वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
जीवनामध्ये प्रत्येक वेळी यश प्राप्त केल्यानंतर एका ठराविक पायरीवर आपल्या ज्ञानाची परीक्षा होते. आपण ज्ञान कितपत योग्य पद्धतीने आत्मसात केले, याची नियतीनुसार टप्प्याटप्प्याने पडताळणी होते. अशीच एक परीक्षा गुरुंनी आपल्या तीन शिष्यांची घेतली….

2020 आणि 2021 ही दोन वर्षे प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय ठरतील अशी वर्षे असणार आहेत.कोरोनाचे थैमान आणि त्यामुळे निर्माण झालेल्या विविध क्षेत्रातील अभूतपूर्व बदलाचे परिणाम अजून काही महिने तरी जाणतील असे चित्र आहे. समाजातील उच्च उत्पन्न गटातील व्यक्तींना याचे परिणाम फारसे जाणवले नाहीत ,परंतु मध्यमवर्गीय आणि हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य जनतेला कोणामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अशावेळी उत्पन्नाचा दुसरा स्रोत म्हणून शेअर मार्केट करू पाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.कुणी आर्थिक गरजेपोटी तर कोणी केवळ मित्र करतो म्हणून तर काही जण केवळ trend आहे म्हणून शेअर मार्केटमध्ये प्रवेश करतात. अशा वेळी योग्य मार्गदर्शन न घेतल्यामुळे किंवा अभ्यास अभावी फायद्यापेक्षा नुकसानच होण्याची शक्यता जास्त असते.
कोणतीही गोष्ट शिकण्याची एक विशिष्ट पद्धत असते, त्या पद्धतीने ती गोष्ट समजून घेऊन त्याचा व्यवस्थित अभ्यास केल्याने ती गोष्ट करण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो, गरज असते योग्य मार्गदर्शन घेण्याची! येथे योग्य हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे कारण केवळ दोन-चार युट्यूब व्हिडिओ पाहून किंवा एक दोन लेख वाचून तुम्ही लगेच ट्रेडिंग करायला लागलात तर तुमचे नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. अशावेळी शेअर मार्केट विषयी परिपूर्ण माहिती घेऊन त्याच्यातील धोके जाणून घेऊन या मार्गाचा अवलंब केल्यास इच्छित उत्पन्न मिळवता येते, अन्यथा अतिआत्मविश्वास विनाशाकडे घेऊन जातो.
तुम्हीदेखील शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर पुढील काही मुद्दे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
मित्रांनो कोणत्याही गोष्टी 2 लेवल मध्ये शिकायच्या असतात, पहिली बेसिक लेवल असते तर दुसरी आडव्हान्स किंवा एक्सपर्ट लेवल असते.त्यांना आपण टप्पे देखील म्हणू शकतो. या गोष्टी शेअर मार्केट बाबतीत देखील लागू होतात. शेअर मार्केट मध्ये प्रवेश करू इच्छिणार्या कोणत्याही व्यक्तीला सुरुवातीला शेअर मार्केट विषयी प्राथमिक माहिती घेणे अतिशय आवश्यक ठरते, ही बेसिक लेव्हल पूर्ण केल्यानंतरच तुम्ही आत्मविश्वासपूर्वक ट्रेडिंग करू शकता. बेसिक लेवल एकदा क्लियर झाल्यानंतर आणि तुम्ही ट्रेडिंग करून आल्यानंतर आपोआपच तुम्ही ऍडव्हान्स लेवल देखील पूर्ण कराल.
बेसिक गोष्टींमध्ये शेअर मार्केटची प्राथमिक ओळख, शेअर मार्केट विषयी सर्व संकल्पना, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या विविध पद्धती, प्रत्येक पद्धतीचे फायदे तोटे, तांत्रिक बाबी यांसारख्या गोष्टी तपशीलवार समजून घेणे गरजेचे असते.
शेअर मार्केटचा अभ्यास करण्यासाठी विविध स्रोत सध्या उपलब्ध आहेत, पुस्तके, ऑनलाईन कोर्स, यूट्यूब व्हिडिओ, विविध लेख, वेबसाईट अशा संमिश्र स्रोतांचा वापर बेसिक शिकण्यासाठी करणे योग्य ठरते.त्यामुळे माहितीची सत्यता देखील तपासता येते आणि शिकलेल्या संकल्पना अधिक पक्क्या होतील.
2.पेपर ट्रेडिंग अथवा सिम्युलेटर ॲपचा वापर
मित्रानो शेअर मार्केट विषयी बेसिक गोष्टी शिकल्यानंतर त्याची प्रात्यक्षिके देखील करणे गरजेचे असते,अशा वेळी प्रत्यक्ष अकाउंट काढून लगेच ट्रेडिंग करणे कदाचित नुकसानकारक ठरू शकते अशावेळी काही दिवस पेपर ट्रेडिंग करणे योग्य ठरते. म्हणजे सध्या आपण ट्रेडिंग करत आहोत असे गृहीत धरून इच्छुक शेअरची खरेदी आणि योग्य वेळी विक्री प्रत्यक्षात न करता केवळ पेपरवर करणे आणि त्याद्वारे नफ्या तोट्याचा हिशोब करणे यास पेपर ट्रेडिंग असे म्हणतात. अशा पद्धतीने थोडे दिवस प्रॅक्टीस करणे गरजेचे असते.
सध्या मार्केटमध्ये ट्रेडिंग सिम्युलेटर ॲप देखील आलेले आहेत त्याचा वापर करुन तुम्ही प्रत्यक्ष ट्रेडिंग केल्यासारखे सर्व गोष्टी करू शकता. ज्यामध्ये प्रत्यक्षात आपले पैसे इन्व्हेस्ट केलेले नसतात. उदाहरणार्थ मनी कंट्रोल ॲप.
पेपर ट्रेडिंग किंवा सिम्युलेटर ॲप्स वापरण्याचा सराव केल्यामुळे दोन फायदे होतात, एक म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले नसल्यामुळे ट्रेडिंग मध्ये तुमचे नुकसान झाले तरी प्रत्यक्षात एक रुपया देखील जात नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही पैसे गुंतवल्यास तुम्हाला कशा पद्धतीने फायदा तोटा होऊ शकेल याचा एक अंदाज तुम्हाला येतो म्हणजे जो अनुभव तुम्ही काही पैसे घालवल्यानंतर मिळवला असता तो पूर्णपणे मोफत मिळवू शकता.
अशा पद्धतीने ट्रेडिंग करण्याचा काही महिने सराव केल्यानंतर तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल तुम्हाला स्वतःच्या काही स्ट्रॅटेजी ठरवता येतील कोणत्या पद्धतीने ट्रेडिंग करावे हे ठरवता येईल. त्यासाठी या पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.
3.गुंतवणूक करावयाची रक्कम
शेअर मार्केटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तुम्ही बेसिक गोष्टी शिकून घेतल्या, काही महीने प्रात्यक्षिक देखील केले त्यानंतर मुख्य तिसरा टप्पा प्रत्यक्षात गुंतवणूक करण्याचा येतो. अशा वेळी दोन प्रश्न निर्माण होतात.
-शेअर मार्केट मध्ये किती रक्कम गुंतवावी?
-गुंतवणूक कशी असावी?
साधारणपणे शेअर मार्केट विषयी गोष्टी शिकताना तुम्ही या गोष्टी देखील समजून घेणे गरजेचे असते.कारण प्रत्यक्षात ट्रेडिंग करण्यास सुरुवात करताना वरील प्रश्न निर्माण होतात.शेअर मार्केटमध्ये किती रक्कम गुंतवावी याची काही मर्यादा नसते ते तुमच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असते आणि व्यक्तीपरत्वे ते बदलते. तुमचा दैनंदिन खर्च भागवून ,भविष्यकालीन येणाऱ्या समस्यांचा आणि गरजांचा विचार करून थोडीबहुत बँकेत शिल्लक रक्कम ठेवून उरलेल्या अतिरिक्त रकमेचा वापर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी करू शकता. उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसताना किंवा कर्ज काढून कधीही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नका. उत्पन्नाचा एक पर्यायी स्रोत म्हणून त्याच्याकडे पाहिले गेले पाहिजे.
शेअर मार्केट मध्ये किती रक्कम गुंतवावी याच्या नंतर अधिक महत्त्वाचा प्रश्न असतो ही गुंतवणूक कशी असावी ?आपल्या आर्थिक उद्दिष्टानुसार त्वरित, मध्यम व दीर्घकालीन असे परतावा देणारे तीनही पर्याय येथे उपलब्ध असतात. तुम्हाला उपलब्ध असणाऱ्या वेळेनुसार यातील योग्य पर्यायाची निवड करणे गरजेचे असते.
4.अपेक्षा कमी आणि संयम जास्त असणे गरजेचे
गुंतवणुकीच्या इतर पर्यायांपैकी सर्वोत्कृष्ट पर्याय शेअर मार्केट असला तरी याद्वारे प्रत्येक व्यक्तीला मिळणारा परतावा मात्र वेगळा असतो, कारण प्रत्येकाचे ज्ञान, ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आणि एक्सपर्ट लेवल यामध्ये फरक असतो.
त्यामुळे सुरुवातीला अपेक्षा कमी ठेवणे आणि थोडाफार संयम ठेवणे गरजेचे असते.
तुमच्या परिचित एखाद्या व्यक्तीस तुमच्या एवढीच गुंतवणूक करून कदाचित तुमच्यापेक्षा जास्त रिटर्न मिळाले असतील किंवा मिळतील, अशावेळी तुम्ही संयमी राहणे गरजेचे आहे. त्याच्याशी तुमची तुलना न करता आपण ठरवलेली एक निर्धारित रक्कम कशी मिळवता येईल हे पाहणे गरजेचे असते. त्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास करून वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून पाहणे गरजेचे असते.
शेअर मार्केटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हे चार टप्पे समजून घेतले तर गुंतवणुकीच्या इतर पर्यायांच्या तुलनेत तुम्हाला नक्कीच जास्त रिटर्न शेअर मार्केटद्वारे मिळतील.त्याकरिता सुरुवातीला संयम ठेवून आणि अपेक्षा कमी ठेवून तुम्ही काम केल्यास तुम्हाला यश नक्की मिळेल.
-- विजयकुमार काशिनाथ पाटील
हेलियमचे पाळणाघर अशी ओळख असलेला आणि पराक्रमाची गाथा सांगणारा किल्ले विजयदुर्ग पर्यटकांबरोबरच आता अभ्यासकांनाही साद घालीत आहे. जगात कुठेही हेलियम डे साजरा केला जात नाही, मात्र विजयदुर्ग किल्ल्यावर हेलियम वायूचा शोध लागल्यामुळे गेली अनेक वर्षे हेलियम डे साजरा केला जात आहे.
दिलीप सरदेसाई खऱ्या अर्थाने सुदैवी होते कारण मुंबईचे भूतपूर्व रणजी खेळाडू एम . एस. नाईक दिलीप सरदेसाई यांच्या खेळावर खूप खूश होते. त्यांनी दिलीप सरदेसाई यांना मार्गदर्शन द्यायला सुरवात केली. नाईक सरांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप सरदेसाई विविध प्रकारचे फटके मारण्याची तयारी करत होते त्याचप्रमाणे आपल्या फलंदाजीवरचे लक्ष विचलित न होण्याची देखील काळजी घेत होते. म्हणून त्यांनी जास्त गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केले नाही. तर फलंदाजीवर आपले लक्ष केंद्रित केले.
सीताफळ हे मूळचे वेस्ट इंडिज बेटे व दक्षिण अमेरिकेचे. त्यानंतर ते भारतात आले. सीताफळाचे झाड सहजच कुठेही, माळरानावर उगवते किंवा त्याची लागवडही करतात. याचे शास्त्रीय नाव Annona squamosa आहे. हे उष्णकटिबंधीय अमेरिकेच्या आणि वेस्ट इंडीजच्या काही भागांमधे आढळणारे. खरे तर याचे नांव शीतफळ. नंतर त्याचा अपभ्रंश शिताफळ व मग सीताफळ असा झाला.
शालेय जीवनामध्ये मनुष्याच्या तीन मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा आहेत असे शिकवले जायचे. आज त्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा त्याही पेक्षा अधिक खूप काही मिळवण्यासाठी मनुष्य घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे वेगवान होत आहे. त्याचबरोबर पाश्चात्य संस्कृतीचा इतका प्रभाव आजच्या पिढीवर पडला आहे की रात्रिचा दिवस करून धनवान बनण्याची स्वप्न साकारू पाहत आहे. हे सर्व करताना निसर्गाशी ताळमेळ तुटत चालला आहे याची मात्र खंत वाटते.
पाणी म्हणजे जीवन. “पानी बिना जग सुना” असेही म्हणतात. पाण्याशिवाय जगावयाची कल्पनाही पृथ्वीवरील सजीवांना सहन होणार नाही. ह्या पाण्याची अनेक रूपे आहेत. त्याचे शात्रीय विवेचन आपण करणार आहोत.
९६४-६५ मध्ये ग्रेग चॅपल यांनी सात आठवड्यामध्ये १० शतके केली. शाळेच्या एका सामन्यामध्ये त्यांनी व्दिशतक केले आणि अँशले वूडकॉक यांच्याबरोबर पहिल्या विकेटसाठी स्कॉट कॉलेज विरुद्ध ३०० धावांची भागीदारी केली.
भारतीय सिनेमाच्या क्षेत्रात इतिहास घडवणाऱ्या शोले सिनेमाला आज तब्बल ४६ वर्षे पूर्ण झाली. पण अजूनही प्रेक्षकांच्या मनावरचे या सिनेमाचे गारूड कमी झालेले नाही. काय आहे ते गारूड?
१५ ऑगस्ट १९७५ रोजी म्हणजे चाळीस वर्षांपूर्वी भारतीय चित्रपटसृष्टीत महत्त्वाचा टप्पा ठरलेला ‘शोले’ हा जी.पी. सिप्पी यांचा चित्रपट मुंबईच्या मुंबई सेंट्रल भागातील मिनव्र्हा या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपटगृहात शोले पाच वर्षे दाखवला जात होता. पन्नासच्यावर चित्रपटगृहात त्याचा रौप्यमहोत्सवही साजरा झाला. या चित्रपटाने पूर्वीचे लोकप्रियतेचे बरेच रेकॉर्ड मोडून स्वत:चा असा विक्रम प्रस्थापित केला. आजही अनेकदा शोले एखाद्या चॅनल वर चालुच असतो. आजवर आपल्या बॉलीवूड मध्ये हजारो चित्रपट झाले... पण " शोले" आजही आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहे. शोले मात्र असा आठवणीत राहिलेला पहिल्या क्रमांकाचा चित्रपट आहे.
कारण एकच त्यातील 'टिमवर्क'
शोलेएवढे प्रचंड यश आतापर्यंत एकाही हिंदी किंवा भारतातल्या प्रादेशिक भाषेतल्या चित्रपटाला मिळालेले नाही. शोलेनंतर हजारो हिंदी चित्रपटांची निर्मिती झाली. ते पडद्यावर आले आणि गेले. त्यातल्या फारच थोड्या चित्रपटांची आठवण लोकांना आहे. या चित्रपटाला एवढे प्रचंड यश मिळेल, असे दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि चित्रपटात भूमिका केलेल्या अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमामालिनी, जया बच्चन यांच्यासह अन्य कलाकारांनाही स्वप्नातही वाटले नव्हते.
दरोडेखोरांचा नायक, त्या दरोडेखोरांच्या वारंवार होणार्याक हल्ल्यांनी संत्रस्त झालेले गाव, त्या दरोडेखोरांच्या म्होरक्याला गब्बर सिंग याला एकदा तुरुंगात डांबणारा माजी पोलीस अधिकारी ठाकूर आणि या दरोडेखोरांना संपवायसाठी आलेले जय आणि विरू, हे दोन तरुण यांच्याभोवती ही कथा संघर्षासह सतत शेवटपर्यंत फिरत राहते. ज्या गब्बरने आपले हात तोडले, त्याचाच सूड ठाकूर कसा घेतो, याचे चित्रीकरण प्रेक्षकांना विलक्षण आवडले होते.
गब्बर सिंगची अमजद खानने केलेली भूमिका तर गाजलीच, पण त्याचे संवादही प्रंचड गाजले. समाजावर प्रभाव टाकणार्याक संवादाचे लेखन जावेद अख्तर आणि सलीम खान या जोडीने केले होते. ग्रामीण भागात घडणारी ही कथा शहरी भागातही लोकप्रिय झाली. शोले का चालला? हे अजूनही कळत नसल्याची कबुली रमेश सिप्पींनी दिली आहे तर या चित्रपटाच्या यशामागचे रहस्य जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांच्या कथेत दडलेले असल्याने, या चित्रपटाचे यशही त्यांनाच माहिती असावे. सगळ्यांना या चित्रपटातले नेमके काय आवडते, हे सांगणे हे खरेच खूप कठीण आहे, अशा शब्दात महानायक अमिताभ बच्चन यांनी शोलेच्या लोकप्रियतेचे रहस्य गवसत नसल्याची कबुली देऊन टाकली.
जपानी चित्रपट निर्माता अकिला कुरोसावा यांच्या सेव्हन समुराई या चित्रपटावरूनच शोले साकारला गेला. याच चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी अभिनेत्री हेमामालिनी आणि धर्मेन्दचे प्रेम बहरले आणि पुढे हे दोघे विवाहबद्ध झाले. गब्बर आणि त्याच्या डाकू सहकार्याअतले संवाद तर लाखो प्रेक्षकांना तोंडपाठ होते. अरे ओ सांबा, कितने आदमी थे? असे गब्बर आपल्या सहकार्यााला विचारतो. तो सांगतो, दो! आदमी चार और वो दो, फिर भी खाली हाथ चले आए? तेरा क्या होगा कालिया? अरे ओ सांबा, कितना इनाम रख्खा है सरकारने हमपर? हे त्याचे रांगडे संवाद प्रेक्षकांना विशेष आवडले होते.
ये दोस्ती, हम नही तोडेंगे, कोई हसीना जब रुठ जाती है तो, ही या चित्रपटातली गाणीही लोकप्रिय झाली होती. पाण्याच्या टाकीवर चढून विरूने (धर्मेंद्र)ने केलेला तमाशाही प्रेक्षकांना आवडला होता. इतना सन्नाटा क्यूँ है भाई, या चाचाचा प्रश्नर (ए. के. हंगल) प्रेक्षकांनाही सुन्न करून टाकणारा ठरला होता. शोलेच्या संवादाची एलपी निघालेली होती आणि तिचाही खप देशभरात खूपच झालेला होता. यशाचे हे शोले भारतीय चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरले आहे.
संकलन : संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
https://www.youtube.com/watch?v=0OyJgWmZH0s
१९ वर्षे हाऊसफुल्ल मनोरंजन करणारे मराठी रंगभूमीवरील नाटक "सही रे सही"
केदार शिंदे लिखित-दिग्दर्शित 'सही रे सही' नाटकाचा पहिला प्रयोग १५ ऑगस्ट २००२ ला झाला होता. अनेक विक्रम रचणाऱ्या या नाटकाची नोंद मराठी रंगभूमीवरील एक सोनेरी पान म्हणून झाली आहे. या नाटकाचे एका वर्षात ५६५ प्रयोग झाले होते. त्यासाठी त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली होती.
मधल्या काळात ते नाटक रंगभूमीपासून दूर होतं. पण, 'भरत जाधव एंटरटेनमेंट' च्या वतीनं पुन्हा सही रे सही'चे प्रयोग दणक्यात सुरू झाले. रंगमंचावर आपल्या डोळ्यांसमोर एकाच वेळी चार ठिकाणी भरत जाधव दाखवण्याची किमया नाटकानं केली. भरत जाधव या नाटकामध्ये मदन सुखात्मे, रंगा ट्रक ड्रायव्हर, गलगले आणि दामू अशा चार व्यक्तिरेखा साकारतात. या नाटकामुळे भरत जाधव हे नाव महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात पोहोचलं. ‘सही रे सही’ या नाटकाचे ‘अमे लई गया, तमे रही गया’ या नावाने गुजराती भाषेत प्रयोग झाले. त्यात शर्मन जोशीने प्रमुख भूमिका केली होती.
गुजराती ‘सही रे सही’ नाटकाचे २० महिन्यांत ३५० प्रयोग झाले होते. एखाद्या नाटकाचे इतके प्रयोग होणे, हे गुजराती रंगभूमीवर प्रथम घडले होते. ‘सही रे सही’ नाटकाचे ‘हम ले गये, तुम रह गये’ या नावाने हिंदीत भाषांतर झाले. हिंदी नाटकात जावेद जाफरीने प्रमुख भूमिका साकारली होती.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti