(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 4

    दिवसा सूर्य असतो. रात्री सूर्य नसतो.
    सूर्य म्हणजे साक्षात अग्नि. पचनाला मदत करणारा. म्हणून तर आयुर्वेदात एक वचन आहे, आरोग्यम् भास्कराद् इच्छेत. म्हणजे आरोग्य ठीकठाक ठेवण्यासाठी सूर्याची भूमिका महत्वाची आहे.

    सर्वात शुद्ध काय असते ? अग्नि सर्वात शुद्ध. सूर्य म्हणजे अग्नि. सूर्य म्हणजे शुद्धता. सूर्य उगवला की बाकी सर्व जीवजंतु नष्ट व्हायला सुरवात होते. या सूर्याची उष्णता त्यांना सहन होत नाही, आणि त्यातील काही जीवजंतुंचा जन्म संपतो.

    आपण सूर्याला केंद्रस्थानी मानतो. आपली भूमाता सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. केवळ भूमाता नाही तर तिचे सर्व मंगळ, बुध, गुरू, शनि, शुक्र हे सर्व भाऊबंद, आपल्या मुलाबाळांसह याच सूर्याला केंद्र मानतात. आणि त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालत आपली कामे करीत असतात.

    आपण आपली दिनचर्या पाळतो. सकाळी उठतो, रात्री झोपतो. पशुपक्षीदेखील, सकाळी उठतात, रात्री झोपतात. म्हणजेच सर्व निसर्ग या सूर्याच्या अधिकारात काम करत असतो.

    आजच्या वैज्ञानिक नियमानुसार "फोटो सिंथेसिस" ही प्रक्रिया देखील सूर्यावरच अवलंबून असते. पानातील हिरवा रंग देखील याच सूर्यामुळे मिळतो. रक्तातील लाल पेशी वाढायला, कॅल्शियम वाढायला, आणि मुख्य म्हणजे व्हिटामिन डी वाढायला फक्त सूर्य मदत करतो. कोणत्याही प्रकारे व्हिटामिन डी कृत्रिमरीत्या तयार करता येत नाही. जरी जाहिरातीतून तसे दावे केले जात असले तरी, जाहिरातीमधे दाखवतात, ते सर्व खरे कुठे असते ? असो.

    तर आपण सूर्यवंशी आहोत. सूर्य उगवतो, त्याच्या स्वागताला आपण आधी उठतो, तो मावळला की आपले सर्व व्यवहार बंद करीत झोपी जातो. हा निसर्ग नियम आहे.

    या सूर्याला साक्षी ठेवूनच आपण आपली सर्व महत्त्वाची कामे करीत असतो. जसे नेहमीचे पोटभरतीसाठीचे व्यवसाय, लग्न, मुंज, वास्तुशांत, गृहप्रवेश, होमहवन, वाढदिवस, देवदर्शन, बारसे, इ शुभकार्ये दिवसाचीच केली जातात. कधी विचार केलाय, असं का, असा ?
    तेव्हा उत्तर मिळालं, सूर्य असतो म्हणून.

    तसेच जेवणे हे जर यज्ञकर्म असेल तर ( तर म्हणजे ते यज्ञकर्मच आहे. वदनी कवल घेता...... जाणिजे यज्ञकर्म । ) ते सुद्धा सूर्य असे पर्यंत पार पडले पाहिजे ना !
    म्हणूनच सूर्य असे पर्यंत जेवावे, कारण आपणही याच निसर्गाचा एक हिस्सा आहोत ना !!
    तेच नियम आपणही पाळले पाहिजेत, जे "त्याने" ठरवून दिलेले आहेत.
    निसर्गापुढे आपली बुद्धी म्हणजे किस झाड की पत्ती !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    27.02.2017

  • जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 3

    जेवण सकाळी आणि सायंकाळी करावे ?
    काहीतरीच सांगताय राव ! ही काय जेवायची वेळ आहे ? भूक तर लागली पाहिजे ना ! आमचं सकाळचा नाश्ता खाल्लेलाच पचत नाही, तर जेवायचं कुठुन ?

    यासाठी काही मुलभुत गोष्टी समजून घ्याव्या लागतील. आज जे काही सांगितले जातेय, ते कितपत योग्य आहे ते आधी ठरवावं लागेल.

    दर दोन तास किंवा चार तासांनी सतत खात रहा, असे आज डाॅक्टरांकडून सांगितले जाते, नाहीतर म्हणे अॅसिडीटी वाढेल म्हणून खावे, असेही सांगितले जाते, असे रुग्ण सांगतात, डाएटीशियन तेच सांगतात, जिम इन्स्ट्रक्टर तेच सांगतात. मुळात प्राॅब्लेम इथेच सुरू होतोय. ज्यांना आरोग्य माहिती आहे त्यांना आहारशास्त्राची माहिती नाही. ज्या डाएटीशियनना आहारशास्त्र माहिती आहे, त्यांना आरोग्याची काहीही कल्पना नाही. आणि जिम इन्स्ट्रक्टरना फक्त प्रोटीन डाएट खपवणे एवढेच माहिती. बाकी त्यांना ओकी ठो माहिती नाही. पण आयुर्वेद तज्ञांना त्यांच्या सिलॅबसमध्ये दोन्ही शास्त्र शिकवली जातात. हेच आयुर्वेदाची प्लस बाजू.

    आयुर्वेदात आहाराविषयीचे एक अत्यंत मह्त्त्वाचे सूत्र सांगितले जाते, ते म्हणजे "भूक असेल तेव्हा जेवावे, नसेल तर खाऊ नये." या सूत्राचा आधार घेऊन असे निश्चित सांगता येईल कि दर दोन चार तासांनी भूक नसली तर अजिबात खाऊ नये.

    गॅस पेटलेला असेल तरच वर अन्न शिजेल ना. गॅस पेटलेलाच नसेल तर ? चमचाभर पाणी सुद्धा गरम होणार नाही. बरोबर आहे ना ? भूक नसताना जेवले तर अजीर्ण होईल. मग जेवायचेच कशाला ? सकाळ असो वा संध्याकाळ दुपार असो वा रात्र भूक नसताना अजिबात जेवू नये.
    आयुर्वेद म्हणतो, वेगान् न धारयेत्
    वेगान प्रवृत्तयेत् ।
    शरीराकडून निर्माण केलेला वेग अडवू पण नये, किंवा त्याच्या मुद्दाम विरोधात जाऊ नये.

    मग आज असे उलटे आणि चुकीचे का सांगितले जाते ?
    ते मी कसं सांगू? मी सांगितले तर ते चुकीचे होईल ना.
    तो नास्ति मम अधिकारः ।

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    26.02.2017

  • मराठी राजभाषा दिवस

    कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करतात.

    हा दिवस साजरा होऊ लागला त्याला आता बरीच वर्षे झाली. आपण वर्षांतून एकदा मराठी भाषा दिवस साजरा करून जगाला हे सांगतो की, ‘मराठीचा आम्हाला विसर पडला आहे, भाषा दिवस साजरा करणे, केंद्राकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळवणे या प्रतीकात्मक असल्या तरी आमच्या आवाक्यातील ज्या गोष्टी आहेत.

    इंग्रजी भाषेप्रमाणे सर्व प्रकारचे व्यवहार मराठीतून करणे, त्यासाठी मराठी माध्यमातूनच शिकणे-शिकवणे हे आम्हाला जमणार नाही. आम्हाला स्वत:ची प्रगती करायची आहे; स्वभाषेची नव्हे. अख्ख्या जगाने समृद्ध केलेली इंग्रजी हीच आमच्यासाठी ज्ञानभाषा व उद्याची लोकभाषा आहे.’ अर्थात, हे आपण स्पष्ट बोलून दाखवत नाही.

    मराठीसंबंधी आपण सगळयांनी मनावर घ्यायला पाहिजे नाहीतर इतिहास आपल्याला माफ करणार नाही.

    मराठी ही मृत्युपंथाला लागलेली भाषा आहे हे इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी पाऊणशे वर्षांपूर्वी सांगितले होते. १९६० नंतर म्हणजे मराठी भाषेचे राज्य स्थापन झाल्यानंतर ती स्थिती बदलण्याची आपल्याला संधी होती; पण मराठी भाषेला काही झालेले नाही या भ्रमात राहणे आपण पसंत केले. मराठीबाबतचे भ्रम जोपासत आपण येणाऱ्या पिढय़ांचे आणि विशेषत: तळागाळातील समाजाचे अपरिमित नुकसान करीत आहोत.

    यापुढे ज्यांना मराठीतून आपली आपली उपजीविका साधायची आहे त्यांना मराठीचे येत्या ३०-४० वर्षांतले चित्र काय असणार हे स्पष्टपणे सांगायला हवे. स्वभाषेच्या वापराचा अलिखित करार आम्ही व्यक्तिगत स्वार्थासाठी कधीच मोडला आहे. आपण हे जाहीरपणे स्वीकारायला हवे की मराठी ही कधीच ज्ञानभाषा होऊ शकणार नाही. जी भाषा शिक्षणाची माध्यमभाषा म्हणून टिकू शकत नाही ती ज्ञानभाषा कशी होणार?

    शेकडो वर्षांची परंपरा असलेली भाषा मरायला अनेक दशके, शतके लागतात. पण हे लक्षात न घेतल्यामुळे आपली भाषा मृत्युपंथाला लागलेली असतानाही निजभाषकांचा तीवर विश्वास बसत नाही. मराठीचा प्रश्न हा भावनात्मक, सांस्कृतिक प्रश्न आहे आणि तो मराठी भाषेविषयी उत्सवी जनजागरण करून सोडवता येईल ही एक अंधश्रद्धा होती हे एव्हाना सिद्ध झाले आहे.

    भाषेचा प्रश्न हा मूलत: आर्थिक प्रश्न आहे. प्रत्येक समाजाला स्वभाषेविषयी प्रेम असते. पण ते प्रेम ती भाषा जगण्याला उपयोगी पडते व भौतिक प्रगतीच्या आड येत नाही तोवरच कार्यरत असते. आपण आपली भाषा सोडतो ती अन्य भाषेविषयी प्रेम वाटते म्हणून नव्हे तर आपली भाषा आपणास आर्थिक संधी पुरवण्यात कमी पडते म्हणून.

    चला संकल्प करू या आजपासून मी माझ्या रोजच्या जीवनात मराठीचा वापर करीन. अगदी रोजच्या जीवनात नाही जमले तरी माझ्या सामाजिक जीवनात म्हणजेच व्हॉट्सअप,फेसबुक पासून मी मराठीचा वापराची सुरवात करीन.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    व्हॉट्अपसाठी मराठीतील कळफलक (keyboard)
    https://play.google.com/store/apps/details?id=com.klye.ime.latin

  • निर्लज्ज

    भारत पर्यटनाला आलेली ती विदेशी महिला हातातील चिप्सचे रिकामे पाकीट फेकण्यासाठी अर्धा तास डस्टबिन शोधत फिरली...

    आणि तिच्याच समोर संत्र्याची सोललेली साल मी बिनधास्त रस्त्यात फेकली...

    माझ्याकडे रोखलेली तिची ती प्रश्नार्थी नजर पाहिली

    तरीही मला लाज नाही वाटली....

    लाज माझ्या बेगडी स्वच्छतेची...!

    त्याने बेकायदेशीर काम करण्यासाठी माझ्याकडे सरकवलेलं नोटांचं पाकीट मी हळूच खिशात दाबलं...

    आणि त्याच्याच मागून भिकाऱ्यासारखं हात जोडून मला विनंती करीत आलेल्या कफल्लक म्हाताऱ्याला वयाचा दाखला आणायला मी बळेच पिटाळून लावलं...

    त्याच्या डोळ्यातला तो अश्रूचा थेंब पहिला

    तरीही मला लाज नाही वाटली....

    लाज माझ्या अधाशी हावरट पोटाची...!

    रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिच्या नवऱ्याला इस्पितळात न्यायची तिने विनंती करताच माझी नवी कोरी चमचमीत आलिशान कार रक्ताने माखेल की काय या भीतीने मी दुसऱ्या मार्गे जात असल्याच सांगून हळूच टांग मारली...

    तिच्या नजरेतली भीक मी स्पष्टपणे पहिली

    तरीही मला लाज नाही वाटली ....

    लाज माझ्या दिखावेबाज श्रीमंतीची...!

    बलात्काराच्या केसमधून त्याला निर्दोष सिध्द करताना मी माझ्या वकिलीची सीमापार गाठली...

    बलात्काराच्या बळीची आब्रू पुन्हा वेशीवर टांगली. तिच्या डोळ्यातला राग पहिला

    तरीही मला लाज नाही वाटली....

    लाज माझ्या कायदाप्रिय बुद्धिमत्तेची...!

    एअरकंडीशनर मॉल मधून महागडे कपडे अन शूज खरेदी करून मी अभिमानाने कार्ड स्वाईप केलं...

    फाईव्ह स्टार हॉटेलच्या मेजवानीनंतर वेटरच्या हातावर १०० रुपयांची टीप सुध्दा टेकवली...

    मात्र बाजारातून भाजी खरेदी करताना १० रुपयासाठी अपार घासाघिस केली...

    त्या गरीब शेतकऱ्याच्या आर्त विनवणीचा सूर कानात घुमत राहिला.

    तरीही मला लाज नाही वाटली....

    लाज माझ्या काटकसरी व्यवहारांची...!

    समुद्रात लाखो करोडो रुपयांची रक्कम ओतून शिवछत्रपतींचे स्मारक उभारण्याच्या मी खूप गप्पा मारल्या...

    पण जिथे माझा राजानं अखेर प्राण सोडला त्या खऱ्याखुऱ्या स्मारकरूपी रायगडाची मात्र दयनीय अवस्था केली...

    शिवछत्रपतींची तलवार तोडली गेल्याची बातमी टीव्हीवरती पसरली...

    प्रेमी युगुलांची नावं लिहलेल्या गडाच्या बुरुजांचा आक्रोश कानठळ्या फोडू लागला

    तरीही मला लाज नाही वाटली....

    लाज माझ्या नादान शिवभक्तीची...!

    गगनभेदी बिल्डींग, शॉपिंग मॉल, मल्टीप्लेक्स, ३ जी- ४ जी अन बुलेटट्रेनच्या जमान्यात कुणी आरक्षणासाठी तर कुणी आरक्षणाच्या विरुध्द भांडला...

    आदिवासी पाड्यावरचा रुग्ण वाहतूकसुविधे अभावी अजूनही झोळीत टाकून आणलेला पहिला...

    डॉक्टर म्हणे तो तर रस्त्यामध्येच मेला.

    तरीही मला लाज नाही वाटली....

    लाज माझ्या विकासाच्या राजकारणाची...!

    २६/११ ला मी मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाहिली...

    पाकिस्तानशी युद्धाच्या पोकळ गप्पा मारून देशाखातर मरण्याच्या सिंहगर्जना केल्या...

    त्याच पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट मी चवीने पहिले...

    माझ्याच पैशात मी कित्त्येक कसाब पोसले

    तरीही मला लाज नाही वाटली....

    लाज माझ्या फुटक्या देशभक्तीची.!

    आणि अजूनही मला लाज नाही वाटत....

    माझ्या निर्लज्जपणाची...!!!

  • कुत्र्याची पिलं

    जो तो आपली कुवत आणि गुणधर्म जन्माला येतानाच घेउन येतो..आपण एखाद्याला अगदी कितीही प्रेम, कितीही आदर व चांगली वागणुक दिली तरी त्याचे कान भरणारे कुणी आल्यावर तो आपल्या मुळच्या रंगात परत रंगून आपल्या जन्मजात लायकीच्या लोकांशीच संबंध जोडून घेत त्यांच्याच कळपातच फिरू बघतो..

  • जागतिक मराठी भाषा दिवस

    आज २७ फेब्रुवारी.  ‘जागतिक मराठी भाषा दिवस’. याच दिवसाला`राजभाषा दिवस’ असंही म्हणतात. जेमतेम सात दिवसांपूर्वी, २१ फेब्रुवारीला `जागतिक मातृभाषा दिवस’ जगभरात साजरा केला गेला.

  • मराठी भाषा दिना’च्या निमित्ताने

    आपल्या ‘मराठी भाषे’वर प्रेम करा, तिचा रोजच्या व्यहारात अट्टाहासाने वापर करा आणि पुढे असंही सांगेन, की कुणाशी भांडायची पाळी अलीत तर निदान भांडताना तरी मराठीचा वापर करा. एक दणदणीत वाक्य मराठीत फेकून मारा, बघा, समोरचा पन्नास टक्र्याने तरी खाली येतो की नाही..!

  • अशी पाखरे येति..आणिक स्मृति ठेवूनि जाती

    मनुष्याला आपल्या आयुष्यात प्रत्येकक्षणी सतत काहीतरी हवे असते. आणि या हव्यासापोटी तो आपले सामाजिक कर्तव्य विसरत चालला आहे. शिक्षण, व्यवसाय, नोकरी करत असताना सामाजिक बांधीलकीचे भान ठेवणे गरजेचे आहे, आणि काही व्यक्ती ठेवतातही. त्यापैकीच खामगावचे एक कलाशिक्षक संजय गुरव. प्राणीमात्रांची सेवा करून इतरांनाही प्रेरणादायी ठरणारा छंद त्यांनी जोपासला आहे.

    आजच्या ग्लोबलायझेशनच्या युगात बहुतांश पालक आपल्या मुलांना घर, शाळा, शिकवणी वर्ग, संगणक, टीव्ही आणि मोबाइल या व्यतिरिक्त इतरत्र डोकावूनसुद्धा पाहू देत नाहीत. जग जवळ आले असले तरी विद्यार्थ्यांना आजूबाजूला आढळणारे प्राणी, पक्षी कोणते? याची माहिती नसते. पूर्वी ‘चिव ये, दाणा खा, पाणी पी अन् भुर्र्र उडून जा’, असे लहानपणी मुले खेळत होती. बालगोपाल चिमण्यांच्या चिवचिव आवाजाचा, भुर्र्र उडण्याचा मनसोक्त आनंद घेत असत. परंतु, आज हा प्रकार अनुभवाला मिळत नाही. तीन वर्षांपूर्वी खामगाव येथील र्शी अ. खि. नॅशनल हायस्कूलमधील कलाशिक्षक संजय माधव गुरव, त्यांची दोन मुले, पत्नी व मित्र विजय खंडागळे यांनी एक प्रयोग करून बघितला. सुरुवातीला अंगणात वृक्षलागवड केली. त्यामुळे विविध पक्षी येऊ लागले. सोबतच खार, मुंगूस, सरडे, हिरवा सरडा, चिमणी, बुलबुल, सूर्यपक्षी, मैना, साळुंकी, चष्मेवाला, शिंपी, पिंगळा, होला, दयाळ, राखी वरवट्या, काळी मैना, ब्राrाणी मैना यांची ओळख छोट्या मुलांना व मित्रांना करून देण्याचा छंद त्यांना जडला. नंतर या पक्ष्यांसाठी अंगणात 22 बाय 33 फूट लांबीचे चार पाणवठे तयार केले. पाणवठय़ाच्या वरच्या बाजूला 12 फूट उंचीवर एक लाकडी घरटे तयार करून लावले. त्या ठिकाणी नियमित अन्न टाकणे सुरू ठेवले. दोन महिन्यांनंतरच त्या घरट्यात ब्राrाणी मैनेने दोन पिलांना जन्म दिला, हे त्यांचा मुलगा संदेशने आनंदाने नाचून सांगितले. हा आनंद पैसे देऊनही विकत मिळत नाही, असे वाटल्याने त्यांनी घरट्यांची संख्या वाढवली. मातीच्या मडक्यांची घरटी तयार केली, परंतु पक्षी येईनात. म्हणून सहा महिन्यांनी मडक्याच्या तोंडावर चिमणीच्या आकाराचे छिद्र पाडले व त्यावर खरड्याचे आवरण लावले. आणि अवघ्या अध्र्या तासातच दोन्ही मडक्यांमध्ये चिमण्यांची ये-जा सुरू झाली. आजपर्यंत या घरट्यात मैना व चिमण्यांनी दहा-बारा वेळा आपल्या पिलांना जन्म दिला. हा अनुभव खरंच आजच्या धकाधकीच्या जीवनात लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वांना सुखदायक ठरणारा आहे.

  • गणपती

    गणपती......

    कोणीतरी मुंबयवाल्यापैकी सक्याच्या म्हातार्याक विचारल्यान...

    तात्यानू गणपती म्हणजे नक्की काय वो? जा म्हातार्यान सांगल्यान ता तुमका सांगतय....

    अरे गणपती म्हणजे मातयेचो गोळो...प्रत्तेक टायमाक तुमका जाणीव करून देता... तुमकाय मातीच होउचा हा... तेवा माजा नकात.... मालवणी मुलकात ज्या घरात गणपती नाय ता घर सुद्धा हिशोबात धरणत नाय.... हीच घराची मर्यादा.... हीच घराची शोभा... एकच सण वर्षाचो जो घरात मयत झाला तरी होताच.... आमचे जिवय तोचआणी देवय तोच..

    पण तुम्ही मुंबयवाल्यानी तेचो निकाल केलाय..... गटारार ... संडासच्या पाईपलायनीर.... गणपती बसवलास.... तेच्यानावान धंदो काडलास... सार्वजनिक गणपतिंचो....

    आमच्या शास्त्रात एका देवाचे दोन मुर्ते एका जाग्यार नाय चलनत.... तर एक पुजेक आणी एक शोक ...

    आवशीच्या घोवान तरी देवाचो शो केल्लो काय रे?

    गटारावरच्या देवाकडे कसला पावित्र येतला रे? थय देवाच्या नावार अक्रीतच कुदतला..... थय दारूच चलतली...... सोमा गोमा बाईच बघुक येतले..... मायझयानु घरात सोवळा लावच्या शिवाय पुजा करून दाखवा रे.... नाय बापाशीन तुमची उत्तरपूजा घातल्यान तर माका इचारा....

    आजय मालवणी मुलखात सगऴ्यादेवांका टोपी लावतीत.... पण गणपतीच्या फुड्यात कोण खोटा बोलाचा नाय....

    वर्षभर ऩचुकता घेणारेसुद्धा गणपती आसापर्यंत घेणत नाय....

    तुमका मतांसाठी देवाचो बाजार मांडणार्यांका ह्या काय समाजतला....

    मेल्यानु झपला तर पाळा रे तेचा सगळा.... पण टिंगल करू नको... मातयेचो देव तो... तेका प्लास्टर चो करून पूजू नकात.... मातयेची पूजा करा... तेनिच तुमचा भला जातला....

    म्हातारो पोट तिडकीन बोला होतो ... आणि समोरचे मुंबईकर सगऴे गायब झाले होते...
    ...
    ...
    बापूर्झा
    डॉ बापू भोगटे

  • मला भेंटलेला रिक्शावाला व त्याच्या नजरेतून मुसलमान समाज

    मुंबईच्या उपनगरांतील रस्त्यावर दिवसाचे १२-२५ तास आपल्या तिन चाकांच्या रिक्शांवर मेहेनत करणारे रिक्शावाले माझ्या अखंड कुतुहलाचा विषय आहेत. बऱ्याचदा नडेल, अडेलतट्टू, उर्मट असंच यांचं वागणं असतं. प्रवाश्याला हवं त्या ठिकाणी न येणं हा तर त्यांचा व्यवसायसिद्ध हक्क आहे की काय अशी शंका यावी असंच यांचं वागणं असतं.