(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • हर्निया

    हर्निया हा सहज आढळणारा आजार आहे. तो सगळ्या वयोगटांमध्ये व स्त्री-पुरुष अशा दोन्हींतही दिसतो. हर्निया म्हणजे आपल्या पोटाचे स्नायू कमजोर होतात, पोटात काहीशी पोकळी निर्माण होते आणि पोटातील आतडी बाहेर येऊन फुगा निर्माण करतात. मोठे आतडे किंवा लहान आतडे हर्नियाच्या पिशवीत ओढ लागणे, फुगा दिसणे, फुगा कमी-जास्त होणे, पोट फुगणे यांसारखी लक्षणे दिसतात.ही लक्षणे हळूहळू किंवा अचानक दिसतात. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या प्रमाणात दुखत असते. काही लोकांना वाटते, की पोटात काहीतरी फुटले आहे किंवा काहीतरी वेगळ्या दिशेने जात आहे. आणखी काही लक्षणे अशी -अशक्तपणा जाणवणे, पोटात आग होणे, दुखणे.पोटातील फुगा, जांघेत दिसतो. मात्र खोकला काढल्यावर किंवा झोपल्यावर तो दिसत नाही.काहीतरी जडान्न खाल्ल्यानंतर खोकला आला तर दुखते.पोटातील कुठल्याही भागात हर्निया होऊ शकतो, पण सगळ्यात जास्त हर्निया जांघेत दिसतो.

    हर्नियाचे तीन प्रकार आहेत -१) जांघेतील हर्निया, २) बेंबीतील हर्निया, ३) शस्त्रक्रियेनंतर होणारा हर्निया.

    हर्नियामध्ये घ्यावयाची काळजी - शरीराला कमीत कमी ताण द्यावा. कारण तेवढ्यानेही पोटात दुखून अस्वस्थता वाढते. ऑपरेशनमुळे हा त्रास कमी होतो. ट्रिटमेंट न दिल्यास हर्निया वाढू शकतो व एक वैद्यकीय आणीबाणी निर्माण होऊ शकते. वर्षानुवर्षे साधा वाटणारा हर्निया अचानक आतडे अडकल्यामुळे ऐनवेळी जिवाला धोका उत्पन्न करू शकतो. हर्निया हा अचानक मोठा होऊ शकतो किंवा अडकू शकतो आणि त्यात अडकलेल्या आतड्याचे गॅंग्रीन होऊ शकते. अशा वेळी त्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यावाचून इलाज नसतो.

    हर्निया कसा बरा करतात?

    हर्निया बरा करण्याचे वेगवेगळे प्रकार वापरता येतात. १) टेन्शन रिपेअर, २) टेन्शन फ्री रिपेअर, ३) दुर्बिणीतून टेन्शन फ्री उपचार. रुग्णांसाठी सगळ्यात चांगली पद्धत कुठली आहे, ज्या पद्धतीच्या वापरानंतर शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला त्रास होणार नाही, हे डॉक्टयर ठरवतात. आधुनिक शस्त्रक्रियेत साधी भूल दिली जाते. शस्त्रक्रियेनंतर दोन-तीन दिवस रुग्णालयात राहावे लागते आणि आठवड्याच्या आत कामावर रुजू होणे शक्यध होते. अत्याधुनिक थ्रीडी मेश पद्धतीमुळे हे सर्व सहज शक्ये झाले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    संदर्भ:- डॉ. जयश्री तोडकर

  • याला जीवन ऐसे नाव भाग ३१

    शास्त्रकार स्पष्टपणे सांगत आहेत.

    अतियोगेन सलिलं तृष्यतोऽपि प्रयोजितम
    प्रयाति श्लेष्म पित्तत्वं ज्वरितस्य विशेषतः।
    वर्धति आमतृष्णानिद्रा तंद्रा ध्मानांग गौरवम
    कासाग्निसादह्रल्लासप्रसेक श्वास पीनसम् ।।

    तहान लागली असताना सुद्धा ती ओळखता यायला हवी, तहान लागल्यानंतर पाणी जरूर प्यावे, पण जर का यावेळी देखील पाणी जास्त प्यायले गेले तर कफ आणि पित्त प्रकुपित होतात, म्हणजे वाढतात. विशेषत्वाने ताप आला असताना जर तहान लागली घसा कोरडा पडलाय म्हणून पाणी गरजेपेक्षा जास्ती प्यायले गेले तर शरीराचे नुकसान जास्ती होते.
    तहानेपेक्षा अधिक पाणी प्यायल्याने शरीरात आमाची वृद्धी होते.
    ( आम म्हणजे काय, तो कसा तयार होतो, कुठे असतो, हे आपण मागील अनेक टीपांमधे आधी वाचले असेलच ! हा आम पुढे जाऊन नवीन व्याधींना जन्माला घालतो. )

    यातूनच अधिक तहान लागणे, शरीर जड होणे, आळसावणे, भूक नाहीशी होणे, पोट फुगणे, खोकला, मळमळ वाटणे, तोंडाला पाणी सुटणे, दम लागणे, नाक वाहाणे, इ. आजारांची लक्षणे वाढतात.

    याचाच अर्थ असा आहे, ही लक्षणे निर्माण झाली तर समजावे, आपल्या पोटात आम वाढला आहे. या अवस्थेत लंघन किंवा उपवास करायला हवा. अशा अवस्थेत पाणी सुद्धा पिऊन चालणार नाही. तेही पचत नाही. आणि व्याधी उग्र रूप धारण करतो.

    लक्षात एवढेच ठेवायचे की, कधीही अनावश्यक पाणी पिऊ नये. ते नुकसान करणारे आहे.

    पण आज बरोब्बर उलटेच सांगितले जात आहे. साध्या व्हायरल इन्फेक्शन पासून ते डायरीया पर्यंत, पाणी प्या पाणी प्या.!!! ज्या बिचाऱ्यांना आयुर्वेदातील "अ" म्हणजे काय, हे सुद्धा कळत नाही, अश्या ब्युटीशियन पासून एकजात सारे डाएटिशियन, नॅचरोपॅथस् सुद्धा सांगतात, ते एकवेळ मान्य करू. वाॅटसपवर तर आयुर्वेदाचे सल्ले द्यायला उधाणच आलेले असते. सर्व आयुर्वेद म्हणे एकशे चाळीस सूत्रात ??? आयुर्वेद एवढा चीप झालाय ? आयुर्वेदाच्या नावावर काहीऽही खपवले जातेय. तेव्हा सावधान !!!

    कोणाच्या भरवंशावर कोण जाणे, पण अगदी पाश्चात्य वैद्यक तंत्राने शिकलेले तज्ञ, इंटीग्रेटेड व्यवसाय करणारे आयुर्वेद पदवीधारक आणि मिक्स प्रॅक्टीस करणारे होमियोपॅथीचे पदवीधर देखील पाणी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात, आणि लोक फसतात. आपला आजार वाढवतात.

    जो तो उठतोय आणि सांगतोय भरपूर पाणी प्या. नुसता चिखल होतोय, बाकी काही नाही, नंतर सर्व निस्तरायला काही मोजके आयुर्वेदीय वैद्य आहेतच !

    हे असे का सांगितले जातेय ? कोणत्या संहितेनुसार, माॅडर्नच्या कोणत्या सिद्धांतानुसार, होमियोपॅथीच्या कोणत्या तत्वानुसार ? काहींना कळतंय पण व्यावसायिक मौन पाळून आहेत.
    मौनात अर्थ सारे.....
    हे चक्क बाजार वाढवणे आहे. असे वाटले तर काय चुकले ?

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021

  • रेल्वे प्रवास करताना हे कराच…

    उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या भीषण रेल्वे अपघातात समोर आलेली एक माहिती धक्कादायक आहे.

    अपघात झालेल्या गाडीत ६९८ व्यक्तींचे रिझर्वेशन होते. आरक्षित व्यक्तींपैकी फक्त १२८ जणांनी विम्याचा पर्याय निवडला. ऑनलाइन रिझर्वेशन केल्यास रेल्वे प्रवाशाला फक्त एका रुपयात (92 पैसे) १० लाखाचा विमा मिळतो. यासाठी रिझर्वेशन करताना फक्त संमतीची खूण करायची असते.

    हा विमा घेतल्यास अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास नातलगांना 10 लाख, कायमचे संपूर्ण अपंगत्व आल्यावरही 10 लाख, कायमचे (पार्शल) अपंगत्व आल्यास 7.5 लाख, जखमी झाल्यास उपचारासाठी 2 लाख आणि अपघातस्थळापासून आपल्या घरी जाण्यास प्रवासासाठी 10 हजार रुपये मिळतील.

    वेळ कधी सांगून येत नाही. त्यामुळे मित्रांनो यापुढे रिझर्वेशन करताना आपण ही बाब नक्की ध्यानात ठेवा इतरांनाही सांगा.

    अधिक माहितीसाठी -http://contents.irctc.co.in/en/InsuranceTermCondition.pdf

  • कोलेस्टेरॉलपासून सुटका

    कोलेस्टेरॉलपासून सुटका करायची असेल तर जीवनशैलीत आरोग्यदायी बदल करणे आवश्यक आहेत. त्यामुळे हृदयरोगाला आमंत्रण देणारे अन्नपदार्थ ओळखता येतात आणि त्यांचे सेवन कमी करता येतं. कोलेस्टेरॉलच्या वाढलेल्या पातळीमुळे कोणत्याही शरीर प्रकारच्या व्यक्तीला हृदयरोगाचा त्रास होऊ शकतो.

    कोलेस्टेरॉलला चांगलं मानलं जात नाही, कारण आपल्यापैकी बरेच जण या कोलेस्टेरॉलचे बळी ठरतात. हो, कोलेस्टेरॉलचं वाढतं प्रमाण म्हणजे आजारपणाला आमंत्रण देण्यासारखं आहे. त्यामुळे हृदयरोग, रक्तदाब आणि मधुमेहासारखे आजार होतात. पण खरा गुन्हेगार कोलेस्टेरॉल नाही, हे तुम्हाला माहिती आहे का? हे लिपीड पित्ताशयात (लिव्हर) तयार होतं.

    तसंच शरीराच्या अनेक प्रक्रियांमध्ये ते महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ मेंदूमध्ये असलेल्या चेतापेशींचे विसंवहन (इन्सुलेटिंग), पेशींना आकार देण्यात कोलेस्टेरॉल महत्त्वाची भूमिका बजावतं. हाय डेन्सीटी लिपोप्रोटिन्स (एचडीएल)ची पातळी घसरते तेव्हा समस्या सुरू होते, तर दुसरीकडे हृदयातील धमन्यांवर लो डेन्सीटी लिपोप्रोटिन्स (एलडीएल) जमू लागते. त्यामुळे हृदयाला होणारा रक्तप्रवाह मंदावतो आणि हृदय तसेच रक्तवाहिकांचे आजार बळावतात.

    याचा अर्थ आजार हे एलडीएलच्या उच्च पातळीमुळे आणि एचडीएलचा स्तर घसरल्याने होतात. कोलेस्टेरॉलमुळे नव्हे! हृदयरोग निर्माण होण्याचं हे एक मुख्य कारण आहे.

    जीवनशैलीत आरोग्यदायी बदल करणे आवश्यक आहेत. त्यामुळे हृदयरोगाला आमंत्रण देणारे अन्नपदार्थ ओळखता येतात आणि त्यांचे सेवन कमी करता येतं. कोलेस्टेरॉलच्या वाढलेल्या पातळीमुळे कोणत्याही शरीर प्रकारच्या व्यक्तीला हृदयरोगाचा त्रास होऊ शकतो.

    तुमच्या शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी अधिक प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट (संतृप्त मेद) आणि ट्रान्स फॅट असलेले पदार्थ टाळा. अनेक हवाबंद अन्नपदार्थ उदाहरणार्थ बटाटयाचे वेफर आणि बेकरी उत्पादने ज्यामध्ये मैद्यासारखे घटक वापरले जातात, त्यात तंतुमय घटक कमी असतात आणि ट्रान्स फॅटचे प्रमाण अधिक असते.

    कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी काय कराल ?

    » जेवणाकरिता वारंवार उकळवलेल्या तेलाचा वापर केल्यास ट्रान्स फॅटची पातळी वाढते.

    » त्याचपद्धतीने लाल मांस, मलईयुक्त दूध उत्पादनं, तूप आणि खोबरेल तेलाचा वारंवार वापर केल्याने लो डेन्सीटी लिपोप्रोटिन्स (एलडीएल)चं प्रमाण वाढतं. कारण त्यात संतृप्त मेद अधिक असतो. अशा प्रकारच्या सेवनावर मर्यादा आणून ताजे, प्रक्रियारहित अन्न आहारात घ्यावं.

    » आपण नियमितपणे आपला आहार घेत असतो, मात्र काही जागरूक व्यक्तीच कोशिंबिरी आणि कच्च्या फळांचा समावेश आपल्या आहारात करतात. आपल्या नियमित आहारात मैदा, ब्रेड, पांढरा भात, बिस्किटांसारख्या प्रक्रिया केलेल्या पदार्थाचा उपयोग कमीत कमी करणं महत्त्वाचं आहे.

    » सालासकट असलेली धान्य, न सडलेली धान्य म्हणजे लाल तांदूळ, लाल पोहे, सालासकट असलेल्या डाळी इत्यादींचा जेवणात समावेश करावा.

    » बदाम हा असा अन्नघटक आहे ज्यामुळे शरीरात हाय डेन्सीटी लिपोप्रोटिन्स (एचडीएल) कोलेस्टेरॉल वाढते. तसंच आहारात अळशीचा नियमित वापर केल्याने एलडीएल कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.

    » आणखी एक प्रभावी बदल म्हणजे संतृप्त मेद अधिक प्रमाणात असलेले पदार्थ म्हणजे बटर न वापरता कमी मेद असलेले पर्याय उदा. लो फॅट टेबल स्प्रेडचा वापर करावा. लो फॅट टेबल स्प्रेड हे आरोग्याला हितकारक असतात. टेबल स्प्रेडची निवड करताना न्यूट्रीशन फॅक्ट लेबलवर शून्य टक्के कोलेस्ट्रॉल आणि शून्य ग्रॅम ट्रान्स फॅट पाहा. तंतुमय घटकही दोन प्रकारचे असतात. एक विरघळणारे आणि दुसरे न विरघळणारे. तुम्ही आहारात विरघळणा-या तंतुमय घटकांचा समावेश करा. या दोन्ही घटकांचे हृदयाच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व अधिक आहे. परंतु, विरघळणारे घटक कमी एलडीएल पातळी राखण्यास मदत करतात.

    » ओट्स, ओट्सचा कोंडा, कडधान्य, डाळी आणि भाज्यांचा तुमच्या नियमित आहारात समावेश करा.

    » आहारात कायम तेलाचा वापर कमी ठेवा. मग ते फिल्टर तेल असो किंवा रिफाईन. कारण रिफाईन तेलावर रासायनिक प्रक्रिया केलेली असते आणि फिल्टर तेलावर यांत्रिक.

    » आहारात सुका मेवा प्रामुख्याने पिस्त्यांचा समावेश करा. डायबेटीज फाऊंडेशन ऑफ इंडिया (डीएफआय) अँड दी नॅशनल डायबेटीज, ओबेसीटी अँड कोलेस्ट्रॉल फाऊंडेशनच्या पाहणीनुसार पिस्त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. ते नसíगकरित्या कोलेस्ट्रॉलमुक्त असतात. त्यात प्रथिने, तंतुमय घटक आणि अॅोन्टीऑक्सिडंट घटक विपुल प्रमाणात असतात. या घटकांमुळे पिस्त्यांचे सेवन स्थूलतेची भीती असणा-यांसाठी आणि हृदयरोग्यांकरिता अतिशय उपयोगी ठरते.

    » याशिवाय साली-कोंडयांसकट असलेली धान्यं, प्रक्रियारहित अन्न, फळे आणि भाज्यांचा समावेश तुमच्या आहारात नियमित करावा.

    » अळशी, सूर्यफूल बिया आणि चरबीयुक्त मासे कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदतीचे ठरतात. अधिक प्रमाणात मेद असलेले दुग्धजन्य पदार्थ न घेता कमी प्रमाणात मेद असलेले पदार्थ वापरावेत.

    » नियमित किमान ३० मिनिटे व्यायाम आवश्यक आहे. नियमित साधे चालणे, सायकल चालविणे, पोहणे किंवा तुमचा आवडता खेळ खेळल्याने मदत होऊ शकते.

    » लिफ्ट, एलिवेटर न वापरता पाय-यांचा वापर करावा.

    » टीव्ही पाहताना अधे-मधे केलेली ऊठबस फायदेशीर ठरू शकते.

    » तुमचे आरोग्य ही तुमची जबाबदारी आहे हे लक्षात असू द्या. त्याची काळजी केवळ तुम्हीच घेऊ शकता.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- डॉ. अर्चना रायरीकर /प्रहार

  • किचन क्लिनीक  – शेंगदाणा

    किचन क्लिनीक – शेंगदाणा

    शेंगदाण्यांचा वापर आपण पुष्कळ वेळेस करतो टाईमपास म्हणून खारे किंवा भाजून खातो,पोहे,खिचडीतघालतो,चटणी,आमटी,
    लाडू,चिक्की,तेल अशा विविध प्रकारे आपण हे वापरतो.

    शेंगदाणे किंवा भुईमूग हे प्रामुख्याने घाटावर घेतले जाणारे पिक.हे जमीनीखाली शेंगामध्ये तयार होतात.

    शेंगदाणे चवीला गोड,उष्ण,पचायला जड,स्निग्ध वात कफ नाशक व पित्तकर असतात.हे दातांना बळकटी देतात.जखम भरायला मदत करतात.त्वचाविकारात उपयुक्त असून बलकारक,पोषक आहेत.

    आता आपण शेंगदाण्याच्या विविध व्यंजनांचा शरीरावर काय परिणाम होतो ते पाहू:

    १)शेंगदाणा लाडू/चिक्की:
    गोड,उष्ण,पचायलाजड,स्निग्ध,वातनाशक,
    कफपित्तकर,बलकारक,अशक्तपणा कमी करणारी,श्रमहर आहे.

    २)शेंगदाणा चटणी:
    तिखट,गोड,उष्ण,वातनाशक,कफपित्तकर,
    पचायला जड,तोंडास रुची उत्पन्न करणारी,भुक वाढविणारी,शुक्रधातू नाशक आहे.

    ३)खारे शेंगदाणे:
    गोड,खारट,उष्ण,वातनाशक,कफ पित्तकर,अम्लपित्त वाढविणारी,पचायला जड,स्निग्ध,रक्तविकार वाढविते.

    ४)शेंगदाण्याची आमटी:
    चवीला गोड,तिखट,उष्ण,वातकफनाशक,
    पित्तकर,शुक्रनाशक,भुक वाढविणारी,रुचिकर,पचायला जड,बाळंतीण बाईचे अंगावरचे दुध वाढविते,पौष्टिक आहे.

    ५)शेंगदाणा तेल:
    गोड,स्निग्ध,पचायलाजड,वातनाशक,
    कफपित्तकर,जखम भरायला मदत करते,त्वचेचा वर्ण सुधारते,संडास व लघ्वी सुटायला मदत करणारी.

    ६)शेंगदाणा पेंड:
    गोड,रूक्ष,वातनाशक,पित्तकफकर,उष्ण,दुध वाढविते,जखम भरणारी,पचायला हल्की.

    शेंगदाणे अतिप्रमाणात खाल्ल्याने अम्लपित्त होऊ शकते.

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • जागतिक हृदय दिन (२९ सप्टेंबर)

    आजच्या दिवशी सर्वत्र जागतिक हृदय दिन साजरा करण्यात येतो. आज काल हृदयरोग होणे अथवा हृदयविकाराचा झटका येऊन अचानक मृत्यू होणे ही बाब एखादया विशिष्ट वयानंतर होऊ शकते असे राहिले नाही. विशी-तिशीतल्या उमद्या तरुणांचाही हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाल्याची उदाहरणे ऐकायला मिळतात. भारतात दरवर्षी होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी तब्बल ३२% मृत्यू हृदयरोगामुळे होतात. त्यामुळे असे दिवस साजरे करून हृदयरोगाविषयी जनजागृती करणे, हृदयरोग होऊ नये अथवा झाल्यास काय उपाययोजना करावी याची माहिती जनतेपुढे मांडणे महत्वाचे ठरते.

    इतर कुणापेक्षाही व्यसन करणाऱ्यांना हृदयरोग होण्याची भीती सर्वाधिक असते. त्यासाठी तंबाखू, धुम्रपान आणि मद्यपान अशा व्यसनांपासून दूर राहणे कधीही चांगले. त्याचबरोबर गरजेपेक्षा जास्त खाणे, साखर-मीठ व चरबीयुक्त पदार्थांचे अतिसेवन करणे तसेच कोणत्याही गोष्टीचा ताण घेणे ह्यागोष्टी ताबडतोब बंद करायला हवे.

    हृदयरोग टाळण्यासाठी दररोज किमान अर्धा तास व्यायाम करावा. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते आणि रक्ताभिसरण प्रक्रियाही सुरळीत चालते. जास्तीत जास्त पायी चालण्याचा अथवा सायकल चालविण्याचा प्रयत्न करावा. आहारात नेहमी हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असावा तसेच नियमित फलहार घ्यावा. संगीत, बागकाम, वाचन आणि योगसाधनेद्वारे अथवा आपल्याला असणाऱ्या एखादया छंदात मन गुंतवून तणावापासून दूर राहावे.

    हृदयरोग होण्यासाठी निश्चित वय नाही, तो कोणत्याही वयात येऊ शकतो. यासाठी वयाची तीस वर्षे पूर्ण होताच हृद्याची तपासणी करून घ्यायला हवी. त्यात रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि मधुमेहाचीही तपासणी होती. अशी तपासणी दरवर्षी करायला हवी.

    हृदयरोग टाळण्यासाठी नियम आहार-विहाराचे

    आहार पचनाकडे लक्ष देणे, प्रकृतीनुरूप व पचण्यास हलके अन्न खाणे, आहारात आले, सुंठ, मिरी, हिंग, जिरे वगैरे दीपक, पाचक द्रव्यांचा, तसेच सात-आठ चमचे साजूक तूप, शुद्ध ताजे दूध यांचा समावेश असू देणे.

    आठवड्यातून एक दिवस रात्रीचे लंघन करणे, यामुळे पोटाला विश्रांती मिळते व पचन व्यवस्थित राहण्यास मदत मिळते.

    नियमित चालायला जाणे, प्रकृतीनुरूप आसने करणे.

    अनुलोम-विलोम, ॐकार गुंजन व ध्यानसंगीत यांच्या मदतीने शरीरात प्राणसंचार व्यवस्थित व्हावा व हृदयाला प्राणशक्तीमचा पुरेसा पुरवठा व्हावा याकडे लक्ष देणे.

    तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने हृदयाची ताकद वाढवणारी, सुहृदप्राश, कार्डिसॅन प्लस वगैरे हृदयाची कार्यक्षमता वाढवणारी रसायने नियमित सेवन करणे.

    नियमित अभ्यंग करणे, विशेषतः छाती-पोट व पाठीवर रोजच हलक्यात हाताने तेल जिरवणे.

    हृदयरोगाचे स्वरूप, कारण, तीव्रता वगैरे अनेक गोष्टींचा विचार करून प्रकृतीनुरूप नेमके उपचार योजावे लागतात. हृदयरोगात औषधोपचारांबरोबरच पथ्य-अपथ्य सांभाळणेही खूप महत्त्वाचे असते.

    तेल, आंबट पदार्थ, आंबट दही-ताक वगैरे पदार्थ, पचायला अवघड अन्न, तुरट पदार्थ हृद्रोगात वर्ज्य समजावेत, परिश्रम करू नयेत, उन्हात जाऊ नये, राग, मैथुन, चिंता, अति बोलणे टाळावे.

    तांदूळ, साळीच्या लाह्या, जव, मूग, परवर, कारले वगैरे गोष्टी हृदयरोगात पथ्यकर होतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- मी मराठी / इंटरनेट

  • मज्जातंतूच्या शिरांचे विकार

    सौम्य प्रमाणात मुंग्या येणे अथवा शरीराचा एखादा भाग बधिर होणे हा प्रकार वरचेवर घडत असेल, तर त्यामागचे कारण वेळीच शोधायला हवे. कदाचित मज्जारज्जूच्या शिरांना अपाय झाल्याने असे होऊ शकते. मज्जातंतू मज्जारज्जूतून बाहेर पडतात. थोड्याच अंतरावर त्यातील काही तंतू एकमेकांजवळ येतात व त्या गठ्ठ्याच्या शिरा बनतात. या शरीराच्या बाहेरच्या बाजूला असणाऱ्या भागात कार्य करतात, म्हणून त्यांना पेरिफरल (परिघाच्या बाजूच्या) मज्जारज्जूच्या शिरा (नव्ह्‌र्ज) म्हटले जाते. या शिरांना अनेक कारणांनी अपाय होणे संभवते. अशा विकारांना पेरिफरल न्यूरोपथी म्हणतात. पेरिफरल नव्ह्‌र्जमुळे आपला मेंदू आपल्या शरीरातील एकूण एक लहानसहान भागाला जोडला जातो. कोणत्या जागेच्या शिरा आणि किती प्रमाणात अपाय झाला आहे, यावर लक्षणे ठरतात. बहुतेक सर्व प्रकारांत सुरवात सौम्य प्रमाणात मुंग्या येणे व भाग बधिर होणे अशी होते. हळूहळू काही महिन्यांनी अथवा वर्षांनी शरीराचे भाग बधिर होतात. मधुमेह या आजारात पावलात आलेल्या बधिरपणामुळे तेथे जखमा झालेल्या रुग्णांच्या लवकर लक्षात येत नाहीत. तेथे जंतुजन्य दाह झालेलादेखील समजत नाही. पावलात असे घडते, ही गोष्ट अनेक मधुमेही रुग्णांत घडते. शरीराच्या इतर भागातही असे घडू शकते. नजर अस्पष्ट होणे, रक्तदाब उतरणे, मूत्रविरेचनात अडथळे जाणवणे, पोट फुगणे, आतड्यांची हालचाल कमी किंवा जास्त होऊन मलावरोध किंवा पोटात कळा येणे आणि पुरुषांत लैंगिक दुर्बलता येणे, अशा विविध प्रकारचे त्रास रुग्णांना होऊ शकतात. हे पेरिफरल न्यूरोपथीचे आजार होण्याची अनेक कारणे असू शकतात. दीर्घ काळ मद्यसेवन, मधुमेह, शरीरात कोठेही (सुप्तदेखील) कॅन्सरची गाठ निर्माण होणे, मूत्रपिंडे अकार्यक्षम होणे, जीवनसत्त्वे ब 1, ब 6 किंवा ब 12 याचा आहारात अभाव होणे, शिसे जास्त प्रमाणात शरीरात जाणे, मुंग्या येण्यासारखे त्रास ताब्यात आणणे त्यामानाने कठीण असते. हेटेरोसायस्लिक प्रकारची औषधे वेदना ताब्यात आणण्यासाठी उपयोगी असतात. या औषधांचा फायदा औषधे घेण्यास सुरू केल्यापासून काही आठवड्यांनंतरच दिसू लागतो. दीर्घ काळ मद्यपान करणाऱ्या व्यक्तीमध्ये मद्यपानाचे अनेक दुष्परिणाम दिसू लागतात. सर्व प्रकारच्या मद्य-पेयांत इथाईल अल्कॉहॉल नावाचे रासायनिक द्रव्य असते. आपल्या शरीरात यकृतातील पेशीने या इथाईल अल्कॉहॉलच्या रेणूचे विघटन होते व प्रथम ऍसिटाल्डिहाईड नावाचा रेणू तयार होतो.

    ऍसिटाल्डिहाईडचे रूपांतर ऍसिटिक ऍसिड या रेणूत होते. ऍसिटिक ऍसिडचे रूपांतर कार्बन-डाय-ऑक्सातईड आणि पाणी या रेणूत होऊन ते शरीराच्या बाहेर टाकले जातात. या सर्व प्रक्रियांना दहा तास लागतात. ऍसिटाल्डिहाईड आणि ऍसिटिक ऍसिड हे रेणू शरीराच्या एकूण एक पेशींना घातकारक असतात.

    शरीरात दहा तासांच्या अवधीत हे रेणू संपूर्ण शरीरभर फिरतात. यकृत, मेंदू, हृदयाचे स्नायू, स्वादुपिंड, जठर, लहान व मोठे आतडे, मूत्राशय इत्यादी सर्व अवयवांवर दारूचा दुष्परिमाण होतो. याचबरोबर पेरिफरल नव्ह्‌र्जच्या पेशीदेखील मृत होतात. परिणामी हात, पाय बधिर होतात. तेथे मुंग्या येणे, वेदना होणे असे त्रास अहोरात्र होतात. हातपाय कमजोर होतात. चालना येईनासे होते. एकदा या मज्जातंतूंच्या शिरा अशा प्रकारे विकारग्रस्त झाल्या की त्या पूर्ववत बऱ्या होतील, असा उपाय अद्ययावत सापडलेला नाही. मूळतःच दारूला स्पर्शही न करणे व घेणाऱ्यांनी तत्काळ पूर्णपणे वर्ज्य करणे अत्यंत आवश्याक आहे. शरीरात कॅन्सरच्या गाठी वाढू लागल्या की त्या पेशींना जीवनावश्यणक तत्त्वे, जीवनसत्त्वे इत्यादी मोठ्या प्रमाणात लागतात. परिणामी, शरीरातील पेशींना त्या कमी पडू लागतात. शिवाय या विकृत पेशी काही द्रव्ये स्रवतात. या द्रव्यांमुळे अन्नपेशींना अपाय होतो. परिणामी, पेरिफरल न्यूरोपथी होते. कधी कधी खुद्द कॅन्सरचा आकार फार मोठा नसतो. त्यामुळे जेथे कॅन्सर होतो त्या जागेवर फारसा त्रास होतही नाही. असा छुपा कॅन्सर जठर, मोठे आतडे, थॉयरॉईड ग्रंथी व श्वारसनलिका येथे असण्याचा संभव बराच असतो. मूळ कॅन्सर काढून टाकला की या पेरिफरल न्यूरोपथीचे त्रास शमू लागतात. मूत्रपिंडांचे कार्य नीट होत नसल्यास शरीरात बरेच बदल होतात. महत्त्वाच्या क्षारांची पातळी योग्य राहत नाही.

    मूत्रपिंडाचे कार्य पुन्हा व्यवस्थित झाल्याखेरीज ही तक्रार जाऊ शकत नाही. काही जड धातूंचे रेणू शरीरात गेल्यास त्यांच्या अपायामुळे पेरिफरल न्यूरोपथी होतो. सुवर्ण, चांदी, पारा, आर्सेनिक किंवा शिसे अशा धातूंचे रेणू अपायकारक असतात. आपण सेवतो त्या औषधांत रासायनिक पृथक्कणरणाच्या परीक्षणातून असली द्रव्ये नाहीत याची खात्री करून मगच कोणतेही औषध घ्यावे. काही जीवनसत्त्वे मज्जापेशींच्या कामाला अधिक महत्त्वाची असतात. जीवनसत्त्व ब संकुलातील ब 1, ब 6 व ब 12 ही विशेष महत्त्वाची असतात. त्यांचा आहारातील अभाव हे पेरिफरल न्यूरोपथीचे कारण असते. पॉलिश्डा भातच खाणे, मैदा खाणे, दूध न घेता इतर आहार पूर्ण शाकाहारी असणे, अशा कारणांतून हे अभाव निर्माण होतात. आपल्या रक्तवाहिन्यांवर स्वतःच्या शरीरात स्वतःच्या शरीरातील पेशींच्या विरुद्ध निर्माण झालेल्या प्रतिपिंडाचा दुष्परिणाम होतो. या आजाराला पेडिआर्टरायटिस नोडिसा म्हणतात. या आजारात मज्जातंतूंना जाणाऱ्या रक्तवाहिन्यांत दोष निर्माण झाल्याने पेरिफरल न्यूरोपथी होतो. थॉयरॉईड ग्रंथीच्या आजारातदेखील पेरिफरल न्यूरोपथी होते. पेरिफरल न्यूरोपथी हे अनेक विकारांचे लक्षण असते. कारण शोधून मगच खरा इलाज होऊ शकतो.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- डॉ. ह. वि. सरदेसाई

  • दरवर्षी करा रेटीना तपासणी

    मधुमेहामुळे मोतीबिंदू, काचबिंदू हे आजार तर होऊ शकतातच; पण मुख्यत्वे मधुमेहामुळे रेटिनावरील रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. डायबेटिक रेटिनोपॅथीसुद्धा एक प्रकारच्या जीनवर अवलंबून असते. डायबेटिक रेटिनोपॅथी फक्त डायबेटिस नीट कंट्रोल न झाल्याने होते असे नाही. तो किती दिवसांपासून आहे यावरही रेटिनोपॅथी अवलंबून असते. असेही पाहण्यात आले आहे की, रेटिनोपॅथीसुद्धा एक प्रकारच्या जीनवर अवलंबून असते. त्यामुळे डायबेटिक रुग्णाने दरवर्षी रेटिनाची तपासणी केली पाहिजे. रेटिनाची तपासणी हे एक स्वतंत्र तंत्रज्ञान आहे. यामध्ये सर्वसाधारणपणे डोळ्यांत औषध टाकून डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या केल्या जातात. नंतर इनडायरेक्ट किंवा क्वचित डायरेक्ट ऑफथॅलमोस्कोपद्वारे रेटिनाची पाहणी केली जाते. रेटिनाचे फोटोग्राफ फंड्स कॅमे-याद्वारे घेता येतात. एक औषध शिरेत देऊन रेटिनाच्या रक्तवाहिन्यांची अँजिओग्राफीही केली जाऊ शकते. कशा प्रकारे तपासणी केली त्यापेक्षा तपासणीत काय दिसले हे महत्त्वाचे. आपल्या रेटिनाची रचना अशा प्रकारे केलेली असते की, त्याच्या निरनिराळ्या लेअर्स असतात. रेटिना हे डोळ्यांच्या आतील पातळ पटल आहे. यावर आर्टरीज आणि व्हेन्स (रक्तवाहिन्या) ठराविक पद्धतीने पसरलेल्या असतात. रेटिनाच्या बाहेरील बाजूस कोराईड व डोळ्यांबाहेरील आवरण म्हणजे स्कलेरा असतो. रेटिना संवेदनशील असून त्यावर पडलेल्या प्रतिमेस ज्ञानतंतूंद्वारे ऑप्टिक डिस्कमधून ऑप्टिक नव्र्हद्वारे मेंदूस माहिती दिली जाते. ती आपणास दिसते.

    लक्षणे : या रेटिनावर मॅक्यूला नावाचा अतिसंवेदनशील भाग असतो. त्याच्या मध्यास फोबिया नावाचा सर्वांत जास्त संवेदनशील भाग केवळ काही मायक्रॉनच्या साईजचा असतो. या भागावरच संपूर्ण दृष्टीची तीव्रता अवलंबून असते. मधुमेहामध्ये रेटिनाच्या रक्तवाहिन्या कमजोर होतात. त्यामुळे रेटिनावर जागोजाग रक्तवाहिन्या फुटून रक्तस्राव होतो. काही ठिकाणी पांढरा पदार्थ तयार होतो. ब-याच ठिकाणी अत्यंत बारीक नव्या रक्तवाहिन्या तयार होतात (निओ व्हॅस्क्युलॅरायझेशन). या अत्यंत नाजूक असतात. म्हणून त्या फुटतात. त्यामुळे रेटिनावर रक्तस्राव होतो. वारंवार होणारे रक्तस्राव, व्हाईट एक्झिडेट्स आणि नवीन तयार झालेल्या रक्तवाहिन्या यामुळे मेंबरेन तयार होते. हे मेंबरेन आकसून गेल्यास ते रेटिनाला ओढते. त्यामुळे रेटिना आपोआप बाजूला सरकतो. यास डिटॅचमेंट ऑफ रेटिना असे म्हणतात.

    उपचार : हे सर्व टाळता येऊ शकते. योग्य वेळी रेटिनाची तपासणी केल्यास या रक्तवाहिन्यांवर लेसर किरणोपचार करून त्यांना फुटण्यापासून थांबवता येते. तसेच जाणारी दृष्टी रोखता येते. आज जगात मोतीबिंदू नंतर अंधत्व भिंगारोपण शस्त्रक्रियेने कायमस्वरूपी दूर करता येते; पण रेटिनोपॅथीने आलेले अंधत्व पूर्णपणे दूर करता येत नाही, तर दृष्टीस येणारे नुकसान थांबवता येते. त्यामुळे डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये लेसर उपचारास फार महत्त्व आलेले आहे. ब-याच वेळेस हा उपचार वारंवार करण्याची गरज भासते. जागतिक पातळीवर व्हिजन २०२०, तर भारतात केंद्र सरकारने याला अंधत्व निवारणात खूप महत्त्व दिले आहे. यासाठी सरकारी पातळीवर बरेच कार्यक्रम राबवले जात आहेत. हा उपचार अत्यंत सुलभ आणि रुग्णास त्रास न होता करता येतो. यात कोठेही कापाकापी किंवा जखम होत नाही. योग्य उपचारांनंतर रुग्णास लवकर घरी जाता येते. डोळ्यांना पट्टी किंवा चष्मा लावण्याची गरज नसते. मात्र, डॉक्टरी सल्ल्याशिवाय कोणताही निर्णय किंवा उपचार करू नये.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • लघुपट – पायथागोरसचे अदभुत प्रकरण!

    राजकारणातील सर्व थोर इशू सम्राटांना समर्पित!

  • ६ जानेवारी – पत्रकार दिन

    मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले त्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांची आठवण म्हणून ६ जानेवारी हा दिवस “पत्रकार दिन” म्हणून साजरा केला जातो.

    सुधारकांच्या पहिल्या पिढीने पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करुन नवी जीवनमूल्ये वृत्तपत्र माध्यमाव्दारे रुजविली. त्या परंपरेचा पाया बाळशास्त्री जांभेकरांनी घातला.

    बंगालमध्ये राजाराम मोहन रॉय यांनी सुधारणांचे नवयुग आरंभिले तेच कार्य बाळशास्त्री जांभेकरांनी महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात नवविचारांची लाट निर्माण करण्यासाठी केले.प्रयत्नशिल व वैचारिक चळवळ सुरु करुन त्यांनी समाज सुधारणा व शिक्षणाची अभिवृध्दी हेच आपले जीवनकार्य मानले. त्या निमित्ताने हा विशेष लेख . . . .

    आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी अल्पावधित महाराष्ट्राच्या जीवनावर विलक्षण छाप टाकली आणि राष्ट्रीय विकासासाठी पोषक अशा बहुविध क्षितिजाचा विकास केला. त्यामुळे त्यांना पश्चिम भारतामधील प्रबोधनाचे प्रवर्तक म्हटले जाते. मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी त्यांनी बजावलेले कार्य हे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदविण्यासारखे आहे.

    मराठी पत्रकारितेचा पाया श्रेष्ठ दर्जाच्या संपादकाने घातला. त्यामुळे परंपरेचा सुवर्णप्रवाह विकसित झाला. प्रथम श्रेणीचे आद्य वृत्तपत्र म्हणून “दर्पण” पत्राची कामगिरी लक्षणीय अशी ठरली आहे. दर्पण हे वृत्तपत्र १८३२ मध्ये काढून मराठी वृत्तपत्रव्यवसायाचा त्यांनी पाया घातला. त्यांनीच १८४० मध्ये दिग्दर्शन हे मराठीतील पहिले मासिक काढले. बाळशास्त्री जांभेकर यांचा लोकशिक्षण व ज्ञानप्रसार हाच हेतू ,या उपक्रमांमागे होता.

    सुधारकांच्या पहिल्या पिढीने पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करुन नवी जीवनमूल्ये वृत्तपत्र माध्यमाव्दारे रुजविली. त्या परंपरेचा पाया बाळशास्त्री जांभेकरांनी घातला. बंगालामध्ये राजाराम मोहन रॉय यांनी सुधारणांचे नवयुग आरंभिले तेच कार्य बाळशास्त्री जांभेकरांनी महाराष्ट्रात केले.

    विलक्षण जीवन कहाणी -

    कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हयातील देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या गावी १८१२ मध्ये बाळशास्त्रींचा जन्म एका पुराणिकाच्या घरी झाला.. अज्ञान,दारिद्रय आणि रुढीप्रिय समाजाच्या अंध:कारातून बाहेर पडण्यासाठी सन १८२५ मध्ये ते मुंबईत आले. मुंबईत बापू छत्रे यांच्या निवासस्थानी राहून त्यांनी अध्ययन सुरू केले. आपल्या विलक्षण बुध्दीचातुर्याने व तल्लख स्मरण शक्तीने त्यांनी त्या वेळच्या मुंबईतील सार्वजनिक जीवनावर विलक्षण छाप टाकली. सन १८३० मध्ये हिंद शाळा पुस्तक मंडळाचे सेक्रेटरी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि एक नवे क्षितिज त्यांच्यासाठी खुले झाले. सन १८३१ मध्ये त्यांनी ग्रंथ रचनेस प्रारंभ केला. त्यानंतर वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण या पत्राची मुहूर्तमेढ रोवली.

    मराठी पत्रकारितेच्या विचार विश्वात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरासारखी विलक्षण कामगिरी बजावणारे बाळशास्त्री जांभेकर हे त्यामुळे युगप्रवर्तक पत्रकार ठरले. सन १८३४ मध्ये भारतातील पहिले प्राध्यापक ( “प्रोफेसर”) होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. एलफिस्टन निधीतून त्यांच्यासाठी स्वतंत्र अध्यासन निर्माण करण्यात आले. सन १८४५ मध्ये राज्यातील शिक्षण विभागाचे संचालक होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. प्राध्यापक या नात्याने अध्ययन, अध्यापन संशोधन व विस्तार ही कार्ये पार पाडण्यात त्यांनी धन्यता मानली. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात नवविचारांची लाट निर्माण करण्यासाठी वैचारिक चळवळ सुरु केली. समाज सुधारणा व शिक्षणाची अभिवृध्दी तेच त्यांनी आपले जीवनकार्य मानले.

    अष्टपैलू व्यक्तिमत्व -

    आचार्य बाळशास्त्रीं जांभेकर यांच्या समग्र जीवनाकडे पाहिले असता त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे विलोभनीय दर्शन घडते. त्यांना देशी व विदेशी ९ भाषा अवगत होत्या. मराठी, इंग्रजी, संस्कृत प्रमाणेच बंगाली, कन्नड इत्यादीप्रमाणे त्यांनी विदेशी भाषांचाही अभ्यास केला होता. त्यांच्या अभ्यासविषयात भाषाशास्त्रे, इतिहास व संस्कृती, गणित, पदार्थविज्ञान, भूगर्भशास्त्र, पुरातत्वविद्या इत्यादीचा समावेश होता. या सर्व विषयात त्यांनी मराठी भाषेत ग्रंथरचनाही केली.

    त्यांच्या कार्याबद्दल तत्कालीन वृत्तपत्रांमध्ये प्रामुख्याने बॉम्बे टाईम्स, कुरियर, ज्ञानोदय, ओरिएंटल स्पेक्टेटर इत्यादी पत्रांनी वारंवार प्रशंसा केलेली आढळते व त्यांच्या समाजकार्याची नोंदही घेतलेली दिसते. तत्कालीन शाळा खात्याने त्यांच्या कार्याचा गौरव केला होता. मुंबई न्यायालयाचे त्यावेळचे न्या. सर टी. ई. पैरी यांनी त्यांचा गौरव केला होता. रे.डॉ. विल्सन, न्या. चंदावरकर या तत्कालीन विद्वानांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या लोकाभिमुख विदवत्‍तेचा गौरव केला होता.

    भारतीय राष्ट्रवादाचे पितामह दादाभाई नौरोजी हे जांभेकरांचे विद्यार्थी होते. त्यांनी गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले आहे, ते पश्चिम भारत खंडातील अर्वाचीन विव्दान मुकुटमणी, प्रख्यात पं. अव्दितीय विव्दान होते. “मुंबईना समाचार” या गुजराथी पत्राने या शिक्षण महर्षींची स्मृती भारतीयांनी सतत जागृत ठेवावी असे आवाहन केले होते. १७ मे १८४६ रोजी जांभेकरांचा आकस्मिक मृत्यू झाला. पण अल्पावधित त्यांनी बजावलेले कार्य महाराष्ट्र जीवनाचा कायापालट करणारे ठरले.

    समाजसुधारक चळवळीचा आदर्श -

    प्राध्यापक या नात्याने केवळ अध्यापन व संशोधनात ते व्यग्र होते असे नाही तर त्यांनी राष्ट्रीय जीवनात अनेक प्रागतिक चळवळींना गती दिली. सामाजिक प्रबोधनासाठी वृत्तपत्रासारखे दुसरे साधन नाही हे ओळखून त्यांनी बंगाली वृत्तपत्रांपासून प्रेरणा घेतली !

    राजाराममोहन रॉय यांचे कार्य आणि बंगाली पत्रांनी केलेला झंझावाती प्रचार यामुळे ते भारुन जाऊन जांभेकरांनी नव्या पत्राचा संकल्प केला व तो कृतीत आणला. ध्येयवादी बंगाली पत्राचा वस्तुपाठ जांभेकरांनी गिरविला व त्यातून नवीन लोकचळवळ महाराष्ट्रात सुरु झाली. गंगा - जमनी व्दैभाषिक पत्र ही परंपरा बंगालातून महाराष्ट्रात पुढे आली. अशा या थोर आद्य पत्रकारास आपले लाख, लाख प्रणाम !