वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
अष्टांग संग्रह सूत्रस्थान या ग्रंथामधे अकराव्या मात्राशीतीय नावाच्या अध्यायात श्लोक क्रमांक 64 ते 68 या मधे काय सांगितले आहे ते पाहूया. फार सुंदर आहे. त्यातील मतीतार्थ सांगतो.
" जसे रेल्वेचं इंजिन धावत असताना, त्याला इंधन जास्ती प्रमाणात लागते. इंजिन सुरू आहे, पण नुसते उभे असेल, तर इंधन कमी प्रमाणात लागते, तसेच शरीराला इंधनाची जास्ती आवश्यकता असते. पण रात्रौच्या वेळी इंधनाची फार आवश्यकता नसते."
व्यवहारातील अत्यंत समर्पक उदाहरण ग्रंथकारांनी दिले आहे. कोणत्याही यंत्राचे असेच असते. जेव्हा काम जास्ती तेव्हा इंधन जास्ती. काम नसेल तर इंधनाची गरज जास्ती रहात नाही.
समजा आपल्याला तीन चारशे किलोमीटरचा प्रवास करायचा असेल तर सुरवातीला गाडीमधे आपण इंधन पूर्ण भरून घेतो. मग लवकर रिझर्व्ह लागणार नाही. दर वीस पंचवीस किलोमीटरला दोन दोन लीटर इंधन घालत पुढे जायचे , असं करतो का आपण ? नाही ना ! मग दर दोन चार तासाने खायचे हा नियम कुठुन काढला ?
एकदा दहा माणसाना पुरेल एवढा चहा करायचा हे ठरलं तर एक एक कप चहा करीत रहायचं की एकदम दहा कप चहा करायचा ? की एक कप चहा उकळला कि त्यातच परत एक कप पाणी घालून पुनः साखर पावडर घालायची ? असं दहा वेळा करायचं ?
एकदा ठरलं की प्रश्नच संपला. तसंच जेवणाचं पण आहे. माझं आजचं काम कसं आहे, किती काम करायचं आहे, त्याला इंधन किती लागणार आहे, हे सुरवातीला (सकाळी) ठरवून घ्यायचं आणि इंधन भरायचं.
एवढं मी जेवलंच पाहिजे, नाहीतर ताकद येणारच नाही, असा नियम करून जेवू नका. कारण प्रत्येकाचं काम वेगवेगळं आहे,
आपली कामे देखील दिवसाचीच खूप असतात. म्हणून सकाळचे जेवण जास्ती प्रमाणात घ्यावे. ज्या दिवशी कामे कमी असतील तेव्हा खाणेही कमी असावे. पण व्यवहारात नेमके उलटे घडते. जेव्हा सुट्टी असते, तेव्हाच पोटावर अत्याचार जास्ती होतात.
अगदी क्वचित रात्रपाळीला प्रश्न येईल, पण नियम तोच जेव्हा काम जास्ती तेव्हा अन्न जास्ती. आणि सूर्यास्तापूर्वी जेवण संपलेच पाहिजे. तरच उर्जा निर्माण होईल. जेव्हा रात्रपाळी असेल तेव्हा सायंकाळी जेवणाचे प्रमाण जास्त आणि सकाळी कमी जेवावे. आणि जेव्हा नियमितपणे दिवसा काम असेल तेव्हा सकाळी जेवण जास्ती प्रमाणात आणि सायंकाळी अगदी कमी जेवावे.
......म्हणजे गाडी ओव्हर लोड होत नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
09.03.2017
मराठीमध्ये कोशवाङ्मयाची समृद्ध परंपरा आहे. मराठी भाषेत कोशरचना सुरू होऊन आता सुमारे १५० वर्षे लोटली आहेत. मराठीत १९व्या शतकात जी कोशरचना झाली ती सामान्यतः शब्दकोश-स्वरूपाची झाली. संस्कृतीच्या विकसनशील काळात आधी शब्दकोश निर्माण होतात; त्यानंतर ज्ञानकोशांची रचना होऊ लागते. अव्वल इंग्रजी काळात शब्दकोश रचनेमागच्या प्रमुख प्रेरणा इंग्रजी राज्यकर्त्यांची मराठी भाषा शिकण्याची गरज आणि ख्रिस्ती धर्मप्रचारकांची धर्मप्रसाराची गरज या होत्या.
आपली विजेची गरज ही वेगवेगळ्या स्वरूपाची असते. उदाहरणार्थ, आपल्या मनगटावरच्या घड्याळातली विजेची गरज ही अत्यल्प असते व ती छोट्याशा बटण-सेलने भागू शकते. याउलट एखाद्या शहराला वीजपुरवठा करायचा असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वीज निर्माण करावी लागते. ही मोठ्या प्रमाणावरची विजेची निर्मिती मुख्यतः औष्णिक, जलविद्युत आणि अणुऊर्जा प्रकल्पांद्वारे केली जाते.
बारामुल्ला जिल्ह्यातील अवंतीपुराजवळील लाटूमोड येथे झालेल्या या हल्ल्यात अनेक जवान जखमी झाले होते. सुमारे ३५० किलो स्फोटकांनी भरलेले वाहन ताफ्यावर धडकावून दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतरचा हा सर्वांत मोठा हल्ला होता.
पहिला चेंडू टाकणारे होते इंग्लंडचे आल्फ्रेड शॉ. त्यांच्यासमोर होते ऑस्ट्रेलियन फलंदाज चार्ल्स बॅनरमन. त्यांनी त्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कसोटी क्रिकेटमधली पहिली धाव घेतली. त्यांनीच दुसऱ्या दिवशी पहिले शतक पूर्ण करताना १६५ धावा केल्या. या सामन्याला कसोटी दर्जा नंतर बहाल करण्यात आला. सुरुवातीला या सामन्याचे स्वरूप ऑल इंग्लंड वि. कम्बाइन्ड न्यू साउथ वेल्स अँड व्हिक्टोरिया इलेव्हन असे होते.
अंबाजोगाई बीड जिल्ह्यातील एका तालुक्याचे गाव म्हणजे भाविक भक्तांचे स्थान जगन्माता योगेश्वरी होय. देवीच्या स्थापनेचा कालावधी पुरातन असून याविषयी ऐतिहासिक उल्लेख प्राचीन शिलालेखात असलेल्या जोगाईचे माहेर या ठिकाणी आढळतो.
प्रकाशन दिनांक :- 25/01/2004
देशात सर्वत्र सध्या ‘फिल गुड’ चा बोलबाला आहे. एका मागोमाग एक घोषणांचा सपाटा लावीत सरकार प्रत्येकाला खूष करण्याच्या प्रयत्नात दिसते. तसेही निवडणुकीचे वर्ष असले की, सर्वसामान्य जनता खूष असतेच.
सध्याच्या काळात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. सोबतच शहराचे प्रदूषण, तापमान वाढत आहे. याशिवाय वर्दळ आणि पार्किंगचाही त्रास सर्वसामान्यांना सोसावा लागतो. दिल्लीमध्ये सम-विषमचा प्रयोग केला गेला. भविष्यात ही परिस्थिती आपल्याही शहरात ओढावणार आहे. हे रोखण्याकरिता सायकलिंग करणे सर्वांत चांगला व आरोग्यदायी उपाय असून, प्रत्येकाने आठवड्यातून किमान एक दिवस सायकल चालविण्याचा निर्धार करावा. समाजात बदल हवा असल्यास त्याची सुरुवात स्वत:पासूनच करावी लागते. शहरात सायकल चालविण्याची संस्कृती रुजविण्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संघटना आणि व्यक्तीं नी पुढाकार घेतला पाहिजे. लोकांचा सायकलकडे पाहण्याचा दुय्यम दृष्टिकोन बदलण्याची व सायकलिंगमुळे होणारे फायदे समाजवून सांगितले पाहिजे. एवढेच करून चालणार नाही, शहरातील मार्केट, मॉल, रेल्वेस्थानक, बसस्थानक अन्य महत्त्वाच्या ठिकाणी सायकल पार्क करण्याची व्यवस्था असावी. सायकल संस्कृती रुजविताना जी वागणूक रस्त्यावरून मोटारसायकल, कार चालविणाऱ्यांना मिळत तीच सायकलिंग करणाऱ्यांना मिळाल्यास सायकल चालविण्याकडे नागरिकांचा कल वाढविण्यास मदत होईल. पालक पाल्यांना ५० ते ६० हजार रुपयांची मोटारसायकल घेऊन देतात. पण, दहा हजार रुपयांची सायकल घेऊन देत नाही. कारण ते त्यांना प्रतिष्ठेचे वाटत नाही. मोटारसायकलच्या किमतीपेक्षा महागड्या सायकल मिळतात. त्याने आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत व पैशाची बचत आणि अपघातांना पायबंद लावणे शक्या होते. परंतु, ते सर्व या माहितीपासून अनभिज्ञ आहेत.
जगातील बऱ्याच देशात सायकलिंगला वेगळे स्थान आहे. नेदरलॅण्डमध्ये वाहतुकीचे साधन म्हणून ४० टक्के सायकलचा वापर केला जातो. विशेष म्हणजे तिथे सायकल चालविणाऱ्यांना प्राधान्य दिले जाते. यासाठी ठिकठिकाणी पार्किंग व्यवस्था, वाहतुकीचे नियम, सहज उपलब्धता यासर्व गोष्टींमुळे तिथे सायकल संस्कृती चांगली रुजली आहे. १८८० च्या दरम्यान पहिल्या सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर अमेरिका, इंग्लंड आणि नंतर संपूर्ण युरोपमध्ये आवश्यकतेनुसार सायकलसाठीच्या पायाभूत सोयीसुविधा उभारल्या गेल्या. अलीकडच्या काळात तर सायकलिंगचे वाढलेले महत्त्व लक्षात घेता सायकलसाठीच्या पायाभूत सुविधांची निर्मिती हा शहराच्या नियोजनाचा भाग झाला आहे. सायकलस्वारांसाठी वेगळे ट्रॅक, सिग्नल व्यवस्था, पाìकग, नियम, कायदे आणि आवश्यक प्रशिक्षणाचा त्यामध्ये समावेश असतो. एवढेच नव्हे तर लहानपणापासूनच सायकलिंगबाबत गोडी निर्माण व्हावी यासाठी मुलांना सायकल चालवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. युरोप आणि अमेरिकेत गेल्यावर आपल्याला त्याचा पावलोपावली प्रत्यय येतो. परदेशात कुठल्याही पायाभूत सुविधा उभारताना सायकलस्वारांची सोय लक्षात घेतली जाते. पायाभूत सुविधा उभारताना सर्वप्रथम पादचारी, सायकलस्वार, सार्वजनिक वाहतूक आणि त्यानंतर खासगी वाहने अशा पद्धतीने रस्त्यांची आणि पाìकगची आखणी केली जाते. नेदरलॅण्डमध्ये २०१४ मध्ये एक अनोखा प्रयोग करण्यात आला. तिथे किलोमीटरभर लांब रात्री चमकणाऱ्या सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात आली आहे. फ्लोरोसंट रंगाचे विशिष्ट तुकडे सिमेंट-काँक्रीटमध्ये वापरण्यात आले असून दिवसाच्या प्रकाशात ते ऊर्जा साठवून घेतात आणि रात्रीच्या अंधारात हाच रस्ता उजळून निघतो. स्पेनमधील सॅन सबॅस्टियन या शहरात २००९ साली जुन्या रेल्वेच्या बोगद्याचे रूपांतर सायकल ट्रॅकमध्ये करण्यात आले असून हा जगातील सर्वात लांब सायकल बोगदा आहे. विशेष म्हणजे सायकलस्वारांच्या सुरक्षिततेसाठी यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा बसवण्यात आले आहेत.
टोकियो शहरामध्ये जमिनीखाली सायकल पाìकगतळाची निर्मिती करण्यात आली असून दोनशे सायकल पार्क करण्याची सुविधा आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठीचा हा उपाय सरस आहे. जर्मनीमध्येही जुन्या रेल्वे ट्रॅकवर तब्बल नव्वद किलोमीटर लांबीचा सायकल ट्रॅक उभारणीचे काम सुरू आहे. अशाच प्रकारच्या सोयी सुविधा आपल्या शहरात मिळाल्यास निश्चिधत चांगले बदल दिसून येईल.
भारतातही सायकलचा वापर फार पूर्वीपासून होत आहे. सायकल हेच दळणवळणाचे प्रमुख साधन होते. मात्र देशात सायकलसाठी म्हणून काही विशेष पायाभूत सुविधा उभारल्या गेल्याचे फारसे दस्तावेज उपलब्ध नाहीत. सायकलिंगबद्दलचे प्रेम वाढत आहे याबाबत शंका नाही. परंतु सायकलसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी लागणाऱ्या राजकीय इच्छाशक्तीचा आपल्याकडे अभावच आहे.
आज सायकल दिना निमीत्त प्रतीज्ञा करा.
मी आठवड्यातून एक दिवस सायकलचा वापर करीन.
सायलक पार्क करण्याची व्यवस्था व ती सहज उपलब्ध व्हावी
ती घेण्यासाठी कर्ज मिळण्याची सुविधा - सायकलचा विमा असावा
सायकलिंगचे फायदे सांगण्यासाठी शिबिर, रॅली, काढावी सर्व काॅर्पोरेट कंपन्यानी कर्मचाऱ्यांना एक दिवस सायकलने येण्याचा सल्ला द्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
महात्मा गांधींना दक्षिण अफ्रिकेत रेल्वेने प्रवास करत असताना फारच कटू अनुभव आला होता. ते फर्स्ट क्लासच्या डब्यामधून प्रवास करत असताना त्यांच्या डब्यात एक गोरा माणूस चढला. 'भारतीय काळा माणूस माझ्याबरोबर प्रवास करण्यास धजतोच कसा?' असं म्हणून गांधीजींना सामानासकट डब्यातून ढकलून देण्यात आलं होतं. या घटनेचे गंभीर पडसाद त्यांच्या पुढील जीवनातील विचारसरणीत पडले. आफ्रिकेतून भारतात परतल्यावर आपला देश जाणून घेण्यासाठी रेल्वेच्या तिसऱ्या वर्गाच्या, बसण्यास लाकडी बाके असलेल्या डब्यातून त्यांनी भारत पालथा घातला. त्या प्रवासादरम्यान भारतीय जनता, तिची जीवनशैली, ते भोगीत असलेली गरिबी, शेतांत राबणारे पुरुष व स्त्रिया, पाण्याकरता वणवण भटकणारे लोक, असं सर्व दृश्य पाहून त्यांचं मन विषण्ण झालं. डब्यातील सहप्रवाशांशी हितगुज करताना त्यांना खऱ्या भारताचं दर्शन झालं. एकदा गांधीजी रेल्वेने प्रवास करत होते. नदीवरील रेल्वेपुलावर गाडी थांबली. नदीच्या पात्रात एका अर्धनग्न गरीब स्त्रीचे डोळे वस्त्र मिळवण्याकरता भिरभिरत होते. गांधीजींना खिडकीतून हे दृश्य दिसले. लागलीच त्यांनी आपल्या खांद्यावरचा पंचा नदीच्या पात्रात फेकला. पाण्याबरोबर वाहत जाऊन तो त्या स्त्रीच्या हातापर्यंत पोहोचला.
तो उचलून घेताना तिच्या लज्जित चेहऱ्यावर कृतज्ञतेचा भाव उतरला. तो पाहून गांधींजींचे डोळे पाणावले. असे मनाला चटका लावणारे अनेक प्रसंग त्यांना भारतभरातील रेल्वे प्रवासात मिळत होते. त्यांनी तिसऱ्या वर्गातून प्रवास करणं कधीच सोडलं नाही, परंतु जसजशी त्यांची लोकप्रियता वाढू लागली. तसतसं त्यांच्या डब्यासमोरच्या प्लॅटफॉर्मवर दर्शनास होणारी गर्दी आवरणं फार कठीण काम होऊ लागलं. हा गोरगरिबांचा राजा मात्र त्यांच्या अडचणीच्या वेळी भर दंगेधोपे, जाळपोळ, चालू असतानाही रेल्वेनेच त्यांच्या मदतीला धावून जात असे. (उदाहरणार्थ, नौखाली, कलकत्ता, पंजाब, लाहोर.)
रवींद्रनाथ टागोर, विवेकानंद, सुभाषचंद्र बोस व इतर अनेक महत्त्वाच्या व्यक्ती रेल्वे प्रवासामुळे सामान्य जनतेपर्यंत पोहोचत असत. त्यांच्या अडचणी, दुःखं जाणून घेणं या नेत्यांना रेल्वेमुळेच सुकर झालं.
रशियन साहित्यिक व महान तत्त्ववेत्ता लिओ टॉलस्टॉय वेषांतर करून एक सामान्य खेडूत म्हणून दिवसचे दिवस रशियाभर रेल्वेच्या तिसऱ्या वर्गाच्या डब्यातून प्रवास करीत असे. डब्यातील सहप्रवाशांशी गावरान भाषेत गप्पागोष्टी करत असे. या सर्व अनुभवांतूनच त्याचं अजरामर साहित्य निर्माण झालं. योगायोग असा, की लिओ टॉलस्टॉयच्या जीवनातील शेवटचा प्रवासही रेल्वेनंच झाला. अखेरीस रेल्वेप्रवासादरम्यान त्याचा मृत्यू स्टेशनवरील वेटिंग रूम मध्येच झाला.
हिटलर व त्याचे सहकारी यांचं रेल्वेवर अतिशय प्रेम होतं. किंबहुना, १९३४ ते १९४५ या काळात जर्मन रेल्वे जगातील सर्वात उत्तम म्हणून गणल्या जात असत. हिटलर ज्या डब्याने प्रवास करत असे त्यात अनेक सोयी होत्या. एकसारखे दिसणारे अनेक गाडीचे डबे त्याच्या वापरात असत. शत्रू आपल्याला मारण्याचा प्रयत्न करील या भीतीने तो सतत डब्यांची व रेल्वेमार्गांची अदलाबदली एका वर्षामध्ये १९४४ साली अमेरिकेच्या या अध्यक्षाने ५०,००० मैल प्रवास केला होता.
-- डॉ. अविनाश वैद्य
गेली चार वर्ष आपटे आजींची सुप्रसिद्ध बटाटा वडा, भजी मिळणारी गाडी बंद होती. १९७१ ते १९८८ च्या अर्ध्या वर्षापर्यंत मी(आई वडील भावंडांसहित) ठाण्याचा रहिवासी. ठाण्यात उत्कृष्ट चविष्ट आणि स्वादिष्ट कुठे काय मिळतं याची खडानखडा माहिती आमच्या अट्टल खवैय्या मित्रांच्या कंपुला असायची. त्यामुळे कुणाच्याही, कुठे काही चविष्ट खाण्यात आलं की ते सगळ्यांना सांगितलं जायचं आणि आमच्या स्वाऱ्या धडकायच्या तिथे.
Copyright © 2025 | Marathisrushti