वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

कोझल इथल्या या खड्ड्यांपैकी अनेक खड्डे पाण्यानं भरले आहेत. त्यामुळे या खड्ड्यांच्या परिसराला आता पाणथळी स्वरूप प्राप्त झालं आहे. हे पाणथळ परिसर म्हणजे बेडकासारखे विविध प्रकारचे उभयचर, सरीसृप, कीटक, पक्षी-प्राणी, इत्यादींचं वसतिस्थान होऊन, कोझलच्या खोऱ्यात ठिकठिकाणी नवीच वैशिष्ट्यपूर्ण परिसंस्था विकसित झाली आहे.
February 12, 2022
महाकवी महर्षी वाल्मिकी; ज्यांनी हिंदू संस्कृतीचा प्राण असलेल्या अजरामर रामायण या महाकाव्याची रचना केलेली आहे. त्यांच्या जन्माच्या तारखेची नोंद कुठेही आढळत नाही.प्राचीन भारतात त्रेता युगातील काळात त्यांचा जन्म व निर्वाण केव्हा झाला, या संबंधी निश्चित माहिती आढळत नाही.
May 2, 2024
_ ळी या अक्षराने संपणारे दोन अक्षरी शब्द
(१) फूल उमलण्याआधीची अवस्था - कळी
(२) पिकावर पडणारी किड -- आळी
(३) गालावर पडणारा खड्डा -- खळी
(४) साखर बनवल्यावर उरते- मळी
(५) बंदूकीला असते -- नळी
(६) पंचपात्राची सोबतीण -- पळी
(७) एका हाताने वाजत नाही -- टाळी
(८) साडी सोबत असते -- चोळी
(९) बागेचा देखभाल करतो -- माळी
(१०) भांड्याचा एक प्रकार --
(११) तूर /मुगाच्या करतात -- डाळी
(१२) करवंदांची असते -- जाळी
(१३) भाजी चिरण्यासाठी वापरतात -- विळी
(१४) फाल्गुन महिन्यातील एक सण- होळी
(१५) आठ पाय असलेला किडा -- कोळी
(१६) भिक्षा मागण्यासाठी उपयोगी -- झोळी
(१७) चोरांची/ दरोडेखोरांची -- टोळी
(१८) होळीेला केला जाणारा पदार्थ - पोळी
(१९) लाकडाची बांधतात -- मोळी
(२०) पुस्तकात शब्दांच्या असतात -- ओळी
(२१) फांद्या नसलेली वनस्पती --V केळी
(२२) एक पाळीव प्राणी -- शेळी
(२३) एकत्र जन्माला आलेली -- जुळी
September 3, 2016
शेतकरी आत्महत्या करेन पण चार चौगांच्या हाताला काम देतात म्हणून तो शेतकरी राजा आहे
October 5, 2018
भवद्गौरवं मल्लघुत्वं विदित्वा
प्रभो रक्ष कारुण्यदृष्ट्यानुगं माम् |
शिवात्मानुभावस्तुतावक्षमोऽहं
स्वशक्त्या कृतं मेऽपराधं क्षमस्व ‖ १९ ‖
भगवंताच्या चरणी शरण जाताना परिपूर्ण शरणागती प्राप्त होण्यासाठी स्वतःच्या अहंकाराचा विलय होणे ही पहिली आवश्यक गोष्ट आहे. त्यासाठी आपल्याजवळ कोणतीही पात्रता नाही याचे वारंवार चिंतन उपयोगी ठरते. अर्थात हे चिंतन हवे. कथन नाही. नाहीतर नुसते म्हणण्यापुरते होईल.
वास्तविक विचार केला तर खरेच आपल्या जवळ कोणतीच योग्यता नाही. आचार्यश्री समान अद्वितीय विभूती जर हे म्हणत असेल तर आपली अवस्था काय? याचा विचारच केलेला बरा.
आचार्य श्री म्हणतात,
हे भगवान शंकरा !
भवद्गौरवं - आपल्या मोठेपणाला, आपल्या विश्वनाथ अवस्थेला, दीनानाथ भूमिकेला,
मल्लघुत्वं - माझ्या अल्प स्वरूपाला, दीनत्वाला,
विदित्वा- जाणून कारुण्यदृष्ट्या- कारुण्यपूर्ण दृष्टीने
अनुगं माम् - आपला अनुयायी असलेल्या माझे,
प्रभो रक्ष - हे प्रभू माझे रक्षण करा.
मी आपला अनुयायी आहे. मी दीन आहे. आपण दीनानाथ आहात. आपल्याशिवाय माझे रक्षण करणार तरी कोण?
शिवात्मानुभाव- हे भगवान शिवशंकरा ! आपण आत्मानुभावी आहात. अर्थात आपल्याला सर्व समजते.
स्तुतावक्षमोऽहं- मी स्तुती करण्यास देखील असमर्थ आहे.
स्वशक्त्या - आपण आपल्या शक्तीने
कृतं मेऽपराधं क्षमस्व - मी केलेल्या अपराधांना क्षमा करा.
मला स्तुती कशी करायची? इतकेही ज्ञान नाही. पण असे असले तरी मला समजो की न समजो , हे भगवंता माझ्यासाठी काय योग्य आहे? हे तुला तर समजते ना?
ते देणे देखील तुझीच शक्ती आहे. मग मी मागण्याची वाट का पाहतोस?
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
June 28, 2020
विज्ञानाच्या सतत झालेल्या प्रगतीमुळे सांधेरोपण शस्त्रक्रिया ही एक अतिशय यशस्वी, प्रभावी व सोपी शस्त्रक्रिया झाली आहे. आजमितीस खुब्याच्या सांध्याच्या अनेक दुखण्याने पूर्वी जे रुग्ण कायमचे अंथरूणाला खिळत असत ते पुन्हा पहिल्यासारखे चालू शकतात. आपले आयुष्य तेवढ्याच ऊर्मीने जगू शकतात. एकेकाळी वयस्क मंडळींना जर फीमरच्या मानेचे फ्रॅक्चर झाले तर एक स्टीलचा गोळा फीमरच्या डोक्याच्या जागी बसवित असत
May 7, 2023
सोनपावलांनी येणार्या दिवाळीतील प्रत्येक दिवसाला सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत प्रत्येक दिवस थाटामाटात साजरा केला जातो. आजकाल केवळ हिदू लोकच नव्हे तर इतर धर्माचे लोकही लक्ष्मीपूजन करतात. हा सण सर्वांना आनंद आणि समृद्धी देणारा ठरतो. दिवाळीशी माझ्याही काही चांगल्या-वाईट आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत.
November 4, 2010
जायफळ हा भारतीय स्वयंपाकामध्ये वापरला जाणारा मसाल्याचा पदार्थ.
गोडाची खीर असो साखरभात असो जायफळ घातल्या शिवाय त्यांना मजा नाही.गरम मसाला असो कि दिवाळीच केला जाणारा फराळ ह्याच्या हजेरी शिवाय सगळेच फिके. मसाले दूध म्हणू नका की चहाचा मसाला सगळ्यांतच हा हवा.
असे हे सुगंधी जायफळ ह्याचा भला मोठा उंच सुगंधी व्रुक्ष असतो. आणी जायफळ हे त्याचे फळाचे बी.हे चवीला तिखट कडू असे मिश्र चवीचे असते.आणी उष्ण देखील असते.म्हणूनच शरीरातील वात व कफ दोष कमी करते.
चला आता ह्याचे काही औषधी उपयोग पाहूयात.
१)मुरूमांवर दुधात उगाळून ह्याचा लेप लावल्यास मूरुमं कमी होतात व चेहर्यावरचे डाग कमी होतात.
२)वारंवार उल्टया होत असतील तर जायफळ तांदूळाच्या धुवणातून उगाळून त्याचे चाटण द्यावे फायदा होतो.
३)लहान मुलांना पोटात थंडी साठून पातळ संडासला होते तेव्हा गाईच्या तूपामध्ये जायफळ व सुंठ समप्रमाणात उगाळून हे चाटण थोड्या थोड्या वेळाने देत रहावे.
४)पोट फुंगून जुलाब होत असल्यास जायफळ लिंबु रसात उगाळून ते चाटण मध्ये मध्ये चाटावे.
५)शरीरावर कुठल्या ही भागावर सुज आली असून तिथे दुखत असल्यास तिथे जायफळाचा लेप करावा.
जायफळ जर जास्त प्रमाणात सेवन केले तर पोटात आग होते,चक्कर येते,छातीत धडधड होते घूसमटल्यासारखे वाटते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
September 22, 2016
संगणक दोन भागांपासून बनविलेला असतो- हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ! मानवी शरीरातील बाहेरची कातडी, हाडे,स्नायू हे दृश्य भाग म्हणजे हार्डवेअर ! आणि मन, भावना, आत्मा हे अदृश्य भाग म्हणजे सॉफ्टवेअर ! मात्र हे दोन्ही घटक आतून एकच असतात. तसेच बाह्य विश्व आणि शरीरातील अदृश्य शक्ती एकमेकांना जोडलेले असतात. भावनिक आरोग्य सॉफ्टवेअरशी संबंधित आहे. आपल्या प्रत्येक कृतीमागे ते असते.
June 24, 2021
कोकणच्या मातीमध्ये रुजणारे हे सर्व वृक्ष या भागाला समृध्दी तर देतीलच पण वृक्षांच्या उत्पादनावर आधारित शेकडो कुटिर उद्योग कोकण भूमीला स्वयंसिद्धतेकडे स्वावलंबनाच्या महाद्वारामधून घेऊन जाऊ शकतात. कोकणच्या मातीचे संरक्षण करावयाचे असेल तर या भूभागाचा विकास तेथील निसर्गाला बरोबर घेऊनच करावयास हवा.
January 10, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti