वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
रोजच्या जेवणात असलेल्या तिखट पदार्थात सर्वांना आवडणारा एक चटपटीत आंबट तिखट पदार्थ म्हणजे चटणी.
ही चटणी बहुगुणी औषध आहे. जिरे, मिरी, मिरची, हिंग, कढीपत्ता, चिंच, पुदीना, कोथींबीर या पैकी कोणत्या तरी पदार्थाने नटलेली सजलेली, रंगीबेरंगी चटणी रोजच्या जेवणात असावी. सुकी किंवा ओली कशीही असली तरी चविष्ट लागते. म्हणजे इष्ट चवीची !
डाव्या हाताला असणारी चटणी मधे मधे खाल्ली की उजव्या बाजूच्या इतर पदार्थांची रूची पण आपोआपच वाढत असते.
लसूण, शेंगदाणे, तीळ, नारळ, जवस, कारळे, कांदा यापैकी ( म्हणजे आठवड्यातून दरदिवशी एक कोणत्याही वेगळ्या प्रकारची चटणी केली तरी) त्यातील मुख्य पदार्थ हा एक प्रकारची तेलबी असते.
या बिया आणि इतर वेगवेगळे मसाले कुटले कि त्यातील तेल बाहेर येते. त्यात मीठ घालून ढवळले की, चटणी तयार. यात कुटण्याची पद्धत महत्वाची.
मिक्सरमधून बारीक वाटून होते, पण कुटण्याचा संस्कार होत नाही. संस्कार बदलला कि परिणाम बदलतात, चवही बदलते.
मिक्सर आणि पाटा वरवंटा वापरून केलेल्या चटणी किंवा वाटपामधे फरक पडतोच ना ! मिक्सरमध्ये ब्लेडच्या सहाय्याने बारीक बारीक तुकडे पाडणे आणि वरवंट्याचा घाव घालून पाट्यावर रगडणे या दोन्ही कृतीतून तेलबीयांमधले तेल बाहेर पडल्यामुळे चवीतही फरक पडतो. म्हणून संस्कार महत्वाचा !
चटणीला चव येण्यासाठी वापरला जाणारा मसाला कच्च्या स्वरूपातच वापरला जातो. हे उघड सत्य आहे.
हे फक्त लक्षात आणून देतो की, चटणीमधले तेल आणि मसाले कच्च्या स्वरूपात वापरले जातात, तर भाज्या या सुसंस्कारीत करून खाल्ल्या जातात. भाज्या कच्च्या नाहीत, मसाले भाजून नाहीत, तर ते जास्त औषधी.
मसाला टिकवण्यासाठी किंवा नीट कुटला जावा, यासाठी तो भाजला जातो. तो परत परत भाजला तर त्यातला दळ, वास, तेल, आणि औषध निघून जाते. पूड होण्यासाठी किंचित गरम करणे इथपर्यंत ठीक आहे, पण खमंग वास आणि परत तेल सुटेपर्यंत भाजणे, म्हणजे त्यातील अंगभूत औषध उडवून लावल्यासारखं आहे. हे निमंत्रित केलेल्या पाहुण्याला, घराच्या दारात आल्यावर, आम्ही आता शिनिमाला जातुय, *तू आता परत जा, असे सांगण्यासारखेच झाले.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
12.11.2016
महोत्सवाची प्रमुख आकर्षण म्हणजे काशी विश्वनाथ धाम आणि संगीत, साहित्य, पुस्तक मेळा, व्यापार मेळा, महोत्सव, महापौर संमेलन, कृषीआधारित संमेलन, वास्तुविशारद संमेलन, कला आणि साहित्य संमेलन, रांगोळी आणि छायाचित्रण स्पर्धा, क्रीडा आणि युवकांसाठी विविध कार्यक्रम असतील. हा उत्सव महिनाभर चालणार आहे.
जगभरात सर्व स्तरांमध्ये ट्विटर हे लोकप्रिय माध्यम बनले आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी, हॉलीवुड-बॉलीवुड कलावंत किंवा नरेंद्र मोदींपासून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांपर्यंत अनेक नेते ट्विटरची मदत घेतात.

ह्याचे ०.५-१.५ मी उंच वर्षायू क्षुप असते.काण्ड सरळ असून फांद्या मजबूत असतात.पाने २.५-८ सेंमी लांब किंचित गोल अथवा हृदयाकृती,एकान्तर असतात पत्र धारा दन्तुर असतात.फुले पिवळसर निळे पुष्प दंड मोठा व त्यात १-३० फुले गुच्छात उगवतात.फळ काळे व गुच्छात येते.बीज काळे लहान कोवळे व विशिष्ट उग्रगंधी असते.बीज मगज पांढरा असतो.
बाकुचीचे उपयुक्तांग बीज व बीज तैल आहे.हे चवीला गोड,कडू,तिखट असून उष्ण आहे.तसेच हल्के व रूक्ष आहे.बाकुची कफवातनाशक व पित्त प्रकोपक आहे.
चला आता आपण हिचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)कृमींवर ५ दिवस बाकुची चुर्ण देऊन मग त्यावर एरंडाचे तेल पोटात देतात संडासला पातळ होऊन कृमी पडून जातात.
२)श्वित्र कुष्ठात व जीर्ण त्वचारोगात बाकुचीचा उपयोग होतो.
३)उष्ण असल्याने बाकुची कामोत्तेजक आहे म्हणून ती क्लैब्यात वाजीकर कार्य करते.
४)खरजेवर बाकुचीबी व कारळे गोमुत्रात वाटून लेप लावतात.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
©Dr Swati Anvekar
“विद्यया संपन्नता” हे ब्रीद घेऊन सोलापूर परिसरातील उच्च शिक्षणाची गरज भागविण्यासाठी, सोलापूर या एका जिल्ह्यासाठी स्थापन झालेले सोलापूर विद्यापीठ, अशी वेगळी ओळख असलेल्या सोलापूर विद्यापीठाची स्थापना २२ जुलै २००४ रोजी झाली, व प्रत्यक्ष कामकाज ०१ ऑगस्ट २००४ पासून सुरू झाले. दुष्काळी व ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना नवनवीन अभ्यासक्रम उपलब्ध करुन, उच्च शिक्षणाची संधी देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हे विद्यापीठ करीत आहे.
अमेरिकेमधे लोकांना सेल (Sale) चे भयंकर वेड आहे. इथे कायम कसला ना कसला सेल चालू असतो. न्यू इयर, व्हॅलेंटाईन, इस्टर, मदर्स डे, फादर्स डे, प्रेसीडेंट्स डे, मेमोरियल डे, लेबर डे, हॅलोवीन, हे ठरावीक निमित्ताने होणारे सेल झाले. त्याशिवाय प्रत्येक सीझन सुरू होण्याआधी, (स्प्रींग, समर, फॉल, विंटर) त्या त्या सीझनचा सेल असतो. झालंच तर सीझन संपत आला की पुढच्या सीझनचे कपडे, वस्तू झाडून झटकून दुकानात लावण्यापूर्वी, आधीच्या सीझनचा माल ‘end of season’ सेलमधे काढून टाकायचा असतो. इथे बरे लोकांना प्रत्येक सीझनला वेगळे वेगळे कपडॆ लागतात. हिवाळ्यात उणे २० आणि उन्हाळ्यात ८५-९० फॅरनहीट असं टोकाचं तापमान असल्यावर, ऋतुमानाप्रमाणे कपडे घालणं हे गरजेचंच असतं. बायकांच्या कपड्यांचे प्रत्येक सीझनमधे रंग वेगळे. आणि परत प्रत्येक वर्षी नवीन नवीन फॅशन्स येणार. मागच्या वर्षीच्या जुनाट फॅशन किंवा सीझनला न शोभणार्या रंग संगतीचे कपडे वापरले तर नाकं मुरडली जातात. पूर्वीच्या काळी आपल्याकडे जसं पुरुषांना दोन पाटलोणी आणि चार शर्ट असले आणि बायकांना चार लुगडी असली की दोन वर्ष बघायला नको, तसा प्रकार इथे नाही. शिवाय आपल्याकडे कसले आले आहेत सीझन! आठ महिने घामाने भिजायचं आणि चार महिने पावसात भिजायचं… त्यासाठी वेगळे वेगळे कपडे काय करायचेत ?
ठरावीक निमित्ताने होणार्या सेलमधे देखील, थॅंक्सगिव्हींग पासून ते ख्रिसमसपर्यंत तर काही बघायलाच नको. हा सबंध महिना, दीड महिना ‘हॉलिडे सीझन’ म्हणूनच मानला जात असल्यामुळे, सगळीकडे सेलच सेल चालू असतात. या सार्यातून काही दिवस मोकळे मिळालेच तर अगदी काहीच नाही तर ‘वीकएण्ड सेल’ असतोच. बहुदा मोठमोठया स्टोअर्समधे दोन आठवडे कुठल्याही सेल शिवाय गेले तर सेल्स मॅनेजरला नोटीस मिळत असावी.
या सेल्समधे सगळ्यात मोठा सेल असतो तो थॅंक्सगिव्हींगच्या दुसर्या दिवशीचा. थॅंक्सगिव्हींग हा म्हणजे पूर्णपणे अमेरिकन सण आहे. हा नोव्हेंबरच्या चौथ्या गुरुवारी असतो. याच्या मागची थोडी पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. १५८४ साली, इंग्लंडच्या एलिझाबेथ राणीने, वॉल्टर रॅले यांना नवीन जगात वसाहती वसवण्याची परवानगी दिली. आताच्या नॉर्थ कॅरोलायना राज्याच्या जवळ, एका बेटावर, १५८५ आणि १५८७ साली, दोन वेळा वसाहती वसवण्याचा वॉल्टर रॅले यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यानंतर १६०७ साली, सध्याच्या व्हर्जिनीया राज्याच्या किनार्यावर, जेम्सटाऊन या नावाची वसाहत सुरू झाली. या सुरवातीच्या सर्व वसाहतीतल्या लोकांना, खाद्यपदार्थ व इतर सामुग्रीसाठी, मुख्यत्वे इंग्लंडहून कधीच्याकाळी येणार्या बोटींवर अवलंबून रहावे लागायचे. जेम्सटाऊन वसाहतीची देखील आधीच्या वसाहतींप्रमाणेच वाताहत झाली असती, पण स्थानिक अमेरिकनांकडून तंबाखूच्या पिकाची माहिती झाल्यावर, जेम्सटाऊनच्या लोकांनी तंबाखूचे उत्पादन करून युरोपात त्याची निर्यात सुरू केली. तोपर्यंत तंबाखूच्या बाबतीत युरोपियन्स पूर्णपणे अनभिज्ञ होते. त्यांना या तंबाखूची एकदा चटक लागल्यावर, अधिकाधिक लोकांची, या नवीन जगात जाण्यासाठी रीघ लागू लागली.
यानंतर अमेरिकेत येऊन स्थायिक व्हायचा प्रयत्न करणारे लोक म्हणजे पिलग्रीम्स. इंग्लंडमधे, या पिलग्रीम्सचा, त्यांच्या धार्मिक विचारांमुळे छळ होत होता. धर्मस्वातंत्र्याच्या शोधार्थ ते अमेरिकेत आले आणि त्यांच्या सुदैवाने, त्यांची गाठ पडलेले स्थानिक रेड इंडियन्स (आधीच्या वसाहतीतल्या लोकांशी संपर्क आल्यामुळे) चक्क इंग्रजी बोलणारे होते. या इंग्रजी बोलणार्या स्थानिक रेड इंडियन्सपैकीच एकाने या नवीन वसाहतीतल्या लोकांना मक्याची लागवड करण्याचा कानमंत्र दिला. त्याच्याच सहाय्याने या वसाहतीतल्या लोकांना स्थानिक वातावरणातल्या क्लृप्त्या, मासे पकडण्याच्या जागा वगैरे समजल्या. पहिले वर्ष निर्वेध पार पडलं. पहिलं पीक आलं आणि एकंदरीत या सर्व यशस्वी वाटचालीबद्दल देवाचे आभार मानण्यासाठी (थॅंक्सगिव्हींग), वसाहतीतील लोक आणि स्थानिक रेड इंडियन लोक यांनी एकत्र येऊन मोठी मेजवानी केली.
तेंव्हापासून ही थॅंक्सगिव्हींगची प्रथा अमेरिकेत चालू आहे. थॅंक्सगिव्हींगच्या दिवशी सुट्टी असते आणि दुसर्या दिवशी मोठा सेल असतो. याला Black Friday असंही म्हणतात, कारण तोपर्यंत बहुतेक दुकानांचा व्यवहार तोटयातच (red) चाललेला असतो. परंतु थॅंक्सगिव्हींगच्या नंतरच्या शुक्रवारच्या एका दिवसातल्या सेलमधेच, सार्यांचा व्यवहार तोटयातून (red) नफ्यात (black) येतो, असा या सेलचा लौकिक! या दिवशी बहुतेक मोठी स्टोअर्स सकाळी सहा वाजताच उघडतात, आणि त्या सुरवातीच्या काही तासांमध्येच, वर्षातले सर्वात मोठे शॉपींग केले जाते. आम्ही इथे आल्यावर पहिल्या वर्षी (२००१) आम्हाला या सेलची काहीच कल्पना नव्हती. सेलच्या दुसर्या दिवशी, इतरांच्या बोलण्यांतून असा काही प्रकार असतो असे आम्हाला समजले. म्हणून दुसर्या वर्षी, थॅंक्सगिव्हींगच्या दोन तीन महिने आधीपासूनच आम्ही या सेलकडे डोळे लावून बसलो होतो.
– डॉ. संजीव चौबळ
वार्धक्यावस्थेचे नियोजन करणे आज गरजेचे झाले आहे. या नियोजनामध्ये सर्वात महत्त्वाचे ठरते ते आर्थिक नियोजन. त्यामुळे सुरुवातीपासूनच आर्थिक शिस्त अंगी बाणवून घेणे अत्यावश्यक ठरते.
वेगवेगळ्या निमित्ताने ठाण्यातील हौशी, उत्साही नाट्यवेड्यांना एकत्र आणून त्यांचे नाट्यप्रवेश बसविणे, त्यांना अभिनयाचे मार्गदर्शन करणे हा जणू परांजपेसरांचा ध्यासच होता. 1996 साली नटवर्य मामा पेंडसे यांच्या स्मृती जागविताना परांजपेसरांनी स्वत ‘खडाष्टक’ आणि ‘भाऊबंदकी’मधला जो प्रवेश सादर केला, तो पाहून ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र पेंढारकर यांनी ‘अविस्मरणीय’ अशी दाद दिली होती.
एक विनंती आहे सखी, पूर्वजांची पुण्याई स्मरून, सुवासिनींची ओटी भरताना आठवणीने त्या मध्ये संस्कारांचे डोरले विणायला, मातृत्वाचा मळवट भरायला आणि मर्यादांचे पैंजण घालायला विसरू नको.स्त्रीनेच स्त्रित्वाची ओळख जपली पहिजे हाच शृंगार शोभेल हो तिजवर.

प. पू. माता कलावती या थोर महिला संत ज्या प. पू. सिद्धारुढ महाराजांच्या कृपांकीत होत्या. प. पू. महाराजांनी त्यांना वेदांताचे तत्त्वज्ञान शिकवले आणि सर्वसामान्य अज्ञजन महिलांसाठी कीर्तनसेवेतून उद्धार करण्याच्या परिस्थितीतून त्यांनी स्वतःचा एक शिस्तपूर्ण भजन संप्रदाय निर्माण केला. आज देश विदेशात लाखो भक्त त्यांच्या आज्ञेनुसार सामुदायिक भजनोपासना तसेच बालकांसाठी बालोपासना करत आहे. श्रीगुरूतत्त्वाची अनुभूती ही घेत आहेत. भजनात त्यांच्या स्वतःच्या काही रचना आहेत. प. पू. आईंच्या एका रचनेचे चिंतन करू या.
उठा उठा हो भाविकजन। गंगेमाजी करा स्नान।
विश्वनाथाचे घ्या दर्शन। त्रिविधताप निवतील।।१।।
स्मरता सदाशिव मायबाप । जाय चित्ताचा संताप।
आनंद होय अनुप । विघ्नसंकटे हरतील ।।२।।
कृष्णा वेणा तुंगा नर्मदा। भीमा तापी शरयु गोदा।
येती शिवदर्शना सदा। त्या पावन करतील।।३।।
गंगा यमुना सरस्वती। घटप्रभा नेत्रावती।
सांब दर्शनासी येती। तुम्हा सहज भेटतील।।४।।
पाहोनी माध्याह्न समय। स्नाना ये गुरुदत्तात्रय।
हर्षे डोले गंगामाय। कलिमल दूर होय म्हणूनी ।।५।।
श्री सद्गुरु हेच भक्तांचे खरे दैवत सत्चिदानंदघन श्रीगुरु हेच ज्ञानदाते-मोक्षदाते हा पूर्ण विश्वास प. पू. आईंचा होता. म्हणूनच प. पू. महाराजांचे वाक्य हे त्यांच्यासाठी प्रमाण वाक्य होते. त्याच महाराजांचे चरणी त्या अनन्य भावे विनंती करतात आणि म्हणतात.
"गुरुदेवा! आपण करुणा सागर आहात. आपल्याच कृपाकटाक्षाने माझा उद्धार होणार आहे. तेव्हा माझ्या उद्धाराचा सत्संकल्प आपल्या चित्ती उमटू द्या. मला आपल्या शिवाय कोण आहे? शिष्यांसाठी व्यवहारातील सर्वच नाती श्रीगुरुचरणी विरुन जाताच तो त्याच आश्रयाने आधाराने राहतो.
।। ॐ नमः शिवाय ।। हा मंत्र आहे प. पू. आईंचा. या मंत्राचे दैवत शिव शंकर आहे. शंकरोतिस: शंकर:। सर्वांचे हीत करणारा-पावन करणारा तोच शंकर याचेच एक नाव विश्वनाथ हा नावाप्रमाणे संपूर्ण विश्वाचा नाथ म्हणजे पिता-आश्रयदाताआहे. गंगातटी याचे वास्तव्य असते. यासाठी आपल्या भक्तांना प. पू. आई म्हणतात, “भक्तजनहो ! जागे व्हा " आत्महितासाठी जागृत व्हा गंगा जी पापहारक आहे. तिच्यात स्नान करा मग
विश्वनाथाचे दर्शन घ्या. यांनी तुमचे अध्यात्मिक (शारीरिक), आधिभौतिक (जगतातून येणारे) व अधिदैविक (जे ताप आपल्या हाती नाहीत) हे सारेच नष्ट होतील.
गंगा ही प्रवाहरूपाने भक्तीचे प्रतिक आहे. शिवतत्त्व जोवर जीवाच्या अंतरी असते तोवर सारेच पवित्र असते, पण शिवाने देहाचा आश्रय त्यागला की त्याचेच "शव" होते असा हा शिव विश्वाचा अंतबार्ह्य व्याप्त आहे.
हे शिव तत्व नित्य पवित्र पावन आहे. म्हणूनच तो सदासर्वकाळ सदाशिव आहे. याचे मस्तकी गंगा वाहते. प्रत्येक जीवाचा मस्तकी ज्ञानगंगा असतेच. तिच प्रवाहित झाली पाहिजे. ही ज्ञानगंगा प्रवाहित होताच जीवाचे क्रोधादि विकार चित्तातून निघुन जातात. जीव भक्तीरसात डुंबला की अंतरी विकार राहणार कसे? अंतरातून विकार गेले की अंतरंग भगवंत प्रेमाने परिपूर्ण भरते. परमात्मा कसा आहे? तर “आत्मा अरे रसो वै सः।" हा प्रेमरसाने भरला आहे. अंतरी प्रेमाचा झरा वाहू लागला की भक्ताला अमाप आनंद होतो. तो निष्काम होतो. लौकिकात त्याचेवर संकटे विघ्ने आली तरी त्यातले संकटत्व हरलेले असते. भक्तांसाठी ती केवळ एक घटना असते.
पुढील ठिकाणी अनेक पवित्र नद्यांची नावे आहेत. या नद्यांच्या काठी तीर्थक्षेत्रे आहेत या नद्यांत सुस्नात होण्यासाठी संतमहंत येतात. देवदेवता सुद्धा येतात. त्यांच्याच चरण स्पर्शाने नद्या पावन होतात. अशा या तीर्थक्षेत्री तुम्ही आलात तर तुम्ही सुद्धा पावन व्हाल, असा दिलासा प. पू. आई देतात.
पण भक्तासाठी सर्व नद्यांचे तीर्थे म्हणजे श्रीगुरुदेवांचे चरणच असतात. गोरक्षनाथ आपल्या एका रचनेत म्हणतात.
"गंगा ना न्हाऊ जी मै जमूना ना न्हाऊ जो मै ।
ना कोई तीरथ न्हाऊ जी । अडसठ तीरथ है घर भीतर ।
ताही में मल मल न्हाऊ जी..."
याच देहाच्या उपाधित अडसठ तीर्थ आहेत. तीच विचाराने, साधनाने मी स्वच्छ-पवित्र करीन परिणामी सदाशीवाचे दर्शन नित्य याच देहमंदिरात घेता येईल.
