वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
एका देवळात एका रिसायकल होणार्या तेल, फुलं, नारळ वगैरेची आर्थिक उलाढाल बघाल तर थक्क व्हाल. एका शनिवारी एका देवळात किमान १०० लिटर तेल वापरलं गेलं आणि रिसायकल झालं तर देशभरात किती लिटर तेल वाया जात असावं? आणि त्यावर किती जण “माया” कमवत असावेत? हीच गोष्ट दूध, फुलं यांचीसुद्धा !!
November 29, 2017
‘गुरुबिन मोरा कौन अधारो’ असे एक वचन आहे. गुरू हाच जीवनाचा आधार असतो हे यातून प्रतित होते. आपण कोणत्याही क्षेत्रात असलो तरी गुरूची आवश्यकता असते. शिष्याच्या कल्याणाप्रती आयुष्य वेचणार्या, त्याला खर्या अर्थाने घडवणार्या गुरूंच्या ऋणातून मुक्त होणं कठीण. पण किमान कृतज्ञता तरी व्यक्त करायला हवी. त्यासाठी उत्तम मुहूर्त असतो गुरूपोर्णिमेचा. ही पोर्णिमा नवी दिशा, नवे संकेत, कृतज्ञता देऊन जाते.
July 25, 2010
१९७५ साली साहाय्यक दिग्दर्शक झाल्यावर शांतारामबापूंनी त्यांना दिग्दर्शनाची संधी दिली. १९७६ साली जगदीश खेबुडकरांचे संवाद व गीते आणि राम कदम यांचे संगीत असलेला ‘झुंज’ हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला.
June 27, 2022
१ जानेवारी २०१० ला ‘कुतूहल’ या सदराची जबाबदारी ‘समन्वयक’ म्हणून माझ्याकडे आली. माझ्या अगोदरच्या समन्वयकांनी या सदराला उच्च स्वरूप आणले होते त्यामुळे माझी जबाबदारी वाढली होती. वयाच्या ७८ व्या वर्षी वर्षभर सोमवार ते शनिवार सदर सातत्याने चालविण्याची जबाबदारी स्वीकारताना तेही माझ्या वैद्यकीय व्यवसाय व इंडस्ट्रियल अॅटॅचमेण्टस् सांभाळून- जरा विचार करावा लागला; पण प्रकृतीने उत्तम साथ दिली.
April 9, 2023
शीतल गारवा, तृप्तता देणारा, आयुष्याला उभारी देणारा ‘वसंतराजा गुलमोहर’. कधी कधी निसर्गात घडणा-या काही मोहक गोष्टी खूप काही सुखाचे क्षण आपल्या ओंजळीत सहजपणे टाकतात.
November 25, 2024
भारतीय प्रशासनातली वाढती लाचखोरी रोखायसाठी, केंद्र सरकारने अंमलात आणलेले कायदे आणि उपाययोजना अयशस्वी ठरल्या आहेत. लाच देणाऱ्यांना कायद्याचे संरक्षण दिल्यास, लाचखोरावर जरब बसेल, त्यासाठी कायद्यात दुरुस्ती करायची सूचना आहे. निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचा हा लेख खास मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी…..
April 8, 2011
जिद्द, नियोजन, सर्व पातळ्यांवरची तत्परता, दर्जाबाबत तडजोडीला संपूर्ण फाटा, असा तोल साधत, १८५३ सालात सुरू झालेल्या भारतीय रेल्वेनं पहिल्या, पंचवीस वर्षांत ६,५४१ मैल मार्ग पूर्ण केले. त्यानंतरच्या पंचवीस वर्षांत, म्हणजे रेल्वेबांधणीला पन्नास वर्षं होता होता २३,६२७ मैल रेल्वेमार्ग पूर्ण करत ही संख्या जवळपास चौपटीच्या आसपास आणून ठेवली. रेल्वेला ६० वर्षं होता होता, १९१३ च्या सुमाराला व्हिक्टोरिया टर्मिनस (VT) आणि आताचं छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) पासून पेशावर, कलकत्ता, मद्रास, कोचिनपर्यंत गाड्या धावू लागल्या. हिंदूंचं बनारस, मुघलांचं लाहोर, ब्रिटिशांचं बंगलोर, अशा विविध धार्मिक आणि सांस्कृतिक भागांतून ह्या गाड्या जात असत. या सर्व गाड्यांचे प्रवास भारतभर पसरलेल्या ५ लाख खेड्यांजवळून घडत होते आणि भारतीय मनं रेल्वेच्या अस्तित्वामुळे भारावली होती.
आज भारतीय रेल्वे भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. केवळ रेल्वेमुळेच इथल्या दऱ्याखोऱ्यांचं, विविधतेनं नटलेल्या सौंदर्याचं दर्शन प्रत्येकाला सुखाचं आणि सुलभ झालं आहे. रेल्वेच्या इतिहासाकडे वळून बघताना, ब्रिटिशांनी सातासमुद्रापार येत भारतामध्ये ज्या प्रकारे रेल्वे बांधली ते सारे व्याप अवाढव्य व विस्मयकारकच आहेत हे जाणवत राहतं. दूरदृष्टीच्या धोरणी ब्रिटिशांनी भारतभर रेल्वेची संपूर्ण बांधणी सफलतेने व्हावी म्हणून अनेक संस्थाशी करार केले. ह्या बांधणीत ब्रिटिश ठेकेदार जास्त प्रमाणात होते, पण जमशेटजी दोराबजी, मोहम्मद सुलतान, असे भारतीयही सहभागी होते. १८५९ ते १९०० या वर्षांमध्ये या बांधणीत सहभागी झालेल्या कामगारांची संख्यादेखील सुमारे १,८०,६०१ ते २,२१,२५३ इतकी अफाट होती. या कामगारांना दिला जाणारा कामाचा मोबदला तुटपुंजा होता, जीवन कष्टमय होतं, भवितव्यात त्यांना बरे दिवस येण्याची सुतराम शक्यताही नव्हती; तरीही, रेल्वेबांधणीचं काम मात्र अहोरात्र सुरूच होतं. संपूर्ण भारतात १८५३ ते १९०० ह्या ४७ वर्षांच्या काळात एकूण ८० लाख लोक रेल्वे बांधणीच्या कामात गुंतले होते. हे खरंच अफाट व विस्मयजनक आहे. रेल्वेबांधणी देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेणं हेच ब्रिटिशांचं ध्येय होतं, त्या एकाच विचारानं ते पछाडलेले होते आणि हे अपूर्व उद्दिष्ट त्यांनी अखेर यशस्वीही केलं.
कामाचे काही तक्ते
मद्रास रेल्वे (कोची) : वर्ष १८५७
| सेवेतील कामगार संख्या | एकूण खर्च | माती काम क्युबिक यार्ड | विटांचे काम क्यूबिक यार्ड |
| ६,४७,५९६ | २३,७६,६३१ | ७,५५,३५४ | ९,०,०३९ |
बोर (खंडाळा) व (कसारा) थळ घाट
| इ.स. | अंतर (मैल) | सेवेतील कामगार संख्या |
| १८५६ | १६ मैल | १०,००० |
| १८५६ | १० मैल | ५,००० |
निवडक मोठे पूल
| पूल | नदीचे नाव | बांधणीचा काळ | कामगार संख्या |
| इंप्रेस | सतलज | १८७३-१८७८ | ५००० पेक्षा जास्त |
| डुफरेन | गोमगेस | १८८१-१८८६ | ७००० |
| शेर-शहा | चिनाब | १८८०-१८९० | ५००० |
| बेजवाडा | कृष्णा | १८९०-१८९३6६ | ६००० |
October 19, 2022
गजेंद्र अहिरे हा माणूस आरपार क्लिष्ट आहे. भावनांचे जंगल तयार करायचे, त्यांत प्रेक्षकांना सोडायचे आणि हळूच हातातून हात काढून घ्यायचा. मग तुम्ही वल्हवत बसा होडी- नशिबी असेल तर मिळेल किनारा अन्यथा आहेच चारही बाजूला पाणी- नाकातोंडात जाऊन गुदमरायला लावणारे.
February 2, 2023
गांव’ या शब्दाचा जन्म कसा झाला, त्याचा अर्थ काय या प्रश्न मला सतावत होते. शब्दांचा मागोवा घेणे ही माझी खोड आहे आणि त्यानुसार मी या शब्दांचा माग काढत गेलो आणि मोठी विलक्षण माहिती माझ्या हाती आली..
July 30, 2016
रोटी आणि चपाती यांच्यात आणखी काही फरक आहेत.
भाकरीचे पीठ भिजवताना त्यात तेल घालावे लागत नाही कारण ते हाताला चिकटतंच नाही.
जिथे चिकटपणा जास्त तिथे चिकटपणा कमी करण्यासाठी आपण तेल वापरत असतो.
चपातीचे पीठ (म्हणजे कणिक) मळताना, मात्र त्यात तेल घालावे लागते. म्हणजे ते हाताला चिकटत नाही. तेल घालून देखील कणिक हाताला चिकटतेच. एवढा चिकटपणा या गव्हामधे आहे.
हा चिकटपणा येण्याचे कारण ?
त्यातील ग्लुटेनीन नावाचे द्रव्य. अतिशय चिकट असते.
आणि हे ग्लुटेनीन जसे हाताला चिकटते तसे आतड्यांनाही चिकटून बसते. केवळ आपणच चिकटते असे नाही तर, मागून येणाऱ्या चांगल्या अन्नालापण चिकटवते. मग ट्रॅफीकजाम होणारच !
एक गाडी अडकली की मागून येणारी सर्व वाहाने सुस्थितीत जरी असली तरी, काहीही हालचाल करू शकत नाही. जैसै थे पोझिशनमधे राहातात. अगदी तसेच होते, या ग्लुटेनीनच्या चिकटपणामुळे. म्हणजेच गव्हामुळे !
आतड्याला चिकटलेला हा ग्लुटेनीनचा भाग मागून येणाऱ्या सकस अन्नाला पण पुढे जाऊ देत नाही. म्हणजे आपण स्वतःही गडबड करतो, आणि दुसऱ्यालाही चांगले काम करू देत नाही.
या सर्व दुर्गुणांमुळे आज पाश्चात्य देशात ग्लुटेन फ्री डाएट ही संकल्पना जोर धरत आहे. त्यांच्या कुत्र्यांना देखील ग्लुटेन फ्री बिस्कीटस बनवू लागले आहेत.
दिवाळीसाठी सुद्धा ग्लुटेन फ्री बिस्कीट खायची ? अशा आशयाची एक जाहीरात आपणदेखील सध्या टीव्हीवर पाहात आहोतच.
बहुतेक पाश्चात्य देश हे थंड हवामानाचे आहेत, त्यांच्याकडे ऊत्पादीत होणाऱ्या पिकांमधे गहू हे मुख्य पिक आहे. हवामान गव्हासाठी पोषक आहे. साहाजिकच उत्पादन जास्त येते.
करायचे काय एवढ्या धान्याचे ?
मुळात लोकसंख्या कमी. मग खाऊन खाणार तरी किती ? उरलेला गहू पशुधनाचे पोषण करण्यासाठी, मांस आणि चरबी वाढवण्यासाठी वापरला जातो, अगदी धान्याची दारू, त्याच्या पीठाची दारू, कुजुन फुकट गेलेल्या गव्हाची दारू इ.इ. अनेक प्रकारची व्हिस्की ब्रॅण्डी रम असे उत्पादन करून देखील गहू उरतो.
त्यांच्या देशातील सरकारला त्यांच्या आरोग्याची खूप काळजी असल्याने ग्लुटेन फ्री डाएटची संकल्पना रूजली. आणि उरलेला गहू, शाकाहारी बहुलोकसंख्या असलेल्या आणि लोकांवर नियंत्रण नसलेल्या, देशात खपवायला सुरवात केली. जनतेची काळजी नसलेल्या सरकारला विदेशी प्रशिक्षण दिल्यावर ते सरकार नमते घेते, असा पुर्वानुभव असल्याने अशा देशात सरकारी वरदहस्ताने गहू प्रमोशन मोहीम सुरू झाली. त्यामुळे आमचे माजी कृषीमंत्री यांनी, शेतकऱ्यांनी शेती सोडून मद्य निर्मिती करावी, असा सल्ला दिल्याचे आपणाला स्मरत असेलच.
आणि.......
घरच्या उत्पादीत तांदुळाऐवजी विकतचा गहू आणून खाण्याला आम्ही भारतीय स्वतःला धन्य समजू लागलो.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
25.10.2016
October 25, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti