(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री आनंद लहरी – भाग ३

    जरी परिपूर्ण वर्णनाची अडचण असली तरी जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज आई जगदंबेच्या एकेका गोष्टी चे वर्णन करीत आहेत.

  • मेकॉले कालबाह्य झाला

    जग झपाट्याने बदलत आहे. या स्थित्यंतराचा वेग अतिप्रचंड आहे. आपले अस्तित्व टिकवून प्रगती साधायची असेल तर या वेगाशी आपल्याला जुळवून घेणे भाग आहे.

  • साधी जखम झाली गँगरीन!

    नक्षलवादी चळवळ काही वर्षांपूर्वी किंवा आता आतापर्यंत या देशातील उपेक्षितांची, वंचितांची चळवळ होती. त्यांनी अंगीकारलेला सशस्त्र क्रांतीचा मार्ग योग्य होता की नाही हा कायम वादाचा विषय राहत आला असला तरी हा संघर्ष देशांतर्गत होता. नक्षलवादी म्हणजे आपलीच माणसे होती आणि आपल्या हक्कांसाठी ती भांडत होती.

  • विटामीन ‘बी’चे महत्त्व

    शरीरासाठी विटामिन्स किती महत्वाचे असतात ते लहान असताना आपल्याला शाळेत शिकविले जाते. तसे तर प्रत्येक विटामिनचे आपले असे महत्व असते. परंतु, आज आपण या लेखाद्वारे विटामीन ‘बी’चे महत्व जाणून घेणार आहोत. विटामीन ‘बी’ आपल्यातील ऊर्जेची पातळी वाढविते. त्याचबरोबर बुद्धी तल्लख ठेवण्यास मदत करते. चला तर, जाणून घेऊया अशा कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्यात विटामिन ‘बी’ची भरपूर मात्रा आहे, ज्याचे सेवन आपण नेहमी केले पाहिजे.

    आक्रोड

    आक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि एंटीऑक्सिडेंट्सची भरपूर मात्रा असते. याशिवाय यात विटामिन बी-५, बी-१ (थियामिन) आणि विटामीन बी-६ सुध्दा असते. इतकेच नाही तर यात खूप कमी प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट असते. यातील पौष्टीक घटक मन प्रसन्न ठेवते, एनर्जी लेव्हल वाढवते आणि स्मरणशक्ती चांगली करण्यात मदत करते. त्याचबरोबर डोळे, दात, त्वचा आणि मेंदूसाठीसुद्धा चांगले असते.

    काजू

    काजूमुळे फॅट वाढेल असे मुलींना वाटत असल्या कारणाने त्या काजूला पसंती देत नाहीत. परंतु, असे काही नसून, काजूमध्ये विटामीन बी-३, बी-१ आणि बी-६ असते. ज्यामुळे शरीर आणि मनाला ऊर्जा मिळते. यात आयर्न, सेलेनियम, मॅग्नेशियम आणि झिंक असते. याबरोबरच काजू एंटीऑक्सिडेंट आणि प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. काजूमुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. याच्या सेवनाने हृदयाच्या संबंधीच्या आजारापासून बचाव होण्यास मदत होते.

    पालक

    कोणत्याही प्रकारच्या हिरव्या भाज्या शरीरासाठी चांगल्याच असतात. शरीरात ऊर्जेचे सातत्य टिकविण्यासाठी पालक या पालेभाजीचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. यात विटामीन बी-२, बी-९, विटामीन सी, ए, आयर्न, फॉलिक अॅसिड, कॅल्शियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. जे संपूर्ण शरीराला आणि मनाला तंदुरूस्त बनवते. पालकाच्या सेवनाने पचन तंत्र निट होऊन, भूक वाढते. त्याचबरोबर चेहऱ्यावरील डाग मिटतात आणि त्वचा स्वच्छ होते.

    बदाम

    जेव्हा एखाद्याला एखादी गोष्ट आठवत नाही, तेव्हा स्मरणशक्ती वाढविण्यासाठी रोज एक बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. बदामामध्ये विटामीन बी-२, बी-१, बी-५, बी-३, बी-९ आणि बी-६ परिपूर्ण असतात. याशिवाय यात विटामीन ई, मॅग्नेशियम, आयर्न आणि प्रोटीनसुद्धा असते. याला आपल्या दररोजच्या खाण्यापिण्यात सामील करणे गरजेचे आहे.

    केळे

    केळामध्ये विटामीन बी भरपूर प्रमाणात असल्याने आपल्या सकाळच्या न्याहारीत केळाचे सेवन जरूर करा. यात विटामीन बी-५, बी-६ चा चांगला स्त्रोत असतो. याशिवाय यात विटामीन सी, फायबर, पोटॅशियम आणि ७४% पाणी असते. केळामुळे तणाव कमी होण्यासदेखील मदत होते. केळात ट्राइप्टोफान नामक एमिनो अॅसिड असते, जे मन प्रसन्न ठेवण्यास मदत करते. मुली तर केळाने त्यांचा चेहरासुद्धा साफ करतात, ज्यामुळे त्यांचा चेहरा उजळतो.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • मराठीची महती

    मराठी आणि मराठी भाषाभिमान हा विषय निघतो तेव्हा १९२२ साली पुण्यात स्थापन झालेल्या महाराष्ट्र शारदा मंदिराचे व तिथे येणाऱ्या साहित्यिक मित्रांनी स्थापन केलेल्या रवी किरण मंडळाचे सदस्य आणि मराठीचा जाज्वल्य अभिमान असणाऱ्या माधव ज्युलियन याचे नाव प्रकर्षाने डोळ्यापुढे येते. नवीन पिढ्यांचा या नावाशी कितपत परिचय असेल कल्पना नाही.

  • श्रीमुद्गलपुराण – ४

    आत्मविस्मृत दक्ष प्रजापतींना आत्मज्ञान प्रदान करण्यासाठी भगवान श्री मुद्गलांनी सांगितलेल्या या पुराणात एकूण नऊ खंड आहेत. आपल्याच आठ विद्यमान विकारांना आपल्याच आत विद्यमान विनायकांनी नियंत्रित करण्याची साधना आहे श्रीमुद्गलपुराण.

  • काय साध्य करायचं आहे त्यावर सतत नजर ठेवणे

    माझ्या कॉर्पोरेट क्षेत्रातील जीवनापैकी पुष्कळशी वर्षे विविध देशात कार्यरत असलेल्या एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत काम करण्यात गेली. २००० साली माझी बदली, प्रमुख म्हणून त्या कंपनीतील एका व्यवसायात झाली की जिथे सतत पाच वर्ष वाढत्या प्रमाणात तो व्यवसाय नुकसानीत जात होता. त्या व्यवसायावर सगळीकडून टीकेचा भडीमार होत होता, साहजिकच त्यामुळे व्यवसायाच्या कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत होते.

  • चैतन्यमय पर्व

    आषाढ लागतो ना लागतो तोच आखिल वारकरी संप्रदायात उल्हास दाटून येतो. ही सात्विक कुणकुण जणू एक वैश्विक चैतन्याचं पर्वच ठरते नी ह्या चैतन्याची खरी मुहूर्तमेढ रोवली जाते ती जेष्ठ वैद्य सप्तमी पासून सुरु होणाऱ्या वारीच्या रुपाने.वारीला किमान साडेसातशे वर्षाची परंपरा लाभलीये असे म्हणतात .ह्या वारीचं प्रस्थान होतं ते आळंदीहून. जेव्हा श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांची पालखी अश्वारुढ होते.

  • क्रिकेटपटू भागवत चंद्रशेखर

    चंद्रशेखर यांना संगीताची खूप आवड असून के. एल . सैगल हा त्यांचा आवडता गायक आहे. ते म्हणतात सैगल यांच्या आवाजातून मला स्फूर्ती मिळाली. बी. एस. चंद्रशेखर यांना भारत सरकारने पदमभूषण अवॉर्ड दिले , अर्जुन अवॉर्ड दिले तर विझडेन क्रिकेटीअर्स ऑफ १९७२ चा सन्मान त्यांना मिळाला. तर भारतीय क्रिकेट क्रिकेटीअर १९७२ ह्या किताबाने ते मध्ये सन्मानित झाले.

  • १००० X १०००

    श्रीनिवास जोशी हा माझ्या वर्गातील सर्वात हुषार मुलगा होता. आम्ही सर्व त्याला श्री म्हणायचो. त्याचा नंबर नेहमी फक्त वर्गातच नव्हे तर आख्या शाळेत पण पहिला असायचा. मी त्यामूळे मुद्दामुच त्याच्याशी दोस्ती करून घेतली होती. प्रशांत कासट हा आमच्या वर्गातला दुसरा मुलगा होता. तो म्हणजे विरुद्ध टोक होता कारण तो ‘ढ’ कॅटेगरीतला होता. तो दरवर्षी कसा बसा काठावर पास होत वरच्या वर्गात चढत आला होता. त्याच्या वडिलांचे वाण्याचे दुकान होते. ते माझ्या घराजवळ असल्यामूळे अनेक वेळा आम्ही त्याच्या दुकानातून किराणा माल आणत असु. बहुतेक संध्याकाळी तो दुकानाच्या गल्यावर बसलेला दिसे. वर्गातील मुले त्याला ‘वाणी’ म्हणून चिडवायची. माझी आणि प्रशांतची मात्र चांगली मैत्री जमली होती.

    मॅट्रिकची परिक्षा ही त्यावेळी आयुष्यातील अत्यंत महत्वाची परिक्षा म्हणून ओळखली जात असे. त्यावेळी 11 वी ला मॅट्रिक असायचे. पुढील सर्व शिक्षण या परिक्षेतील मार्कांवर ठरायचे. त्यावेळी बोर्डात टॉपला आलेल्या पहील्या 30 मुलांची यादी वर्तमानपत्रात प्रसिद्ध व्हायची. त्याला ‘मेरिट लिस्ट’ म्हणायचे. मेरिटमध्ये येणे हा फार मोठा बहुमान समजला जायचा. अमच्या वेळच्या मॅट्रिकच्या परिक्षेमध्ये श्रीने सर्व रेकॉर्ड्स तोडली. तो फक्त आमच्या शाळेतच नव्हे तर आख्या पुणे शहरात पहिला तर आलाच पण बोर्डाच्या मेरिट लिस्टमध्ये पण चौथ्या क्रमांकावर झळकला. अर्थात आम्हाला याचा सार्थ अभिमान वाटला. प्रशांत मात्र कसा बसा 51 टक्के मार्क मिळवून सेकंड क्लासमध्ये पास झाला.

    अपेक्षेप्रमाणे श्री इंजिनिअरींगकडे गेला. बी. ई. मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल झाला. इथे पण तो युनिव्हर्सिटी टॉपर होता. पुढे त्याला पुण्याच्याच एका चांगल्या कारखान्यात नोकरी मिळाली. आपल्या गुणांवर चढत चढत तो दहा वर्षांच्या आतच कंपनीचा प्रॉडक्शन मॅनेजर झाला. स्वतःचा फ्लॅट घेतला, गाडी घेतली, लग्न केले. प्रशांत मात्र कॉमर्सला गेला पण त्याला काही शिक्षण पुरे करता आले नाही. तो सेकन्ड इयरला असताना त्याचे वडील आजारी पडले. तो घरातील सर्वात मोठा असल्याने दुकानाची जबाबदारी त्याच्यावर पडली. त्यामूळे शिक्षण अर्धवट सोडून त्याला वडिलांच्या धंद्याची जबाबदारी घ्यावी लागली.

    श्रीने अचानक नोकरी सोडून स्वतःचा बिझनेस सुरु केल्याचे मला कळले. त्याला कुठल्यातरी इंजिनिअरिंग प्रॉडक्ट्सची एजन्सी मिळाली होती. श्रीने हातात असलेली चांगली नोकरी सोडून बिझनेस चालु करणे ही गोष्ट टिपिकल मध्यमवर्गीय मेन्टॅलिटी असलेल्या मला काही फारशी रुचली नाही. एकदा मला तो त्याचे ऑफीस दाखवायला घेऊन गेला. त्याचे ऑफिस एकदम पॉश होते, केबीनला ए.सी. बसवलेला होता. बाहेर सुरेख रिसेप्शनिस्ट होती. श्री सुट, बूट टायमध्ये होता. तो रुबाबात त्याच्या गाडीतून ऑफीसमध्ये येतो असे मला कळले. प्रशांतने मात्र काहीतरी वेगळाच उद्योग सुरू केला होता. त्याने भोसरीला स्वतःचे वर्कशॉप काढल्याचे मला कळले. धाकटा भाऊ हाताशी येताच त्याच्याकडे दुकानाची जबाबदारी सोपवून प्रशांतने हा नवीन उद्योग सुरू केला होता. त्याला वर्कशॉपमधले काही कळते का असा यक्षप्रश्न माझ्यापूढे होता. तो रोज मला त्याच्या जुन्या व्हेस्पा स्कुटरवर वर्कशॉपमध्ये जाताना दिसे. बहुतेक वेळा जेवणाचा डबा पण बरोबर असे. त्याच्या एकूण अवतारावरून त्याचे काही फारसे बरे चालले नसावे असे मला वाटे. असे असुनही अधुन मधुन आमची भेट होत असे आणि कोपर्यासवरच्या उडप्याकडे कॉफी प्यायला म्हणून आम्ही जात असु. कारण तेथील फिल्टर कॉफी लाजबाब असे.

    श्रीने अचानक त्याचा धंदा बंद केल्याचे मला कळले. कारण विचारले तेव्हा धंद्यामध्ये लॉस होतो असे सांगीतले. तो नोकरीच्या शोधात आहे असे पण मला कळले. पण तो जेव्हा प्रशांतच्या वर्कशॉपमध्ये जनरल मॅनेजर म्हणून नोकरीला लागल्याचे मला कळले तेव्हा धक्काच बसला. आमच्या वर्गातील सर्वात हुषार मुलगा आमच्याच वर्गातील एका ‘ढ’ मुलाच्या कंपनीत काम करतो ही गोष्ट, नाही म्हटले तरी मला पचवणे अवघडच गेले. पण श्री लागल्यापसून प्रशांतच्या कंपनीत लक्षणीय बदल घडू लागले. प्रशांतने आपनी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड केली आणि श्रीला कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर केले. प्रशांतच्या वर्कशॉपची वेगाने तरक्की होत असल्याची लक्षणे मला दिसू लागली. प्रशांतने वडिलांचे जुने घर पाडून तेथे चार मजली पॉश इमारत उभी केली, मर्सिडिझ गाडी घेतली. जुन्या व्हेस्पा स्कुटरवरून फिरणारा प्रशांत आता मर्सिडिझमधून फिरू लागला. एक उद्योजक म्हणून तो ओळखला जाऊ लागला. तरी सुद्धा माझ्यासाठी तो पुर्वीचाच प्रशांत होता. अजुनही आम्ही कोपर्यािवरच्या उडप्याकडे कॉफी प्यायला जात होतो.

    एकदा आम्ही असेच कॉफी प्यायला बसलो होतो तेव्हा श्रीचा विषय निघाला. अर्थात श्रीमुळेच आपली तरक्की झाल्याचे प्रशांत नेहमीच आवर्जून सांगायचा. यावेळचा विषय मात्र श्रीच्या बिझनेसचा निघाला. त्याने बिझनेस बंद का केला हे कोडे मला काही उलगडत नव्हते. मी प्रशांतला याचे कारण काय असेल असे विचारले.

    ‘कारण त्याला 1000 X 1000 हा फॉर्मुला ठाऊक नव्हता म्हणून!’ प्रशांतने उत्तर दिले.

    ‘ हा कसला फॉर्म्युला?’ मी प्रशांतला विचारले.

    ‘हा फॉर्मुला मला माझ्या वडीलांनी लहानपणीच शिकवला होता! माझे वडील फक्त सतवी पर्यंतच शिकलेले होते. पण त्यांचा हा फॉर्म्युला अगदी अचूक निघाला!’ प्रशांत म्हणाला.

    ‘हा कसला फॉर्म्युला आहे? मला जरा नीट समाजाऊन सांग ना!’ मी प्रशांतला म्हणालो.

    ‘माझे वडील म्हणायचे कि जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा त्याच्या आयुष्यातील पहीले 1000 दिवस, म्हणजे 3 वर्षे अत्यंत महत्वाची असतात. मूल या तीन वर्षतच खरी प्रगती करते. म्हणजे ते आधी कुशीवर वळायला लागते, मग पालथे पडायला लागते, पोटावर सरकायला लागते, रांगायला लागते, धरून धरून उभे रहायला लागते, चालायला लागते, पळायला लागते, बोबडे बोबडे बोलायला लागते. पण याच काळात त्याची तब्येत पण नाजूक असते. ते वारंवार आजारी पडत असते. त्याला सारखा ताप येत असतो. सर्दी, पडसे, खोकला होत असतो. इन्फेक्शन होत असते. दात येताना त्रास होत असतो. याच काळात त्याला अनेक लशी टोचण्यात येतात, पोलियोचा डोस द्यावा लागतो. त्याची काळजी घ्यावी लागते. मी सुद्धा लहानपणी बराच आजारी असायचो अशी माझी आई मला सांगते. पण मूल वारंवार आजारी पडते म्हणून काही कोणी त्याला मारून टाकत नाही!’ प्रशांत मला सांगत होता पण याचा श्रीच्या बिझनेसशी काय संबंध असा प्रश्न मला वारंवार पडत होता.

    ‘वडील म्हणायचे की जे मूल 1000 दिवस जगते ते मूल पुढे 1000 महिने म्हणजे 84 वर्षे जगू शकते. थोडक्यात आपल्याला जर दिर्घायुष्य मिळाले तर त्याचे खरे श्रेय पहिल्या 3 वर्षांत आपले कसे पालन पोषण झाले याला असते. माझे वडील याला 1000 गुणीले 1000 फॉर्म्युला म्हणायचे. हाच फॉर्म्युला बिझनेसला पण लागू असोतो!’ प्रशांत म्हणाला

    ‘ते कसे काय?’ मी प्रशांतला विचारले.

    ‘तुम्ही जेव्हा एखादा नवीन बिझनेस सुरू करता तेव्हा एखादे नवीन मूल जन्माला घालण्यासारखेच असते. याचे पहीले 1000 दिवस फार महत्वाचे असतात. या काळात जरी धंदा वाढत असला तरी याच काळात धंद्यात अनेक अडचणी येत असतात. अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागत असते. याच काळात फसवणारी, टोप्या घालणारी माणसे भेटत असतात. तुमचे स्पर्धक तुम्हाला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच तुम्हाला मदत करणारे लोक पण याच काळात भेटत असतात. आता माझेच बघना! मी जेव्हा वर्कशॉप सुरु करायचे ठरवले तेव्हा वडिलांनी एकच अट घातली. कोणत्याही परिस्थितीत 1000 दिवसांच्या आत वर्कशॉप बंद करायचे नाही. जसे असेल तसे चालू ठेवायचे. माझे पहिल्यांदा खूप हाल झाले. एकतर मला वर्कशॉपमधले काही ठाऊक नव्हते. लेथ म्हणजे काय, मिलींग मशीन कशाला म्हणतात, ग्राईंडरचे काय काम असे मला काही म्हणजे काही ठाऊक नव्हते. ट्रॉब सारखे मशीन तर मला स्वप्नवटच वाटायचे. ज्या पार्टनरबरोबर वर्कशॉप सुरू केले त्याने टोपी घातली. जे वर्कर्स होते ते बेकार निघाले. वर्कशॉपमध्ये चोर्याॉ व्हायच्या. फसवाफसवी तर मोठ्या प्रमाणावर होत होती. अनेक वेळा वाटायचे की कुठून या फंदात पडलो. पण वडीलांना वचन दिले होते त्याप्रमाणे वर्कशॉप चालू ठेवले. आज त्याचे काय झाले हे तू बघतो आहेस! आता आमचा 1000 दिवसांचा काळ संपला असून आता 1000 महिन्यांच्या काळात आम्ही आलो आहोत. माझ्या वडीलांच्या दुकानाची पण हीच कथा आहे. माझ्या वडिलांना पहिल्या 1000 दिवसांमध्ये दुकान चालवायला फार त्रास पडला. आज आमच्या दुकानाला 55 वर्षे पूर्ण झाली असून अजून 30 वर्षे तरी आमचे दुकान व्यवस्थीत चालू राहील याची आम्हाला खात्री आहे. माझ्या भावाने तर आता दुकानाचे रुपच पालटून टाकले आहे. आता आमच्या दुकानाचे रुपांतर भव्य स्टोअरमध्ये झाले असून लवकरच त्याचे मॉलमध्ये रुपांतर होणार आहे!’ प्रशांत म्हणाला आणि थोडे थांबून बोलू लागला

    ‘श्री जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे आला तेव्हा मी फक्त त्याच्या धंद्याचीच चौकशी केली आणि माहिती घेतली. माझ्या लक्षात आले की त्याचा धंदा चांगला चालू होता. पण त्याने घेतलेल्या काही चुकीच्या निर्णयांमूळे त्याला धंद्यात खोट बसली होती. म्हणून त्याने घाबरून धंदा बंद केला. थोडक्यात त्याने त्याचे मूल 1000 दिवसांच्या आतच मारले. त्याने जर त्याचा धंदा 1000 दिवस चालू ठेवला असता तर नक्कीच तो यशस्वी झाला असता आणि त्याचा धंदा 1000 महिने चालू शकला असता. पण त्याच्यात पेशन्सची कमी आहे हे माझ्या लक्षात केव्हाच आले आहे. असो’

    मी जेव्हा कॉफी शॉप मधून बाहेर आलो तेव्हा माझ्या डोक्यात सतत 1000 X 1000 हा फॉर्मुला घोळत होता.

    जी गोष्ट केवळ सातवीपर्यंत शिकलेल्या प्रशांतच्या वडिलांना ठाऊक होती तीच गोष्ट ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युउट, डॉक्टरेट तसेच युनिव्हर्सिटितले टॉपर असलेली मराठी मंडळींना अजुन सुद्धा का समजत नाही हे कोडे मला तरी उलगडलेले नाही.

    अर्थात 1000 X 1000 हा फॉर्म्युला वापरून बिझनेस करायचा की नाही हे तुमचे तुम्हीच ठरवायचे!

    उल्हास हरी जोशी,
    मोः-9226846631