वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
प्रभो नाम तुझे । विंझाई । सगुण रूप तव आई ।
भत्त* कैवारी । महिमा हा । गाती सर्व ही आई ।।धृ0।।
प्रभो नाम तुझे ।
निर्गुण परब्रह्य । अनाद्य । अनामवासी आद्य ।
विंद्यवासिनी । अवतीर्ण । परब्रह्याते स्फुरण ।।
ऋृषी माकर्ंडेय । अत्रेय । ब्रह्यानन्दी दंग ।।1।।
प्रभो नाम तुझे ।।धृ।।
पुर्ण चैतन्य । प्रेमळे । शशि सूर्याहून आगळे ।
कोटी रविचे । तेजासी । न लागे तुलनेसी ।।
देव नारदा । सदानन्द । चित्ती ब्रम्हानन्द ।।2।।
प्रभो नाम तुझे ।।धृ।।
वाघावर बैसे । अष्टभुजा । स्वरूप सुन्दर अनुजा।
विंध्यवासिनी । विझाई । ताह्मिणीची आई ।।
गणेश सुताला । आनन्द देई नित्यानन्द ।। 3।।
प्रभो नाम तुझे ।।धृ।।
गायीका - वृषाली घाणेकर
October 15, 2015
चॉकलेट किंवा त्याचा कच्चा माल असणाऱ्या कोकोचेउगमस्थान कोणते, हा एक कुतूहलाचा विषय आहे. कारण, हा विषय फक्त चॉकलेट या पदार्थाशी निगडित नसून तो मानवाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीशीही संबंधित आहे. त्यामुळे पुरातत्त्वशास्त्रज्ञांना अधिकाधिक जुन्या चॉकलेटचा किंवा कोकोच्या वापराचा शोध घेण्यात मोठे स्वारस्य आहे. याच संशोधनातून मिळालेली ही माहिती…
September 3, 2023
मूलाधारादुत्थितवीथ्या विधिरन्ध्रं
सौरं चान्द्रं व्याप्य विहारज्वलिताङ्गीम् ।
येयं सूक्ष्मात्सूक्ष्मतनुस्तां सुखरूपां
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ ५॥
आई जगदंबेचे मानवी शरीरातील सूक्ष्मतम अस्तित्व म्हणजे कुंडलिनी शक्ती. नाभीजवळ साडेतीन वेटोळ्यात, वर्तुळाकारात ती सुप्तावस्थेत असते.
तिचा रंग अत्यंत आकर्षक लालबुंद वर्णिलेला आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज, नागिनचे पोर कुंकुमे अर्चिले , अशा सुंदर उपमेने तो लाल रंग दाखवितात.
योगमार्गाने या आदिशक्तीला जागृत केल्यानंतर तिच्या होणाऱ्या प्रवासाचे वर्णन करताना या श्लोकात आचार्यश्री म्हणतात,
मूलाधारादुत्थितवीथ्या विधिरन्ध्रं- मूलाधारा पासून वर सरकत वीथी म्हणजे मार्गाने विधिरंध्र म्हणजे मस्तकातील सहस्त्रार कमल, ब्रह्मरंध्रात पोहोचणारी.
ही कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर पाठीच्या दांड्याच्या खाली असणाऱ्या मूलाधार चक्रातून ऊर्ध्वगामी होत स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा अशा चक्रांचा मार्ग पार करीत , ब्रह्मरंध्रात स्थिर होते.
सौरं चान्द्रं व्याप्य विहारज्वलिताङ्गीम् - सूर्यनाडी चंद्रनाडी स्वरूपात वर्णन केलेल्या इडा आणि पिंगला या नाड्यांना व्यापून, अत्यंत दिव्य तेजस्वी स्वरूपात असणारी.
सूप्तावस्थेत लालबुंद असणारी ही कुंडलिनी मार्गक्रमणा करताना अत्यंत तेजस्वी सुवर्णमयी स्वरूपात चकाकते. ' सुवर्ण नागिन लचकत मुरडत आकाशी चालली ' अशा स्वरूपात संत तिचे वर्णन करतात.
येयं सूक्ष्मात्सूक्ष्मतनुस्तां- ह्या अत्यंत सूक्ष्मातिसूक्ष्म शरीर असणाऱ्या तिला. आई जगदंबे ला इथे सूक्ष्मातिसूक्ष्म म्हटले आहे . जी गोष्ट जितकी सूक्ष्म तितकी अधिक शक्तिशाली, असा शास्त्र सिद्धांत आहे. आई जगदंबा परमशक्ती असल्याने सूक्ष्मातिसूक्ष्म.
सुखरूपां- तिचे हे ब्रह्मरंध्रात स्थिर होणे हेच परमसुख आहे. ते जिचे मूलभूत स्वरूप आहे अशा,
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे - कमलाप्रमाणे नेत्र असणाऱ्या आई जगदंबा गौरीचे मी स्तवन करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
May 3, 2020
आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो हे गाणे झिम्मा फुगडी खेळताना पुरवापार पासून आवडीने गायले जाते.हो हो आज आपण नव्याने ओळख करून घेणार आहोत फळांचा राजा आंबा ह्याची.
धगधगत्या उन्हाळ्यात मनाला आल्ल्हाद देणारे हे फळ.उन्हाळ्यामध्ये आतुरतेने ह्या फळाच्या आगमनाची वाट पाहिली जाते.असा हा फळांचा राजा.लहान मूलांपासून अगदी वृध्द मंडळीचा देखील हा आवडता आहे.
ह्याच्या जाती तरी किती,लंगडा,केसर,
भिष्म,हापूस,मानकुराद,मुशेराद,तोतापुरी,रायवळ इ अनेक जाती आहेत ह्याच्या आणी प्रत्येकाची चव वेगळी बरं का.
बरं ह्या पासून खायचे प्रकार किती करतात मुरंबा,आमरस,आम्रखंड,आंबा वडी,आंब्याचे साठ,रायते इ हे झाले पिकलेल्या आंब्याचे.तर कारी असताना लोणचे,रायते,पन्हे,चुंदा इ प्रकार फारच सुरेख लागतात.
चला मग आता ह्याची माहिती पाहूयात ना.आंब्याचा ३०-१२० फूट पर्यंत उंच वृक्ष असतो.पाने ४-१२ इंच लांब असतात फुले छोटी असतात व मादक सुगंध येतो त्यांना.फळ हे वेगवेगळ्या आकाराचे असले तरी कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर पिवळसर लाल असते.
आता प्रथम भागामध्ये आपण कैरीचे उपयोग पाहूयात व गुणधर्म जाणून घेऊया.कैरी जी तुरट असते ती शरीरातील वात दोष वाढविते तर आंबट कैरी हि शरीरातील पित्त दोष वाढविते.कैरी उष्ण असते.
चला मग ह्याचे औषधी उपयोग पाहुया:
१)जुलाब होत असल्यास तुरट चवीच्या कैरीचा रस थोडा थोडा प्यावा.
२)आंबट कैरी पासून तयार केलेले पन्हे हे तहान,अंगाची आग शांत करते व तृप्तीचा अनुभव देते.
3)ज्या व्यक्तिंना कामा अथवा व्यवसाया
निमित्त वारंवार उष्णतेशी संपर्क येतो त्याच्या डोळ्याचा थकवा घालवायला कैरीचा किस डोळ्यावर ठेवावा.
४)उन्हाळ्यात कच्च्या कैरीवर सैंधव मीठ घालून बेताने खाल्ल्यास उन्हाळ्याचा त्रास कमी होतो.
५)आंबट कैरीची साल सुकवून केलेली आंबोशी तोंडाची चव वाढविते तसेच हि चिंचे एवजी आमटी भाजीत वापरली जातात.
