(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आमच कोकण

    From the time line of श्रीनिवास चितळे


    अनुपमा ---"काका ,मी आधीच तुम्हाला सांगून ठेवते कि मला लग्नानंतर पुणे सोडून कुठेही जायचं नाही ,नो कर्जत ,नो कोकण ,नो मुंबई ."
    "अग तू कुठे बघितल आहेस का ? कोणी आवडलाय का ? मला सांग हवतर मी जाऊन विचारतो .
    "तस काहीही नाहीये काका ,पण मला पुणे सोडायचं नाही आणि आई पाठी लागली आहे कि देवगडच एक स्थळ आहे ,मुलगा इंजिनियर आहे आणि इथली बजाज मधली नोकरी सोडून तो गावाला शेती ,बाग बगिच्या पाहायला स्वतःहून गेला आहे म्हणे ".
    "अहो,भावोजी बघा हो ,दारी १००० कलम ,सुपारीच्या ५ बागा ,शेती ,मुंबई पुण्याच्या सर्व सुख सोई आहेत आणि हि जायचं नाही म्हणते ".
    "अहो वाहिनी सोडून द्या ना ,तिला नाहीना जायचं ,आणि त्याला छपन्न मुली मिळतील आणि हिला ५६ उत्तम स्थळ येतील ,अहो आपली एवढी हुशार मुलगी ,कम्प्युटर इंजिनियर त्या शिवाय लेखिका ,कवयत्री ."
    "अहो त्या मुलाने आणि त्याच्या आईने हिला सरोज वन्सनच्या शेखरच्या लग्नात पहिली आणि त्यांना हि खूप आवडली आहे ,मी काय म्हणते एकदा आपण देवगडास जाऊन तर येऊ ,त्या मुलग्याशी हिला बोलू दे ,तिच्यावर जबरदस्ती नाही पण सहज एक कोकण ट्रीप म्हणून जायला काय हरकत आहे ? तिला नाही आवडला तर नाही ."
    "अनुपमा हा वाहिनीचा मुद्दा मला पटला ,अग बघून घे कि ."
    "ठीक आहे ,आलिया भोगासी असावे सादर "म्हणत बाई तयार झाल्या .
    आम्ही कोकणात गेलो ,उत्तम स्वागत .तिच्या सासऱ्यांच्या "ये ग मनी माऊ ,अग तुला पाहिल्यावर अनिकेतनेच तुला हे नाव ठेवलय .आणि हे बघ मस्त दोन दिवस फिरा ,बागेत जा ,समुद्रावर जा ,खा प्या मजा करा आणि तरीही तुला पसंत नाही पडल तर नाही म्हण बाळा ."या गोड बोलण्यानेच अनुच्या चेहऱ्यावरचे भाव थोडे बदलले ,त्या दोघांनी खूप गप्पा वगैरे मारली आणि येताना गाडीत मला अनु म्हणाली "काका बोका आवडला,आणि मग पुणे येई पर्यंत त्याची आजी ,आई ,सासरे ,धाकटा दीर ,एक वन्सबाई ,बाग हे कित्ती कित्ती मस्त आहे याची सहस्र आवर्तन झाली .
    लग्न झाल ,हि माझी तशी लांबची पुतणी , नंतर बरेच वर्ष गाठभेट नाही ,कधीतरी फोनवर बोलण व्हायचं ,तीच सारख एकच टुमण "काका ,काकू या कि एकदा पुतणीच राज्य बघायला ."
    बरेच वर्षांनी योग आला ,गाडीतून उतरलो तर काकूला आणि मला मिठी मारून रडून झाल ,"काका तुम्ही इकडे ट्रीप सारख यायचं सांगितल नसतत ,तर मी खरच स्वर्गाला मुकले असते ,thank you ,thank you ,thank you काके काकू करून झाल .
    "अगो बाई ,एक बाई रुसल्यात का आमच्यावर ,दोन दिवसात इकडे फिरकले नाही म्हणून,"बाप रे किती तो शिष्ठपणा अगदी पहिली कळी उमलली म्हणून एवढ नकोय काही ,माहित्ये पाहिलट करीण आहेस ती ,"सुखली ग ताई माझी ,दोन दिवसात पाणी नाही का मिळाल ,आज सांगत्ये हो वामनला इकडे पाट फिरवायला ."ओ पोफळे वाहिनी ,तुम्ही जीव धरणार कधी ,जरा वारा आला को १८० अंशात डुलता ."
    मी आणि हि बघतच राहिलो ,"अनु किती सुरेक बोलत्येस झाडांशी ?अग कोणी शिकवलं तुला हे ?.
    "काका ,आजे सासूबाई होत्याना त्या सुरवातीला मला घेऊन या बागा मधून फिरायच्या ,झाडावरून एवढ्या प्रेमाने हात फिरवत बोलायच्या कि ती झाड अगदी झिम्माड होऊन जायची आणि खर सांगते काकू ,आजी बागेत शिरण्यापूर्वी पेक्षा त्या अस झाडांशी बोलून गेल्या कि झाड टवटवीत व्हायची ."
    मध्यंतरी माझ्या सासर्यांनी म्हणजे बाबांनी एक गोष्ट सांगितली कि म्हणे एक आदिवासी जमात आहे ,त्यांना एखाद झाड काढून टाकायचं असल कि ते झाड तोडत नाहीत ,सगळे गावकरी जमून त्या झाडाला मोठमोठ्या आवाजात शिव्या देतात ,मग ते झाड अपोआप मरून जात ."
    आमच्या सासूबाई सांगतात झाड ,गुर यांच्याशी प्रेमाने बोलाव ,त्यांच्या पाठीवरून हात फिरवीत कौतुक कराव कि ती झाड देता किती घेशील दो कराने अस दान देतात .
    आम्ही मंत्रमुग्ध होवून नुसत ऐकत होतो ,तेवढ्यात सासूबाई म्हणाल्या झाल्या का बागा फिरून आणि मालकिणीने केलेलं कौतुक ऐकून ? अनु तू बस हो काका काकूशी गप्पा मारीत मी बघत्ये जेवणाच .
    मग .
    एवढ्यात सासरे आले आणि गप्पात सामील झाले ."बाबा उद्या आपल्याला समुद्रावर पोहायला जायचं आहे ,मी काही ऐकणार नाही ".
    "ते म्हणाले अग मी कशाला ?नवऱ्याला घेऊन जा ,माझ्यावर नको तुझी दादागिरी ".
    अहो त्याला वेळ असेल तर ना ,साहेबांचा काहीतरी नवीन कलमाचा प्रयोग चालू आहे ,उद्या दापोलीस जायचं होत पण आता काका आलेत म्हणून पुढे ढकलली .
    "अनु ,पोहायला कधी शिकलीस ?"
    आज्जे सासूबाई आणि बाबा यांची पहिली अट होती कि पोहायला शिकायचं ,मी भीत होते पण बाबांनी हट्टच धरला कि यंदा गणपती विसर्जनाला समुद्रात तू गणपती नवऱ्या बरोबर घेऊन जायचीस म्हणून ,मग काय मारली उडी आणि घाबरल्ये मग यांनी माझी वेणी धरून वर घेतली आणि अशी घट्ट बिलगल्ये त्यांना ,तेव्हा हे हळूच म्हणाले अशी बिलगणार असलीस तर सतरा वेळा विहिरीतून वर काढेन .
    "काका ,सासऱ्याच्या समोर काय पुराण लावल आहे ते ऐकलत ना ?"सासरे हसून म्हणाले तशी पटकन म्हणाली "बाबा you are not my सासरा only ,तुम्ही मित्र आहात माझे ".
    माझ्या डोळ्यातून अश्रू यायचे बाकी होते .
    तेवढ्यात तीच पिल्लू आल आणि म्हणाल "आई मी शिपण्याला जाऊ ?'
    फावड उचलत तरी का ?उगीच पाटात पाय फिरवत खेळत बसायचं ,सर्दी होईल ,काही नको जायला ."
    तेवढ्यात सासूबाई पोह्याच्या बशा घेऊन बाहेर आल्या आणि म्हणाल्या "गवयाच्या पोराने मोठा आ लावला तर घसा दुखत नाही अनु ,जाऊ दे त्याला ."
    "तरी काका अनुची गंमत सांगत्ये ,पहिल्यांदाच पावसात मनसोक्त भिजली ,एवढा पाऊस पुण्यात कधी बघितलेला नसेल ,आणि आली शिंकत आणि कोमट अंग घेऊन ,तेवढ्यात तिचा नवरा हसला आणि मग काय ग बाई तो सदाशिवपेठी फणकारा .तिला औषध दिल आणि दोन दिवसांनी पुन्हा मोठी सर आली तशी गोधडी लपेटून बसलेली ,तेवढ्यात हे आले आणि म्हणाले चला सुनबाई पावसात ,मनसोक्त भिजा ,अग म्हणजे इथल्या पावसाला पण कळत कि हे आपल माणूस आहे ,दोन तीन वेळा भिजलीस कि पाऊस मग सर्दी वगैरे नाही फक्त वरदहस्त देतो ."
    तीन दिवस हे सगळ ऐकत होती ,जावई आणि अनु त्यांच्या नवीननवीन योजना ,शेतीतील ,बागेतील एकेक प्रयोग दाखवीत होते,गोठ्यातील गोधन दाखवीत होते .मी आणि हि फक्त अचंबित .तेवढ्यात दोन खड्डे खणलेले आणि दोन डाळिंबाची रोप उभी होती तिथे अनु घेऊन गेली आणि म्हणाली "तुमच्या दोघांच्या हस्ते वृक्षारोपण आणि आज इथेच बागेत जेवण असा बेत आहे ,"
    निघताना मी विचारल "अनु पुण्यास कधी फेरी ?'
    "काका ,खर सांगू ,इथून पाय निघत नाही ,दोन दिवस नसले कि या आमच्या लाडूबाई म्हणजे वेली रे रुसतात ,मला आठवण आली कि मीच गाडी पाठवून आई ,बाबांना इकडे बोलवून घेत्ये आणि आता काका तू हि निवृत्त झाला आहेस ,तुला हवेतेव्हा कळव मी तुमच्यासाठी गाडी पाठवून देईन ."आणि एकदा सगळ्या मुलांना देखील पाठवून द्या बघा म्हणाव आमच कोकण ".

    -- श्रीनिवास चितळे


    -- संकलन : अशोक साने
    फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो..

  • याला जीवन ऐसे नाव भाग १५

    न पिबेत् पंक शैवालतृणपर्णाविलास्तृतम् ।
    सूर्येन्दुपवनादृष्टमभिवृष्टं घनं गुरू ।।
    फेनिलं जन्तुमत्तप्तं दन्तग्राह्यतिशैत्यतः ।

    वाग्भट सूत्र स्थान 5 - 5/6 भाग 3

    जसं काळोख्या जंगलातील पाणी निषिद्ध सांगितले आहे, तसेच आपल्या घरातील असा प्रदेश म्हणजे शीतकपाट. या फ्रीजमध्ये देखील असाच काळाकुट्ट काळोखच दडलेला असतो.

    शीतकपाटामधे ना सूर्यप्रकाश, ना चंद्रकिरण ना वाऱ्याची झुळुक. हे कारण देखील ग्रंथकार देताहेत. अशा ठिकाणी असलेले अन्न पाणी घन आणि गुरू गुणाचे बनते, असे स्पष्टपणे सांगताहेत.

    या ठिकाणचे अन्नपाणी, वात आणि कफ दोष वाढवणारे बनते. हे पाणी तात्काळ पित्तशमन करेलही, पण अग्निच्या विरोधी काम होईल, आणि थंड गुणांनी वातही वाढवेल. वाढलेला वात पुनः पित्ताला अन्य ठिकाणी जायला मदत करतो. एकंदरीत हे पाणी गडबड करणारेच ठरते. दाताला झिणझिण्या आणणे, हिरड्या शिणशिणणे, लालास्राव कमी करणे, संकोच घडून आल्याने चवही बदलून जाते. सर्वात महत्वाचे आम, क्लेद, चिकटपणा वाढवणारे असते.

    आता करा यादी.
    फ्रिजमधील पाण्याच्या बाटल्या,
    दूधाच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या,
    पालेभाज्यांच्या जुड्या,
    दोन चार दिवसाची मळून ठेवलेली कणिक,
    पाकीटातील मांसाचे तुकडे,
    आईस्क्रीमचे गोळे,
    दह्याचे पातेले,
    शिल्लक राहिलेली कोशिंबीर, सॅलेड,
    डबाबंद रसगुल्ले, गुलाबजाम, श्रीखंड,
    ज्युस, इ.इ. हे सर्व ....????
    सूर्येंदुपवनम् अदृष्टम् न भक्षयेत.....

    फ्रीजमधीलच नव्हे तर, जे जे अन्नपदार्थ, पाणी, सूर्येंदुपवनम् अदृष्टम असतील ते ते सर्व, या वैश्विक नियमानुसार निषिध्दच ना !
    शेवटी ज्या अन्न पाण्यावर सूर्य, चंद्र, वारा यांचा स्पर्श नसेल, ते अन्न पाणी खाण्या पिण्यासाठी अयोग्यच ठरेल. मग ते निबाड जंगलातील एखाद्या तलावातील असूदेत, बोअरवेलचे असूदेत, किंवा टाकीत साठवलेले पाणी, रेन वाॅटर हारवेस्टींगच्या माध्यमातून गोळा करून घराच्या खाली तळघरातील टाकीचे असू दे. किंवा घरातील शीतघराचे ! !

    असे साठलेले पाणी वात आणि कफ दोष वाढवणारे असल्यामुळे याच गुणाने निषिध्द ठरेल.

    शास्त्रकारानी आपल्याला प्रकाशाचा मार्ग दाखवला आहे. शास्त्रकाराते वाट पुसतु असं माऊली पण म्हणतात. ज्या मार्गाने गेल्यावर, आपले भले होईल त्या मार्गाने जाणेच संयुक्तिक होईल ना !

    आजची काळाची गरज,
    हे असंच चालायचं,
    काळानुसार बदलायला नको काय ?
    आजचे विज्ञान, शोध मान्य करायचे नाही का ?

    एकदा वैश्विक नियम पाळायचे ठरवले तर बाकी
    या साऱ्या लंगड्या पळवाटा आहेत, असे वाटत नाही काय ?

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021

  • आज १८ मार्च – जागतिक निद्रा दिवस

    आज १८ मार्च – जागतिक निद्रा दिवस

    दरवर्षी १८ मार्च हा दिवस ‘जागतिक निद्रा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी निद्रेविषयी आजारांची जनजागृती करण्यात येते. झोप न लागणे हा आजार आहे, याविषयी सामान्य जनता अनभिज्ञच आहे. त्यामुळे झोप न येणाऱ्या एकूण व्यक्तींपैकी फक्त एकचतुर्थांश व्यक्तीच झोप येत नसल्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतात. सर्व शारीरिक क्रियांप्रमाणेच झोप ही क्रियादेखील अत्यंत महत्त्वाची आहे. झोपेमुळे शरीराचे कार्य चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ६ ते ९ तास झोपणे आवश्यक असल्याचे अनेक मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर सांगतात. स्लीप हायजिन’ पाळणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. प्रत्येक मानवी शरीरात घड्याळ (बायोलॉजिकल क्लॉक) असते. हे घड्याळ सूर्योदय आणि सूर्यास्ताप्रमाणे सुरू असते. त्यामुळे सूर्योदयापूर्वी उठणे आणि सूर्यास्त झाल्यावर झोपणे ही शरीराची शिस्त आहे. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत शरीर विशिष्ट रसायने तयार करीत असते. त्यामुळे व्यक्ती जागी राहू शकते. सूर्यास्तानंतर शरीरातील विशिष्ट रसायने कमी झाल्याने झोप येऊ लागते. पण, कृत्रिम प्रकाशामुळे रात्री उशिरापर्यंत जागण्याची सवय स्वत:च शरीराला लावल्याने अन्य आजारांना निमंत्रण मिळू शकते. रसायन प्रक्रिया बिघडल्याने शरीरावर परिणाम होत असतो. काही महिन्यांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने शांत, पूर्ण वेळ, चांगली झोप हा मूलभूत अधिकार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे झोपेकडे योग्य लक्ष द्यावे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

    हल्ली व्हॉट्सअप, फेसबुकसह विविध समाजमाध्यमांनी तरुणांसह सर्वच वयोगटातील नागरिकांना आपल्या कवेत घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत ही माध्यमे सोबत बाळगल्याने रात्रीच्या झोपेवर त्याचा दुष्परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. रात्री उशिरा झोपणे, सकाळी उशिरा उठणे, झोप अपुरी झाली तर दिवसभर आळसावणे, असे हे चक्र सलग पाच ते सात वर्षे राहिल्यास मधुमेह, रक्तदाबासह विविध आजाराचा गंभीर धोका ‘आ’ वासून आपल्यासमोर उभा राहणार हे एका अभ्यासातून पुढे आले आहे. प्रत्येक माणसाला रात्री किमान ८ तासांची गुणात्मक झोप आवश्यक असते. अशी झोप मिळाली नाही तर मधुमेह, रक्तदाब, यासह कर्करोगासारखे बरेच आजार जडण्याची शक्यता असल्याचे विविध अभ्यासातून पुढे आले आहे. जगभरात ३५ ते ४५ टक्के नागरिकांना निद्रानाशाचा आजार आहे. आपल्या झोपेच्या चार अवस्था असतात.

    त्यात रेम अवस्था महत्त्वाची असून १, २, ३ आणि रेम या चारही अवस्थेचे चक्र ९० मिनिटांचे असते. एक व्यक्ती सरासरी ६ तास झोपली तर तिच्या झोपेची चार चक्र पूर्ण होतात. रेम अवस्थेत मेंदूतल्या पेशी उत्तेजित होतात. या अवस्थेत जिथे गरज आहे, तिथल्या भागात मेंदूची दुरुस्ती होते, परंतु हल्ली रात्री तरुण पिढीमध्ये व्हॉट्सअप, फेसबुकसह समाज माध्यमांचा वापर वाढला असून त्यामुळे त्यांच्या झोपेवर विपरीत परिणाम होत आहे. भारतात मध्यरात्री १२ ते ३ वाजेपर्यंत सर्वात जास्त गाढ झोपेची वेळ असते. यावेळी मेंदूत मिलॅटोनीम हार्मोन्सचे प्रमाण वाढते. या हार्मोन्समुळे झोप येते. या मिलॅटोनीमचा संबंध सूर्याशी असतो. सूर्यास्त झाल्यावर हे हार्मोन्स मेंदूत सक्रिय होतात, परंतु रात्री व्हॉट्सअप, फेसबुकचा जास्त वापर करणाऱ्यांमध्ये हे हार्मोन्स तयार होण्याचे प्रमाण मंदावलेले असते. साहजिकच अशा व्यक्तींमध्ये हळूहळू निद्रानाशाचा आजार बळावू लागतो आणि हेच चक्र सातत्याने पाच ते सात वर्षे सुरू राहिल्यास रक्तदाब, हृदय, कर्करोगासह सगळेच आजार बळकावण्याचा धोकाही वाढतो. शालेय विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक स्पर्धा वाढली आहे. त्यांच्या शाळा, शिकवण्या याबरोबरच वाढलेल्या अभ्यासक्रमांमुळे त्यांची जीवनशैलीही बदलली आहे. तेव्हा या मुलांमध्ये निद्रानाशाचा आजार लहानपणीच सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    झोपेची सायकल म्हणजे?

    झोपेच्या चार अवस्था असतात. त्यात रेम अवस्था महत्त्वाची असते. १,२,३ आणि रेम अशा ४ अवस्थांची एक सायकल होते. ही सायकल ९० मिनिटांची असते. पहिल्या ३ अवस्था ७० मिनिटांच्या आणि रेमची अवस्था वीस मिनिटांची असते. एक व्यक्ती जर सरासरी ६ तास झोपेल तर ४ सायकल पूर्ण होतात. रेम अवस्थेत मेंदूतल्या पेशी चार्ज होतात. जिथे गरज आहे, तिथल्या भागात या अवस्थेत मेंदू दुरुस्ती करतो. ही तंदुरुस्तीची नैसर्गिक प्रक्रिया खंडित होते. त्यामुळे आजार बळावततात, असे झोपेचे वैद्यकशास्त्र म्हणते. प्रत्येकाने किमान आठ तासांची आणि वयाची पन्नासी गाठलेल्यांनी किमान साडेसात तासांची झोप घेणे महत्त्वाचे आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • घरगुती लेप

    चण्याचे पीठ/ मसुरच्या डाळीचे पीठ/ मक्याचे पीठ/ मेथीचे पीठ किंवा ओटचे पीठ यामध्ये लिंबाचा रस साध्या पाण्यात मिसळून लेप लावावा.

    संत्री, मोसंबी, लिंबे यांच्या सालींच्या आतल्या भागातले पांढरे धागे काढून टाकून साली वाळवाव्यात. त्यांची बारीक भुकटी करावी व कुठल्याही फेसपॅकमध्ये अर्धा ते एक चमचा घातली तर चेहऱ्याला ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात मिळते.

    ‘पपई’ या फळात ‘पेपेन’ हे एन्झाइम मोठय़ा प्रमाणात असते. शिवाय पपईच्या गरात त्वचेवरील मृत किंवा कोरडय़ा पेशी काढून टाकण्याचे सामथ्र्य आहे. तेलकट त्वचेसाठी पपईचा लेप गुणकारी आहे, हा जंतुनाशक म्हणूनही उपयुक्त ठरतो.

    थोडय़ा कोमट केलेल्या चमचाभर दुधात पाव चमचा यीस्ट घालून जरा वेळाने ते मिश्रण कापसाने चेहऱ्यावर लावावे. काही वेळाने पॅक घट्ट होतो. चेहऱ्यातील रुधिराभिसरण वाढविण्यासाठी यीस्ट पॅक फारच गुणकारी ठरते. तेलकट व कोरडय़ा दोन्ही प्रकारच्या त्वचेवरील निस्तेज पेशी नाहीशा होऊन आतली नवीन त्वचा प्रकट होते.

    अंडय़ांमध्ये शरीरनिर्मितीला उपयुक्त ठरणारी प्रथिने असतात. अंडय़ातला पांढरा बलक हा प्रथिनांचा बनलेला असतो तर पिवळा बलक हा संपूर्णतया स्निग्ध असतो. यातला बराचसा भाग त्वचा शोषून घेते. ज्यांची त्वचा अत्यंत शुष्क झाली आहे अशा मध्यमवयीन किंवा प्रौढ स्त्रियांना पिवळा बलक उपयोगी आहे. ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांनी चेहऱ्याला पांढरा बलक लवावा. दोन्हींमध्ये अर्धा चमचा मध घालवा. ज्यांची त्वचा नॉर्मल आहे त्यांनी चेहऱ्यावर प्रथम पांढऱ्या बलकाचा पॅक लावावा. तो सुकल्यावर त्याच पॅकवरती पिवळ्या बलकाचा पॅक लावावा म्हणजे हे दोन्ही बलक त्वचेमध्ये शोषून घेतले जातील.

    कोबीच्या रसात गंधक व क्लोरीन ही द्रव्ये असतात. त्यामुळे त्वचेला नवे जीवन प्राप्त होते. कोबी किसून फळांप्रमाणे चेहऱ्यावरही लावता येतो.

    ताज्या मक्याची कणसे किसून घेऊन पिळावीत. त्यातून मक्याचे दूध भरपूर प्रमाणात मिळते. या दुधात ‘अ’ व ‘ड’ ही जीवनसत्त्वे असतात. हा स्टार्च पॅक किंवा पिष्टमय पदार्थाचा पॅक म्हणून चेहऱ्यावर फारच उपयुक्त ठरतो.

    आंबेहळद, जायफळ दुधात किंवा लिंबाच्या रसात उगाळून लेप करावा. हा लेप रक्तशुद्धी करणारा आहे. त्वचेवरील काळसरपणा किंवा डाग घालवण्यास या लेपाचा फार उपयोग होतो.

    तांबडय़ा मुळ्याचा रस व दही यांचे मिश्रण चेहऱ्याला लावले तर चेहऱ्यावरचे मुरमांचे डाग कमी होतात.

    -- गौरी पाटील
    निसर्गोपचार तज्ज्ञ
    9820584716

  • इवान इवानोविचची गोष्ट

    इवान इवानोविच हा अंतराळवीर, जैववैद्यकशास्त्रात संशोधन करणाऱ्या एका संस्थेच्या सल्ल्यानुसार, मॉस्कोतील एका कृत्रिम अवयव बनवणाऱ्या संस्थेकडून बनवून घेतला होता. हा बाहुला इतका बेमालून बनवला गेला होता, की जमिनीवर परतल्यावर जर तो स्थानिक लोकांच्या हाती लागला, तर गैरसमज पसरू नये म्हणून त्यावर ‘माकेत’ (नकली) असं लिहून ठेवण्यात आलं होतं. तरीही काहीसा गोंधळ झालाच. दुसऱ्या अंतराळसफरीच्या वेळी इवान हा बर्फाच्छादित प्रदेशात उतरला. त्यामुळं त्याला घोड्यांकडून ओढल्या जाणाऱ्या गाडीवरून परत नेण्यात आलं. या घटनेच्या काही महिने अगोदर गॅरी पॉवर्स या अमेरिकन वैमानिकाचं विमान हेरगिरी करीत असल्याच्या आरोपावरून रशियाकडून पाडण्यात आलं होतं आणि हवाई छत्रीच्या साहाय्यानं जमिनीवर उतरलेल्या गॅरी पॉवर्सला रशियानं ताब्यात घेतलं होतं.

  • अभिनेता सिद्धार्थ जाधव याची स्वाक्षरी

    माणसाच्या दिसण्यापेक्षा त्याचे खरे असणे किती म्हणवाचे असते हे सिद्धार्थच्या यशावरून आणि त्याच्या माणूसपणावरून दिसून येते. सिदार्थ जाधव याला खरा हात दिला तो केदार शिंदे यांच्या ‘ लोच्या झाला रे ‘ या नाटकाने. अभिनेते संजय नार्वेकर यांना सिद्धार्थ खूप मानतो. केदार शिंदे यांच्या ‘ लोच्या झाला रे …’ या नाटकांनंतर खऱ्या अर्थाने त्याला ब्रेक मिळाला असे म्हणता येईल

  • अमेरिकी सैन्य अफगाणिस्तानातून माघारी

    अफगाणिस्तानात अमेरिकेने हस्तक्षेप केला त्याला अकरा वर्षे झाली. अलीकडच्या काळात अमेरिकेला सर्वाधिक काळापर्यंत गुंतवून ठेवणारे हे युद्ध ठरले. अगदी व्हिएतनामचे युद्धदेखील यापेक्षा कमी काळ चालले होते आणि त्यात झालेला खर्चदेखील अफगाणिस्तानच्या युद्धापेक्षा कमी होता.

  • सिक्युअर्ड डिजिटल इंडिया’ साकारायाची गरज

    भारतातील डिजिटल उपभोक्ता वाढत असून, भारतीय ग्राहक विविध डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर सक्रियपणे करत आहेत. मात्र, फसवणुकीचा धोकाही त्यामुळे वाढला असून, चारपैकी एक ग्राहक ऑनलाइन फसवणुकीला बळी पडत आहे. एक्स्पिरिअनच्या डिजिटल कंझ्युमर इनसाइट्स १६ जुनच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

  • खोबरेल तेलाने करावा केसांचा मसाज

    केस मुलायम व्हावे यासाठी केसांची काळजी घेणे गरजेचे असते. वेळोवेळी केसांचा मसाज करावा लागतो. परंतु मसाज योग्य पद्धतीने न झाल्यास त्याचा फायदा होत नाही.

    तेलाने मसाज करण्यासाठी लागणारे साहित्य

    - खोबरेल तेल, कॉटन(कापूस), गरम पाणी, टॉवेल, शँम्पू इत्यादी.

    प्रथम खोबरेल तेल थोडे कोमट करुन घ्यावे. केसाचे दोन भाग करुन कापसाच्या साहाय्याने सगळ्या केसांच्या मुळाशी तेल चांगल्या प्रकारे लावावे.

    १५ मिनिटे गोलाकार मसाज करावा. एका कानापासून दुसर्याु कानापर्यंत क्रॉस मसाज करावा.

    थोडे-थोडे केस घेऊन संपूर्ण केसांचा गरम तेलाने मसाज करावा.

    मानेपासून कांद्यापर्यत खालच्या दिशेने मसाज करत यावा.

    अधून-मधून डोक्याचे पॉईट दाबावे या क्रियेला पंचिंग असे म्हणतात.

    १५ मिनिटे व्यवस्थीत मसाज झाल्यावर गरम पाण्यात टॉवेल भिजवून केसांना गुंडाळून थोडा वेळ वाफ घ्यावी या क्रियेला स्टीम असे म्हणतात
    मसाज झाल्यानंतर केस शँम्पूने स्वच्छ धुवावेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • दिन:श्चर्या प्रारम्भ…………!!!

    मंत्र म्हणजे तरी काय? तर आपल्या सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, ‘मंत्र’ म्हणजे मन त्या त्रयीत लय करून जो शब्दोच्चार केला जातो, तोच मंत्र होय. (याचाच अर्थ, मन + त्र म्हणजे तीन ज्ञानेंद्रिये अर्थात नाक, कान आणि डोळे म्हणजेच त्रिकुटी एका ठिकाणी एकाग्र होत असते, तेव्हाच मुखातून जो प्रणव ओम् सहित बाहेर पडतो किंवा ज्याचे उच्चारण केले जाते तोच हा मंत्र होय.)