(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • हा जुगार तुम्ही खेळून बघा !

    शेतकरी दरवर्षी जुगार खेळतात. हाती असेल नसेल तितके शेतीत गुंतवतात, पाऊस-पाणी चांगले झाले, पिकांना थोडा बरा भाव मिळाला, तर किमान गुंतविले तितके तरी वापस येण्याची आशा असते, नफा हा प्रकार तर त्यांच्यासाठी बादच आहे आणि निसर्गाने दगा दिला, तर होत्याचे नव्हते होऊन तो भिकेकंगाल होतो. परत पुढच्या वर्षी कर्ज काढून असाच जुगार खेळला जातो, एक दिवस हा जुगार अंगाशी येतो आणि सारे काही सहन होण्यापलीकडे गेले, की तो बिचारा आत्महत्या करतो. एका तरी सरकारी कर्मचाऱ्याने आजपर्यंत पगार कमी मिळतो म्हणून आत्महत्या केली आहे का?

    लोकशाहीत समानता हे एक अत्यंत महत्त्वाचे मूल्य मानले आहे. कोणत्याही आधारावर देशाच्या नागरिकांमध्ये भेदाभेद करता येणार नाही, असे आपले संविधान ठासून सांगते; परंतु समानतेच्या या तत्त्वाला सरकारच अप्रत्यक्षपणे हरताळ फासत आले आहे. दुय्यम नागरिक हे संबोधन देशात अधिकृत नाही, संविधान त्याला मान्यता देत नाही, परंतु अप्रत्यक्षरित्या समाजातील काही घटकांना सरकार आणि व्यवस्थेकडून दुय्यम नागरिकाची वागणूक देण्यात येते आणि त्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे शेतकरी. अगदी साधा तर्कसंगत प्रश्न विचारायचा झाल्यास ज्या आधारावर सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, जो की सध्या मूळ वेतनाच्याही दुप्पट झाला आहे, देते त्याच आधारावर अन्य उत्पादक घटकांचा विचार का केला जात नाही? महागाई केवळ कर्मचाऱ्यांसाठीच वाढते का? महागाईचे चटके केवळ कर्मचाऱ्यांनाच बसतात का? साधी तुलना करायची झाल्यास दहा वर्षांपूर्वी कोणत्याही कर्मचाऱ्याचे असलेले एकूण वेतन आणि आजचे एकूण वेतन यातला फरक पाहिला तर वेतनात किमान अडीचपटीने वाढ झाल्याचे दिसते, परंतु दहा वर्षांपूर्वीच्या शेतमालाचा भाव आणि आजचा शेतमालाचा भाव पाहिला तर ही वाढ साधी दीडपटही दिसत नाही. शेतीमालाचा भाव वाढला म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले, असा सोईस्कर समज सगळेच पांढरपेशे लोक करून घेतात, परंतु वस्तुस्थिती तशी नाही. एकीकडे शेतमालाचे भाव कासवगतीने वाढत असताना उत्पादनखर्च मात्र सशासारखा उड्या मारत पळत आहे. त्यामुळे शेतमालाच्या भाववाढीचा शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कोणताही लाभ होत नाही, उलट पूर्वीपेक्षा तो अधिक अडचणीत आल्याचे दिसते. ही वस्तुस्थिती स्वीकारून ज्याप्रमाणे आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी सरकार घेते त्याचप्रमाणे सरकारने शेतकऱ्यांनाही दिलासा द्यायला हवा. अर्थात दिलासा द्यावा म्हणजे त्याला कर्जमाफी द्यावी, त्याला रोख पैसे द्यावे, असे कुणीही म्हणणार नाही. दिलासा म्हणजे खऱ्या अर्थाने त्याला न्याय द्यायला हवा.

    जगातला कोणताही उत्पादक आपला माल उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत विकत नाही, विकूच शकत नाही. त्याला नफा हवा असतो आणि तो मिळविणे त्याचा न्याय्य हक्क आहे. बहुतेक सगळ्या उत्पादनांच्या बाबतीत असे दिसून येते, की प्रत्यक्ष ग्राहकाच्या हाती ते उत्पादन ज्या किमतीत पडते ती किंमत किंवा तो भाव उत्पादन खर्चाच्या किमान दुप्पट तरी असतो. अनेक उत्पादनांच्या बाबतीत तर तो कैकपट अधिक असतो. यावर कुणाचाच आक्षेप असत नाही. साध्या पेट्रोलचा लिटरमागे उत्पादनखर्च फार तर पंधरा रुपये आहे, परंतु ते ग्राहकांना 75 रुपये दराने विकले जाते. ही तफावत पाच पट आहे आणि ती सरकारलाही मान्य आहे, ग्राहकांनाही त्यावर काही आक्षेप नाही. कोणताही व्यवसाय किंवा असा कोणताही व्यवहार जिथे विकणारा आणि घेणारा, उत्पादक आणि ग्राहक असे दोन स्वतंत्र घटक असतात तिथे नफा ही संकल्पना गृहीतच धरलेली असते. उत्पादक माल विकताना त्यातून नफा वसूल करणारच असतो आणि ग्राहकालाही ते माहीत असते, हा बाजाराचा साधा नियम झाला; परंतु जगाच्या पाठीवर या नियमाला अपवाद केवळ भारतातीत शेतकरी आहेत. त्यांचे उत्पादन सरकारच उत्पादनखर्चापेक्षा कमी किमतीत विकत घेते. सरकारकडून टिच्चून महागाई भत्ता वसूल करणारे कर्मचारी, एरवी महागड्या मॉलमध्ये जाऊन उधळपट्टी करणारे धनदांडगे, आपल्या मुला-मुलींना पॉकेटमनी म्हणून दोन-चार हजार महिन्याकाठी देणारे पांढरपेशे हे सगळेच शेतमालाच्या किमती वाढल्या, की लगेच गळा काढून रडू लागतात, `कांद्याने रडविले',`मिरच्यांनी डोळ्यात पाणी आणले' अशा बातम्या येऊ लागतात, महागाई प्रचंड वाढल्याची आवई उठविली जाते, महागाईला राष्ट्रीय संकट संबोधले जाते आणि हा विरोध इतका तीऋा तसेच संघटित असतो, की सरकारला त्यांच्यापुढे झुकावेच लागते. कांद्याचे भाव वाढले आणि सरकार ते नियंत्रणात आणू शकले नाही, या एका कारणामुळे दिल्लीचे सरकार पडल्याची इतिहासात नोंद आहे. कृषी उत्पादने जीवनावश्यक गोष्टींमध्ये मोडतात, त्यामुळे ते सगळ्यांना परवडू शकतील, या दराने विकल्या जावेत, ही सरकारची भूमिका असते, परंतु सरकारचा हा उदारपणा कोल्हापूर लुटून सोलापूरला दान करण्यासारखा आहे. सगळ्यांना परवडणाऱ्या दरात कृषी माल उपलब्ध व्हावा, असे सरकारला वाटत असेल, तर सरकारने तो खर्च उचलावा, त्यासाठी शेतकऱ्यांचा गळा का आवळला जातो? खरे तर परवडणे हा प्रकार खूपच सापेक्ष आहे. सोने, चांदी, पेट्रोल आणि अन्य चैनीच्या वस्तुंची किंमत सातत्याने वाढत असते, परंतु यांच्या किमती वाढल्यामुळे खप कमी झाला, असे कधीच ऐकायला मिळत नाही. लोकांना या गोष्टींची महागाई परवडू शकत असेल, तर थेट पोटाचा ज्यांच्याशी संबंध आहे त्या धान्यांची, भाजीपाला-फळांची महागाई का परवडू शकत नाही? शेवटी लोकांची प्राथमिक गरज काय आहे? सोने, चांदी खाऊन पोट भरणार आहे का? खिशात वीस-पंचवीस हजारांचा महागडा मोबाईल ठेवायचा आणि दुसरीकडे गव्हाचे दर दोन रुपयांनी वाढले, की महागाईच्या नावाने गळे काढायचे, हा कुठला न्याय? ज्या वस्तूंची गरज अधिक त्या वस्तूंसाठी अधिक पैसे मोजावे लागतात किंवा लागायला हवे, हे साधे सूत्र आहे. तुमच्या प्राथमिक गरजा भागवून अधिकचे पैसे उरत असतील, तर त्यातून तुम्ही चैनीच्या वस्तू विकत घेऊ शकता. इथे उलटच होताना दिसते. चैनीच्या वस्तू कितीही महाग असल्या, तरी त्या विनातक्रार खरेदी केल्या जातात आणि जीवनावश्यक वस्तुंची थोडी जरी दरवाढ झाली, की आभाळ कोसळल्यागत आकांत केला जातो.

    शेतकरी शेतात कष्ट करतो आणि देशाचे पोट भरतो, परंतु त्याच्या पोटाचे काय? त्याने उपाशी मरावे आणि इतरांच्या पोटापाण्याची सोय पाहावी, ही अपेक्षा अत्यंत क्रूर तसेच अमानवीय म्हणावी लागेल. शेतकरी दरवर्षी जुगार खेळतात. हाती असेल नसेल तितके शेतीत गुंतवतात, पाऊस-पाणी चांगले झाले, पिकांना थोडा बरा भाव मिळाला, तर किमान गुंतविले तितके तरी वापस येण्याची आशा असते, नफा हा प्रकार तर त्यांच्यासाठी बादच आहे आणि निसर्गाने दगा दिला, तर होत्याचे नव्हते होऊन तो भिकेकंगाल होतो. परत पुढच्या वर्षी कर्ज काढून असाच जुगार खेळला जातो, एक दिवस हा जुगार अंगाशी येतो आणि सारे काही सहन होण्यापलीकडे गेले, की तो बिचारा आत्महत्या करतो. एका तरी सरकारी कर्मचाऱ्याने आजपर्यंत पगार कमी मिळतो म्हणून आत्महत्या केली आहे का? असे एकही उदाहरण नसताना दरवर्षी नियमाने कर्मचाऱ्यांचा पगार वाढविला जातो आणि दर दहा वर्षांनी नवा वेतन आयोग नेमून या नित्याच्या वाढीला अगदी घसघशीत स्वरूप दिले जाते. आयुष्याची कमाई एकदाच डावावर लावण्याचा जुगार शेतकरी दरवर्षी खेळतात, सरकारी कर्मचाऱ्यांनी एकदा तरी ही हिंमत दाखवावी. ही हिंमत नसेल तर कधी काळी चुकून शेतमालाच्या किमती वाढल्या तर ओरड करू नये. खरे तर सरकारने तातडीने ज्या पिकाचा ज्या भागात जितका उत्पादनखर्च आहे त्याच्या दुप्पट त्या पिकाचा हमीभाव निश्चित करावा, ही नफ्याची किमान पातळी आहे. हा भाव निश्चित झाल्यानंतर कुणालाही त्यापेक्षा कमी दरात शेतमाल विकत घेण्याची परवानगी नसावी, तसे झाल्यास तो गंभीर गुन्हा मानल्या जावा आणि शेतकऱ्यांना आपला माल तितक्या किंवा त्यापेक्षा अधिक किमतीत कुणालाही, कुठेही विकण्याचे स्वातंत्र्य बहाल करावे. सोबतच सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाप्रमाणे या किमान हमीभावात दरवर्षी एका निश्चित दराने वाढ केली जावी आणि ही वाढ कायम त्या वर्षीच्या उत्पादनखर्चापेक्षा अधिक असावी. असे केल्याने काही आभाळ कोसळणार नाही.

    सरकारी कर्मचाऱ्यांचा हक्क त्यांच्या मूळ पगारावर आहे, महागाई भत्ता म्हणून मूळ पगारापेक्षा अधिक पैसा त्यांना दिला जातो तो कशासाठी? महागडे मोबाईल घेण्यासाठी? दुचाकी-चारचाकी गाड्या घेण्यासाठी? मल्टिफ्लेक्समध्ये जाऊन सिनेमे पाहण्यासाठी? हा महागाईभत्ता जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठीच दिला जातो. त्यामुळे उद्या शेतमालाचे भाव दुप्पट वाढले तरी या लोकांनी तक्रार करण्याचे कारण नाही, कारण तेवढा भत्ता सरकार त्यांना देतच आहे. या पद्धतीने शेतीचे अर्थशास्त्र सांभाळले गेले तर त्याचा देशाच्या विकासाला फायदाच होणार आहे. शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे आले, की तोदेखील हे अधिकचे पैसे भौतिक सुविधा देणाऱ्या वस्तुंच्या खरेदीसाठी वापरणार, त्यातून कारखानदारी वाढेल, बाजारात तेजी येईल, बेरोजगारीची समस्या बऱ्यापैकी दूर होईल, सरकारकडे महसूल अधिक प्रमाणात जमा होईल, त्यातून अधिक लोकोपयोगी कामे करता येतील आणि सरकारची आर्थिक स्थिती चांगली असेल, तर आपोआपच सरकारी कर्मचाऱ्यांचीही आर्थिक स्थिती चांगली राहील; परंतु त्यासाठी सगळे तूप माझ्या एकट्याच्याच पोळीवर हवे, हा बालिश दुराग्रह या लोकांनी सोडायला हवा. सरकारी कर्मचारी, मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय, श्रीमंत, अतिश्रीमंत या सगळ्यांनी थोडा फार त्याग करण्याची, थोडी झळ सोसण्याची तयारी ठेवायला हवी. त्यातून केवळ शेतकऱ्यांचेच नव्हे, तर सरतेशेवटी या लोकांचेही भले होणार आहे. आपल्यासाठी शेतकरी दरवर्षी जीवघेणा जुगार खेळत असतात, ही हिंमत केवळ तेच दाखवू शकतात, याचे भान इतर सगळ्यांनीच राखायला हवे.

    -- प्रकाश पोहरे
    रविवार, दि. 26 जुलै 2015
    दैनिक देशोन्नती मधील प्रहार या सदरात प्रकाशित
    आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com

  • निरंजन – भाग ६ – ग्रहण भक्ती

    मनाची ग्रहणशक्ती वाढवण्यासाठी ध्यान करणे खुप गरजेचे आहे. ध्यान करुनच मनाची ग्रहणभक्ती वाढते आणि ग्रहण भक्तीतुनच ग्रहण शक्ती प्राप्त होते. ग्रहणभक्ती वाढवण्यासाठी ग्रहणभक्तीध्यान खुप महत्वाचे आहे.

  • शक्तीदेवी

    येवले – औरंगाबाद मार्गावर, म्हणजे येवल्या पासून तेरा मैलावर कोटम हे गांव असून, या ठिकाणी “महालक्ष्मी”, “महासरस्वती” व “महाकाली” या तीन देवींची मंदिरं आहेत.

  • मोडी लिपीत करिअर करणे शक्य

    मोडी लिपीत करिअर करणे शक्य आहे.

  • सिलिकॉन व्हॅली (Silicon Valley) एक अजब रसायन

    अमेरिकेतील स्यान फ्रान्सिस्को ( San Francisco ) ते स्यान ओजे ( San Jose ) या ८० मैलांच्या पाट्याला ' बे अरिया' ( Bay Area ) असे म्हणतात. हाच एरिया अख्या जगामध्ये ' सिलिकॉन व्ह्याली' म्हणून ओळखला जातो. कॉम्पुटर, हार्ड वेअर, सोफ्ट वेअर ( Soft Ware ) आणि आय. टी. इंडस्ट्रीची ही मक्का म्हणून ओळखली जाते.या खेत्रातील १५० प्रमुख कंपन्यांची मुख्यालये ( Head Quarters ) याच भागात आहेत. यामध्ये इंटेल (Intel ), Apple , गुगल ( Google ), याहू (yahoo ), Oracle , सिस्को ( Cisco ), एच. पी. ( H.P. ),सन मायक्रो ( Sun Micro ), फेसबुक ( Face book ), Twitter , यु ट्यूब ( You Tube ), या प्रमुख कंपन्या आहेत. IBM, डेल (Dell), Microsoft या प्रमुख कंपन्या या भागातील नाहीत. पण या भागाचे महत्व ओळखून व या भागात आपला प्रेझेन्स असावा म्हणून या कंपन्यांनी सिलिकॉन व्ह्याली मध्ये आपली ऑफिसेस थाटली आहेत.

    सिलिकॉन व्ह्याली हे एक अजब रसायन आहे. उद्योग व्यवसायातील अनेक आश्चर्यकारक गोष्टी येथे घडत असतात.अनेक नवीन उत्पादनाबरोबरच अनेक नवीन कल्पना, नवीन विचार, नवीन परंपरा यांचा जन्म येथे होत असतो.

    पहिली गोष्ट म्हणजे येथील बहुतेक प्रमुख कंपन्यांचे संस्थापक हे शाळा- कॉलेजमधील ड्रोप आउट झालेले किंवा शिक्षण पूर्ण न केलेले आहेत. त्यातील बहुतेक जण गरीब- मध्यम वर्गीय कुटुंबातून आलेले आहेत. बहुतेक जणांना उद्योग व्यवसायाची कौटुंबिक पार्श्वभूमी नाही. असे असूनही आज ही मंडळी प्रसिध्धीच्या झोतात आहेत. यातील कित्येक जणांची नावे जगातील अब्जाधीश व्यक्तींच्या यादीत झळकली आहेत. बहुतेकांनी अगदी तरुण वयातच हे यश संपादन केले आहे. खालील यादी बघा.

    बिल गेट्स ( Bill Gates ) :- हार्वर्ड मधला ड्रोप औट. Microsoft ची स्थापना. श्रीमंत क्र. २. संपत्ती ५६ अब्ज डॉलर्स म्हणजे २४७५ अब्ज रुपये. वय ५५ वर्षे.

    लेरी अलीसन ( Larry Ellison ) :- युनिवर्सिटी ऑफ इलिनॉय ( Illinois ) आणि युनिवर्सिटी ऑफ शिकागो ( Chicago ) मधून ड्रोप औट. Oracle ची स्थापना. श्रीमंत क्र.५. संपत्ती ३९.५ अब्ज डॉलर्स म्हणजे १७७५ अब्ज रुपये. वय ६६

    स्टीव जॉब्स ( Steve Jobs ) :- रीड कोलेज ( Reed College Portland ) मधून ड्रोप औट. Apple ची स्थापना. श्रीमंत क्र.११०. संपत्ती ८.३ अब्ज डॉलर्स म्हणजे ३८२.५ अब्ज रुपये. वय ५६.

    मार्क झुकेरबर्ग( Mark Zuckerberg ) :- हार्वर्ड मधून ड्रोप औट. Face book ची स्थापना. श्रीमंत क्र.५२. संपत्ती १३.५ अब्ज डॉलर्स म्हणजे ६०७.५ अब्ज रुपये. वय २७

    जेरी यांग ( Jerry Yang ) आणि डेव्हिड फिलो ( David Filo ):- दोघेही Stanford युनिवर्सिटी मध्ये पी. एच डी. करत होते. शिक्षण अर्धवट सोडले. Yahoo ची स्थापना.

    जेरी यांग( Jerry Yang )-श्रीमंत क्र.९३८. संपत्ती १.३ अब्ज डॉलर्स म्हणजे ५८.५ अब्ज रुपये. वय ४२.

    डेव्हिड फिलो ( David Filo )- श्रीमंत क्र.८७९. संपत्ती १.४ अब्ज डॉलर्स म्हणजे ६३ अब्ज रुपये. वय ४५

    सर्जी ब्रिन ( Sergey Brin ) आणि ल्यारी पेग ( Larry Page ) :- दोघेही Stanford मध्ये पी. एच डी करत होते. शिक्षण अर्धवट सोडले. Google ची स्थापना

    सर्जी ब्रिन ( Sergy Brin )- श्रीमंत क्र.२४. संपत्ती १९.८ अब्ज डॉलर्स म्हणजे ८९१ अब्ज रुपये. वय ३८.

    ल्यारी पेग ( Larry Peg )- श्रीमंत क्र.२४. संपत्ती १९.८ अब्ज डॉलर्स म्हणजे ८९१ अब्ज रुपये. वय ३७

    दुसरी गोष्ट म्हणजे यातील बहुतेक कंपन्या या अत्यल्प भांडवलावर, ग्यारेजेस मध्ये सुरु केलेले अती अल्प लघु उद्योग ( Very Small Scale Industry ) आहेत. आज याच कंपन्यांचे रुपांतर जगातील मोठ्या, प्रतीष्टीठ, दर्जेदार आणि बलाढ्य कंपन्यांमध्ये झाले आहे. बीझिनेससाठी शाळा कॉलेजमधील शिक्षण पूर्ण करणे आवश्यक असतेच असे नाही. तुमच्याकडे जर चांगला बिझिनेस प्लान किंवा कल्पना असेल तर शाळा कोलेजच्या शिक्षणात वेळ घालविण्यात काही अर्थ नाही. कारण हे शिक्षण जरूर भासल्यास तुम्ही नंतर केव्हाही पूर्ण करू शकता. अशी येथील विचार धारा आहे.

    माणसाच्या क्वालिफिकेशन, डिग्री, परीक्षेतील मार्क, टक्केवारी, ग्रेड या पेक्षा त्याचा ' Talent ' महत्वाचा! त्याच्या 'पास्ट पर्फोर्मंस ' ( Past Performance ) पेक्षा तो 'फ्युचर 'मध्ये काय करू शकतो हे महत्वाचे. त्याची traditional पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करायची कुवत किती हे महत्वाचे. त्याला किती नवीन कल्पना सुचू शकतात हे महत्वाचे. सिलीकोन व्ह्यालीमधील बोझीनेस हा पाया आहे. म्हणूनच हा भाग जगातील Technology व Talent चा हब ( Hub ) म्हणून ओळखला जातो.

    परंतु तेथील बिझिनेस या एवढ्याच क्वालिफिकेशन वर यशस्वी झालेले नाहीत. वरील लोकांमध्ये आहे तो धृढ आत्मविश्वास. स्वतःच्या क्षमतेवर आणि कर्तुत्वावर असलेला पूर्ण विश्वास! आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा आपले उत्पादन/ कल्पना/ आयडिया जास्त चांगली आहे या विषयी असलेली अतूट श्रद्धा! आणि कांहीतरी वेगळे, 'हटके', नवीन करण्याची प्रबळ इच्छा आणि तळमळ. या मुळेच हे बिझिनेस एवढे मोठे होऊ शकले.

    माणसाच्या Talent वर त्याला प्रगतीची संधी देणारा हा भाग आहे. या मध्ये जात, पात, लिंग भेद, कातडीचा रंग या गोष्टी आड येवू नयेत याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे अख्या जगातले Talented तरुण सिलीकोन व्ह्यालीकडे आकर्षित झाले नसतील तरच नवल! आज सिलीकोन व्हालीमध्ये जेवढे फोरीन वर्कर्स काम करतात तेवढे जगात कुठेच आढळून येत नाहीत. तसेच त्यांच्या जेवढी विविधता दिसून येते तेवढी जगात दुसरीकडे कोठेच आढळून येणार नाही. या मध्ये हेस्प्यानिक ( म्हणजे mexico तून आलेले व Spanish मातृ भाषा असलेले ) लोक सर्वात जास्त आहेत. त्यानंतर आशियाई लोकांची संख्या आहे. यामध्ये चीनी आणि भारतीय लोकांची संख्या सगळ्यात जास्त आहे. त्यानंतर जपानी, कोरियन, तैवानीज, Vietnam मधून आलेले लोक, फिलिपिनो यांची संख्या आहे. त्यानंतर इतर देशातून आलेल्या लोकांची संख्या आहे. आज सिलिकॉन व्ह्यालीमधील ४६ % लोकसंख्या परदेशातून आलेल्या लोकांची आहे. त्या मुळे तेथे खऱ्या अर्थाने जागतिक संस्कृतीचे दर्शन घडते. तसेच भारतातील अनेक राज्यातील लोक तेथे गेले आहेत. त्यामुळे तेथे मिनी भारत दर्शन घडते.

    व्यवस्थापन क्षेत्रात या विभागावे अनेक नवीन कल्पना अमलात आणल्या, अनेक नवीन पायंडे पडले. येथे अगदी वेगळ्या प्रकारच्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे हे लक्षात आल्यावर मुलाखतीच्या तंत्रामध्ये ( Interview Techniques ) अमुलाग्र बदल करण्यात आले. हल्ली मुलाखतीमध्ये कोडी ( Puzzles ) विचारण्याची पध्धत बर्याच ठिकाणी अवलंबली जाते. त्याची सुरवात येथूनच झाली. उत्तम मनुष्यबळ पुरविण्याचे काम शाळा, कॉलेजेस आणि Universities करत असतात हे ध्यानात आल्यामुळे तेथील कंपन्यांनी शिक्षण संस्थांबरोबर घनिष्ट संबंध पहिल्यापासूनच ठेवले आहेत. Stanford हि जगप्रसिध्ध University याच भागात आहे. ही खाजगी University जगातील नम.१ ची सर्वोत्तम University समजली जाते. याचे बजेट हे अनेक राष्ट्रांच्या बजेट पेक्षा जास्त असते. SUSJ (State University of San Jose), University of Santa Clara तसेच बर्कले येथील University या चार प्रमुख Universities या भागात आहेत

    येथील CEOs नी बॉस या कल्पनेमधेच अमुलाग्र बदल घडवून आणले. कंपनीचा बॉस हा नेहमी सुटा-बुटातच असला पाहिजे. त्याला भली मोठी केबिन असायला पाहिजे. त्याच्या भोवती सेक्रेटरींची टीम असायला हवी अशी जी परंपरा होती ती पार मोडीत काढली. कंपनीचा बॉस हा सुध्धा कंपनीतील इतर साध्या सुध्या वर्कर सारखाच असावा. त्याने पण इतरांसारखेच हॉल मध्ये बसून काम करावे. त्याला केबिन, सेक्रेटरी असा थाट नसावा. तसेच त्याचे कपडे पण सर्व साधारण माणसांसारखे साधे व क्याजुअल असावेत असा नवीन पायंडा पडला.

    छोट्या स्टार्ट अप कंपनीचे रुपांतर जगातल्या मोठ्या कंपनीत कसे करता येते हे सिलीकोन व्ह्यालीने दाखवून दिले आहे. श्रीमंतीचे वाटप कसे करता येते. व्यवस्थापन क्षेत्रात किती नवीन कल्पना राबविता येऊ शकतात हे सिलीकोन व्ह्यालीने दाखवून दिले आहे. आज सिलीकोन व्ह्यालीमधील कंपन्या जेवढा रेवेन्यु निर्माण करतात तेवढा जगात दुसरीकडे कोठेच निर्माण होत नाही.

    आज भारतीय लीकांना अमेरिकेमध्ये जी इज्जत, प्रतिष्ठा, सन्मान आणि गौरव मिळतो आहे त्यामध्ये सिलिकॉन व्यालीचे योगदान फार मोठे आहे. आज तेथे हजारो भारतीय तरुण अभियंते आणि तंत्रज्ञ तेथील सर्वच कंपन्यांमध्ये उत्तम काम करीत आहेत. अनेक कंपन्यांमध्ये अनेक भारीतीय उच्च पदावर काम करीत आहेत. यामध्ये मराठी लोकांची पण संख्या लक्षणीय आहे. आपण सुध्धा उच्च दर्जाचे काम उत्तम पणे करू शकतो असा आत्मविश्वास भारतीयांमध्ये जागृत करण्याचे फार मोठे काम सिलिकॉन व्हालीने केले आहे.

    भारतीय, विशेषतः मराठी तरुणांना यातून बरेच काही शिकता येण्यासारखे आहे.

    आज भारताची जागतिक आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने वेगाने घोड दौड चालू आहे. याचा अर्थ आज जागतिक स्तरावर उद्योग व्यवसाय सुरु करण्याची संधी भारतीय तरुणांपुढे चालून आली आहे. मराठी तरुण तरुणींनी या सुवर्ण संधीचा फायदा उठवावा. ज्याप्रमाणे पेशव्यांच्या काळात मराठी झेंडा अटकेपार( जे आता पाकिस्तानात आहे) नेला होता. त्याप्रमाणे उद्योग vyavasayachya nimittane मराठी झेंडा अमेरिका ते new ziland paryant akhya jagat phadakawa. तसेच यापुढे मराठी समजताच बिल गेट्स आणि मार्क झुकेरबर्ग निर्माण व्हावेत हीच शुभेच्छा!

    उल्हास हरी जोशी
    June 8, 2011 at 11:53 am

  • बारा ज्योतिर्लिंगे – श्री नागेश्वर औंढ्या नागनाथ

    ह्या तीर्थक्षेत्राला “शिल्पमंदिर” ही म्हणता येईल. परभणी जिल्ह्यात हे ज्योतिर्लिंग आहे.

  • श्री गणेश अवतारलीला ६ – श्री पुष्टिपती अवतार

    वैशाख शुद्ध पौर्णिमेला सूर्योदय समयाला भगवंतांनी त्याच मूर्तीतून पुष्टिपती अवतार धारण केला. भगवान श्री कृष्णांनी मांडलेली दोन पुष्टिपती गणेश यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा आणि पुणे जिल्ह्यातील सुपे येथे विद्यमान आहेत……

  • कचऱ्याचे वर्गीकरण का करावे?

    मुंबई महानगरपालिकेने ओला कचरा आणि कोरडा कचरा अशा दोन भागात रोजच्या कचऱ्याचे वर्गीकरण करावे असा फतवा काही वर्षापूर्वीच काढला आणि जे कोणी असे करणार नाहीत त्यांना दंड करु असेही तेव्हा म्हटले होते. पण लोक आपण काढलेल्या फतव्याचे पालन करतात की नाही यावर देखरेखीची काही सोय केली नाही.

  • श्री गणरायाला आवाहन

    गंधर्व संगीत

    श्री वरदविनायक सिध्दगणेशा
    हे मंगलमुर्ती हे श्रीगणराया
    घेऊनी सोबत सप्तसुरांना
    यावे तुम्ही हो श्रीगणराया ।
    शब्द माझीया हृदयी वसती
    अर्थ शब्दांना तुम्हीच द्यावा
    द्यावे सूर तुम्ही मम शब्दांना
    संगीतही द्यावे त्यांना गाया ।
    नाही सूर अन् नाही संगीत
    काय अर्थ मग मम शब्दांना
    करितो विनती हात जोडूनी
    सूरसंगीत तुम्ही द्या गणराया ।
    देता संगीत तुम्ही मम शब्दांना
    सूर मिळेल गंधर्वांचा त्यांना
    यास्तव विनती हे गौरीनंदना
    झडकरी या हो श्रीगणराया ।

    सुरेश काळे
    मो.9860307752
    सातारा.
    १४ जुलै. २०१८

  • खतांच्या भाववाढीवर सगळीकडे सामसूम !

    अलीकडील काळात आंदोलने `मॅनेज’ होण्याचे प्रकार इतके वाढले आहेत, की लोकांचा आता आंदोलनावरील विश्वासच उडाला आहे. बियाणे कंपन्या आणि सरकार, खत कंपन्या आणि सरकार, विरोधक आणि सरकार अशा अभद्र युतीतून बळी जातोय तो सर्वसामान्य शेतकर्‍यांचा आणि अधिक खेदाची बाब म्हणजे आपण नागविले जात आहोत हे शेतकर्‍यांनाही कळेनासे झाले आहे. सगळे आपापल्या जागी शांत आहेत, सुस्त आहेत.