(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • सुजलेल्या पायांवर घरगुती उपाय

    काही वेळा लोकांचे पाय सुजतात. त्याला वैद्यकीय शास्त्रात एडिमा असे म्हणतात. साधारणत: लघवीचे विकार असणार्यांसचे पाय सुजतात असे मानले जाते. मात्र पाय सुजणे हे मधुमेहाचे सुद्धा लक्षण असू शकते. आपली पावले हा शरीराचा खालचा भाग आहे आणि या भागापासून रक्त वर वाहण्यासाठी गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरोधात काम व्हावे लागते. तसे ते झाले नाही की, पायाकडचा रक्त पुरवठा जास्त होतो आणि पाय सुजतात. साधारणपणे घोटे आणि तळवे सुजतात. अर्थात पावले सुजण्याची अनेक कारणे आहेत. महिलांच्या बाबतीत गरोदर अवस्थेत पावले सुजतात.

    रक्तदाबाने सुद्धा पावले सुजू शकतात.

    एका बादलीत पाणी घेऊन त्या पाण्यात पेपरमींट ऑईल अगदी थोड्या प्रमाणात टाकावे. युकॅलिप्टस्चा सुद्धा वापर होऊ शकतो. अशा पाण्यात आपले पाय बुडवून ठेवावे. मोठा दिलासा मिळू शकेल.

    रक्त गोठल्यामुळे किंवा त्याचा प्रवाह मंद झाल्यामुळे पाय सुजले असतील तर मालीश करावे.

    अशाच रितीने मिठाच्या पाण्यात सुद्धा पाय बुडवून ठेवता येतात. त्यानेही सूज कमी होते.

    उताणे झोपावे आणि आपले पाय एका उशीवर उंच ठेवावेत. त्याने रक्तप्रवाह उलट्या दिशेने सुरू होतो. खुर्चीवर बसून टेबलावर काम करण्याची सवय असेल तर पाय ठेवायला काही तरी घ्यावे आणि थोडे उंचावर पाय ठेवावे.

    भरपूर पाणी प्यावे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

  • कंबर, पाय, दात दुखण्यांवर उपाय

    बारीकसारीक व्याधींमध्ये पाय, कंबर, दात दुखणे असले प्रकार मोडतात. म्हटले तर या व्याधी असतात अगदी किरकोळ पण आपल्याला बेचैनी देण्यास त्या पुरेश्या ठरतात. दात दुखणारा माणूस अन्य कशातही लक्ष घालू शकत नाही तसेच कंबर दुखणारा कोणतीच हालचाल सहज करू शकत नाही. मात्र किरकोळ पण वेळच्या वेळी केलेल्या उपचारांमुळे या कटकट्या स्वरूपाच्या दुखण्यातून मुक्तता मिळविता येते.
    पाय दुखणे मध्यमवयाच्या महिला, अशक्त मुले आणि मुली तसेच सरसकट सगळे वृद्ध यांना पायदुखीचा त्रास बरेचदा होताना आपण पाहातो. यावर पाव चमचा कच्चे तीळ चावून खावेत. महिनाभर हा उपाय केल्याने पाय दुखणे थांबते.

    कंबर दुखी विशेषत महिलांची – रात्री झोपताना गरम पाण्याच्या पिशवीने कंबर शेकावी. रोज १ चमचा सुंठवडा आठ दिवस खाल्ल्याने कंबरदुखी बंद होते.

    उसण भरणे कोठेही उसण भरली अथवा लचक आली तर मोहरीचे तेल मालिश करून लावावे व मग तो भाग शेकावा.

    बारीकसा अस्थिभंग (हेअर क्रॅक) बर्याचचवेळा पडल्याने अथवा पाय मुरगळणे या सारख्या प्रकारात हाडाला बारीकशी चीर पडते. यामुळे वेदना होतातच पण बर्याेच वेळा अवयव सुजतो. या प्रकारात कच्च्या डिंकाचे लाडू खाण्याने ही चीर लवकर भरून येण्यास मदत होते.

    दात दुखणे आजकाल अगदी बालवयापासून दातदुखी हा विकार आढळतो. त्रिफळा चुर्णाने दात घासल्याने दातदुखी थांबतेच पण दात आवळून येतात. मायफळाची पावडर हिरडयांना लावून अर्ध्या तासाने चुळा भराव्यात. हिरडयांना सूज असेल तरी त्रिफळा चूर्ण लावल्याने आराम मिळतो.

    पोटदुखी ओवा व साखर गरम पाण्याबरोबर घेण्याने पोटदुखी कमी होते. लहान बाळांमधील पोटदुखी पोट शेकण्यानेही कमी होते. अगदी तान्हे बाळ असेल तर आईने ओवा चावून बाळाच्या बेंबीवर तोंडानेच वाफारा सोडला तरी पोटदुखी कमी होते. मात्र गॅसेसमुळे बाळाचे पोट दुखत असेल तर हिंग पाण्यात कालवून त्याचा लेप बेंबीभोवती दिल्याने आराम पडतो.

    जुलाब जुलाब होत असतील तर खसखस तुपात परतावी व दुधात शिजवावी. २ चमचे खसखस घ्यावी. हे मिश्रण प्यायल्याने जुलाब थांबतात. अगदी लहान बाळाला जुलाब होत असतील तर जायफळ उगाळून साखरेबरोबर चाटवावे.

    उलटी उलट्या होत असतील तर धने रात्री पाण्यात भिजत घालावेत. ते पाणी धन्यासकट उकळावे. यात साखर व मीठ घालून थोडे थोडे पाजत राहावे.

    अपचन अपचनावर लंघन हा सर्वात्तम उपाय आहे. लिंबू ,मीठ घालून केलेले शरबत थोडेथोडे थोडया वेळाने पिण्यानेही फरक पडतो. अननसाच्या फोडी त्यावर साखर घालून खाव्यात त्यानेही पचन सुधारते.

    शौचास खडा होणे ही सवय बर्याअच लोकांना असते.त्यासाठी वेगवगळी औषधे ही घेतली जातात. रात्री झोपताना हळद व आवळकाठी यांचे मिश्रण घेतल्यानेही खडा मोडतो. १ चमचा आवळकाठी अधिक १ चमचा हळद एकत्र करून त्याच्या सारख्या आठ पुडया कराव्यात व रात्री झोपताना रोज १ पुडी या प्रमाणे आठ दिवस घ्याव्यात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

  • वीरचक्र विभूषित योद्धा सुभेदार रतन सिंग

    सुभेदार रतन सिंग १० ऑगस्ट, २०१६ रोजी वयाच्या ९२व्या वर्षी वृद्धापकाळाने मरण पावले. आमच्या प्रसारमाध्यमांनी बारीकशी बातमी दिली. साहजिकच आहे. वाचकांच्या मनात थोडीदेखील राष्ट्रीय भावना निर्माण होता कामा नये, असंच आपल्या माध्यमांचं अलिखित धोरण आहे. विविध प्रकारच्या राजकीय, सामाजिक खर्याा-खोट्या ‘कॉन्ट्रोव्हर्सीज’ उभ्या करायच्या आणि लोकांचं चित्र त्यात गुंतवून ठेवायचं; ‘नॉन-इश्यूज’ ना ‘इश्यूज’ बनवायचं आणि खर्याय ‘इश्यूज’ पासून जनतेचं लक्ष दूर न्यायचं, हे खरं अलिखित धोरण आहे.

  • सुडौल बांध्यासाठी लायपोसक्शन

    गेल्या दोन दशकांमध्ये चरबी कमी करण्याबद्दलचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. यालाच लायपोसक्शन म्हणतात. यामध्ये चरबी कायमची कमी करता येते व शरीरालापण सुडौल बनवता येते. समाजात वावरताना स्वाभिमानाने, आत्मविश्वाासाने वागता येते. सुडौल व तंदुरुस्त शरीर हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. नियमित व्यायाम करूनही काही व्यक्तींमध्ये जास्त चरबी असते. ती कुठेही असू शकते, तर काही विशिष्ट ठिकाणीही असू शकते. बराच व्यायाम आणि डाएटिंग करूनही ही चरबी घालवता येत नाही. आनुवंशिकता हे बऱ्याच वेळा कारण असू शकते. गेल्या दोन दशकांमध्ये चरबी कमी करण्याबद्दलचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. यालाच "लायपोसक्शेन' म्हणतात. यामध्ये चरबी कायमची कमी करता येते व शरीरालापण सुडौल बनवता येते. समाजात वावरताना स्वाभिमानाने, आत्मविश्वाीसाने वागता येते.

    लायपोसक्शन म्हणजे काय?

    कातडीखाली असलेली चरबी छोटीशी जखम करून त्यातून विशिष्ट नळीवाटे काढतात. हे दोन प्रकाराने केले जाते.

    पॉवर असिस्टेड लायपोसक्सन
    यात इलक्ट्रिकच्या साहाय्याने किंवा हवेच्या दाबाने विशिष्ट नळी सतत हलवत ठेवतात. त्यामुळे चरबी पातळ होते व बाहेर काढण्यास सोपे जाते.

    अल्ट्रासाऊंड असिस्टेड लायपोसक्शेन
    यात अल्ट्रासाऊंडच्या साहाय्याने चरबी काढली दाते. चरबी काढण्याअगोदर प्रथम सलाईन व त्याचबरोबर अड्रेनलीन टोचले जाते, ज्यामुळे रक्तस्राव कमी होतो. या प्रकाराने गाल, हनुवटी, मान, दंड, स्तन, पाठ, छाती, पोट, कंबर, बसण्याची जागा, मांडी, पायाचा खालचा भाग, घोट्याजवळची वगैरे ठिकाणची चरबी काढता येते. याच वेळी जरूर असेल तर फेसलिफ्ट, स्तनांचा आकार कमी करणे किंवा पोटाची चरबी कमी करता येते.

    अपेक्षा
    लायपोसक्शन हे वजन कमी करण्यासाठी ट्रीटमेंट म्हणून केले जात नाही. त्यासाठी व्यायाम व खाण्यावर बंधन हेच योग्य आहे. लायपोसक्शनमुळे चरबी कायमची कमी करता येते. जिथे ती जास्त आहे किंवा इतर शरीराच्या मानाने बेडौल दिसते आहे, अशा जागांमधून ती कायमची कमी करता येते.

    योग्य व्यक्ती कोण?
    ज्यांच्यात कातडीची स्थिती उत्तम आहे, स्नायू चांगले आहेत, एकूण आरोग्य ठीक आहे, जखम भरण्याची क्रिया उत्तम आहे, विडी, सिगारेट ओढत नाही किंवा कुठला आजार नसेल अशी तरुण व्यक्ती लायपोसक्शन करून घेऊ शकते.

    ज्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला आहे, ज्यांच्यापुढे विशिष्ट ध्येय आहे अशा व्यक्ती.

    ब्लड प्रेशर, डायबेटिस किंवा हार्टडिसीझेस असलेल्या व्यक्तींचा वेगळा विचार करावा लागतो. तसेच ज्या जागेतून चरबी काढायची त्या जागेची जर काही शस्त्रक्रिया आधी झाली असेल तरीही विचार करावा लागतो.

    प्रथम सुरुवात कुठे करणार?
    प्रथम अस्थेटिक सर्जनबरोबर विचारविनिमय करा. लायपोसक्शीनमुळे शरीर कसे सुडौल करता येईल याबद्दल माहिती करून घ्या. त्याचे परिणाम, करण्याचे वेगवेगळे मार्ग समजावून घ्या व मगच विचार करा. त्याचप्रमाणे करण्याअगोदर तुमची खरीखुरी आरोग्याबद्दल माहिती तसेच चालू असलेली औषधी, ऍलर्जी, स्मोकिंग वगैरेबद्दल सर्जनला सांगणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.डॉ. आशीष दावलभक्त, ऍस्थेटिक प्लास्टिक सर्जन, पुणे.

  • याला जीवन ऐसे नाव भाग ३६

    पाण्याची प्रशंसता भाग एक

    पाणी म्हणजे जीवन जर योग्य वेळी, योग्य काळी, योग्य स्थळी, योग्य मात्रेमधे प्यायले तर !

    हे विश्व पाण्यातूनच निर्माण झाले आहे. प्रत्येक प्राणीमात्राला जगण्यासाठी पाणी हे अत्यंत आवश्यक आहे. असे पाणी न मिळाल्यास तोंडाला कोरड पडते, शरीर चैतन्यहीन होते. अवयव शिथील होतात, आणि शेवटी मृत्यु येतो. पाण्याशिवाय कोणत्याही प्राण्यांचे कार्य चालूच शकत नाही, मग तो रोगी असो वा निरोगी, पाणी हेच जीवन आहे.

    निरोगी राहाण्यासाठी वाग्भटजी म्हणतात,
    जेवणाच्या आरंभी पाणी प्यायल्याने मनुष्य बारीक होतो.
    जेवणाच्या नंतर पाणी प्यायले असता, माणूस स्थूल होतो.
    तर जेवताना पाणी प्यायले असता मनुष्य सडसडीत राहातो.

    तो मूळ संदर्भ असा आहे.
    समस्थूलकृशा भक्तमध्यान्तप्रथमाम्बुपा : ।

    भक्तस्यादौ जलं पीतमग्निसादं कृशांगताम् ।
    अंते करोति स्थूलत्वं ऊर्ध्व चामाशयात्कफम
    मध्ये मध्यांगतां साम्यं धातूनां जरणं सुखम् ।।

    जेवताना देवाचे स्मरण करून पहिली आपोषणी घेतात. घसा ओला होण्यापुरतेच हे पाणी सांगितले आहे. नंतरचा घास अडकू नये, म्हणून घसा थोडा ओला करून घेणे. एक पळी पाणी उजव्या हाताची तर्जनी आंगठ्याच्या मुळाशी लावून तळहातावर छोटा खळगा करून त्यात एकच पळी पाणी घेतात......

    देवपूजे मधेदेखील कोणत्याही कार्याच्या सुरवातीला आपोषणी घेतात.
    केशवाय... नारायणाय....माधवाय नमः।
    इथेपण तीनच पळ्या पाणी सांगितले आहे....

    पाणी भरपूर प्यायचा नियम जर आपल्या संस्कृती मधे असला असता तर तिथे एक पळीभर ऐवजी, एकेक पेलाभर किंवा एकेक तांब्याभर पाणी प्यायला का सांगितले जात नाही?

    "कारणाशिवाय पाणी पिऊ नये. जेवणापूर्वी पाणी पिऊ नये, पाणी प्यायचे असल्यास एक पळीभरच पाणी प्यावे" हा संदेश यातून मिळतो.

    जेवणापूर्वी जास्त पाणी प्यायल्याने पोटातील पाचक स्राव कमी होतात.भूक मारली जाते. जेवण कमी जाते, त्यामुळे बारीक व्हायला होते. शरीर कृश होते, म्हणून असे करू नये.

    हो. हे आधी ठरवले पाहिजे की, आपण सडसडीत असले पाहिजे. जाड पण नको. आणि बारीक पण नको. केवळ बारीक दिसण्यासाठी, डाएटींगच्या नावाखाली, पाणी पित रहाणे हा रानटी क्रूरपणा आहे. कृपया असे करू नये. आम्ही आमच्या विचारधाराच बदलून टाकल्या आहेत. आम्ही आमचे आदर्शच बदलून टाकले आहेत.

    आमचे आदर्श जर दीपिका नि कॅटरीना असतील तर जीवनात वादळं आल्याशिवाय राहाणार नाही. काय दीपक लावायचे आहेत, ते कर्तृत्वात दाखवा. नुसते 'फिगर फिगर' करण्यात काही अर्थ नाही. शरीर अगदी नाजूक आखीव रेखीव, पण जरा काम सांगितले की कंबर जाते मोडून !

    तरूणांचा आदर्श सुद्धा संजय दत्त नको, तर बटुकेश्वर दत्त हवा. पाश्चात्य विचारांचे पाणी जोखणारा आणि त्यांच्या तोंडचे पाणी पळवणारा !!

    कृश होणे, बारीक होणे हे, 'अशक्त होणे' या अर्थी आहे, हे लक्षात घ्यावे. म्हणून शहाण्या माणसानी जेवणापूर्वी पाणी पिऊ नये.

    तोंडातील लाळ औषधी असते, पण सकाळी सकाळी तोंड धुवायच्या अगोदरची नाही. रात्रभर तोंडात तयार झालेली, किडलेल्या दाढांमधे भरून राहिलेली, लाळ औषधी कशी असेल ? राजा भोज यानी लिहिलेल्या एका ग्रंथातील संदर्भ असं सांगतो, पण वाग्भटजी असं कुठेही सांगत नाहीत.
    आपले राजे केवळ युद्धच करत नव्हते तर ग्रंथ देखील लिहित होते. आमच्या छत्रपती शंभुराजांच्या संस्कृतमधे लिहिलेल्या बुधभूषण या ग्रंथाचे नाव तरी आठवत असेल. हे सर्व प्राचीन ग्रंथ खरंतर शालेय अभ्यासक्रमात असायला हवेत. असो.

    गोऱ्या कातडीचे लोक काय सांगतात, यापेक्षा आपल्या परंपरा आणि आमचे आप्त काय सांगतात, ते जास्त महत्वाचे. त्यांनी नक्कीच चार पावसाळे जास्त बघितलेले आहेत.

    थोडा विश्वास दाखवूया, आमच्या आप्तांवर !
    त्यांनी आखून दिलेल्या चालीरीती वर !!

    वैद्य सुविनय दामले,
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    12.01.2017

  • दहा गोष्टी आरोग्याच्या

    निरोगी आरोग्यासाठी १० उपयुक्त टिप्स...

    • सकाळी उठल्यावर पाउण इंच आल्याचा तुकडा चावून खाल्ला कि शरीराची अंतर्गत ताकद वाढायला फार मदत होते.
    • सकाळी उठल्यावर खूप पाणी पिण्यापेक्षा एक फळ खा. रात्रभर दमलेल्या हृदयाला त्याने शक्ती मिळते.
    • दिवसभरात खूप पाणी पिण्याचा सल्ला काहीजण देतात. पण प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणे हे किडणीसाठी धोकादायक आहे. अनावश्यक अतिपाणी म्हणजे जास्त पाणी पिणे हे मधुमेह्सारख्या रोगाला निमंत्रण देण्यासारखे आहे. दिवसभरात अडीच ते पावणेतीन लिटर पाणी शरीरास योग्य आहे.
    • हाडांची ताकद वाढण्यासाठी सकाळी आठच्या सुमारास शरीराचे सांधे उघडे करून कोवळ्या उन्हात बसले कि त्वचेखाली विटामिन डी तयार होते. ज्याच्या मदतीने शरीरात कॅल्शियम चे पचन आणि शोषण वेगाने व्हायला मदत होते. कोणत्याही बाजारातल्या गोळ्यांपेक्षा हा उपाय खुपच प्रभावी आहे.
    • रोज तीन ते चार तुळशीची पाने चावून खाल्ली कि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली वाढते.
    • दुधातून हळद घेतली तर रक्तशुद्धी होते आणि शरीरातील घातक रोगजंतू मरतात.
    • दुधात एक चमचा सुंठ घालून ते उकळून घेतले कि असे दुध पित्त प्रकृतीच्या लोकांना चांगले पचते.
    • दुपारच्या जेवणानंतर ताजे आणि कमी आंबट ताक घेणे आरोग्यदायी आहे.
    • रोज आवश्यक तेवढा व्यायाम केला कि शरीराच्या अनेक तक्रारी कमी होतात.
    • सूर्यनमस्कार हा भारतीय उपखंडातील वातावरणासाठी उत्तम व्यायाम आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • हिमोग्लोबिन – भाग २

    हिमोग्लोबिनमधला हिम हा भाग फुफ्फुसातील ऑक्सिजनचे परिवर्तन ऑक्सिहिमोग्लोबिनमध्ये करतो. उतीमध्ये पोहोचल्यावर ऑक्सिजनचा दाब जिथे कमी असेल व कार्बनडाय ऑक्साईडचा दाब वाढला असेल तिथून तो ऑक्सिजनबरोबर मुक्तक होतो. त्यानंतर कार्बनडाय ऑक्साईडबरोबर संयोग होऊन फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो व कार्बनडाय ऑक्साईड वेगळा होतो आणि उच्छ्वासाद्वारे शरीराबाहेर पडतो. हिमोग्लोबिनमार्फत ऑक्सिजन घेणे आणि सोडणे ही प्रक्रिया सतत सुरू असते.

    बोनमॅरोमधील रंगपेशींना लोह आणि ऑक्सिजनचा पुरवठा करणारे रंगद्रव्य म्हणजे हिमोग्लोबिन. याचा रंग लाल असतो. हिमोग्लोबिन म्हणजे प्रथिनांचे एक जटील रूप आहे. ज्यामध्ये 96 टक्के ग्लोबिन आणि 4 टक्के हिम असते.

    हिमोग्लोबिनचे कार्य

    फुफ्फुसांतून उतींना ऑक्सिजन पुरवणे आणि उतींमधून कार्बनडाय ऑक्साईड फुफ्फुसामध्ये पोहोचवणे हे हिमोग्लोबिनचे महत्त्वाचे कार्य आहे. हिमोग्लोबिनमधला हिम हा भाग फुफ्फुसातील ऑक्सिजनचे परिवर्तन ऑक्सिहिमोग्लोबिनमध्ये करते. उतीमध्ये हे ऑक्सिहिमोग्लोबिन पोचल्यावर ऑक्सिजनचा दाब जिथे कमी असेल आणि कार्बनडाय ऑक्साईडचा दाब वाढला असेल तिथून ऑक्सिजन मुक्त होतो. त्यानंतर कार्बनडाय ऑक्साईडबरोबर संयोग होऊन फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो त्यानंतर कार्बनडाय ऑक्साईड वेगळा होतो आणि उच्छ्वासाद्वारे शरीराबाहेर पडतो. हिमोग्लोबिनमार्फत ऑक्सिजन घेणे व सोडणे ही प्रक्रिया सतत सुरू असते.

    हिमोग्लोबिनशी निगडित समस्या

    सामान्यपणे रक्तागल्पता, पोषण कमी, रक्त.वाहिन्यांच्या समस्या, ट्यूमर आदी समस्या हिमोग्लोबिनच्या पातळीशी निगडित असतात.
    रक्ता्ल्पता हा हिमोग्लोबिनशी निगडित रोग सामान्यपणे पाहायला मिळतो.

    रक्ता्मधील हिमोग्लोबिनचे प्रमाण

    पुरुष : 14 ते 17 ग्रॅम प्रति 100 मिली
    स्त्री : 13 ते 15 ग्रॅम प्रति 100 मिली
    लहान मुले : 14 ते 20 ग्रॅम प्रति 100 मिली

    हिमोग्लोबिन वाढण्यासाठी दिवसाकाठी एक सफरचंद खाल्ल्यास हिमोग्लोबिनचे प्रमाण कायम राहते. लीची हे फळ आरोग्यास अतिशय लाभदायक आहे. लीचीमध्ये बीटा कॅरोटीन, राईबोफ्लेबिन, नियासीन आणि फॉलिक अॅ सिड किंवा ‘बी’ जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तनपेशी वाढतात तसेच पचनही सुलभ होते. लाल रक्तबपेशींच्या वाढीसाठी ही जीवनसत्त्वे शरीरास मिळणे अत्यावश्यक आहेत.

    आहारात बीटाचा समावेश अवश्य करावा त्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढते. त्यात फॉलिक अॅासिड, आयर्न, तंतुमय पदार्थ आणि पोटॅशिअमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे लाल रक्त पेशींची संख्या वाढते. त्याशिवाय डाळिंबामध्येही लोह आणि कॅल्शियमसह प्रथिने, कार्बोहायड्रेट आणि तंतूमय पदार्थ यांचे प्रमाण जास्त असते. घरात वापरला जाणार गूळ हादेखील हिमोग्लोबिन वाढवण्याचा उत्तम उपाय आहे. गुळामध्ये लोह आणि फॉलिक अॅळसिडसह इतरही ‘बी’ जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे लाल रक्त पेशींचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढते. नियमित व्यायामामुळे शरीर स्वतःच हिमोग्लोबिनची निर्मिती करते. कॉफी, चहा, कोकाकोला, वाईन, बीअर यांच्यामुळे शरीरात लोह शोषण्याचे प्रमाण कमी होते. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असेल तर या पदार्थांचे सेवन कमी करा. ‘क’ जीवनसत्त्वाची कमतरता असेल तर हिमोग्लोबिनची पातळी खालावू शकते. कारण ‘सी’ जीवनसत्त्वाची कमतरता असेल तर लोह शोषले जात नाही. त्यामुळे ‘सी’ जीवनसत्त्व असणाऱे पदार्थ खाल्ल्यास हिमोग्लोबिनच्या पातळीत वाढ होते. आपल्या आहारात पोषण तत्त्वांची कमतरता असल्यास हिमोग्लोबिनच्या पातळीत झपाट्याने घट होते. त्यासाठी प्रथिने आणि लोह हे घटक असणार्याा पदार्थांचे सेवन करावे. अंडे, डाळ, ज्यूस यांचे नियमित सेवन केल्यास रक्तातल्पता कमी होते. धूम्रपान आणि दारू पिणे या गोष्टींपासून दूर राहिल्यास हिमोग्लोबिनची पातळी राखता येते. सकाळच्या ताज्या स्वच्छ हवेत व्यायाम केल्यासही आरोग्य चांगले राहते. वजनाच्या प्रमाणात माणसाच्या शरीरात लोहाचे प्रमाण हे तीन ते पाच ग्रॅम असते; पण हे प्रमाण कमी झाले तर शरीराला हिमोग्लोबिनची कमतरता भासते. त्यामुळे शरीरातील पेशींना मिळणारा ऑक्सिजन कमी होतो त्यामुळे शरीराराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही. त्यामुळे व्यक्तीा अॅसनिमियाग्रस्त होते. त्याशिवाय बी-12 जीवनसत्त्वाची कमतरता आणि फॉलिक अॅुसिडची कमतरता असल्यासही व्यक्तीम अॅतनिमियाग्रस्त होते.

    पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अॅानिमियाचे प्रमाण जास्त असते. लवकर थकवा येणे, चक्कतर येणे, त्वचा पिवळी पडणे, सततची डोकेदुखी ही अॅ निमियाची लक्षणे असतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. डॉ. रोहिणी भगत

  • आणि जगण्याचा अर्थ गवसला

    आणि जगण्याचा अर्थ गवसला

    २००५ सालचा बालश्री पुरस्कार विजेता ओंकार वैद्य याच्या जीवनावर प्रत्येकाने आवर्जून पाहावा असा एक स्फूर्तिदायक लघुपट. ओंकार वैद्य याचे कौतुक A.P.J. अब्दुल कलाम आणि सचिन तेंडुलकर यांनी केले आहे.

    ..आणि जगण्याचा अर्थ गवसला

    https://youtu.be/9XHJEJmwV3k

  • विटामीन ‘बी’चे महत्त्व

    शरीरासाठी विटामिन्स किती महत्वाचे असतात ते लहान असताना आपल्याला शाळेत शिकविले जाते. तसे तर प्रत्येक विटामिनचे आपले असे महत्व असते. परंतु, आज आपण या लेखाद्वारे विटामीन ‘बी’चे महत्व जाणून घेणार आहोत. विटामीन ‘बी’ आपल्यातील ऊर्जेची पातळी वाढविते. त्याचबरोबर बुद्धी तल्लख ठेवण्यास मदत करते. चला तर, जाणून घेऊया अशा कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्यात विटामिन ‘बी’ची भरपूर मात्रा आहे, ज्याचे सेवन आपण नेहमी केले पाहिजे.

    आक्रोड

    आक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि एंटीऑक्सिडेंट्सची भरपूर मात्रा असते. याशिवाय यात विटामिन बी-५, बी-१ (थियामिन) आणि विटामीन बी-६ सुध्दा असते. इतकेच नाही तर यात खूप कमी प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट असते. यातील पौष्टीक घटक मन प्रसन्न ठेवते, एनर्जी लेव्हल वाढवते आणि स्मरणशक्ती चांगली करण्यात मदत करते. त्याचबरोबर डोळे, दात, त्वचा आणि मेंदूसाठीसुद्धा चांगले असते.

    काजू

    काजूमुळे फॅट वाढेल असे मुलींना वाटत असल्या कारणाने त्या काजूला पसंती देत नाहीत. परंतु, असे काही नसून, काजूमध्ये विटामीन बी-३, बी-१ आणि बी-६ असते. ज्यामुळे शरीर आणि मनाला ऊर्जा मिळते. यात आयर्न, सेलेनियम, मॅग्नेशियम आणि झिंक असते. याबरोबरच काजू एंटीऑक्सिडेंट आणि प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. काजूमुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. याच्या सेवनाने हृदयाच्या संबंधीच्या आजारापासून बचाव होण्यास मदत होते.

    पालक

    कोणत्याही प्रकारच्या हिरव्या भाज्या शरीरासाठी चांगल्याच असतात. शरीरात ऊर्जेचे सातत्य टिकविण्यासाठी पालक या पालेभाजीचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. यात विटामीन बी-२, बी-९, विटामीन सी, ए, आयर्न, फॉलिक अॅसिड, कॅल्शियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. जे संपूर्ण शरीराला आणि मनाला तंदुरूस्त बनवते. पालकाच्या सेवनाने पचन तंत्र निट होऊन, भूक वाढते. त्याचबरोबर चेहऱ्यावरील डाग मिटतात आणि त्वचा स्वच्छ होते.

    बदाम

    जेव्हा एखाद्याला एखादी गोष्ट आठवत नाही, तेव्हा स्मरणशक्ती वाढविण्यासाठी रोज एक बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. बदामामध्ये विटामीन बी-२, बी-१, बी-५, बी-३, बी-९ आणि बी-६ परिपूर्ण असतात. याशिवाय यात विटामीन ई, मॅग्नेशियम, आयर्न आणि प्रोटीनसुद्धा असते. याला आपल्या दररोजच्या खाण्यापिण्यात सामील करणे गरजेचे आहे.

    केळे

    केळामध्ये विटामीन बी भरपूर प्रमाणात असल्याने आपल्या सकाळच्या न्याहारीत केळाचे सेवन जरूर करा. यात विटामीन बी-५, बी-६ चा चांगला स्त्रोत असतो. याशिवाय यात विटामीन सी, फायबर, पोटॅशियम आणि ७४% पाणी असते. केळामुळे तणाव कमी होण्यासदेखील मदत होते. केळात ट्राइप्टोफान नामक एमिनो अॅसिड असते, जे मन प्रसन्न ठेवण्यास मदत करते. मुली तर केळाने त्यांचा चेहरासुद्धा साफ करतात, ज्यामुळे त्यांचा चेहरा उजळतो.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • २०१६ मध्ये संरक्षण मंत्रालयात सकारात्मक बदल

    २०१६ मध्ये संरक्षण मंत्रालयात सकारात्मक बदल

    संरक्षण मंत्रालयात गेल्या वर्षभरामध्ये अनेक सकारात्मक बदल झाले आहेत. ज्यामुळे या मंत्रालयाचे काम पारदर्षक,वेगवान, व जास्त चांगले झालेले आहे. त्यामधील काही महत्त्वाच्या पैलूंवर आपण चर्चा करू.याअगोदर देशाच्या सुरक्षा व्यवस्थेची स्थिती कशी होती हे पाहाणे गरजेचे आहे. तसेच वर्षात या क्षेत्रात काय बदल झालेले आहे आणि शिल्लक असलेल्या २ १/२ वर्षांत कोणत्या अपेक्षा आहेत हे पण समोर आणणे जरुरी आहे.