कैरी अतिप्रमाणात खाल्ल्यास व अजीर्ण होऊ शकते.
(क्रमश:)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 19, 2016
माणसाच्या तोंडात सदैव असलेली गोष्ट म्हणजे शिवी. क्रोध,तिरस्कार व्यक्त करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. त्या सर्वच भाषेत उपलब्ध आहेत. कधी राग आला म्हणून तर कधी राग यावा म्हणून शिव्यांचा उपयोग होतो.अगदी जन्मापासूनच त्याचे बाळकडू मिळते.
August 27, 2023
आपल्या आहारातील काही अत्यंत महत्वाच्या पदार्थाविषयी किंवा प्रमुख सूत्राविषयी आपण आता चर्चा करूया.
आहार हेच औषध आहे. हा आहार जर युक्ती वापरून बनवला तर वेगळ्या औषधांची आपल्याला गरजच पडू नये. शास्त्रीय स्पष्टीकरण देण्यापेक्षा जास्तीतजास्त व्यावहारिक स्तरावरून आहार अभ्यासला पाहिजे.
देशानुसार आहार विचार करावा. म्हणजे आपण ज्या प्रदेशात राहातो, त्या प्रदेशात उगवणारे अन्नधान्य आपल्याला हितकर असते. उगाचच कोणत्या तरी कंपनीच्या अहवालानुसार, कोणत्या तरी प्रयोगशाळेचा दाखला देऊन, काही अन्न पदार्थ आपल्या पोटी मारले जातात. आपणही कोणताही विचार न करता ते पदार्थ जणुकाही आपल्यासाठीच बनवले आहेत, अशारितीने त्यांना अंगिकारतो.
एवढं सांगताहेत, ते आधी वापरून तर बघू, पासून सुरू होत जाणारी आमची गुलामगिरी आमच्या रक्तात एवढी भिनते की नंतर ते आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनून जातात, मग त्या पदार्थातील दोष दिसेनासे होतात. पण ते पदार्थ मात्र आपला प्रभाव आतून दाखवतच असतात.
जसे सोयाबीन. मुळात डुकरांना माजवण्यासाठी पाश्चात्य देशात या सोयाचा वापर केला जायचा. याची तशी काही आवश्यकता आहे, असे अजिबात नाही. पण भ्रष्टाचार कोणत्याही स्तरावरून केला जाऊ लागला. आणि भारतातील मोठ्या प्रमाणात असलेल्या कुपोषितांच्या सोईसाठी या सोयाची आयात केली गेली. त्याच्या शेतीसाठी अनुदान देणे सुरू झाले. जिथे सोयाची शेती केली जाते, तिथे अन्य पिके कुपोषित राहातात. तेथील जमिनीतील पाण्याचा स्तर इतर जमिनीपेक्षा अधिक खाली जातो. पण लक्षात घेतो कोण ?
मुळात अभारतीय असलेला हा धान्य प्रकार आमच्या स्वयंपाकघरात असा काही घुसवला गेला आहे, की आमचे पूर्वजांनी हे सोयाबीन आम्हाला न दिल्यामुळे आमचे अतोनात नुकसान झाले आहे, असे काही वेळा वाटते. नेहमीच्या पोळीच्या पीठात एक मुठ करता करता सोयाच्या दुधापर्यंत, आणि चंक्सच्या रूपात, गरीबांचे चिकन इथपर्यंत त्याची घुसखोरी झालेली आहे.
त्याला सक्षमपणे पर्याय असणारे उडीद, मसूर, चवळी, राजमा सारखे भारतीय पर्याय उपलब्ध असताना या सोयाचे मिडीयाने एवढे कौतुक केले की, स्वतःच्या पोटच्या गोळ्यापेक्षा, सवतीचे पोर आम्हाला आमचेच वाटू लागले.
सोयाबीन हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. अश्या कितीतरी अभारतीय गोष्टी आम्ही सहजपणे स्विकारल्या आहेत.
