(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • व्यवसाय कसा करावा हे अंबानीकडून शिका

    १५०० रु. ३६ महिने वापरायचे,आपला माल सुद्धा विकायचा. !!
    (१५३ x ३६ =५५०८) आणि नंतर बिनव्याजी पैसे परत करायचे !

    .....आधी दिलेलं 'फुकट' व्याजाच्या पैश्यातून वसूल ! वर ५५०८ चा धंदा !

    ...आता फक्त प्रश्न एवढाच आहे कि ५५०८ गुणिले किती ?
    सरासरी ४ कोटी जरी पकडले तरी !
    २२०३२०००००००!
    22032 कोटी !
    फुकट हँडसेट देऊन दिवसाला २०.४ कोटी कमाई !

    उदाहरण समोर आहे-
    व्यवसाय कसा करावा.....हे अंबानी कडून शिका..!!

  • गप्पा निळाईशी

    असेच एका सायंकाळी,
    सहजी पाहिले आकाशी,
    निरभ्र निळाईमध्ये न्हाऊनी,
    बोलू म्हटले देवाशी.

    उलगडलो उघड्या जमिनीवरती,
    अनं हाताची केली उशी,
    निरभ्र निळाईमध्ये न्हाऊनी,
    बोलू म्हटले देवाशी.
    आंथरलेला होता वरती,
    मैलोगणती गालीचा ,
    चमचमणारी नक्षी त्यावरी,
    वापर केला ताऱ्यांचा.
    रेलायाला बैठकीवरी,
    मऊशार ढगांची केली उशी,
    निरभ्र निळाईमध्ये न्हाऊनी,
    बोलू म्हटले देवाशी.
    एकेरीवर आलो अनं मी,
    साद घातली देवाला
    पळभरती म्हटले टेक जरासा,
    चार गोष्टी बोलायाला.
    ये ना सामोरी असा तू ,
    मैफिल जमवुया खाशी ,
    निरभ्र निळाईमध्ये न्हाऊनी,
    बोलू म्हटले तुजपाशी.
    काय म्हणते वैकुंठाची म्हटले,
    बरी आहे ना पाणी हवा ?,
    दिवाळसणासाठी वहिनींना,
    खरिदला का शालू नवा ?
    सुनी गेली आषाढी कार्तिकी,
    भेट न घडली भक्तांची ,
    निरभ्र निळाईमध्ये न्हाऊनी,
    बोलू म्हटले तुजपाशी.
    बोलतो आता मुद्द्याचे देवा,
    काय सांगू रे मी तुजला ,
    विषाणू फोफावला इथे अन् ,
    मारीत चालला आम्हाला.
    माणूसघाणा झाला माणूस,
    अन् दुरावला माणुसकीशी ,
    निरभ्र निळाईमध्ये न्हाऊनी,
    बोलू म्हटले तुजपाशी.
    भाग्य आमुचे देवा घातले,
    आम्हास मानव जन्माला ,
    सृष्टीचा रे तूच करविता,
    जन्म दिला या विश्वाला.
    मर्यादा सोडून ईश्वरा, आमुच्या,
    मांडला दावा तव सृष्टीशी
    निरभ्र निळाईमध्ये न्हाऊनी,
    बोलू म्हटले तुजपाशी.
    विषाणूचा व्यापार नांदतो,
    निर्मित तव पृथ्वीवरती ,
    सर्वांगसुंदर तुझी निर्मिती,
    व्हावे तिने किती स्वार्थी ?.
    तूच एक आधार आता,
    वाचव यातून जगतासी ,
    निरभ्र निळाईमध्ये न्हाऊनी,
    बोलू म्हटले तुजपाशी.
    निरभ्र निळाईमध्ये न्हाऊनी,
    बोलू म्हटले तुजपाशी.
    प्रासादिक म्हणे
    -- प्रसाद कुळकर्णी
  • ड्रॅगनचे विषारी फुत्कार

    दक्षिण आशियामध्ये चीनला प्रभाव वाढवायचा आहे. त्यात त्यांना भारताचा अडथळा जाणवत आहे. दुसरीकडे जागतिक महासत्ता बनण्यासाठी त्यांची अमेरिकेशी स्पर्धा सुरू आहे. या दोन्ही आघाड्यांवर लढताना त्यांनी पाकिस्तानला हाताशी धरून भारताच्या सीमांवर अशांतता निर्माण करण्याचे धोरण ठेवले आहे. यात भारताचे बरेच नुकसान होत असून अमेरिका आणि चीन यांच्या वर्चस्वाच्या युद्धात भारत होरपळून निघत आहे.

  • फिल्मी कानोसा – टाइमपास

    या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेषकांच्या पुरेपूर टाइमपास होईल (म्हणजे उत्तम कलाकृतीच्या माध्यमातून मनोरंजन होत राहील) याची काळजी घेतली आहे. टाइमपास या चित्रपटाची कथा आहे दगडू (प्रथमेश परब) आणि प्राजक्ता (केतकी माटेगावकर)ची ; तारुण्यात नुकतच पदार्पण केलेल्या दोन मुलांच्या भावविश्वाभोवती फिरणारी ही कथा;

  • मच्छोदरी देवी

    औरंगाबाद जिल्ह्यातील अंबड या गावाजवळ एक छोट्याशा टेकडीवर मच्छोदरी देवीचं मंदीर स्थित आहे, या टेकडीचा आकार मच्छाप्रमाणे असल्याने या देवीला मच्छोदरी हे नाव मिळालं असावं

  • अनुवंशशास्त्र (भाग २)

    घराण्यात कुठलाच आजार नसताना अचानक एका बाळात/ व्यक्तीत अनुवंशिक आजार उद्भवू शकतो का? हा प्रश्न मनात येतो. रंगसूत्रांत वा गुणसूत्रांत गर्भ वाढत असताना नव्याने काही चुका/ दोष निर्माण होऊ शकतात. त्यातून वाढणाऱ्या गर्भात/ व्यक्तीत अनुवंशिक आजार दिसतो, मात्र तो आई-वडिलांकडून आलेला नसतो. अनेकदा जनुकांच्या दोन प्रतींमधली एक प्रत काम करीत नसते, मात्र दुसरी प्रत आवश्यक ते काम योग्य प्रकारे आणि शरीराला पुरेशा प्रकारे करते.

  • मालवून टाक दीप

    परवा खूप दिवसांनी हे गाणं ऐकलं. शृंगार रस सुद्धा इतका विभोर करणारा असू शकतो ह्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे हे गाणं. किती हळुवार प्रेमाचे एकएक पदर उलगडत जातात ह्या गाण्यात. लताबाईंचा आवाज आणि हृदयनाथांचे स्वर्गीय संगीत केवळ वर्णनातीत. शृंगार रसाचे हे गाणे आपण अगदी चार चौघात बसून ऐकू शकतो. मी तर हे गाणे माझ्या मुलीबरोबर पण ऐकले आहे. आम्ही बोललो आहे ह्या गाण्यावर. कधीच लाज नाही वाटली ह्या वर बोलतांना.

    हल्ली सगळेच खुल्लमखुल्ला जगण्याचे पुरस्कर्ते झाले आहेत. त्यात काय एवढं? म्हणत हि पिढी आपल्यालाच नाकं मुरडते. पण प्रेम खरच चार लोकांना दाखवण्यासाठी आहे का हो? का चार लोकात करण्यासाठी? अगदी दुसऱ्याच्या भानगडीत आपण कशाला नाक खुपसा म्हंटल तरी मग चार लोकात नसते उद्योग करू नका ना, असं म्हणायची वेळ येते. आमच्या घराच्या मागे नदी आहे, नदी पलीकडे एक छान रस्ता आहे, दुपारी कधीतरी चुकून त्या रस्त्यावर गेलं तर खरंच सांगते तुम्हीच लाजाल इतके प्रेमाचे थेरं चालतात तिथे. थेरच... ते प्रेम नाहीच मुळी. घरा मागेच नदी असल्यामुळे पावसाळ्यात आम्हाला जरा टेंशन असतं पाण्याची पातळी वाढली की. मग काय पाण्याची पातळी किती झाली हे पाहण्यासाठी आम्ही दोघे गेलो त्या रस्त्यावर, दोन मिनिटंसुद्धा तिकडे उभे राहता आले नाही. 'कामातुराणां न भयं न लज्जा'. भर रस्त्यावर, अगदी दिवसा-ढवळ्या मिठ्या काय, चुंबन काय आणि काय काय? मला खरंच असं झालं की दोन मिनिटं थांबून त्या प्रेमवीरांना विचारावे, काय करताय बाबांनो? शिकता ? प्रेम म्हणजे काय हे तरी कळतंय का? असे किती दिवस एकमेकांना ओळखता? आणि तुमच्या प्रेमाची ओळख पटायला काय केलंत तुम्ही? का तुम्हला असा एकटा रस्ता निवडावासा वाटला? का एखाद्या कॅफेत गेल्यावर जे परिवार बरोबर येतात त्यांना तिथे बसवत सुद्धा नाही? इतकी कसली घाई आहे तुम्हाला ? प्रेम म्हणजे फक्त असे स्पर्श? बाकी काहीच नाही ? तो स्पर्श सुद्धा इतका वासनेने बरबटलेला? त्या स्पर्शाची सगळी गम्मतच घालवूं बसलात रे तुम्ही, असं ओरडून सांगावस वाटत होतं, पण ह्यातलं काहीच न बोलता आम्ही दोघेही मान खाली घालून तिथून माघारी फिरलो.

    पण डोकं शांत बसे ना. असं वाटलं काय करून आपण ह्या नव्या पिढीशी संवाद साधू शकू? मग लक्षात आलं हा संवाद फक्त नव्या पिढीशीच नाही तर अगदी माझ्या वयाच्या पिढीशी पण तेवढाच गरजेचा आहे. आमच्या पिढीतही हे अनेक प्रकाराने दिसून येतं, विवाह बाह्य संबंध ह्याचेच परिणाम आहेत. आम्ही जसे मोठे होतं गेलो त्यावेळी आमच्या आई-वडिलांनी आम्हाला एकच गोष्ट सांगितली, जी गोष्ट करतांना तुम्हाला चार-चौघात सांगायची लाज वाटेल, भीती वाटेल, आमच्या समोर आमच्या नजरेत नजर मिळवून तुम्ही त्या गोष्टीची चर्चा करू शकणार नाही ती गोष्ट नक्कीच वाईट/चुकीची असणार.

    मला सिनेमा बघायला फारच आवडतं. पण सिनेमा बघतांना सुद्धा आपली विवेक बुद्धी जागृत असावी असा माझा अट्टाहास आहे. हल्लीच प्रदर्शित झालेला मुंबई पुणे मुंबई २ बघतांना मला जाणवलं का हा सिनेमा प्री मॅरेज कॉन्सेलिंग साठी एक उत्तम उदाहरण ठरू शकतो. नातं हळू हळू उलगडण्यात जी मजा आहे , ती ओरबाडून घेतलेल्या क्षणिक स्पर्शात नक्कीच नाही. ओरबाडून घेतलेल्या म्हणतेय मी कारण अगदी दोघेही समजदार असले आणि समजून घडलेलं असलं तरी ते ओरबाडलेलं एवढ्या साठी की वेळेची गरज नव्हती, ती फक्त शरीराची गरज होती. आणि प्रेम शरीराच्या फार वर आहे.

    स्पर्श किती हिम्मत देतो आपल्या जगण्याला. अगदी मायेने ओथंबलेला आईचा स्पर्श, शाबासकी म्हणून बाबांची पाठीवर थाप, भावा बहिणींचा एकमेकांना होणार मारामारीच्या वेळेचा स्पर्श, मित्रत्वाने भरलेला आश्वासक स्पर्श, बाळाचा आईला होणार गोड स्पर्श आणिकही कितीतरी. प्रत्येक स्पर्श भावानेच परिमाण घेऊन येतात आणि आपलं नातं अणिकच घट्ट विणत जातात. मग ह्या स्पर्शातले बदल आपली नवी पिढी समजू शकली नाही, की आपण पालक म्हणून ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवू शकलो नाही, हा प्रश्न उरतोच.

    प्रियकर-प्रियसी, पती-पत्नी ह्या नात्यातले काही स्पर्श तर फार फार सुंदर असतात. प्रेमाची ग्वाही देणारे असतात. त्या स्पर्शात केवढी तरी ताकद असते, येणारे कितीतरी कठीण क्षण पचवण्याची, नात्यात आलेले चढ-उतार सहज पार करण्याची. त्या पहिल्या स्पर्शाच्या आठवणी किती तरल असतात, त्यात एकाच वेळी किती तरी भावना दडलेल्या असतात, ही स्पर्शची एकरूपता आपल्या अध्यात्मातल्या समाधी इतकी खोल आहे. त्याचा असा बाजार मांडून काय मिळणार?

    "काय हा तुझा श्वास, दरवळे इथे सुवास
    बोल रे हळू उठेल चांदण्यावरी तरंग"

    आपल्या बोलण्याने, जे फक्त आपल्या दोघांचेच आहे, ज्याची दखल त्या चांदण्यांनी सुद्धा घेता कामा नये, इतकं हे पर्सनल आहे. इतकं हे त्या दोघांचेच आहे. मी नवीन पिढीला दोष देण्या आधी पालक म्हणून स्वतःला तपासून बघते. आम्ही आमच्या पुढच्या पिढी पर्यंत ह्या स्पर्शाची ताकद पोचवू शकण्यात कुठेतरी कमी पडलो म्हणून आमची मुलं तो स्पर्श आणि त्याचे न समजलेले अर्थ घेऊन वाहवत जातांना दिसतात.

    मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग
    राजसा किती दिसात, लाभला निवांत संग

    © सोनाली तेलंग
    २४/०७/२०१८

  • “मराठीसृष्टी”

    गुढीपाडवा व नूतन वर्षाभिनंदन !

    मराठीसृष्टीसाठी जीवापाड मेहनत घेणारी टीम व त्यांचे आमच्यावरी प्रेम आणि आमचे त्यांच्या वरील प्रेमासाठी कविता. ज्यांनी मराठीपण जपले, मराठीसाठी काम केले.

  • स्वर विज्ञान – श्वसनतंत्र

    मनुष्यजीवन सर्वस्वी या श्वास पद्धतीवर अवलंबून आहे. नियंत्रित श्वास हा अतिशय आवश्यक असा विचार आहे.श्वास नियंत्रणाने आपण हवे ते साध्य करु शकतो आणि श्वासावरचे नियंत्रण सुटले तर आयुष्याची माती सुद्धा होवू शकते.

  • जरा विसावतो आता ..

    वर्ष संपलं. वर्ष सरताना या वर्षांत आपल्या हातून काय काय झालं याचा आढावा घेणं मला आवश्यक वाटतं. अर्थात संसारतापे जे काय करावं लागतं, ते करणं कुणाला चुकलेलं नाही.