वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आर्म्ड फोर्सेस स्पेशल पावर्स ऍक्ट, १९५० (अफस्पा) अंतर्गत दहशतावादी किंवा त्यांच्याशी संबंधित समर्थकांविरुद्ध कारवाई केल्यास जबाबदार सेनाधिकारी आणि जवानांच्या मागे सीबीआय आणि राज्य पोलिसांचा एफआयआर आणि न्यायालयीन खटले यांचा ससेमिरा लागत आहे.सामान्य नागरिकांमधून दहशतवाद्यांना शोधून बाहेर काढणे अतिशय अवघड असते. केंद्र सरकारने ‘डिस्टर्ब्ड एरिया’ म्हणून घोषित केलेल्या क्षेत्रात अफस्पा अंतर्गत कार्यरत असलेले सैनिक सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे त्रस्त आहेत.
रात्री उशिराचा एक रेडिओ कार्यक्रम ऐकत होते. श्रोत्याने फोनवरुन आपली समस्या सांगणे,त्यावर निवेदकाने सल्ला देणे, मग एक चित्रपट गीत. पुन्हा पुढची समस्या. पुष्कळसे इंग्लिश शब्द मिश्रित असलेल्या हिंदी भाषेतील त्या कार्यक्रमाचे स्वरुप असे होते. फोनवर एका मुलाने सांगितले की त्याची ‘गर्लफ्रेंड’ सतत काही ना काही कारणाने व परत करण्याच्या बोलीवर पैसे मागते.
भारतीय संस्कृती खूप दूरवर पसरलेली आढळते. असे असताना आपल्या शेजारी असलेले राष्ट्र तिबेटात तिची पाळेमुळे न आढळणे अशक्यच. अशा आपल्या शेजारी असलेल्या तिबेट राष्ट्रात प्राचीन काळी वैदिक संस्कृती प्रचलित होती.
स्वयंपाकात उपयोग होणा-या मसाल्याला औषधी महत्व खुप असते . याचे योग्य उदाहरण म्हणचे ओवा. ओव्याचा वापर हजारो वर्षांपासुन आजारांवर घरगुती उपाय म्हणुन केला जातो. ओव्याचे वनस्पतिक नाव ट्रेकीस्पर्मम एम्माई आहे.
आज ‘नरकचतुर्दशी’.. आपल्यासारख्या चाकरमान्यांच्या दृष्टीने हा दिवाळीचा पहिला दिवस असला तरी वसुबारसेपासून सुरू झालेल्या दिवाळसणाचा आजचा तिसरा दिवस..बहूजनांच्या ‘पहिल्या आंघोळी’चा तर महाजनांच्या ‘अभ्यंगस्नाना’चा हा दिवस.. नरकासूर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे नाव पडले असा पुराणांमधे उल्लेख आहे.
अंदमान व निकोबार बेटे हिंद महासागरात, बंगालच्या उपसागराच्या आग्नेयेस पसरलेली आहेत. या द्वीपसमूहात एकूण ५७२ बेटे आहेत, त्यापैकी फक्त ३८ बेटांवरच लोकवस्ती आहे. ह्या ५७२ बेटांमध्ये अंदमान बेटे ३२५ हून अधिक आहेत आणि मुख्यत्वे पर्यटनासाठी प्रसिद्ध. निकोबार बेटे त्यामानाने तुलनेने अलिप्त व तिथे मुख्यत्वे तिथल्या मूळ निवासी लोकांचे वसतयव असल्यामुळे पर्यटकांसाठी खुली नाहीयेत. अंदमान निकोबार बेटांचा समूह उत्तर–दक्षिण ८०० किलोमीटर पर्यंत पसरलेला आहे. येथे उष्णकटिबंधीय हवामान असून वर्षभर ऊन–पाऊस यांचा खेळ चालतो. ऑक्टोबर ते मे – पर्यटनासाठी उत्तम कालावधी आणि जून ते सप्टेंबर – मान्सून; पाऊस जास्त असल्याने, फारसे पर्यटक येत नाहीत.
‘शक्ती पेक्षा बुध्दी श्रेष्ठ’ ही म्हण आज कलियुगात पण शंभर टक्के खरी आहे. कोणत्याही क्षेत्रात उत्तम यश मिळविण्या साठी कुशाग्र बुध्दीला पर्याय नाही ह्या बद्दल कोणाचे दुमत असणे शक्य नाही.
कोणत्याही रोगाचे निर्मूलन करताना लोकशिक्षणाची गरज हा मुख्य घटक असतो . Prevention is better than cure असे म्हणणे सोपे आहे परंतु त्याची पूर्णपणे अंमलबजावणी करणे तितकेच कठीण आहे . मलेरिया हा रोग होण्यास डास हा मुख्यतः जबाबदार असल्याने त्याच्या निर्मूलनाच्या विविध पद्धती दाखविणारे तक्ते , व्हिडीओ फिल्म्स् या शाळा , कॉलेजे , ऑफिसेस् व वस्त्यांमधून दाखविणे आवश्यक आहे . शहरामध्ये शेकडोंनी बाहेर गावाहून येणारे मालवाहू ट्रक्स् , बसेस् तसेच रेल्वेचे डबे हे डेपोत व यार्डात जातात . त्यावेळी त्या गाड्या व डब्यांखालील चेसिस् व चाकांच्या खोबणीत असंख्य डास लपलेले असतात . त्यांच्यामुळे आजूबाजूच्या नागरी वस्त्यांमधून मलेरिया रोगाचा फैलाव होतो . मलेरिया झालेल्या रुग्णांना त्यावरील औषधे योग्य वेळी व योग्य प्रमाणात मिळणे अत्यंत गरजेचे आहे . जे प्रवासी मलेरियाचा प्रादुर्भाव नसलेल्या प्रदेशातून मलेरिया ग्रस्त भागात जातात तेव्हा त्यांना रोगप्रतिबंधक औषधे त्या प्रदेशात शिरण्यापूर्वीच दिली जाणे अत्यंत गरजेचे आहे . मलेरिया या रोगासंबधी सामान्य लोकांना प्राथमिक स्वरुपाची माहिती देणारा एक तक्ता मुंबई महानगरपालिकेने प्रसिद्ध केला होता . त्याचा हा नमुना
मलेरिया
महत्त्वाची लक्षणे प्रतिबंधक उपाययोजना
ताप घराच्या आजूबाजूस पाण्याची डबकी
हुडहुडी व थंडी तयार न होऊ देण्याची खबरदारी घ्यावी .
डोकेदुखी पाणी साठविण्याची पिंपे व भांडी
अंग दुखणे झाकून ठेवावीत
उलटी व उमासे येणे
खोलीमध्ये Indoor residual spray ( IRS ) कीटकनाशकाचा फवारा मारावा. जास्त काळ टिकणाऱ्या व कीटकनाशक रसायनाचा लेप असलेल्या मच्छरदाण्या वापराव्यात . ( Long lasting insecticidal ( LLIN ) गरोदर स्त्रिया व लहान मुले यांनी वरील प्रकारच्या मच्छरदाणीत झोपणे अत्यावश्यक आहे.)
-डॉ. अविनाश वैद्य

सिग्नल व्यवस्था अखंड सुरळीत ठेवण्याचं काम केबीन सिग्नलतंत्रज्ञ करतात. रेल्वेचे रुळ, त्यांतील सांधे खेचण्याचा हलणारा दांडा, बॉक्स, विद्युतप्रवाह या सर्वांचा समन्वय झाला, की सिग्नल लागतो. मध्ये एखादा छोटासा खडा जरी आला, तरी यंत्रणा बिघडते. हा बिघाड तत्परतेने शोधणारे रेल्वे कर्मचारी केबिनमध्ये सतत सतर्क असतात. प्रत्येक केबिनची कामाची हद्द २२ कि.मी. किंवा त्याहून जास्त किलोमीटर एवढी असते.
केबिनमध्ये भल्या मोठ्या पॅनेलवर अनेक लाल, पिवळ्या, हिरव्या दिव्यांची उघडझाप होत असते. ती बटणं दाबून रेल्वेचे सांधे बदलून, येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्यांचा मार्ग मोकळा केला जातो. पुणे स्टेशनच्या बाहेरील आउटर सिग्नल केबीनजवळून दहा वर्षांपूर्वी ५०० गाड्या व इंजिनांची ये-जा होत असे, आज २००० गाड्यांच्या व इंजिनांच्या हालचाली होत असतात. यांतील बरीच वाहतूक रात्री १२ ते पहाटे ५ यामधील काळात असते. हे सर्व बघण्यासाठी ओणव्यानं, वाकून काम करावं लागे. त्यामुळे बऱ्याच कर्मचाऱ्यांना पाठीच्या दुखण्यांनी ग्रासलं. आता ही सर्व कामं इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होतात. कोणतीही गाडी स्टेशनात शिरताना वा स्टेशनातून बाहेर पडतानाची संपूर्ण जबाबदारी या केबिन कर्मचाऱ्यांची असते. अत्यंत जोखमीचं असं हे काम डोळ्यांत तेल घालून करावं लागतं.
भारतभर पसरलेले १.१५ लाख किलोमीटर अंतराचे रेल्वेमार्ग, ७५०० ते ८००० रेल्वेस्टेशनं व प्रवाशांना घेऊन धावणाऱ्या १४,३०० गाड्या, हा सर्व व्याप व्यवस्थितरीत्या सांभाळण्याचं अजस्र काम रेल्वेचे हे सर्व कर्मचारी जोखमीने पार पाडतात.
शंभर वर्षांपूर्वी 'रस्कीन बाँड' हा प्रसिद्ध ब्रिटिश लेखक भारतात रेल्वेनं फिरला. भारतीय रेल्वे यंत्रणेच्या तो इतक्या प्रेमात पडला, की तो भारतातच स्थायिक झाला. त्यानं भारतीय गँगमन, के बिनमन, पॉईंटमन यांच्या प्रामाणिकपणा, चिकाटी या गुणांवर व अथक काम करण्याच्या जिद्दीवर अनेक कथा लिहिल्या. भारतीय रेल्वेच्या या साऱ्या दर्जेदार व्यवस्थेची ही संवेदनापूर्ण पावतीच आहे.
-डॉ. अविनाश वैद्य
आपण यापूर्वी मराठीसृष्टीतील माझ्या लेख मालिकेतील अनुक्रमे १. महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग १-१० व २. ओळख महाराष्ट्रातील जंगलांची: भाग १-१० हे लेख वाचले आहेत. त्या पुढील नवीन लेख मालिका सुरु करत आहे. कारण अजूनही बरेच महत्वाचे वृक्ष व त्यांची माहिती राहिली आहे. नवीन लेख मालिकेचे शीर्षक आहे ” महाराष्ट्राच्या अरण्यातील वृक्ष संपदा “. या मालिकेचेही वाचक स्वागत करतील अशी आशा आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti