वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
नमोऽस्तु नालीकनिभाननायै नमोऽस्तु दुग्धौदधिजन्मभूम्यै ।
नमोऽस्तु सोमामृतसोदरायै
नमोऽस्तु नारायणवल्लभायै।।१२।।
आई जगदंबा महालक्ष्मीला वंदन करताना जगद्गुरु श्री आदि शंकराचार्य स्वामी महाराज विविध विशेषणांचा उपयोग करीत आहेत.
त्यातून आई जगदंबेच्या विविध गुणांचे वैभव विशद करीत आहेत.
आचार्य श्री म्हणतात,
नमोऽस्तु नालीकनिभाननायै- नालीक शब्दाचा अर्थ आहे कमळ. नाल म्हणजे पोकळ दांड्यावर ते फुलत असल्यामुळे त्याला नालीक असे म्हणतात. निभ अर्थात प्रमाणे, सारखे तर आनन म्हणजे मुख.
अर्थात जिचे मुख कमळाप्रमाणे अतीव आकर्षक आहे अशी.
तिला नमोऽस्तु अर्थात नमस्कार असो.
नमोऽस्तु दुग्धौदधिजन्मभूम्यै- दुग्ध म्हणजे दूध. उदधि म्हणजे सागर. दुधाचा सागर अर्थात क्षीरसमुद्र ही जिची जन्मभूमी आहे अशी.
समुद्रमंथन कथेचा संदर्भ यात घेतलेला आहे. उद म्हणजे पाणी आणि धी म्हणजे साठा या अर्थाने सागराला उदधी म्हणतात. पृथ्वीवर आढळणाऱ्या सामान्य पाण्याच्या समुद्राप्रमाणे पुराणात दुग्धसागर,दधिसागर इक्षुसागर,मधुसागर यांचेही वर्णन आहे.
यापैकी क्षीर म्हणजे दुधाच्या सागरातून समुद्रमंथन प्रसंगी महालक्ष्मी प्रगटली आहे. त्यामुळे सागर ही तिची जन्मभूमी.
नमोऽस्तु सोमामृतसोदरायै- याच सागर मंथनातून सोम म्हणजे चंद्र आणि अमृत निघाले असल्याने त्यांची सोदरा अर्थात एकाच उदरातून जन्माला आलेली, बहीण.
नमोऽस्तु नारायणवल्लभायै- भगवान श्री नारायण यांची वल्लभा अर्थात प्रियतमा असणाऱ्या आई महालक्ष्मीला नमस्कार असो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
March 21, 2020
केरळातल्या शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश असावा की नसावा यावरुन देशात युद्धसदृष परिस्थिती आहे. स्त्रियांना या मंदिरात प्रवेश नाही, ही काही कालच घडलेली घटना नाही. गेली ८०० वर्ष ही प्रथा सुरू आहे. अधे मध्ये ह्या प्रथेला किरकोळ विरोध व्हायचा, पण पूर्ण देशभर त्याचे पडसाद उमटलेले माझ्या स्मरणात नाहीत. मग आताच अशी बेबंद परिस्थिती निर्माण होणं हा निवडणुकांच्या मोसमात काही किंवा सर्वच राजकारणी पक्षांच्या स्वार्थाचा भाग आहे, हे ओळखणं अवघड नाही.
February 17, 2019
म्हातारपण म्हणजे दुसऱ्यांदा जगण्याचे बालपण. आपले वय जसे जसे वाढत जाईल तसे तसे आपला विचार करण्याचा दर्जा हा वाढतच गेला पाहिजे. म्हातारी माणसं नेहमी म्हणत असतात की आम्ही इतके पावसाळे पाहिले आहेत. पण पावसामुळे तुमच्यात किती पाणी शिरले आणि त्या पाण्याचा तुम्ही किती आणि कसा उपयोग केला यावर तुम्ही अनुभवापासून काय काय शिकला ते ठरत असते.
December 20, 2024
२६ जानेवारी २०१४ ला पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेल्या डॉ. ज्येष्ठराज भालचंद्र जोशी यांचा जन्म १९४९ साली सातारा जिल्ह्यातील ‘मसूर’ला झाला. नंतर ते कराडच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातून बीएस्सी करून मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून रसायन अभियांत्रिकीत बीई, एमई व पीएच.डी. झाले. त्यानंतर त्यांनी तेथेच अध्यापनाचे काम सुरू केले.
