वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
चन्द्रोदभासितशेखरे स्मरहरे गड्गाधरे शंकरे सर्पैभूषितकण्ठकर्णविवरे नेत्रोत्थवैश्वानरे ।
दन्तित्वत्कृतसुन्दराम्बरधरे त्रैलोक्यसारे हरे मोक्षार्थ कुरु चित्तवृत्तिमखिलामन्यैस्तु किं कर्मभिः ॥१२॥
भगवान शंकरांच्या दिव्य वैभवाला आपल्या समोर ठेवताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज शब्दरचना करतात,
चन्द्रोदभासितशेखरे - मस्तकावरील चंद्रामुळे ज्यांचा शिरोप्रदेश उजळून निघाला आहे असे. मस्तकावरील चंद्र हे वेगळ्या अर्थाने मस्तकाच्या उज्ज्वलतेचे, शांततेचे, प्रसन्नतेचे, शीतलतेचे प्रतीक.
स्मरहरे - स्मर म्हणजे भगवान मदन. श्रीशंकरांनी मतदानाचे दहन केल्यामुळे त्यांना स्मरहर म्हटले आहे.
गड्गाधरे - मस्तकावर गंगा धारण करून संपूर्ण जगाच्या पावनतेची धुरा ज्यांनी आपल्या मस्तकावर घेतली आहे असे,
शंकरे - शम् म्हणजे कल्याण. संपूर्ण विश्वाचे कल्याण करतात ते भगवान शंकर. सर्पैभूषितकण्ठकर्णविवरे - ज्यांनी गळ्यात मोत्यांच्या माळांप्रमाणे आणि कानात कुंडलां प्रमाणे सर्प धारण केले आहेत असे.
नेत्रोत्थवैश्वानरे - ज्यांच्या तृतीय नेत्रातून विश्व विनाशकारी प्रलयाग्नी प्रगट होतो असे,
दन्तित्वत्कृतसुन्दराम्बरधरे - दंती म्हणजे हत्ती. त्याची त्वचा म्हणजे कातडे ज्यांनी वस्त्र प्रमाणे गुंडाळले आहे असे. गजासुर नावाच्या राक्षसाला सोबत झालेल्या संग्रामाचा इथे संदर्भ आहे.
त्रैलोक्यसारे- संपूर्ण त्रैलोक्याचे सार असणाऱ्या,
हरे- भक्तांची दुःखे दूर करणाऱ्या,
मोक्षार्थ कुरु चित्तवृत्तिमखिलामन्यैस्तु किं कर्मभिः - हे भगवान शंकरा ! माझ्या मोक्षासाठी कारणीभूत ठरणारी माझी वृत्ती निर्मल करा. अन्य स्तवनाचा अर्थात मागणीचा उद्देश तो काय?
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
भगवान शंकरांच्या पंचतुंड स्वरूपाला जगद्गुरु आद्य शंकराचार्य स्वामी महाराज वंदन करीत आहेत.
भगवान शंकरांच्या अनेक लीलांपैकी एक परम वैभवशाली लीला म्हणजे हलाहल प्राशन.
भगवान शंकरांच्या पंचवक्त्र स्वरूपाचे अधिक गुणवर्णन करताना आचार्यश्री म्हणतात….
भगवान शंकर यांच्या नावाचा उल्लेख निघाल्या बरोबर प्रत्येक भक्ताच्या मनात येणारी प्रथम गोष्ट म्हणजे द्वादश ज्योतिर्लिंग. भारतीय संस्कृतीमधील महान उपास्य स्थाने असणाऱ्या या बारा स्थानांचे महत्त्व सांगणारे स्तोत्र आहे द्वादशलिंगस्तोत्र.
भगवान श्री शंकरांच्या अद्वितीय वैभवाचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात….
द्वादश ज्योतिर्लिंगातील दुसरे स्थान म्हणजे श्रीशैल पर्वतावर असणारे श्री मल्लिकार्जुन क्षेत्र. या स्थानाला दक्षिण कैलास असे देखील म्हणतात.
भगवान शंकरांच्या या दिव्य स्वरूपाला वंदन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात…
आपल्या विश्व प्रसिद्ध असणाऱ्या मेघदूतम् नावाच्या काव्यात महाकवी कालिदास यांनी ज्या नगरीचे वर्णन करताना, वाट वाकडी करावी लागली तरी चालेल पण या नगरीला निश्चित जा.
स्तोत्राच्या शेवटी मी जे काही करतो, अर्थात या देह मन बुद्धी च्या द्वारे जे जे काही घडते, त्या सगळ्यांच्या मध्ये माझ्या अज्ञानामुळे ज्या ज्या चुका होतात, त्या सगळ्यां करिता आचार्यश्री एकत्र क्षमायाचना करीत आहेत. ते म्हणतात,
Copyright © 2025 | Marathisrushti