वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
जेवण शाकाहारीच आहे, पण त्यातही किती विविध छटा दिसतात ना ? सात्विक राजसिक तामसिक इ.इ.
आपण घेत असलेल्या आहारांचा गुणाशी काहीही संबंध असतच नाही, ही ऋषीमुनींनी केलेली थापेबाजी आहे, असे काही जणांना वाटते. पण वास्तवात असे नाही.
बाजारात हाॅटेलमधे मिळणारे अन्नपदार्थ आणि घरात तयार होणारे अन्न यात फरक नाही ? घरात आईने केलेले पदार्थ आणि हाटेलातील बाईनं केलेले पदार्थ, यातील कॅलरीज कदाचित सारख्याच असतील, पण भावनांचा विचार केला तर निश्चित फरक पडतो.
हाटेलमधे केलेल्या जेवणात घरच्या सारखी स्वच्छता, पवित्रता, विवेक आणि मांगल्य कुठुन येणार ? हाटेलच्या जेवणाने कदाचित पोट भरेल पण मन भरणार नाही. कारण त्यात भाव असत नाही. प्रेम असत नाही. असतो फक्त पैसा. बिझनेस ! जो वैश्यवृत्तीच्या इंग्रजाकडून आपण शिकलोय.
तामसिक आहार घेणाऱ्याची वृत्ती केवळ चवीने जेवण करणे आणि पोट भरणे !
राजसिक आहाराने मन आणि बुद्धी चंचल होते. राजसिक प्रवृत्तीची माणसे अत्यधिक महत्वाकांक्षी असतात!
आणि सात्विक भोजन संतुलीत असते. कारण असं जेवण केल्याने मादकताही निर्माण होत नाही, ना आळस, ना अशक्तपणा ना उत्तेजना. केवळ स्फूर्ती येते आणि ताकद मिळते.
समजा आपण एखाद्याच्या घरी पाहुणे म्हणून जेवायला गेलेला आहात. पंचपक्वान्नाचे संतुलीत, चौरस जेवण तयार आहे. परंतु जेवण वाढणाऱ्यांनी उपरोधाने आपणाला म्हटले,
"काय हो ऽऽऽ, यापूर्वी असे जेवण तुमच्या उभ्या आयुष्यात कधी खाल्ले होते काय ?"
तर तुम्हाला ते चांदीच्या ताटात वाढलेले जेवण आवडेल काय ?
इथे भाव महत्वाचा आहे. कॅलरीज नाहीत.
दुसऱ्याच्या घरातील जाऊदेत, आपल्याच घरात आपली आई किंवा सौभाग्यवती वा बहिणाबाई भाकरी करीत आहे. साध्या चटणीबरोबर ती गरम गरम भाकरी इतकी छान लागते. सहज तोंडातून शब्द बाहेर येतात,
" व्वाह, क्या बात है, "
एका भाकरीने भूक भागतच नाही. दुसरी भाकरी घेता, तिसरी मागता.. तसा आईचा चेहेरा खुलत जातो. वाटलं तर परत पीठ भिजवेन, पण जरा दमानं खा, असं प्रेमानं म्हणते. तेव्हा तिच्या डोळ्यातील भाव बघण्यासारखे असतात.
आता सीन बदला.
आपल्याच घरात स्वयंपाकाला आलेली बाई भाकऱ्या करीत आहे. त्याच चटणीबरोबर तुम्ही भाकरी खाताय. तुम्हाला भाकरी आवडली आहे. तुम्ही आणखी एक भाकरी तिच्याकडे मागताय. आता तिचा चेहेरा नीट बघा. कपाळावर आठ्या, डोळे वटारलेले, 'मेल्याला आजच भाकऱ्या खायची लहर आलीय, जरा कुठे घरी लवकर जाणार होते, तो बसला गिळायला' जणु असे भाव तिच्या चेहेऱ्यावर स्पष्टपणे दिसताहेत.........
तुम्हाला ते समजताहेत....
असलेली भूक क्षणार्धात गायब होऊन जाते. आणि भरल्या ताटावरून ऊठावेसे वाटते ना ?
असे का झाले ? तर भाव बदलले.
भाव बदलले, तर चिडचिड वाढतेच ना !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
17.10.2016
मी पहिले पाऊल जेव्हा ऑस्टिन एअरपोर्ट बाहेर जमिनीवर टाकले, तेव्हा आपले नगरपण असेच स्वच्छ असावे असे वाटून गेले. आणि तसे ते दिसेल हि. फक्त प्रत्येकाने ते मनावर घेतले तर. आपले महामार्गहि, इथल्या इतके रुंद नसले तरीही, चांगलेच आहेत. येथील रस्त्यावर आपल्या इतके जाहिरातीचे प्रस्त दिसले नाही. रस्त्यावर केवळ दिशादर्शक, गरजेचे फलक मात्र आहेत, आणि तेही वाहन चालकाच्या नजरेच्याटप्प्यात सहज येण्याच्या उंचीवर.
भारतातील डिजिटल इकोसिस्टमची वाढ अनेक घटकांमुळे झाली आहे, ज्यात सरकारचा डिजिटलायझेशनवरचा जोर, इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वाढलेला वापर आणि ई-कॉमर्सचा उदय यांचा समावेश आहे. भारत सरकार डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया सारख्या विविध उपक्रमांद्वारे डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरास सक्रियपणे प्रोत्साहन देत आहे.
प्लास्टिक हा आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, त्यामुळे त्याच्यापासून सुटका नाही. प्लास्टिकमुळे अनेक अशक्य गोष्टी शक्य झाल्या तसेच यूज अँड थ्रो साधनांना चालना मिळाली.
वर्तमानात वयाची वाढ तर थांबवता येत नाही नि निसर्गाने ठरवलेले श्वास तर घ्यावेच लागणार असतात. मग हेच जर सत्य आहे, तर ते सत्य ‘सुंदर’ का करायचे नाही? ज्या प्रज्ञेने वैज्ञानिक झेप घेऊन चंद्र काबीज केला, त्याच प्रज्ञेने हे ज्येष्ठपण अधिकाधिक सुसह्य, आनंदमय का करता येऊ नये
सिस्टिम बदलायची पण, कोणी ? असा प्रश्न सर्वच स्तरातुन विचारला जातोय. सिस्टिम बदलायची, सिस्टिम बदलायची अशी ओरड ही सातत्याने होते. पण, सिस्टिम विषयी सततगळ काढणारे आणि सिस्टिम विषयी “ब्र” ही न काढणारे अशी दोन भिन्न टोकं आज प्रत्यक्ष वावरताना दिसुन येतात.

शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना ‘सरकारचे जावई’ म्हणण्याचा एकेकाळी रिवाज होता. कदाचित, सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारे अधिकार आणि दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधा पाहून मत्सराने हा शब्दप्रयोग रूढ झाला असावा! काहीही असो..पण एक गोष्ट मात्र काबुल करावी लागेल कि शासकीय कर्मचाऱ्यांना सरकार कायम जावयासारखी वागणूक देत आलं आहे.
किती आहे भुजबळांची मालमत्ता?
- नाशिक भुजबळ फार्म - 5 कोटी
- राम बंगला, नाशिक - दीड कोटी (समीर भुजबळ)
- गणेश बंगला, नाशिक - 1 कोटी
- 3 एकर जमीन, नाशिक - 25 कोटी
- भुजबळ पॅलेस - 60 कोटी
- ठाण्यात पारसिक बंगला - पाच कोटी
- सुखदा बंगला - 6 कोटी
- येवला ऑफिस आणि बंगला - 10 कोटी (पंकज)
- मनमाड येथील जमीन - 10 कोटी
- दिंडोरीतील द्राक्ष मळा - पाच कोटी (पंकज)
- माणेक महल, चर्चगेट - पाच कोटी (पंकज)
- माहिममधील फ्लॅट - पाच कोटी
- नवी मुंबईतील घर आणि दुकान - पाच कोटी
- 30 एकर जमीन - 600 कोटी
- पेंटिंग आणि परदेशी आर्ट पीस - 100 कोटी
- जुहूच्या वसुंधरा सोसायटीत दोन फ्लॅट - 40 कोटी
- 60 किलो सोने - 18 कोटी
- हिरे - 10 कोटी
- वाहने - रेंज रोव्हर 2 कोटी, बीएमडब्ल्यू 7 सीरिज सव्वा कोटी, लॅण्ड क्रूझर 50 लाख, मर्सीडीज टू 1 कोटी
- आर्मस्ट्रॉंग एनर्जी - 200 कोटी
- नाशिकचा पॉवर प्लॅंट - 25 कोटी
- नाशिक शिलापूर येथे जमीन - 30 कोटी
- गिरणा शुगर मिल - 30 कोटी
- आर्मस्ट्रॉंगच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाने 250 एकर जमीन - 100 कोटी
- भुजबळ वाईन्स - 155 कोटी
- नाशिकची कन्सल्टिंग कंपनी - 10 कोटी
- मुंबईतील दादर येथे इन्फ्रा कंपनी - 35 कोटी
- देविशा इन्फ्रा, नवी मुंबई - 600 कोटी
- "बलु सर्कल'च्या नावाने गुंतवणूक - 600 कोटी
- भावेश बिल्डर - 50 कोटी
- परवेश कन्स्ट्रक्शन - सांताक्रूझ निवासस्थान, वांद्रे येथे हाफिज महल, लोणावळा येथे बंगला व हेलीपॅड आणि नाशिक येथे निवासी इमारत - 330 कोटी
- आर्मस्ट्रॉंग प्युअर वॉटर - 35 कोटी
- नाशिक एमआयडीसीत जय इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि. - 25 कोटी
- माझगाव येथे राबरेक्स इंडस्ट्री - 25 कोटी
- पनवेल येथे सुवी रबर प्रा. लि. साठी शेड - 2 कोटी
- बाभूळगाव- येवला येथे 105 एकर जमीन - 25 कोटी
- वांद्रे येथील फ्लॅट - 5 कोटी
- भुजबळ वाईन्सच्या नावाने उज्जैन येथे 350 एकर जमीन - 60 कोटी
हि सर्व दादरला रस्त्यावर भाजी विकून मिळवलेली संपत्ती आहे, असेही त्यांनी जाहीर करावे.
भुजबळ "निर्दोष" (!!) सूटण्या आधी आख्या महाराष्ट्राला हे कळु दे...
-- मकरंद
आपल्या तान्हुल्याची भूक भागवणाऱ्या त्या मातेला सभोवताली असलेल्या आणि बहुतेक वेळा तिरक्या नजरेने तर कित्येकदा थेट पाहणाऱ्या विकृत व्यक्तींचा. अशा प्रवृत्ती समूळ नष्ट होणे शक्य नाहीच पण किमान त्यांच्यावर ताबा मिळवण्याकरता वेळीच पावले उचलणे आवश्यक आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti