वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आजच्या काळात निदान भारतात तरी कोणतेही क्षेत्र भ्रष्टाचाराच्या विळख्यातून सुटलेले नाही. शिक्षणक्षेत्र पुण्याचे आणि ज्ञानदानाचे कार्य सर्वश्रेष्ठ मानले जाते. शिक्षणाने माणसाचा उद्धार होतो आणि तो नीती-अनितीमधील फरक ओळखू शकतो असा गैरसमज सर्वत्र आढळून येतो, पण आज शिक्षणाच्या नावाखाली केवळ तुंबड्या भरण्याचे काम सुरू आहे.
मानवाच्या वाढत्या गरजा, चैन, भोगवाद, चंगळवाद आणि जगण्याच्या नाना तऱ्हा तसेच वाढलेल्या सत्ता स्पर्धा त्यातून निर्माण झालेले कलह, लढाया आणि त्याला तोंड देता देता पर्यावरणाचा झालेला ऱ्हास भविष्यात आरोग्याच्या चिंता निर्माण केल्याशिवाय राहणार नाहीत.
येवले – औरंगाबाद मार्गावर, म्हणजे येवल्या पासून तेरा मैलावर कोटम हे गांव असून, या ठिकाणी “महालक्ष्मी”, “महासरस्वती” व “महाकाली” या तीन देवींची मंदिरं आहेत.
" आगडदुम नगारा सोन्याची जेजुरी " ह्या ओळी गाणे बनून सगळे कडे घुमत आहेत, Groups वर गाणे share होत आहेत . पण ह्या ओळी नक्की काय आहेत हे समजून घेउ...
जेजुरी ला गेल्यावर तळी-भंडार हा आवशक विधी त्याचे हे बोल/ मंत्र आहेत. दर्शन झाल्यावर कुळाचार म्हणून तळी भरली जाते. एका तबकात किंवा मोठ्या कपड्यात , विड्याची पाने , खोबरं , लाह्या , सुपार्या , दक्षिणा , भंडारा इत्यादी घेऊन त्याला विषम संख्येतील पुरुष हाताने उचलून सतत वर खाली करतात हि कृती सदानंदाचा येळकोट म्हणत केली जाते . येळकोट हा कानडी शब्द आहे कानडी मध्ये येळू म्हणजे ७ आणि कोट म्हणजे कोटी , खंडेराया सोबत मणि-मल्ला शी युद्ध करताना ७ कोटी सैन्य होते , सदानंद हे खंडेरायाचेच एक नाव . ह्या सात कोटी सैन्या वरून संदानादाचा येळकोट हा गजर रूढ झाला .
हे झालं तळी भंडार .
आत्ता खंडोबा विषयी थोडेसे ,
खंडोबा हे भगवान परमशिवाचेच स्वरूप होय मार्तण्ड भैरव असेही म्हंटले जाते. खंडोबा हा मुळचा कन्नड प्रांतातला , वीरशैव पंथातील दैवत . कानडीत खंडोबाला मैलार किंवा मैलारलिंग संबोधले जाते. ह्याचा सासर नेवासे गावचा . लग्न ठरलेलं असताना सुद्धा खंडेरायाने स्वतःच्या होणार्या पत्नी ला पळवले आणि तिच्याशी गांधर्व-पद्धतीने विवाह केला.
पुढे शिकारी ला गेल्यावर देव खंडोबा धनगरांच्या वस्तीत आला . तिथे त्याच प्रेम बाणाईशी जडले. तिच्याशी लग्न करून खंडेराय जेजुरी ला आले, पण म्हाळसाबाई ला हे लग्न मान्य नव्हते त्यांच्यात भांडण सुरु झाले , खंडोबा त्यांचे भांडण बघून हसू लागतो , ह्या प्रसंगाला अनुसरून बरीच लोक-गीते आणि जागरण गीते लिहली गेली आहेत , पुढे ,बाणाईची स्वतंत्र व्यवस्था खंडेराय जेजुरगडावर लावून देतात, अधून मधून भेटी ला जातात.
खंडोबाची राजधानी म्हणजे आत्ताची जेजुरी नगरी . खंडेराया ला बेल - दवणा आणि भंडारा-खोबरे वाहायची पद्धत आहे .
दवणा हि एक सुगंधी वनस्पती आहे, खंडोबाला वाहिलेला बेल-भंडारा हातात घेवून आण म्हणजे शपथ खायची पद्धत मराठा समाजात रूढ आहे.
खंडोबाने जेव्हा मणी-मल्लाचा पराभव केला तेव्हा मणी-मल्ल दैत्य खंडोबाला शरण आले , मणि च्या मस्तकावर खंडेरायाचा पाय होता त्याने विनंती केली कि "मला तुझा वाहन होऊ दे" आणि मल्लाने विनवणी केली "तुझ्या नावा आधी माझा नाव लागू दे" त्यामुळे अश्वरूपी मणी खंडोबाचे वाहन झाला , आणि मल्लासुराला खंडोबाने हरवले म्हणून तो "मल्हारी" ठरला .
खंडेरायाची मूर्ती जर निट पहिली तर काळ-भैरवाच्या मूर्तीशी भयंकर साम्य आढळेल फक्त शस्त्रांचा क्रम बदलला कि दैवत वेगळं ठरतंय . म्हणजे हे दोन्ही अवतार एकच आहेत . पण कालभैरव हा ब्रम्हचारी दाखवला गेला आहे . ज्योतिबाची मूर्ती उभी आहे आणि खंडोबाची मूर्ती बैठी आहे , ज्योतिबाला गुलाल-खोबरं तर खंडोबाला भंडार-खोबरं वाहिला जाता . कोकणात रवळनाथ तर घाटावर खंडेराय कोल्हापुरात जोतीबा असा भोळा शंकर .
खंडोबा हा कडक शिस्तीचा आहे . एक सेना-प्रमुख म्हणून शिस्त प्रिय असणे रास्तच आहे . ह्या खंडोबाची काही स्थाने जागृत मानली गेली आहेत , त्यात मणीचूळ पर्वत म्हणजे आत्ताचे जेजुरी , पाली-पेम्बर , नेवासे-पारनेर आणि मंगसुळी .
खंडोबा हा सैन्याचा अधिपती असल्यामुळे युद्धकाळात रात्रीचे जागे राहणे खूप महत्वचे होते , त्यासाठी रणवाद्य वाजवून रात्र जगती ठेवली जायची त्यातूनच "जागरण-गोंधळ " ह्या लोक-कलेचा उगम झाला . सेनापती खंडोबाला त्यामुळेच जागरण अतिशय प्रिय आहे .
लग्न झालेल नवीन जोडपं खंडोबाचा गोंधळ घालतात आणि त्याची कृपा प्राप्त करतात,, ह्या प्रसंगी कडी-लंगर तोडायची प्रथा आहे. कडी-लंगर म्हणजे एक लोखंडी साखळी असते ती गोंधळात पूजेच्या ठिकाणी ठेवली जाते आणि गोंधळ समाप्ती च्या वेळी तोडली जाते .
मल्हारी मार्तंडाला बोली भाषेत खंडोबा म्हणतात कारण ह्याच्या हातात कायम "खंड" म्हणजे खड्ग / तलवार आहे. खंड धारण करणारा म्हणून खंडोबा .
-- संकलन : शेखर आगासकर
सोशल मिडियातून येणारे चांगले लेख जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझा उपक्रम. लेखकाचे नाव मला माहित नाही.
आपण सगळेच स्वत:शीच आयुष्यभर Hide & Seek चा गमतीशीर खेळ खेळत असतो. कालानुरूप वा व्यक्तिनिहाय त्या खेळाचे स्वरूप बदलत असले तरी त्या खेळाचा आत्मा मात्र आयुष्यभर आपल्यातला माणूस शेवटपर्यंत जागा ठेवत असतो.
माधव आपटे सरांच्या शब्दात सांगायचे झाले तर , ‘ क्रिकेट हा अत्यंत क्रूर खेळ ‘ आहे असेच म्हणता येईल . कोणत्या क्षणी काय होईल ते सांगता येणार नाही , तसाच काहीसा प्रकार जयंतीभाई ह्यांच्या बाबतीत घडला होता.
हेडिंग्लेवर एक चमत्कार. वसिम अक्रमचा चेहरा धूमकेतूच्या शेपटाने माऊन्ट एव्हरेस्टला धडकून जाण्याची घटना नुकतीच पाहिल्यासारखा झाला होता. तब्बल सहा वर्षांच्या अंतरानंतर इंग्लिश कप्तान माईक आथर्टनने कसोटी सामन्यात चेंडू टाकण्यासाठी हात फिरवला होता…
डार्विनचा सिद्धांत सांगतो की माकडापासून माणूस उत्क्रांत झाला..
मला वाटते हा सिद्धांत मनुष्याच्या शरीरापुरताच खरा असावा..!
आजकाल विविध प्रसारमाध्यमांवरून प्रसारित केले जाणारे कार्यक्रम पाहिले की या माध्यमाला काही धरबंद राहिला नाही असेच म्हणावेसे वाटते. अगदी किरकोळ बाबीला अवास्तव महत्त्व देणे आणि जनतेच्या मुख्य प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे असा प्रकार सुरू आहे.
कोणत्याही सांघिक खेळातच काय पण रोजचे काम योग्य रीतीने पार पाडण्यासाठी व ते करताना येणार्या सर्व प्रकारच्या अडीअडचणींना तोंड देण्यासाठी संघ भावना अत्यंत आवश्यक आहे. आपल्याकडे सर्व प्रकारच्या संस्थांमधे संघभावना अभावानेच आढळते. संघ भावना निर्माण न होण्यात कोणत्या गोष्टी अडसर ठरतात हे जाणून घेतले पाहिजे.
Copyright © 2025 | Marathisrushti