मुळात मेकाॅलेच्या विचारसरणीचा आमच्यावर एवढा प्रभाव पडत चालला आहे, की भल्या भल्यांना देखील आपण दिवसेंदिवस अभारतीय होत चाललो आहोत, हे लक्षातही येत नाही. आमच्या मनातील भारतीयत्व पद्धतशीरपणे विसरायला भाग पाडणारा तो दुष्ट मेकाॅले आमच्या शिक्षणपद्धतीतून अजुनही जिवंत आहे.
स्वत्व गमावल्यामुळे सर्वस्व जाण्याची वेळ लवकरच येते, या न्यायाने आपण जर वेळीच जागे होऊन भारतीय पद्धतीने विचार करणे सुरू केले नाही तर आपण कृतीच्या स्तरावर पण अभारतीय होत जाऊ, अशी प्रामाणिक भीती वाटते.
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
17.01.2017
January 17, 2017
१९५०-६०च्या दशकात यूएसमध्ये ब्लॅक फ्रायडेला त्याचे नाव मिळाले जेव्हा फिलाडेल्फिया पोलीस विभागाने थँक्सगिव्हिंग आणि आर्मी-नेव्ही गेम्समधील दिवसाचा संदर्भ देण्यासाठी “ब्लॅक फ्रायडे” हा शब्द वापरला. तेव्हा शुक्रवार दिवस होता जेव्हा मोठ्या संख्येने लोकं शहरात खरेदी करत होते आणि गर्दी आणि समोरून येणाऱ्या वाहतुकीला तोंड देण्यासाठी पोलिसांना तासनतास कसरत करावी लागली.
November 26, 2021
अगस्त्यच्या बियांची पूड तीन ग्रॅम ते दहा ग्रॅम पर्यंत गाईच्या धरोष्ण २५0 ग्रॅम दुधासोबत सकाळ-संध्याकाळ काही दिवसापर्यंत घेतल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.
शंखपुष्पीची ३-६ ग्रॅम पूड मधात घालून चाटावी आणि वरून दूध प्यावे. याच्या सेवनाने बुद्धीचा योग्य विकास होतो.
३-६ ग्रॅम शंखपुष्पी पूड साखर आणि दुधाबरोबर नेहमी सकाळी घेतल्याने स्मरणशक्ती वाढते.
शंखपुष्पी २-४ ग्रॅम आणि वचा १ ग्रॅम पूड मुलांना दिल्याने खूपच बुद्धिमान आणि शहाणे होतात.
सकाळी शंखपुष्पीचे थोडे पाणी घालून रस काढता येते. शुद्ध रस १0-२0 मिलिग्रॅम किंवा २-४ ग्रॅम पूड मध, तूप आणि साखरेबरोबर सहा महिन्यांपयर्ंत सेवन करीत राहिल्याने स्मरणशक्ती आणि बुद्धीत वाढ होते.
दूध, तूप किंवा पाण्यासोबत वचाच्या खोडीची पूड २५0 मिलिग्रॅमच्या प्रमाणात दिवसातून दोन-तीन वेळा एका वर्षापयर्ंत किंवा किमान एक महिन्यापयर्ंत घेतल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.
१0 ग्रॅम वचा पूड २५0 ग्रॅम खांडसरीसोबत पाक करून रोज १0 ग्रॅम सकाळ-संध्याकाळ खाण्याने विसरण्याची सवय दूर होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 18, 2017
महाराष्ट्रातील कोनाकोपऱ्यातील जाती शोधून त्यांना एकमेकांविरुद्ध झुंजविण्याचे राजकारण सुरु आहे. अशा वेळी दुसऱ्या जातीबद्दल काही चांगले लिहिण्याचे मी धाडस करतो आहे. ही जात म्हणजे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ! म्हणजेच सीकेपी समाज !!
November 11, 2018
June 19, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti