(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सत्य ठरलेलं स्वप्न – कोकण रेल्वे – भाग एक 

    अवघ्या कोकणवासीयांचं स्वप्न असलेला ‘कोकण रेल्वे’ हा स्वतंत्र भारतातला ‘भारतीय रेल्वे’चा सर्वांत लांब, बांधण्यास महाकठीण असलेला प्रकल्प होता. या बांधणीचं दिव्य स्वप्न ३० ते ३५ वर्ष कागदावरच धूळ खात पडलं होतं. १९९० च्या सुमाराला भारतीय रेल्वेच्या आधिपत्याखाली ‘कोकण रेल्वे बोर्ड’ ही एक स्वायत्त कंपनी स्थापन झाली. कोकण रेल्वे हा भारतानं संपूर्णपणे स्वत:चं तंत्रज्ञान वापरून बांधलेला सर्वांत मोठा प्रकल्प आहे.

  • अवनीवर घन:श्यामी कोण हे…

    पावसाळ्यातील वर्णन

  • अंतरंग – भगवद्गीता – सांख्ययोग ( स्थितप्रज्ञ)

    अंतरंग – भगवद्गीता – सांख्ययोग ( स्थितप्रज्ञ)

    शरीर आणि शरीराच्या गरजा दोन्ही अल्पजीवी आहेत. राजाची देणगी आज आहे उद्या नाही. किंबहुना राज्यही आज आहे उद्या नाही. डोळ्यांना दिसणारे सुख कायम टिकणारे नाही कारण ते नश्वर प्रकृतीचा भाग आहे. जे कायम टिकणारे शाश्वत सुख आहे ते आहे आत्म्याचे सुख… कारण आत्मा शाश्वत आहे… ते सुख राजाच काय कोणीच देउ शकणार नाही. ते आपणच मिळवायचे असते. त्यामुळे शरीराचे मोह जोपासण्यापेक्षा आत्त्म्याचे स्वरूप जाणणे आवश्यक आहे.

  • गाढवेंचे झाले तारळेकर

    कवी यशवंत अुर्फ पेण्ढरकर ‘पुणे ट्रेनिंग कॉलेज फॉर मेन’ या संस्थेत नोकरीला होते. त्या संस्थेत ‘गाढवे’ या आडनावाचे अेक शिक्षक होते. विद्यार्थी त्या आडनावाची खूप चेष्टा करायचे म्हणून पेण्ढरकरांच्या मदतीनं त्या शिक्षकानं ‘गाढवे’ हे आडनाव बदलून ‘तारळेकर’ असं आडनाव धारण केलं. कारण ‘तारळे’ या गावचा तो मूळ रहिवासी होता.

  • भारतीय मानसिकता

    पुत्र असावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा, या उक्तीची जाणीव मा. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून जाणवू लागली, व 8 नोव्हेंबरला ती खऱ्या अर्थाने सार्थ ठरली. 125 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात, घडवली जाणारी महत्वाची घटना, फक्त 2 लोकांनी नियोजित करून, रात्री 8 वाजता, लोकांच्या समोर ठेवणे, हि निश्चितच धाडसी कृतीच म्हणावी लागेल.

    आपले नशीब फार चांगले म्हणूनच मोदींना 284 चे स्पष्ट बहुमत मिळाले, आणि एक पांगळे सरकार देशावर लादण्याची नामुष्की टळली. 70 वर्षात वारेमाप काळा पैसा जमावणाऱ्यांची पहिल्यांदा झोप उडाली आहे. कर बुडवून अफाट मालमत्ता गादीखाली, माळ्यावर, भिंतीत, जमिनीत ठेवणारी जमात, खडबडून जागी झाली आहे. मोदींच्या जीवाला ह्याच लोकांचा मोठा धोका आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही.

    या देशाचा हजारो वर्षाचा इतिहास आहे, घरचा भेदी हा देशावर लागलेला शाप आहे, या वेळेस असे भेदी मिळणारच नाहीत याची खात्री देता येणार नाही. रात्र वैऱ्याची आहे, त्यामुळे डोळ्यात तेल घालून जागे राहण्याला पर्याय नाही.

    मोठया प्रमाणात जंगम व स्थावर मालमत्ता करणाऱ्यांच्यावर सुद्धा येणाऱ्या काही दिवसात दणका बसू शकतो. कित्तेक लोक बेनामी संपत्ती करून बसले आहेत, त्याचा हि पर्दाफाश काही दिवसात होऊ शकेल. आजपर्यंत 97 टक्के पैसा फक्त आडव्या वर्तुळात फिरत राहिला ज्याने दुबळ्या अर्थकारणाला जन्म दिला व पैसा फक्त तीन टक्के लोकांच्या हातात राहिला. तो उभ्या वर्तुळात फिरला तरच,तळागाळात मोठया प्रमाणात पैसा पोहोचतो व सुदृढ अर्थव्यवस्था तयार होते.

    भारतीय लोकांना घाईच फार, ट्रेन जरी स्टेशनवर अर्धातास थांबणार असली तरी, आरक्षित डब्यातुन उतरण्यास व चढण्यास घाई करतील, तीच परिस्थिती, उच्च वर्गीय लोक विमानातून उतरताना करतात. पायलट कुर्सी कि पेटी छोड दे असे म्हणताच, लोक तडक उभे राहतात, व वरती ठेवलेल्या ब्यागा काढण्याची घाई करतात. इतके करून बाहेर जाऊन मात्र कनवेअर बेल्टवर समान येण्याची वाट पाहत 20-25 मिनिटे घालवतात. तीच गत पैसे बद्दलणाऱ्यांची बँकेत दिसली. 30 डिसेंबर पर्यंत सवलत असतानाही, पहिले 3-4 दिवस बँकेत झुंबड करण्याची काही आवश्यकता न्हवती. पण आमभारतीयांची मानसिकता प्रत्येक ठिकाणी घाई करण्याची असते, ते इथेही सिद्ध झाले. अशीच घाई मात्र टॅक्स भरण्यासाठी मात्र करताना दिसत नाहीत. थकवलेली वीज, पाणी, यांची बिले जेव्हा कापायची नोटीस येते तेव्हाच भरली जातात हे चित्र कमी अधिक प्रमाणात देशात सगळीकडे सारखेच आहे.

    इंदिराजी नंतर मोदीजी हेच सर्वार्थाने या देशाला धडाडीचे पंतप्रधान म्हणून लाभले, असे आपण म्हणू शकतो. बँकेत लांबच लांब रांगा रहाणे हे मोदींचे अपयश नसून, काही शाखेतील कर्मचाऱ्यांची नियोजनाची बेजबाबदार वृत्ती म्हणू शकतो, हे मी उदाहरणाने सांगू शकतो.

    काही शाखेत 10 तारखेला 10 वाजता नोटा वाटप सुरु झाले, एकूण किती लाखाच्या नोटा त्या शाखेत सरकारने दिल्या आहेत, या वरून तेथील प्रबंधक नोटा बदलीसाठी लागलेल्या रांगेतील अंदाजे किती लोकांना नोटा मिळतील, हे सांगून इतरांना दुसऱ्या दिवशी येण्यास सांगू शकले असते, व लोकांची ससेहोलपट थांबवू शकले असते. 12.30 ला कॅश संपली व मी प्रबंधकाना 1 वाजता, कधी कॅश येणार असे विचारल्यावर, त्यांनी 4 वाजता येईल असे उत्तर दिले, हेच त्यांनी रांगेतील लोकांना सांगितले असते तर लोक घरी निघून गेले असते. मी केबिन बाहेर येऊन लोकांना असे सांगितले, तशी गर्दी ओसरू लागली. या मुळे फक्त पैसे भरणारे लोकच बँकेत थांबले, आणि गर्दी आटोक्यात राहिली. जे काम व्यवस्थापकाचे होते, ते मला करावे लागले. काही शाखेत दोन चार महिन्यात रिटायर होणारे कर्मचारी नोटा बदलण्यासाठी नियुक्त केले, त्यांना फक्त एक बोटाने किबोर्ड चालवता येत होता, त्यामुळे चार हजार बदलीसाठी प्रती व्यक्ती अंदाजे 5 मिनिटे खर्ची होत होती, जे काम 23-25 वयाच्या व्यक्तीला दिले असते तर अडीच मिनिटात झाले असते, व रांगा लवकर संपल्या असत्या.

    काही मोजक्याच बँक शाखेत खूप चांगले चित्र होते, रांगेतील लोकांना पाणी, चहा वाटप करण्यात आले. कर्मचारी वर्ग अदबीने वागत होता, तसेच जेष्ठ नागरिकांना मदत दिली जात होती. नोटा बदलण्याचा वेग हि अपेक्षित असा चांगलाच होता.

    असे छोटे छोटे निर्णय घेतले असते तर, टीव्ही वर बातम्यात दिसणाऱ्या लांबच लांब रांगा दिसल्या नसत्या, लोकांची छळणूक झाली नसती, व विरोधी नेत्यांची ओरड दिसली नसती. अश्या बाळबोध युक्त्या अमलात आणल्या असत्या तर, नाहक काही लोकांचा बळी गेला नसता.

    -- विजय लिमये

  • लघुपट – पायथागोरसचे अदभुत प्रकरण!

    राजकारणातील सर्व थोर इशू सम्राटांना समर्पित!

  • श्रीहरी स्तुति – ७

    भगवंताला ज्या विविध मार्गानी शास्त्रात निर्देशित केल्या जाते त्या विविध उपाधींचे निरूपण प्रस्तुत श्लोकात आचार्य करीत आहेत. ते म्हणतात…

  • माथेरानच्या राणीच्या निमित्ताने

    Toy Train of Matheranमुंबई-पुण्याहून माथेरानला पर्यटनासाठी जाणार्‍यांना माथेरानच्या राणीने नेहमीच खुणावले आहे. गेली तब्बल १०९ वर्षे ही राणी दररोज अनेक प्रवाशांना आपल्या कुशीत घेउन माथेरानचा डोंगर चढत-उतरत आहे. दोन-सव्वादोन तासांच्या, २० किलोमीटरच्या प्रवासात गेल्या दोन वर्षात या राणीने जवळपास आठ लाख प्रवासांना माथेरानच्या निसर्गसौंदर्याचे दर्शन घडवले आहे.

    माथेरान हे ठिकाण पर्यावरणीय पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. या गावात प्रदूषण करणार्‍या वाहनांना प्रवेश नाही. त्यामुळेच येथे जाणार्‍या पर्यटकांना गावाच्या वेशीबाहेर आपली वाहने उभी करावी लागतात. गावात थेट पोहोचण्यासाठी या माथेरानच्या राणीचाच आधार आबालवृद्धांना असतो.

    गेल्या काही आठवड्यात ही माथेरानची राणी एक-दोनदा रुळावरुन घसरली काय आणि तिला कायमची बंद करण्याची चर्चा सुरु झाली काय. खरेतर नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेउन या गाडीला नवीन ताकद देणे गरजेचे आहे. मात्र तशी इच्छाशक्तीच रेल्वेच्या अधिकार्‍यांमध्ये नाही त्याला कोण काय करणार?

    सतत महाराष्ट्राला दुजाभाव देणार्‍या रेल्वे प्रशासनाला आता या गाडीच्या निमित्ताने पुन्हा एकदा जोर आलेला दिसतोय. या गाडीच्या निमित्ताने एका उच्च(?)स्तरीय अभ्यास(?)गटाची स्थापना करण्यात आली. ही गाडी यापुढे चालवू नये असा सल्ला या अभ्यासगटाने आपल्या अहवालात देऊनही टाकला. त्यापुढे जाऊन या गाडीची रचना नव्याने करण्यासाठी आणि त्यानुसार नवा रेल्वेमार्ग बांधण्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे सहकार्य घ्यावे लागेल असा सल्ला या दिडशहाण्या अभ्यासगटाने दिला.

    संवेदनाशुन्य अधिकारी, स्वत:च्या स्वार्थात मश्गुल असलेले प्रशासन आणि उठसुठ परदेशी सल्लागारांवर अवलंबून रहाण्याची प्रवृत्ती यामुळे आपले किती नुकसान होते आहे हे बघणार कोण?

    गंमत बघा.. याच महाराष्ट्राच्या मातीत, कोकणासारख्या दुर्गम भागात, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कोकण रेल्वेचा मार्ग ऊभारणार्‍या कोकण रेल्वे कॉर्पोरेशनकडे जम्मू-काश्मीरमधील जास्त खडतर परिस्थितीत रेल्वेमार्ग उभारण्याचे काम अतिशय विश्वासाने केंद्र सरकारने दिले आहे. माथेरानच्या रेल्वेमार्गासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे सहकार्य घ्यावे असे सांगणार्‍या या दिडशहाण्यांना कोकण रेल्वेचे नाव तरी माहित आहे का हा प्रश्न पडावा.

    अर्थात एक गोष्ट सरळपणे दिसतेय ती म्हणजे आता रेल्वेला या मार्गाचे लोढणे आपल्या गळ्यात नकोय. त्यामुळे आता ते पर्यटन विकास महामंडळाच्या गळ्यात टाकण्याचे सूतोवाच काहीजणांकडून सुरुही झाले.

    माथेरानच्या राणीला कायमचे बंद करण्याच्या सूचनेत एक मोठी खेळी असण्याचाही संशय घ्यायला जागा आहे. सध्यातरी माथेरानच्या डोंगरावर कॉंक्रिट बांधकामे आली नाहीत. पायथ्याशी नेरळ गावात आणि आसपास बंगले आणि सेकंड होमचा सुळसुळाट झालाय. आता तर दररोज मुंबईला ये-जा करण्यासाठीही नेरळ सोयिस्कर असल्याच्या जाहिराती केल्या जात आहेत.

    मुंबई-पुण्यातल्या मंडळींना आता “सेकंड होम” साठी वेगवेगळ्या ठिकाणांचा पर्याय उपलब्ध झालाय. यातही नेरळ, कर्जत वगैरे परिसरात घरे किंवा बंगले बांधू इच्छिणार्‍यांची संख्या मोठी आहे. एरवी बाजारात मंदी आल्याची बोंब मारणारे लोक अशी सेकंड होम घेण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करतात. बिल्डर्सही त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जाहिराती करतात.

    मुंबईत हिरवाई राहिली नाही म्हणून मुंबईबाहेरच्या ठिकाणी ती शोधण्याच्या हव्यासात हा सगळा पसारा मुंबइबाहेर हलतोय. लवकरच तो नेरळ पार करुन वरवर चढायला सुरुवात करेल. या सिमेंटच्या जंगलांनी माथेरानचा श्वास गुदमरायला लागेल. माथेरानच्या या हिरवाईत नवी कॉक्रिट जंगले उभी रहातील.

    आत्ताच काही दूरदृष्टीच्या पॉवरबाज नेतेमंडळींनी या डोंगरावरच्या जागा विकत घेऊन ठेवल्या असतील. कुणाला इथे नव्या “लवासा”चा साक्षात्कार होईल. माथेरानच्या डोंगराच्या कुशीत नव्या गृहप्रकल्पांचे प्लॅन बनतील आणि ते पासही होतील. पर्यावरणाचे नियम धुडकावले जातील. कॉक्रिटची जंगले उभी रहातील... त्यात धनिक गुजराती-मारवाडी रहायला येतील... माथेरानचे मूळ रहिवासी त्यांच्याकडे कामाला लागतील....

    माथेरानची राणी बंद झाल्यावर रस्ते मोठे करावे लागतील. त्यासाठी नवी कंत्राटे निघतील. त्या रस्त्यावरील वाहतूक वाढेल. नवा रस्ता बनला की टोलची दुकाने सुरु होईल. वाहतूकीची साधने वाढवावी लागतील त्यामुळे टोलची आवक वाढेल.

    एक हिलस्टेशन बरबाद झालं तर काय झालं? आमच्या सात पिढ्यांची कमाई तर होईल?

    याच विषयावरील “लोकसत्ता”मधील एक लेख वाचा ...

    एका ‘राणी’ची विराणी..

    -- निनाद अरविंद प्रधान

  • लोकल ट्रेनमधील अपघातांच्या निमित्ताने !

    माणसाला वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी रोज कुठल्याना कुठल्या वाहनाने प्रवास हा करावाच लागतो. मग तो सायकल, स्कूटर, मोटार, बस, बोट-होडी, रेल्वे किंवा विमान असो. प्रवास करतांना अपघात होतात म्हणून प्रवास करण्याचे टाळता येत नाही.

  • किचन क्लिनीक – कलिंगड

    किचन क्लिनीक – कलिंगड

    उन्हाळा आला रे आला कि थंडगार कलिंगड खाल्ल्यावर खरेच अगदी आल्हाददायक वाटते.उन्हाची झळ हि काहि काळा पुरती का होईना बरीच कमी होते. ह्याला उन्हाळ्यातील थंडाव्याची झुळूक म्हटल्यास वावगे ठरणार नाही,नाही का!

    मस्त चाट मसाला घालून,किंवा मिरपुड व मीठ घालून देखील ह्याच्या फोडी रूचकर लागतात बरं का.कधी कधी तळपत्या उन्हातून आल्यावर ह्याचा ग्लासभर लाल लाल रस पिणे म्हणजे अमृत तुल्यच होय.हो पण हा रस फक्त उन्हाळ्यात क्वचित घेतल्यास चालू शकतो बरे अन्यथा फळ खाणे उत्तम.

    कलिंगडाचा वेल असतो,ह्याच्या काळी व पांढरी अशा दोन जाती आहेत.काळी गोल असते तर पांढरी लांबट असते.पांढऱ्या जातीची कलिंगडे मोठी व गोड असतात.कलिॅगड हे फळ चवीला मधुर,थंड,कफकर व वात पित्तनाशक आहे.

    चला आता ह्याचे औषधी गुणधर्म पाहूया:

    १)पौष्टिक म्हणून कलिंगडाच्या बिया मगज ६ ग्राम+६ ग्राम खडीसाखर एकत्र करून खावी.

    २)उन्हाळ्यात १ कप कलिॅगड रस+१/२ चमचा जीरे+१ चमचा खडीसाखर तीन वेळा घ्यावे शरीरातील उष्णता कमी होते.

    ३)१ ग्लास कलिंगड रस+२ चमचे लिंबू रस+ १ चमचा खडीसाखर हे मिश्रण जेवणापुर्वी घ्यावे त्याने मळमळ,तोंडाचा बेचव पणा,छातीत जळजळ,उल्ट्या ह्या तक्रारी कमी होतात.

    ४)कलिंगडाच्या सालीचा पांढरा भाग+ कापूर+ चंदन हे मिश्रण अंगास लावल्यास अंगाची आग कमी होते.

    ५)बद्धकोष्ठाचा त्रास असल्यास १ ग्लास कलिंगड रस+ १ चमचा आवळकाठी चुर्ण जेवणापुर्वी १ तास घ्यावे व मग जेवावे.

    कलिंगड सेवनाचा अतिरेकाने जुलाब होऊ शकतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४