वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
पाण्याच्या व्यवस्थापनाची अनेक उदाहरणं आपल्याला इंग्रजांचे शासन येण्याच्या आधीपर्यंत ठिकठिकाणी दिसतात. अगदी उत्तर पेशवाईत औरंगाबाद ला बांधलेले ‘थत्ते नहर’ असो, की पुण्याला पेशव्यांच्या काळात केलेली पाणी पुरवठ्याची रचना असो. बऱ्हाणपूर ला आजही अस्तित्वात असलेली, पाचशे वर्षांपूर्वीची पाणी वाहून नेण्याची रचना असो की पंढरपूर – अकलूज रस्त्यावरील वेळापूर गावात सातवाहन कालीन बांधलेली बारव असो. ‘समरांगण सूत्रधार’ ह्या ग्रंथाच्या आधाराने राजा भोज ने बांधलेला भोपाळ चा मोठा तलाव असो... अशी कितीतरी उदाहरणं देता येतील.
वराहमिहिराने आजच्या वैज्ञानिकांसारख्या नोंदी करून ठेवल्या, ज्या महत्वपूर्ण आहेत. त्याने पंचावन्न वृक्ष व वनस्पतींचा अभ्यास करून मांडणी केली आहे. त्याच प्रमाणे त्याने मातीचे वर्गीकरण देखील विस्ताराने केले आहे. ह्या सर्व निरीक्षणांचे निकष ही त्याने मांडून ठेवले आहेत. त्यातील काही आहेत –
1. भरपूर फांद्या व तेलकट साल असलेले ठेंगणे झाडं असेल तर पाणी आढळते.
2. उन्हाळ्यात जमिनीतून वाफा येताना दिसल्या तर पृष्ठ्भागाजवळ पाणी असते.
3. झाडाची एकच फांदी जमिनीकडे झुकलेली असेल तर तिच्या खालील भागात पाणी आढळते.
4. जेंव्हा जमीन गरम झालेली असते तेंव्हा एखाद्याच ठिकाणी ती थंड लागली तर तिथे पाणी असते.
5. काटेरी झाडांचे काटे बोथटलेले असतील तर हमखास पाणी मिळते... वगैरे.
अशी अनेक निरीक्षणे त्याने नोंदवलेली आहेत.
खरी गंमत तर पुढेच आहे.
वराहमिहिराचे हे प्रतिपादन खरं की खोटं, हे ठरविण्यासाठी आंध्र प्रदेशातल्या तिरुपती मधल्या श्री वेंकटेश्वर (एस. व्ही.) विद्यापीठाने सुमारे पंधरा – सोळा वर्षांपूर्वी प्रत्यक्ष विहिरी खोदुन पाहायचे ठरविले. वराहमिहिराच्या निरीक्षणानुसार पाणी मिळण्यास योग्य ठरतील अश्या जागा निवडल्या आणि सुमारे ३०० बोअर घेतले. (बोअरवेल खणल्या). आश्चर्य म्हणजे ९५% ठिकाणी पाणी लागले. अर्थात वराहमिहिराचे निरीक्षण योग्य होते हे सिध्द झाले. मात्र पुढे दुर्दैवाने हा प्रकल्प सरकारी लालफिताशाहीत अडकला आणि तो लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही..!
गढा-मंडला (जबलपुर संभाग) आणि चंद्रपूर या भागात प्राचीन काळापासून गोंडांचं राज्य होतं. अगदी मुगलांना, आदिलशाहीला किंवा कुतुबशाहीला सुध्दा त्यांना जिंकता आलं नव्हतं. मात्र तरीही आपल्या देशात हा प्रदेश म्हणजे मागासलेला मानला गेला. अर्थात खरं चित्र तसं नव्हतं. एक खूप सुरेख हिंदी पुस्तक आहे – ‘गोंड कालीन जल व्यवस्थापन’. यात सुमारे पाचशे ते आठशे वर्षांपूर्वी गोंड साम्राज्यात किती उत्कृष्टपणे पाण्याचं नियोजन केलं होतं याचं वर्णन आहे. या नियोजनाचा फायदा म्हणजे कुठल्याही दुष्काळाची किंवा अवर्षणाची झळ ह्या गोंड प्रदेशाला कधीही लागली नाही.
जबलपुर शहरात गोंड राणी दुर्गावती च्या काळात (अर्थात पाचशे वर्षांपूर्वी) ‘बावन ताल आणि बहात्तर तलैय्या’ बांधले गेले (तलैय्या – लहान तलाव). हे तलाव नुसतेच खोदून बांधले गेले नव्हते तर जमिनीच्या ‘कंटूर’ प्रमाणे त्यांची रचना आहे. काही तलाव तर आतून एक-दुसऱ्याशी जोडले गेलेले आहेत. आज त्यातले अनेक बुजले असूनही उरलेल्या तलावांमुळे जबलपुर मधे, अगदी आज ही पाण्याची पातळी बऱ्यापैकी चागली आहे आणि येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत नाही. मग त्या काळात पाण्याची, शेतीची आणि निसर्गाची काय समृध्दी असेल..!!
याचाच अर्थ, पाण्याचे महत्त्व, पाण्याचा शोध आणि पाण्याचे नियोजन याचे संपूर्ण विकसित तंत्रज्ञान आपल्या जवळ होते. काही हजार वर्षांपासून आपण ते प्रभावी पध्दतीने वापरत होतो. आणि म्हणूनच आपला देश खऱ्या अर्थाने सुजलाम – सुफलाम होता..!
मात्र आपल्यापैकी अनेकांच्या मनावर इंग्रजांचे असे जबरदस्त गारुड आहे की अनेकांना आज ही असे वाटते की आपल्या देशात पाण्याचे महत्त्व ओळखले ते इंग्रजांनी. आपल्याला धरणे बांधायला शिकवले ते इंग्रजांनी..!
दुर्दैवाने आपण आपलं प्राचीन जल व्यवस्थापन विसरलो अन आज पाण्यासाठी आपण त्राही-त्राही करतोय, १४४ कलमं लावतोय, युध्द खेळतोय..!!
आपल्यालाच आपल्या समृध्द ज्ञानाचा, वारश्याचा आणि तंत्रज्ञानाचा विसर पडला तर हे असं होणं अटळ आहे..!!
June 10, 2016
प्रश्नाचे उत्तर सध्याला सर्रासपणे बाळाचे वय दीड- दोन वर्षे होईपर्यंत असे ऐकू येते. कित्येक बालरोगतज्ज्ञ असे मत अहंअहमिकेने मांडत असल्याचे दिसते. मात्र तसे करणे मुळीच योग्य नाही. आयुर्वेदानुसार विचार करता; बाळाला दात येण्यास सुरुवात होणे हे वय स्तन्यपान थांबवण्यास सुरुवात करण्याचे वय असते. माणसाचेच कशाला; जगातील कुठल्याही सस्तन प्राण्यांतील माता आपल्या पिल्लांना दात येऊ लागले की त्यांना पाजणे थांबवतात.
माणसांचा विचार करता साधारणपणे वयाच्या सहाव्या महिन्यापासून लहान मुलांना दात येण्याची प्रक्रिया सुरु होते. याच कालावधीत त्यांना ‘अन्नप्राशन संस्कार’ करवून स्थूल आहार देण्यास सुरुवात करावी असे आयुर्वेद सांगतो. पुढील दोन- तीन महिन्यांत मातेने स्तन्यपान करवणे थांबवून बकरीचे वा ते न मिळाल्यास देशी गायीचे दूध सुरु करावे असे आयुर्वेदाचे मत आहे.
वरील वयाच्या नंतरही दोन दोन वर्षे पूर्ण होईपर्यंत स्तन्यपान करवत राहिल्यास; ते सोडवताना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. शिवाय; त्या मातेला कंबरदुखी, गुडघेदुखी, केस गळणे असे त्रास सुरू होतात. त्यापासून पुढे ही वाटचाल हाडांची झीज भरून काढण्यास कॅल्शियमच्या गोळ्या देणे, त्यातील कॅल्शियम किडनीमध्ये साचून राहिल्याने किडनी स्टोन होणे आणि मग ते काढून टाकण्यास अन्य पर्यायांचा विचार न करताच शस्त्रक्रिया करायला लावणे इथपर्यंत होऊ शकते. ‘अति सर्वत्र वर्ज्ययेत्।’ हा सिद्धांत इथेदेखील लागू होतो हे कायम लक्षात ठेवावे. बाळगुटी वापरणे, बाळांना तेल लावणे- धुपन करणे, काजळ वापरणे वाईट आणि वयाची दीड दोन वर्षे पूर्ण होईपर्यंत स्तन्यपान करवणे मात्र चांगले असे ‘अशास्त्रीय’ सल्ले कोणीही देत असल्यास दुर्लक्ष करावे.
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
Aug 4, 2016
August 4, 2016
भारताच्या उत्तरेला थेट हिमालयाच्या पायथ्याशी वसलेलं डेहराडून ब्रिटिश काळापासून सर्वांत मोठं लष्कराचं शिक्षण केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. मसुरी, चार धाम व अनेक थंड हवेच्या ठिकाणांना जाण्याचे रस्ते येथूनच जातात.
मुंबईपासून थेट डेहराडूनपर्यंत पोहोचणारी पश्चिम रेल्वेवरील सर्वांत जुनी, पहिली लांब पल्ल्याची गाडी म्हणजे मुंबई-डेहराडून एक्सप्रेस. अर्थातच, मुंबईहून हिमालयाच्या पायथ्यापर्यंत जाणारी सर्वांत जुनी गाडी म्हणून हिचं वेगळं महत्त्व आहे. ही गाडी १७०० कि.मी.चं अंतर ४६ तासांत आपल्या धीम्या गतीनं पार करते. या मार्गावरील सर्वांत महत्त्वाचं धार्मिक स्थान हरिद्वार. त्यामुळे या गाडीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. ही गाडी दिवसा पॅसेंजर आणि रात्री एक्सप्रेस असते. या गाडीच्या प्रवासात जितकी विविधता अनुभवता येते, तेवढी अन्यत्र कुठेच अनुभवता येत नाही.
जुन्या दिल्ली स्टेशनवर ही गाडी चांगली तासभर थांबते, प्लॅटफॉर्मवर मोठ्या कढईत गरमागरम तळल्या जाणाऱ्या मोठ्या आकाराच्या पुऱ्या व बरोबर झमझमित बटाट्याचा रस्सा! आरामात उभं राहून खात बसावं. गाडी सुटण्याची घाई नसतेच. एकदा मी एकटाच प्रवास करत होतो. गाडीकडे पाठ करून आरामात मस्तपणे पुरी रश्श्याचा फडशा पाडत होतो, आणि मागे वळून पाहतो तो डेहराडून गाडी नाहीशी झालेली व रुळांवर कोणतीच गाडी नव्हती. ते रिकामे रूळ पाहून माझी गाळणच उडाली. कावराबावरा झालो. सर्व सामान आणि तिकिटं गाडीतच. खाण्यापायी गाडी घालविली. मी पुढे पळण्यास सुरुवात करणार, तोच पुरी तळणारा माणूस देवदूतासारखा शांतपणे म्हणाला, 'घबराना नही, साहब. यहाँके प्लॅटफॉर्म इतनेऽ लंबे होते है! आपका डब्बा आगे खडा है। आप आरामसे नाश्ता कर लेना।' जिवात जीव आला, पुढे बरंच अंतर चालत गेल्यावर माझा प्रिय डबा माझ्या प्रतीक्षेत उभा होता, संपूर्ण डब्यात मी एकमेव प्रवासी होतो. असा आनंद क्वचितच आणि तोही बहुधा डेहराडून गाडीच देत असेल.
दिल्ली सुटल्यावर मेरठ जवळच्या एका लहान स्टेशनवर अनेक दूधवाले आपले मोठाले कडीवाले अॅल्युमिनियमचे कॅन घेऊन उभे असायचे आणि या नंतरचं दृश्य तर अफलातून दिसायचं. डब्याच्या दोन्ही बाजूंनी विजेच्या दिव्यांच्या माळा लावाव्या तसे दिसणारे खिडकीच्या बाहेर लटकणारे सर्व कॅन आणि दूधवाले 'आत' आरामात बसलेले! याचा उत्तम फोटो एकदा नॅशनल जिओग्रॉफिक मासिकात आलेला होता. या मार्गावरचं महत्त्वाचं जंक्शन स्टेशन आहे सहाणपूर. येथे गाडी एका बाजूनं आत शिरते व बाहेर पडताना इंजिन विरुद्ध बाजूस लागतं, त्यामुळे गाडी दुसऱ्या मार्गाने बाहेर पडते. प्रथम प्रवास करताना मी चक्रावूनच गेलो. असाच प्रकार पुढे गजरोला स्टेशनशी होतो. ह्याचं कारण, गंगा नदीच्या अनेक उपप्रवाहांनी इथली जमीन भुसभुशीत झाली आहे. त्यामुळे तो भुसभुशीत परिसर टाळून हे रेल्वेमार्ग भक्कम जमिनीवरून टाकलेले आहेत. ही गाडी या भागात आपल्या लोकलसारखी असल्यामुळे मधून मधून अनेक प्रवाशांची चढ-उतार चालू असते. त्यांची गडबड व डब्याभोवती कचो-या, ब्रेड, भजी, विकणारे विक्रेते. या सर्व माहौलाला एक लय आहे. रेल्वेच्या दोन्ही बाजूंचा प्रदेश हिरवागार गहू, तांदूळ, कडधान्य यांनी सजलेला असतो. शेती, ऊसाचे मळे, ट्रॅक्टर्स, गाई-बैल, विटांची छोटी घरं, मध्येच पाण्याचे छोटे प्रवाह, या सर्वांतून या भागाची नैसर्गिक सुबत्ता प्रतीत होते.
-डॉ. अविनाश वैद्य
June 26, 2022
प्रत्येक लेखकाला आपल्या प्रत्येक कथेविषयी खूप जिव्हाळा वाटत असतो . निवांत क्षणी कथेचा प्रवास आठवत राहतो . असाच एक प्रवास स्मरणात आहे माझ्या . ती कथा आहे ड्रॉवर या शीर्षकाची . ती प्रसिद्ध झाली होती अंतर्नाद सप्टेंबर , १९९९ या मासिकात .
August 22, 2025
मादागास्कर येथून भारतात आलेल्या गुलमोहराने, ऑॅस्ट्रेलियातून भारतात आणल्या गेलेल्या निलगिरी, १९७२ साली आयात केलेल्या गव्हा ( मिबलो ) बरोबर भारतात आलेली सुबाभूळ, पेल्ट्रोफोरम, अकेशिया, स्पॅथोडिया, कॅशिया, ग्लिरिसिडीया, फायकस, सप्तपर्णी, रेन ट्री या झाडांनी आज हजारो एकरांवर डेरा जमवून आपल्या आम्लयुक्त पानांमुळे आपल्या आसपासची जमीन नापीक केली आहे.
June 9, 2026
तुम्हाला कधी एखाद्या ब्रॅंडचा उगम कसा झाला असेल असा प्रश्न पडलाय का? सगळं काही ब्रॅंडेड वापरण्याच्या या दिवसात जागतिक कंपन्यांबरोबरच भारतातल्या कंपन्याच्या ब्रॅंडसविषयी जाणून घेतानाच आपण बघणार आहोत मराठी माणसाच्या काही कंपन्यांच्या ब्रॅंडसविषयीही… फक्त “ब्रॅंड-नामा” या नव्या कोर्या सदरामध्ये….
December 9, 2014
आज जीवनात कोणताही बदलाव आणायचा असेल तर मनुष्य पहिला प्रश्न विचारतो ‘मीच का ?’ परिवर्तनाची अपेक्षा नेहमी दुसऱ्यांकडून केली जाते. पण ‘ स्वपरिवर्तनानेच विश्व परिवर्तन होते. हे आपण लक्षात ठेवावे.
September 3, 2021
मधुमेह किंवा डायबिटीस, अगदी शाळकरी मुलांनाही परिचित असे हे शब्द. ह्याविषयी शास्त्रीय आणि किचकट भाषेत अनेक लेख किंवा पुस्तके आपल्याला वाचायला मिळतात. मात्र साध्या-सोप्या, कोणालाही समजेल-उमजेल अशा भाषेत मधुमेहविषयक महत्वाची माहिती ह्याठिकाणी आपल्यासाठी सादर करीत आहोत. ही माहिती फक्त औषधांबद्दलच नव्हे तर रोग, रोगाची कारणे, उपद्रव, संरक्षणाचे उपाय ह्यांसह दैनंदिन व्यवहारात आहार, विहार, आचरण, सवयी ह्यांविषयी देखील आहे.
April 7, 2015
महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. विद्यासागर राव यांनी असें म्हटलें आहे की ते पूर्वी ‘संघा’चे स्वयंसेवक होते. या कारणावरून म्हणे, विरोधी पक्ष त्यांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकणार आहे. अहो, बहिष्कार टाकायचाच असेल तर ज़रा चांगलें कारण तरी शोधा !
February 26, 2019
आम्हांला कर्मस्वातंत्र्या बरोबर मन व बुद्धी दिल्यामुळे आंम्ही खुपच प्रगती केली आहे. परंतू आज पृथ्वीवर मानव सुखी व सामाघानी का नाही? का तो एकमेकांचे पाय खेचत असतो? मर्यादांचे पालन करताना दिसत नाही! मोहात पदोपदी अडकत असतो व इतरांना अडकवतो. आम्हांला वाटते की त्याला तू मन व बुद्धीचे रसायन दिलेस व त्यात भर म्हणून की काय कर्म स्वातंत्र्य दिलेस. अमर्याद कर्म स्वातंत्र्याचा आपल्या स्वार्थ व भोगावादासाठी असा काही उपयोग करून घेत आहे की तो आज स्व:लाच विसरला आहे की तो प्रथम एक माणूस आहे. आम्हांला दिलेल्या कर्मस्वातंत्र्याचे आता अपचन होत आहे. जास्त खाल्ले की अपचन होऊन तब्बेत बिघडते व शरीरात जास्त वात होऊन त्याचा मन व बुद्धीवर परिणाम होतो. देवा खरंच सांगतो मानवाच्या मेंदूतील कर्म स्वातंत्र्य नावाचे व आपण देवाच्या वर नाही, श्रेष्ठ नाही याचे भान ठेवणारे स्मरणशक्तीचे PCB (Printed Circuit Brain (Board) बदलण्याची वेळ आली आहे.
July 14, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti