वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
“हे माझे घर शब्दांचे”. लिम्का रेकॉर्ड २०१६ ह्यांनी नोंद घेतलेली एकमेव “स्वाक्षऱ्याची भिंत”. “सह्याजीराव – सतीश चाफेकर” – ह्यानी गेली ५० वर्षे स्वाक्षऱ्या गोळा करण्याचा छंद जोपासलेला आहे, आजमितीस त्यांच्याकडे १०००० हून अधिक स्वाक्षऱ्या आहेत. त्याचे मूर्त स्वरूप म्हणचेच “स्वाक्षरी संग्रहालय”
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहात बोलताना राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष डॉ. स्वामीनाथन यांनी ‘शेतकऱ्यांना वाचवा, शेती वाचवा’ , हा नारा घेऊन ठाामस्तरावर काम करण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी पॅकेजने आत्महत्या थांबत नसतील तर कृषी धोरणाचा फेरविचार करावा लागेल, असे वत्त*व्य त्यांनी केले होते.
२४ ऑक्टोबर' हा दिवस 'मराठा आरमार दिन' म्हणून साजरा करूयात .
भारतीय आरमाराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखले जाते. शिवरायांच्या पूर्वीही हजारो वर्षांपासून आपल्याकडे आरमार होते. मात्र त्यानंतर काही कारणांमुळे भारतात आरमाराचा वापर पूर्णपणे बंद झाला. एवढेच काय तर समुद्र उल्लंघायला देखील बंदी करण्यात आली. याचा फायदा पोर्तुगीज-इंग्रज-डच-फ्रेंच-सिद्दी यांनी उठविला आणि आपल्याला अनेक वर्षे गुलामगिरीत काढावी लागली. त्यावेळचे बलाढ्य सम्राट मोगल-आदिलशाह-निजामशहा-कुतुबशाह इ. यांनीदेखील प्रबळ असे लढाऊ आरमार उभारण्याचा साधा विचारही केला नाही.
मात्र शिवाजी महाराजांनी कोकणाचा मुलुख ताब्यात आल्यानंतर तेथील समुद्र पाहून, सिद्दी व युरोपियनांच्या उचापती पाहून लढाऊ आरमार उभे केले. एवढेच नाही तर अत्यंत कमी कालावधीत उत्तमोत्तम सागरी किल्ले बांधले.धार्मिक चालीरीती झुगारून देऊन आपल्या मावळ्यांना बलाढ्य युरोपियनांविरुद्ध लढण्याची नवी प्रेरणा दिली. आणि... आणि मग पुढच्या पिढीने आपल्या समुद्रावरील युरोपियनांची सत्ता खिळखिळी करून टाकली.पोर्तुगीज तर स्वतःला हिंदी महासागराचे मालकच समजत. समुद्रामध्ये बाहेर पडणाऱ्या कोणत्याही जहाजांना मग ते बलाढ्य मोगलांचे असले तरी त्यांना पोर्तुगीजांकडून कार्ताझ (परवाने) विकत घ्यावे लागत. मोगलांची हि स्थिती तर आपली काय ? त्यावेळच्या सागरी किनारपट्टीवरील बलाढ्य शाह्यांपुढे मराठयांची नव्याने उदयास आलेली सत्ता अगदीच छोटी होती. मात्र शिवरायांच्या दूरदृष्टीमुळे त्यांनी आरमाराची गरज ओळखली.
शिवरायांच्या आरमारासंबंधी एक कवी म्हणतो-
देशी भार्गव क्षेत्र सागर तिरी नाना स्थळे योजिनी
बंदी दुर्ग अनेक डोंगर शिरी बेटे बाले पाहुनी
जहाजे आरमार भर जलधि दुष्टांसी शिक्षा करी
बारा मावळ देश पर्वत दरी बांधोनि किल्ले गिरी
हा झाला आपला इतिहास, मात्र आपण तो कदापी विसरता कामा नये.
शिवाजी महाराजांनी इ.स. १६५६ मध्ये जावळी काबीज केली. जावळीमध्ये कोकणाचा बराचसा भाग येत असल्याने राजांचा कोकणात प्रवेश झाला. ४ नोव्हेंबर १६५६ पूर्वी मराठ्यांच्या सिद्दीशी अनेक झटापटी झाल्या. ऑक्टोबर १६५७ ते जानेवारी १६५८ या कालावधीत शिवरायांनी १०० किमी. लांबीचा समुद्रकिनारा व मुलुख मिळविला. मिळविलेल्या या नव्या मुलुखाच्या संरक्षणासाठी व सिद्दीच्या कुरापती थांबविण्यासाठी व त्याला समुद्रमार्गे मिळणारी रसद तोडण्यासाठी नाविक दल (लढाऊ आरमार) असणे गरजेचे होते. त्यासाठी योग्य अशी जागा / तळ असणे गरजेचे होते. *ऐन समुद्रामध्ये नौका बांधता येत नाहीत. लष्करीदृष्ट्या समुद्रामधून आत घुसलेली खाडी हि जहाजबांधणीसाठी उत्तम जागा असते.
आणि अखेर तो दिवस उजाडला..... दि. २४ ऑक्टोबर १६५७ रोजी ऐन दिवाळीत (धनत्रयोदशी) कल्याण, भिवंडी काबीज केली. आणि कल्याण, भिवंडी व पेण येथे मराठ्यांच्या नव्हे तर भारताच्या पहिल्या जहाजाची निर्मिती झाली. _यावर्षी या घटनेस ३५९ वर्षे पूर्ण झालेली आहेत._ हि आपल्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.
अशा शुभमुहूर्तावर शिवरायांनी आरमाराची उभारणी केली, म्हणून '२४ ऑक्टोबर' हा दिवस 'मराठा आरमार दिन' किंवा 'भारतीय आरमार दिन' म्हणून आपण सर्वजण मोठ्या उत्साहात साजरा करूयात .......
स्वतंत्र्य आणि सार्वभौम आरमारनिर्मिती हा हिंदवी स्वराज्याचा ठळक विशेष होय.तीन बाजूंनी सागराने वेढलेल्या हिंदुस्थानचे संरक्षण करण्यासाठी आरमार(नौदल) हे अत्यंत महत्वाचे अंग असल्याचे महाराजांनी ओळखले होते.विशेष म्हणजे ज्या काळात मुघल साम्राज्याजवळ सार्वभौम आरमार नव्हते,त्या काळात महाराजांनी स्वतंत्र्य आरमाराची उभारणी जाणीवपुर्वक केलेली आहे.पश्चिम किनार्यावरील सागरी संरक्षणाचे कार्य औरंगजेबाने जंजिरेकर सिद्दीवर सोपवले होते.पुर्व किनार्यावर मुघल आरमार होते पण ती जहाजे चालवणारी खलाशी फिरंगी असत व त्यासाठी वार्षीक चौदा लक्ष रुपये खर्च करी.अशाप्रकारे मुघली आरमार परावलंबी होते.मात्र महाराजांनी गलबते स्वत: बांधुन त्यावर आपलेच खलाशी ठेवले.हाच मुघली व मराठी आरमारातील ठळक फरक होता.
मराठ्यांच्या आरमाराची सरकाररित्या संस्थापना छत्रपती शिवरायांनी केली.महाराजांनी स्वतंत्र्य आरमार उभारण्याचा हुकुम दिला.असा उल्लेख "मराठे व इंग्रज" या ग्रंथात आहे.दिसामासाने वाढणारे स्वराज्याची सिमा समुद्र किनार्यालाही लागून आहे.किनारपट्टीवर सत्ता अधिकार प्राप्त करुन घेतल्याशिवाय आपली कोकणपट्टी सुरक्षित नाही,याची खात्रीही पटली होती.बसरुरच्या मोहिमेनंतर आलेल्या अनुभवाने शिवरायांना आरमारी प्रतीकारासाठी काही नवीन उपाययोजना करण्याची निकड वाटली.
शिवाजी महाराजांनी परदेशी पोर्तुगिज अभियंत्यांना जहाज बांधणीसाठी कामास ठेवले.
"लैतांव व्हियेगस" व त्याचा मुलगा "फेर्नांव व्हियेगस" यांच्या नेतृत्वाखाली शिवरायांनी पहिली वीस लढाई गलबते बांधण्यास सुरुवात केली.हा जो "लैतांव व्हियेगस" होता त्याच्या हाताखाली जवळपास ४०० माणसे होती. शिवरायांमध्ये हे एक चाणाक्ष नौसेनानी होण्याचा सर्व गुण होते आणि ह्या आरमारापासुन आपल्याला भविष्यात धोका निर्माण होणार हे पोर्तुगिज विजरई पु्र्ण पणे जाणुन होता त्यामुळे आरमार पुर्ण बांधुन होण्यापुर्वीच त्याने एक जाहिरनामा काढला की शिवरायांच्या आरमारात नौकरीस असलेल्या सर्व पोर्तुगिज लोकांनी स्वदेशी परत जावे.त्यामुळे एके दिवशी सर्व कारागीर महाराजांची नौकरी सोडुन गुप्तपणे पळुन गेले.
शिवरायांचे आरमार दिवसेंदिवस वाढत होते.इतके की पोर्तुगिजांना मराठी नौदलाची भिती वाटत होता. महाराजांच्या आरमाराविषयी सन १६६७ च्या अखेरीस पोर्तुगालच्या राजास "विजरई कौंदि द सांव्हिसेंति" याने कळविले होते.विजरई लिहितो की, "शिवाजीचे नौदल मला भितीदायक वाटते.कारण त्याच्याविरुद्ध आम्ही सुरुवातीपासुनच कारवाई न केल्यामुळे त्याने किनार्यावर किल्ले बांधिले आणि त्याच्या जवळ पुष्कळ तारवे आहेत,पण ती तारवे मोठी नाहित. शिवाजीराजे व संभाजीराजेंनी यांनी स्थानिक लोकांच्या कर्तबगारीचा सदुपयोग करुन पाश्चात्यांच्या मोठ्या आरमाराला तोंड दिले व आपल्या लोकांच्या समुद्रपर्यटनाबाबतच्या धार्मिक समजुतीत मोठी क्रांती घडवुन आणून त्यांना दर्यावर्दीपणात व आरमारी युद्धकलेत अल्प कालावधीत आघाडीवर नेऊन बसविले.
व्यापारी धोरण:-
स्वतंत्र्य आरमाराची स्थापना करुन शिवाजी महाराजांनी महारष्ट्राच्या इतिहासाला जी कलाटणी दिली तिच्या मागे आधुनिकिकरणाचे तत्वज्ञान होते.त्यांनी पश्चिम किनार्यावरील दरवाजा उघडुन पाश्चात्य सुधारणेचा कालवा इकडे आणण्याची तजवीज चालविली होती.परकिय व्यापारास उत्तेजन तर द्यायचेच सोबत आपल्या आरमाराचे नियमन करावयाचे असा दुहेरी बेत शिवरायांनी आखला.त्यांना पाश्चात्यांच्या नौकानयनाची पुर्ण जाणीव होती.त्यांनी डच,इंग्रज,पोर्तुगिज ह्यांच्याकडुन बर्याच कल्पना उचलल्या.मराठी राजवटीत शिवराय हे एकमेव राजे आहेत ज्यांनी तारवांतून स्वारी केली,ही गोष्ट याबाबत विसरण्यासारखी नाही.शेतीप्रमाणेच सरकारी उत्पन्नाचे दुसरे महत्वाचे साधन म्हणजे व्यापार व उद्योगधंदे.पश्चिम किनारपट्टीवरील बंदरे म्हणजे एका अर्थी व्यापाराच्या रक्तवाहिन्या होत्या.इथूनच सर्वदूर मालाची आयातनिर्यात केली जाई.या मालावरील जकाती म्हणजे सरकाराते प्रंचड उत्पन्न होते.महाराजांच्या वेळी पोर्तुगीज,इंग्रज,डच,फ्रेंच,अॅबिसिअन,चिनी व बेहेरोनी,आर्निनियन,तार्तार,ग्रीक,अरब हे परदेशी व्यापारी भारताशी व्यापार करीत.स्वराज्यात फारसा माल तयार होत नव्हता,तरी राजापुरी पंचा व लोटा तसेच भिवंडीची हातमागावरील वस्त्रे व चौलचे रेशमी कापड,मीठ,आंबे,सुपारी,नारळ इ.वस्तुंची निर्यात लक्षणीय होती.
