(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • संगीतोपचार एक स्वास्थ्यवर्धक उपाय !

    आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आभासी ध्येयांच्या मागे उर फुटेपर्यंत धावताना नको नको ते आजार, व्याधी शरीराला विळखा घालत आहेत, त्यावर बर्याचदा औषधांच्या मात्राही काम करीत नाहीत. संगीतात असणार्या अनोख्या संमोहन शक्तीमुळे सध्या रोगांवर पूरक उपचार म्हणून संगीतोपचार लोकप्रिय होत आहे.

    संगीतं श्रवणामृतं !

    संगीत हे नेहमीच आनंद देणारं, मनःशांती मिळवून देणारं असत. कोणतही काम करीत असताना एकीकडे गाण चालू असलं कि काम चुटकीसरशी संपत. कामाचा शीण तेव्हढासा जाणवत नाही. सकाळच्या वेळी फिरायला जाताना कानात इयर-प्लग्ज घालून गाण ऐकत गाण्याच्या ह्रिदमबरोबर भराभर चालणारे लोक आजकाल खूप दिसतात. जिममध्ये तालबद्ध गाण्यांच्या साथीने सगळे वर्कआऊट्स होत असतात. वशपींळीं च्या खुर्चीत मोठ्ठा ‘आ’ करून, तोंड बधीर करून बसलेले असताना आणि तिथून कधी एकदा सुटका होतेय त्या क्षणासाठी अधीर झालेले असताना जर का लरलज्ञर्सीपव मध्ये मंद, सुखद वाद्यसंगीत वाजत असलं तर आपलं लक्ष दुखण्यापासून थोडं दूर हटत. अंगाई गीताच्या सुरांनी चुळबुळ करणारी छोटी बाळ चट्कन झोपेच्या आधीन होतात.

    संगीत हे मनाला, चित्तवृत्तींना शांत करत हे तर सर्वश्रुत आहे. पण संगीताचा उपयोग रोगनिवारणासाठीदेखील करता येतो याबद्दल मात्र अजून फारशी कुणाला माहिती नाही. आपल्या वेदांपैकी सामवेदात संगीताबद्दल विस्तृत माहिती आहे. संगीत हे आयुर्वेदाचा देखील खूप जुना भाग आहे.

    भारतीय शास्त्रीय संगीतात राग-समय चक्राची संकल्पना फार महत्वाची मानली जाते. त्या नुसार दिवसाच्या प्रहराप्रमाणे राग गायले जातात. जसे सकाळी गायचे राग म्हणजे भैरवचे प्रकार, तोडीचे प्रकार इ. दुपारी सारंगचे प्रकार, पटदीप, भीमपलास इ. संध्याकाळच्या रागामध्ये भूप, कामोद, यमनकल्याण वगैरे आणि रात्रीच्या रागामध्ये बागेश्री,मालकौंस, भिन्न षड्ज इ. रागाचा समावेश होतो.

    आयुर्वेदात त्रिदोष म्हणजे कफ,पित्त आणि वात ही संकल्पना आहे. हे त्रिदोष आपल्या शरीरात असतात. त्यांचं प्रमाण हे व्यक्तीपरत्वे भिन्न असत. या दोषांच प्रमाण हे नेहमी संतुलित असावं लागत. कोणताही एक दोष वाढला की आजार येतो. या दोषांच्या वेळा ठरलेल्या असतात. दिवसभरात दोन चक्रात त्या वेळा विभागलेल्या असतात. म्हणजे सकाळी 6 ते 10 कफाच प्रमाण जास्त असत. 10 ते 12 पित्त आणि 2 ते 6 वात. दुसर्‍या सायकलमध्ये 6 ते 10 कफ, 10 ते 2 पित्त आणि 2 ते 6 वात.

    ज्या वेळेला त्रिदोषांपैकी जो दोष वाढलेला असतो त्यानुसार रागाची निवड केली जाते (अर्थात तो राग त्या वेळी गायचा राग असतो). मात्र त्यात थोडा बदल करावा लागतो. म्हणजे एखाद्या स्वराची षीशािंrऊशपलू किंवा शपशीसू वाढवून तो राग गायला किंवा वाजविला गेला तर रोग निवारण होण्यास मदत होते. राग विशिष्ट पद्धतीने वाजविला किंवा गायला तरच त्याचा परिणाम होतो एरवी त्याने नुसते मनोरंजन होते. शारंगदेवाच्या ‘संगीत-रत्नाकर’ या ग्रंथात याविषयीचे श्लोक आहेत. त्रिदोषांपैकी प्रत्येक दोषाचे पाच प्रकार आहेत आणि ते शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. त्या नुसार राग बांधलेले आहेत.

    आधुनिक वैद्यक शास्त्रात आता संगीतात असलेल्या रोगनिवारक शक्ती (हिलिंग पॉवर) बद्दल नवीन शोध लागत आहेत. संगीताच्या माध्यमा तून उपचार करण्यासाठी आपल्या शरीरातल्या पेशींना कंपनाच्या साह्याने सचेत केलं जात. या कंपनामुळे रोग्याच्या जाणीवेवर (लेपीलर्ळीपशी) परिणाम होतो व त्याला आरोग्याचा लाभ होतो. त्या साठी रोगाचं अचूक निदान करून त्याला ऐकवण्यासाठी नेमक्या रागाची निवड करून तो किती वेळ आणि कोणत्या समयी ऐकायचा हे ठरवावं लागत.

    चेन्नईतील राग रिसर्च सेंटर सध्या भारतीय राग आणि त्यांचा रोग- निवारणासाठी कसा उपयोग करून घेता येईल याबद्दल अभ्यास आणि संशोधन करीत आहे. या साठी संगीतज्ञ, डॉक्टर्स, मानसोपचारतज्ञ यांची एक टीम काम करते आहे.

    मुंबईत प्रसिद्ध सतारवादक व संगीतकार पं.शशांक कट्टी (शांक-नील फेम )यांनी गेली अनेक वर्ष या संदर्भात अभ्यास व चिंतन करून डॉक्टर्स आणि आयुर्वेदाचार्य यांच्या बरोबर काम करून स्वतःची ‘सूर-संजीवन’ या नावाची एक उपचार पद्धती विकसित केली आहे. इच्छुकांना ते या विषयीच प्रशिक्षणही देतात. रोगनिवारणासाठी विशिष्ट रागांची निवड करून ते विशिष्ट पद्धतीने वाजवून त्यांनी अनेक सीडीजची निर्मिती केली आहे.

    डोकेदुखी, पोट दुखी, संधीवात, असिडीटी, मधुमेह, कोलायटिस, यकृताचे विकार, अस्थमा, रक्तदाब, निद्रानाश, फिट्स अशा अनेक विकारावर संगीतोपचार फार उपयुक्त ठरत आहेत. अर्थात चालू असलेली ओषध पूर्णपणे बंद करून चालत नाही. पण त्यांच्या जोडीने पूरक उपाय म्हणून ह्या उपचारांचा खूप फायदा होतो. ओषधांची मात्रा कमीकमी करीत पूर्णपणे बंद करून रोग बरा होऊ शकतो. नुसत करमणूकीच साधन न रहाता आरोग्य सुधारण्यासाठी आता संगीताचा उपयोग करण्यात येतो आहे.

    आधुनिक जीवनाचा परिपाक म्हणून निरनिराळ्या प्रकारच्या व्याधी वाढीस लागल्या आहेत. अलोपथिच्या मर्यादा लक्षात आल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून सुजोक, रेकी, प्राणिक हिलिंग, इत्यादी अनेक पूरक वा पर्यायी उपचारपद्धती लोकप्रिय झाल्या आहेत. त्यांच्याच जोडीने आता येणार्या काळात संगीतोपचार पद्धती लोकप्रिय झाली तर त्यात नवल वाटायला नको.

    -- सुलोचना देवलकर
    9930657226…

    WhatsApp वरील संगीत या ग्रुपवरुन..

  • धनगरवाडा

    धनगरवाडा या मराठी चित्रपटात महाराष्ट्रातील डंगे धनगर समाजाचे जगण्याचे वास्तव दर्शविण्यात आले आहे. कथालेखक विजयकुमार दळवी यांच्या ‘धनगरवाडा’ या गाजलेल्या कादंबरीवर हा चित्रपट आधारीत आहे.

    अडीचशेहून अधिक चित्रपटांचं छायांकन केलेले ख्यातनाम सिनेमॅटोग्राफर समीर आठल्ये यांनी धनगरवाडाच्या निमित्ताने दिग्दर्शन क्षेत्रात पहिलं पाऊल टाकले आहे.

    महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील चंदगड तालुक्यातील उंच डोंगरमाथ्यावर घनदाट जंगलात वसलेल्या एका धनगरपाड्यावर या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आले. त्यामुळे चित्रपटाला लाभलेला एक वेगळाच नैसर्गिक ताजेपणा डोळ्यांना नक्कीच सुखावेल, असं समीर आठल्ये यांनी सांगितले. धनगरवाडाच्या माध्यमातून त्यांनी धनगर समाजाच्या समस्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

    ज्येष्ठ अभिनेते स्व. सदाशिव अमरापूरकर यांनी ‘झिमू’ या जातपंचायतीच्या प्रमुखाची भूमिका चित्रपटात साकारली आहे. सदाशिव अमरापुरकर यांच्यासोबत वरद विजय चव्हाण, पल्लवी पाटील, मिलिंद गवळी, गणेश यादव, माधव अभ्यंकर, सुहासिनी देशपांडे, पूजा पवार, जयवंत वाडकर आणि गणेश आगलावे यांच्या प्रमुख भूमिका आहे.

    गीतकार बाबा चव्हाण यांची मधूर गीतरचना आणि पटकथा-संवाद अनिल सपकाळ यांनी लिहिले आहेत.

    अलका कुबल-आठल्ये, शिल्पा मसुरकर प्रस्तुत आणि विजयकुमार दळवी – प्रकाश मसुरकर निर्मित धनगरवाडा

  • अफवाना वाव देऊ नका..

    नुकतीच नागोठणे येथील एक पोस्ट सोशल मिडियावर फिरतेय. अजगराने मुलीला गिळले.. अशा शिर्षकाने.....

    सोशल मीडियाचा गैरवापर म्हणतो तो हाच. कुठलीही माहिती कुठेही जोडायची आणि वायरल करायची.

    रेटिक्युलेट पायथन (जाळिदार अजगर) हा अंदमान निकोबार बेटावर आढ़ळतो .त्याची लांबी 32 फुट एवढी नोंदली आहे. एवढा मोठा अजगर माणसाला इजा पोहचवु शकतो ,पण अजून तरी तशी नोंद भारतात नाही.

    सध्या वायरल होत असलेली पोस्ट व त्यातील फोटो ज्यात माणसाचे पाय दिसत आहेत तो एका विषारी सापाचा फोटो एडिट केलाय, अजगराला विषारी सुळे (दात) नसतात.आणि जो गाडिमधे काहीतरी खाऊन आहे तो जाळीदार अजगर आहे. हे फोटो भारतातले नसून ते खुप जूने आहेत.

    आपल्या कड़े इंडियन रॉक पायथन (भारतीय अजगर) आढ़ळतो.त्याची लांबी 25 फुट एवढी नोंदली आहे.या अजगराने आता पर्यन्त माणसाला गिळल्याची नोंद नाही. कुत्रा मांजर कोंबड्या शेळ्या मेंढ्या यांच्या मागे इंडियन रॉक पायथन मनुष्य वस्तीत येण्याच्या घटना कॉमन आहेत.

    कृपा करुन आधीच बदनाम केलेल्या या असहाय जिवाना आणखी बदनाम करू नये यासाठी सर्वानी प्रामाणिक प्रयत्न करू या.

    या अशा पोस्ट या जिवाना नामशेष करण्यासाठी पुरेशा असतात. अज्ञान हे आंधळ असतं. आपण भारतीय सत्य जाणुन घेण्या ऐवजी अंधानुकरण करण्यात पुढे आहोत.
    -- FON फ्रेंड्स ऑफ़ नेचर ,चिरनेर
    उरण-रायगड

  • वेश्या व राजकारणी

    दिवसेंदिवस घसरत चाललेली राजकारणाची पातळी मला मुंबईच्या कामाठीपूरा, फोरास रोड, पिला हाऊस या परिसरातील ‘वेश्या’ बाजाराची याद दिलवते..फरक एकच, या परिसरात बसलेल्या वेश्या बऱ्याचश्या बळजबरीने व काही पोटाची खळगी भरण्यासाठी नाईलाजाने या व्यवसासात आलेल्या असतात.

  • श्रीगुरुचरित्राचं लेखनस्थान : कडगंची

    श्रीदत्तात्रेयांच्या भक्तांसाठी वेदसम असलेल्या श्रीगुरुचरित्राचं लेखनस्थळ..

  • श्रीगुरुचरित्राचं लेखनस्थान : कडगंची

    श्रीदत्तात्रेयांच्या भक्तांसाठी वेदसम असलेल्या श्रीगुरुचरित्राचं लेखनस्थळ..

  • महाविद्यालयीन युवतींचे शिक्षण; वास्तव अन् अपेक्षा

    गावखेड्यातील मुलं शाळेत येतात. शिक्षण घेतात. तसेच महाविद्यालयातही प्रवेश घेतात. मात्र ग्रामीण भागात शिक्षण घेण्यास आजही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शिक्षणाच्या सोयी अत्यल्प असतात. घरची परिस्थिती नाजूक असते. कृषी संस्कृतीशी निगडित व्यवसाय असतो. घरचे संस्कार त्यांच्यासोबत असतात. गावचे रीतिरिवाज, रूढी, परंपरा यांचा पगडा मनावर असतो. शिक्षण ही संकल्पना जसजशी प्रगल्भ होऊ पाहते, तितकीच ती कठीण होत जाते. मुलं मोठी झाली की, पालकांना त्यांची जबाबदारी वाढल्याचे जाणवते. किंबहुना ते आपल्या पाल्याचे पालनपोषणाचे ओझे डोक्यावर घेऊन हिंडताना दिसतात. तत्कालीन परिस्थितीत ते योग्यच असते. तसेच साहजिकही आहे. दहावीनंतर शिक्षणाचा अनेक शाखांमध्ये विस्तार होतो. ती शाखा विद्यार्थ्यास त्याच्या आवडीनिवडीप्रमाणो मिळेलच असे नाही.

    मुलींच्या त्यातही विशेषत: ग्रामीण भागातील मुलींच्या बाबतीत तर अनेक समस्या आहेत. महाविद्यालयीन शिक्षणात मुलींचे प्रमाण खूप कमी आहे. पालकांनी करून घेतलेला गैरसमज. गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी नसणो. शिक्षणाची सुविधा नसणो. आपल्या मुली सुरक्षित नाहीत ही पालकांना भेडसावणारी अनाठायी चिंता. आर्थिक दुर्बलता. महाविद्यालयात जाण्यासाठी वाहनांची सोय नसते. मुलगी हे परक्याचे धन आहे ही मानसिकता. समाजातील अंधश्रद्धा, अज्ञान, अडाणीपणा ही काही प्रमुख कारणो त्यामागे आहेत. आजही तिला सन्मानाची वागणूक देण्यास समाज कचरतो.

    दूरचित्रवाहिन्यांवरील विविध मालिका, चित्रपट यातून जे अवास्तव दर्शन घडविले जाते. जे विकृतीकरण करतात, ते वर्तमान सामाजिक परिस्थितीशी साधर्म्य असतेच असे नाही. रक्षण करणार्‍या यंत्रणांवर असणारी विश्‍वासार्हता. रक्षण करणारी आणि न्याय देणारी यंत्रणा हे कितपत तिच्या रक्षणासाठी सजग राहतील, यावर हे अवलंबून असते. महाविद्यालये शिक्षण देण्यासाठी कितपत सोयी उपलब्ध करून देतात? हाही एक प्रश्न आहे. कारण या युवती एकतर प्रवेश घेत नाहीत आणि घेतला तर फक्त पटावर नाव असते. केवळ परीक्षेसाठी येणो जाणो असते. ती परीक्षाही कॉपीयुक्त. शिष्यवृत्ती, तडजोडी, शिक्षणाचा खर्च, संस्थाचालकांचे हित अशा अनेकविध बाबी अशा आहेत की, त्या शिक्षणातील अडथळा ठरतात. परगावहून येणार्‍या मुलींच्या अनेक समस्या आहेत. वाहनांची सुविधा अपुरी असणो. वाटेत, प्रवासादरम्यान मिळणारी वागणूक या सर्वांचा परिणाम मुलींच्या महाविद्यालयीन शिक्षणावर होतो आहे. आज महाविद्यालयात पाहिले तर तास नियमित होत असतील. परंतु काही शहरांतील मोजकी महाविद्यालये सोडली तर इतर महाविद्यालयांत मात्र मुलींचे बेंच रिकामेच असतात, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. एखाद्या वर्गात एखादी-दुसरी विद्यार्थिनी असलीच तर ती नियमित येतेच असे नाही. हा चिंतनाचा आणि चिंतेचा विषय आहे.

    मुलींच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी हमी देऊन शिक्षणसक्ती का करू नये? तसेच जन्मदर वाढविण्यापासून ते आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराची साधने उपलब्ध करून देणो. हे या व्यवस्थेचे कामच आहे. ते आवश्यक आहे. ज्या ठिकाणी मुली अधिक प्रवेश घेतात, त्याठिकाणी त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची चुणूक दाखविलेली आहे.

    महाविद्यालयीन स्पर्धा, वादविवाद, वक्तृत्व, गायन, वादन किंवा मैदानी खेळ असतील तिथे मुलीच अग्रक्रमाने पुढे असतात. एमपीएससीच्या किंवा तत्सम परीक्षेच्या निकालात पाहिले तर मुली प्राधान्यक्रमाने पुढे गेलेल्या पाहावयास मिळतील. सचोटी, प्रामाणिक प्रयत्न आणि उपजत गुणकौशल्य यांच्या बळावर अनेक यशशिखरे पादाक्रांत केलेली आहेत. हा इतिहास आहे आणि हे वर्तमानही आहे.

    महाविद्यालयाचा परिसर पाहिला तर ग्रंथालयापेक्षा चहाच्या कट्टय़ावर जास्त गर्दी असते. तेथील परिसराचे वातावरण प्रदूषित असते. व्यसनाधिन किंवा कॉलेज म्हणजे मौजमजा असा गैरसमज करून आलेले विद्यार्थी. काही फसलेले, फसवलेली युवाशक्ती पाहिली की, पालक गंभीरपणे विचार करतो. मुलींच्या बाबतीत काळजी करतो. तिथेही तिच्या शिक्षणाला गतिरोध निर्माण होतो.

    मुलींच्या वसतिगृहाच्या संदर्भात किंवा आश्रम शाळांमधील मुलींची सुरक्षितता, एकंदरीत सर्वच ठिकाणी त्यांना सुरक्षितता मिळाली तर पालकांमध्ये नक्कीच आत्मविश्‍वास वाढेल. ते मुलींना महाविद्यालयीन शिक्षण देतील. पालकांची इच्छाशक्ती असूनही ते हे शिक्षण देऊ शकत नाहीत. परिणामी देशाची प्रचंड हानी होते. भरमसाट वाढलेल्या फीस, शिकवणीचे फुटलेले पेव, त्यांच्याकडून होणारी आर्थिक फसवणूक, महाविद्यालयाची कमी असलेली संख्या या बाबी घातक आहेत.तसेच महाविद्यालयीन शिक्षणाचा बाऊ करू नये. सोप्या पध्दतीने शिक्षण दिले जावे. कॉपीमुक्तीही गरजेची आहे. परीक्षा पध्दतीही सदोष असते. अशा सर्व बाबींचा कमी अधिक परिणाम मुलींच्या शिक्षणावर होतो.शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि मानसिक पिळवणूक थांबवून समानतेने त्यांना शिकविले तर मुलींचा आत्मविश्‍वास नक्कीच वाढेल. रथाची दोन्ही चाके मजबूत आणि भक्कम असतील तेव्हाच रथ व्यवस्थित चालू शकेल. म्हणून महाविद्यालयीन युवतींचे शिक्षण हे भयमुक्त, भेदभावविरहित विश्‍वासपूर्ण, सौहार्दपूर्ण वातावरणात व्हायला हवे.

    -- विठ्ठल जाधव
    शिरूरकासार जि.बीड
    मो.9421442995
    ( पुण्यनगरी मध्ये पूर्वप्रकाशित)

  • व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने

    ख्रिस्ती वर्चस्व वाढण्याच्या काळात हीदन आणि पेगन (मूर्तिपूजक आणि निसर्गपूजक) लोकांना हालहाल करून ठार करण्यात आले वा बाटविण्यात आले. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात रोमन साम्राज्यात ख्रिस्ती वर्चस्व वाढू लागले. त्या काळात क्लॉडियस दुसरा हा राजा होता. रोमन साम्राज्यात गृहयुद्धे व बाहेरील आक्रमणे चालू होती. नित्य युद्धमान असलेल्या त्या देशाला तरुणांची सैन्यात भरती होण्याची आवश्यकता वाटू लागली. प्रेम आणि लग्न या दोन गोष्टी यात बाधा आणू शकतात असा विचार करून राजाने लग्नांवर काही काळ बंदी घातली. राजाविरुद्ध जनमत एकवटावे म्हणून व्हॅलेंटाईन आणि मेरियस यांनी पुढाकार घेऊन बंदी झुगारून लग्ने लावण्याचा धडाका लावला. हे दोघेही ख्रिस्ती धर्मप्रचारक होते. त्यांचे कृत्य म्हणजे राजद्रोह होता. राजाने त्यांना पकडले. शिरच्छेदाची शिक्षा सुनावली असूनही या व्हॅलेंटाईनने तुरुंगातही प्रेम केले. त्याने तुरुंगाधिकार्याच्या मुलीला आपल्या नादी लावले. मरणापूर्वी लिहिलेल्या पत्राखाली त्याने म्हणे 'लव्ह फ्रॉम युवर व्हॅलेंटाईन' असे लिहिले होते. १४ फेब्रुवारी २७० मध्ये त्याचा शिरच्छेद करण्यात आला. हा दिवसही नक्की नाही. तो जाणीवपूर्वक पेरण्यात आला, कारण हा दिवस म्हणजे रोमन देव-देवतांच्या ज्युनो नामक राणीचा गौरव दिवस होय. तोच या आक्रमकांनी 'व्हॅलेंटाईन डे' ठरवून पुढे रोमन मूर्तींचा विध्वंस केला. राजद्रोह करणाऱ्याच्या नावाने आपण हा दिवस साजरा करावा काय? पाश्चात्यांच्या वैचारिक आक्रमणामुळे असे 'दिवस' साजरे करण्याचे फॅड आपल्याकडे बोकाळले आहे.

    त्यातूनही महाविद्यालयीन जीवनात गम्मत म्हणून 'प्रेमदिवस' साजरा करायचा असेल तर 'रुक्मिणी डे' साजरा करा. माघ शु.दशमीला श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाह दिवस असतो तेव्हा साजरा करा. जगाला ज्ञात असलेला पहिला प्रेमसंदेश रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णांना पाठवला. त्या गोष्टीला साडेपाच हजार वर्षांचा दिव्य इतिहास आहे. हे प्रेम राजद्रोह, बंडाळी वा अन्यांचे गळे घोटून केले गेले नव्हते. उदाहरणच हवे असले तर ते असे उदात्त आणि आदर्शवत हवे. रुक्मिणीने तिचा विवाह शिशुपालासमवेत ठरला आहे हे कळताच सुदेवाबरोबर संदेश धाडला. भागवतातील ५२ व्या अध्यायात श्लोक क्र.३७ ते ४३ यात तो आहे. सामराजाने यावर 'रुक्मिणी हरण'ही पद्यरचना केली आहे. यात रुक्मिणी म्हणते-

    या कारणे नियत म्यां वरिलासे भावे|येऊनिया त्वरित मज आजि न्यावे||
    हा लागला जिव असे तुजवीण जाया|तू आपुली हरि करी मज आजि जाया||९४|| सर्ग-५

    हे संपूर्ण काव्य रोचक आहे. श्रीकृष्णासारख्या नितीज्ञ, धर्मज्ञ, ध्येयासक्त, सामर्थ्यवान, ज्ञानी, पराक्रमी वीरावर तिचे मन जडले आहे हे लक्षात घ्या. प्रेम असे असावे. तारुण्यातील प्रेममस्ती म्हणजे बहुतेक वेळा वासनेचा धिंगाणा असतो. त्याला हे असे 'डे' साथ देतात. तेव्हा राजद्रोही व्हॅलेंटाईनचे नाव टाका आणि उत्तुंग प्रेमाविष्काराच्या रुक्मिणीच्या नावाला पुढे न्या. युवाशक्तीने पुढाकार घेतला तर काही काळात हा 'डे' जगभर साजरा होऊ शकेल.

    राष्ट्रजागर : डॉ.सच्चिदानंद शेवडे
    पृ.१५६-१५७,
    तृतीय आवृत्ती
    गार्गीज प्रकाशन-वसई

  • हरलाय महाराष्ट्र… आणि हरलाय मराठी माणूस…

    कोणी म्हणतोय भाजप जिंकला,
    कोणी म्हणतोय शिवसेना हरली,
    कोणी म्हणतोय राष्ट्रवादी पुढे तर,
    कोणी म्हणतोय कॉंग्रस मागे,
    कोणी म्हणतोय मनसेची वाट लावली...

    पण लक्षात ठेवा इथे फक्त "जिंकलाय" आणि पुढे गेलाय तो...

    गुजराथी,
    मारवाडी,
    भैया,
    मद्रासी,
    सिंधी,
    पंजाबी,
    आणि

    हरलाय आणि तो फक्त माझा "महाराष्ट्र"... आणि माझ्या महाराष्ट्रातील "मराठी माणूस"...

    आपण कोणत्याही पक्षाचे असाल आपल्याला हे मान्य करावंच लागेल ...

    महाराष्ट्रात राहून जर परप्रांतीय समाज एकत्र होऊ शकतो तर आपण का नाही ?

    मुंबईची आणि पुण्याची स्थिति...

    हिरा मार्केट - गुजराती‬

    कपडा मार्केट - ‪मारवाडी‬ आणि गुजराती

    लकडा मार्केट - मुस्लिम‬

    शेयर मार्केट - गुजराती, मारवाडी

    स्टील मार्केट - मारवाडी आणि गुजराती

    हाॅटेल लाईन - ‪‎शेट्टी‬, आणि पय्याडे

    वाईन मार्केट - शेट्टी, ‪‎पंजाबी‬

    मच्छी मार्केट - मुस्लिम, उत्तर भारतीय ..
    ‪‎मराठी‬ माणुस.... आहे कुठे ?

    वडापावच्या गाडीवर.. !!
    हसण्यावर घेऊ नका‪. 'लाज‬'' वाटण्यासारखी गोष्ट आहे.

    रिकाम्या बाटल्या विकत घेणारांनी बंगले बांधले ...

    तर बाटल्या रिकाम्या करणारांनी जमिनी विकल्या ......!!!

  • गिरनार व नवनाथ गुरू शिष्य

    गिरनार व नवनाथ गुरू शिष्य

    दतात्रेयांनी जिथे प्रत्यक्ष वास केला असे ठिकाण पर्वतशिखरांचा समूह म्हणजे गिरनार आसे मानले जाते. दहा हजार पायर्‍या चढुन तिथे जाणं हे शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी पाहणार असलं तरी एकदा तरी जायलाच पाहिजे असं ते स्थान आहे.

    भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनीत केलेले आणि बारा हजार वर्षे तपाने सिध्द केलेले स्थान म्हणजेच गिरनार अशी दतभक्तांची श्रध्दा आहे. भौगोलिक दृष्ट्या असंख्य छोट्या मोठ्या पर्वतांचा, शिखरांचा आणि सुळके यांचा समूह असलेला हा परिसर आहे. पुराणांमध्ये याचा श्र्वेताचल, श्र्वेतगिरी अशा नावाने उल्लेख आढळतो.

    पश्चिम भारतातील गुजरात राज्यामध्ये जुनागड या शहरापासून गिरनार तळ पाच कि मी अंतरावर आहे. या पर्वताचा विस्तार सुमारे चार योजना म्हणजेच 16 गावांपर्यत आहे. सुमारे 28 चौ कि मी ने व्यापलेला गिरनार पर्वताचा हा परिसर अत्यंत निसर्गरम्य, विलोभनीय, वन्यप्राणी जगताने संपन्न, विविध औषधी वनस्पतीने युक्त आहे. ही भूमी योगी सिध्द महात्मे यांनी संपन्न झालेली आहे. आजही अनेक जण गिरनार पर्वतावरील त्यांच्या स्थानावर तपश्र्चर्येला बसलेले आढळून येतात.

    गिरनार पर्वताच्या पायथ्याला (गिरनार तलेठी) भगवान महादेव मंदिर ,मृगी कुंड,लम्बे हनुमान मंदिर अशी प्राचीन आणि प्रेक्षणीय स्थळे आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेव मंदिरच्या दर्शनाला हजारो साधूं संत आणि लाखोंच्या संख्येने भाविक येतात. तेथील मृगी कुंडामध्ये हे नागा साधू स्नानाला उतरतात.

    अशी एक आख्यायिका आहे. कि त्या साधूमध्ये असा एक साधू असतो की जो स्नानाला मृगी कुंडात उतरतो पण डुबकी मारल्यावर बाहेर येत नाही. अंतर्धान पावतो आजूबाजूच्या परिसरामध्ये जुना आखाडा,निरंजन आखाडा, आव्हान आखाडा, अग्नी आखाडा, असे अनेक आखाडे आहेत . त्यापैकी श्रीशेरनाथ बापू संचलित गुरू त्रिलोकनाथ बापूचा एक आश्रम बघण्यासारखा आहे. अतिशय सात्त्विक आणि आपल्या तपोबलाने तेजस्वी अशा श्री शेरनाथ बांपूचे दर्शन सर्व भाविकांनी घेण्यासारखे आहे. आश्रमामध्ये गेली अनेक वर्षे अव्याहतपणे अन्नदान चालले आहे. गुरु शिष्य ( नाथ परंपरा ) येथे अजूनही जपली जाते. आलेल्या प्रत्येक भाविकाने येथे "प्रसाद" घेतला जाईल याकडे स्वत शेरनाथ बांपूचे कटाक्ष लक्ष असतो.

    लंबे हनुमान समोरील एका पायवाटेने सुमारे अडीच ते तीन कि मी आत जंगलाच्या दिशेने दुसरे एक संत श्री काश्मिरी बापूंचा आश्रम आहे श्री काश्मिरी बापूंचे वय अंदाजे दिडशे वर्षेच्या आसपास आहे. अशी स्थानिकांची तसंच भाविकांची श्रध्दा आहे,याही आश्रमामध्ये अतिशय निसर्गरम्य आणि काश्मिरी बापूंच्या तापाने प्रवित्र असे हे स्थान आवर्जुन बघण्यासारखे आहे.

    गिरनार पर्वतावर स्वयंभू उमटलेल्या भगवान दत्तात्रयांच्या पादुकाचे दर्शन घेणे ही प्रत्येक दत्त भक्ताची इच्छा असतेच सुमारे दहा हजार पायर्‍यावर हे स्थान आहे . वाटेत जाताना विविध इतर ही स्थाने आहेत. पायर्‍या चढायला सुरुवात करताना अगोदर एक कमान लागते जिथून सर्व भाविक सुरवात करतात.

    दोन हजार पायर्‍यांवर वेलनाथ बाबा समाधी असा फलक दृष्टीला पडतो. हेही एक सिध्द स्थान आहे. २२५० पायर्‍यांवर श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या राजा भर्तृहरी आणि गोपीचंद यांची गुफा आहे. आतमध्ये जाऊन दर्शन घेतल्यास दोन सुबक मूर्ती आढळून येतात. थोडे बाजूला "माली परब" घाट येतो. तेथे रामाचे मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी गोड पाण्याचे थंडगार पाणी असलेले कुंड आहे. २,६०० पायर्‍यांवर आसपास राणक देवीमातेची शिळ आहे. त्या शिळवर दोन हातांच्या पंजाचे निशाण आहे. थोडे अजून पुढे गेल्यावर सुमारे साडेतीन हजार पायर्‍यांपाशी प्रसूती बाई (देवी) चे स्थान आहे. संतान प्राप्ती झाल्यावर येथे त्या संतानाला घेऊन दर्शनाला येणार्‍या भाविकांची संख्या मोठी आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दत्त गुंफा , संतोषी माता, काली माता,वरूडी माता,खोडीयार माता , अशी छोटी छोटी मंदिरे आहेत.

    बाजूला जैन मंदिर येते. मुख्य मंदिर नेमिनाथचे आहे. अतिशय सुंदर सुबक मोहक अशी नेमिनाथाची मूर्ती आहे. नेमिनाथा हे 22 वे जैन तीर्थकर होय. या मंदिरातून थोड्या पायर्‍या उतरल्यावर जैन धर्मातले पाहिले तीर्थकर आदिनाथांची भव्य आणि उंच प्रतिमा आहे. थोडे पुढे गेल्यावर जैन दिगंबर मंदिराचा समूह आहे. उत्कृष्ट कलाकसुरी कारागिरीने युक्त अशी ही मंदिरे आपल्या प्राचीन संस्कृतीच्या वैभवाची प्रतीके आहेत.

    थोडे पुढे गेल्यावर गौ मुखी गंगा या नावाने स्थान आढळून येते. येथे गाईच्या मुखातून गंगाचे पाणी येते बाजूला गंगेश्वर महादेव मंदिर व बटुक भैरवाचे मंदिर आहे. गौ मुखी गंगा मंदिराच्या उजव्या बाजूने वर चढण्याचा मार्ग आहे. डाव्या बाजूला एक उतरण्याचा मार्ग आहे. ग्रामस्थ ,भाविक,साधू बैरंगी या मार्गांने येतात अथवा जातात. या मार्गांवर कूठल्याही प्रकारची मदतीसाठी माणसे, डोलावाले नसल्यामुळे बर्‍याचजणांना हा मार्ग माहित नाही.

    गौ मुखी गंगेच्या उजव्या बाजूने पर्वत चढायला लागल्यावर पाच हजार पायर्‍यांवर "अबाजी टुंक" येते. देवी पार्वतीने अंबामातेच्या रूपात गिरनार पर्वतावर वास केला म्हणुन हे मंदिर असल्याचे सांगितले आहे. या मंदिराचा देवी अंबामातेच्या सन्मुख असलेला दरवाजा कायम बंद असतो. होळी पौर्णिमा अथवा नवरात्रीलाच तो उघडतात. हे स्थान बहुतेक भाविकांचे आकर्षण आहे. येथून पुढे पाचशे पायर्‍या चढल्यावर श्री गोरक्षनाथ टुंक हे स्थान येते. गिरनार पर्वतवरील सर्वांत उंच शिखरावर हे स्थान आहे. समुद्र सपाटीपासून ३,६६६ फुटावर हे स्थान येते .

    नवनाथ संप्रदायातील श्री गोरक्षनाथांनी येथे तपश्र्चर्या केली आणि आजही गुप्त रूपाने त्यांचा येथे वावर आहे अशी भाविकांची धारणा आहे बाजूलाच गुरु गोरक्षनाथांची धुनी आहे व याच स्थानावर गुरु गोरक्षनाथांनी सिध्दांना उपदेश केला. बाजूलाच नवनाथानां गुरु दत्तात्रेयानी यांचा ठिकाणी गुरु मंत्र दिला होता.

    बाजूलाच एक पाप पुण्याची खिडकी ( बारी ) आहे म्हणजे एक छोटा बोगदा आहे. एका बाजूने त्यात आत शिरायचे व दुसर्‍या बाजूने सरपटत बाहेर पडायचे. या स्थानावर गेली बारा वर्षे मंदिराची व्यवस्था बघणार्‍या मंहत सोमनाथ यांचा दत्त संप्रदायातील " सेवा" या शब्दावर नितांत विश्वास आहे. इतक्या दुर्गम स्थानावर एकटे राहाणे, तपश्र्चर्या करणे हे येर्‍यागबाळयाचे काम नव्हे.

    गोरक्ष टुंक नतंर यात्रेकरूंना थोडासा दिलासा मिळतो. कारण पुढच्या शिखरावर जाण्यासाठी हजार ते पंधराशे पायर्‍या उतरायला लागतात. श्री गिरनारी बापूंची गुंफा लगते .येथे भैरवनाथाचे मंदिर आहेत. जे भक्त इथे नतमस्तक होतात त्यांना श्री गिरनारी बापू प्रसाद म्हणून ज्याच्या-त्याच्या योग्यतेनुसार रूद्राक्ष देतात. थोडे अंतर पुढे गेल्यावर दोन मोठ्या कमानी लागतात. उजव्या बाजूच्या कमानीतून सुमारे 300 पायर्‍या उतरल्यावर श्री कमंडलू स्थान आहे. डाव्या बाजूच्या कमानीतून पुढे समोर हजार पायर्‍या चढल्यावर दत टुंक आहे.

    चरण पादुका उमटलेल्या या शिखरावर चढताना थंडी वारा पाऊस यांचा अनुभव वेगळाच असतो. यांच स्थानवर बसून भगवान दत्तात्रयांनी बारा हजार वर्षे तपश्चर्या केली आणि तेथून ते अंतर्धान पावले असा समज सर्व दत्त भक्तां मध्ये आहे.

    दहा बाय बारा चौ फूट जागेमध्ये दत्तात्रेयांच्या पादुका, एक सुबक मूर्ती, एक पुजारी बसू शकेल एवढीच जागा आहे. येथे एक प्राचीन घंटा आहे. ती घंटा तीन वेळा आपल्या पुर्वजाची नावे एकेक करून घेत वाजवल्यावर सर्व पितरे मुक्त होतात. इथून पुढे जायचा कुठलाही रस्ता नसल्यामुळे परत आलो त्या वाटेवरून खाली कमंडलू स्थानापाशी जावे लागते. भगवान दत्तात्रेयाची सगुण उपासना करताना चरण पादुकांची उपासना सर्वश्रेष्ठ मानली जाते. तसेच आकाशातील चांदण्याचे अवलोकन करणे हाही काही सांधकांचा दत्त उपासनेचा भाग असल्यामुळे या स्थानावरून पहाटेच्या अथवा रात्रीच्या वेळी जे अवकाशाचे विहंगम दृश्य दिसते ते येथे येऊनच अनुभवावे.

    पावसाळ्यात तर येथील अनुभवाचे शब्दात वर्णन करणेच अशक्य आहे. ढग सुध्दा या शिखरा पासून खाली असतात.

    उतरताना परत त्या दोन कमानीशी आल्यावर कमंडलू स्थानकडे जायला 300 पाय-या उतरायला लागतात. इथे पाच हजार वर्षे पासून असलेली चेतन धुनी आहे. दर सोमवारी पहाटे सहा ते आठ या वेळातही "धुनी" प्रज्ज्वलित करण्यासाठी उघडतात. त्यात भरपूर लाकडे घालतात. येथील "भस्म" प्रसाद म्हणून भाविकांना दिले जाते.

    भगवान दत्तात्रेय ध्यानात अनेक वर्षे दत्त टुंकवर बसलेले असताना देवी अनुसूया मातेने त्यांना भानावर येण्यासाठी हाक मारली तेव्हा भगवान दत्तात्रयांचे कमंडलू खाली पडले. एक भाग एकीकडे व दुसरा भाग दुसरीकडे असे त्याचे विभाजन झाले. एक ठिकाणी अग्नी ( जिथे धुनी आहे) प्रकटला तर दुसर्‍या स्थानावर जल निर्माण झाले. तेच हे कमंडलू स्थान आहे.

    श्री गुरूदेव दत्त दत्त
    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त