वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सबस्टॅण्डर्ड’ आणि ‘सेकण्डस्’ असे शिक्के त्या कापडाच्या प्रत्येक मीटरवर मारलेले असतात. ते बघून त्यानुसार त्याला दर देणे जागरुक ग्राहकाचे लक्षण आहे. अन्यथा व्यापाऱ्यांकडून याबाबतीत सर्रास फसवणूक होते
इच्छामरणाचा ‘प्रश्न’ हा नेहमीच महत्वाचा प्रश्न राहिलेला आहे. आतां लवाटे दांपत्यामुळे तो ऐरणीवर आला आहे. तसा तो ऐरणीवर आणल्याबद्दल त्यांचे आभार.
सध्या आपल्याकडे “युथफुल” चित्रपटांचा ट्रेंड वाढलेला दिसतोय, विशेष म्हणजे अशा कथांना प्रेक्षक ही भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहे कारण म्हणजे फर्स्ट लुक मधून केलेलं मनोवेधक मार्केटींग आणि साचेबद्ध पद्धतीच्या बाहेरचे असलेले विषय असल्याचं पटवून देणं, या फंड्यामुळे सध्या बर्यापैकी आपल्या मराठी चित्रपटांना हिट्स मिळत आहेत

हिरा हे आपल्याला सुपरिचित असलेलं रत्न आहे. हिरा म्हणजे प्रत्यक्षात स्फटिकाच्या स्वरूपातला कार्बन. योग्य अशा उच्च तापमानाची आणि उच्च दाबाची परिस्थिती निर्माण झाली, की कार्बनचं हिऱ्यात रूपांतर व्हायला लागलं. अशी परिस्थिती पृथ्वीच्या कवचाखालील भागात अस्तित्वात असते. त्यामुळे पृथ्वीच्या या अंतर्भागातील कार्बनचं रूपांतर हिऱ्यांत होऊ शकतं.
आयुर्वेद शास्त्रात मनुष्य शरीर , त्यात उत्पन्न होणारे रोग , त्याची चिकित्सा याचा विचार फार वेगळ्या पद्धतीने केला गेला आहे . वेगळे मी एवढ्यासाठीच म्हणीन की , आताची आपली जीवन शैलीच फार बदलली आहे
“ॐ” हे अक्षर हिंदू धर्मियांकरीता अत्यंत महत्वाची आणि पवित्र धार्मिक बाब असली तरीही एवढ्यापुरताच ह्या अक्षराचे महत्व मर्यादित नाही. ॐ नामाचा नियमित जप आरोग्याच्या दृष्टीनेही अतिशय फायदेशीर ठरू शकतो.
“यावर्षी महाराष्ट्रात भीषण अतिवृष्टी झाली. आपण नेहमीप्रमाणे हवामान बदलालाच दोष दिला. पण एके दिवशी स्वप्नात नारद मुनी भेटले आणि त्यांनी या अतिवृष्टीमागचं खरं कारण सांगितलं — जे पृथ्वीवर कुणालाही माहीत नव्हतं!” काय घडले ते जाणण्यासाठी थेट इंद्रच्या दरबारात जाऊ या:
मानवजातीच्या आयुष्यातील हा एक ऐतिहासिक क्षण होता. हा प्रसंग जेव्हा टेलिव्हिजनवर दाखविण्यात आला, तेव्हा जगातील १/५ लोकांनी तो बघितला. अपोलो-११ या यानाने १६ जुलै १९६९ रोजी सकाळी ९ वाजून ३२ मिनिटांनी अवकाशात झेप घेतली.
सफरीत ओढे, नाले, नद्या ओलांडण्यासाठी श्वापदांची एक रांगेत पन्नास किमी लांबीची विलक्षण रांग लागते. १९५१ साली ब्रिटिश राज्यकर्त्यांनी हा पाचहजार सातशे चौरस मैलांचा टापू ‘सेरेंगेटी राष्ट्रीय उद्यान’ म्हणून घोषित केला. श्वापदांच्या या मांदियाळीत सामील असतात, वनराज सिंह, डहाण्या वाघ, चित्ते, किंकाळी फोडणारे तरस, कोल्हे. वर आकाशात गिधाडे भक्षाच्या शोधात सतत घिरट्या घालत असतात.
अक्षय तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले असे सांगितले जाते. या दिवशी दुसऱ्या युगाला सुरुवात झाली होती.ही समजूत जुनी असली तरीही आपण यातून काही शिकण्यासारखे नक्कीच आहे.केशवसूतांच्या 'जुने जाऊ द्या मरणालागुन' या उक्तीप्रमाणे आपणच घालून दिलेल्या चौकटी, रूढी-परंपरा, रीतीरिवाज वेळोवेळी बदलत्या काळाच्या कसोटीवर तपासून घ्यायचे काम समाजपुरुषाने करायचे असते.त्यामुळे वर्षभर आलेले अपयश झटकून नव्या जोमाने अभ्यासाला लागा.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे मशागत करण्याचे काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करायची प्रथा आहे.कोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे, देशावर नाही. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही, अशी समजूत आहे.त्यामुळे विद्यार्थी मित्रहो, आजपासून पुन्हा अभ्यासाला लागा.आज केलेला अभ्यासाला क्षय लागणार नाही.कारण हा सन अक्षय आहे.
अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात अशी समजूत आहे.म्हणूनच संकल्प करा आज मी स्वत:ला अभ्यासात रुजवून घेणार आहे.व यंदा यशाची गोड फळे नक्कीच चाखणार आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti