वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
नखं कुरतडणे ही अतिशय वाईट सवय आहे… यावर कोणाच दुमत नक्कीच नसेल! अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत अनेकांमध्ये ही सवय आपण पाहिली असेल. वाचकांपैकीसुद्धा अनेकांना हाताच्या बोटांची नखे कुरतडायची सवय असेल कदाचित. खूप जण या सवयीपासून लांब जायचा प्रयत्न देखील करतात, पण ते तितकसं सोप नाहीये, हे ही आपण जाणता. अनेक प्रसिद्ध व्यक्तींना, सेलिब्रिटीजनादेखील आपण ही सवय असलेले पाहिले आहे. एका सर्वेनुसार लहान मुलं किंवा वयात येणाऱ्या मुलांमध्ये नख कुरतडण्याचे प्रमाण जास्त असते व ते वय वाढते तसे हळू हळू कमी देखील होते. वयाने मोठ्या असलेल्या माणसांमध्ये ही सवय क्वचितच दिसून येते.
देहबोलीचा विचार केला तर लहान अथवा मोठे, कोणीही नख खाताना किंवा कुरतडताना वाईटच दिसते. मानसशास्त्रानुसार ती एक डीसऑर्डर आहे. पण, हा काही गंभीर मानसिक आजार नव्हे… तर मानसिक अस्वस्थतेच एक लक्षण आहे.
का बर नख कुरतडतात?
मानसिक अस्वस्थता, ताण-तणाव, एकटेपणा, कंटाळा, विचारांमध्ये अति गढून जाणे किंवा परिस्थितीवरील आपले नसलेले नियंत्रण… यापैकी कशामुळेही नख कुरतडण्याची सवय लागू शकते. परीक्षेचा ताण, भीती, इंटरव्ह्यूचे टेन्शन, एखादा निर्णय घेताना येणारा ताण, कंटाळा आलेला असणे, यापैकी कशाहीमुळे आपल्याला नख कुरतडण्याची इच्छा होऊ शकते. ताण-तणावाची कारणे वेगवेगळी असू शकतात. यामध्ये काही क्रॉनिक कारणे असू शकतात व काही तात्कालिक कारणे पण असू शकतात. उदा. एखाद्या मुलीला जर आपला रंग सावळा आहे किंवा आपल्याला पिम्पल्स आहेत यामुळे न्युनगंड वाटत असेल तर त्यामुळे जेंव्हा ती चार माणसांमध्ये मिसळेल त्या वेळी तिला एक प्रकारचा नर्वसनेस आणि अस्वस्थता येऊ शकते व त्या अस्वस्थतेमुळे ती नख खाणे, बोटांच्या अथवा हातांच्या अस्वस्थ हालचाली आदी करू शकते. कधी कधी एकटेपणामुळे काही सुचत नाही म्हणून देखील नख कुरतडली जातात.
या सवयीचे परिणाम
ही नक्कीच वाईट सवय आहे. यावरून समोरच्याला आपल्याला कसला तरी ताण आला आहे, हे लगेचच लक्षात येते. आपण नर्वस होतो आणि नख कुरतडतो, म्हणजेच आपल्याला समोर आलेल्या परिस्थितीला शांत मनाने सामना करता येत नाहीये किंवा आपण अशा परिस्थितीत मनाने अस्वस्थ होतो, असे समोरच्याचे आपल्याबद्दल मत होऊ शकते, जे नक्कीच चांगले नाही. मग आपली ही सवय जर ऑफिसमध्ये आपल्याबद्दलचे मत खराब करणार असेल, इंटरव्ह्यूमध्ये आपले इम्प्रेशन खराब करणार असेल, तर या सवयीपासून कसे दूर जाता येईल हे पाहिले पाहिजे.
कशी सोडवायची ही सवय?
आता आपल्याला माहीत आहे की आपण नर्वस झालो किंवा काही ताण आला की किंवा एकटेपण वाटून कंटाळा आला की आपण नख चावतो / कुरतडतो. मग यावर उपाय काय? मैत्रिणींसाठी यावर सगळ्यात सोपा उपाय आहे की नखांना अतिशय उग्र वासाचे किंवा कडवट चवीचे नेल पॉलिश लावा!! त्यामुळे नख खाणे कमी होईल. थोडा अवघड उपाय म्हणजे, शांतपणे विचार करा आणि लक्षात घ्या की आपल्याला कशाचे टेन्शन येते. त्यावर कशी मात करता येईल याचा देखील विचार करा आणि अशावेळी, आपले हात एकमेकांत गुंफून ठेवून पहा. अर्थात सतत हात गुंफून ठेवणेही चांगले नाही. परंतु, नखं कुरतडण्याची सवय सुटेपर्यंत हे करून पहायला हरकत नाही.
तसेच, मुळात मानसिक एकटेपणा घालवण्यासाठी आपले मन चांगल्या छंदात अथवा चांगल्या गोष्टीत रमवण्याचा प्रयत्न करा. मित्र-मैत्रिणींमध्ये मिसळा. सतत मनाला सांगा की ही सवय चांगली नाही आणि चार-चौघात मिसळल्यानंतर आपण नख खातो आहे असे लक्षात येताच ते लगेच थांबवा. आपला आत्मविश्वास कसा वाढेल यासाठी प्रयत्न करा. आपला रंग, रूप, भाषा, शिक्षण, आपली परिस्थिती याचा कमीपण वाटून घेऊ नका. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याबद्दल न्यूनगंड बाळगण्यात आपला फायदा नाही, पण ज्या गोष्टीमध्ये बदल करणे आपल्या हातात आहे, त्या बदलण्यासाठी नक्कीच प्रयत्न करा आणि मग पहा, ही सवय कधी सुटली हे तुम्हाला आठवावं लागेल!
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:-मृणाल काशीकर
पाय दुखण्याचे कारण सहसा पायाच्या अस्थी आणि स्नायूत असते. कधी कधी अधिक गंभीर आजारांमुळे पायाच्या मज्जातंतूच्या प्लीहा अथवा रक्तवाहिन्या यांच्या आजाराने देखील पायात वेदना येतात. पायातील वेदना अचानक सुरू होऊ शकतात किंवा हे दुखणे हळूहळू सुरू होते. कधी ते दुखणे पायाच्या विशिष्ट भागातच जाणवते, तर इतर वेळा संपूर्ण पायात वेदना होणे संभवते. पायातील वेदना सतत चालू असू शकतात. तसेच त्या अधूनमधून कळा आल्याप्रमाणे देखील जाणवू शकतात. वेदनेत अनेक प्रकार असू शकतात. काही आजारात ही वेदना सतत संथ प्रमाणात होत असते. कधी आग झाल्यासारखे जाणवते, कधी तीव्र वेदना पायाच्या एका टोकापासून दुसरीकडे जाताना जाणवते. पायात मुंग्या येणे, बधिरपणा जाणवणे अशा प्रकारे देखील त्रास होतो. या वेदनेमुळे व्यक्तीच्या हालचालीत अडचण निर्माण होते. बऱ्याच वेळा शरीराचे वजन पायांना पेलवत नाही. कधी कधी रुग्णाच्या पायाच्या रक्तपुरवठ्यात दोष असतो. अशा व्यक्तीला अकस्मात मोठ्या प्रमाणात पायात वेदना सुरू होणे ही गंभीर घटना असते. पायाला रक्ताचा पुरवठा बंद होऊ शकतो व रक्तवाहिन्यांवर शस्त्रक्रिया करावी लागते अथवा पायाचा काही भाग काढून टाकण्याची आवश्यकता निर्माण झालेली असते. खुबा, गुडघा, घोटा, पाऊल अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या कारणांनी वेदना होतात. वेदनेचे नेमके कारण शोधणे उपचाराच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.
पायाच्या हाडाचा कर्करोग होतो तेव्हा वेदना सतत चालू असते. ही वेदना रात्री जास्त जाणवते. आजार असतो तेथे सूज येते, रुग्णाचे शरीर वाळू लागते, ताप येऊ लागतो आणि हालचाल अधिकाधिक कठीण होते. कोणताही आघात न होताच हाड मोडते. आघातानंतर होणारा अस्थिभंग अर्थातच खूप वेदना निर्माण करतो. हाड मोडते तेथे सूज येते, भाग काळानिळा पडतो, थोडीसुद्धा हालचाल वेदना असह्य करते, त्या बाजूला शरीराचे वजन पेलवत नाही. अनेकदा हाडाच्या जवळून जाणाऱ्या रक्तवाहिन्यांवर आणि मज्जातंतूंच्या शिरांवर परिणाम होतो. त्यामुळे मुंग्या येतात, मांडीची स्पंदने होतात. पायाचा रंग बदलतो, त्वचा गार पडते. भाग वाकडा होतो. स्नायूंत गोळे येतात व तो भाग हलला, तर हाडांचे तुकडे एकमेकांत घसून कटकट आवाज येतो.
पायात जीवाणूंमुळे दाह होतो तेव्हा तो भाग सुजतो, तेथे वेदना होतात. अंगात ताप चढतो, नाडीच्या गतीत बदल होतो. भाग लालसर होतो. हातापायाच्या रक्तवाहिन्यांतून स्नायूंना रक्ताचा पुरवठा कमी पडला, तर ते दुखणे चालण्याने वाढते. रात्री हवा गार आली की दुखणे वाढते, पाय गार पडतात, थंड हवा सहन होत नाही. त्वचेवर हलका दाब दिल्यास तेथील केशवाहिन्या रिकाम्या होतात. दाब काढल्यास निरामय प्रकृतीत एक ते तीन सेकंदात या केशवाहिन्या पुन्हा भरतात. रक्तवाहिन्यांत अडथळा झालेला असला, तर अशावेळी रिकाम्या झालेल्या केशवाहिन्या भरावयाला वेळ लागतो. सायटिका हा शब्द वारंवार वापरला जातो. सायाटिका हे आजाराचे नाव नाही. कमरेतून, खुब्याच्या, मांडीच्या मागच्या भागातून पोटऱ्यापर्यंत जाणाऱ्या वेदनेला सायाटिका म्हणतात. अशा प्रकारच्या वेदनेची अनेक कारणे असू शकतात. विश्रांती घेत असताना वेदना कमी होतात, परंतु हालचाल करताना दुखणे वाढते. चालताना व्यक्ती लंगडत अडखळत चालते. बसल्या स्थितीतून उभे राहताना त्रास वाटतो. कधी कधी अकस्मात आलेल्या ताणाचा पाठीवर विपरीत परिणाम होतो. पायात दुखण्याचे व सुजण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे पायाची नीला गोठते. माफक गैरसोय होण्यापासून ते तीव्र वेदना होण्यापर्यंत त्रास होऊ शकतो. पाय, पिंढऱ्या सुजतात. पाय गरम होतो. जड झालेला जाणवतो. ताप येतो, हुडहुडी भरते. पायावरच्या नीला फुगतात. दाबल्या तर दुखतात. व्हेरीकोझ व्हेन्समध्ये रात्री पिंढऱ्यांना गोळे येणे असा त्रास बऱ्याच लोकांना होतो. दीर्घकाळ उभे राहिले किंवा चालले तर पोटऱ्या जड होतात. मासिक पाळीच्या दिवसात पाय दुखतात. घोट्याजवळील त्वचा काळी होते. तेथे त्वचा जाड होते, खपल्या पडू लागतात. तेथे मुरुम होते. ही जखम भरून येण्यास खूप वेळ लागतो.
लहान मुलांमध्ये हाडांना चीर पडते. कधी कधी तेथे विषाणूमुळे गळू होते. क्वचित हाडांचा कॅन्सर होतो. मोठ्या माणसांना व लहान मुलांना पायात होणारा एक त्रास म्हणजे कंपार्टमेंट सिंड्रोम. यामध्ये पायात वेदना येते, ती हळूहळू वाढत जाते. स्नायू ताणले की दुखणे वाढते. सांध्याची हालचाल रोखण्यासाठी बांधलेली ड्रेसिंगस् उपयोगी पडतात. ट्रॅक्शनमुळे वेदना वाढते. स्नायू कमजोर होतात. पायात मुंग्या येतात, पायांची आग होते. पायातील रक्ताभिसरण व्यवस्थित चालू असते. तथापि आजार वाढल्यावर रक्तवाहिन्यांचे स्पंदन लागेनासे होते. वेदनाशामन औषधांचा उपयोग होत नाही. उलटपक्षी वेदनाशामक औषधांच्या वापराने दुखणे वाढते.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.डॉ.ह.वी.सरदेसाई
अग्नि महत्वाचा !
'अग्निमिळे' या ऋचेनेच संहिता ग्रंथाची सुरवात झाली आहे. एवढं अग्निचं महत्व !
पाणी शुद्ध करण्यासाठी जो अग्नि वापरला जातो, तो देखील शुद्धीकरणासाठी महत्वाचा मदतनीस आहे.तोही तसाच शुद्ध हवा.
हो. अग्निमध्ये देखील थोडे सूक्ष्म फरक आहेत.
सूर्य म्हणजे साक्षात अग्नि. पण प्रकटीकरणाची वेळ ठरलेली. त्यामुळे रात्रौच्या वेळी पाणी शुद्ध करायचे झाल्यास त्याचा उपयोग नाही. (आणि तसं पाणी सूर्यास्तानंतर प्यायचेच नाही, अगदी उकळून गार झालेले पाणी देखील परत गरम करायचे नाही आणि रात्र उलटून गेली तर निषिध्दच ! )
सूर्याखेरीज आणखी कोणते अग्नि वापरले जातात. मोठ्या यज्ञामधे जी अग्निची स्थापना करतात, त्यासाठी लाकडी रवि लाकडी उखळात घर्षण करून अग्नि निर्माण केला जातो. स्वयमग्नि ! हा अग्नि अत्यंत शुद्ध असतो.
नंतर त्याची स्थापना करून इतर समिधा, लाकडे वगैरे इंधन वापरून वाढविला जातो.
एक अग्नि विवाहाच्या वेदीवर सप्तपदी करत असताना प्रज्वलीत केला जातो. या अग्निचे रक्षण पुढे समंत्र आयुष्यभर करायचे असते, जो मृत्युनंतर उरलेलं शरीर परत ईश्वरापर्यंत पोचवण्यासाठी, म्हणजेच दहन करण्यासाठी वापरला जातो. हा अग्नि अत्यंत पवित्र असतो. म्हणून अग्निला पावक असेही म्हणतात.
गारगोटीचा दगड वापरून अग्नि प्रज्वलीत केला जातो, तोही अग्निच, पण गरज म्हणून तयार केलेला. मंत्राशिवाय केवळ तंत्र वापरून.
एक अग्नी चुल पेटवण्यासाठी वापरतात. सध्याच्या जमान्यातील काडेपेटी वापरून म्हणजे गंधकाचा वापर करून. किंवा लायटर मधली चकमक वापरून ठिणगी तयार केली जाते. अशा प्रकारे तयार केलेला अग्नि हा दुय्यम दर्जाचा मानला जातो.
अग्नि रक्षणासाठी जे इंधन वापरले जाते, तेही महत्वाचे. जसे तेल, तूप, राॅकेल, कापूर, स्पिरीट, जसे इंधन तशी काजळी, तशी अग्निची तीव्रता !
विडी किंवा सिगरेट पेटवायची असेल तर देवघरातल्या निरांजनावर पेटवली जात नाही. जसे काम तसा अग्नि. जसे काम तशी पवित्रता.
अग्नि कोणत्या कारणासाठी हवाय, त्याप्रमाणे अन्य साधने. आयुर्वेदात काही भस्म बनवताना भट्टी वापरायला लागते. ही भट्टी विशिष्ट लाकडे वापरून, विशिष्ट संख्येमध्ये रानशेणी वापरून बनवायला सांगितली आहे. रानशेणींची संख्या बदलली की पुटाचे नाव बदलले. त्या औषधावर होणारा परिणाम बदलला. हे सगळं अग्निवरच अवलंबून आहे ना !
घरात जी चुल पेटवली जाते, त्या चुलीमागे एक उपचुल असते. तिला वाईल, वैल असे म्हणतात. त्यावर मातीचे मडके ठेवून त्यात पाणी ठेवून दिले जाई. पुढे मुख्य चुलीवर काम करत असताना मागे जाणारा अग्नि फुकट दवडू न देता, त्यावर मडक्यात पाणी तापवून घेतले जाई. आमटी भाजीत जर पाणी हवे असेल तर हेच गरम पाणी वापरले जाई. हे पाणी दिवसभर त्या वैलावरच. चुल प्रत्यक्षात थंड झाली तरी देखील चुलीचे दगड गरम असत, तेवढी उष्णता हे पाणी धगधगीत ठेवायला पुरेसे असे. या पाण्याला एक मस्त वास येतो. धुराचा वास. स्मोक फ्लेवर ! जो वास तयार अन्नाला आपोआपच येत असे. (आमच्याघरी आजही चुल आहे. आम्हाला पेज अजूनही चुलीवरची मिळते.) हे वैलावरचे पाणी सतत कोमट असल्यामुळे जंतुसंसर्ग होण्याचे काही कारणच नाही.
काळ बदलत गेला, तसे अग्नि निर्माण करण्याची पद्धत बदलत गेली. ओव्हन आला. विद्युत उर्जा वापरून हा अग्नि तयार केला गेला.
आतातर चुंबकीय पद्धतीने अग्नि मिळतो म्हणे. मायक्रोवेव्ह !! आणि इंडक्शन प्लेट. !!! अग्निचे तेज हे हे रूप दिसतच नाही. केवळ तापणे.
एका अग्निवर एका पद्धतीने शुद्ध करून घेतलेले पाणी परत दुसऱ्या अग्नीच्या संपर्काने शुद्ध करायचे नाही. गुण बदलतात.
वेळ नाही, या सबबीखाली अन्न शिळं करून फ्रीजमध्ये ठेवायचं. आणि गरम करायला सुद्धा सवड नाही, म्हणून मायक्रोवेव्ह मधे ठेवून परत गरम करून खायचं. अशी ही पाश्चात्य पद्धत !
मायक्रोवेव्हमधे गरम केलेलं पाणी आणि चुलीच्या अग्निवर केलेलं पाणी यावर तौलनिक अभ्यास झाला. दोन वेगवेगळ्या कुंडीतील एकाच वयाच्या, एकाच प्रकारच्या रोपट्यांना विशिष्ट दिवस या दोन्ही प्रकारानी गरम करून गार झालेले पाणी घातले. काही दिवसांनी असे लक्षात आले, की मायक्रोवेव्ह मधील अग्निचे जे तरंग निर्माण होतात, ते घातक असतात, त्यांनी गरम केलेले "शुद्ध" पाणी पिऊन रोपटे मरून गेले.
आज पाश्चात्य तंत्र आमच्या स्वयंपाकघरात येऊन पोचले आहे. ज्याच्या निर्धोक उपयोगिते विषयी अजून मोठे प्रश्नचिन्हच आहे. तरी आम्हाला जाग येत नाहीये. एका बाजूने तंत्रज्ञान वाढते आहे, तर एका बाजूने रोग वाढताहेत. नवनवीन रोग अक्राळविक्राळ स्वरूपात समोर येताहेत. आणि अजून आम्हाला जाग येत नाही.
याला काय अर्थ आहे ?
आमचं वैलावरचं पाणी मात्र त्यासाठी समर्थ आहे.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
मुलांप्रमाणेच मोठ्या माणसांमध्येही जंत होऊ शकतात. त्यांच्यावर वेळीच इलाज केला पाहिजे. मुळात अस्वच्छता व अशुद्धी यापासून दूर राहायला हवे. जंत झाल्यानंतर त्यांचा नाश करण्यावरच थांबता नये, तर त्यानंतर जंतनाशक औषधे घेऊन त्याचे मुळापासून निर्दालन करायला हवे. तसेच जंत का होतात याच्या कारणांचा शोध घेऊन तीही दूर केली पाहिजेत.
घरच्या घरी करता येण्याजोगे साधे उपचार
रोज सकाळी अर्धा चमचा वावडिंगाचे चूर्ण मधासह घेण्याने जंतांचे त्रास कमी होतात.
जेवणानंतर ताकात बाळंतशोप, बडीशेप, ओवा व हिंग यांचे बारीक चूर्ण टाकून घेण्यानेही जंत कमी होतात.
कारल्याच्या पानांचा रस पिणे, मुळ्याचा रस व मध एकत्र करून घेणे, यामुळे जंत पडण्यास मदत मिळते.
टाकळ्याचे बी चावून खाऊन वरून एरंडेल घेतल्यास जंत पडतात.
ताकामध्ये पळसपापडीचे पाव ते अर्धा चमचा चूर्ण घेतल्यासही जंत कमी होतात.
कडुनिंबाच्या सालीचे चूर्ण व हिंग यांचे मिश्रण मधासह घेण्याने जंतांचा नाश होतो.
डाळिंबाचे साल वाळवून त्याचे चूर्ण करून रोज अर्धा चमचा इतक्या् प्रमाणात घेतले तर जंतांची प्रवृत्ती कमी होते.
शेवग्याच्या शेंगा उत्तम कृमिनाशक असतात. शेंगा उकळून त्या पाण्यात सैंधव मीठ व मिरेपूड टाकून घेण्याने जंत कमी होतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.डॉ.मधुरा भिडे
जवस हे तेल बीज चवीला गोड,कडू,उष्ण असते.हे स्निग्ध,पचायला जड असते.हे शरीरातील कफ व पित्त दोषाचा नाश करतात व वातदोष वाढवितात. जवसाचे बी हे डोळ्यांच्या आरोग्यास अहितकर असते.तसेच ते शुक्रधातूचा नाश करते.
ह्या जवसामधील ओमेगा ३ फॅटी अॅसीड्स हे हृदयाचे आरोग्य उत्तम राखायला मदत करतात.तसेच शरीरामध्ये रक्ताची कमी असेल तर ती देखील जवस वाढायला मदत करतात.
जवसाची चटणी करतात किंवा त्याचे तेल ही काढले जाते.आता आपण ह्या दोन व्यंजनांचा शरीरावर होणारा परिणाम पाहूया:
१) जवस चटणी:
तिखट,गोड,कडू,स्निग्ध,भुकवाढविते,उष्ण,
वात,कफनाशक,पित्तकर,शुक्रधातू नाशक,हृदयविकार नाशक आहे.
२) जवस तेल:
गोड,उष्ण,पचायला जड,स्निग्ध,कफ पित्तकर,वातनाशक,बल्य,संडासला साफ करविणारे,त्वचारोग नाशक,चरबी कमी करणारे,आहे.
जवस व मोहरीचे तेल हे जरी स्निग्ध असले तरी अन्य तेलांपेक्षा हि दोन्ही तेलं थोडी रूक्षच असतात.
जवसाचे अतिसेवन केल्यास अशक्तपणा येऊ शकतो.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
अगदी खरे सांगायचे तर नेत्रतज्ज्ञांनाही हे माहीत नाही. नक्की माहिती असलेले एकच कारण आहे- ते म्हणजे आनुवंशिकता. आई-वडिलांना चष्मा असल्यास मुलांना चष्मा लागण्याची शक्येता खूपच असते. इतर कुठलेही एकच एक कारण अद्याप सिद्ध झालेले नाही. ‘मुले सारखी टीव्ही-कॉम्प्युटरसमोर असतात, त्यामुळे चष्मा लागतो का?’ असे अजून तरी सिद्ध झालेले नाही. ज्यांना चष्म्याचा नंबर असतो, ते जवळ जाऊन टीव्ही बघतात. कारण त्यांना लांबून टीव्ही दिसत नाही. म्हणजे जवळून टीव्ही बघितल्यामुळे चष्मा लागतो, असे म्हणता येत नाही. तर चष्म्याचा नंबर असल्यामुळे टीव्ही जवळून बघितला जातो. एकदा त्यांना चष्मा लावायला दिला, की ते व्यवस्थित अंतरावरून टीव्ही बघतात. सिद्ध झालेले नसले तरी बहुतेक नेत्रतज्ज्ञांच्या मते- आधुनिक बैठी जीवनशैली आणि चष्मा यांचे नाते असू शकेल. सिंगापूर व जपानमध्ये झालेल्या पाहणीत काही वर्षांपूर्वीच्या मानाने तेथील सध्याच्या मुलांमध्ये चष्मा लागण्याचे प्रमाण जवळजवळ दुपटीपेक्षाही जास्त वाढले आहे. त्यांत घरात राहून बैठे खेळ खेळणे, कुठल्यातरी स्क्रीन (टीव्ही-कॉम्प्युटर)समोर नजर सतत खिळवून ठेवणे, या अशा शहरी जीवनशैलीचा परिणाम असण्याची शक्यलता सांगितली आहे. ‘अ’ जीवनसत्त्व डोळ्यांसाठी निश्चि तच चांगले असते; परंतु चष्म्याचा नंबर ‘अ’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे येत नाही. ‘अ’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे डोळ्यांवर इतर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे कितीही पालेभाज्या खाल्ल्या, गाजर खाल्ले तरी चष्म्याचा नंबर कमी होत नाही. काही लोकांमध्ये असाही एक गैरसमज असतो, की सारखा चष्मा वापरला, की चष्म्याचा नंबर कमी होतो; परंतु असे काही नसते. चष्मा वापरणे व नंबर कमी अथवा जास्त होणे, या दोन स्वतंत्र बाबी आहेत. त्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. चष्मा कायम घातला तरी नंबर जर वाढायचा असेल, तर वाढतोच.
नंबरांचे वर्गीकरण
चष्म्याच्या नंबरांच्या प्रकाराचे वर्गीकरण ऱ्हस्वदृष्टिदोष, दीर्घदृष्टिदोष व चाळिशीनंतर लागणारा चष्मा, असे करता येईल.
ऱ्हस्व दृष्टिदोष - अशा रुग्णांचा डोळा आकाराने मोठा असतो. त्यामुळे ज्या वस्तूकडे बघतो, त्याची प्रतिमा डोळ्याच्या रेटिनाच्या पुढे तयार होते. या रुग्णांना लांबचे दिसत नाही; जवळचे मात्र दिसते. लांबचे न दिसल्यामुळे हे रुग्ण टीव्ही जवळ जाऊन बघणे, पुस्तक डोळ्यांच्या जवळ घेऊन बघणे, असे करतात. ऋण (मायनस) नंबरचा चष्मा अथवा कॉन्टॅक्टय लेन्स वापरून या रुग्णांची नजर सुधारते. सर्वसामान्यपणे लहान वयात ऱ्हस्वदृष्टी चष्मा लागल्यावर शरीराची वाढ होते; त्या प्रमाणात नंबरही वाढत जातो. वाढ पूर्ण झाल्यावर नंबर वाढण्याचे प्रमाणही थांबते; परंतु काही रुग्णांमध्ये त्यानंतरही नंबर वाढू शकतो. त्यांच्या आधीच्या पिढीतील नातेवाइकांचा नंबर कसा व किती आहे, यावर बरेचसे अवलंबून असते.
काही ऱ्हस्वदृष्टिदोष असलेल्या रुग्णांमध्ये डोळ्यांचा रेटिना नावाचा भाग काही ठिकाणी झिरझिरीत झालेला आढळून येतो. जास्त जाड चष्मा असलेल्या लोकांमध्ये याचे प्रमाण जास्त दिसून येते. झिरझिरीत- पातळ झालेल्या भागात जर भोक पडले, तर त्यातून नेत्रपटल अथवा रेटिना आपल्या जागेवरून सरकण्याची शक्यळता असू शकते. असे झाल्यास एकाएकी दृष्टी एकदम कमी होते किंवा नजरेसमोर पडदा आल्यासारखे वाटून फक्त वरच्या भागातले दिसणे किंवा कुठल्या तरी एकाच भागातले दिसणे, असे होऊ शकते. उदाहरणार्थ- समोर उभ्या असलेल्या व्यक्तीचे फक्त डोके व मान दिसते. खालचा भाग दिसत नाही किंवा फक्त खालचे शरीर दिसते; वरचा भाग दिसत नाही. एखाद्या रुग्णाला कपबशीतील फक्त कप दिसतो; बशी दिसत नाही, असे घडते. नेत्रपटल जागेवरून सरकलेले असल्यास त्यावर शस्त्रक्रिया हाच उपाय आहे. ही शस्त्रक्रिया लवकरात लवकर करणे गरजेचे असते.
जाड चष्मा असलेल्या सर्व रुग्णांनी आपल्या डोळ्याचा रेटिना वर्षातून एकदा तपासून घ्यावा. त्यात जर काही झिरझिरीत अथवा भोके असलेला भाग दिसला, तर त्यावर लेझर उपचार करून पुढील संभाव्य धोका व त्यावरील मोठी शस्त्रक्रिया टाळता येऊ शकते. ज्यांच्या कुटुंबांमध्ये (आई-वडील-बहीण-भाऊ इत्यादी) असा प्रकार आधी झालेला आहे, त्यांना हा धोका जास्त असतो. असे घडल्यास करावी लागणारी शस्त्रक्रिया ही जवळ जवळ तातडीची शस्त्रक्रियाच समजली जाते; जितक्या् लवकर करू, तेवढी ती यशस्वी होण्याची शक्य्ता वाढते. जाड मायनस नंबरचा चष्मा असलेल्या रुग्णांनी त्यांना जर डोळ्याच्या आत वीज चमकल्यासारखी वाटली, तर डॉक्ट.रना लगेच दाखवावे. रेटीनाला भोक पडले असल्यास, असे होऊ शकते. अशा वेळी आधी सांगितल्याप्रमाणे लेझर उपचार केल्यास पुढचा धोका टाळता येऊ शकतो.
डोळ्यांच्या उपचारांमध्ये लेझर वेगवेगळ्या कारणांसाठी वापरतात. लेझर म्हणजे फक्त काही विशिष्ट पद्धतीचे लाईटचे किरण डोळ्यातील हव्या त्या भागावर केंद्रित करतात. अगदी पाच ते दहा मिनिटांत हे काम होते. कुठल्याही प्रकारचे इंजेक्शकन, शस्त्रक्रिया यात नसते.
दीर्घदृष्टिदोष या रुग्णांचा डोळा आकाराने लहान असतो. त्यामुळे ज्या वस्तूकडे बघायचे तिची प्रतिमा रेटिनाच्या मागच्या भागात तयार होते. प्रत्यक्ष रेटिनावर धूसर प्रतिमा दिसते. या रुग्णांना मुख्यत्वे जवळचे बघायला त्रास होतो. लांबचे चष्मा न लावल्यासही दिसते; परंतु जास्त नंबर असल्यास डोके दुखणे - डोळे दुखणे असे होऊ लागते. त्यामुळे लांबचे बघतानासुद्धा चष्मा लावावा. ऱ्हस्वदृष्टिदोषाप्रमाणे दीर्घदृष्टिदोषाच्या रुग्णांमध्ये शरीराच्या वाढीनुसार नंबर वाढत नाही. रेटिनाही बहुतांश रुग्णांत चांगला असतो. त्यामुळे त्यामानाने नेत्रपटल सरकण्याचा प्रकार कमी असतो.
प्रेसबायोपिया म्हणजेच चाळिशीनंतर येणारा चष्म्याचा नंबर! चाळिशीआधी आपल्या डोळ्याचे स्नायू लवचिक असतात. त्यामुळे डोळ्यापासून जवळच्या अंतरावर, लांब अंतरावर व त्यामधील कुठल्याही अंतरावर आपल्याला नजर केंद्रित करता येते; परंतु चाळिशीनंतर स्नायूंची लवचिकता कमी होते, त्यामुळे लांबची नजर फारशी खराब होत नाही. मात्र जवळचे अंधुक दिसू लागते. पेपर जरा लांब धरल्यावर चांगला दिसतो. वयाप्रमाणे काही प्रमाणात हा नंबर वाढतो. त्यामुळे चाळिशीनंतर बायफोकल अथवा प्रोग्रेसिव्ह चष्मा किंवा लांबचा व जवळचा वेगवेगळा, असे दोन चष्मे करावे लागतात. ज्यांना आधीपासून मायनस नंबरचा चष्मा आहे, त्यांना लांबचा चष्मा काढून जवळचे चांगले वाचता येते; परंतु तरीही जवळचा नंबर वेगळा काढणे व त्यानुसार वेगळा चष्मा करणे चांगले. कॉम्प्युटरवर ज्यांना जास्त वेळ काम करावे लागते, त्यांना कॉम्प्युटरच्या अंतरासाठी वेगळा नंबर वापरल्यास डोळ्यांवर ताण येत नाही.
सिलिंड्रिकल नंबरचा चष्मा असणे बऱ्याच रुग्णांची सिलिंड्रिकल नंबर आहे म्हटल्यावर ‘काही तरी भयंकर आजार आहे’, अशी भावना होते. खरे असे काहीच नाही. नंबरचा तो एक प्रकार आहे, एवढेच. कॉनियाचा पृष्ठभाग सर्व भागांत सारखाच गोलाकार नसेल, तर सिलिंड्रिकल नंबर लागतो. उदाहरणार्थ- उभा भाग जास्त गोलाकार असणे किंवा तिरपा भाग (१४० अंश-१२० अंश इत्यादी) जास्त गोलाकार असणे, असे. अशावेळी सर्व भागांत सारखाच गोलाकार असणारा नंबर देता येत नाही. सिलिंड्रिकल नंबरची काच हव्या त्या भागात कमी-जास्त गोलाकार करून घेता येते. सिलिंड्रिकल नंबर प्लस किंवा मायनस किंवा दोन्हींचे मिश्रणही असू शकतो. हा फारसा वाढत नाही; मात्र चष्मा न घातल्यास पेशंटना डोळे दुखणे, डोके दुखणे असे त्रास सुरू होतात. कोणता का नंबर असेना, डोळ्यांना त्रास होत असेल तर चष्मा वापरणे हितावह आहेच.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.- संतोष शेणई
मुंज, उपनयन, व्रतबंध हा सोळा संस्कारांपैकी दहावा संस्कार आहे. या संस्कारानंतर मुलगा गुरुग्रही विद्यासंपादनासाठी पाठवण्यात येतो. या संस्कारात एक विधी महत्वाचा आहे तो म्हणजे मुंडण.
मुंडण का करायचे? याला शास्त्रीय आधार पुरातन ग्रंथात दिसत नाही, परंतु हि क्रिया उपनयन संस्कारमध्ये अनिवार्य आहे, त्याचा अर्थ जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे.
पुरातन काळी गुरुकुल मधील सर्व मुले दररोज नदीवर स्नानासाठी जात असत, नदीच्या गार पाण्यात पहाटे स्नान करावे लगे, त्यामुळे आजाराला आमंत्रण मिळत असे. लहान म्हणजे ८-९ वर्षाच्या मुलांना डोके स्वच्छ पुसणे जमत नाही, जर डोक्यावर केस असतील तर, केसातील पाणी पूर्ण निघून जाण्याची शक्यता कमीच, यामुळे सर्दी, खोकला आणि सोबत ताप येण्याचे प्रकार वारंवार होऊ शकतात.
शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी वारंवार आजारी होऊ शकतात ज्या मुळे मोठ्या प्रमाणात शिक्षणात व्यत्यय होऊ शकतो, त्याच बरोबर बरीच मूले गुरुकुल मध्ये रहात असल्यामुळे, उवा किव्वा तस्सम प्रकारचे कीटक डोक्यात राहण्याची शक्यता अधिक, ज्यामुळे डोके खाजवणे, डोक्यात फोड येणे, तसेच हे प्राणी चावल्यामुळे आजार होऊ नयेत म्हणून मुंडण करणे हाच उपाय दिसून आला.
त्या काळी आजच्या सारखे खूप कपडे तयार होत नसत, आजकालच्या टर्किश टॉवेल सारखी वस्त्रे ज्यात पाणी टिपले जाऊ शकते, त्या काळात नव्हती, बहुतेक लोक उपरण्यानेच अंग पुसत असत, जे तलम कापडाचे असे ज्यात डोक्यातील पाणी पूर्णपणे निघण्याची शक्यता कमीच होती. महिला श्रुंगाराचा भाग म्हणून केस वाढवतात, पूर्वी राजे लोक तसेच त्यांच्या पदरी असलेले उच्च पदस्त लोक केस वाढवत असत, ते त्यांना काही पैसे खर्च करून नीटनेटके ठेवावे लागत असे, विद्या शिकायला जाणाऱ्या मुलांना हि चैन नक्कीच परवडणारी नसतेच, त्यामुळे डोक्याचा गोटा केला कि सर्वच प्रश्न सुटत असत.
मुलांना स्वयंपाक सुद्धा करावे लगे, म्हणून केस अन्नात पडू नयेत हा सुद्धा विचार नक्किच केले गेला असणार. आजकाल हॉटेल मध्ये स्वयापाकी (कुक) नाही का डोक्याला टोपी घालून स्वयपाक करतात, त्याचे हेच कारण आहे.
बौद्ध भिक्कू, जैन मुनी सुद्धा डोक्याचे संपूर्ण केस काढून स्वतःचे शरीर स्वच्छ ठेवतात. केस वाढवणे, हे मुलांना मुळात आवडते, जर हे नाहीसे केले तर अहंकार तसेच न्यूनगंड संपतो, उच्च, नीच हा भेदभाव हि नष्ट होतो, यामुळे सर्व मुले समान पातळीवर उभीराहून विद्याविभूषित होण्यास पात्र ठरतात.
आजही सैन्य दलात बारीक केस ठेवणे हाच नियम आहे, कारण सीमेवर सैनिक आपल्यासारखे स्नानगृहात आंघोळ करत नाहीत, त्यानाही नदीचाच आधार घ्यावा लागतो. नदीतील घाण केसात अडकून केस राठ बनतात, त्यामुळे व्यक्ती विद्रूप दिसते, हे होऊ नये म्हणूनच शिक्षण काळात तसेच उर्वरित आयुष्यात सुद्धा लोक मुंडण करून स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करत होते, असे नाही का वाटत?
धन्यवाद
-- विजय लिमये
9326040204
हृदयाचा ठोका चुकला किंवा हृदयाची धडधड वाढली हे वाक्प्राचार आपल्या भावना व्यक्त करीत असतात. हा हृदयाचा लयबध्द ठेका जर चुकायला लागला, ताल बिघडला, तर आयुष्यात बरीच गडबड सुरु होते. प्राणवायूयूक्त रक्त संपूर्ण शरीराला पुरविण्याचे काम हृदयाचे असते. रक्तवाहिन्या रक्त वाहून नेतात . हृदयातील व निलांमधील झडपा सतत उघडझाप करीत असतात व त्यामुळे हे कार्य व्यवस्थित सुरु राहते. हृदयाचा आकार हा साधारणपणे प्रत्येकाच्या मुठीएवढा असतो. एवढेसे हृदय, पण काय कमालीचे काम करते ! अशा ह्या अवयवाची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. ह्या जबाबदारीची जाणीव लहानपणापासून असावी आणि त्यासाठी विशेष प्रयत्न असावेत.
हृदयावर जेवढी गाणी किंवा कविता होतात,तेवढ्या इतर कुठल्याही अवयवावर होत नाहीत. कारण हृदय व डोळे हे दोन अवयव भावना व्यक्त करण्याचे उत्तम साधन आहेत. अविरतपणे म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत x काम करणारे हृदय, हे अत्यंत लयबद्ध काम करीत असते. या लयबद्धतेला वैद्यकशास्त्रात सुद्धा अतिशय महत्व आहे. हृदयाचा ठोका चुकला किंवा हृदयाची धडधड वाढली हे वाक्प्रचार आपल्या भावना व्यक्त करीत असतात. हा हृदयाचा लयबध्द ठेका जर चुकायला लागला, ताल बिघडला, तर आयुष्यात बरीच गडबड सुरु होते. प्राणवायूयूक्त रक्त संपूर्ण शरीराला पुरविण्याचे काम हृदयाचे असते. रक्तवाहिन्या रक्त वाहून नेतात . हृदयातील व निलांमधील झडपा सतत उघडझाप करीत असतात व त्यामुळे हे कार्य व्यवस्थित सुरु राहते. हृदयाचा आकार हा साधारणपणे प्रत्येकाच्या मुठीएवढा असतो. एवढेसे हृदय, पण काय कमालीचे काम करते ! अशा ह्या अवयवाची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. ह्या जबाबदारीची जाणीव लहानपणापासून असावी आणि त्यासाठी विशेष प्रयत्न असावेत.
जंकफूड, बेकरी पदार्थ, रस्त्यावरील तळलेले पदार्थ, परत परत तेच तेल टाळण्यासाठी वापरणे, क्रीम, मांसाहार, आईस्क्रीम सारखे पदार्थ, सिगारेट, मद्यपान इत्यादी गोष्टी आपल्या तब्बेतीस घातक असतात, हे आपणास माहित आहे. पण तब्ब्येत म्हणजे हे सर्व पदार्थ आपल्या हृदयावर प्रत्यक्षपणे परिणाम करीत असतात. असे पदार्थ सतत खाल्ल्यावर रोगांची मालिकाच सुरु होते. प्रथम वजन वाढायला लागते. नंतर उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, इत्यादी रोगांची मालिका तरुण वयातच सुरु होते. आजकालचे बैठे काम, शरीराच्या कमी झालेल्या हालचाली, व्यायाम न करणे, कामाचा ताणतणाव, ह्या सगळ्याची भरच पडते. आजकाल अनेक कंपन्यांमध्ये दर वर्षी वैद्यकीय चाचण्या घेतल्या जातात. त्यामुळे खरेतर लोकांना वेळीच आपल्या चुका कळू शकतात. पण तरी वेळ नाही म्हणून दुर्लक्ष केले जाते. खास करून बॉर्डर वर असलेली साखर बॉर्डरलाईन लिपीड प्रोफाईलचे अहवाल ही एक धोक्यालची घंटा असते. यावेळी खरेतर तातडीने डॉक्टईर आणि आहारतज्ञ गाठणे गरजेचे असते. तसे न करता, काही दिवस आपण वाचलेले, ऐकलेले, प्रयोग करतो आणि तरी जिना चढायला लागल्यावर धाप लागते. दिवस संपता संपता थकवा जाणवतो आणि मग आम्ही डॉक्ट,र गाठतो.
हृदयविकाराची कारणे अनेक असतात,पण आहारातील चुकांमुळे जो प्रश्न उद्भवतो, तो म्हणजे रक्तवाहिन्या अरुंद होणे. अरुंद रक्तवाहिन्या पूर्ण क्षमतेने रक्तपुरवठा करू शकत नाहीत. आणि ही रक्तवाहिनी जर हृदयालाच रक्तपुरवठा करणारी असेल, तर रक्ताचा पुरवठा न झाल्यामुळे जी अवस्था होते, त्याला ऍथेरोस्केलेसीस म्हणतात. कोलेस्टेरॉल, कमी व जास्त घनतेची लायपोप्रोटीन्स, संतृप्त व असंत्रुप्त मेद, ह्या सगळ्या बद्दल आपण मागे एका लेखात माहिती घेतली आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष हृदयरोगात आहार कसा असावा, हे पाहूया .
हृदयरोगाचा आहार, हा कमी उष्मांक , कमी कर्बोदके, सर्वसाधारण प्रथिने, कमी स्निग्ध पदार्थ, त्यातही कमी कोलेस्टेरॉल व बहुअसंपृक्त मेदाम्ले असलेले व सर्वसाधारण जीवनसत्वे व खनिजांचा असावा. आहारात तंतुमय पदार्थ असावेत.
कर्बोदके एकूणच उष्मांकाचे प्रमाण कमी करावे लागते. त्यामुळे कर्बोदके सुद्धा आहारात कमीच असावीत. जर रोग्याला मधुमेह व लट्ठपणा असेल तर कर्बोदाकांवर विशेष लक्ष द्यावे लागते. बटाटा, ब्रेड, साखर, साबुदाणा, असे पदार्थ कटाक्षाने टाळावेत. साखरेच्या ऐवजी गुळ खाण्याचा सल्ला चुकीचा ठरू शकतो कारण त्यात उष्मांक एकसारखेच असतात. गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, उत्तम, थोडा तांदूळही गरजेचाच आहे. शक्यरतो सकाळी घ्यावा.
प्रथिने प्रत्येकाच्या गरजेनुसार प्रत्येक किलो वजनामागे एक ग्रॅम प्रथिने आवश्याक आहेत. किलो वजन असल्यास ग्रॅम प्रथिने आहारात असावीत. डाळी, कडधान्ये, गाईचे दुध, अंड्याचा पांढरा भाग, मासे, कमी उष्मांक असलेले पनीर इत्यादी मधून प्रथिने चालतील. पण मटन, पोर्क, इत्यादी नसलेलेच चांगले .
स्निग्ध पदार्थ हृदयरोग असणाऱ्या साठी स्निग्ध पदार्थ हा खूपच चर्चेचा विषय असतो. आपल्या शरीरात कोलेस्टेरॉल तयार होत असते. त्यामुळे आहारातून शरीरात जाणाऱ्या कोलेस्टेरॉल बद्दल प्रत्येकाने जागरूक असणे आवश्यअक आहे. लोणी, चीज, क्रीम, अंड्याचा पिवळा भाग, मांसाहारातील रेड मिटच्या किडनी, लिव्हर इत्यादी भागात कोलेस्टेरॉल जास्त असते म्हणून हे पदार्थ टाळावेत. आपण ज्याला बॅड कोलेस्टेरॉल म्हणतो, ते कमी घनतेचे लायपोप्रोटीन्स असतात आणि हेच आपल्या रक्तवाहिन्या अरुंद करतात . त्यामुळे वरील पदार्थ टाळणेच उत्तम. रोजच्या आहारात आपण मुख्यत्वे तेल व तुपाचा वापर करतो. तेलाच्या अनेक जाहिराती आपल्याला संभ्रमात पाडणाऱ्या असतात. काही जाहिराती झिरो कोलेस्टेरॉल तेलाच्या असतात, तर काही तेले फिल्टर किंवा रिफाईंड असतात. ह्यावर उत्तम उपाय म्हणजे आलटून पालटून वेगवेगळ्या कंपन्यांचे व वेगवेगळ्या प्रकारच्या तेलांचा वापर करावा. घाण्याचे तेल पण उत्तम असते. तेलबियांपासून काढलेल्या घाण्यावरच्या तेलात स्निग्ध पदार्थात विरघळणारी जीवनसत्वे सुद्धा असतात. इतर तेलांमध्ये त्यांना फोर्टीफाय केलेले असते. ओलिव्ह मोहोरी, करडई तेले उत्तमच आहेत, ह्या सगळ्यापेक्षा महत्वाची बाब म्हणजे प्रत्येक माणसाला एक महिन्याला एक लिटर तेल पुरेसे आहे. वनस्पती तूप व ते वापरून केलेले पदार्थ टाळलेलेच बरे. साजूक तूप शरीरास उत्तम आहे. प्रत्येकाने रोज चमचे ( टी स्पुन्स पूर्ण भरून ) तूप खावे.
तंतुमय पदार्थ भाज्या व फळे तसेच कडधान्य व तृणधान्याचे बाहेरील आवरण तंतुमय असते. काकडी, मुळा, गाजर, सफरचंद, यांचे साल न काढता स्वच्छ धुवावे व सालीसकट खावे. पालेभाज्यांची कोवळी देठे पूर्ण वापरावीत. शेंगभाज्यांच्या शिरा न काढता त्या चिराव्यात म्हणजे भरपूर तंतू आपल्या पोटात जातात. हे तंतू बॅड कोलेस्टेरॉल कमी करतात व रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवण्याचे काम करतात.
जीवनसत्वे व खनिजे एखादी मोठी इमारत छोट्या विटा, त्याहून छोटे कण असलेली वाळू, व सिमेंट यांची बनलेली असते. त्याप्रमाणेच जीवनसत्वे व खनिजे यांचे प्रमाण अत्यल्प असले तरीही ते अत्यंत मोठी कामे करीत असतात. फळे, भाज्या दुध, अंडी, सुका मेवा, यामधून शरीराला याचा पुरवठा होत असतो. पण हृदयरोग्यांनी फळे व भाज्यांच्या माध्यमातूनच ह्याचे ग्रहण करावे.
ह्या सगळ्या सोबत तज्ञ व्यायाम तज्ञाकडून व्यायाम शिकणे, किंवा योगासने, प्राणायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या हृदयाची धडधड अनेक वर्ष लयबद्ध होत राहावी असे वाटत असल्यास नियमित व्यायाम, उत्तम आहार व नियमित वैद्यकीय तपासणी अत्यंत आवश्यवक आहे .
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.आश्ले षा भागवत, आहारतज्ज्ञ
अगस्त्यच्या बियांची पूड तीन ग्रॅम ते दहा ग्रॅम पर्यंत गाईच्या धरोष्ण २५0 ग्रॅम दुधासोबत सकाळ-संध्याकाळ काही दिवसापर्यंत घेतल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.
शंखपुष्पीची ३-६ ग्रॅम पूड मधात घालून चाटावी आणि वरून दूध प्यावे. याच्या सेवनाने बुद्धीचा योग्य विकास होतो.
३-६ ग्रॅम शंखपुष्पी पूड साखर आणि दुधाबरोबर नेहमी सकाळी घेतल्याने स्मरणशक्ती वाढते.
शंखपुष्पी २-४ ग्रॅम आणि वचा १ ग्रॅम पूड मुलांना दिल्याने खूपच बुद्धिमान आणि शहाणे होतात.
सकाळी शंखपुष्पीचे थोडे पाणी घालून रस काढता येते. शुद्ध रस १0-२0 मिलिग्रॅम किंवा २-४ ग्रॅम पूड मध, तूप आणि साखरेबरोबर सहा महिन्यांपयर्ंत सेवन करीत राहिल्याने स्मरणशक्ती आणि बुद्धीत वाढ होते.
दूध, तूप किंवा पाण्यासोबत वचाच्या खोडीची पूड २५0 मिलिग्रॅमच्या प्रमाणात दिवसातून दोन-तीन वेळा एका वर्षापयर्ंत किंवा किमान एक महिन्यापयर्ंत घेतल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.
१0 ग्रॅम वचा पूड २५0 ग्रॅम खांडसरीसोबत पाक करून रोज १0 ग्रॅम सकाळ-संध्याकाळ खाण्याने विसरण्याची सवय दूर होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आजपासून देशभरात नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. मोठया प्रमाणात भाविक नऊ दिवस देवीचे व्रत व उपवास ठेवतात. व्रताच्या वेळी शरीराचं डिटॉक्सिफाय होणं खूप गरजेचं असतं. म्हणजे आपल्या शरीरातील सर्व विषारी द्रव्य बाहेर निघतील. पावसाळ्यात पित्त वाढतं, पचनक्रिया कमजोर होते. त्यामुळं उपवासानं पित्त कमी होण्यास मदत होते आणि पचनक्रियाही सुधारते. जर आपण ९ दिवस व्रत/उपवास ठेवणार असाल तर या नऊ गोष्टी लक्षात ठेवा...
नवरात्रात व्रतातील आहार कसा असावा?
- हाय फायबर आणि लो फॅट असणारे पदार्थ खावे - मॉर्डरेट प्रोटीन, हाय कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ खा - त्वचेतील कोरडेपणा कमी करण्यासाठी आहारातील द्रव पदार्थ वाढवा - सामान्य दूधाऐवजी स्किम्ड दूध प्या.
नवरात्रौत्सवात व्रतादरम्यान किती कॅलरीची असते गरज?
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये १८००-२२०० कॅलरीची व्रतासाठी गरज नवरात्रीच्या व्रतात काय करू नये? - फक्त लिंबू-पाणी पिऊन उपवास ठेवू नये. - खाहीही न खाता नुसतं दूध पिऊन उपवास करू नका, असं केल्यानं अशक्तपणा येतो. - यामुळं थकवा, ब्लड प्रेशर लो आणि चिडचिडपणा वाढू शकतो. - गॅस्ट्राइटिस, अॅसिडिटी आणि छातीत जळजळ होऊ शकते. - व्रतात आंबट फळं उदा. संत्री, लिंबू, मोसंबी खाऊ नये. - व्रतादरम्यान लंच आणि डिनरमध्ये आहाराचं संतुलन राखावं. - कुटू किंवा शिंगाड्याच्या पिठाची चपाती खावी. - साबुदान्याची खीर किंवा खिचडी खाऊ शकता. - सीताफळ, बटाट्याची रस्सेदार भाजी खाणं चांगलं राहील. - दिवसातून तीन वेळी फळं किंवा फ्रूट सॅलेड खावं. - ४-६ वेळा सुख्यामेव्यासह ज्यूस, दूध, मिल्कशेक पिणं चांगलं राहील. - नारळ पाणी आपल्या डाएटमध्ये अवश्य असू द्या - नवरात्रीच्या व्रतात कमीतकमी ८ लीटर पाणी प्यावं. - एकाच प्रकारच्या फळांपेक्षा मिक्स्ड फळं खावीत. - ताजी फळं खा, कडवट चवीचे फळं खाऊ नका.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti