(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १३

    न शक्नोमि कर्तुं परद्रोहलेशं
    कथं प्रीयसे त्वं न जाने गिरीश |
    तथाहि प्रसन्नोऽसि कस्यापि
    कांतासुतद्रोहिणो वा पितृद्रोहिणो वा ‖ १३ ‖

    काव्य-शास्त्रात व्याज स्तुती किंवा व्याज निंदा अलंकार आहेत. अर्थात लेखक जे लिहित असतो त्याच्या वेगळाच अर्थ अपेक्षित असतो.
    वरपांगी निंदा दिसते. अपेक्षित असते स्तुति. वरपांगी स्तुती केलेली असते मात्र प्रत्यक्षात निंदा करायची असते.
    अशीच काहीशी रचना या श्लोकात आचार्यश्री करतात. ते म्हणतात,
    न शक्नोमि कर्तुं परद्रोहलेशं
    कथं प्रीयसे त्वं न जाने गिरीश - हे भगवान गिरिजापती ! मी कधीही कोणाचा लेशमात्र देखील द्रोह करू शकत नाही. मग तुम्ही माझ्यावर कसे प्रसन्न व्हाल? हेच मला समजत नाही.
    वास्तविक कुणाचाही द्रोह न करणाऱ्यावरच भगवान प्रसन्न होणार. मात्र येथे आचार्यश्री उलट बोलत आहेत. इतकेच नव्हे तर ते पुढे म्हणतात,
    तथाहि प्रसन्नोऽसि कस्यापि
    कांतासुतद्रोहिणो वा पितृद्रोहिणो वा - तुम्ही प्रसन्न होता ते पण कोणावर? तर जे पत्नी कन्या किंवा पित्याशी द्रोह करतात.
    पत्नीशी बेईमानी करणारा रावण, कन्येचा अपमान करणारा दक्ष आणि वडिलांची इच्छा नाकारून तप करणारी पार्वती, यांना भगवान प्रसन्न झाले. अशा विविध कथा पुराणांमध्ये आपणास वाचावयास मिळतात.त्या पौराणिक कथांचा आचार्य संदर्भ घेतात. त्यांच्यावर भगवान शंकरांनी कृपा केली होती.
    तुम्ही अशा द्रोहींना प्रसन्न होता. यात भगवंताची वरपांगी निंदा वाटते.
    मात्र त्यांना म्हणायचे आहे की अशा सगळ्यांवर, अशा अशास्त्रीय कृती करणाऱ्यांवर देखील आपण कृपा करता ,मग माझ्यासारख्या स्वच्छ व्यक्तीचा अव्हेर कसा कराल?
    यांच्या उद्धारात निंदा नाही तर त्यांचाही उद्धार करण्याइतके आपण उदार आहात अशी स्तुतीच आहे.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १३

    न शक्नोमि कर्तुं परद्रोहलेशं
    कथं प्रीयसे त्वं न जाने गिरीश |
    तथाहि प्रसन्नोऽसि कस्यापि
    कांतासुतद्रोहिणो वा पितृद्रोहिणो वा ‖ १३ ‖

    काव्य-शास्त्रात व्याज स्तुती किंवा व्याज निंदा अलंकार आहेत. अर्थात लेखक जे लिहित असतो त्याच्या वेगळाच अर्थ अपेक्षित असतो.
    वरपांगी निंदा दिसते. अपेक्षित असते स्तुति. वरपांगी स्तुती केलेली असते मात्र प्रत्यक्षात निंदा करायची असते.
    अशीच काहीशी रचना या श्लोकात आचार्यश्री करतात. ते म्हणतात,
    न शक्नोमि कर्तुं परद्रोहलेशं
    कथं प्रीयसे त्वं न जाने गिरीश - हे भगवान गिरिजापती ! मी कधीही कोणाचा लेशमात्र देखील द्रोह करू शकत नाही. मग तुम्ही माझ्यावर कसे प्रसन्न व्हाल? हेच मला समजत नाही.
    वास्तविक कुणाचाही द्रोह न करणाऱ्यावरच भगवान प्रसन्न होणार. मात्र येथे आचार्यश्री उलट बोलत आहेत. इतकेच नव्हे तर ते पुढे म्हणतात,
    तथाहि प्रसन्नोऽसि कस्यापि
    कांतासुतद्रोहिणो वा पितृद्रोहिणो वा - तुम्ही प्रसन्न होता ते पण कोणावर? तर जे पत्नी कन्या किंवा पित्याशी द्रोह करतात.
    पत्नीशी बेईमानी करणारा रावण, कन्येचा अपमान करणारा दक्ष आणि वडिलांची इच्छा नाकारून तप करणारी पार्वती, यांना भगवान प्रसन्न झाले. अशा विविध कथा पुराणांमध्ये आपणास वाचावयास मिळतात.त्या पौराणिक कथांचा आचार्य संदर्भ घेतात. त्यांच्यावर भगवान शंकरांनी कृपा केली होती.
    तुम्ही अशा द्रोहींना प्रसन्न होता. यात भगवंताची वरपांगी निंदा वाटते.
    मात्र त्यांना म्हणायचे आहे की अशा सगळ्यांवर, अशा अशास्त्रीय कृती करणाऱ्यांवर देखील आपण कृपा करता ,मग माझ्यासारख्या स्वच्छ व्यक्तीचा अव्हेर कसा कराल?
    यांच्या उद्धारात निंदा नाही तर त्यांचाही उद्धार करण्याइतके आपण उदार आहात अशी स्तुतीच आहे.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • चिरफाड करणारे पत्र.. (बेवड्याची डायरी – भाग ४० वा)

    माँनीटरच्या म्हणण्यानुसार जे प्रामाणिक पणे आत्मपरीक्षण करतात त्यांच्या मनात ..आत्मग्लानी ..अपराधीपणा ..अशा भावना निर्माण होणे स्वाभाविक होते ..मी येथे उपचारांसाठी दाखल होताना अश्या सगळ्या प्रक्रियांना सामोरे जावे लागेल याचा विचार देखील केला नव्हता ..व्यसनमुक्तीचे उपचार म्हणजे मला काही दिवस शारीरिक त्रासासाठी गोळ्या औषधे देतील ..मग व्यसन करणे कसे वाईट आहे हे समजावून सांगतील इतकेच वाटले होते ..परंतु इथे केवळ व्यसनमुक्तीच नव्हे तर एका विस्कळीत झालेल्या व्यक्तिमत्वाला पुन्हा आकार देण्याचे काम सुरु झाले होते ..शरीरातून दारू लवकर निघून जाते मात्र मनातून निघून जायला खूप वेळ लागतो ..कारण मनातील दारूच्या सेवनाशी निगडीत असलेल्या भावना इतक्या सहज सहजी निघून जात नाहीत ..त्यासाठी आपल्या व्यक्तिमत्वाचे संपूर्ण आकलन ..परीक्षण ..करणे गरजेचे आहे ..ते झाले की मनाच्या साफसफाईचे काम सुरु होते .. नंतर केलेली स्वच्छता नियमित टिकवून ठेवणे आलेच ..नाहीतर दारू अथवा व्यसन हा अतिशय खुनशी शत्रू आहे ..तो आपल्या बेसावध होण्याची वाट पाहत रहातो ..पुन्हा पुन्हा हल्ला करू शकतो ..मला हे पूर्णपणे पटले ..पूर्वी घरी देखील अनेकदा मी दारू सोडली होती ..एकदोन महिन्यातच माझा निश्चय डळमळीत होऊन पिणे पुन्हा पुन्हा सुरु झाले होते ..कायमची व्यसनमुक्ती मिळवण्यासाठी स्वतःवर कष्ट घेण्याची गरज होतो मला ...नाश्ता करून झाल्यावर मी वार्डात मित्रांशी गप्पा मारत बसलेलो असताना माॅनिटरने मला एक पाकीट आणून दिले... पाकीट उघडेच होते ..म्हणाला विजयभाऊ जरा वाचा हे सगळे ..मी पाकीट घेवून त्यातील कागदाची घडी काढली ..उघडून पहिले तर वर प्रिय असे लिहिलेले होते ...एका कोपर्यात जावून बसलो वाचत ..

    प्रिय ,
    परवा मी भेटीला आले असताना तुम्ही घरी घेवून जाण्यासाठी जो हट्ट केला त्यामूळे मी खूप व्यथित झाले आहे ..शेवटी तर तुम्ही घटस्फोटाची धमकी दिलीत मला ..इतकी का मी वाईट आहे ? आपल्या नव-याने व्यसनमुक्त असावे ही अपेक्षा ठेवणे हीच माझी चूक आहे का ? जर तुम्हाला असे वाटत असेल की मी आयुष्यातून निघून गेल्यावर तुम्ही व्यसनमुमुक्त राहू शकाल..तर मी खरोखरच तुमच्या आयुष्यातून निघून जाईन ..तुमच्या व्यसनमुक्तीसाठी मी वाट्टेल तो त्याग करायला तयार आहे ..

    मला माहित आहे की तुम्ही रोज पिवून घरी आलात की मी कटकट करते ..आदळआपट करते ..म्हणून तुम्हाला माझा राग येतो ..पण त्यामागे तुमचा जीव सुरक्षित व्हावा हीच भावना असते माझी ..लग्न झाल्यावर अगदी सुरुवातीपासूनच मी तुमच्या पिण्याबद्दल माझी नाराजी व्यक्त करतेय हे आवडत नसेल तुम्हाला कदाचित ..परंतु आपण नेहमी आसपास होणार्या घटना वाचत असतो पाहत असतो ..त्यातून दारू एका संसाराचे कसे वाटोळे करते हे माहित असूनही तुम्ही अहंकाराने मला काही होणार नाही असेल म्हणता तेव्हा खरोखर तुमच्या बुद्धीची कीव येते मला ..वर्तमान पत्रातील व्यसनाशी संबंधित वाईट बातम्या वाचल्या की खरोखर माझ्या काळजाचा थरकाप होतो ..दारूच्या नशेत खून ..दारूच्या नशेत बलात्कार ..दारूच्या नशेत अपघात ..दारुड्या बापाचा मुलाने खून केला ..विषारी दारूने मृत्यू ..दारूमुळे कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या ..अश्या प्रकारच्या बातमीचा मथळा मला अवस्थ करतो ..तुमची काळजी वाटते सतत ..

    तुम्हाला खरे वाटणार नाही कदाचित पण तुमच्या आणि आपल्या संसाराच्या काळजीने अनेक रात्री मी जागी असते ..बाजूला तुम्ही नशेत चूर झोपलेले असताना मी जागीच आहे ..डोळ्याला डोळा नाही हे तुम्हाला कधी जाणवले नसेल ..मुले देखील हल्ली तुमच्या दारूबद्दल माझ्याकडे नाराजी व्यक्त करतात ..बाबा असे का वागतात हे विचारतात मला ? काय उत्तर देवू मी त्यांना ..किती दिवस बाबा औषध घेतात हे खोटे सांगू त्यांना ..मुले तुम्ही घरी असलात कि अत्यंत असुरक्षित असतात हे तुम्हाला जाणवत नाही का ? घरात फालतू बडबड ..शिव्या देणे ..मुलांसमोर शोभते का तुम्हाला ? माझे वागणे चुकत असेल तर तुम्ही मला तसे स्पष्ट सांगा ..मी तुम्हाला हवा तसा बदल करेन माझ्या वर्तनात ..तुम्ही कितीही भांडले माझ्याशी ..माझ्या माहेरच्या उद्धार केलात ..मला शिव्या दिल्यात ..मूर्ख ..बेअक्कल ..बावळट म्हंटले तरी चालेल ..मी सहन करीन सगळे ..मात्र तुमचे दारू पिणे माझ्या सहनशक्तीच्या बाहेर होतेय ..

    माझ्या मनात आजकाल आत्महत्येचे विचार येतात हे मी तुम्हाला प्रथमच सांगते आहे ..पराभवाची भावना मला सतत घेरून असते ..माझ्या संसाराची किती किती स्वप्ने सजवली होती मी . गरिबीत ..दारिद्र्यात देखील आनंदाने संसार करायला तयार होते ..तुम्ही अर्धपोटी ठेवले असतेत तरी चालले असते मला ..आम्हा मुलींना लहानपणापासून हे तडजोड करायला ..संसार आहे तसा स्वीकारायला शिकवले जाते ..पण तुमच्या दारूबाबत मात्र मला तडजोड करता येत नाहीय ..हा माझा पराभवच आहे ..तुमच्या व्यसनमुक्तीसाठी मी उपास केले ..नवस केले ..रोज देवाजवळ तुम्ही आणि आपला संसार सुरक्षित राहावा म्हणून मी प्रार्थना करत असते ..तुमचा देव धर्मावर विश्वास नाहीय म्हणून तुम्हाला न सांगता माझे हे उद्योग सुरु असतात ..दारूच्या नशेत तुम्ही मला अनेकदा घर सोडून कायमची निघून जा ..तोंड काळे कर ..असे म्हणत असता तुम्ही नशेत असे बोलता म्हणून मी दुर्लक्ष करते त्याकडे ..परंतु परवा पहिल्यांदाच दारू न पिता तुम्ही घटस्फोट घेईन अशी धमकी दिलीत मला ..हे माझ्या मनाला फार लागून राहिले आहे ..

    तुमच्या भल्यासाठीच मी तुम्हाला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे ...तुम्ही बरे व्हावे म्हणूनच हे चालले आहे हे तुम्हाला समजत नाहीय का ? योग्य वेळी मी येथील सरांच्या सल्ल्याने तुम्हाला घरी घेवून येईन ..मी अगदी थोडी पितो ..असे तुम्ही अनेक वर्षांपासून म्हणत आला आहात ..मात्र आता तुमचे पिणे हाताबाहेर गेलेय हे तुम्हाला वाटत नाही का ? असो ..हे पत्र वाचून तुम्हाला माझा राग येईल कदाचित ..मला क्षमा करा.

    सदैव तुमची
    अलका

    पत्र वाचताना माझा हात थरथरत होता ..डोळ्यातून अश्रू ओघळले ..!

    ( बाकी पुढील भागात )

    -- तुषार पांडुरंग नातू

    " मैत्री ' व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
    संपर्क..रवी पाध्ये - ९३७३१०६५२१ ..तुषार नातू - ९८५०३४५७८५

  • एक ऋण असेही..

    एक ऋण असेही..

    कोव्हिड १९ विरोधात झुंज देणार्‍या आपल्या दररोजच्या नायकांबद्दल कृतज्ञता आणि कौतुक व्यक्त  करण्यासाठी आज मी एक इंर्टन डॉक्टर पुढाकार घेत आहे. हे तुम्हा सर्वांसाठी ….. आपण दररोज आणि विशेषत: या साथीच्या आजारा दरम्यान देत असलेल्या त्यागांसाठी आहे. आपले समर्पण, वचनबद्धता आणि धैर्य आमच्या मनापासून कृतज्ञता आणि कौतुक करण्यास पात्र आहेत. आपण केलेली रूग्णांची सेवा असंख्य जीव वाचवित आहे आणि हजारो बदल घडवत आहे. ….

  • निरंजन – भाग १२ – क्षमाभाव

    क्षमा आपल्याला तेव्हाच मिळते, जेव्हा आपल्या मध्ये आपल्याकडून झालेल्या चुकीबद्दल पश्चातापाची भावना असते.

  • निरंजन – भाग १२ – क्षमाभाव

    क्षमा आपल्याला तेव्हाच मिळते, जेव्हा आपल्या मध्ये आपल्याकडून झालेल्या चुकीबद्दल पश्चातापाची भावना असते.

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १२

    पशुं वेत्सि चेन्मां तमेवाधिरूढः
    कलंकीति वा मूर्ध्नि धत्से तमेव |
    द्विजिह्वः पुनः सोऽपि ते कंठभूषा
    त्वदंगीकृताः शर्व सर्वेऽपि धन्याः ‖ १२ ‖

    कोणत्याही परिस्थितीत आपण माझा स्वीकार करावा. अशी जणू काही भगवान शंकरांना गळ घालताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज एका वेगळ्याच पद्धतीचा वापर करीत आहेत.
    ते म्हणतात भगवंता कदाचित आपल्याला योग्य वाटत नसेल. पण ज्या ज्या कारणांनी मी योग्य नाही असे वाटते त्या गोष्टींनाही आपण पावन करीत असता. जसे,
    पशुं वेत्सि चेन्मां- आपण मला पशु समजत असाल, अर्थात कोणत्याही प्रकारची साधना, उपासना न करणारा जड जीव समजत असाल, तर
    तमेवाधिरूढः- आपण त्यावर बसता. आपला नंदी असाच पशू नाही का?
    त्या पशूच्या उद्धार केला तसाच माझाही उद्धार करा.
    अन्य अवगुणांचेही असेच साधर्म्य दाखवतांना आचार्य श्री म्हणतात,
    कलंकीति वा - माझ्या पाप कृतींमुळे मी कलंकित आहे असे वाटत असेल तर,
    मूर्ध्नि धत्से तमेव - तसा डाग असणाऱ्या चंद्राला आपणच डोक्यावर धारण करता.
    द्विजिह्वः पुनः- माझ्या बोलण्यात आणि वागण्यात वेगळेपणा आहे म्हणून मी दुतोंड्या आहे असे आपल्याला वाटत असेल तर,
    सोऽपि ते कंठभूषा- तशा दोन जिभा असणारा नागराज आपल्या कंठाचे भूषण आहे.
    त्वदंगीकृताः
    शर्व सर्वेऽपि धन्याः - हे शर्व अर्थात शरणागतांच्या दुःखाची हिंसा करणाऱ्या हे भगवंता, तू अंगीकार केलेली प्रत्येक गोष्ट धन्य होते. अन्य समयी क्षुद्र असणाऱ्या अशा सर्व गोष्टींनाही विश्ववंद्यत्व प्राप्त होते.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १२

    पशुं वेत्सि चेन्मां तमेवाधिरूढः
    कलंकीति वा मूर्ध्नि धत्से तमेव |
    द्विजिह्वः पुनः सोऽपि ते कंठभूषा
    त्वदंगीकृताः शर्व सर्वेऽपि धन्याः ‖ १२ ‖

    कोणत्याही परिस्थितीत आपण माझा स्वीकार करावा. अशी जणू काही भगवान शंकरांना गळ घालताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज एका वेगळ्याच पद्धतीचा वापर करीत आहेत.
    ते म्हणतात भगवंता कदाचित आपल्याला योग्य वाटत नसेल. पण ज्या ज्या कारणांनी मी योग्य नाही असे वाटते त्या गोष्टींनाही आपण पावन करीत असता. जसे,
    पशुं वेत्सि चेन्मां- आपण मला पशु समजत असाल, अर्थात कोणत्याही प्रकारची साधना, उपासना न करणारा जड जीव समजत असाल, तर
    तमेवाधिरूढः- आपण त्यावर बसता. आपला नंदी असाच पशू नाही का?
    त्या पशूच्या उद्धार केला तसाच माझाही उद्धार करा.
    अन्य अवगुणांचेही असेच साधर्म्य दाखवतांना आचार्य श्री म्हणतात,
    कलंकीति वा - माझ्या पाप कृतींमुळे मी कलंकित आहे असे वाटत असेल तर,
    मूर्ध्नि धत्से तमेव - तसा डाग असणाऱ्या चंद्राला आपणच डोक्यावर धारण करता.
    द्विजिह्वः पुनः- माझ्या बोलण्यात आणि वागण्यात वेगळेपणा आहे म्हणून मी दुतोंड्या आहे असे आपल्याला वाटत असेल तर,
    सोऽपि ते कंठभूषा- तशा दोन जिभा असणारा नागराज आपल्या कंठाचे भूषण आहे.
    त्वदंगीकृताः
    शर्व सर्वेऽपि धन्याः - हे शर्व अर्थात शरणागतांच्या दुःखाची हिंसा करणाऱ्या हे भगवंता, तू अंगीकार केलेली प्रत्येक गोष्ट धन्य होते. अन्य समयी क्षुद्र असणाऱ्या अशा सर्व गोष्टींनाही विश्ववंद्यत्व प्राप्त होते.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ११

    अयं दानकालस्त्वहं दानपात्रं
    भवानेव दाता त्वदन्यं न याचे |
    भवद्भक्तिमेव स्थिरां देहि मह्यं
    कृपाशील शंभो कृतार्थोऽस्मि तस्मात् ‖ ११ ‖

    भगवंताला आपण देव म्हणतो. त्याचा शास्त्रीय अर्थ जरी दिव्यतायुक्त असा असला तरी श्रद्धावानांच्या मनातील अर्थ जो देतो तो देव असा साधा-सोपा असतो. भगवंताच्या या दातृत्वाचा विचार आचार्यश्री या श्लोकात आधारभूत मानत आहेत.
    ते म्हणतात,
    अयं दानकाल:- हा दानाचा काळ आहे. कारण आत्ता मी आपल्यासमोर याचक स्वरूपात उभा आहे. मला आत्ता आपल्या कृपेची आवश्यकता आहे. त्यामुळे कोणी मागणारा असेल, आणि त्याला ज्या वेळी आवश्यकता असेल तीच दानाची खरी वेळ. या हिशोबात ही दानाची वेळ आहे.
    त्वहं दानपात्रं- मी दानास पात्र आहे. दान नेहमी पात्र व्यक्तीलाच द्यावे. ज्याच्याजवळ एखादी गोष्ट नसते तो ती गोष्ट प्राप्त करण्यास पात्र आहे. हे भगवंता माझ्यावर आपली कृपा झालेली नाही. त्यामुळे मी कृपेला पात्र आहे.
    भवानेव दाता- आपण दाता आहात. आपल्याजवळ देण्याची क्षमता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दातृत्वाची भाव अर्थात देण्याची इच्छा देखील आहे.
    त्वदन्यं न याचे - आपल्या शिवाय अन्य कोणालाही मी मागत नाही.
    आता इतक्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या नंतर आपण मला कृपेचे दान देणार नाही तर कुणाला देणार?
    भवद्भक्तिमेव स्थिरां देहि मह्यं- मला आपली स्थिर भक्तिप्रदान करा. भगवंताच्या चरणी नेमके काय मागायचे? हेच आचार्यश्री येथे सांगत आहेत. त्या चरणाशी व्यवहारातील सामान्य गोष्टी नव्हे तर भगवंताच्या भक्तीची मागणी हीच एकमेव योग्य मागणी आहे.
    कृपाशील - हे कृपाशील अर्थात कृपा हा ज्यांचा स्वभाव आहे अशा भगवंता.
    शंभो - हे कल्याणकारका !
    आपण माझ्यावर अशी कृपा केली की,
    कृतार्थोऽस्मि तस्मात- त्यामुळे मी कृतार्थ होईल. मग माझ्या आयुष्यात करण्यासारखे काहीही उरणार नाही. माझे जीवन सफल होईल.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ११

    अयं दानकालस्त्वहं दानपात्रं
    भवानेव दाता त्वदन्यं न याचे |
    भवद्भक्तिमेव स्थिरां देहि मह्यं
    कृपाशील शंभो कृतार्थोऽस्मि तस्मात् ‖ ११ ‖

    भगवंताला आपण देव म्हणतो. त्याचा शास्त्रीय अर्थ जरी दिव्यतायुक्त असा असला तरी श्रद्धावानांच्या मनातील अर्थ जो देतो तो देव असा साधा-सोपा असतो. भगवंताच्या या दातृत्वाचा विचार आचार्यश्री या श्लोकात आधारभूत मानत आहेत.
    ते म्हणतात,
    अयं दानकाल:- हा दानाचा काळ आहे. कारण आत्ता मी आपल्यासमोर याचक स्वरूपात उभा आहे. मला आत्ता आपल्या कृपेची आवश्यकता आहे. त्यामुळे कोणी मागणारा असेल, आणि त्याला ज्या वेळी आवश्यकता असेल तीच दानाची खरी वेळ. या हिशोबात ही दानाची वेळ आहे.
    त्वहं दानपात्रं- मी दानास पात्र आहे. दान नेहमी पात्र व्यक्तीलाच द्यावे. ज्याच्याजवळ एखादी गोष्ट नसते तो ती गोष्ट प्राप्त करण्यास पात्र आहे. हे भगवंता माझ्यावर आपली कृपा झालेली नाही. त्यामुळे मी कृपेला पात्र आहे.
    भवानेव दाता- आपण दाता आहात. आपल्याजवळ देण्याची क्षमता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दातृत्वाची भाव अर्थात देण्याची इच्छा देखील आहे.
    त्वदन्यं न याचे - आपल्या शिवाय अन्य कोणालाही मी मागत नाही.
    आता इतक्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या नंतर आपण मला कृपेचे दान देणार नाही तर कुणाला देणार?
    भवद्भक्तिमेव स्थिरां देहि मह्यं- मला आपली स्थिर भक्तिप्रदान करा. भगवंताच्या चरणी नेमके काय मागायचे? हेच आचार्यश्री येथे सांगत आहेत. त्या चरणाशी व्यवहारातील सामान्य गोष्टी नव्हे तर भगवंताच्या भक्तीची मागणी हीच एकमेव योग्य मागणी आहे.
    कृपाशील - हे कृपाशील अर्थात कृपा हा ज्यांचा स्वभाव आहे अशा भगवंता.
    शंभो - हे कल्याणकारका !
    आपण माझ्यावर अशी कृपा केली की,
    कृतार्थोऽस्मि तस्मात- त्यामुळे मी कृतार्थ होईल. मग माझ्या आयुष्यात करण्यासारखे काहीही उरणार नाही. माझे जीवन सफल होईल.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड