वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
भारतातील सण हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. प्रत्येक सणाला जोडून काही परंपरा आहेत. अशीच एक परंपरा आहे उटणे लावणे. दीपावलीतील अभ्यंगस्नानात उटण्याला विशेष महत्त्व आहे. उटणे हे वनौषधींपासून बनवलेले असावे, असा संकेत आहे. दिवाळीच्या दिवसामध्ये भल्या पहाटे उठून अंगाला तेल लावून घातलेले स्नान म्हणजेच अभ्यंग स्नान होय. अभ्यंग स्नानासाठी जे सुवासिक तेल वापरले जाते ते केवळ सुवासिक न वापरता त्यासोबत कोमट तीळ तेलाने अभ्यंग करावा. शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यंग करताना सर्वागाला तेल लावून हलकेसे मालिश करणे आवश्यक असते. अभ्यंग करताना तो हातापायांच्या ठिकाणी खालून वरच्या दिशेने करावा तर सांध्याच्या व पोटाच्या ठिकाणी घडय़ाळाच्या काटय़ाच्या दिशेने गोलाकार करावा. आपल्याकडे फक्त दीपावलीच्या दिवसांमध्येच केला जातो. अनेक कुटुंबातील स्त्रिया सर्व घरातील सदस्यांना अभ्यंग करून स्नान घालतात; परंतु स्वत:साठी वेळ काढून अभ्यंग करीत नाहीत. अनेक जणींचा बाळंतपणानंतर अंगाला तेल लावून स्नान करणे एवढाच काय तो अभ्यंगाशी संबंध आलेला असतो. परंतु त्यामुळेच बऱ्याच स्त्रियांमध्ये नियमित अभ्यंग न झाल्याने वयाच्या तिशी-पस्तिशीनंतर कंबरदुखी, पाठदुखी, संधिवात, गुडघेदुखी, अंगदुखी अशा अनेक तक्रारी दिसून येतात. धावपळीच्या युगात बऱ्याचशा स्त्रिया डोक्यालादेखील तेल लावण्यास वेळ काढत नाही. त्यामुळे केस गळणे, अकाली केस पांढरे होणे, केस व डोक्याची त्वचा रूक्ष होणे, केसांमध्ये कोंडा होणे अशा तक्रारी अनेक जणींमध्ये आढळतात. या तक्रारी दूर करण्यासाठी पौष्टिक आहाराबरोबरच आठवडय़ातून दोन वेळा डोक्याला तेल लावून हलकीशी मालिश करणे गरजेचे आहे.
नियमित अभ्यंग केल्याने रोजच्या रोज होणारे शारीरिक श्रम दूर होतात. शरीराला बल मिळते. शरीरातील वाढलेल्या वायूचे शमन होऊन दृढता प्राप्त होते. त्वचेचा कोरडेपणा जाऊन त्वचा कांतियुक्त होते. अभ्यंगामुळे आजच्या आधुनिक काळात प्रवासामुळे व हवेतील प्रदूषणामुळे होणारा वात प्रकोप व त्वचेवरील दुष्परिणाम टाळले जाऊ शकतात. नियमित अभ्यंग केल्याने भूक चांगली लागून मलबद्धतेचे विकार नाहीसे होतात. मानसिक थकवा दूर होऊन झोप चांगली लागते; मनाची एकाग्रता वाढून स्मरणशक्ती वाढते. एवढेच काय तर वृद्धत्व उशिरा येऊन चिरतारुण्य प्राप्त होते. म्हणून सर्वानीच दीपावलीच्या काळात तळपायापासून ते डोक्यापर्यंत सर्व अवयवांना अभ्यंग करावे व नंतरही आठवडय़ातून एकदा तरी सुटीच्या दिवशी अभ्यंग स्नान करावे.
अभ्यंगानंतर स्नान करताना सुगंधी उटणे लावण्याची प्रथा आहे. शरीराला लावलेले तेल त्वचेमध्ये जिरून शिल्लक राहिलेले जास्तीचे तेल किंवा त्वचेचा तेलकटपणा जावा व शरीरातील रक्ताभिसरण सुधारून हालचालीमधला सहजपणा व चपळपणा कायम राहून शरीराला सुगंध यावा. हा यामागे उद्देश असतो. जसे अभ्यंग करताना आपण तेल लावतो अगदी त्याच दिशेने व पद्धतीने उटणेही शरीराला लावावे. जाहिरातीमध्ये आकर्षक वाटलेला परंतु रासायनिक प्रक्रियेने तयार केलेला साबण या अभ्यंगाच्या वेळी लावू नये. त्यामुळे त्वचा जास्तच रूक्ष होते. म्हणून कुठलाही साबण लावू नये. अशा पद्धतीने अभ्यंग करून उटणे लावून नंतर सोसवेल अशा गरम पाण्याने केलेले स्नान शरीर स्वच्छ करून मनाला तरतरीतपणा, प्रसन्नता आणते व एकूणच शरीराचे सर्व आजार बरे होऊन दीर्घायुष्य प्राप्त होते.
अभ्यंगासाठी तेल अभ्यंग करण्यासाठी कोमट तीळ तेल वापरावे किंवा आपल्या प्रकृतीनुसार व एखादी व्याधी असेल तर त्या व्याधीनुसार वेगवेगळी तेले तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली वापरता येतात. उदाहरणार्थ वातशामक तेल, चंदन बलालाक्षादी तेल, सहचर तेल आदी.
उटणे सहसा उटणे हे घरीच किंवा तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानुसार वापरावे. बाजारात मिळणाऱ्या उटण्यांमध्ये अनेक वेळा चूर्णाची भेसळ झालेली दिसून येते.
उटणे बनविण्याची कृती.
साहित्य:- पाव किलो मसूर डाळ पीठ, २५ ग्रॅम आवळकाठी, २५ ग्रॅम सरीवा, २५ ग्रॅम वाळा, २५ ग्रॅम नागर मोथा, २५ ग्रॅम जेष्टमध, २५ ग्रॅम सुगंधी कचोरा, ५ ग्रॅम आंबेहळद, २५ ग्रॅम तुलसी पावडर, २५ ग्रॅम मंजीस्ट, ५ ग्रॅम कापूर. ( हे सर्व साहित्य कास्टा औषधीच्या दुकानात मिळते.)
कृती : वरील सर्व साहित्य चांगले मिक्स करून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावे.
हे उटणे लावल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारून त्वचा कांतियुक्त होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
आनुवंशिकता : उच्च रक्तदाब असलेल्या आई-वडिलांच्या मुलांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण चार पट अधिक असू शकते. तसेच आई-वडिलांच्या जीवनपद्धती, राहणीमान, खाणे पिणे यांचे अनुकरण मुले करीत असल्यामुळेही या मुलांत उच्च रक्तदाबाचे प्रमाण अधिक असू शकते.
स्वभाव व मानसिकता : कित्येक लोकांचा स्वभाव मुळात असमाधानी व अति महत्त्वाकांक्षी असतो. ते थोडय़ा वेळात खूप काही करून दाखवण्याचा प्रयत्न करतात व वेळेशी स्पर्धा करू पाहतात. अशा लोकांना जीवनात सतत मानसिक ताणतणाव सहन करावा लागतो. त्यांच्या मानसिक संघर्षांमुळे शरीरातील कित्येत ग्रंथी विशेषत: अॅिड्रिनल ग्रंथी उत्तेजित होतात त्यामुळे रक्तदाब वाढतो.
मानसिक ताणामुळे कॉटिकोलामाइन्स, अॅसड्रिनालीन व नॉरेअॅ ड्रिनालीन या शरीरातील स्रावात वाढ होते. त्यामुळे रक्तदाब वाढतो.
‘अ’ व्यक्तिमत्त्व (Type A-Personality) असलेल्या व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब आणि हृदयरोग होण्याचे प्रमाण अधिक आहे.
धूम्रपान : धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींत उच्च रक्तदाबाचे प्रमाण अधिक असते. तंबाखूत ‘निकोटिन’ व ‘कार्बन मोनोक्साइड’ ही विषारी तत्त्वे असतात. यामुळे नॉरेअॅकड्रिनालीन या स्स्रावाचे प्रमाण वाढते आणि रक्तदाब वाढतो. धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या कठीण होतात.
मद्यपान : मद्यपान करणाऱ्यांत उच्च रक्तदाबाचे प्रमाण हे अधिक असते.
मिठाचा अतिरेक : जे लोक मिठाचा अल्प प्रमाणात उपयोग करतात त्याचा रक्तदाब हा कमी किंवा नॉर्मल असतो. त्याच्याविरुद्ध ज्या व्यक्ती मिठाचा अतिरेक करतात, त्यांना अति रक्तदाब असण्याचे प्रमाण वाढते आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावण्याची प्रक्रिया ही अति संवेदनक्षील होते आणि रक्तदाब वाढतो. जर अति रक्तदाब असलेल्या रुग्णाने जर आपल्या आहारात मिठाचे प्रमाण कमी केले तर अशा रुग्णाचा रक्तदाब नॉर्मल होऊ शकतो, किंवा नक्कीच कमी होण्यास मदत होईल.
रक्तवाहिन्यांचा कठीणपणा (ATHEROSCLEROSIS)
जेव्हा रक्तवाहिन्या अरुंद आणि कठीण होतात, तेव्हा त्यातून रक्ताला ढकलण्यासाठी हृदयाला खूप जोर लावावा लागतो, परिणामत: रक्तवाहिन्यांच्या आंतरस्तरावरील दाब वाढतो, म्हणजेच रक्तदाब वाढतो. रक्तवाहिन्या कठीण होण्याची अनेक कारणं आहेत. त्यात आनुवंशिकता, वाढणारे वय, रक्तातील चरबीचे अतिप्रमाण, मधुमेह, धूम्रपान, लठ्ठपणा व बैठे जीवन आणि ताण-तणावाचे जीवन या गोष्टींचा समावेश होतो.
लठ्ठपणा, अतिरक्त वजन :
स्थूलपणा, लठ्ठपणा आणि वाढलेले वजन यांचा उच्च रक्तदाबाशी अत्यंत जवळचा संबंध आहे. ज्याचे वजन जितके जास्त, त्याचा रक्तदाबही जास्त असतो. लठ्ठ व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब हा लहान वयातच सुरू होऊ शकतो. तसेच जर अशा लोकांनी वजन कमी केल्यास त्यांचा अति रक्तदाब थोडय़ा प्रमाणात कमी होऊ शकतो.
अति रक्तदाबाची लक्षणे
अतिरक्तदाब हा मुनुष्याचा ‘छुपा शत्रू’ (Silent Killer) आहे, असे म्हटले जाते. कारण बऱ्याचदा मनुष्याला अति रक्तदाब असूनही काहीही लक्षणे किंवा त्रास दिसून येत नाही. बऱ्याच वेळा इतर काही आजारांसाठी मनुष्य डॉक्टरकडे जातो आणि तपासणीचा एक भाग म्हणून डॉक्टर रक्तदाब तपासतात, तेव्हा तो वाढलेला आढळतो, अशा वेळी अति रक्तदाबाचे निदान होते.
अति रक्तदाबाची लक्षणे खालीलप्रमाणे असू शकतात.
* सतत डोके दुखणे, जड वाटणे.
* चक्कर येणे, आसपासच्या वस्तू हलत असल्याचा भास होणे, कामात लक्ष केंद्रित न होणे, एकाग्रता न होणे, आकडेमोड चुकणे, घटनाक्रम विसरणे, थकवा जाणवणे, चिडचिड करणे.
* छातीत धडधड होणे, छातीत दुखणे.
* लैंगिक सामथ्र्य कमी होणे.
रक्तदाब फारच वाढला असेल तर खालील लक्षणे दिसून येऊ शकतात.
* दृष्टिदोष, कमी दिसणे, अंधूक दिसणे
* नाकातून रक्तस्राव होणे.
* हातापायावर सूज येणे.
* किंवा कधी कधी मेंदूमध्ये रक्तस्राव होणे, किडनी निकामी होणे, हृदयविकाराचा झटका येणे इत्यादी त्रास होऊ शकतो.
उच्च रक्तदाबाचे दुष्परिणाम
१) हृदयाची अकार्यक्षमता :
उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीच्या हृदयाला काम करण्यास खूप कष्ट करावे लागतात. त्यामुळे हृदय मोठे आणि जाड होऊ शकते. त्याची कार्यक्षमता कमी कमी होत जाते. त्यामुळे हृदयाचे पंपिंग कमी होते. याला ‘हार्ट फेल्युअर’ (HEART FAILURE) असे म्हणतात.
उच्च रक्तदाबाच्या रोग्यांत हृदयाच्या विकाराने मृत्यू पावलेल्यांचे प्रमाण सामान्य लोकांपेक्षा चारपट अधिक आहे. उच्च रक्दाबाच्या रुग्णांना हृदयशूळ (ANGINA) आणि हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाणसुद्धा जास्त असते.
२) मूत्रपिंडावर परिणाम :
उच्च रक्तदाब जर अधिक काळापासून असेल तर अशा रुग्णांचे मूत्रपिंड हळूहळू निकामी होऊ शकते. मूत्रपिंडातील रक्तशुद्धीचे काम व्यवस्थित होत नाही. परिणामत: शरीरात मीठ आणि इतर व्यर्जित पदार्थाचा भरणा होतो. त्यामुळे हातापायाला सूज, चेहऱ्यावर सूज येते.
३) इतर दुष्परिणाम :
अति उच्च रक्तदाबामुळे डोक्यातील रक्तवाहिन्या फुटून मेंदूमध्ये रक्तस्राव होऊ शकतो. तसेच डोळ्याच्या पडद्यावर रक्तस्राव होऊन दृष्टिदोष होऊ शकतो.
उच्च रक्तदाबामुळे काही रोग्यांच्या महारोहिणीचा (AORTA) काही भाग अति पातळ होतो. हा पातळ भाग आतल्या किंवा बाहेरील बाजूस फुगू शकतो किंवा फुटूपण शकतो. (DISSECTING ANEURYSM), ही अत्यंत भयावह अवस्था असून कधी कधी यात मृत्यूही येऊ शकतो. रक्तदाब उच्च झाला आणि तो नीटपणे आटोक्यात राहिला नाही तर जीवनमर्यादापण कमी होऊ शकते.
अति रक्तदाबाचे निदान (DIAGNOSIS)
अति रक्तदाबाचे निदान करण्यासाठी व्यवस्थित मोजणे आवश्यक असते. रक्तदाब मोजण्याच्या आधी एक तास रुग्णाने कॉफी-चहासारखी उत्तेजके घेऊ नयेत, धूम्रपान करू नये किंवा अशा प्रकारची औषधे टाळावीत ज्यांनी रक्तदाब वाढतो.
रक्तदाब मोजताना रुग्ण हा पूर्णपणे रिलॅक्स (निश्चिंत) असावा. रक्तदाब एका डॉक्टरच्या भेटीमध्ये दोनदा मोजावा, म्हणजे तपासणीच्या सुरुवातीला आणि शेवटी असे प्रत्येक आठवडय़ात एकदा किंवा दोनदा याप्रमाणे तीन आठवडे करावे. तीन आठवडय़ांतील सर्व मोजमापे जर नॉर्मलपेक्षा जास्त असतील किंवा जर अध्र्यापेक्षा अधिक मोजमापे अधिक असेल तर अशा व्यक्तींना अति रक्तदाब आहे असे निदान करण्यात येते. रक्तदाब हा फारच जास्त असेल उदा. १८०/ १२० तर अशा रुग्णांना ताबडतोब रुग्णालयात भरती करून त्यावर औषधोपचार करावा लागतो.
* याच्या सोबतीला इसीजीमध्येसुद्धा दीर्घकालीन अति रक्तदाबाचे ठरावीक बदल होतात. त्यामुळे सर्व अशा रुग्णांना इसीजी काढणे आवश्यक असते.
* इकोकार्डियोग्राफी (ECHOCARDIOGRAPHY) या तपासणीमध्ये अति रक्तदाबाचे हृदयावरील परिणामाची नोंद घेतली जाते. यात हृदयाचा वाढलेला आकार, स्नायूंची वाढलेली जाडी, हृदयाच्या झडपांवर झालेला विपरीत परिणाम, हृदयाची कार्यक्षमता याचा समावेश होतो.
* डोळ्यांच्या तपासणीमध्ये अति रक्तदाबाचे डोळ्यावर आणि डोळ्यांच्या पटलावर (RETINA) झालेल्या परिणामांची नोंद घेतली जाते. याला FUNDOSCOPY असे म्हणतात.
* रक्ताच्या तपासणीमध्ये किडणीवर झालेले विपरीत परिणाम याची कल्पना येते. जर अनुषंगिक अति रक्तदाब असेल तर त्या त्या अवयवाशी निगडित रक्त तपासण्या किंवा इतर अत्याधुनिक तपासण्या कराव्या लागतात. त्यामध्ये पोटाची सोनोग्राफी, सीटीस्कॅन, आयव्हीपी, अँजिओग्राफी, अॅावोटरेग्राफी, किडनीच्या रक्तवाहिनीच्या तपासण्या इत्यादीचा समावेश होतो. या तपासण्यांची निवड हृदयरोगतज्ज्ञ करतात.
अति रक्तदाबाचे उपचार
अति रक्तदाबाचा औषधोपचार हा तज्ज्ञ डॉक्टराकडूनच घ्यावा. एकदा का हा रक्तदाब नॉर्मल (योग्य) पातळीवर आला की मग वाटले तर रक्तदाबाचे मोजमाप करण्यासाठी नियमितपणे आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जाण्यास काही हरकत नाही. मध्ये मध्ये हृदयतज्ज्ञ डॉक्टरकडे जाणे योग्य आहे.
वैद्यकीय औषधोपचाराबद्दल मी इथे विशेष काही लिहीत नाही, कारण हा व्यक्तिसापेक्ष असतो. प्रत्येक रुग्णाला वेगवेगळ्या प्रकारची औषधे वेगवेगळ्या प्रमाणात द्यावे लागतात. दहापेक्षा अधिक वेगवेगळ्या औषधांचे ग्रुप आहेत. त्यातून योग्य व्यक्तीसाठी योग्य औषधे योग्य प्रमाणात निवडणे हे तज्ज्ञ डॉक्टरचे काम आहे.
रक्तदाब कमी करण्यासाठी ज्या औषधाव्यतिरिक्त गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे त्या खालीलप्रमाणे आहेत.
१) मिठाचा उपयोग कमी प्रमाणात करावा- मिठाचा अतिरेक टाळावा. बऱ्याच लोकांना जेवणात वरून मीठ घेण्याची सवय असते. ही सवय अतिरक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी फार धोकादायक आहे. दररोज जेवणात फक्त तीन ते पाच ग्रॅम मिठाचाच वापर करावा. लिंबाचा रस, मिरे, मोहरी, जिरे या पदार्थाचे सेवन केल्यास मिठाची उणीव भासणार नाही.
२) धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन टाळा- अतिरक्तदाबाचे हृदयावर होणारे दुष्परिणाम हे धूम्रपानामुळे वाढतात. ते लवकर व अधिक प्रमाणात होतात. धूम्रपान करणाऱ्या रुग्णांना औषधांचा सुद्धा जास्त डोस (मात्रा) लागतो. त्यामुळे धूम्रपान व तंबाखूचे सेवन टाळावे.
३) वजन कमी करणे- वजन कमी केल्याने थोडय़ा फार प्रमाणात रक्तदाब कमी होतो. अतिरिक्त वजन म्हणजे हृदयाला अतिरिक्त काम करावे लागते.
चरबीच्या प्रत्येक पेशीपर्यंत रक्त पोहोचवण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत करावी लागते. हा अतिरिक्त बोजा हृदयाला हानीकारक होऊ शकतो.
स्थूल व्यक्तींच्या रक्तामध्ये कॉलेस्टेरॉल (रक्तातील एक चरबी)चे प्रमाण जास्त असते. ते कालाप्रमाणे रक्तवाहिन्यांत जमा होत जाते. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद व टणक बनतात. तसेच त्यांचा लवचीकपणा कमी होतो. या कारणांमुळे हृदयविकार व अतिरक्तदाब होतो. वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आहारात पालेभाज्या, भाज्यांची कोशिंबीर, गाजर, मुळा, काकडी, टोमॅटो, कच्च्या भाज्यांची सॅलाड भरपूर प्रमाणात खावीत. ताजी फळे खावीत. भात, वरण, भाजी, पोळय़ा असा सात्त्विक आहार योग्य प्रमाणात दोन वेळा योग्य वेळी घ्यावा.
* पोळय़ांना तूप किंवा तेल लावू नये. तळलेल्या पदार्थाचे सेवन टाळावे.
* दुधाचा, मलाईचा अतिरेक टाळावा. चहा-कॉफी व इतर उत्तेजक टाळावे.
* केक, आईक्रीम, चॉकलेट, मिठाई, जाम, बटर, चीज, सुकामेवा, दारू टाळावी.
* मांसाहार कमीत कमी करावा. जास्त मसाल्याचे पदार्थ खाऊ नयेत.
* कॅल्शियम व पोटॅशियम क्षार यांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश करावा.
४) व्यायाम आणि योगासने :
* वजन आणि रक्तदाब कमी करण्यासाठी आहारासोबत व्यायाम-योगासने करणे आवश्यक आहे. व्यायाम आणि योगासने केल्याने वाढलेला रक्तदाब हा कमी करता येतो. हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे.
* भरभर चालणे, पोहणे, सायकल चालवणे, एरॉबिक्स, धावणे हे व्यायामाचे प्रकार अतिरक्तदाबाच्या व्यक्तीला अत्यंत फायदेशीर आहेत (या सर्व प्रकारांना आयसोटोनिक ISOTONIC EXERCISE असे म्हणतात). यात हृदयाची कार्यक्षमता व सहनशक्ती वाढते आणि रक्तवाहिन्यांतून रक्त वेगाने धावून रक्तवाहिन्यांची RIGIDITY (कठिणीकरणाची प्रक्रिया) सुद्धा कमी होते.
* अतिरक्तदाबाच्या रुग्णांनी वजन उचलण्याचे व्यायाम, दंडबैठका, सूर्यनमस्कार यासारखे व्यायाम करू नयेत.
* योगासने करणे लाभदायक असते. विशेषत: शवासन, पद्मासन, योगमुद्रा, धनुरासन, कोनासन करावे. यासाठी शास्त्रशुद्ध शिक्षकाची मदत घ्यावी. ज्यात मस्तक खाली राहते व पाय वर असतात, अशी आसने (शीर्षांसन) उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी करू नये.
‘योगा’ या जीवनशैलीचा फायदा रक्तदाबाच्या रुग्णांना होतो. त्यातील प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या गोष्टींमुळे अतिरक्तदाब आणि हृदयविकार होण्याचे प्रमाण कमी होते. यांना ‘मेडिटेशन’ असे म्हणतात.
ताण-तणाव कमी करणे
उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी मानसिक ताण-तणाव कमी करणे आवश्यक आहे. अवाजवी काळजी (TENSION) किंवा तणाव घेणे म्हणजे रक्तदाब वाढवणे.
नेहमी हसतमुख राहणे, मन कुठे ना कुठे रमवणे, आपल्याला आवडेल आणि परवडेल असा काही छंद करावा. अतिमहत्त्वाकांक्षी, असमाधानी, नकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्तींचा रक्तदाब सहसा जास्तच असतो. त्यामुळे आपल्या कर्तृत्वाची जाणीव ठेवून कर्मयोगी व्हावे. म्हणजेच फळाची इच्छा-अपेक्षा न राखता नियतकार्य करणे. त्याच्या परिणामाची दखल योग्य प्रमाणातच घ्यावी. पुन्हा प्रयत्न करावे. कारण प्रत्येक काळय़ा ढगाला रूपेरी किनार असते. प्रयत्न करणाऱ्यांना यश हे मिळतेच. म्हणजेच प्रयत्नवादी आणि आशावादी व्हावे.
क्रोधाची-संतापाची हकालपट्टी करावी. राग-लोभ-मत्सर यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. स्वत:ची जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न करावा. चांगली पुस्तके, चांगली व्याख्याने, चांगली संगत ठेवावी.
मनावरील ताण हलका करण्यासाठी श्वसनाचे काही व्यायाम आहेत. ते केल्यास मन स्थिर व शांत राहण्यास मदत होते. ते विचलित होत नाही. खंबीर राहते.
दररोज सात ते आठ तास रात्री शांत झोप घ्यावी. त्यासाठी झोपेच्या गोळय़ा घेऊ नयेत. आठवडय़ाच्या सहा दिवसांचा ताण घालवण्यासाठी रविवारच्या सुट्टीचा भरपूर उपयोग घ्यावा. मन रमेल आणि नेहमीच्या कामाचा विसर पडेल असे काही करण्यात भर द्यावा. परिवारासोबत बाहेर फिरायला जाणे, पर्यटन करणे म्हणजे मनातील मरगळ झटकून नव्या जोमाने, नव्या उत्साहाने पुढच्या आयुष्याची सुरुवात करावी. ‘आहार-विहार-विचार-आचार’ यांच्यावर नियंत्रण ठेवावे. व्यसनांना दूर ठेवावे. मद्यपान, धूम्रपान टाळावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.डॉ. गजानन रत्नपारखी
निषेधार्ह पाणी भाग एक
काही श्लोकांचे अर्थ कळले नाहीत तरी ते द्यावेत असे वाटते. म्हणजे त्याविषयी वाचणाऱ्याच्या मनात शंका रहात नाही.
जसे वाग्भटजी अध्याय क्र.5 मधील श्लोक 13/14 मधे म्हणतात,
नाम्बु पेयमशक्त्या वा स्वल्पमग्निगुल्मभिः ।।
पाणडूदरातिसारार्शोग्रहणीदोष शोथिभिः ।
ऋते शरदन्निदाभ्यां पिबेत्स्वस्थोऽपि चाल्पशः ।।
यांनी पाणी पिऊ नये, कोणी ?
ज्यांचा अग्नि मंद आणि अल्प आहे, ज्यांना गुल्म, रक्ताल्पता, जलोदर, अतिसार, मुळव्याध, संग्रहणी, सूज हे आजार असतील त्यांनी (अतिरिक्त) पाणी (आयुर्वेदीय डिग्रीहोल्डर आणि शुद्ध आयुर्वेदाचीच प्रॅक्टीस करणाऱ्या वैद्यांच्या सल्ल्याशिवाय ) पिऊ नये.
आयुर्वेदाची सरकारमान्य पदवी धारकाकडूनच आयुर्वेदीय उपचार करून घ्यावेत. हे सुशिक्षितांना पण सांगावे लागते, यापेक्षा दुर्दैव ते कोणते ?
बरं केवळ पदवी असून उपयोगी नाही. ते स्वतःला "वैद्य" म्हणवून घ्यायला लाजत नाहीत असे हवेत. (स्वतःला डाॅक्टर म्हणवून घेण्यात कोणता आनंद मिळतो कोण जाणे ? असो.
प्रत्येकाचा स्वतःकडे किंवा स्वतःच्या व्यवसायाकडे पहाण्याचा विचार वेगवेगळा असू शकतो. )
पदवी आयुर्वेदाची असेलही, पण ते प्रॅक्टीस आयुर्वेदाची करत असतील याची खात्री नाही. म्हणून म्हटले, शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टीस करणाऱ्यांचा सल्ला घ्यावा. माझे काही मित्र म्हणतात, शुद्ध आयुर्वेद हा शब्दच चुकीचा आहे. अशुद्ध आयुर्वेद नसतोच ! पण समाजात बघितले की कळते, राजस्थानी, बंगाली, हिमालयीन जडीबूटीवाले, यांनी आयुर्वेद पोटासाठी अशुद्ध करून ठेवलाय. वैदूंनी जिवंत ठेवलाय, पण सशास्त्र नाही. आणि ज्या शास्त्र जाणणाऱ्यांनी आयुर्वेदाचे संगोपन करायला हवे होते, त्यांनी मात्र आता तरी सवतीभावाने आयुर्वेदाकडे पाहू नये. ही वेळ आयुर्वेद पुनरूत्थानाची आहे.
असो !
वरील श्लोकाचे शास्त्रीय स्पष्टीकरण द्यायचे झाल्यास असे सांगता येते की, ज्या रोगांची नावे उल्लेखित केली आहेत, ते रोग तर आहेतच, पण तशाच लक्षणसमुहाचे अन्य रोग देखील जाणावेत, (हे वाक्य अनुक्त प्रकारात येते. अनुक्त म्हणजे, प्रत्यक्ष सांगितलेले नाही, पण यापूर्वी सांगितले असल्यामुळे इथे परत सांगत नाही, असे. )
या रोगांची प्रातिनिधीक यादी बघीतली तर सात व्याधी अन्नवह स्रोतसाशी प्रत्यक्ष संबंधीत आहेत. आणि सूज हे लक्षण रक्त आणि मूत्रवह संस्थेशी निगडीत आहे. म्हणजे पाण्यापासून ज्या अवयवांना विशेष हानी होणार आहे, असे हे अवयव जाणावेत. असे ग्रंथकर्ते वाग्भटाचार्य सुचवतात.
त्यात प्रथम उल्लेख केला आहे, भूक मंद आणि कमी असलेल्यांचा. स्वल्पम् आणि अल्पम् असे दोन वेगळे शब्द ग्रंथकार वापरतात. ते केवळ यमक जुळवून घेण्यासाठी नव्हे !
सध्या भूक म्हणजे काय, असाच प्रश्न पडतो. कारण भुकेची जाणीव व्हायच्या आतच पुढची खाण्याची डिश किंवा डबा समोर येतोय. इतकं अरबट चरबट खाणं अधे मधे होत असतं. ग्रहण केलेले अन्न पचवायला देखील वेळ हवा असतो ना ! तर त्यातून पोषक अंश शरीर तयार करेल. नाहीतर खाल्लेलं अन्नच रोगाच कारण होतंय.
यालाच म्हणतात भस्मासूर उलटणे !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
खूप वेळ घराबाहेर काढावा लागला तर नेमकं काय खायचं हा मधुमेहींसमोर यक्षप्रश्न असतो.
कामानिमित्त बराच वेळ घराबाहेर राहावं लागतं, वारंवार पाटर्य़ाना जावं लागतं, नवरा- बायको दोघेही काम करतात अशा विविध कारणांमुळे मधुमेहींना बाहेर, हॉटेलमध्ये खावे लागते. बाहेर खाताना ज्याने साखरेचे प्रमाण वाढणार नाही असं काय खाऊ हा प्रश्न नेहमीच सतावतो. नाक्यानाक्यावर असलेले विविध खाद्यपदार्थाचे ठेले, तोंडाला पाणी आणणारा वास, आकर्षक मांडणी यामुळे कुणालाही नक्कीच ते पदार्थ खावेसे वाटणार. हे अगदी स्वाभाविक आहे. ‘पिझ्झावर कोक फ्री’ अशा आकर्षक जाहिरातीदेखील अनेकांना भुरळ पाडत असतात. जिभेवर ताबा ठेवून, साखरेचे प्रमाण वाढणार नाही याचा विचार करत हॉटेलमधील पदार्थ निवडताना तारेवरची कसरत होते. खाण्याचा पदार्थ निवडताना खाणाऱ्याची आवड, खाद्यपदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स, (Glycemic Index), त्यातील कॅलरीजचं प्रमाण या मुद्दय़ांचा प्रामुख्याने विचार करावयास हवा. ग्लायसेमिक इंडेक्स हा त्या पदार्थामुळे रक्तातील साखर किती वाढते याचं प्रमाण दर्शवितो. खाद्यपदार्थावर दिलेला त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स, कॅलरीजचं प्रमाण, त्याचबरोबर त्यातील कबरेदके, तसंच नमूद केलेले प्रथिने, स्निग्धाचे प्रमाण जरूर वाचावे व त्यानुसार खाद्यपदार्थ निवडावा.आपल्या खाण्याची सुरुवात नेहमी ताक/ लिंबू पाणी/ सोडा, टोमॅटो, काकडी इ. सलाड, सूप (साखर, क्रीमरहित) यांनी करावी. जेवणात ब्राऊन किंवा मल्टी ग्रेन ब्रेडचे व्हेजिटेबल सँडविच (बटर, चीजरहित), साधा डोसा, गव्हाच्या पिठाची पोळी (तेल, बटर न लावलेली), डाळ (तडका नसलेली), उकडलेल्या किंवा कमी तेलात केलेल्या भाज्या, पालक पनीर, चणा मसाला, भाज्यांचा पुलाव हे पदार्थ खाण्यासाठी निवडावेत. कमी प्रमाण (small portion size) असलेला उपलब्ध खाद्यपदार्थ मागवावा.
