(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • खदिर / खैर

    खदिर / खैर

    खदिराचा मध्यम उंचीचा वृक्ष असतो. खदिर चवीला कडू, तुरट असून थंड गुणाचा व हल्का व रूक्ष असतो.हा कडू, तुरट व थंड असल्याने पित्तशामक व थंड सोडुन अन्य गुणांनी कफशामक आहे.

      January 2, 2018


  • श्रीहरी स्तुति – ४२

    अंतरंगी ज्या श्रीहरी तत्त्वाची साधकाला अनुभूती येते त्या तत्त्वाच्या अद्वितीय स्वरूपाचे वर्णन प्रस्तुत श्लोकात आचार्य श्रींनी केलेले आहे. कसे आहे हे तत्व? ते म्हणतात,

      December 2, 2020


  • श्री कनकधारा स्तोत्रम् – १६

    दग्धिस्तिभि: कनकुंभमुखावसृष्टिस्वर्वाहिनी विमलचारूजलप्लुताङ्गीम।
    प्रातर्नमामि जगतां जननीमशेष लोकाधिनाथगृहिणी ममृताब्धिपुत्रीम्।।१६।।

    दग्धिस्तिभि:- पुराणांतील अनेक संकल्पना पैकी संकल्पना आहे दिग्गज. पृथ्वीच्या आठ दिशेस हे आठ हत्ती असतात. त्यांच्या आधारावर पृथ्वी स्थिर असते.

    ही संकल्पना प्रतिकात्मक आहे. सगुण-साकार गोष्टीला जग म्हणतात. याच्या विपरीत निर्गुण-निराकाराला गज असे म्हणतात.
    अर्थात बाहेरून निराकार तत्त्वाच्या आधारे, सामान्य शब्दात निराधार स्वरूपात पृथ्वी असते.
    प्रतीकरूपात स्वीकारलेले गज म्हणजे हत्ती हे समृद्धीचे सर्वोच्च टोक.
    असे हत्ती दारात झुलत असणे श्रीमंतीचे सगळ्यात मोठे प्रतीक आहे. याला गजान्तलक्ष्मी म्हणतात.
    असे हत्ती आपल्या शुंडांनी आई जगदंबेच्या मस्तकावर अभिषेक करतात.
    हत्ती सामान्य असते तर त्यांचे घडे सामान्य असते आणि पाणी सुद्धा. येथे मात्र सर्वच अद्वितीय आहे. आचार्यश्री म्हणतात,

    कनकुंभमुखावसृष्टि- त्यांनी आपल्या सोंडे मध्ये घेतलेले घडे सोन्याचे आहेत. त्या घड्यांचा मुखातून ती वर्षाव करत आहेत. कशाचा?

    स्वर्वाहिनी- स्वर् वाहिनी अर्थात स्वर्गातून वाहणारी. देवी मंदाकिनी गंगा.

    विमलचारूजल- तिचे विमल अर्थात अत्यंत शुद्ध तर चारु म्हणजे अत्यंत सुंदर, अशा जलाच्या द्वारे,

    प्लुताङ्गीम- जिचे अंग ओलेचिंब झाले आहे अशी.

    प्रातर्नमामि - त्या आई जगदंबे ला मी सकाळी वंदन करतो. येथे सकाळी म्हणताना दिवसाचे पहिले काम, हा अर्थ अपेक्षित आहे.

    अर्थात आई जगदंबेची उपासना हेच आयुष्यातील प्राथमिक कार्य आहे.

    जगतां जननीमशेष- अशेष म्हणजे संपूर्ण, जगाची जननी अर्थात माता. कशी आहे ही माझी माता?

    लोकाधिनाथगृहिणी- हे लोक म्हणजे स्वर्ग, मृत्यु ,पाताळ. त्यांचे नाथ म्हणजे स्वामी अर्थात भगवान श्री विष्णू. त्यांची गृहिणी अर्थात प्रिय पत्नी. अमृताब्धिपुत्रीम्- अमृत अब्धि अर्थात दुधाचा समुद्र, क्षीरसागर. त्याच्यातून निर्माण झाली या अर्थाने त्याची पुत्री.
    तिला वंदन असो.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

      March 25, 2020


  • दानशूर कर्ण

    महाभारतातील कर्णाचे स्थान अद्विती असून
    मान जाई उंचावुनी त्यास समजोनी घेता ।।१।।

    सुर्यपुत्र कर्ण घनुर्धारी महान
    दानशूर तो असून इतिहास घडविला ।।२।।

    सुर्य आशिर्वादे जन्मला कवच कुंडले लाभती त्याला
    रक्षण वलय शरिराला मिळती कर्णाच्या ।।३।।

    अंगातील कर्तृत्व शक्ति माणसाला उंचावती
    शक्तीस वाट फुटती शोधूनी त्याची योग्यता ।।४।।

    जन्मुनी प्रथम पांडव सहवासांत सारे कौरव
    हेच त्याचे खरे दुर्दैव नियतीचा होई खेळ ।।५।।

    महाभारत युद्ध प्रसंगी कौरवामध्ये कर्ण अग्रभागीं
    होता तो विजयाच्या मार्गी हादरुन सोडले पांडवाना ।।६।।

    इंद्रासह सर्व देव आकाशी बघती अर्जुन-कर्ण युद्धासी
    परी चित्त त्यांचे कृष्णासी बघती त्याची लिला ।।७।।

    थोपवून धरिला अर्जून रथ असूनी सारथी भगवंत
    बाण शक्तिनें नेला रेटीत कृष्ण परमात्म्यासह ।।८।।

    शक्तीचे हे दिव्य दर्शन बघू लागले आकाशांतून
    इंद्रादी देव विस्मयित होऊन न्याहळूं लागले कर्णाला ।।९।।

    चकीत झाले देवगण यश अर्जुना यावे म्हणून
    कवच कुंडले मागावी दान इंद्र करी मनीं विचार ।।१०।।

    प्रातः काळची सुर्य किरणे सुचवी कर्णा सावध राहणे
    रुप घेतले इंद्राने दान मागण्यासाठीं ।।११।।

    कर्ण होता दानशूर मन त्याचे उदार
    न घेई तो माघार संकल्प करिता एकदां ।।१२।।

    इंद्र देवाचा राजा ठोठती कर्ण दरवाजा
    ठेवूनी मनी भाव दुजा रुप घेतले याचकाचे ।।१३।।

    देवांचा नृपती दान मागण्या येती
    हे माझे भाग्य असती सत्व परिक्षा देण्याचे ।।१४।।

    ओळखले याचकाला इंद्राच्या सत्य रुपाला
    अभिवादन केले तयाला कवच कुंडले देई दान ।।१५।।

    कवच कुंडलाचे दान स्वहत्याचे ठरले कारण
    असूनी कर्णा हे ज्ञान इंद्रसी दानधर्म केला ।।१६।।

    इंद्रापरी याचक कोण जो मागेल मजसी दान
    त्याचा कर्णा अभिमान हीच त्याची श्रेष्ठता ।।१७।।

    कर्णाचे हे दान ठरले त्याचे समर्पण
    करी त्यासी महान अजरामर करुनी ।।१८।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    २०-२१११८३

      January 19, 2018


  • भटकंती

    ‘भटकणे’ हा शब्द अनेक अर्थांनी वापरला जातो. माहित असलेल्या वाटेवरून फिरण्याला भटकणे म्हणतात. काही उद्देशाने केलेली रपेट व पाय नेतील त्या वाटेने केलेली चाल हा भटकण्याचाच प्रकार. काही न ठरवता केलेली पदयात्रा व चालण्याच्या स्पर्धेमध्ये कापलेले अंतर हेही भटकणे नाही का? सपाटीवरून केलेले भ्रमण व डोंगरदर्‍यातील फिरणे ही भटकंतीची रूपे आहेत. ठराविक काळात ट्प्पे पार करीत केलेली वारी ही वेगळ्या पातळीवरील अनुभव देणारी पण भटकंतीच.

    डोंगरातील भटकंती

    भटकण्याच्या या प्रत्येक प्रकारातून आनंद घेतला जाऊ शकतो. वाट चुकल्यामुळे किंवा निष्कारण काराव्या लागलेल्या वणवणीला भरकटणे म्हणतात. असे होते तेव्हा मात्र आनंदापेक्षा त्रास जास्त होतो. ज्याला फिरण्याची आवड आहे त्याने वरीलपैकी कोणत्याही प्रकारे पायपीट केली तरी ती आनंददायी होऊ शकते. ज्याला चालण्याचा कंटाळा असतो त्याला पाच-दहा मिनिटांचे अंतर कापणे जिवावर येते. तर अशी ही फिरण्याची अनेक रूपे ज्याने अनुभवली आहेत त्याला ‘चालणे’ म्हणजे काय हे कळलेले असते, त्याचे फायदे-तोटे यांची माहिती असते.

    आजच्या जमान्यात कामाच्या वेळा पाळणे, लांब अंतराचे प्रवास करणे यासाठी वाहतुकीची (खाजगी व सार्वजनिक) साधने सोयीची ठरू लागली आहेत. चरितार्थ चालविण्याची जबाबदारी असणार्‍यांना अशा वाहतुकीचा आसरा घ्यावा लागतो. पुर्वी ज्या अंतरावरील शाळेत मुले चालत जात असत त्याच्या अनेक पट अंतरावरील शाळा आजची मुले गाठतात. लांब अंतरावर शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांना वाहनांचा आधार असतो. जवळपास असणारी कामे आणि बाजारहाट यासाठी वाहन सोयीचे पडते, कारण वेळ महाग झाली आहे. घड्याळाच्या काट्याशी स्पर्धा असणा-यांना वाहनांचा उपयोग करावा लागतो.

    ‘भटकणे’ हे पायी असते असे गृहित धरायला हरकत नाही. वाहनावर मारलेला फेरफटका म्हणजे ‘भटकणे’ नव्हे. त्यामुळे सध्याच्या काळात पायी चालणे कमी झाले आहे, म्हणजेच ‘भटकंती’ कमी झाली आहे असे म्हणता येईल. यात एवढे काळजी करण्यासारखे काय आहे? तांत्रिक प्रगतीचा स्वीकार करणे म्हणजे प्रगतीचे लक्षण आहे ना? मग चालणे कमी झाल्याचा एवढा बाऊ कशाला? कारण चालणे ही फॅशन होऊ पहात आहे. हे संवाद बघा.

    1) ‘मी रोज 5 कि. मी. चालतो.’
    ‘हो का? वा. कोठे जाता?’
    ‘जिममध्ये.’
    ‘तिथे कसे जाता?’
    ‘कारमधून.’
    ‘मग चालता कोठे?’
    ‘ट्रेडमिलवर.’

    2) ‘ह्या बघा मी नवीन चपला घेतल्या आहेत.’
    ‘काय म्हणतात या चपलांना?’
    ‘ह्या ऍक्युप्रेशर चपला आहेत. घरात कारपेट असल्याने व बाहेर अनवाणी चालण्याची वेळ येत नसल्याने ह्या वापरण्याचा सल्ला दिला आहे डॉक्टरांनी.’

    एके काळी अन्य पर्याय नसल्याने चालणे ही प्राथमिक गरज होती. पण त्याचे फायदे शरीराला मिळत होते. आता चालण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे न चालण्याचे तोटे पुढे येत आहेत. मोकळ्या हवेतील चालणे व एसीतील चालणे यात फरक आहे हे डॉक्टरांची फी भरल्याशिवाय कळत नाही. आधी जिमची फी भरलेली असते. हेडफोनवर गाणी ऐकत नुसते पाय हलवणे ही चालण्याची व्याख्या झाली आहे. हात हँडलवर असतात. खांद्यापासून हात हलण्याची क्रिया करण्यासाठी वेगळा व्यायाम प्रकार करावा लागतो. पहाटेच्या वेळी हवा शुध्द असते. आवाज व दृष्ये नैसर्गिक असतात. हात पाय व सारे शरीर एका लयीत हलत असते. पण हे फुकटचे असल्याने याचे बाजारी मूल्य शून्य असते. जवळ असलेल्या शाळेत मुलांना गाडीवर सोडायला जाणारे पालक मुलांना न चालण्याचे धडे देत असतात. जुन्या सवयींना चिकटून बसण्याचा सल्ला कोणी देणार नाही. पण चांगली सवय असेल तर ती का सोडायची? चालणे, सायकल चालविणे व पोहणे हे सर्वांगसुंदर व्यायाम प्रकार आहेत. सध्याच्या काळात बेशिस्त वाहतुक ही पहिल्या दोन प्रकारांसाठी अडथळा ठरते आहे. नियोजनशून्य कारभारामुळे पर्यावरणीय समस्या वाढत आहेत. अशा परिस्थितीत अशुध्द हवेबरोबर आरोग्याच्या नव्या तक्रारी उद्भवू लागल्या आहेत. यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न काही गृहसंकुले करीत आहेत. बागेतील तसेच रस्त्याच्या कडेला बसविलेली व्यायाम व फिटनेस साधने यांचा उपयोग केला जातो आहे. हे चित्र आशादायक आहे. पण समस्यांचे मुळापासून निवारण व्हावे यादृष्टीने प्रशासन प्रयत्न करताना कधीच दिसत नाही. ह्क्क व कर्तव्य या बाबतीतली भारतीयांची मनोवृत्ती ‘चलता है’ या शब्दाने वर्णिली जाते. ‘चलता है’ म्हणजे ‘चालणे’ या सुदृढ अर्थी नाही, तर ‘चालायचेच’ या बेफिकीर अर्थी आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.

    चला आपण खरंखरं चालायला सुरुवात करायची का? डबल सेव्हिंग होईल – जिमची व डॉक्टरांची फी वाचेल. आणि जवळच्या कामांसाठी चालत गेलं तर ईंधनाची बचतही होईल. मिळणारा वेळ हा आपल्या अग्रक्रमानुसार ठरत असतो. ‘चालणे’ मात्र या अग्रक्रमात वर सरकणे आवश्यक आहे, तरच त्यासाठी वेळ मिळेल. म्हणून, ‘चालण्याची सवय ही चांगली सवय आहे’ हे मनात ठसविणे अवश्यक आहे.

      April 21, 2020


  • रोमन काँक्रीट

    सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या रोमन साम्राज्यानं मोठा भूभाग व्यापला होता. या रोमन साम्राज्याच्या खुणा आजही युरोपात भूमध्य सागराजवळच्या देशांत, तसंच उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आशिआतल्या अनेक भागांत, त्याकाळच्या वैशिष्ट्यपूर्ण बांधकामांच्या स्वरूपात दिसून येतात.

      February 2, 2023


  • बाप्पा…

    तो बसतो, तो फसतो, तरी गालातच हसतो
    दीड, पाच, सात, अकरा सांगाल तेवढे दिवस बसतो
    Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो.

    आपल्यासारखा असता तर काय म्हणाला असता?
    नैवेद्य दाखवल्यावर -
    आजकाल २१ मोदकाने काय होतेय सायेब?
    असं म्हणाला असता?

    नवस पूर्ण न झालेल्या भक्ताला,
    तुम्ही नवसाच्या लाईन मध्ये नव्हता ना मैडम,
    असं म्हणाला असता?

    अंधेरी वरून आलेल्या भक्ताला, लालबाग चा बाप्पा
    हे अंधेरीचं मैटर आहे अंधेरी च्या बाप्पाला कॉन्टॅक्ट करा,
    असं म्हणाला असता?

    नाही...

    त्याचा आशीर्वाद सगळ्यांवर सारखाच बरसतो..
    Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो

    त्याच्या नावाखाली आम्ही धंदा थाटलाय,
    एक असला तरी त्याला मंडळामध्ये वाटलाय,

    गणपतीच्या सणाला परवा एक जण म्हणाला,
    या वर्षी देवा तेवढं एक काम करून दे,
    त्या फेमस गणपती चा तेवढं दर्शन करून दे,

    भक्तांच्या या डिमांड ला तो गालातच हसतो,
    Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो

    आशिर्वादाचं त्याने पॅकेज दिलं असतं?
    माझ्याबरोबर शंकराचे आशीर्वाद, फक्त २० हजार..

    ग्रुप नवस केला असता तर डिस्काऊंट दिला असता?
    विसर्जनाच्या २ दिवस आधी, लास्ट २ डेज, लास्ट २ डेज..
    असं ओरडला असता?

    नाही... नाही... नाही...

    भक्तीच्या धंद्यात त्याला इंटरेस्ट नसतो..
    Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो..

    त्याची उंची फुटात मोजणारे आपण,
    भक्ती सोडून शक्ती दाखवणारे आपण,

    जो आपल्याला वाचवत आलाय त्याला आपल्यापासून वाचवा,
    नाक्या नाक्यावर बसवता तसा एक क्षण हृदयात बसवा..

    एक क्षण कशाला हो..??
    दीड, पाच, सात, अकरा सांगाल तेवढे दिवस बसतो
    Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो..

    विसर्जनाच्या दुसर्या दिवशी काय नजारा असतो?
    दीड कोटी डोकी ज्या पायावर टेकली, तो पाय कुठेतरी असतो
    तेवढेच आशीर्वाद देणारा, हात कुठेतरी असतो..
    एवढ्या लोकांना एकत्र आणणारा बाप्पा,
    स्वतः मात्र चौपाटीवर विखुरलेला असतो..

    तरीही तो हसतो.. तो फसतो...
    पुढच्या वर्षी आनंदाने आपल्या घरी बसतो..

    त्याचा आशीर्वाद पुन्हा आपल्यावर बरसतो
    Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो..

    तुमच्या आनंदातच त्याला इंटरेस्ट असतो
    दीड, पाच, सात, अकरा सांगाल तेवढे दिवस बसतो
    Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो..

    गणपती बाप्पा मोरया..

      September 9, 2016


  • बाळक्रीडा अभंग क्र.१९

    संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.

      August 30, 2018


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग त्रेहात्तर

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 30

    नैवेद्यम् समर्पयामी-भाग चार

    आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. त्याच्यासाठी मस्त स्वयंपाक तयार केलेला आहे. पाने घेऊन ठेवलेली आहेत. पण पाहुणेच आलेले नाहीत, तर पाने उगाच वाढून ठेवायची काय ?

    देवाच्या पूजेची सर्व आरास तयार झालेली आहे. पूजेला दाखवायचा नैवेद्य तयार आहे. सर्व पूजा साहित्य तयार आहे. यजमान तयार आहेत, पण देवाची प्रतिष्ठापना जर झाली नसेल तर नैवेद्य दाखवून घ्यायचा का ? आणि मखरात देवच नसेल तर नैवेद्य दाखवायचा तरी कुणाला ?

    नैवेद्य कधी दाखवायचा ?
    देव आला असेल तर.

    अहं वैश्वानरो भूत्वां प्राणीनाम् देहमाश्रितम, म्हणजे पोटातील भूक, वैश्वानर, जाठराग्नी, तो मीच, असं प्रत्यक्ष भगवंत सांगताहेत. याचाच अर्थ असा की, पोटात देव उपस्थित झाल्याशिवाय त्याला नैवेद्य दाखवायचा काय ?

    सरळ सरळ सांगायचे तर, भूक लागल्याशिवाय अजिबात जेवू नये. देव प्रकट झाल्याशिवाय नैवेद्य तरी कोणाला दाखवायचा ना ? पाहुणे आल्याशिवाय वाढायचे तरी कोणाला ?

    नैवेद्याचे हे साधे सोपे सूत्र लक्षात ठेवले तरी बास आहे. ज्याला जसे समजून घ्यायचं असेल तसं समजून घ्यावे समजून घ्यायचंच नसेल तर सोडून द्यावे. इथे फुकटचा निरर्थक वाद घालायला वेळ आहे कोणाला ?

    देवाला समजून घेण्यासाठी मुळात एक वेगळी दृष्टी, काही वेगळी समज असली पाहिजे. देव का सांगितला गेलाय, देव कुठे असतो, तो कुणाला दिसलाय का ? सगुण रूपातला देव समजला की नंतर निर्गुणातला समजून घ्यायचा असतो. सगुण निर्गुण एकु गोविंदु रे, असं माऊली म्हणतात. पण सगुण समजून घेतला की नंतर निर्गुण समजणे सोपे होते.

    काही गोष्टीमधे आपल्याला "क्ष" गृहीत धरावा लागतो, ते उत्तर मिळेपर्यंत. ते उत्तर एकदा मिळाले की नंतर हा गृहीत धरलेला "क्ष" विसरून जायचा असतो. हा " क्ष" म्हणजेच आमचा देव.

    ज्यांना अभ्यास करायचा आहे, त्यांनी कोणत्याही मार्गाने शिकावे. सगुण रूपात भक्ती योगाने जाणून घ्यावा, ज्यांना कर्मयोगाने समजून घ्यायचा असेल तर तसा समजून घ्यावा. ज्यांना ज्ञानमार्गाने जाणून घ्यायचा असेल तर तसा निर्गुण रूपातील अभ्यासावा. पण कुत्सित बुद्वीने देव म्हणजे बुवाबाजी, देव मानणे म्हणजे समाजाला काही वर्षे मागे नेणे असले आरोप करून केवळ शाब्दीक बुडबुडे काढणे म्हणजे शक्तीचा अपव्यय आहे.

    देवपूजा वगैरे सगळं बामनाचं काम. त्यांनी समद्या जन्तेला फशीवलंय. येड्या देवाच्या नादी लावलंय, समाजाला मागे नेण्याचं काम केलंय, वगैरे ज्यांना बोलायचं असेल ते खुशाल बोलू द्यावे. देव ही संकल्पना समजून घेण्यासाठी तशी शुद्ध वैज्ञानिक बुद्धी हवी, ते येरागबाळ्याचे काम नव्हे. आज कोणीही उठतो, देवाची निंदा नालस्ती करतो.

    देवाला नैवेद्य अर्पण करायचा तेव्हा मनात भाव असा हवा की मी जणुकाही सगुणरूपातील देवाला घास भरवतो आहे. भाव जर नामदेवांचा असेल तर देव जेवल्याशिवाय राहात नाही, ही उच्चकोटीची भक्ती आहे. ही तळमळ, तो भाव आपण निर्माण करू शकत नाही, म्हणून देव आपल्या हातून जेवत नाही. भाव तसा देव असतो, हे समजून घ्यायचे असते. बुद्धिवादी नास्तिक लोकांना ही भक्ती म्हणजे बुवाबाजी वाटते. ढोंग वाटते. आणि मनात विकल्प येतात. चार दोन बड्या लोकांनी देवाला नावे ठेवली, त्यांचे आपण अनुयायी आहोत, समाजसुधारक आहोत, असे वाटणे हा निव्वळ भ्रम आहे.

    जर विज्ञानाचा तिसरा डोळा उघडला तर भक्तीमागील कर्मयोग आणि ज्ञानयोग दोन्ही दिसू लागतील.आणि त्यामागे लपलेले आरोग्य सूर्याप्रमाणे स्पष्ट दिसू लागेल.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    23.06.2017

      June 23, 2017


  • इंद्रिये अवयव आणि आहार – भाग एक

    आपल्या पचनाचा प्रत्येक इंद्रियांशी संबंध असतो. पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये आणि मन यांचा पचनाशी कसा संबंध असेल ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

    या सगळ्यांमधे महत्त्वाचे आहे, मन ! मनामार्फत अनुभूती येत असते. जर हे मनच जागेवर नसेल, तर आपण काय खातोय, त्याची चव कशी असणार, हे अनुभवले नाही, तर त्याचा होणारा परिणाम वेगवेगळा होणार.

    जेवताना, खाताना टीव्ही बंद असावा, असे जेव्हा वारंवार आई ओरडते, तेव्हा नेमके काय बदल होतात, जे पचन बिघडवतात ? हे समजून घेतले तर जेवताना लक्ष जेवणातच राहील. जसे शिकवताना लक्ष शिक्षकांकडे असेल तरच शिकवलेले डोक्यात जाते, नाहीतर इकडून तिकडे शब्द धावत सुटतात. त्याचा अर्थ मनामार्फत इंद्रियापर्यंत पोचतच नाही.

    रसग्रहण नावाचा शब्द साहित्य क्षेत्रात वापरला जातो. तो मुळात आहारशास्त्रातील आहे. गोड, आंबट, खारट, तिखट,कडू आणि तुरट या सहा रसांचे ग्रहण कधी होईल, जर माझे मन जाग्यावर म्हणजे जेवताना, जेवणाच्या ताटावर असेल तर. वेळ मिळेल तसे मी जेवून घेतो, मी डबा खातो, कामात गुंतलो तर लागलेली भूक लक्षात सुद्धा येत नाही, काही वेळा कधी पोट भरलंय, हे पण कळत नाही. अशी अवस्था असणाऱ्यांनी जरा सावध रहायला हवे, कारण यांचे पचन हमखास बिघडते. आणि हीच छोटी छोटी कारणे पुढे काट्याचा नायटा करतात.

    जेवणाचा डबा न्यावा लागणं ही गरज आहे, कोणी हौस म्हणून डबा नेत नाही. शाळेची सहल हा या हौसेला अपवाद असायचा. सहलीला न्यायच्या डब्याची गंमत काही औरच असायची....
    आता यातून आनंद मिळवत जेवलो तर खाल्लेल्याचं पचन होणार. नाहीतर अगदी प्रेमळ बायकोच्या हातचा, प्रेमानं बनवून दिलेला, डबा जर मनापासून खाल्ला नाही तर पचन पूर्ण होणार नाही.

    डबा कसा खाल्ला तर आनंद जास्त मिळेल? विचार करून पहा. काही कारणाने कामावरून, जेवणाच्या वेळीच घरी आलोय, सकाळी भरून दिलेला डबा सोबत आहे, तर तो डबा आपण कसा खाऊ ? तर नेहेमी जेवतो ते ताट समोर घेऊ, डब्यातले जे काही एक दोन जिन्नस असतील, ते ताटात वाढून घेऊन जेवायला सुरवात करू. आणि छान शांतपणे जेवू. डबा तोच आहे. आपणच वाढून घ्यायचा आहे, पण ताटात वाढून घेऊन जेवलो तर मिळणारा आनंद वेगळा असतो.

    म्हणजे डब्यातल्या डब्यात जेवणे, आणि ताटात वाढून जेवणे यात फरक आहे. ताटात वाढून जेवण्यात जे समाधान मिळते, ते डब्यातल्या डब्यात बुचकून खाण्यात मिळत नाही.

    अर्थात काही भगिनीना, डबा खाणं हे तेवढंच आनंददायी वाटतं.
    रोजच्या रांधा वाढा... या चक्रातून सुटका तर मिळते तिला ! उरलं सुरलं काढून ठेवणे नाही, ओटा टेबल पुसायला नको, पुढची आवराआवर करावी लागत नाही....

    रोज डबा खाण्याची जागा जरी घर नसली, तरी डब्यातील सर्व पदार्थ ताटात वाढून जेवण्यातला आनंद तर आपण घेऊ शकतो ?

    एका ताटाचा तर प्रश्न आहे, तेवढे एक ताट काम करतो तिथे ठेवून द्यायचे की झाले. तेवढेच समाधान !!

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    16.03.2017

      March 16, 2017