(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • भारतात बनलेला पहिला संगीतप्रधान बोलपट

    भारतात बनलेला पहिला संगीतप्रधान बोलपट मुंबईच्या मॅजेस्टिक सिनेमामध्ये १४ मार्च १९३१ रोजी प्रदर्शित झाला.

    p-34645-alam-araइम्पिरियल मूव्हीटोन निर्मित, आर्देशीर इराणी दिग्दर्शित या हिंदी चित्रपटाचं नाव होतं ‘आलम आरा’! चित्रपटांमध्ये ध्वनीचे महत्त्व समजून इतर बोलपट प्रदर्शित होण्यापूर्वी इराणी यांनी आलम आरा प्रदर्शित केला. हा चित्रपट तेव्हा इतका लोकप्रिय झाला की, प्रेक्षकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी अक्षरश: पोलिसांची मदत घेण्यात आली होती.

    ‘आलम आरा’मध्ये पृथ्वीराज कपूर, मास्टर विठ्ठल, जुवैदा, जिल्लो आणि सुशीला यांनी भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाची कथा जोसेफ डेव्हिड यांनी लिहिली होती. या पहिल्या बोलपटाची लांबी १२४ मिनिटे इतकी होती. या चित्रपटात संगीताला उत्तम स्थान मिळाले होते. ‘आलम आरा’मध्ये एकूण सात गाणी होती. त्यापैकीच ‘दे दे खुदा के नाम पे’ हे भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिले गाणे मानले जाते. हे गाणे वजीर मोहम्मद खान यांनी गायले होते. ‘बदला दिलवाएगा या रब…, ‘रूठा है आसमान…’, ‘तेरी कातिल निगाहों ने मारा…’, ‘दे दिल को आराम…’, ‘भर भर के जाम पिला जा…’, आणि ‘दरस बिना मारे है…’ ही चित्रपटातील इतर गाणी आहेत.

    राजकुमार आणि बंजारनच्या प्रेमकथेवर आधारित असलेला हा चित्रपट एका पारसी नाटकावर आधारित होता. ‘आलम आरा’ पाहण्यासाठी पहिल्या दिवशी, पहिल्या शोच्या तिकीटासाठी चित्रपटगृहांबाहेर मोठी गर्दी जमली होती. लोकांना आवरण्यासाठी तेव्हा पोलिसांना बोलवावे लागले होते. त्यावेळी जे तिकीट चार आण्यात मिळत होते, त्याला लोकांनी ब्लॅकमध्ये पाच रुपयांत खरेदी केल्याचेही म्हटले जाते.

  • खेळ आकड्यांच्या

    • महाराष्ट्राचा अर्थसंकल्प १८ मार्च रोजी मांडला जाणार आहे.
    • दरडोई उत्पन्न आणि मानव विकास निर्देशांक यांच्या बाबतीतही महाराष्ट्राचा देशात अनुक्रमे तिसरा आणि सातवा क्रमांक लागतो.
    • गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सरासरी १० टक्क्यांनी वाढते आहे. सन २०१६-१७ मध्ये महाराष्ट्राचे सकल राज्य उत्पन्न मागील वर्षांपेक्षा १२ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे, तर सन २०१५-१६ मध्ये हीच वाढ १५ टक्क्यांनी अपेक्षित होती.
    • सन २०१४-१५ मध्ये महाराष्ट्राच्या सकल राज्य उत्पन्नाच्या ५.१५ टक्के एवढा निधी सामाजिक क्षेत्रावर खर्च करण्यात आला होता. हे प्रमाण २०१५-१६ मध्ये ४.८५ टक्के तर २०१६-१७ मध्ये ४.२९ टक्के होते. भारतातील सर्व राज्य सरकारे व केंद्र सरकार मिळून सामाजिक क्षेत्रावर जीडीपीच्या ९ टक्के खर्च करतात.
    • २०१४-१५ च्या अर्थसंकल्पाबाबत सुधारित अंदाजानुसार अर्थसंकल्पातील एकूण २३१ हजार कोटींपैकी राज्य सरकार केवळ १९७ हजार कोटी खर्च करू शकले, त्यातही सामाजिक सेवांसाठी केलेल्या ९० हजार कोटींपैकी केवळ ७९ हजार कोटी खर्च झाल्याचे २०१६-१७ च्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीमधून स्पष्ट झाले होते. २०१५-१६ वर्षांमध्येही शासकीय आकडेवारी पाहिली असता (१७ मार्च २०१६ अखेर) अनेक कळीच्या क्षेत्रांसाठीचा निधी वापरलाच गेला नसल्याचे दिसते. आरोग्यासाठीच्या निधीतील ७३ टक्के , शिक्षणासाठी ८३ टक्के निधी खर्च झाला.
    • महिला-बाल विकास विभागाच्या बजेटमध्ये २०१६-१७ मध्ये ६२ टक्के इतकी भयंकर कपात करण्यात आली. पुरवणी बजेटमध्ये त्यात वाढ झाली, पण तरीही २०१५-१६ च्या तुलनेत या वर्षी विभागाला मिळालेला निधी हा १०८२ कोटीने कमी होता. महाराष्ट्राच्या सर्व सामाजिक सेवांना मिळणाऱ्या बजेटच्या तुलनेत या विभागातील बजेट सर्वात कमी आहे.
    • तामिळनाडू सरकार २०१५-१६ या आर्थिक वर्षांत पोषणावर दरडोई रुपये ४२३ एवढा महसुली खर्च करीत होते, तर महाराष्ट्र सरकार याच आर्थिक वर्षांत केवळ २५४ रुपये दरडोई खर्च करीत होते.
    • महाराष्ट्राचा आरोग्यावरील दरडोई खर्च रु. ८५० हा राष्ट्रीय पातळीवर केल्या जाणाऱ्या खर्चापेक्षा रु. १२१७ पेक्षा बराच कमी आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत राजस्थान (रु. १६७२), छत्तीसगड (रु. १२८४), ओदिशा (रु. ९२५) ही राज्येसुद्धा आरोग्यावर जास्त निधी खर्च करतात. याचे उदाहरण म्हणजे २०१६-१७ मध्ये केंद्र शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे बजेट ३१४२ कोटी वरून २७१७ कोटींपर्यंत (४२५ कोटींची कपात) कमी केले आहे.
    • येत्या वर्षांत (२०१७-१८) आरोग्य सेवांचे बजेट ४०टक्क्यांनी वाढवण्याचे लक्ष ठेवले पाहिजे. म्हणजे महाराष्ट्र शासनाने १४,६०० कोटी इतका निधी सार्वजनिक आरोग्यावर खर्च करावा. याआधारे राष्ट्रीय दरडोई आरोग्य खर्चाच्या प्रमाणात १२०० रु. प्रतिव्यक्ती निधी उपलब्ध करावा आणि पुढील दोन वर्षांत राजस्थानइतका (दरडोई रु. १६७०), अर्थात आरोग्यावरील खर्च दुप्पट करण्याचे धोरण ठेवावे. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य सेवा पुरवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ, शहरी आरोग्य अभियान आणि सार्वत्रिक मोफत औषधे मिळण्याची सोय, यांची व्यवस्थित अंमलबजावणी होऊ शकेल.
    • महाराष्ट्र राज्याचा पहिला अर्थसंकल्प ११ जुलै १९६० रोजी तत्कालीन अर्थमंत्री बॅ. शेषराव वानखेडे यांनी सादर केला होता व तो होता १७१ कोटी ५६ लाख रुपयांचा. गेल्या वर्षी सादर झालेला राज्याचा अर्थसंकल्प होता दोन लाख कोटींचा. यंदा केंद्र सरकारने २१ लाख कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. म्हणजेच केंद्राच्या एकूण अर्थसंकल्पाच्या तुलनेत राज्याचा अर्थसंकल्प हा साधारपणे दहा टक्के आहे. राज्याचा ७०वा अर्थसंकल्प १८ मार्च रोजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार सादर करणार आहे.
    • आठ फेब्रुवारीला सरकारने जारी केलेल्या आदेशात विकास कामांवरील खर्चात २० टक्के कपात करण्यात आली आहे.
    • विक्रीकर, मुद्रांक आणि उत्पादन शुल्क हे राज्याचे तीन प्रमुख उत्पन्नस्रोत आटत चालले असताना ‘आस्थापना खर्च ६३ टक्के आणि व्याजफेडीपायी १५ टक्के’ ही खर्चाची स्थिती कायम राहणारच, अशी चिन्हे आहेत.
    • सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करायची झाल्यास १५ हजार कोटींचा ताण वर्षांला पडू शकतो.
    • अल्पभूधारकांचे कर्ज माफ करायचे तरीही राज्याचा १० हजार कोटींचा खर्च वाढू शकतो.
    • मद्यविक्रीतून यंदा १५ हजार कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. वित्त खात्याने जमा केलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारीअखेर १० हजार ३५० कोटीच जमा झाले आहेत. मार्चअखेर १२ हजार कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. गेल्या वर्षी (२०१५-१६) १२ हजार ५०० कोटींच्या आसपास महसूल उत्पादन शुल्क विभागाकडून मिळाला होता.
    • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गालगतची दारूची दुकाने किंवा परमिट रूम बंद करण्यात येणार आहेत. या आदेशामुळे राज्यातील एकूण ६३ टक्के दुकाने किंवा परमिट रूम बंद होणार आहेत. ३०० कोटींचे परवाना शुल्क, सात ते साडे सात हजार कोटींचा महसूल तसेच त्यावरील विक्रीकर असे एकूण राज्याचे पुढील आर्थिक वर्षांत १० हजार कोटींचे नुकसान अपेक्षित आहे.
    • व्यापाऱ्यांना खुश करण्याकरिता सरकारने गेल्या वर्षी घाईघाईत स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द केला. त्याची नुकसानभरपाई महापालिकांना देण्याकरिता सरकारच्या तिजोरीवर चालू आर्थिक वर्षांत सहा हजार कोटींपेक्षा जास्त बोजा पडला. वस्तू आणि सेवा कराची प्रत्यक्ष अंमलबजावणी केव्हा होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तोपर्यंत सरकारला दरमहा ५००ते ७०० कोटींचा बोजा सहन करावा लागेल.
    • जमा होणाऱ्या प्रत्येक एक रुपयातील फक्त ११ पैसे हे विकास कामांवर खर्च होतात’, अशी माहिती अर्थसंकल्पीय पुस्तिकेतच देण्यात आली आहे.
    • दरवर्षी २५ ते ३० हजार कोटी फक्त व्याज फेडण्याकरिता खर्च होतात. राज्याच्या एकूण अर्थसंकल्पाच्या आकारमानाच्या तुलनेत १० ते १५ टक्के रक्कम ही व्याज फेडण्यासाठी खर्च होत आहे.
    • केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही यंदापासून योजना व योजनेतर खर्च अशी विभागणी बंद केली जाणार आहे. याऐवजी भांडवली व महसुली खर्च अशी रचना करण्यात येणार आहे.
    • बॅ. वानखेडे यांच्याकडून सर्वाधिक अर्थसंकल्प सादर बॅरिस्टर शेषराव वानखेडे – १३ अर्थसंकल्प जयंत पाटील – १० अर्थसंकल्प सुशीलकुमार शिंदे – ९ अर्थसंकल्प अधिक राज्यमंत्री म्हणून दोनदा विधान परिषदेत अर्थसंकल्पाचे वाचन
    • ‘जीव्हीए’ म्हणजे सकल मूल्यवर्धन (ग्रॉस व्हॅल्यू अ‍ॅडेड) आणि ‘जीडीपी’ म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्न (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट)
    • ऑक्टोबर २०१६ ते डिसेंबर २०१६ मध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्न (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट- ‘जीडीपी’) सात टक्क्यांनी वाढल्यामुळे चालू आर्थिक वर्ष ३१ मार्च २०१७ रोजी संपेल तोवर या वर्षभरातील आपला आर्थिक वाढदर ७.१ टक्क्यांवर पोहोचलेला असेल असा निर्वाळा ‘केंद्रीय सांख्यिकी संस्था’ किंवा ‘सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑर्गनायझेशन (‘सीएसओ’) चे विद्यमान प्रमुख सांख्यिकी अधिकारी डॉ. टी. सी. अनंत यांनी दिला आहे.
    • २०१६-१७ या आर्थिक वर्षांच्या सुरुवातीला, यंदाचा वाढदर ७.६ टक्के असेल असा दावा सरकारने केला होता. तो आता निश्चलनीकरणानंतर ७ टक्के होणार असे जर आपण गृहीत धरले, तरीही त्यास अनिष्ट परिणामच म्हणायला हवे, कारण ०.६ टक्क्यांवर पाणी सोडणे म्हणजे आपल्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात नव्वद हजार कोटी रुपयांची घट होणे. जर हाच वाढदर साडेसहा टक्क्यांवर पोहोचला तर बसणारा फटका असेल १,६५,००० कोटी रुपयांचा.
    • ‘जीव्हीए’ म्हणजे सकल मूल्यवर्धन (ग्रॉस व्हॅल्यू अ‍ॅडेड) आणि ‘जीडीपी’ म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्न (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) या दोहोंचे आकडे केंद्रीय सांख्यिकी संस्थेतर्फे प्रकाशित केले जातात. यापैकी ‘जीव्हीए’ हे अनुमान असते आणि ‘जीडीपी’ मात्र कर-महसुलाची बेरीज आणि अनुदानांची वजाबाकी करून मग काढला जातो.

  • आयुष्याच्या निर्मितीचा रंग कोणता? ‘पांडु’रंग, ‘पांडुरंग’..

    आयुष्य निर्मितीचा खरा ‘रंग’ ‘काळ्या’तून जन्मलेला ‘पांढरा’ व पुन्हा ‘काळा’ हे मनोमन पटलं, आणि ‘पांडुरंगा’चा अर्थही पटतो..! ‘काळ्या’ विठ्ठलाला अन्यथा ‘पांडूरंग’ असं विजोड नांव का बरं दिलं असावं..!!

  • शिक्षित अडाणी

    युनिव्हर्सिटी कॅम्पसच्या बाहेर एक भाजी विक्रेता फुटपाथवर जवळपास पंचवीस प्रकारच्या भाज्या विकायला बसतो. भाजी घेणाऱ्यांची तोबा गर्दी असते, साधारण वाडीकडे जाणारे सर्व लोक यांच्याकडूनच भाजी घेतात, याचे प्रमुख कारण भाजी बाजारभावापेक्षा स्वस्त असते. सर्व दुचाकी व तुरळक चारचाकी पण इथे थांबून भाजी घेऊन पुढे जातात, हा विक्रेता भाजी घेणाऱ्या प्रत्येकाला एका भाजीला एक प्लास्टिक पिशवी देतो, साधारण एक व्यक्ती तीन ते सहा प्लास्टिक पिशव्या घेऊनच इथून निघतो, हि सर्व मंडळी स्वतःला शिक्षित समजतात, हा एक मोठा गैरसमज आहे हे याना समजत नाही.

    ऑफिस मधून घरी जाताना आज भाजी संपली आहे असा साक्षात्कार नक्कीच होत नसणार. सकाळी घरून निघताना भाजीसाठी दोनतीन कापडी पिशव्या घेऊन निघावे, इतके न समाजण्याइतके हे लोक निर्बुद्ध आहेत का? असा प्रश्न यांच्याकडे पाहिल्यावर मला नेहेमी पडतो. हा भाजीवाला दररोज अंदाजे 800 ते 1000 प्लास्टिक पिशव्या लोकांना देतो, यात चूक त्याची का घेणाऱ्यांची.

    हे सर्व शिक्षित लोक आहेत यात शंका नाही, सुशिक्षित मात्र नक्की नाहीत. एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा, याच पिशव्यांचा सर्वात मोठा कचरा आज होत आहे, हे सर्व या मध्यमवर्गीय लोकांना माहित असून देखील, असे का वागतात याची चीड व किव येते. हे चित्र फक्त नागपूर शहराचे नाही, तर पूर्ण देशाचे आहे, असे म्हणू शकतो कि ल्युटिन पासून लालभाई च्या घरापर्यंत समान चित्र आहे. देशात या पिशव्यांचा दररोज सहा हजार टनापेक्षा जास्त कचरा होत आहे, जो नष्ट करण्यासाठी किव्वा शहराबाहेर फेकण्यासाठी स्थानिक नगरपालिकेच्या सरकारला त्या पासून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या कैकपट जास्त खर्च करावा लागतो.

    सरकार या पिशव्या बाजारात येतात हे माहित असून देखील काहीही उपाययोजना का करत नाही? याचा अर्थ बड्या अधिकाऱ्यांना, तसेच निवडून आलेल्या नेत्यांना हप्ते जातात, हे न समजायला आम्ही आंधळे नाही. कदाचित याच राजकारण्यांचे अश्या पिशव्या बनवायचे कारखाने असू शकतात. यातून हे हि लक्षात घ्यावे लागेल कि केंद्र सरकार, राज्य सरकार, नगरपालिका प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा अश्या अर्थाच्या जाहिराती कर देणाऱ्या लोकांचे करोडो रुपये खर्च करून रेडिओ, टीव्ही, पेपर मधून देतात, हि आमच्या डोळ्यात धूळफेक आहे, हे आता समजू लागले आहे. अश्या जाहिरातीवर खर्च करून स्वतःच्याच तुमड्या भरणे सुरु आहे, हे हि आता जगजाहीर होत आहे.

    मोदी सरकारचा आता तीन वर्षाचा कार्यकाळ संपत आला आहे, स्वच्छ भारत अभियानावर अमाप पैसा खर्च झाला, मोदीजींनी ठरवले तर एकदिवसात प्लास्टिक पिशव्या बनवणारे कारखाने बंद पडू शकतात, मग ते का करत नाहीत? मी म्हणत नाही कि त्यांचे हात हि बरबटलेले असतील, पण मग त्यांना कठोर निर्णय घेण्यापासून कोणते कारण थांबवत आहे? का सत्ता कोणाचीही असो, सूत्रधार अंबानीच असणार, असे तर चित्र नाही ना?

    हा लेख समाज धुरिणींच्या माध्यमातून सरकार दरबारी पोहोचावा अशी आशा करतो. इंग्रजीमध्ये म्हण आहे, More the things change more they remain the same.

    असेच काहीसे अनुभव आजकाल येऊ लागले आहेत, याची डोळस नेत्यांनी नोंद घ्यावी हि विनंती.

    -- विजय लिमये

  • शिवरायांचे “८” वावे रूप

    या आमच्या आराध्य दैवताची कीर्ती दिगदिगंत “अष्ट्”दिशांना पसरत राहो

  • देशासमोरची बहुआयामी सुरक्षा आव्हाने

    गेल्या काही दिवसात भारतावर विवीध दिशांनी व मार्गांनी हल्ले करण्यात आले. या वरुन देशासमोरचीसुरक्षा आव्हाने किती गंभीर आहेत हे लक्षात यावे.‘जेएनयू’मध्ये देशविरोधी घोषणा देण्याबद्दल देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या उमर खालिदला रामजस महाविद्यालयात बोलावण्यावरून सुरू झालेल्या आंदोलनामुळे दिल्ली ढवळून निघाली

  • माझी माय मराठी !

    काल परवा कुणीतरी मराठी भाषा मरणाच्या उंबरठ्यावर...... मराठी मराठी करणारांच्या नाकाला मिरच्या झोम्बाव्यात असे वादग्रस्त विधान करून खरं तर मराठीविषयी परखड मत मांडले. आपल्याला मराठी सही करण्याची देखील लाज वाटणारांनी मराठी भाषा अस्तित्वात राखण्याऐवजी व्यवहारशून्य भाषा अशी अवहेलना करण्याचे धारिष्ट्य दाखविले आहे.

    महाराष्ट्र शासन व्यवस्था इंग्रजीच्या आहारी गेलेली आहे. अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थीची यादी इंग्रजीतून प्रसिध्द केलेली आहे. पोट भरण्याची मारामार, गरीब, गरजू आणि ग्रामीण भागातील ज्यांना साधं मराठीचं ज्ञान अवगत नाही.त्यांना इंग्रजीचा आधार घेऊनच सुविधा प्राप्त होणार असतील तर आपले सत्ताधारी मराठीच्या नावाने २७ फेब्रुवारीला ज्येष्ठ साहित्यक, नाटककार, व कविश्रेष्ठ वि वा शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्ताने मराठी भाषा दिन साजरा करतील .’जय हो’ चा उद्घोष करीत मराठीचा गुलाल या दिवसापुरता सर्वत्र उधळेल.

    आम्ही मराठी माणसे इंग्रजीच्या इतके आहारी गेलेलो आहोत की, मराठी भाषा लिहिणे ,वाचणे, बोलणे वा तिच्या अभ्यासासाठी आणि जीवन व्यवहारासाठी माध्यम म्हणून उपयोग करणे यात आपल्याला अभिमान किंवा गौरवास्पद वाटण्यापेक्षा कमीपणा वाटत आहे. संत ज्ञानेश्वरांनी “ती अमृतालाही जिंकणारी भाषा आहे “ हे मराठीला दिलेले सुवर्ण रत्नजडित प्रशस्ती पत्र.

    एखाद्या “शिंपी कामाचे दुकान’ या ऐवजी ज्ञानेश्वर अथवा तुकारामासारख्या संताचे नाव देऊन टेलरिंग फर्म अस्तित्वात येते. इंग्रजी भाषा हि जगातील एक समर्थ, सुंदर, संपन्न,महत्वाची रसाळ भाषा आहे. या बद्दल दुमत नाही. त्या भाषेचा मत्सर करण्याचे कारणही नाही. इग्रजीशिवाय जगात ज्ञान मिळत नाही. इंग्रजी ज्ञानभाषा आहे.हे आपण बहुतेक जन सांगताना आढळतात, इतर सर्व भाषा अज्ञानभाषा आहेत का....? पण अवास्तव महत्व देण्याचे कारण काय....?

    कुटुंबातील आईची जागा हि आईचीच आणि मावशीचीच जागा मावशीला हे अलिखित सूत्र आहे त्या प्रमाणे भाषेबाबतही असले पाहिजे. मुंबई शहरात मराठींच्या शाळा ओस पडताहेत. इंग्रजी शाळा अव्वाच्या सव्वा देणगी, फी आकारून गब्बर होत आहे. श्रमजीवी, कष्टकरी समाजाला दोन वेळेच्या अन्नाची भ्रांत तरी देखील पोटाला चिमटा काढून पालक पाल्य इंग्रजीत शिकला पाहिजे हा अट्टाहास का करताहेत...? हि स्पर्धा महाराष्ट्रातील शेतमजुराला,कामगारांना परवडणारी नाही. इंग्रजी शिडीचा आधार घेऊन गरीबांचा फायदा तर नक्की नाही. मुंबई शहरात मराठी शाळा आहेत. त्यामध्ये इंग्रजीचे अध्ययन होत आहे. या शाळांमध्ये गरीब वा अशिक्षित पालकांच्या मुलांना थारा नाही. पाल्याच्या प्रवेशापूर्वी पालकांची मुलाखत घेऊन त्यातून प्रवेश ठरविला जातो. जे पालक मुळात अशिक्षित आहेत त्यानी कधी शाळा कॉलेज पाहिले नसेल त्यांना, त्यांच्या मुलांना उच्चभ्रू वस्तीतील शाळा प्रवेश नाकारून नेमके काय साध्या करतात......? मराठी बरोबर इंग्रजीचा उत्तम अभ्यास आजच्या तरुण पिढीने करावा. पण इंग्रजी माध्यमात मराठीला दुजाभाव देऊन नाही.

    कवी सुरेश भट यांच्या खालिल रचनेतून आपणास बरेच काही उमजले असेलच.

    पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी !

    आपुल्या घरात हाल सोसते मराठी !!

    मराठीची महती आपण गातो, प्रसार करतो. मराठीचा ठसा सर्वत्र उमटविण्याचा प्रयत्न करतो. पण शासन याबाबत किती उदासीन आहे. महापालिका , नगरपालिका मराठी संदर्भात किती बेफिकीरीने वागतात. मंत्री,आमदार, खासदार, नगरसेवक अन्य लोकप्रतिनिधी चे इंटरनेटवर ईमेल आहेत. किती तरी लोक त्यावर त्यांच्याशी सर्व सामान्य विषयावर मराठीतून हितगुज करू पाहतात. समस्यांचा उहापोह करू इच्छितात . समस्या निवारणाचा हेतू असतो. पण कोणता प्रतिनिधी त्याची दखल घेतो ? आता पर्यंत त्यांनी कुणाला उत्तरे दिली आहेत. आम्ही आपल्या प्रश्नावर कार्यवाही करू ….! कुणी तरी कळवीत आहे का....? संगणक प्रणाली वरून जर लोकप्रतिनिधीना लोकांशी सुसंवाद साधण्याचे साधन उपलब्ध झाले असेल तर काय हरकत आहे. मराठी पत्रे आली तर त्या संगणकांवर त्या प्रकारचा font असावयास हवा. आपण इतके गांभीर्याने का घेत नाही . मंत्रालयातील मुख्यमंत्री असो वा मंत्री साधी पोहच पावती देणे देखील जीवावर येते.

    मी मराठी आणि माझा महाराष्ट्र मराठ्यांचा …छे इतके मराठी संदर्भात गंभीरतेने घेतले असते तर मात्र आपण मराठी भाषेच्या प्रगतीत मागासलेले नसतो. “पिकते तेथे विकत नाही” असे म्हणतात . तसेच महाराष्ट्रात राहून मराठी भाषेचे महत्व जाणवत नाही. आई समोर असताना आईचे महत्व जाणवते का...? आपण तिच्या पासून दूर जातो तेव्हा तिचे महत्व कळते. माणसाच्या जीवनात मातेचे स्थान जेवढे परमोच्च असते तेवढेच मातृभाषेचे असावयास हवे. पण आज आपल्या मातृभाषेसंदर्भात जे चित्र दिसत आहे ते दुर्दैवाने फार वेगळे आहे.

    आपल्याच प्रांतात आपल्याच भाषेचे वर्चस्व असले तर इतर आपल्याशी नमून वागतील. हेच जर तुम्ही दक्षिणेत तुमच्या मातृभाषेत अथवा राष्ट्रभाषेत विचारले तर ते त्यांचा खाक्या काय असतो ते दाखवितात की नाही. अहो...! सध्या जन्मलेल्या मुलांना आई ऐवजी मम्मीचे ढोस पाजणारे संस्कृतीदर्शन मराठी भाषा संवर्धनासाठी उपयुक्त नाही. मराठी भाषा हे संवाद आणि सांस्कृतिक देवान घेवाणीचे माध्यम. आपल्या मुलांवर आपल्या भाषेचे संस्कार जितके अधिक विकसित करू तितक्या सहजतेने मुले ज्ञान ग्रहण करतील. आपल्या भाषेविषयी आपण मराठी बांधवांचे हित, खऱ्या अर्थाने येथील संस्कृती, भाषा यांचा वारसा जपण्यासाठी, स्वाभिमान दर्शविण्यासाठी माझ्या माय मराठीला सर्वोच्च स्थान मिळविण्यासाठी आग्रह धरला पाहिजे.

    जगाच्या कानाकोपरयात मराठीला घेऊन जाणे मुश्किलीचे नाही आणि नसणारही. फक्त इच्छा हवी ती आपल्या राज्यकर्त्याकडे नाही. काही झाले तरी सर्व स्तरावर मराठीचा अभ्यास व्हायला पाहिजे. इंग्रजी प्रमाणे मराठी भाषेची अत्यंत निकड आहे. जेव्हा मातृभाषेवर प्रभुत्व असेल तेव्हाच परकीय भाषेवर प्रभुत्व मिळविता येते. मातृभाषा, राजभाषा हेच खरे राष्ट्राचे मानदंड . लोकभाषा लोकशाहीचा कणा. भाषिक विद्वानांना परिचित आहे. पण शासन प्रणालीला हे कोणी सांगायचे...!

    -- श्री अशोक भेके,
    घोडपदेव

  • आहारातील या ‘१०’अन्नघटकांनी वाढवा तुमचे हिमोग्लोबिन

    हिमोग्लोबिन हा रक्तातील अतिशय महत्त्वाचा घटक असून, तो ‘आयन’ (लोह) आणि ‘प्रोटीन’ (प्रथिने) यापासून बनलेला असतो. रक्‍तामध्ये 12 ते 14.5 मिली इतके हिमोग्लोबिनचे प्रमाण आवश्‍यक असते. मात्र अनेक जणांमध्ये हे प्रमाण कमी असल्याने ते एनिमियाच्या बळी पडतात. मग अनेकदा आयन आणि प्रोटीन वाढवण्यासाठी डॉक्टर गोळ्या देतात , मात्र त्याने तात्पुरते हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. पुन्हा हळूहळू हिमोग्लोबिन खाली जाते, अशावेळी तुमच्या सकस आहारातील काही पदार्थ नैसर्गिकरित्या तुमचे हिमोग्लोबिन वाढवतात पहा कोणते आहेत हे घटक…

    १) पालक -

    पालकचा तुमच्या आहारात समावेश असणे अत्यंत महत्वाचे आहे. पालकमुळे रक्तातील ‘आयन’ (लोह) वाढवण्यास मदत करते . सुप्स , भाजी ,पालक वडे , आमटी किंवा सलाड अशा कोणत्याही स्वरूपात पालक खाणे हितावह आहे. पालकवर लिंबू पिळल्याने त्यातील आयन (लोह) अधिक चांगल्याप्रकारे ग्रहण होते.

    २) संत्र -

    संत्र्यामधील व्हिटामिन सी आणि व्हिटामिन बी ६ रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत करते . रोज किमान २ ग्लास संत्र्याचा रस प्या मात्र त्यात साखर टाकू नका.

    3) दुध आणि दुग्धजन्य पदार्थ -

    आहारात नियमित किमान ग्लासभर दुध व दुग्धजन्य पदार्थ असणं फार महत्त्वाचे आहे. दुधात शरीराला पूरक अनेक ‘मिनरल्स’( खनिजं )व ‘व्हिटामिन्स’ असल्याने दुधाला पूर्णान्न म्हणतात. दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने रक्तातील हिमोग्लोबिन वाढते.

    4) खजूर

    काळा आणि लाल अशा दोन स्वरूपात बाजारात खजूर उपलब्ध आहे. खजूर हे आयन (लोह) प्रमाणेच ‘व्हिटामिन सी’ व ‘व्हिटामिन बी’ वाढवण्यास मदत करते. खजुराच्या सेवनाने लाल रक्तपेशींची निर्मिती वाढते , परिणामी हिमोग्लोबिन वाढते.खजूर नुसताच खाण्याबरोबरीने त्यापासून तयार केलेली बर्फी , लाडू किंवा चटणी असे विविध पदार्थांमार्फत तुम्ही खजूर खाऊ शकता .

    5) गूळ -

    भारतीय स्वयंपाकघरात अगदी सहजतेने गूळाचा वापर केला जातो .आयुर्वेदात गुळाला ‘औषधीय शर्करा’ म्हणून संबोधलं जाते. गूळ लोह्वर्धक असून उत्तम स्वास्थ्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. गूळाच्या नियमित सेवनाने रक्तातील हिमोग्लोबिन तर वाढते त्याचबरोबर शरीरात रक्ताचं प्रमाण वाढते आणि त्वरित उर्जा मिळते . दररोजच्या जेवणात साखरेऐवजी गूळ वापरणे अधिक हितावह आहे.

    6) डाळींब -

    शारीरिक स्वस्थ्याप्रमाणेच सौदर्य खुलवण्यासाठी डाळींबाचा प्रामुख्याने आहारात वापर केला जातो. डाळींबातील लोह्वर्धक व मुबलक प्रमाणात आढळणारे व्हिटामिन सी चे प्रमाण रक्तातील हिमोग्लोबिन वाढवते. आठवड्यातून तीन ते चार वेळेस डाळींबाचा रस घेतल्यास तुमचे हिमोग्लोबिन नक्कीच वाढेल .

    7) फरसबी

    प्रोटीन, कॅल्शियम, आयन (लोह), सल्फर (गंधक), फॉस्फरस तसंच व्हिटामिन ‘ए’ असलेली फरसबी ही पोषकतेच्या दृष्टीने उत्तम भाजी आहे.यामधील फॉलिक अॅसिडमुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे योग्य प्रमाण राखण्यास मदत होते. फरसबीची भाजी अथवा कोशिंबिरीत फरसबीचा वापर आठवड्यातून दोनदा केल्याने तुमचे हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात राहील.

    8) मांसाहार -

    शाकाहाराबरोबरीने मांसाहारानेदेखील तुमचे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवता येते . चिकन , मटण , अंडी , मासे यामधील व्हिटामिन ‘बी १२’ व व्हिटामिन ‘बी ६’ रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतात. मात्र मांसाहार करताना ते योग्य प्रकारे शिजवा व योग्य प्रमाणात खा .

    9) पिस्ता -

    सुक्या मेव्यात व्हिटामिन ‘बी ६’ चे प्रमाण अधिक असते, मात्र विशेषतः ‘पिस्ता’ सर्वाधिक प्रमाणात शरीराला व्हिटामिन पुरवते. त्यामुळे लाडू , शिरा ,हलवा खीर यांसारख्या गोड पदार्थांमध्ये पिस्त्याचा वापर वाढवा. पिस्त्यातील व्हिटामिन ‘बी ६’ रक्तातील हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात राखण्यास मदत करतात.

    10) गरम मसाला -

    भारतीय खाद्यसंस्कृतीचे खरे वैभव आहे यामध्ये वापरले जाणारे ‘मसाले’ ! तुमच्या जेवणात तमालपत्र , कोथिंबीर , पुदिना , तुळशीची पाने यांचा योग्य वापर ठेवा . हे मसाले आहारातील ‘लोह’ योग्य प्रमाणात ग्रहण करतात त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण राखण्यास मदत होते.

    -आरोग्य धनसंपदा

  • इंद्रिये अवयव आणि आहार – भाग एक

    आपल्या पचनाचा प्रत्येक इंद्रियांशी संबंध असतो. पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये आणि मन यांचा पचनाशी कसा संबंध असेल ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

    या सगळ्यांमधे महत्त्वाचे आहे, मन ! मनामार्फत अनुभूती येत असते. जर हे मनच जागेवर नसेल, तर आपण काय खातोय, त्याची चव कशी असणार, हे अनुभवले नाही, तर त्याचा होणारा परिणाम वेगवेगळा होणार.

    जेवताना, खाताना टीव्ही बंद असावा, असे जेव्हा वारंवार आई ओरडते, तेव्हा नेमके काय बदल होतात, जे पचन बिघडवतात ? हे समजून घेतले तर जेवताना लक्ष जेवणातच राहील. जसे शिकवताना लक्ष शिक्षकांकडे असेल तरच शिकवलेले डोक्यात जाते, नाहीतर इकडून तिकडे शब्द धावत सुटतात. त्याचा अर्थ मनामार्फत इंद्रियापर्यंत पोचतच नाही.

    रसग्रहण नावाचा शब्द साहित्य क्षेत्रात वापरला जातो. तो मुळात आहारशास्त्रातील आहे. गोड, आंबट, खारट, तिखट,कडू आणि तुरट या सहा रसांचे ग्रहण कधी होईल, जर माझे मन जाग्यावर म्हणजे जेवताना, जेवणाच्या ताटावर असेल तर. वेळ मिळेल तसे मी जेवून घेतो, मी डबा खातो, कामात गुंतलो तर लागलेली भूक लक्षात सुद्धा येत नाही, काही वेळा कधी पोट भरलंय, हे पण कळत नाही. अशी अवस्था असणाऱ्यांनी जरा सावध रहायला हवे, कारण यांचे पचन हमखास बिघडते. आणि हीच छोटी छोटी कारणे पुढे काट्याचा नायटा करतात.

    जेवणाचा डबा न्यावा लागणं ही गरज आहे, कोणी हौस म्हणून डबा नेत नाही. शाळेची सहल हा या हौसेला अपवाद असायचा. सहलीला न्यायच्या डब्याची गंमत काही औरच असायची....
    आता यातून आनंद मिळवत जेवलो तर खाल्लेल्याचं पचन होणार. नाहीतर अगदी प्रेमळ बायकोच्या हातचा, प्रेमानं बनवून दिलेला, डबा जर मनापासून खाल्ला नाही तर पचन पूर्ण होणार नाही.

    डबा कसा खाल्ला तर आनंद जास्त मिळेल? विचार करून पहा. काही कारणाने कामावरून, जेवणाच्या वेळीच घरी आलोय, सकाळी भरून दिलेला डबा सोबत आहे, तर तो डबा आपण कसा खाऊ ? तर नेहेमी जेवतो ते ताट समोर घेऊ, डब्यातले जे काही एक दोन जिन्नस असतील, ते ताटात वाढून घेऊन जेवायला सुरवात करू. आणि छान शांतपणे जेवू. डबा तोच आहे. आपणच वाढून घ्यायचा आहे, पण ताटात वाढून घेऊन जेवलो तर मिळणारा आनंद वेगळा असतो.

    म्हणजे डब्यातल्या डब्यात जेवणे, आणि ताटात वाढून जेवणे यात फरक आहे. ताटात वाढून जेवण्यात जे समाधान मिळते, ते डब्यातल्या डब्यात बुचकून खाण्यात मिळत नाही.

    अर्थात काही भगिनीना, डबा खाणं हे तेवढंच आनंददायी वाटतं.
    रोजच्या रांधा वाढा... या चक्रातून सुटका तर मिळते तिला ! उरलं सुरलं काढून ठेवणे नाही, ओटा टेबल पुसायला नको, पुढची आवराआवर करावी लागत नाही....

    रोज डबा खाण्याची जागा जरी घर नसली, तरी डब्यातील सर्व पदार्थ ताटात वाढून जेवण्यातला आनंद तर आपण घेऊ शकतो ?

    एका ताटाचा तर प्रश्न आहे, तेवढे एक ताट काम करतो तिथे ठेवून द्यायचे की झाले. तेवढेच समाधान !!

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    16.03.2017

  • आंगणेवाडीची श्री भराडीदेवी

    मालवणपासून १५ कि.मी. अंतरावर असणार्या मसूरे या गांवातील बारा वाड्यांपॆकी आंगणेवाडी ही एक वाडी आहे. पण श्री भराडीदेवीच्या प्रसिद्धीमुळे आंगणेवाडी हे एक गांवच असल्याचा समज सर्व-सामान्य लोकांमध्ये निर्माण झालेला आहे.

    p-34368-bharadideviश्री भरडीदेवीच्या महात्म्यामुळे आंगणेवाडीला हे महत्व प्राप्त झालेले आहे. साधारणत: ३०० वर्षापूर्वी देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली असल्याचं सांगण्यात येतं. पुण्याचे पेशवे श्रीमंत चिमाजी आप्पांनाही मोहिमेमध्ये भराडीदेवीचा कृपाशिर्वाद लाभल्यामुळे त्यांनी २२ हजार एकर जमीन या मंदिराला दान दिली होती. इतर अनेक प्रचलित कथांप्रमाणे या देवीची कथा आहे. आंगणे नामक ग्रामस्थाची गाय नेहमी रानातील एका विशिष्ठ ठिकाणी एका पाषाणावर पान्हा सोडत असे. एके दिवशी तो रानात गेला असता सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याच दिवशी, देवीने त्याला स्वप्नात दृष्टांत दिला आणि आपण तेथे प्रकट झाल्याचे सांगितले. आणि तेव्हापासून सर्वजण त्या पाषाणाची पूजा करु लागले. 'भरड' भागातील एका राईत ही स्वयंभू पाषाणरुपी देवी अवतरली म्हणून तिला भराडीदेवी असे म्हणतात. या देवीची एक आख्यायिका सांगितली जाते कि, ही देवी तांदळाच्या वड्यातून भरडावर प्रकट झाली म्हणून आजही आंगणे मंडळी गावात आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून तांदळाचे वडे देतात व तेथेच खायला सांगतात. ते वडे तेथून आपल्या घरी आणता येत नाहीत.

    देवी जशी वड्यातून आली तशी ती वड्यातून बाहेर गेली तर ? अशी भिती वाटत असल्यामुळे ते प्रसादाचे वडे बाहेर नेऊ देत नाहित. असे या नवसाला पावणार्या देवीचे महात्म्य दिवसेंदिवस वाढतच आहे. जत्रोत्सवाला तर भाविकांचा पूरच येतो.
    या देवीचा जत्रॊत्सव साधारणपणे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यातून होतो. विशेष म्हणजे जत्रा विशेष तिथीवर अवलंबून नसून ती वेगळ्या प्रकारे ठरवली जाते. देवदिवाळी झाल्यानंतर देवीचा डाळप विधी (मांजरी बसणं) होतो. या विधीमध्ये आंगणेवाडीतील ठरावीक ठिकाणी पुजारी, गुरव, आंगणे कुटुंबीय व इतर यांसह सहभोजन केलं जातं, या वेळी जत्रेचं नियोजनही ठरवलं जातं. हा विधी झाल्यानंतर मानकरी तांदूळ लावून देवीला कौल लावतात. ‘‘शिकारेक संपूर्ण गाव जमतोलो, शिकार करुक तू हुकुम दे, शिकार साध्य करून दी...’’ असे गार्हाणे घालून कौल लावला जातो. पाषाणास तांदूळ लावून उजवा कौल मिळण्याची वाट बघतात. एकदा कौल मिळाला, की सात ते आठ जणांचा गट करून जंगलात रान उठवले जाते. यालाच ‘रान धरणं’ असं म्हटलं जातं.जोपर्यंत शिकार मिळत नाही तोपर्यंत पुढील काम होत नाही.पारध म्हणून डुकराची शिकार झाल्यानंतर, या शिकारीची गावातून मिरवणूक काढली जाते.

    मंदिराच्या उजव्या बाजूला पातोळी आहे. तिथे डुकराचे मांस सुटे करून ‘कोष्टी’(प्रसाद) म्हणून वाटले जाते. या पारधीनंतर पुन्हा देवीचा कौल घेतला जाऊन जत्रेची तारीख निश्चित केली जाते. गावाबाहेर इतरत्र असलेल्यांना या जत्रेची तारीख जाहीर होण्याबाबत प्रचंड उत्सुकता असते.

    नवसाला पावणारी म्हणून देवीची ख्याती असली तरी कोंबड्या-बकर्यांच्या बळीचे नवस मात्र यात्रेमध्ये आढळत नाही. देवीला सोन्या-चांदीच्या नाण्यासह ओटी भरणे, साडी चोळी, नारळाचे तोरण घातले जाते.उत्सवादिवशी देवीची स्वयंभू पाषाण मूर्ती अलंकारांनी सजविली जाते. या पाषाणास मुखवटा घालून
    साडीचोळी नेसविली जाते. संपूर्ण अलंकार धारण केलेलं देवीचं रूप मनात घर करून जातं. जत्रेच्या पहिल्या दिवशीच पहाटे तीन वाजल्यापासून भाविकांच्या ओटय़ा भरण्यास प्रारंभ होतो. या दोन दिवसीय उत्सवामध्ये देवीचं रूप अवर्णनीय दिसतं. देवीची ओटी खणानारळानं, तर नवस तुळाभारानं फेडले जातात. ज्याचा नवस असेल त्याच्या वजनाएवढी साखर, नारळ, गूळ, तांबे याची तुलाभार करून देवीला वाहिली जाते. तुलाभार हा नवसाचा प्रकार पाहण्यासाठी झुंबड उडालेली असते.याशिवाय आगळावेगळा नवस म्हणजे भिक्षा मागण्याचा. जत्रेच्या दिवशी कडक उपवास करून रात्री देवीला दाखवलेल्या प्रसादापैकी शिते भिक्षा मागून ग्रहण केली जातात. त्यानंतरच उपवास सोडला जातो.यात्रेदिवशी रात्री नऊनंतर देवीचे दर्शन बंद केले जाते. मंदिराची साफसफाई झाल्यावर देवीसमोर नैवेद्याची ताटं लावण्याचा (देवीचा महाप्रसाद) हा कार्यक्रम असतो.हा मान आंगणे समाजातील कुटुंबांचा असतो. उत्सवाच्या दिवशी आंगणे कुटुंबीय उपवास करतात. आंगणेच्या प्रत्येक घरातील एक सुवासिनी प्रसादाची ताटे घेऊन मंदिराकडे येतात. त्या उत्सवात सामील होणार्या आंगणे कुटुंबीयांच्या लेकी व सुनांनी ओटीचे सामान (खण, नारळ इत्यादी) व नवस असेल तर साडी आपल्या सोबत आपल्या घरूनच घेऊन यावे, अशी पूर्वापार प्रथा आहे.

    जत्रेच्या दिवशी रात्री हा विधी झाल्यानंतर आंगणे कुटुंबीयांच्या घरी महाप्रसाद घेऊन हा उपवास सोडला जातो. जत्रेचा दुसरा दिवस हा मोड जत्रेचा असतो. या दिवशी इतर ग्रामस्थ देवीची ओटी भरून दर्शन घेतात. मसुरे पंचक्रोशीचं आराध्य दैवत असलेल्या या भराडी देवीची ही जत्रा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्याचा योग वर्षातून एकदाच लाभतो.