महाराजांनी परदेशी व्यापार धोरण राबवण्यास सुरुवात केली."साॅल्ट फ्लीट "(Salt flit) म्हणजे मीठ वाहुन नेणार्या बोटींचा तांडा मराठ्यांकडे होता.मुलखातील चौल,दाभोळ,कल्याण,भिवंडी,वेंगुर्ला,पेण हि ठिकाणे चांगलीच भरभराटीस आले.चौल हे दख्खनेतील सर्वात मोठी बाजार पेठ होती.पश्चिम किनारपट्टी महाराजांच्या ताब्यात येताच त्यांनी भरपुर व्यापारी उत्पन्न मिळू लागले.शिवाय मीठाच्या व्यापारही प्रंचंड असुन त्याचे उत्पन्न दांडगे होते.काही मिठागरे पोर्तुगिज हद्दीत होते.पुष्कळदा व्यापारी स्पर्धा चाले.गोवेकरांच्या स्पर्धेमुळे स्वराज्यातील मीठ व्यापार धोक्यात आला बरीच मिठागरे ओस पडली अशा वेळेस ह्या व्यापाराय संरक्षण देण्याच्या दृष्टीने मीठावर जबर कर बसवला. अर्थशास्रामध्ये ह्या धोरणास'policy of protection" असे म्हणतात.मीठ वाहतुकीत बचतीसाठी त्यांनी कारंजाहुन मीठ आणण्याऐवजी ट्राॅंम्बेहुन मीठ आणण्याचा हुकुम नौदलास दिला.त्यामुळे ४०० खंडी मीठ आधी १०० आण्यास विकले होते तेच मीठ आता ४६ आण्यास विकले.
अरबस्तानाशी व्यापार करण्यासाठी मजबुत व अवजड अशी दोन जहाज बांधली व ती जैतापुर मार्गे मोखा येते पाठवली. लढाऊ गलबतांवर मोठ्या व लहान तोफा,बंदुकी,हुक्के ही शस्त्रे असत.इंग्रज व पोर्तुगिजांकडून महाराजांनी तोफा विकत घेतल्या.इंग्रजांच्या पितळी तोफेचे प्रमुख गिऱ्हाईक महाराजाच होते.
मराठा आरमार दिन
२४ आॅक्टोबर
(उद्या भाग-२ मध्ये महाराजांनी दुरदृष्टीने निर्माण केलेल्या आरमाराचा वारसा सांभाळणार्या पाश्चात्य शक्तींना नामोहरम करणार्या मराठा नौसेना अधिपती सरखेल कान्होजी आंग्रे यांचा पराक्रम पाहु)
एक भुकेलेला मुलगा काहीतरी खायला दे असे म्हणत आईकडे जातो. खरेतर कोणत्याही मातेसाठी लेकराच्या भुकेपेक्षा अधिक महत्त्वाचे काहीही नसते. ते नसायलाही नको असे समाज समजतो.
प्रस्तुत श्लोकांमध्ये आचार्य श्री भगवान श्रीहरी विश्व उद्धारासाठी धारण केलेल्या दशावतारांचे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात,
श्रीमद् शंकराचार्यांच्या या भक्तिपूर्ण स्तोत्रात श्रीकृष्णरूपातील श्रीविष्णूची मानसपूजा वर्णिली आहे. शिखरिणी या भावनाप्रद वृत्तात केलेली ही रचना भाविकांच्या मनाला भिडल्याखेरीज रहाणार नाही.
नागपूरातील कोणतीही मराठी व्यक्ती घराच्या बाहेर पाऊल टाकल्या हिंदीमध्ये बोलचाल सुरू करते मग समोरची ब्यक्ती मराठी पानवाला, रिक्षावाला, भाजीवाला किंवा चहावाला का असेना. कारण त्याच्या रक्तातच हिंदी असते. त्याचेसाठी वर्षाचा प्रत्येक दिवसच राष्ट्रभाषा दिवस असतो. याच्याविरुध्द परिस्थिती म्हणजे ७० ते ८० वर्ष नागपूरात वास्तव्य करणारे अमराठी. ते कधीही मराठी बोलण्याचा किंवा शिकण्याचा प्रयत्न करणार नाहीत, मराठी बातम्या ऐकणे तर दूरच. कारण नागपूरचे मराठी लोक त्यांच्याशी हिंदीतच बोलतात. भारताच्या कोणत्याही शहरात हे दृष्य तुम्हाला दिसणार नाही.
शेतकरी किंवा उद्योजक अशा कोणत्याही घटकाला सरकारचा ना आधार आहे ना सरकारची त्यांना मदत मिळते, अशा परिस्थितीत इथे बेरोजगारीची समस्या निर्माण होणे अपरिहार्य आहे.
ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे आधुनिक सत्पुरुष!
गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे, लहानाचे मोठे झाले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे.
१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारू व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकर्यांना शिकविला.
दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता,अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.
समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यानांच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा(प्रामुख्याने वैदर्भीय बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.
त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.
महाराष्ट्रातील संतपरंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणार्या,कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणार्या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.

पुर्वीच्या काळी खोडकर विद्यार्थी वर्गात ह्याच्या शेंगा वरील लव बाकावर अथवा शिक्षकांच्या खुर्चीवर घालून मुलांच्या व शिक्षकांच्या नाकी नऊ आणत अशी हि खाजकुहिली.जिच्या शेंगेवरील लवंगेचा स्पर्श जर अंगास झाल्यास भयंकर खाज सुटते.
ह्याचा वर्षायू वेल असून पाने ७-१३ सेंमी लांब,त्रिदलीय असून पानांवर बारीक लव असते.फुल १५-३० सेंमी लांब व मंजिरी स्वरूप असते.फुले वांगी निळ्या रंगाची असतात.फळ शेंगेच्या स्वरूपात ५-१० सेंमी लांब व १ सेंमी रूंद असते ह्याच्या कडा वाकड्या असून शेंगेवरील दाट लव असते.प्रत्येक शेंगेत ५-६ धुरकट व चपट्या बिया असतात.बीज मज्जा पांढरी असते.
ह्याचे उपयुक्तांग बीज,मुळ व रोम असून कपिकच्छू चवीला गोड,कडू असून थंड गुणाची व जड व स्निग्ध असते.हे गोड,जड व स्निग्ध असून वातनाशक आहे.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग पाहूयात:
१)फलरोम क्षोभ उत्पन्न करून कृमिनाशक कार्य करतात म्हणून फल रोम हे गुळ,मध व लोण्यासह मिसळून देतात व त्यानंतर रेचक औषध दिले जाते ज्यामुळे कृमी मरून पडतात.
२)कपिकच्छू बीज शुक्रवृद्धि करते म्हणून नपुंसकत्वात हे उपयुक्त आहे.
३)कपिकच्छू मुळ हे आर्तवजनन असल्याने मासिकपाळीच्या तक्रारींवर उपयुक्त आहे.
४)कृशता व अशक्तपणा ह्यात कपिकच्छू बीज उपयोगी आहे
५)गोड चव व थंड असल्याने बाळंतीणीमध्ये स्तन्यवृद्धि करण्यास कपिकच्छू बीज उपयुक्त आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
©Dr Swati Anvekar
Copyright © 2025 | Marathisrushti