(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • हे पण घेणार का?

    एखादी गोष्ट आंतरजालावरून विकत घेतल्यानंतर सतत संगणकावर येणाऱ्या जाहिराती आणि आपल्या भ्रमणध्वनीवर सतत येणारे संदेश पाहून आपल्याला प्रश्न पडतो की, मला काय हवे आहे, हे या लोकांना कसे कळते? याच प्रश्नाची एक उकल पाहणार आहोत आपण या लेखामध्ये…

      August 30, 2023


  • दुर्गेचे पहिले रूप – शैलपुत्री देवी

    दुर्गेचे पहिले रूप – शैलपुत्री देवी

    अस्त्र-शस्त्र : त्रिशुळ
    वाहन : गो माता

    दुर्गेचे पहिले रूप ' शैलपुत्री' या नावाने ओळखले जाते. ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला 'शैलपुत्री' असे नाव पडले आहे.

    नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते. या पहिल्याच दिवशीच्या पूजेत संत-महंत आपल्या मनाला 'मूलाधार' चक्रात स्थिर करतात. या दिवसापासून त्यांच्या योग साधनेला सुरवात होते.

    या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हाता कमळाचे फूल आहे. आपल्या पूर्वजन्मात तीने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता. त्यावेळी तिचे नाव 'सती' असे होते. तिचा विवाह शंकराशी झाला होता.

    एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला. या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित केले होते. परंतु, त्याने शंकराला निमंत्रित केले
    नव्हते. आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली. तिने आपली इच्छा शंकराजवळ प्रकट केली. तेव्हा शंकराने तिला सांगितले, की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत. त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलावले आहे. परंतु, मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिले नाही. अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही. शंकराने समजावून सांगितले तरीही तिचे समाधान झाले नाही. वडीलांचा यज्ञ पाहणे, तसेच आपली आई आणि बहिणींना
    भेटण्यासाठी तिचे मन व्याकूळ झाले होते. तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली.

    सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही. तिला कुणीही आदराची वागणूक दिली नाही. आई आणि बहिणींनी देखील तिला गळाभेट दिली नाही. सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते. नातेवाईकांची ही वागणूक पाहून तिला अत्यंत राग आला. तिथे शंकराच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले. दक्षाने शंकराविषयी काही अपमानकारक शब्दही वापरले होते. हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली आणि शंकरानसांगितले तेच योग्य होते, असे तिला वाटले आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे याची जाणीव होऊन नवर्याचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वत:ला योगाग्नीत जाळून घेतले. याची माहीती शंकराला मिळाल्यावर त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उध्वस्त केला. सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला. यावेळी ती 'शैलपुत्री' या नावाने प्रसिद्ध झाली.

    पार्वती, हेमवती हे तिचेच नाव होते. 'शैलपुत्री' देवीचा विवाहदेखील शंकराशी झाला होता. पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती शंकराची अर्धांगिनी बनली. म्हणून नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे.

    -- निखिल आघाडे

      October 2, 2016


  • पाकिस्तानकडून समुद्री दहशतवादी हल्ल्याची शक्यता

    26-11 चा मुंबई दहशतवादी हल्ला हा समुद्राकडूनच झाला होता. या हल्ल्याला 10 वर्षे पूर्ण होतील. पुन्हा एकदा भारताला धडा शिकवण्याच्या हेतूने पाकिस्तान हल्ल्याचे नियोजन करीत आहे. 26-11 चा हल्ला होण्याची शक्यता वर्तवली असतानाही तो थांबवता आला नाही. त्यामुळेच या लेखामध्ये सागरी सुरक्षा अधिक बळकट कशी करता येईल याविषयी चर्चा करूया.

      November 12, 2018


  • फ्रान्सचे अध्यक्ष ओलांदे यांची भारतभेट

    मालदीव, श्रीलंकेतील अलीकडच्या घडामोडींच्या निमित्ताने शेजारी राष्ट्रांबाबतच्या भारताच्या अनाकलनीय धोरणाचा पुन्हा प्रत्यय आला. पाकिस्तान, चीनबरोबरची डोकेदुखी कायम असताना बांगला देश, नेपाळ आदी शेजार्‍यांशीदेखील आपण सुरळीत संबंध राखू शकत नाही याला कारणीभूत ठरतात आपली चुकीची गृहितके. फ्रान्सच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर फ्रान्स्वा ओलॉद यांनी युरोपबाहेरील पहिल्या परदेश दौर्‍यासाठी भारताची निवड करावी, यावरून भारताबरोबरच्या संबंधांना तो देश किती महत्त्व देत आहे, ते कळते.

      March 2, 2013


  • ध्रुवीय प्रकाश – विषुववृत्ताजवळचा

    सुमारे ४१,००० वर्षांपूर्वी घडून आलेल्या या पृथ्वीवरील चुंबकीय बदलांत, चुंबकीय ध्रुवांची जागा मोठ्या प्रमाणात सरकली होती. तसंच त्यांच्या तीव्रतेतही मोठा बदल झाला होता. चुंबकत्वातील बदलाच्या घटना अधूनमधून घडून येत असल्या तरी, पृथ्वीच्या चुंबकत्वातला या वेळचा बदल खूपच मोठा असल्यानं लक्षवेधी ठरला आहे. या लक्षवेधी घटनेची झलक त्या काळी विषुववृत्तावरील ‘ध्रुवीय’ प्रकाशाद्वारे दिसून आली असल्याचं, आताचं हे संशोधन दर्शवतं.

      March 22, 2022


  • किचन क्लिनिक – कांदा

    आपल्या दररोजच्या जेवणात महत्त्वाचे स्थान असणारा हा मसाले वर्गामधला घटक.खरोखरच कापत असताना जरी सर्वांना रडवत असला तरी देखील आपल्या विशिष्ट चवीने रोजच्या जेवणाला एक वेगळीच चव आणतो.हा सुद्धा जमिनी खालीच उगवणारा कंद आहे.ह्याचे दोन प्रकार आहेत पांढरा आणि लाल.पांढरा कांदा चवीला गोड असतो तर लाल कांदा चवीला तिखट असतो.

    कांद्याची चव तिखट गोड असते आणि हा अनुष्णशीत असतो थोडक्यात सांगायचे तर कोमट पाणी कसे असते तसा त्यामुळे हा शरीरातील वात आणि कफ दोष कमी करतो पण पित्त वाढू देत नाही.औषधे पोटात घयायची असतील तर त्यासाठी पांढरा कांदा वापरावा पण बाहेरून लावण्यासाठी लालकांदा उत्तम.

    चलातर आता तुमच्या स्वयंपाक घरातील कांदा वैद्याची भूमिका कशी बजावितो हे पाहूयात ना!

    १)मुळव्याधी मध्ये ब-याच जणांना संडासला घट्ट होते त्यांनी कांद्याचा रस दह्यात मिसळून खावा.

    २)जुलाब होत असल्यास अथवा आव पडत असल्यास कांद्याचा रस साजूक तूपासोबत प्यावा.

    ३)कांदयाच्या आडव्या गोल पातळ चकत्या कापाव्यात प्रत्येक चकतीवर खंडीसाखर घालून एकावरएक रचून ठेवावी काही वेळाने जो रस वाटीत उतरेल तो सर्दी ,खोकला ह्यात कफसुटून पडायला उत्कृष्ट काम करतो.

    ४)खरूज अथवा गजकर्ण ह्यात कांद्याच्या रसात हळकुंड उगाळून लावा खाज देखील कमी होते आणि व्याधी बरा होतो.

    ५)मार लागणे,मुरगळणे,सुज ह्यावर कांद्याचा रस आणि मोहरीचे तेल एकत्र करून कोमट करून दुखणा-या भागावर लावावे सूज आणि वेदना एकदम कमी होतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      September 9, 2016


  • वॅक्सिंग करताना

    सुंदर, टॅनिंग फ्री त्वचेसाठी वॅक्सिंग हा चांगला व सहज अजमावता येणारा पर्याय आहे. मात्र तरीही वॅक्सिंग करताना कांही गोष्टींची काळजी अवश्य घ्यायलाच हवी अन्यथा त्वचा सुंदर दिसण्याऐवजी भलतेच काही तरी होऊ शकते. साधारणपणे मुली मुले वयात येऊ लागली की अंगावर केस येऊ लागतात. त्यातही मुलींना हाता पायावर अथवा ओठांवर केस येऊ लागले की सौंदर्याला बाधा निर्माण होते व त्यासाठी वॅक्सिंग करून हे नको असलेले केस काढून टाकता येतात. शिवाय उन्हात सतत फिरल्याने त्वचा काळी पडते म्हणजे टॅन होते तो टॅनही वॅक्सिंगच्या सहाय्याने कमी करता येतो. वॅक्सिंग घरच्याघरीही करता येते मात्र प्रथमच वॅक्सिंग करत असाल तर चांगल्या पार्लरमध्ये ते करावे हे उत्तम. एखाद्या कार्यक्रमासाठी जायचा प्लॅन असेल तर दोन दिवस आधीच वॅक्सिंग करावे कारण अनेकांना त्याची अॅलर्जी येऊ शकते व अॅलर्जी बरी होण्यासाठी दोन दिवस हाताशी असलेले केव्हाही चांगलेच. वॅक्स लावून ते स्ट्रीप्सच्या सहाय्याने खेचून काढणे हा वॅक्सिंगचा सर्वात चांगला मार्ग आहे. मात्र त्यासाठी वॅक्सिंग करण्याअगोदर वॅक्सच्या डब्यावरच्या सूचना लक्षात घ्यायला हव्यात. वॅक्सिंग करण्याअगोदर त्वचेवर बर्फ फिरवला तर त्वचा थोडी बधीर होते व त्यामुळे वेदना कमी होतात. घरात वॅक्सिंग करताना त्वचा, हातपाय स्वच्छ करा व मगच वॅक्सिंग करा. त्यामुळे जंतूसंसर्गाचा धोका राहणार नाही. वॅक्स गरम केल्यावर कोमट पाण्यात ठेवले म्हणजे ते लगेच घट्ट होत नाही तसेच वॅक्सवर लावण्यासाठी सुती कपड्याच्या ४ इंच रूंदीच्या पट्ट्या वॅक्स स्ट्रीप म्हणून वापरता येतील. वॅक्सिंक करून झाल्यावर पुन्हा एकदा त्वचा स्वच्छ करणे व मॉईश्चरायझर लावणे आवश्यक आहे. पायावर हातावर लावताना वॅक्स वरून खाली लावा व स्ट्रीप ओढताना केसाच्या वाढीच्या विरूद्ध बाजूने ओढा. ओठावर अथवा हनुवटीवर वॅक्सिंग करताना कटोरी वॅक्सचा प्रयोग करा. या भागातली त्वचा जास्त संवेदनशील असते. त्यामुळे या भागाचे वॅक्सिंग करताना ३-४ छोटे छोटे भाग करून वॅक्सच्या केळ्याच्या सालीएवढा जाड थर द्यावा व ७ -८ सेकंदानंतर तो थर खेचून काढावा. त्या जागी लगोलग अँटीसेप्टीक क्रिम लावण्याची खबरदारी घ्यावी. वॅक्सिंग केलेली जागा कापसाने स्वच्छ पुसून कोरडी करावी.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 10, 2017


  • श्री गणेश भुजंगस्तोत्रम् – ९

    या अंतिम श्लोकात भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज शिरस्त्याप्रमाणे फलश्रुती सादर करीत आहेत.

      January 21, 2020


  • समुद्रतळावरचं ‘ओॲ‍सिस’

    पृथ्वीवरचं जीवन सूर्यप्रकाशावर आधारलेलं आहे. सूर्यप्रकाशाच्या मदतीनं वनस्पती अन्नाची निर्मिती करतात व या अन्नावर इतर सजीवांची गुजराण होते. अर्थात, जिथे थोडाही सूर्यप्रकाश पोचू शकत नाही, अशा पूर्ण काळोखी जागेत राहणारे सजीवही पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. अशा ठिकाणी सजीवांची विविधता मर्यादित असणं, अपेक्षित असतं. मात्र हा तर्क चुकीचा ठरेल, असा एक शोध अलीकडेच लागला आहे.

      April 2, 2022


  • श्रीहरी स्तुति – ३०

    अशा स्वरूपात करीत असलेले आपले ही विवेचन कसे शास्त्रशुद्ध आहे? याचे प्रतिपादन करताना, परमपूज्य जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज येथे उपनिषदाचा आधार घेत आहेत. ते म्हणतात,

      November 20, 2020