वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
कासवांच्या सातही प्रमुख प्रजाती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणूनच त्या प्राणिसंवर्धन आणि संरक्षण कायद्याच्या परिघात येतात. समुद्री कासवांना पकडणे बेकायदेशीर आहे.
May 23, 2021
समर्थ रामदास स्वामी हे खरे तर भगवान श्रीरामाचे उपासक आणि परमभक्त. असे सांगतात की, समर्थ रामदास स्वामी हे पुणे जिल्ह्यातील मोरगाव या गणेशस्थानी गेले असता गणपतीच्या दर्शनानंतर त्यांनी ही आरती लिहिली.
September 7, 2024
…सरकारी कार्यालयाचे वाॅचमन, कार्यालयातील शिपाई, लिफ्टमन आदींचं समाधान दोन-पाचशे रुपयांच्या वर्गणीवर होतं. कारण त्यांची मजल तेवढीच असते. तेवढ्यावर मिळणारं एखादं गटार त्यांना पुरेसं असतं. खरी गटारी तर त्यांच्या पुढच्या डेसिग्नेशन्सवर असलेल्यांची आणि त्यांची तिथे नेमणूक करणार्या राजकारण्यांची असते. हे गटारी निमित्त वर्गणी वैगेरे काढत नाहात. ते एका दिवसाच्या गटारीवर समाधानीही नसतात. त्यांची गटारी वर्षभर सुरुच असते आणि लोळण्यासाठी गटारं असतात, ती ‘लाचे’ची, कॅश आॅर काईंड आॅर बोथ..! ही गटारं साधी, झोपडपट्टीतल्यासारखी गरजेपोटी निर्माण झालेली नसतात, तर मुद्दामहून तयार केलेले परंतू वरून गुळगुळीत गिलावा केलेले मोठे, गलित्छ नाले असतात…
July 26, 2017
नुकताच ‘जागतिक मराठी भाषा दिन ‘ झाला अन आम्ही झोपेतून ( कि गुंगीतून ) सपाटून जागे झालो . “मराठी वाचवा ” असे आवाहन करण्यात आले . मराठीचा -बचाव -बचाव असा आक्रोश स्पष्ट एकू येवू लागला . आम्ही बेचॆन झालो . ‘मराठी वाचलीच पाहिजे ‘ (क्रिया आणि क्रियापद दोन्ही )याचा साक्षात्कार झाला !
February 28, 2018
भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र दिल्लीत १९५८ साली सुरू झाले. त्यानंतर २ ऑक्टोबर १९७२ रोजी मुंबईत दूरदर्शन केंद्र सुरू झाले. नंतरच्या काळात आशियाई क्रिडा स्पर्धांच्या वेळी भारतात रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले. तेव्हा अगदी मोजकीच चॅनेल असायची आणि कार्यक्रमसुद्धा अत्यंत दर्जेदार असायचे. या दर्जेदार कार्यक्रमातलाच एक कार्यक्रम म्हणजे शेतकरी बंधूंसाठी असलेला 'आमची माती- आमची माणसं' !
https://www.youtube.com/watch?v=TFtiDc5GRmU
खरंतर पहिले केंद्र दिल्लीत सुरू झाल्याने आणि तब्बल १२ वर्षे त्यावर कार्यक्रम करण्याचा अनुभव घेतल्याने दूरदर्शनच्या अधिकार्यांना लोकांच्या गरजांसाठी कोणते कार्यक्रम करायला हवेत याची माहिती झाली होती. त्यामुळेच मुंबई केंद्र सुरु झाल्यावर आपण कोणकोणती सदरे सुरू करावीत, याचेही मार्गदर्शन मिळाले.
सुरुवातीला मुंबई दूरदर्शनवर काम करण्यासाठी दिल्ली केंद्रावरची काही अनुभवी माणूस मागवून घेतली गेली. मात्र बाकीचे सगळे दूरदर्शनचा अनुभव नसलेलेच होते. निदान कार्यक्रम तयार करण्याचा व तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा अनुभव असवा या उद्देशान जागोजागच्या आकाशवाणी केंद्रांवरची माणसे दूरदर्शनवर आणली.
आकाशवाणी आणि दूरदर्शन यात काही साम्ये आहेत तसेच काही फरकही आहेत. लोकांना कोणते कार्यक्रम द्यायचे, त्याचा आराखडा कसा असावा, विविध विषयावरील माहिती देणारे तज्ज्ञ कोण आहेत, या गोष्टी दोन्ही माध्यमांना समान आहेत. पण आकाशवाणीवर चित्रे दाखवता येत नसल्याने तेथे शब्दांना फार मोठे महत्त्व असते.
आकाशवाणीवरील भाषणावरून श्रोत्यांपुढे त्याचे हुबेहुब चित्र दिसले पाहिजे. प्रत्यक्ष चित्र दाखवता येत नसल्याने जी कमतरता आकाशवाणीच्या माध्यमात आहे तीच दूरदर्शनची ताकद असते कारण दूरदर्शनवर चित्रे दाखवता येतात. यामुळे वक्त्याचा संदेश अधिक स्पष्ट होतो. त्यासाठी दूरदर्शनवर काम करणार्या व्यक्तींना अधिक कष्ट ग्यावे लागत. भाषणाला साजेशी चित्रे, दृश्ये, छायाचित्रे मिळवणे हा त्यातला कष्टाचा भाग असे आणि ती चित्रे योग्यवेळी दाखवणे हाही तितकाच महत्त्वाचा भाग असे. त्यावेळी आतासारखा मोठा चित्रसंग्रह किंवा व्हिडिओजचा संग्रह उपलब्ध नव्हता.
'आमची माती- आमची माणसं' या कार्यक्रमात अनेक कृषी-तज्ज्ञांच्या मुलाखती प्रत्यक्ष शेतावर घेतल्या जात. दृक-श्राव्य माध्यमातून एखादा रोग पडलेले पीक कसे दिसते ते नीट दाखवता येते. सकस फळ आणि रोगट फळ
यातील फरक चित्राच्या माध्यमातून नीटपणे दाखवता येतो. यामुळे शेतकरी वर्गामध्ये हा कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाला.
आज दूरदर्शनवर असंख्य खाजगी चॅनेल्स आहेत. त्यातील काही कृषी-शेती या विषयाला वाहिलेली सुद्धा आहेत. मात्र याची पायाभरणी 'आमची माती- आमची माणसं' या कार्यक्रमाने केली असल्याने या कार्यक्रमाचे महत्त्व अबाधित आहे.
सुप्रसिद्ध कृषीतज्ज्ञ डॉ. यशवंतराव नेने एकदा म्हणाले होते की, मुंबई दूरदर्शनवरील शेतीविषयक कार्यक्रम महाराष्ट्रात ज्या गुणवत्तेचा असतो, तितका इतर राज्यांतील नसतो. यातच हा कार्यक्रम सादर करणार्यांचे योग्य कौतुक होते.
--
April 7, 2016
तुम्हाला केस विंचरण्याची कल्पना नकोशी वाटते का? खाली नमूद केलेली योगासने करून पहा, नक्की लाभ होईल. पण एक गोष्ट लक्षात असू द्या की केस गळतीवर उपचार करण्यापेक्षा ती सुरु होण्या आधीच खबरदारी घेतलेली जास्त उपयुक्त ठरते. केस गळतीवर प्राचीन उपचार पद्धतींबद्दल अधिक माहितसाठी पुढे वाचा
एका सुप्रसिद्ध मासिकाची पाने चाळताना हा लेख मला दिसला. मला खात्री आहे की या आवृत्तीच्या प्रति शिल्लक राहिल्या नसतील कारण सर्वजण सध्या एकाच अडचणी वर विविध उपचार शोधत आहेत आणि तो म्हणजे केस गळणे. तुमच्या सोयीसाठी मी त्यातला काही भाग इथे प्रसिद्ध करत आहे.
खरं म्हणजे आपले केसांचे आरोग्य आपल्या एकूण आरोग्यचे ध्योतक आहे . सुंदर केस हे तुमच्याकडे असलेला आरोग्याचा अनमोल ठेवाच होय.
केस गळतीचे मुख्य कारण म्हणजे: मानसिक तणाव, खाण्य-पिण्याच्या सवयी, व्याधी, आमली पदार्थांचे सेवन, हेअर-डाय चा वापर, अनुवांशिक विकार आणि धूम्रपान.
योग आणि ध्यान केल्याने फक्त केसांची समस्याच दूर होईल असे नाही तर पूर्ण शरीरालाच त्याचा लाभ होऊ शकतो. शारीरिकच नाही तर मानसिक स्वास्थ्यही ह्यामुळे सुधारेल. योगा केल्याने टाळूच्या त्वचेमध्ये रक्ताभिसरण वाढते, पचन प्रक्रिया सुधारते आणि ताण-तणाव कमी होतो.
केस गळती थांबविण्यासाठी उपयुक्त आसने:
पुढे वाकून केलेली सर्व आसनं डोक्यातील व टाळू कडील भागातील रक्ताभिसरण वाढवतात. ह्या मुळे केसांच्या मुळांना पुष्टी मिळते. हा परिणाम काही दिवसातच लक्षात येईल.
१.अधोमुख श्वानासन
हे आसन केल्याने मस्तकात व्यवस्थित रक्ताभिससरण होते ज्यामुळे सायनसचा व सर्दीचा त्रास कमी होतो. मानसिक थकवा, तणाव आणि निद्रानाश ह्या लक्षणांवार मात करण्यासाठी देखील हे आसन उत्तम आहे.
२. उत्थानासन:
थकवा व शीण घालवण्यासाठी हे आसन उत्तम समजलं जातं. रजोनिवृत्ति काळात ह्या आसनाचा खूप लाभ होतो, पचन शक्तीची वृद्धी होते.
३. वज्रासन
हे एकमेव असे आसन आहे जे जेवल्यानंतर लगेच करता येते. मूत्र यंत्रणेचे विकार, वजन कमी होणे, मंदाग्नी ह्यांच्यावर परिणामकारक असे हे आसन आहे. पोटातील निर्माण झालेला वायू कमी करण्यासाठीही वज्रासन उत्तम समजले जाते.
४. अपानासन:
अपान म्हणजेच आपल्या पचन यंत्रणेतील गरळाचे शुद्धीकरणास जबाबदार असलेली उर्जा. हे आसन केल्याने मनाचे स्थर्य येते, बद्धकोष्ठतेवर मात करता येते.
५ .पवनमुक्तासन:
पवनमुक्तासन केल्याने शरीरातील वायूवर नियंत्रण येते व पचन सुधारते. पाठीच्या खालच्या भागातील स्नायू मजबूत होतात. पोट व कुल्ल्यावरील मेद (चरबी) कमी होते.
६. सर्वांगासन:
हे आसन थायरॉईड ग्रंथीना पुष्टी देते ज्यामुळे श्वसनसंस्था, पचनसंस्था, प्रजननसंस्था व कार्यरत राहतात.
केस गळती थांबविण्यासाठी उपयुक्त प्राणायाम:
१. कपालभाती प्राणायाम:
हा प्राणायाम केल्याने मेंदूला अधिक प्राणवायूचा पुरवठा होतो ज्यामुळे मज्जासंस्था अधिक कार्यरत राहते, विषद्रव्यांचा निचरा नीट प्रकारे होते. स्थूलपणा व मधुमेहावरही अत्यंत प्रभावी.
२. भस्त्रिका प्राणायाम:
ह्यामुळे शरीरातील अतिरिक्त वात, कफ आणि पित्ताचा समतोल राहतो. मज्जासंस्थेचे शुद्धीकरण होते ज्यामुळे शरीर स्वस्थ राहते.
३. नाडी शोधन प्राणायाम:
हे हृदयाच्या समस्या, तसेच दमा आणि संधिवात, नैराश्य व डोळे आणि कानाच्या समस्या दूर ठेवते.
लक्षात ठेवण्यासारख्या आणखी काही गोष्टी:
आसनांबरोबरच आपला आहार नियंत्रित ठेवणे खूप आवश्यक आहे. आहार संतुलित असावा ज्या मध्ये ताजी फळं, पाले भाज्या, डाळी, मोड आलेली कडधान्ये आणि दुधा पासून बनलेली उत्पादने ह्यांचा समावेश असावा. ही केस वाढीसाठी महत्वाचे पोषक देते. अशा आहाराने केसांचे व्यवस्थित पोषण होते.
कडुलिंबाच्या पाणयाने केस धुतल्याने, आठवड्यातून २-३ वेळा धूवून स्वछ ठेवल्याने, नारळाचे तेलाने मालिश केल्याने केसांची वाढ उत्तम प्रकारे होते.
केसांवर कोणतीही उग्र रसायने किंवा केस सजवण्याची बाजारू भंपक उत्पादने वापरणे टाळा.
एक गोष्ट मात्र समजून घेतली पाहिजे की केस गळती ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. केस गाळण्याच्या प्रक्रियेची गती कमी करणे शक्य आहे पण गेलेले केस परत येणे सोपे नाही.
मार्च ११, १२ आणि १३ २०१६ रोजी होणारा जागतिक सांस्कृतिक उत्सव (वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल) म्हणजे दि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सेवा, माणुसकी, अध्यात्म आणि मानवतावादी मुल्ये या क्षेत्रातील ३५ वर्षाच्या कार्याचे पर्व साजरे करणे होय. हा उत्सव म्हणजे संपूर्ण जगभरातील संस्कृतींमधील वैविध्य साजरे करताना मानवी समाजाचे सदस्य म्हणून आपल्यातील एकोप्याचे दर्शन घडवून आणेल.
-- सुषमा मोहिते
आरोग्यदूत या Whatsapp ग्रुपवरुन
March 4, 2017
पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश यांना एकत्रितपणे पंचमहाभूते असे म्हणतात. संपूर्ण विश्वाची निर्मिती याच पाच तत्वांनी झाली असल्याचे आयुर्वेद मानतो. हनुमंताला ‘पवनपुत्र’ म्हटले गेले आहे. याचा अर्थ; वायू महाभूताचा प्रभाव हनुमंतावर अधिक प्रमाणात आहे. इतका; की जन्म झाल्यावर तेज महाभूताचे मूर्तिमंत रूप असलेल्या सूर्यालाच गिळंकृत करण्यास हनुमान झेपावले!! वायू हा प्रचंड सामर्थ्य असलेला आहे. मात्र; तो आपल्या शरीरासाठी उपकारक व्हावा याकरता त्याला आटोक्यात ठेवणे हे आवश्यक असते.
शरीरातील वात नियंत्रित ठेवण्याचा साधा-सोपा मार्ग म्हणजे दररोज अंघोळीपूर्वी कोमट तेलाचा अभ्यंग करणे. त्वचा हा अवयव सर्व शरीरव्यापी आहे. तेल हे वातावरील सर्वोत्तम औषध आहे. त्यामुळे नियमित अभ्यंग केल्यास वात आटोक्यात तर राहतोच; मात्र त्वचेचे रोगदेखील होत नाहीत. शिवाय शरीराला बळकटी येवून ते वज्राप्रमाणे कठीण होते. हनुमानाला शनिवारी तेल वाहण्याचा प्रघात आपल्याला अभ्यंगाचे महत्व तर शिकवत नसेल?!
हनुमान जयंतीला प्रसाद म्हणून सुंठवडा वापरला जातो. साधारणपणे सूंठ, पिठीसाखर आणि तीळ यांच्यापासून मिश्रणापासून हा सुंठवडा तयार केला जातो. सुंठीमुळे रुची वाढते, पचन सुधारते, सुंठ पचायला हलकी, वीर्याने उष्ण व विपाकाने मधुर असते, गुणाने स्निग्ध असते, तसेच आमवातात हितकर असते. सुंठ ही केवळ वात कमी करण्यास उपयुक्त आहे असे नसून ती ‘वृष्य’ आहे असे आयुर्वेद सांगतो. थोडक्यात काय; तर सुंठ ही पौरुषशक्ती वाढवणारी आहे. हनुमंत म्हणजे साक्षात पौरुषशक्तीच नव्हेत काय?
आणखी एक महत्वाची गोष्ट; हनुमान लंकेला जात असताना त्यांचा स्वेद हा समुद्रातील एका मगरीने प्राशन केला अशी कथा आहे. त्यापासून जन्माला आलेल्या हनुमंताच्या मुलाचे नाव ‘मकरध्वज’ असे असून तो एक अतुल्य सेनानी होता. अहिरावण-महिरावण यांसारख्या राक्षसांना त्याने पराजित केले होते. आयुर्वेदीय रसशास्त्रात ‘मकरध्वज’ नावाचे औषध असून; वैवाहिक सौख्यासाठी ते एक उत्तम औषध आहे. (अर्थात; या औषधांचा उपयोग वैद्यांच्या सल्ल्याशिवाय करण्याचा विचारदेखील करू नये!). पौरुषाची ही परंपराच या कथेतून मांडली जात नाही काय?
आयुर्वेदाने उत्तम आचार हे यशाचे साधन मानले आहे. बलवान आणि बुद्धिमान असूनदेखील प्रभू रामचंद्रांच्या चरणी विनम्र भाव ठेवणारे हनुमान आपल्याला उत्तम आचार कसे असावे याचीच शिकवण देत नाहीत काय?
आपले शास्त्र-परंपरा यातून काहीतरी आरोग्यसंदेश दडलेला आहे हे निश्चित. गरज आहे ती; त्याला डोळसपणे- श्रद्धेने नीट अभ्यासण्याची!! ‘नाही रे’ असे म्हणणे खूप सोपे असते. ‘आहे रे’ असे म्हणून ते सिद्ध करण्यातच खरी मजा आहे. आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपले शास्त्र आणि आपली संस्कृती यांप्रती सकारात्मक वृत्ती जोपासण्याची प्रतिज्ञा करूया.
© वैद्य परीक्षित स. शेवडे.
'श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद चिकित्सालय-औषधालय'; डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
April 14, 2015
‘एक सुंदर बोधकथा आहे. चिमणीच्या मुलीचे बारसे असते आणि या बारशासाठी चिमणी आपल्या सगळ्याच परिचितांना आमंत्रण देते. गोगलगायीलाही हे आमंत्रण मिळते.
April 23, 2006
4 रविवार, नोव्हेंबर 2007
पैसा, नाव कमाविण्याचे या जगात अनेक मार्ग, अनेक धंदे आहेत. अंगात फत्त* थोडा बेरकीपणा मुरवावा लागतो. तो मुरवला की बाकी कशाचीच काळजी करावी लागत नाही.
November 4, 2007
काही खास एक्स-रे ची माहिती
September 24, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti