(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गृहिणीची अर्थनीती

    भारतीय ‘गृहलक्ष्मी’ मग ती कुठल्याही जाती धर्माची असो, शहरी अथवा ग्रामीण असो. शिक्षित वा अशिक्षित असो. ती मर्यादित जिन्नस वापरून उत्तम स्वयंपाक करते आणि कुटुंबाला पोटभर खाऊ घालते. तशीच मर्यादित उत्पन्नामध्ये घर चालवते. घरखर्च भागवते आणि वर बचतही करते.

      September 6, 2023


  • समांतर व व्यावसाईक चित्रपटाचा समन्वय- बिमल रॉय

    ज्या काळात हिंदी चित्रपटात कलात्मक सिनेमा हे नावही अस्तित्वात नव्हते त्याकाळात व्यावसायिक व कलात्मक चित्रपटाचा उत्तम संगम ज्याने साधला ते होते बिमल रॉय. त्यांनी मी कलात्मक चित्रपट निर्मितो असा धिंडोरा पिटला नाही.ते म्हणत मी अतिशय सामान्य कलाकार आहे.मला वाटते कि मी हे  लोकांसमोर मांडावे असे वाटते,  ते मी चित्रपटामधून मांडतो.

      August 6, 2022


  • चिनी ड्रॅगनचे आव्हान आणि भारताचे प्रत्युत्तर

    चीनने संरक्षणावरील तरतूद सात टक्क्यांनी वाढवली. त्यामुळे संरक्षण खात्यावरील तरतूद तब्बल १५२ अब्ज अमेरिकन डॉलर एवढी झाली आहे. ही रक्कम भारत संरक्षणावर करत असलेल्या तरतुदीच्या तिप्पट आहे.अमेरिका आणि चीनच्या वादात चीनने संरक्षणावरील तरतूद वाढवली असली तरी ती भारताच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे.

      May 9, 2017


  • दररोज कांदा खाल्ल्याचे फायदे

    भारतीय आहार पद्धतीमध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे कांदा. कांदा जेवणाला स्वादिष्ट करण्याबरोबरच यात उत्तम औषधी गुणधर्म आढळतात. म्हणून अनेक आजारांवर कांदा रामबाण उपाय ठरतो. एक नजर टाकुयात कांदा खाण्याच्या फायद्यावर...

    कांदा हा थंड असल्याने जर तुमच्या हातावर जळहळ होत असेल तर त्या जागेवर कांदा लावा.

    जर तुम्हाला मुतखड्याचा त्रास असेल तर दररोज सकाळी दोन चमचे कांद्याचा रस प्या.

    जर एखादा किडा तुमच्या शरिरावर चावला असेल तर त्यावर लगेच कांद्याने घासा. याने तुम्हाला लवकर आराम मिळेल.

    सर्दी आणि घशातली खवखव दूर करण्यासाठी नेहमी कांद्याचा रस प्यावा.

    जर तुम्हाला कुत्र्याने चावले असेल तर त्या जखमेवर कांदा कापून मधात मिक्स करून लावा. त्याने विषाचा प्रभाव कमी होतो.

    कांदा खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास सहजरित्या दूर केला जाऊ शकतो.

    मासिक पाळीदरम्यान पोट दुखत असेल किंवा पाळी अनियमित असेल तर कांद्याचं सेवन करावं.

    कांदा खाल्ल्याने ब्लड प्रेशर नियंत्रित केला जाऊ शकते. शिवाय कोलेस्ट्रॉलही नियंत्रित ठेवता येतो.

    ज्यांच्या शरीरात रक्त कमी आहे. त्यांच्यासाठी कांदा रामबाण आहे. दररोज कांदा खाल्ल्याने हृदयाचे आजारांचा धोका कमी होतो.

    मुलांना अतिसार झाल्यास कांदा बारीक करून त्यांच्या नाभिवर लावा किंवा कपड्यात बांधून पोटावर लावा.

    कांद्याच्या सेवनाने चांगली झोप येते आणि कॅलरी बर्न होण्यासही कांद्याची मदत होते.

    तणाव कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात कांद्याचा वापर करावा.

    मधुमेहग्रस्त लोकांनी तसेच ज्यांचे केस गळतात त्यांनी कांदा खावा.

    कांदा खाल्ल्याने शुक्राणू संख्या आणि गुणवत्ता वाढते.

      April 22, 2017


  • टॅक्स डिडक्टर्स अकाऊंट नंबर

    टॅक्स डिडक्टचा काय खाते क्रमांक म्हणजेच टॅन. पॅन स्वतःच्या आयकरासाठी असतो. तर टॅक्स डिडक्शन अकाऊंट नंबर आपण खर्च करत असलेल्या व्यक्तिंची माहिती देण्यासाठी असतो. पॅन प्रत्येक व्यक्तीला कंपल्सरी असतो. कमवत्या व्यक्तीकडे पॅन असलाच पाहिजे. पण टॅन सर्वांसाठी गरजेचा नाही.

      June 21, 2018


  • श्री अन्नपूर्णाष्टकम् – ५

    दृश्यादृश्यविभूतिवाहनकरी ब्रह्माण्डभाण्डोदरीलीलानाटकसूत्रभेदनकरी विज्ञानदीपाङ्कुरी ।
    श्रीविश्वेशमनःप्रसादनकरी काशीपुराधीश्वरी
    भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥५॥

    आई जगदंबेचे वैभव वेगवेगळ्या अंगाने प्रस्तुत करताना आचार्यश्री म्हणतात,

    दृश्यादृश्यविभूतिवाहनकरी- दृश्य अर्थात दिसू शकणारे आणि अदृश्य अर्थात न दिसणारे. आपल्या आकलनाच्या ही पलीकडे असणारे. विभूती अर्थात वैभव. संपत्ती. आपल्या भक्तांना जी दृश्य आणि अदृश्य स्वरूपातील अद्वितीय वैभव प्रदान करते त्या आदिशक्तीला दृश्यादृश्यविभूतिवाहनकरी असे म्हणत असतात.

    ब्रह्माण्डभाण्डोदरी- या संपूर्ण ब्रह्मांडांचा पसारा जिच्या उदरात राहतो, अर्थात जिच्या उदरातून जन्माला येतो त्या विश्वजननीला ब्रह्माण्डभाण्डोदरी असे म्हणतात.

    लीलानाटकसूत्रभेदनकरी- या संपूर्ण जगाच्या संचालनासाठी जसा एखादा कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करणारा आपल्या हातातील दोऱ्यांचा वेगवेगळ्या उपयोग करतो. हालचाली करतो. भेद म्हणजे बदल करतो. त्यानुसार खालील बाहुल्यांना आपल्या तालावर नाचवतो. त्याप्रमाणे विश्वाचे संचालन करणारी.

    विज्ञानदीपाङ्कुरी- विज्ञान अर्थात विशेष ज्ञान. ब्रह्मज्ञान. त्याचा दीपाचा अंकुर असणारी. अर्थात जिच्या आधारावरच ब्रह्मज्ञान उजळते अशी. समाधीदायक कुंडलिनी शक्ती स्वरूपिणी.

    श्रीविश्वेशमनःप्रसादनकरी- भगवान श्री विश्वनाथांच्या मनाला अत्यंत आनंद प्रदान करणारी.

    काशीपुराधीश्वरी- काशीनगरीची सम्राज्ञी.

    भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी- सकल कृपेचा आधार असणाऱ्या हे माते अन्नपूर्णे मला भक्ती, ज्ञान,वैराग्यरूपी भिक्षा प्रदान कर.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      March 2, 2020


  • मुळा

    भारतात मुळा कोणाला आवडत नाही? कारण मुळ्यातच सगळे चांगले गुणधर्म असतात आणि दुसरे म्हणजे मुळा सर्व जगात कुठेही सापडतो. मुळ्याचे उत्पादन साधारणपणे जर वर्षभर होते तरी पण एप्रिल ते जून व ऑक्टोबर ते जानेवारी महिन्यात विशेष सापडतो. मुळ्याचे बी पेरल्यापासून साधारण ३ ते ७ दिवसांत त्याला उगवण येते व पूर्ण मुळा तयार होण्यास तीन ते चार आठवडे लागतात. मात्र मुळ्याची पानेही फार देखणी दिसतात. मात्र मुळ्याला कीडही लवकर लागते. मुळा तयार केल्यास ती ताजी असल्यास भाजी त्वरीत करता येतात.

      December 20, 2023


  • हिशोब….शुद्ध खाद्यतेलाचा

    मला अजूनही उमगले नाही,..

    शेंगदाणे 80 रूपये किलो होलसेल भावात...

    1 किलो शेंगदाणे तेल गाळायला 3 किलो शेंगदाणे लागतात...हिशोब धरला तर एक किलो शेंगदाणे तेलासाठी रूपये 240...

    3 किलो शेंगदाणे गाळायची वा तेल काढायची मजुरी 30 रूपये ..दहा रूपये एका किलोला.

    मिळणारी शेंगदाणे पेंड / groundnut deoiled cake / खल्ली 2 किलो..ती 20 रूपये किलो....

    एकूणच उत्पादन खर्च 240 अधिक 30 ...बरोबर ...रूपये 270

    एकूण उत्पन्न एक किलो शेंगदाणे तेल साधारणपणे 120 रूपये , शेंगदाणे पेंड 40 रूपये दोन किलोची....टोटल उत्पन्न रूपये 160 रूपये ...

    आता मला सांगा , 270 रूपये धंद्यात लावून 160 रूपये उत्पन्न कोणता महाभाग काढेल....

    तात्पर्य भारतातील सर्वच खाद्यतेल कंपन्या भेसळ करतात पामतेलाची , वापरलेल्या तेलाची , डालडाची , वनस्पती तूपाची अगदी 50 ते 90 % पर्यत .,,.

    कसं राहील आरोग्य चांगलं नागरीकांचे....याचेच transfat बनतात हेच ते विषारी घटक ....

    महात्मा गांधी सांगत ",खेडयाकडे चला , त्याचा गरभीत अर्थ हाच."

    आला ना हिशोब ध्यानात ......शुद्ध ....शुद्ध खाद्यतेलाचा....

    आंधळी अन् बहिरी जनता , बेबस सरकारे अन् बेबस प्रशासन ...

    -- मकरंद

      November 6, 2016


  • डिहायड्रेशन अर्थात शरीरातील पाणी कमी होणे

    उन्हाळ्यात विशेषतः देशावर वा कोरड्या प्रदेशांत होणारा त्रास म्हणजे डिहायड्रेशन अर्थात शरीरातील पाणी कमी होणे हा होय. बाहेरील तापमानाप्रमाणे शरीराचे तापमान बदलणे आणि आपल्याला वातावरणाशी समायोजित ठेवणे याकडे आपल्या शरीराचा नैसर्गिक कल असतो.

      December 28, 2017


  • वेदसार शिवस्तोत्रम् – ११

    विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयाचे एकमेव कारण अशा स्वरूपात आपल्या उपास्य देवतेची आराधना केली जाते.

      August 24, 2020