फ्रूट सलाड, गोड पदार्थ, आइस्क्रीम (साखररहित) माफक प्रमाणात मागवावे व आपल्या सोबतच्या मित्रांसमवेत वाटून खावे. गोड, तळलेले, मैद्यापासून बनविलेले, डालडा, तूप वापरून बनवलेले पदार्थ कटाक्षाने टाळावेत. मद्यपान टाळावे, ते शक्य नसल्यास मद्याचे कमीत कमी प्रमाणात सेवन करावे. मद्य हे पाणी अथवा डायट सोडय़ामध्ये मिसळून प्यावे. प्रक्रिया केलेले (processed), बाजारात मिळणारे डबाबंद पदार्थ (packed) उदा. लोणचे, फरसाण, वेफर्स इत्यादी टाळावेत. मांसाहार खाणाऱ्यांनी कबाब, तंदूर केलेले खाद्यपदार्थ निवडावेत. उकडलेल्या माशांना प्राधान्य द्यावे. तोंडात त्वरित विरघळणारे पदार्थ टाळावेत. ३२ वेळा चावून खावे लागतील असेच पदार्थ निवडावेत. पदार्थाचे ग्लायसेमिक इंडेक्स आणि कॅलरीज दाखवणाऱ्या अॅेप्सचा वापर केल्यास योग्य खाद्यपदार्थ निवडण्यास मदत होईल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.डॉ. मीनाक्षी कुऱ्हे
आपण प्रत्येक जणच बदामाचे फॅन आहोत.अगदी लहान पणा पासूनच आपले नाते ह्याच्याशी जोडले जाते.लहान मुलांना बदाम पाण्यात भिजत घालून दुधात उगाळून देतात.परिक्षेच्या काळात अभ्यास चांगला लक्षात रहावा म्हणून आई मुलांना बदाम खायला देते.
बदामाचा शीरा,बदाम खीर,बदाम तेल,बदाम पाक असे बरेच प्रकारे बदाम आपण वापरतो.मिठाई मध्ये सजावटी करिता देखील ह्याचा वापर केला जातो.
चला मग बदामाचे गुणधर्म पाहूया:
बदाम चवीला गोड,तुरट,उष्ण,स्निग्ध,बलकारक,वातनाशक,
कफपित्तवाढविणारे,पौष्टिक,सारक,बुद्धिवर्धक,
पचायला जड,शुक्रवाढविणारे आहे.
आता बदामापासून बनविलेल्या व्यंजनाचा शरीरावर काय परिणाम होतो ते पाहूया:
१)बदामखीर/मिठाई:
गोड,पौष्टिक,उष्ण,पचायला जड,झोप आणणारी,शुक्र धातूवाढविणारी,बुध्दिवर्धक,
वातपित्तनाशक,बलकारक आहे.
२)बदामाचे तेल:
गोड,स्निग्ध,पचायलाजड,वातपित्तनाशक,
कफकर,मेंदूलाशांतकरणारा,वृष्य,उष्ण,
पोषक,डोकेदुखी कमी करते.हे तेल कानाच्या रोगात देखील उपयुक्त आहे.
बदामाचे अतिसेवन केल्यास पित्तवाढून जुलाब देखील होऊ शकतात.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
सौंदर्याच्या दृष्टीने केसांचे अत्यंत महत्व आहे. केस गळणे, केसात कोंडा होणे, अकाली केस पांढरे होणे, केस तुटणे यासारख्या केसांच्या समस्या असतात.
या केसांच्या समस्यांनी आज अनेक स्त्री आणि पुरुष दोघेही ग्रासलेले आहेत. केसांची समस्या गंभीर असली तरीसुद्धा, आपण जर आपल्या जीवनशैलीमध्ये अगदी थोडासाच बदल केल्यास केसांच्या सर्व समस्यांचे सहजतेने निरसण होईल. यासाठी येथे काही सहज सोपे उपाय दिले आहेत.
केसांचे आरोग्या आपल्या संपूर्ण आरोग्यावरच अवलंबुन असते. जसे जर आपल्या शरीरातील रक्तसंचारण [Blood circulation] योग्य प्रकारे होत असल्यास त्यायोगे केसांच्या मुळांचे पोषण योग्य प्रकारे होते. यांमुळे केसांची मुळे घट्ट होतात. परिणामी केस गळणे, तुटणे यासारख्या समस्या होत नाहीत.
संतुलित आहार घ्यावा
तळलेले पदार्थ, आंबट, खारट, तिखट, मसालेदार आहाराचे प्रमाण कमी करावे. हवाबंद पदार्थ, जंकफूड, फास्टफूडच्या आहारी जाणे टाळावे. कारण अशा आहारात केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे प्रोटीन, जीवनसत्वे, कॅल्शियम, लोह, जिंक इ. पोषकतत्वे नसतात. केसांच्या आरोग्यासाठी वरील पोषकतत्वांनी भरपूर असणाऱया हिरव्या पालेभाज्या, विविध फळे, मोड आलेली कडधान्ये, दुध, अंडी, सुकामेवा विशेषतः बदाम यांचा आहारात समावेश करावा. पुरेसे पाणी वरचेवर प्यावे. यांमुळे रक्तसंचार सुधारण्यास मदत होते. मानसिक ताणतणाव रहित रहावे. नियमित व्यायाम करावा. यांमुळे रक्तसंचारण सुधारण्यास मदत होते. योग्य रक्तसंचारणामुळे केसांची मुळे घट्ट होतात. यांभुळे केस गळण्यासारख्या समस्या होत नाही. केसांच्या आरोग्यासाठी ‘ड’ जीवनसत्व अत्यंत उपयुक्त असते. यासाठी सकाळच्या कोवळ्या ऊन्हात काही वेळ उभे रहावे. व्यसनांपासून दूर राहणे हे केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे असते. कारण धुम्रपान, मद्यपानाद्वारे अनेक विषारी घटक रक्तप्रवाहात येत असतात. त्यामुळे इतर आरोग्याच्या समस्येबरोबर केसांच्या समस्यासुद्धा उद्भवतात. धुम्रपान करणाऱया व्यक्तींचे केस लवकर पांढरे होतात.रासायनिक औषधे, कंडीशनरचा वापर हानिकारक ठरु शकतो. यासाठी तज्ञांच्या मार्गदर्शनानेच शक्यतो यांचा वापर करावा. यापेक्षा भृंगराजतेल, मेहंदी यांचा वापर करावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
सडसडीत व किडकिडीत यामधला फरकही समजून घेणे आवश्योक असते. सर्व बांधा सुदृढ व मनुष्य आकारात असणे, शरीराच्या कुठल्याही भागावर अवाजवी चरबी साठलेली नसून उंची व वजन यांचे प्रमाण उचित असून चालणे, पोहणे, काम करणे वगैरे सर्व क्रियांमध्ये चपळता असणे म्हणजे सडसडीत असणे. पण उंची जास्त व त्यामानाने वजन कमी असणे, शरीरावयवांना योग्य तो आकार नसणे व अशा व्यक्तीसला पाहिल्यावर आपण काडी/काठी पाहतो आहोत असा भाव मनात येणे म्हणजे किडकिडीत असणे.
दिवसातून दोन वेळा व्यवस्थित जेवण, सकाळची न्याहारी, मध्ये एखाद्या वेळी काहीतरी तोंडात टाकणे असे नियमात राहून स्वतःच्या प्रकृतीला मानवणारा आहार घेत राहिले तर सहसा कुठल्याही प्रकारचे आजार येत नाहीत, वजनही बरोबर राहते व शरीरही सडसडीत राहते. परंतु वजन वाढेल अशी भीती मनात असली तरी वजन कमी होते. वजन वाढेल या भीतीपायी शरीराला शक्तीय देण्यास समर्थ असलेले दूध, तूप, लोणी, साखर यांसारखे घटक बंद केले तर नुसतेच वजन उतरत नाही, तर शरीराची शक्तीम कमी होते. शक्तीा कमी व्हायला लागली, शरीराचे एकूणच असंतुलन सुरू झाले की शरीरातील हॉर्मोन्सचे असंतुलन होते व त्याचेही अनेक त्रास होऊ लागतात. त्याउलट अति खाण्याची, अति झोपण्याची, आळसात वेळ घालविण्याची सवय असली तर वजनाचा काटा प्रमाणाबाहेर झुकू लागतो, त्यातही नितंबांवर, मांड्यांवर, दंडावर, पोटावर अशा चुकीच्या ठिकाणी चरबी वाढल्याने वजन वाढू लागते.
न पचणारे नकोच
स्त्रियांचा मासिक धर्म जोपर्यंत व्यवस्थित चालत असतो तोपर्यंत सहसा वजन वाढत नाही, पण मासिक धर्मात काहीही असंतुलन झाले (उदा. एकच दिवस अंगावर जाणे वगैरे) तर त्याचा परिणाम वजन वाढण्यात, त्वचा काळपट व रुक्ष होण्यात होऊ शकतो. वयाच्या एका विशिष्ट मर्यादेनंतर शरीराचे धर्म पाळत असतानासुद्धा पोट व ओटीपोट येथे चरबी वाढण्याकडे प्रवृत्ती असते. याचा संबंध केवळ अन्नसेवनाशीच असतो असे नाही.
आईवडिलांकडून आलेल्या गुणांमुळे ज्यांच्या प्रकृतीचा कल वजन वाढण्याकडे असतो त्यांचे किंवा बुटक्यां व्यक्तीुचे शरीर भरायला लागले तर ते चांगले दिसत नाही. असे वजन कमी करण्याचीच आवश्ययकता असते. पण या उलट मनुष्य फार किडकिडीत झाल्यास (वंशपरंपरेने असो वा इतर कारणांमुळे असो) त्याचे वजन वाढवणे आवश्यिक असते. यासाठी कायम शरीराला सिद्ध तेलाचा अभ्यंग आवश्य्क असतो. स्त्रीने आपला मासिक धर्म व्यवस्थित आहे याकडे लक्ष ठेवावे (तो नीट नसल्यास आयुर्वेदाच्या तज्ज्ञांकडून प्रकृती तपासून घेऊन योग्य ते औषधोपचार सुरू करावेत). शरीर किडकिडीतेकडून सडसडीतेकडे नेण्यास याचा उपयोग होतो. अमुक गोष्ट खाऊन वजन वाढते व तमुक गोष्ट खाऊन वजन कमी होते या वक्त व्याला फारसा अर्थ नसतो. कुठलीही गोष्ट खाऊन अपचन झाले की वजन नक्की वाढते. न पचणाऱ्या गोष्टी खाल्ल्या, सातत्याने रात्री उशिरा जेवले तर मात्र वजन नक्की वाढते. पण असे वाढलेले वजन असंतुलनाला व रोगाला कारणीभूत ठरत असल्यामुळे या वजनाचा काही उपयोग नसतो.
किडकिडीत असणाऱ्या व्यक्तीरला शरीरसौष्ठव प्राप्त व्हावे यासाठी अभ्यंगाचा उपयोग होतो, तसेच स्वतःच्या प्रकृतीला जाणून त्यानुसार योग्य आहार घ्यावा. सकाळी न्याहारीच्या वेळी कुठलातरी गरम ताजा पदार्थ, दुपारच्या वेळी भरपूर जेवण, रात्री अल्पाहार म्हणजे दूध-भात, सूप, एखादी-दुसरी पोळी असा एकूण आहार ठेवल्यास वजन वाढायला मदत होते.
वजन वाढण्यासाठी आवश्य क असणाऱ्या धातूंची पुष्टी होण्यासाठी त्यानुसार धातुवर्धक अन्नसेवन आवश्याक असते, पण त्यासाठी व्यक्ति्गत मार्गदर्शन आयुर्वेदाच्या डॉक्टेरांकडून घेणे व त्यानुसार आहार ठेवणे आवश्यसक असते. याचे मार्गदर्शन आयुर्वेदिक डॉक्टदरांकडून अशासाठी, की आयुर्वेदाचा एकूण आहारासंबंधी दृष्टिकोन संपूर्ण वेगळा असतो, प्रकृतीनुसार तसेच पचनशक्ती्ला साजेसा आहार सुचविलेला असतो.
शरीर किडकिडीत नसावे, सडसडीत असावे अशा दृष्टीने वजन वाढविण्याची इच्छा असणाऱ्यांना व्यायामही आवश्यषक असतो. स्थूल व्यक्तींवना वजन उतरविण्यासाठी व्यायामाची आवश्य कता असते अशी समजूत अनेक वेळा असलेली दिसते. पण वजन वाढविण्यासाठीसुद्धा व्यायामाची गरज असतेच. अशा व्यक्तीं नी योगासने, प्राणायाम करणेही आवश्याक असते. फुफ्फुसांमध्ये प्राणवायू जेवढा अधिक स्वीकारला जाईल तेवढे शरीर सुदृढ व चांगले होते. योग करण्याने शरीरातील संप्रेरकांचे संतुलन व्यवस्थित राहिल्यामुळेही वजन व्यवस्थित वाढते. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून त्यानुसार आचरण केले, तर किडकिडीत न राहता सडसडीत राहायला मदत होईल, शरीराचा आकार व सौष्ठव चांगले राहून शरीर आकर्षक होऊ शकेल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- balaji tambe
मधुमेह जडलेल्या व्यक्तीला निरामय जीवन जगायचे असेल तर मधुमेहींसाठी डॉक्टरांनी नेमून दिलेलाच आहार घेणे आणि त्या आहाराच्या बाबतीतली पथ्ये कसोशीने पाळणे हा एकमेव उपाय असतो. डॉक्टर मंडळी वारंवार ही पथ्ये आणि हा आहार सांगत असतात. ब्लड शुगरची पातळी योग्य राहील असाच हा आहार असतो. असे काही आहार.
मधुमेही व्यक्तीने स्टार्च म्हणजे पिष्टमय पदार्थ कमी असणार्या. भाज्या प्राधान्याने खाल्ल्या पाहिजेत. त्यात प्रामुख्याने पालक आणि मोड आलेली हिरवी कडधान्ये यांचा समावेश होतो. हे मोड आलेले कडधान्य आहारात मिसळून खाणे जास्त श्रेयस्कर असते.
स्ट्रॉबेरी हे फळ मधुमेहींसाठी सर्वात उत्तम मानावे लागेल. कारण त्यामध्ये तंतूमय पदार्थ जास्त असतात आणि पाण्याचे प्रमाण खूप असते. या फळात गोडी भरपूर असली तरी कॅलरीज्चे प्रमाण कमी असते आणि कर्बोदकेही मर्यादित असतात. तेव्हा ब्रेकफास्टच्या वेळी चार स्ट्रॉबेरीज् खाल्ल्या तरी लगेच काही शुगर वाढत नाही.
मधुमेही व्यक्ती चरबीचे प्रमाण कमी असणारे मांसाहरी पदार्थ खाऊ शकतात. उदा. मासे आणि चिकन. मांसाहार करताना मधुमेही व्यक्तीने प्राण्यांच्या शरीराचे विशेष भाग आवर्जून मागितले पाहिजेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
एक चमचा मेथ्या रात्री भिजत घाला. त्या भिजलेल्या मेथ्या (भिजवलेल्या पाण्यासहित), एक ते दीड वाटी नारळाचे दूध, नागरमोथा, जटामांसी, गवलाकचरा, ब्राह्मी, आमलकी, मंजिष्ठ, माका आणि मेंदी सर्व एकेक चमचा, असं सगळं चांगलं घोटून (मेथ्या मिक्सरमधून आधी काढून घ्यायच्या किंवा सगळेच मिक्सरातून काढून घ्यायचे) मिक्स करा. गरजेप्रमाणे पाणी / नारळाचे सेकंडरी दूध (एकदा चोथा पिळून झाल्यावर परत तो पाणी घालून मिक्सरमधून काढले की जे पातळ ना दूध मिळते ते) घाला. केसाला मेंदी लावताना जी कन्सिस्टन्सी तयार करतो तीच करा. एकेका बटेला डोक्यापासून केसाच्या टोकापर्यंत लावा. अर्धा-पाऊण तास ठेवा आणि नुसत्या पाण्याने धुवून टाका. रात्री डोक्याला तेल. दुसर्यार दिवशी सकाळी माइल्ड शांपू लावून केस धुवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
केस मुलायम व्हावे यासाठी केसांची काळजी घेणे गरजेचे असते. वेळोवेळी केसांचा मसाज करावा लागतो. परंतु मसाज योग्य पद्धतीने न झाल्यास त्याचा फायदा होत नाही.
तेलाने मसाज करण्यासाठी लागणारे साहित्य
- खोबरेल तेल, कॉटन(कापूस), गरम पाणी, टॉवेल, शँम्पू इत्यादी.
प्रथम खोबरेल तेल थोडे कोमट करुन घ्यावे. केसाचे दोन भाग करुन कापसाच्या साहाय्याने सगळ्या केसांच्या मुळाशी तेल चांगल्या प्रकारे लावावे.
१५ मिनिटे गोलाकार मसाज करावा. एका कानापासून दुसर्याु कानापर्यंत क्रॉस मसाज करावा.
थोडे-थोडे केस घेऊन संपूर्ण केसांचा गरम तेलाने मसाज करावा.
मानेपासून कांद्यापर्यत खालच्या दिशेने मसाज करत यावा.
अधून-मधून डोक्याचे पॉईट दाबावे या क्रियेला पंचिंग असे म्हणतात.
१५ मिनिटे व्यवस्थीत मसाज झाल्यावर गरम पाण्यात टॉवेल भिजवून केसांना गुंडाळून थोडा वेळ वाफ घ्यावी या क्रियेला स्टीम असे म्हणतात
मसाज झाल्यानंतर केस शँम्पूने स्वच्छ धुवावेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Copyright © 2025 | Marathisrushti