October 2, 2023
सध्या मोबाईलच्या युगात बरेच जण प्रत्यक्ष भेटणं कमी आणि सोशिअल मीडियावर चॅटिंग करण्यात जास्त वेळ घालवतात तसेच सध्याच्या जगात बरेच जण स्वतःचा खूप विचार करतात पण आपल्या नात्यांना फारस महत्व देत नाही. सध्या सोशिअल मीडियाच्या जमान्यात आणि धावत्या आयुष्यात महत्वाची असणारी नाती हरवत चालली आहेत.त्याच नात्यांना जपण्यासाठी काही खास टिप्स येथे देत आहे…
March 10, 2019
पर्यटन हा तर कोकणाचा श्वास! ढगांनी गच्च भरून ओथंबून येणारं आकाश आणि सहस्रावधी जलकुंभांनी अभिषेक करावा असा अनिर्बंध कोसळणारा पाऊस कोकणातला पर्यटन हंगाम खऱ्या अर्थानं जिवंत करतो. ओसंडून वाहणारे धबधबे, धडकी भरवणारे पण डोळ्याचं पारणं फेडणारे घाटरस्ते, थंड हवेची ठिकाणं आणि स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांना खुणावतात.
April 4, 2023
भारतीय रेल्वेमधील स्वप्ननगरीचं सुख अनुभवावयाचं असेल, तर ‘पॅलेस ऑन व्हील्स’ या एकमेव अतिश्रीमंत गाडीचं नाव समोर येतं. देशाचा अभिमान, असलेली ही राजेशाही गाडी नवी दिल्लीहून निघून पुढे जैसलमेर, जयपूर, जोधपूर, रणथंबोर (व्याघ्र प्रकल्प), आग्रा असा आठ दिवसांचा आरामदायी व आनंददायी प्रवास घडविते. या गाडीचा प्रत्येक डबा म्हणजे पारंपरिक भारतीय पद्धतीनं सजविलेला महालच आहे.
June 7, 2022
प्रत्येक लेखकाला आपल्या प्रत्येक कथेविषयी खूप जिव्हाळा वाटत असतो . निवांत क्षणी कथेचा प्रवास आठवत राहतो . असाच एक प्रवास स्मरणात आहे माझ्या . ती कथा आहे ड्रॉवर या शीर्षकाची . ती प्रसिद्ध झाली होती अंतर्नाद सप्टेंबर , १९९९ या मासिकात .
August 22, 2025
बर्याच दुकानांमधे या सेलसाठी दुकानाची नेहमीची व्यवस्था (arrangement) बदललेली असते. काही दरवाजे बंद केलेले असतात. काही isles देखील बंद केलेल्या असतात. त्यामुळे लोकांचा लोंढा एका ठरावीक दिशेने आणि ठरावीक ठिकाणी वळवता येतो आणि एकंदर गोंधळ थोडा कमी होतो. शिवाय सेलमधल्या सर्व वस्तू एक दोन दिवस आधीपासूनच मांडून ठेवलेल्या असतात. प्रत्येक दुकानामधे विविध कंपन्यांच्या सेल मधे लावलेल्या वस्तू देखील मर्यादित प्रमाणातच असतात. बरेच लोक सेलच्या एक दोन दिवस आधी वेगवेगळ्या स्टोअर्समधे फिरुन आपल्याला हव्या असलेल्या वस्तू नेमक्या कोणत्या isle मधे, कोणत्या शेल्फवर, कुठे ठेवल्या आहेत, ते प्रत्यक्ष बघून येतात. त्यामुळे या अशा अनुभवी व जाणकार लोकांकडे काय काय घ्यायचे आहे त्याची पक्की यादी असते, कोणत्या दुकानात कोणी किती वाजता जायचं याचं प्लॅनिंग असतं आणि प्रत्येक स्टोअरची अंतर्गत मांडणी आणि आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंची नेमकी ठिकाणं असलेला नकाशा असतो. वर्षानुवर्षांचा अनुभव असलेली बुजुर्ग मंडळी अशा जय्यत तयारीनिशी, पहाटेपासून एखाद्या मंदिराच्या दाराशी भाविकांनी भक्तीभावाने गर्दी करावी, तशी थंडी वार्याची पर्वा न करता तिष्ठत उभी असतात. मग सहा वाजता स्टोअर्सची दारं उघडली, की ‘हर हर महादेव’ असं ओरडून मावळे जसे किल्याची दारं फोडून मोगलांवर तुटून पडायचे, तसे हे खरेदी बहाद्दर सेलच्या वस्तूंवर तुटून पडतात.
मला आजूबाजूला काय होतंय ते समजायला दोन तीन मिनीटे लागली. तोपर्यंत लोकांनी shopping carts घेऊन, आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या शेल्फसपर्यंत धाव घेऊन, आपल्याला हव्या त्या वस्तूंनी आपापल्या carts भरायला सुरुवात केली होती. कुठे भांबावण्य़ाचा, अडखळण्याचा, कुणाला काही विचारण्याचा प्रश्नच नव्हता. सगळा नकाशा आणि strategy प्रत्येकाच्या डोक्यात पक्की होती. माझ्यासारखे व देशमुखांसारखे त्या स्टोअरमधे पहिल्यांदाच प्रवेश करणारे फारच थोडे असावेत. मी कशी बशी एक shopping cart मिळवली आणि electronics चा विभाग शोधत निघालो. लोकांची गर्दी आणि त्यांच्या carts नी isles भरून गेल्या होत्या. त्यातून वाट काढता काढता, दादर स्टेशनच्या ब्रीजवरून, ऐन गर्दीच्या वेळी गाडी पकडायला चालल्याचा भास होत होता. आपल्या देहयष्टीला न शोभणारी आणि भौतिकशास्त्राचे नियम खोटे पाडणारी चपळाई दाखवत, माणसं शॉपिंग करता करता पळत होती (किंवा पळता पळता शॉपिंग करत होती).
सगळी माणसं एकमेकांना शह, काटशह दिल्याप्रमाणे, एकमेकांना चकवत इकडून तिकडे पळत होती. सगळी धावपळ आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंपर्यंत इतरांच्या आधी लवकरात लवकर पोहोचण्याची होती. सुदैवाने मला एक सेल्सगर्ल लगबगीने बाजूने जाताना दिसली आणि त्या गोंधळात तिचे लक्ष वेधून घेऊन, “DVD players कुठे ठेवले आहेत”, हे विचारण्यात मी यशस्वी ठरलो. तिला लगेच ‘पावनं दुसर्या गावचं दिसंतय’ हे लक्षात आलं. दुकानाची दारं उघडून पूर्ण पाच मिनिटं झाली आणि तरीही माझी cart अजूनही रिकामीच आहे, हे बघून तिला बहुतेक माझी दया आली आली असावी. तिने चक्क त्या गर्दीतून वाट काढत, मला DVD players ठेवलेल्या शेल्फपर्यंत पोहोचवलं. तिचे आभार मानून मी उरलेल्या DVD players मधून मला हवा असलेला DVD player उचलला. नंतर पुढच्या दहा पंधरा मिनीटांत आणखीन हव्या असलेल्या दोन तीन वस्तू शोधल्या. देशमुखांचा पत्ता नव्हता. एवढया मोठया दुकानात आणि एवढया गर्दीत त्यांना शोधणं सोपं नव्हतं.
माझं त्या दुकानातलं शॉपिंग संपलं होतं. त्यामुळे मी check out करण्यासाठी एका काऊंटर पुढच्या रांगेत जाऊन उभा राहिलो. एवढयात मला निसर्गाच्या हाकेला ओ देण्याची वेळ आली. पहाटे तासभर थंडीत कुडकुडत उभं राहिल्यामुळे मला आता rest room ला जाण्याची आवश्यकता वाटू लागली होती. त्यामुळे check out रांगेमधला माझा नंबर सोडून मी rest room शोधायला निघालो. इकडे तिकडे शोधता शोधता आणि गर्दीतून माझी cart ढकलत मार्ग काढता काढता, पुन्हा एकदा एक सेल्समन देवदूतासारखा समोर आला. मी त्याला थांबवून, rest room ला जाण्याचा रस्ता विचारला. आजूबाजूची पाच दहा माणसं आपली धावपळ विसरून उभी राहिली आणि त्यांनी आश्चर्याने आपादमस्तक मला न्याहाळून घेतलं. ‘हा कोण अडाणी आता शॉपिंग सोडून rest room शोधत फिरतोय’, असा भाव त्यांच्या चेहर्यावरून उतू जात होता. एखादी पूर्ण दिवस भरलेली आणि प्रसुतीच्या वेदना सुरू झालेली बाई देखील अशा वेळी शॉपिंग सोडून हॉस्पिटलमधे जायला तयार होणार नाही, याबद्दल माझी खात्री पटली.
दोन चार मिनिटे मी त्या गोंधळात rest room शोधायची खटपट करून पाहिली. शेवटी तो नाद सोडून मी पुन्हा check out च्या रांगेमधे उभा रहायला गेलो आणि मला माझी चूक समजली. तेवढया त्या चार पाच मिनिटांत माझ्यापुढे जवळजवळ वीस पंचवीस लोकांची रांग तयार झाली होती. असे बारा check out काउंटर्स होते आणि प्रत्येका पुढे अशाच मोठमोठाल्या रांगा लागल्या होत्या. म्हणजे दुकान उघडल्यापासून मोजून पंधरा वीस मिनिटांच्या आत carts भरभरून शॉपिंग करून लोक check out करायला लागले होते. एवढा जीवाचा आटापिटा करून शॉपिंग संपवून बाहेर पडायचं कारण म्हणजे दुसर्या दुकानात जाऊन शॉपिंगचा पुढचा टप्पा सुरू करायचा होता.
– डॉ. संजीव चौबळ
March 30, 2016
आपल्याला ना सगळंच हवं असतं. काही ना काही सांगायचं असतं, समोरच्याने ते ऐकायला हवं असतं, नाही ऐकलं तर आपल्याला ते फार लागतं, मग आपल्याला समजून घेत नाहीत म्हणून आपण गळा काढतो. एकूण काय तर सगळ्या दोऱ्या आपल्या हातात हव्या असतात.
January 16, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti