वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
दतात्रेयांनी जिथे प्रत्यक्ष वास केला असे ठिकाण पर्वतशिखरांचा समूह म्हणजे गिरनार आसे मानले जाते. दहा हजार पायर्या चढुन तिथे जाणं हे शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी पाहणार असलं तरी एकदा तरी जायलाच पाहिजे असं ते स्थान आहे.
भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनीत केलेले आणि बारा हजार वर्षे तपाने सिध्द केलेले स्थान म्हणजेच गिरनार अशी दतभक्तांची श्रध्दा आहे. भौगोलिक दृष्ट्या असंख्य छोट्या मोठ्या पर्वतांचा, शिखरांचा आणि सुळके यांचा समूह असलेला हा परिसर आहे. पुराणांमध्ये याचा श्र्वेताचल, श्र्वेतगिरी अशा नावाने उल्लेख आढळतो.
पश्चिम भारतातील गुजरात राज्यामध्ये जुनागड या शहरापासून गिरनार तळ पाच कि मी अंतरावर आहे. या पर्वताचा विस्तार सुमारे चार योजना म्हणजेच 16 गावांपर्यत आहे. सुमारे 28 चौ कि मी ने व्यापलेला गिरनार पर्वताचा हा परिसर अत्यंत निसर्गरम्य, विलोभनीय, वन्यप्राणी जगताने संपन्न, विविध औषधी वनस्पतीने युक्त आहे. ही भूमी योगी सिध्द महात्मे यांनी संपन्न झालेली आहे. आजही अनेक जण गिरनार पर्वतावरील त्यांच्या स्थानावर तपश्र्चर्येला बसलेले आढळून येतात.
गिरनार पर्वताच्या पायथ्याला (गिरनार तलेठी) भगवान महादेव मंदिर ,मृगी कुंड,लम्बे हनुमान मंदिर अशी प्राचीन आणि प्रेक्षणीय स्थळे आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेव मंदिरच्या दर्शनाला हजारो साधूं संत आणि लाखोंच्या संख्येने भाविक येतात. तेथील मृगी कुंडामध्ये हे नागा साधू स्नानाला उतरतात.
अशी एक आख्यायिका आहे. कि त्या साधूमध्ये असा एक साधू असतो की जो स्नानाला मृगी कुंडात उतरतो पण डुबकी मारल्यावर बाहेर येत नाही. अंतर्धान पावतो आजूबाजूच्या परिसरामध्ये जुना आखाडा,निरंजन आखाडा, आव्हान आखाडा, अग्नी आखाडा, असे अनेक आखाडे आहेत . त्यापैकी श्रीशेरनाथ बापू संचलित गुरू त्रिलोकनाथ बापूचा एक आश्रम बघण्यासारखा आहे. अतिशय सात्त्विक आणि आपल्या तपोबलाने तेजस्वी अशा श्री शेरनाथ बांपूचे दर्शन सर्व भाविकांनी घेण्यासारखे आहे. आश्रमामध्ये गेली अनेक वर्षे अव्याहतपणे अन्नदान चालले आहे. गुरु शिष्य ( नाथ परंपरा ) येथे अजूनही जपली जाते. आलेल्या प्रत्येक भाविकाने येथे "प्रसाद" घेतला जाईल याकडे स्वत शेरनाथ बांपूचे कटाक्ष लक्ष असतो.
लंबे हनुमान समोरील एका पायवाटेने सुमारे अडीच ते तीन कि मी आत जंगलाच्या दिशेने दुसरे एक संत श्री काश्मिरी बापूंचा आश्रम आहे श्री काश्मिरी बापूंचे वय अंदाजे दिडशे वर्षेच्या आसपास आहे. अशी स्थानिकांची तसंच भाविकांची श्रध्दा आहे,याही आश्रमामध्ये अतिशय निसर्गरम्य आणि काश्मिरी बापूंच्या तापाने प्रवित्र असे हे स्थान आवर्जुन बघण्यासारखे आहे.
गिरनार पर्वतावर स्वयंभू उमटलेल्या भगवान दत्तात्रयांच्या पादुकाचे दर्शन घेणे ही प्रत्येक दत्त भक्ताची इच्छा असतेच सुमारे दहा हजार पायर्यावर हे स्थान आहे . वाटेत जाताना विविध इतर ही स्थाने आहेत. पायर्या चढायला सुरुवात करताना अगोदर एक कमान लागते जिथून सर्व भाविक सुरवात करतात.
दोन हजार पायर्यांवर वेलनाथ बाबा समाधी असा फलक दृष्टीला पडतो. हेही एक सिध्द स्थान आहे. २२५० पायर्यांवर श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या राजा भर्तृहरी आणि गोपीचंद यांची गुफा आहे. आतमध्ये जाऊन दर्शन घेतल्यास दोन सुबक मूर्ती आढळून येतात. थोडे बाजूला "माली परब" घाट येतो. तेथे रामाचे मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी गोड पाण्याचे थंडगार पाणी असलेले कुंड आहे. २,६०० पायर्यांवर आसपास राणक देवीमातेची शिळ आहे. त्या शिळवर दोन हातांच्या पंजाचे निशाण आहे. थोडे अजून पुढे गेल्यावर सुमारे साडेतीन हजार पायर्यांपाशी प्रसूती बाई (देवी) चे स्थान आहे. संतान प्राप्ती झाल्यावर येथे त्या संतानाला घेऊन दर्शनाला येणार्या भाविकांची संख्या मोठी आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दत्त गुंफा , संतोषी माता, काली माता,वरूडी माता,खोडीयार माता , अशी छोटी छोटी मंदिरे आहेत.
बाजूला जैन मंदिर येते. मुख्य मंदिर नेमिनाथचे आहे. अतिशय सुंदर सुबक मोहक अशी नेमिनाथाची मूर्ती आहे. नेमिनाथा हे 22 वे जैन तीर्थकर होय. या मंदिरातून थोड्या पायर्या उतरल्यावर जैन धर्मातले पाहिले तीर्थकर आदिनाथांची भव्य आणि उंच प्रतिमा आहे. थोडे पुढे गेल्यावर जैन दिगंबर मंदिराचा समूह आहे. उत्कृष्ट कलाकसुरी कारागिरीने युक्त अशी ही मंदिरे आपल्या प्राचीन संस्कृतीच्या वैभवाची प्रतीके आहेत.
थोडे पुढे गेल्यावर गौ मुखी गंगा या नावाने स्थान आढळून येते. येथे गाईच्या मुखातून गंगाचे पाणी येते बाजूला गंगेश्वर महादेव मंदिर व बटुक भैरवाचे मंदिर आहे. गौ मुखी गंगा मंदिराच्या उजव्या बाजूने वर चढण्याचा मार्ग आहे. डाव्या बाजूला एक उतरण्याचा मार्ग आहे. ग्रामस्थ ,भाविक,साधू बैरंगी या मार्गांने येतात अथवा जातात. या मार्गांवर कूठल्याही प्रकारची मदतीसाठी माणसे, डोलावाले नसल्यामुळे बर्याचजणांना हा मार्ग माहित नाही.
गौ मुखी गंगेच्या उजव्या बाजूने पर्वत चढायला लागल्यावर पाच हजार पायर्यांवर "अबाजी टुंक" येते. देवी पार्वतीने अंबामातेच्या रूपात गिरनार पर्वतावर वास केला म्हणुन हे मंदिर असल्याचे सांगितले आहे. या मंदिराचा देवी अंबामातेच्या सन्मुख असलेला दरवाजा कायम बंद असतो. होळी पौर्णिमा अथवा नवरात्रीलाच तो उघडतात. हे स्थान बहुतेक भाविकांचे आकर्षण आहे. येथून पुढे पाचशे पायर्या चढल्यावर श्री गोरक्षनाथ टुंक हे स्थान येते. गिरनार पर्वतवरील सर्वांत उंच शिखरावर हे स्थान आहे. समुद्र सपाटीपासून ३,६६६ फुटावर हे स्थान येते .
नवनाथ संप्रदायातील श्री गोरक्षनाथांनी येथे तपश्र्चर्या केली आणि आजही गुप्त रूपाने त्यांचा येथे वावर आहे अशी भाविकांची धारणा आहे बाजूलाच गुरु गोरक्षनाथांची धुनी आहे व याच स्थानावर गुरु गोरक्षनाथांनी सिध्दांना उपदेश केला. बाजूलाच नवनाथानां गुरु दत्तात्रेयानी यांचा ठिकाणी गुरु मंत्र दिला होता.
बाजूलाच एक पाप पुण्याची खिडकी ( बारी ) आहे म्हणजे एक छोटा बोगदा आहे. एका बाजूने त्यात आत शिरायचे व दुसर्या बाजूने सरपटत बाहेर पडायचे. या स्थानावर गेली बारा वर्षे मंदिराची व्यवस्था बघणार्या मंहत सोमनाथ यांचा दत्त संप्रदायातील " सेवा" या शब्दावर नितांत विश्वास आहे. इतक्या दुर्गम स्थानावर एकटे राहाणे, तपश्र्चर्या करणे हे येर्यागबाळयाचे काम नव्हे.
गोरक्ष टुंक नतंर यात्रेकरूंना थोडासा दिलासा मिळतो. कारण पुढच्या शिखरावर जाण्यासाठी हजार ते पंधराशे पायर्या उतरायला लागतात. श्री गिरनारी बापूंची गुंफा लगते .येथे भैरवनाथाचे मंदिर आहेत. जे भक्त इथे नतमस्तक होतात त्यांना श्री गिरनारी बापू प्रसाद म्हणून ज्याच्या-त्याच्या योग्यतेनुसार रूद्राक्ष देतात. थोडे अंतर पुढे गेल्यावर दोन मोठ्या कमानी लागतात. उजव्या बाजूच्या कमानीतून सुमारे 300 पायर्या उतरल्यावर श्री कमंडलू स्थान आहे. डाव्या बाजूच्या कमानीतून पुढे समोर हजार पायर्या चढल्यावर दत टुंक आहे.
चरण पादुका उमटलेल्या या शिखरावर चढताना थंडी वारा पाऊस यांचा अनुभव वेगळाच असतो. यांच स्थानवर बसून भगवान दत्तात्रयांनी बारा हजार वर्षे तपश्चर्या केली आणि तेथून ते अंतर्धान पावले असा समज सर्व दत्त भक्तां मध्ये आहे.
दहा बाय बारा चौ फूट जागेमध्ये दत्तात्रेयांच्या पादुका, एक सुबक मूर्ती, एक पुजारी बसू शकेल एवढीच जागा आहे. येथे एक प्राचीन घंटा आहे. ती घंटा तीन वेळा आपल्या पुर्वजाची नावे एकेक करून घेत वाजवल्यावर सर्व पितरे मुक्त होतात. इथून पुढे जायचा कुठलाही रस्ता नसल्यामुळे परत आलो त्या वाटेवरून खाली कमंडलू स्थानापाशी जावे लागते. भगवान दत्तात्रेयाची सगुण उपासना करताना चरण पादुकांची उपासना सर्वश्रेष्ठ मानली जाते. तसेच आकाशातील चांदण्याचे अवलोकन करणे हाही काही सांधकांचा दत्त उपासनेचा भाग असल्यामुळे या स्थानावरून पहाटेच्या अथवा रात्रीच्या वेळी जे अवकाशाचे विहंगम दृश्य दिसते ते येथे येऊनच अनुभवावे.
पावसाळ्यात तर येथील अनुभवाचे शब्दात वर्णन करणेच अशक्य आहे. ढग सुध्दा या शिखरा पासून खाली असतात.
उतरताना परत त्या दोन कमानीशी आल्यावर कमंडलू स्थानकडे जायला 300 पाय-या उतरायला लागतात. इथे पाच हजार वर्षे पासून असलेली चेतन धुनी आहे. दर सोमवारी पहाटे सहा ते आठ या वेळातही "धुनी" प्रज्ज्वलित करण्यासाठी उघडतात. त्यात भरपूर लाकडे घालतात. येथील "भस्म" प्रसाद म्हणून भाविकांना दिले जाते.
भगवान दत्तात्रेय ध्यानात अनेक वर्षे दत्त टुंकवर बसलेले असताना देवी अनुसूया मातेने त्यांना भानावर येण्यासाठी हाक मारली तेव्हा भगवान दत्तात्रयांचे कमंडलू खाली पडले. एक भाग एकीकडे व दुसरा भाग दुसरीकडे असे त्याचे विभाजन झाले. एक ठिकाणी अग्नी ( जिथे धुनी आहे) प्रकटला तर दुसर्या स्थानावर जल निर्माण झाले. तेच हे कमंडलू स्थान आहे.
श्री गुरूदेव दत्त दत्त
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
अध्यात्म-विज्ञाना'नुसार आपल्या मनाचं सामर्थ्य इतकं आहे, की ते आपल्या जीवनाचा उद्धार जसं करू शकतं, तसंच ते आपलं जीवन उद्ध्वस्त देखील करू शकतं. याचाच अर्थ, आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा, की आपलं जीवन उद्ध्वस्त करून घ्यायचं, हे पूर्णपणे आपल्यावरच अवलंबून आहे. या सामर्थ्याची आपल्याला जाणीव नसल्याकारणाने एखादी प्रतिकूल परिस्थिती उद्भवताच आपण खचून जातो. 'मला हे जमणार नाही' असा विचार मनात घर करू लागतो. अशाच एका बिकट प्रसंगात, एका साधकाला स्वामींनी दृष्टांत देऊन जो संदेश दिला होता, तो आपल्या सर्वांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे. तो संदेश असा होता, की "प्रसंगांना सामोरे जाणं, तुझं काम आहे. तुझ्या मागे उभं राहणं, माझं काम आहे".
प्राप्त परिस्थिती पाहून ज्या ज्या वेळी आपल्या मनात विचार येईल, की 'मला हे जमणार नाही', त्या त्या वेळी हे वचन जर आपल्याला आठवलं, तर आपल्या 'मागे कोण आहे' ह्याची आपल्याला जाणीव होईल आणि त्या प्राप्त परिस्थितीला सामोरे जाण्याचं धैर्य आणि बळ निश्चितच आपल्यात आल्याशिवाय राहणार नाही. 'स्वामी कवच' यात नेमकं हेच तर सांगितलं गेलंय. नाही का ? त्यातही सांगितलं गेलंय, की "निःशंक होई रे मना, निर्भय होईल रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना" अशी ही असाधारण शक्ती पाठीशी असता, 'मला हे जमणार नाही' असा विचार येणं याचा अर्थ, त्या शक्तीचा पूर्णपणे विसर पडणं हाच होते.
आपली श्रद्धा अशी कमी पडता कामा नये. तर यापुढे आपण सर्वांनीच, 'आपण केवळ कर्ता आहोत आणि करविता आपल्या पाठीशी भक्कम उभा आहे' याची कायम जाणीव ठेवून 'मला हे जमणार नाही' हे वाक्य कायमचं विसरून जाऊया.
अध्यात्म-विज्ञाना'नुसार आपल्या मनाचं सामर्थ्य इतकं आहे, की ते आपल्या जीवनाचा उद्धार जसं करू शकतं, तसंच ते आपलं जीवन उद्ध्वस्त देखील करू शकतं. याचाच अर्थ, आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा, की आपलं जीवन उद्ध्वस्त करून घ्यायचं, हे पूर्णपणे आपल्यावरच अवलंबून आहे. या सामर्थ्याची आपल्याला जाणीव नसल्याकारणाने एखादी प्रतिकूल परिस्थिती उद्भवताच आपण खचून जातो. 'मला हे जमणार नाही' असा विचार मनात घर करू लागतो. अशाच एका बिकट प्रसंगात, एका साधकाला स्वामींनी दृष्टांत देऊन जो संदेश दिला होता, तो आपल्या सर्वांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे. तो संदेश असा होता, की "प्रसंगांना सामोरे जाणं, तुझं काम आहे. तुझ्या मागे उभं राहणं, माझं काम आहे".
प्राप्त परिस्थिती पाहून ज्या ज्या वेळी आपल्या मनात विचार येईल, की 'मला हे जमणार नाही', त्या त्या वेळी हे वचन जर आपल्याला आठवलं, तर आपल्या 'मागे कोण आहे' ह्याची आपल्याला जाणीव होईल आणि त्या प्राप्त परिस्थितीला सामोरे जाण्याचं धैर्य आणि बळ निश्चितच आपल्यात आल्याशिवाय राहणार नाही. 'स्वामी कवच' यात नेमकं हेच तर सांगितलं गेलंय. नाही का ? त्यातही सांगितलं गेलंय, की "निःशंक होई रे मना, निर्भय होईल रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना" अशी ही असाधारण शक्ती पाठीशी असता, 'मला हे जमणार नाही' असा विचार येणं याचा अर्थ, त्या शक्तीचा पूर्णपणे विसर पडणं हाच होते.
आपली श्रद्धा अशी कमी पडता कामा नये. तर यापुढे आपण सर्वांनीच, 'आपण केवळ कर्ता आहोत आणि करविता आपल्या पाठीशी भक्कम उभा आहे' याची कायम जाणीव ठेवून 'मला हे जमणार नाही' हे वाक्य कायमचं विसरून जाऊया.
निवडणूकीचा मोसम सुरू झाला आहे. सर्वच पक्ष आपापले जाहीरनामे, वचननामे नागरीकांसाठी जाहीर करत आहेत. या सर्व ‘नाम्यां’त पक्ष काय करू इच्छितो हेच जाहीर केलेलं असतं.
विश्वास नांगरे पाटील म्हणतात,
परवा मी सैराट पाहीला . सिनेमा बद्दल मला काहीच बोलायचे नाही . मराठी सिनेमाने ६०-७० कोटीचा धंदा केला म्हणजे आनंद आहे . म्हणतात, आज काल मराठी जनमानसावर या सिनेमाचा पगडा आहे . नक्कीच असेल . नाशिक-पुणे हायवेवर संगमनेर जवळच्या चहाच्या टपरीवर एक पंचविशीतला तरुण दुसऱ्याला सांगत होता की , "मागच्या आठवड्यात त्याला मुलगा झाला आणि त्याचा छोटा परश्या मोठा झाल्यावर नक्कीच सैराट सारखी आर्ची शोधणार ." चहा कडवट लागला .
नुकताच UPSC या देश पातळीवरच्या अत्यंत अवघड परीक्षेचा निकाल लागला. ६३ टक्के बिहारी विद्यार्थी पास झाली . महाराष्ट्राचा टक्का माहीत नाही पण किरकोळ असणार , मराठी टक्का बहुदा नगण्य. याच परीक्षेतून IAS , IFS , IPS म्हणजे प्रशासानातले बडे अधिकारी तयार होणार . बिहारी , UP वाल्यांना मनसोक्त शिव्या घाला पण लई कष्ट , जिद्द , हुशारी लागते इथे . काय बोलणार ? पुढे मोठे होऊन विना शिक्षण आणि विना अक्कल लाचार झालेले गावा - गावातले मराठी पर्शे , अर्च्या आणि आत्ता टेचात असणारे त्यांचे आई -बाप या बिहारींच्या आगे मागे नोकरीसाठी खेपा घालणार. आपले पुढारी मराठी - बिहारी वाद घालून मते मिळवणार.
सैराट करमणूक म्हणून पहा पण आदर्श UPSC पास झालेल्या या बिहारी पोरांचा ठेवा .
योग्य वयात योग्य गोष्टी करा. उगीच फुकाच्या सैराट करमणुकी मागे लागून आयुष्य वैराण नको .
केंद्रिय लोकसेवा आयोग (UPSC) च्या परीक्षेत 1757 पैकी एकट्या बिहारमधील 1123 उत्तीर्ण झाले.
आणि आम्ही काय पाहतोय तर, सैराट...!!!
मराठी किती संपन्न भाषा आहे पहा. एका स्पर्धा परीक्षेतील प्रश्न :
"दिलके टुकडे टुकडे करके मुस्कराके चल दिए"
या वाक्याचं आपल्या मातृभाषेत भाषांतर करा.
वेगवेगळ्या सेंटरवरील विद्यार्थ्यांची नमुनेदार उत्तरे..,
विद्यार्थी-१ (पुणे)
ह्रदयाचे तुकडे तुकडे करुन गालावर खळीसह चालती झाली...
विद्यार्थी-२ (नाशिक)
ह्रदयाची खांडोळी खांडोळी करून स्मितहास्य करत निघून गेली टवळी...!
विद्यार्थी ३ (मुंबई)
दिल ब्रेक करुन वर नुस्ती एक स्माईली सेंड करुन परतीची लोकल पकडलीस...!
विद्यार्थी-४ (अकोला)
मनाचा बुकना बुकना करून दात ईचकुन निंगुन गेली
विद्यार्थी-५ (अमरावती)
कलिजाचे मार कुटके कुटके केले माह्या, अन दातकाड काहाडत कुठं चाल्ली वं !
विद्यार्थी-६ (यवतमाळ)
निरे तुकळे केलेना हिर्दयाचे, न वरुन जाता जाता बत्तिशी दाखुन राह्यली..आं !!
विद्यार्थी-७ (वाशिम)
कायजाच्या पार चिंध्या करून टाकल्या माहया, अन हेंबाडथुत्री दातकड विचकत जाऊन राहाली भैताड़ लेकाची
विद्यार्थी-८ (बुलढाना)
लांग चिथडे करुन माया कायजाचे वरुन लय दातं इचकून रहाली तु तं.. आन चाल्लि लगे..
विद्यार्थी ९ (वर्धा)
बाप्पा !! पार चिटोरे चिटोरे केले पोट्टिन कायजाचे अन बगा कशी जाऊन रायली फिदिफिदी हासंत
विद्यार्थी १० (नागपूर)
दिलची बोटी बोटी करुन गालात हासत हासत च्याल्ली न बे ...
विद्यार्थी ११ (धुळे)
काळीज ना तुकडा तुकडा करी सन गाल गाल मा हसी सन तरफडली बेरड !
विद्यार्थी १२(लातूर) :
आरं बाबो, अगुदर तर काळजाची पार वाट लावली ! वरनं माज्याकड बगुन दाताड इचकत निगुन गेली, च्या मायला...!
विद्यार्थी १३ (मालवण) :
मेली अवदीसा नायथयली...,
तेचा त्वांडार शिरापडली ती...,
तेच्या आवशिक खाली कोल्यान...,
माझा काळीज नांगरुन.., खिदळत - खिदळत वाटेक लागला ता अक्कर माशी प्वार...!!!
विद्यार्थी १४ ( चिपळूण ) :
जल्ला कनाखाली जालपोल केलीव नी कालजाचं पानी पलवलनं नं तीनं ...आनी फारकन पलाली
जेवणानंतर लगेच झोपल्याने कफ वाढतो. कफ वाढतो, म्हणजे खोकल्यातून बाहेर येतो तो कफ नव्हे हो! हे एव्हाना आपल्या लक्षात आलं असेलच !
हा कफ म्हणजे विकृतरीत्या वाढलेला कफ दोष. जो प्रमेहाचे मुख्य कारण आहे. मधुमेह हा ज्याचा एक उपप्रकार आहे, त्याला प्रमेह म्हणतात.
ग्रीष्म ऋतु सोडला तर दुपारची झोप वर्ज्य सांगितली आहे. ग्रीष्मात बाहेर उष्णता खूप असते. अग्नि वाढलेला असतो. त्यामुळे दुपारच्या झोपेने वाढणारा कफ कमी व्हायला मदत होते. पण ही झोप आडवे राहून घ्यायची नाही. तर बसल्या बसल्या डुलकी या स्वरूपाची असावी. आणि लवंडताना डाव्या कुशीवर असावे. यालाच वामकुक्षी असे म्हणतात.
वाम म्हणजे डावी बाजू. डाव्या बाजुला लवंडून झोपल्याने डावी नाडी, चंद्र नाडी बंद होते. आणि उजवी सूर्यनाडी सुरू होते. सूर्य म्हणजे अग्नि. उजवी नाडी म्हणजे योग शास्त्रानुसार पचन प्रक्रिया वाढवणारी, सुधारणारी नाडी. वामकुक्षीचा हा फायदा होतो.
पोटात या डाव्या बाजूलाच आमाशय असते. त्याच्याखाली ग्रहणी नावाचा अवयव असतो.या ग्रहणी अवयवामधेच पचनाचे म्हणजे अग्निचे काम सुरू असते. आपण आपल्याला जसे हवे तसे खात असतो, ग्रहणी या खाल्लेल्या अन्नाला, त्याला हवे तसे रूपांतरीत करीत असते.
आणि आमाशयाच्या वरच्या बाजुला ह्रदय असते. म्हणजे ही रचना जणुकाही खाली चुल, वर पातेले अशी असते. अग्नि व्यवस्थित असेल तर रूपांतरण नीट होत असते. चुल नीट पेटली असेल तरच अग्नि चांगला प्रज्वलीत असतो.
जेवल्यानंतर लगेचच झोपल्याने ही चुल थंड होते आणि पचन मंदावते. म्हणून जेवणानंतर झोपू नये.
मग आमच्या दुपारच्या झोपेचं काय ?
त्याला एक पळवाट सांगतो. जेवणानंतर झोपू नये हा नियम झाला. पण ज्यांना झोप अनावरच होत नाही किंवा रात्रौचे जागरण करावेच लागते, अशा महाशयांनी जेवणापूर्वी झोप घ्यायला काही हरकत नाही. झोपून उठावे आणि जेवून परत कामाला लागावे.
पण
हे केवळ नियमाला अपवाद म्हणून.
अपवाद हा नियम होऊ नये !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
06.02.2017
प्रमेहामधे नुसता जिभेवर संयम ठेवून चालत नाही. झोपेवर पण संयम ठेवावा लागतो. आपल्या मूळ श्लोकातील आस्यासुख शब्दानंतरचा दुसरा शब्द स्वप्नसुख.
स्वप्न या शब्दाचा अर्थ निद्रा, झोप. नेहेमीची शांत झोप लागणे वेगळे आणि लोळतलोळत पडणे वेगळे!
नेहेमीची शांत झोप आवश्यकच आहे. आरोग्याच्या प्रमुख घटकामधे ती आहार आणि ब्रह्मचर्याबरोबर स्विकृत झालेली आहे.
झोप अशी हवी की, तिला अन्य गोळी, अभ्यास, अंथरूण पांघरूण, उशी, अंगाई, कोणाचीही गरज नसावी. पडल्या पडल्या ती आली पाहिजे. दिवसभर एवढे श्रम व्हावेत, की कधी एकदा आडवे टेकतोय असे व्हावे, आणि पाठ टेकताक्षणी ती प्रसन्न व्हावी. जसं झोपून उठून मलविसर्जनाला गेल्यावर पाच मिनीटात परत बाहेर यावेसे वाटले पाहिजे. आणि झोप पूर्ण झाल्यावर आणखी थोडावेळ झोपूया, असे न वाटणे म्हणजे झोप पूर्ण होणे. मुख्य म्हणजे या झोपेचे समाधान मिळाले पाहिजे.
झोपेचा आणखी हव्यास वाटू लागणे म्हणजे प्रमेहाकडे वाटचाल सुरू होणे.
अर्थात हे लहान मस्तीखोर मुले जी दिवसभर फक्त धावपळच करतात आणि झोपतात, त्यांच्यासाठी नाही सांगितलेले !
ज्यांची झोप पूर्ण झालेली आहे आणि ज्यांना नुसते अंथरुणात लोळत पडायला आवडते, त्यांना थोडे लवकर अंथरूणातून उठून बाहेर पडायला हवे. ही जास्तीची झोप शरीरातील कफ दोष वाढवते.
दोषांची प्राकृत कर्मे ही शरीरात होतच असतात पण या प्राकृत कामापेक्षा, गरज नसताना, आणखी जास्त कार्य घडून येणे म्हणजे प्रकोप होणे आणि गरजेपेक्षा काम कमी होणे हा दोषांचा क्षय मानावा. अतिरिक्त झोपेमुळे सुस्ती, येते. शरीर आळसावते. पचन मंदावते. अग्नि कमी होतो.
आपण कसं रात्री झोपताना खोलीतील मोठा बल्ब कमी करून झिरोचा बल्ब सुरू ठेवतो, तसेच झोपल्यावर शरीरातील अग्निदेखील कमी केला जातो. म्हणूनतर झोपेपूर्वी पचन पूर्ण होऊन मगच झोपणे अपेक्षित आहे. म्हणून कामा निमित्त (वा असेच वाॅटसपसाठी) जागरण करणाऱ्या मंडळींना पचनाच्या विकृतींना सामोरे जावे लागते. पचनाचा आणि झोपेचा, झोपेचा आणि अग्नीचा खूप जवळचा संबंध आहे.
अग्नि कमी झाला की स्थित्यंतर, बदल होणे कमी होते. स्थिरता येते. मेद वाढतो. जाडी वाढते. म्हणजेच प्रमेहाकडे वाटचाल सुरू होते.
हे निरीक्षण फक्त आयुर्वेदात वर्णन केले आहे. ऋषींची ही दृष्टी आपल्याला आत्मसात होणे अपेक्षित आहे.
मी या स्वप्नसुखमचा आणखी एक शब्दशः अर्थ लावतो, तो म्हणजे झोपेत स्वप्नातदेखील सुख बघणे. झोपेतदेखील सुखाचाच विचार करणारी स्वप्ने बघणे म्हणजे स्वप्नसुख.
काही जणांना वाईट स्वप्न पडतात ते किंचाळत ओरडत उठतात, दुसऱ्यांची झोपमोड करतात. काही जणांना ही स्वप्ने आठवतात, तर काहींना अजिबात आठवत नाहीत. ही वाताची स्वप्ने.
काहींना आपल्याला स्वप्न पडले होते एवढे आठवते, भानावर येतात आणि खुदकन हसतात आणि लगेचच परत झोपतात.ही स्वप्ने त्यांच्या लक्षात राहातात, ही पित्ताची स्वप्नप्रकृती.
तर काहीजण या स्वप्ननगरीतून बाहेरच पडत नाहीत. जागे झाले तरी याच स्वप्नधुंदीत राहातात. झोपेतच हसतात, बोलतात, चालतात सुद्धा. पण भान नसते की आपण अजून झोपेतच स्वप्न बघत आहोत. पूर्ण भानावर येतात, तेव्हा जाग येऊन पुनः झोपतात. ही कफाच्या स्वप्नाची दुनिया असते.
आणखीन एक झोप ही फक्त रात्रीच घ्यायची असते. दिवसाचे झोपणे हे शंभर टक्के वर्ज्य.
वामकुक्षी वेगळी. आणि भरपेट जेवून, पंखा किंवा एसी लावून अंथरूण घालून, डोक्यावरून पांघरूण घेऊन, 'चला आता मस्त झोपतो', असे म्हणत जे झोपणार, त्यांचा सोबतीला प्रमेह नक्की येणार.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
05.02.2017
पाकिस्तानने आपल्याविरुद्ध पुकारलेल्या छुप्या युद्धाचा आणखी एक प्रकार नेपाळमध्ये पकडलेल्या आयएसआय एजंटाकडून समोर आलेला आहे. देशाविषयीची संवेदनशील माहिती शत्रूपर्यंत जायला नको (सिक्युरिटी ऑफ इन्फर्मेशन), नागरिकांना दुष्कृत्य करण्यास प्रवृत्त करणे (सबव्हर्शन) आणि राष्ट्रीय मालमत्तेचे नुकसान (सॅबोटाज) या तीन पातळ्यांवर पाकिस्तानी आयएसआय सध्या आपल्या देशाला धोका पोहोचवत आहे.
जम्मू-काश्मीरमधील गुरेज सेक्टर येथे झालेल्या हिमस्खलनात 15 जवान हुतात्मा झाले असून, महाराष्ट्रातील तीन जवानांचा यामध्ये समावेश आहे. अकोल्याचे आनंद गवई, संजय खंडारे व बीडचे विकास समुद्रे हे जवान हिमस्खलनात हुतात्मा झाले आहेत.जम्मू-काश्मीरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti