वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
विरारच्या नॅशनल शाळेत इयत्ता ४ च्या विद्यार्थ्यांसाठी इतिहासाचे पुस्तका’चं एक पान आज एका ग्रुपवर वाचनात आलं. त्यात तानाजी मालुसरे ह्यांचे टोपण नाव “सिंह” होते असा स्पष्ट उल्लेख आहे.
एका जर्मन कंपनीच्या कृषी विभागातर्फे आठ वर्षे कोकणात भटकंती करत असताना इंग्रजांच्या काळातील असा एकही पूल शिल्लक राहिला नाही जिथे थांबून पुलावर लावलेल्या दगडावरील (प्लेक्) माहिती मी वाचली नाही. ३४ वर्षांपूर्वी कोकण रेल्वे अस्तित्वात आली नसल्यामुळे रस्त्यांवरूनच प्रवास करावा लागत असे. मोबाईल अस्तित्वात आला नव्हता व चांगल्या कॅमेऱ्यांच्या किमती आवाक्याबाहेर असल्यामुळे फोटो काढणे शक्य नव्हते. पूल जिथे सुरु होतो तिथे त्या पुलाबद्दल माहिती लिहिलेला एक दगड बसविलेला असतो. त्या दगडावर ज्यांच्या देखरेखीखाली पुलाचे काम झाले त्यांची नावे, वर्ष, बांधकाम पूर्ण होण्यास लागलेला काळ, खर्चाचा अंदाज व झालेला प्रत्यक्ष खर्च असा तपशील लिहिलेला (खोदलेला) असतो. इंग्रजांच्या काळातील कोणत्याही बांधकामावर लावलेल्या दगडावरील मजकूर पराकोटीच्या भ्रष्टाचाराने सडलेल्या आपल्या देशातील कोणीही वाचला तर त्याचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणे केवळ अशक्य आहे.
२०१५ च्या दिवाळीत तब्बल २५ वर्षांनंतर कोकणातील रस्त्यांवरून पुन्हा एकदा भटकंती केली. रत्नागिरीच्या काळ्या समुद्रावरील ‘द गेटवे ऑफ रत्नागिरी’ या कमानीवरील लावलेल्या दगडावरील लाल चौकटीतील मजकूर काळजीपूर्वक वाचा. कुठे ते अनुमानित खर्चापेक्षा कमी खर्चात कमीतकमी शंभर वर्षे टिकणारे बांधकाम करणारे इंग्रज आणि कुठे कोट्यावधींचा भ्रष्टाचार करूनही काम न करणारे आम्ही भारतीय. रत्नागिरीच्या काळ्या समुद्रावरील धक्क्याचे किंवा कोकणातील कोणत्याही पुलाचे काम करणारे भारतीय असले तरी त्याच्यावर देखरेख (सुपरविजन) करणारे पराकोटीचे शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष इंग्रजच होते याची आवर्जून नोंद घ्यावी.
श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
ETF म्हणजेच एक्चेंज ट्रेडेड फंड अलीकडे लोकप्रिय गुंतवणुक पर्याय म्हणुन नावारूपाला येतोय. म्युच्युअल फंडांच्या तुलनेत याचा एक्स्पेन्सेस रेशिओ खुप कमी आहे म्हणुनच हा एक स्वस्त गुंतवणुक पर्याय मानला जातो. प्रस्तुत लेखात मी एक्चेंज ट्रेडेड फंड (ETF) हा विषय थोडक्यात सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.
ग्राहकांमधील जागृतीचा अभाव हे बेकायदेशीर व्यापार फोफावण्यामागील प्रमुख कारण आहे. काही लोक बँडेड वस्तू परवडत नाही, म्हणून बनावट वस्तू खरेदी करतात. हे प्रकार रोखण्यासाठी आपल्याला पारदर्शक व्यवस्थेची गरज आहे. नागरिकांनी बेकायदेशीर वस्तू चांगली आणि स्वस्त असली तरीही घेऊ नये. आपण अशा वस्तू घेताना जीएसटी क्रमांक असलेले बिल मागणे आवश्यक आहे. कारण यावर जीएसटी दिला जात असेल तर ती वस्तू कायदेशीररित्या देशात आलेली असते.
१४ मार्च १९३१ रोजी ‘आलम आरा’ मुंबईच्या ‘मॅजेस्टिक’ सिनेमात लागला होता. पहिल्या दिवशी, पहिल्या शोच्या तिकीटासाठी सिनेमा हॉल बाहेर मोठी गर्दी जमली होती. या प्रकरणाला सांभाळण्यासाठी पोलिसांनासुध्दा बोलवावे लागले होते. जे तिकीट चार आण्यात मिळत होते, त्याला लोकांनी ब्लॅकमध्ये पाच रुपयांत खरेदी केले. सांगितले जाते, ब्लॅक मार्केटिंग भारतीय सिनेमाच्या पहिल्या बोलपटापासून सुरु झाली.
भारतीय लष्कराचा मूळ पाया व अंतर्गत गाभा हा ब्रिटीश आर्मीवर आधारलेला आहे. याच ब्रिटिशांकडून १५ जानेवारी १९४९ ला फिल्डमार्शल (तत्कालीन जनरल) के. एम. करिअप्पा यांनी पदभार स्वीकारला. यामुळे हा दिन भारतीय लष्कर दरवर्षी ‘आर्मी डे’ म्हणून साजरा करते.
भारतीय लष्कर ही प्रशंसनीय काम केलेली सन्माननीय संस्था आहे व आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपल्या लष्कराला मान आहे.
भारतीय लष्कराची एक प्रतिमा आहे, ती चांगली आहे, लष्कराची नेहमीच प्रशंसा झालेली असून लष्कराने देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय आव्हानांचा सामना करताना आदर्श कामगिरी केलेली आहे,संयुक्त राष्ट्रांच्या शांतिरक्षक सेनेत भारतीय लष्कराची मोठी भूमिका आहे, आंतरराष्ट्रीय समुदायाने भारतीय लष्कराच्या कामाची स्तुतीच केली आहे. भारतीय लष्कर हे केवळ शक्तिप्रदर्शनासाठी नाही पण या संस्थेकडे एक परिपक्वता व जबाबदारी आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
भारतात सर्वत्र आढळणारे कडू लिंबाचे झाड निंब व नीम या नावांनी ओळखले जाते. पुरातन काळापासून आयुर्वेद औषधांमध्ये याचा उपयोग होत आला आहे. मेलिएसी (म्हणजे निंब) कुलातील हा वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव अॅझॅडिराक्टा इंडिका असे आहे. द. भारत, कर्नाटक, श्रीलंका, मलेशिया व ब्रह्मदेश या प्रदेशांत म्यानमार हा वृक्ष आढळतो.
कडू लिंब: पाने वफुलोरा.मध्यम आकाराच्याकडू लिंबाच्या वृक्षाची उंची सु.१५-२० मी. तर विस्तार २-३ मी. असतो. पाने हिरवीगार, एकाआड एक, संयुक्त व विषमदली असून फांद्यांच्या टोकास वाढतात. तसेच ती समोरासमोर, तळाशी तिरपी व भाल्यासारखी दातेरी असतात. फुले लहान व पिवळसर पांढरी असून मार्च ते मे मध्ये गुच्छाने येतात. फळे (लिंबोळ्या) हिरवी-पिवळी व १.५ सेंमी. लांब आठळीयुक्त असून उन्हाळ्याच्या मध्यावर येतात. बिया लंबवर्तुळाकार असून बीजपत्रे जाड आणि तेलकट असतात.
कडू लिंबाच्या झाडांचे अनेक उपयोग असून त्याचा प्रत्येक भाग उपयोगी आहे. डासांना तसेच कीटकांना पळवून लावण्यासाठी त्याच्या पानांचा उपयोग पूर्वीपासून होत आहे. खोडाची तसेच मुळाची साल कडवट असून रक्तस्त्राव थांबविण्यासाठी उपयुक्त आहे. खोडातून पाझरणारा डिंक औषधी असून त्वचारोगावर वापरतात. याच्या डिंकाचे लाडू बाळंतपणात देण्यात येतात. पाने वातशामक व मूत्रल असून त्यांचा उपयोग श्वासनलिकांमधून स्त्रवणारा कफ कमी करण्यासाठी होतो. पानांचा काढा हिवतापावर उपयोगी असून यकृताचे कार्य सुलभतेने होण्यास मदत करतो. कडू लिंबाची पाने व खोड कुष्ठरोगावर औषध म्हणून वापरतात. पोटिस बांधणे, वाफेने शेकणे, मलम तयार करून वापरणे इत्यादींसाठीही पानांचा उपयोग करतात.
जखमा, त्वचेचे रोग, व्रण, आतड्यातील जंत, मधुमेह इत्यादींवर कडू लिंबाच्या काढ्यांचा उपयोग केला जातो. त्याच्या खोडाचा व लिंबोळ्यांचा वापर मूळव्याधीसाठी करतात. तसेच डहाळीचा वापर दात घासण्यासाठी पूर्वीपासून केला जात आहे. त्यापासून काढलेला रस दंतधावनाचा (टूथ पेस्टचा) एक घटक म्हणून वापरतात.
-- सुषमा मोहिते
( आरोग्यदूत व्हॉट्सअॅप ग्रुपच्या सौजन्याने )
दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने फ्रान्सवर कब्जा केला तेव्हा फ्रेंच लोकांनी टॉवरच्या लिफ्टच्या केबल कापून टाकल्या होत्या. हेतू हा की हिटलर येईल तेव्हा त्याला पायऱ्या चढत टॉवरवर जावं लागेल. हिटलर आला, पण तो आयफेल टॉवरवर काही गेला नाही. म्हणून फ्रेंच लोकं गंमतीने म्हणतात की हिटलरने पॅरिस जिंकलं पण त्याला आयफेल टॉवर काही जिंकता आला नाही!
कोट्यावधींनी संगणक असलेल्या आपल्या देशात अजूनही परदेशी ऑपरेटिंग सिस्टिम, परदेशी वर्ड प्रोसेसर, परदेशी इमेज मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, परदेशी ब्राऊझर्स वापरावे लागतात हे दुर्दैव आहे. नाहीतरी “गुलामगिरी”ची आपल्याला सवयंच आहे !!! ज्या “मायक्रोसॉफ्ट ऑफिस”वर आम्ही रात्रंदिवस काम करतो तसंच एखादं सॉफ्टवेअर बनवण्याची आमच्याकडच्या “जायंटस”ना इच्छा का होत नाही?
ऐंशीच्या दशकापर्यंत भारताकडे फक्त आयएनएस विक्रांत ही एकच विमानवाहू युद्धनौका होती. हिंदी महासागरावर आपले वर्चस्व कायम राहावे, यासाठी आणखी एका युद्धनौकेच्या शोधात भारत होता. अंतिमतः ब्रिटनच्या एचएमएस हार्मिसची खरेदी ४६५ मिलियन डॉलर्सला केली गेली. आणि भारतीय नौदलाच्या गरजांनुसार नूतनीकरण होऊन ती आयएनएस विराट म्हणून सेवेत रुजू झाली. विराट आपली सेवा योग्य पद्धतीने देण्यात यशस्वी झाली होती. भारतीय नौदलात दाखल झाल्यानंतर विराटची पाच वेळा दुरुस्ती करण्यात आली.
Copyright © 2025 | Marathisrushti