पुढे गंगा यमुना सरस्वती यांचा त्रिवेणी संगमाचा उल्लेख आहे. गंगा भक्तीचे, यमुना कर्माचे तर सरस्वती ज्ञानाचे प्रतिक आहे. कर्म भक्ती ज्ञान याच क्रमाने भक्त हळूहळू विकसीत होत जातो. आणि अद्वैत तत्वात प्रवेश कर्ता होतो. तेव्हा देहाच्या घरात चैतन्याची प्रभा असतेच याची जाणीव त्याला होते. परिणामी नेत्रातून तो जे काही पाहतो, तेव्हा त्याला तत्वदर्शन सहज घडते. "अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी" या म्हणी प्रमाणे आत ओतप्रेत भरलेला शिव-सांब बाहेर सर्वत्र आहे, याचे तत्वदर्शन घडते या दर्शनाला सहजता आली की भक्त भक्तिच्या प्रांगणात स्थिरावतो. व जीवनमुक्तीच्या प्रवासाकडे सरकतो.
याच पवित्र नद्यांमध्ये माध्यांन्ह समयी जगताचे आद्य गुरु श्री दत्तात्रेय दररोज स्नानासाठी येतात. श्रीगुरुदत्तात्रेयांचा अवतार हा नित्य-शाश्वत अवतार आहे. युगानयुगे ते आहेतच. ज्ञानप्रचार-प्रसार हेच त्यांचे प्रमुख कार्य आहे. त्यांच्याच चरण स्पर्शाने गंगा माता सुखाने-आनंदाने डोलू लागते. कारण दत्तात्रेयांच्या संस्पर्शाने तिच्यातील कली (कलह) मळ (निषिद्ध कर्माची इच्छा) हे दोन दोष निघून जातात.
भक्तीच्या गंगेत राहणाऱ्या-डोलण्याऱ्या भक्ताला, जे तत्त्व परमात्याने दिले ते “दत्त" शाश्वत याची जाण येते, हे तत्त्व ज्ञानस्वरूप-आनंदस्वरूप-निरंजन असल्याने, भक्त सुद्धा भगवंतासारखाच होतो. त्याचे अंतरीची पापवासना क्षय पावते, द्वैतभाव विरू लागतो त्यामुळे कलह भांडण-वाद कलीचा प्रवाह कमी होत जातो. अंतकरणाच्या तळाशी रुतलेला “मल" दोष जो निषिद्ध-नको तो कर्म करणे हा सुद्धा नाहिसा होतो - दुर जातो. भक्ताला खऱ्या अर्थाने भगवंत दर्शनाची तळमळ लागते. याच तळमळीने जेव्हा भक्त भजन करतो तेव्हा तो भगवंत तत्त्वापासून भिन्न रहातच नाही “शिव भत्वा शिवं भजेत्” यानुसार तो रजन रतो होतो. श्री सद्गुरु कृपेने भजनाच्या माध्यमातून “मजन रती" या अवस्थे पर्यंतचा अंतरीचा प्रवास आई येथे प्रगट करतात.
क्षेत्र म्हाणजे शरीर तर क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्मा होय. तीर्थ हे पावित्र्य दर्शवते शुद्ध भक्तीने, भावाने भजन केले नामानसंधान ठेवले तर देहाचेच तीर्थ होणे संतांना अपेक्षीत आहे. जीवापासून तार्थक्षेत्राचा प्रवास भजनाच्या माध्यमातून प. पू. आई घडवतात भजनम्हणजे केवळ गाणे म्हणणे नव्हे भजू हा धातू आहे. यात परमात्म्यतत्त्व स्वीकारणे हे आहे. प्रथम बुद्धीने स्वीकारणे नंतर भजनाच्या साधनाने साध्याची प्राप्ती करून घेणे.
भजनातून अंतरी उतरणे अन् शिव-दत्त दर्शनाने कृतार्थता प्राप्त करुन घ्यावी हेच प. पू. आईंना या भजनातून सांगायचे आहे.
हे चिंतनरुपी पुष्प प. पू. माता कलावतींचे चरणी समर्पीत करून शब्दांना विराम देते.
--सौ. अलका मुतालिक, डोंबिवली.
सौजन्य: गुरुतत्व मासिक, वर्ष २ रे, अंक १० वा.
Copyright © 2025 | Marathisrushti