वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
क्रिकेट म्हटले की माणूस सगळे काही विसरून जातो. परंतु हे क्रिकेट काल कसे होते आणि आज कसे आहे हे आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सागू शकतो. परंतु एका शहराचे आणि क्रिकेटचे काय नाते आहे ह्यासाठी शोध घेण आवश्यक ठरते.
सिलसिला चित्रपटाच्या प्रदर्शनास आज यशस्वी ४० वर्षे पूर्ण होत आहेत.
१४ ऑगस्ट १९८१ रोजी हा चित्रपट प्रक्षेपित झाला. मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर ऑपेरा हाऊस होते, तेथे या चित्रपटाने रौप्यमहोत्सवी यश संपादले. या चित्रपटाचे लेखन यश चोप्रा, प्रीती बेदी, सागर सरहादी आणि रोमेश शर्मा यांचे आहे.
या चित्रपटाचे कथानक संजीवकुमार, शशी कपूर, अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि रेखा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच सुषमा सेठ, कुलभूषण खरबंदा यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटात हरिवंशराय बच्चन यांच्या 'रंग बरसे ' या काव्याचे गीत रुपांतर आहे. या चित्रपटाची गीते जावेद अख्तर, हसन कमाल आणि राजेंद्र कृष्ण यांची असून संगीत शिव हरी यांचे आहे. या चित्रपटातील देखा एक ख्वाब मै ये सिलसिले हुये, ये कहा आ गये हम, लडकी है या शोला, सर से सर के, नीला आसमा खो गया, जब तुम तोडो पिया, खुद जो वादा किया ही गाणी आजही लोकप्रिय आहेत.
या चित्रपटाचे छायाचित्रण के. जी. यांचे आहे. या चित्रपटासाठी सुरुवातीला स्मिता पाटील आणि परवीन बाबी यांची निवड करण्यात येणार होती. इतकेच नव्हे तर रेखाने साकारलेल्या 'चांदनी ' या व्यक्तिरेखेसाठी अगोदर आपणास ऑफर होती, असे पद्मिनी कोल्हापूरेने एका मुलाखतीत म्हटले होते. पण जया बच्चन आणि रेखा एकाच चित्रपटात एकत्र आल्याने या चित्रपटाची घोषणेपासूनच दणदणीत पूर्वप्रसिध्दी झाली.
संकलन : संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
अखंड भारत ही संकल्पना आहे. या संकल्पनेत भारताचे भौगोलिकदृष्ट्या एकिकरण होणे आपेक्षित आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखंड भारताचे एकत्रिकरण करणे हे एक उद्दिष्ट आहे. १४ ऑगस्ट हा दिवस अखंड भारत दिन म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे साजरा केला जातो.
प्राचीन कालापासून भारत देश हा अनेक प्रांत, राज्ये, संस्थाने, साम्राज्ये यात विभागला गेला आहे, याचे एकत्रिकरण कमीवेळा झाले. अखंड भारत या संकल्पनेत, भारत तसेच पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ व ब्रम्हदेश, अफगाणिस्तान, भूटान,हिमालय,श्रीलंका आहे. भारत हा प्रचिन देश आहे. विविधतेने नटलेल्या या देशात वेगवेगळ्या संस्कृती आणि धर्माचे लोक मिळून मिसळून राहतात. सध्या आपण जो भारत बघतो, तो प्राचिन काळी जरा वेगळा होता. म्हणजेच भारत एक विशाल देश होता.
इराणपासून इंडोनेशियापर्यंत त्याचा विस्तार होता. हिंदू धर्माचा तेव्हाच्या जागतिक राजकारणात दबदबा होता. पण काळाच्या ओघात भारताचे आणि हिंदू धर्माचे लचके तोडण्यात आले. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात तसेही एक प्रकारची सांस्कृतिक, ऐतिहासिक समानता आहे. शेकडो वर्षापूर्वी भारत देश एक महाकाय हिंदुस्थान देश म्हणून जगाला परिचित होता. इंग्रजांनी भारतावर राज्य करत असताना आपल्या सोईसाठी १८७६ ते १९४७ या ७१ वर्षाच्या कालखंडात Divide & Rule policy चा वापर करत भारताचे सात तुकडे पाडले.
भारताचा सर्वात शेवटचा तुकडा १९४७ साली इंग्रजांनी पाडत पाकिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले. त्यानंतर भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे करत आताचा बांगलादेश जन्माला घातला. १९४७ साली झालेली भारत व पाकिस्ताननची फाळणी ही मागील २५०० वर्षांतील देशाची २४ वीं फाळणी होती. ज्या राजांनी मागील २५०० हजार वर्षांत भारतावर आक्रमण केले त्यां नी अफगानिस्तान, मॅनमार, श्रीलंका, नेपाळ, तिबेत, भूटान, पाकिस्तान, मालद्वीप किंवा बांग्लादेशावर आक्रमण केल्याीचा उल्लेयख इतिहासातील कुठल्यााच ग्रंथात नाही. त्यालमुळे हे आताचे छोटे छोटे देश तेव्हा अखंड भारतात होते याला पुष्टीा मिळते.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना १४ ऑगस्ट १८६२ साली झाली. आज १४ ऑगस्टला या न्यायालयाची स्थापना झाल्याला १५७ वर्षे पूर्ण होत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या उच्च न्यायालयाची इमारत हे आपल्या मुंबईचे वैभव आहे. मुंबई, मद्रास व कोलकाता येथील उच्च न्यायालयांच्या इमारती एकाच वेळी बांधल्या गेल्या आहेत. त्या वेळी भारतामध्ये या तिन्ही शहरांच्या ठिकाणी उच्च न्यायालये सुरू करण्यासाठी इंग्लंडच्या राणीने २६ जून १८६२ साली परवानगी दिली.
भारतातील ब्रिटिश काळातील न्यायालयांचा इतिहास १६७२ पासून सुरू होतो. त्या वेळी ईस्ट इंडिया कंपनीचे मुंबईचे गव्हर्नर जेरॉल्ड ऑन्जियर होते. त्या वेळी त्यांनी मुंबईचा जो सर्वागीण आराखडा तयार केला, त्यामध्ये न्यायालयाची कल्पना मांडली. त्या वेळी त्यांनी ब्रिटिश सरकारला अशी ग्वाही दिली होती की, ‘हे न्यायालय स्वायत्त आणि पारदर्शी कारभार करणारे असेल.’ तेव्हा ८ ऑगस्ट १६७२ साली या कोर्टाच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा मोठय़ा दिमाखात पार पडला.
मिरवणुकीत हिंदू, मुस्लीम व ख्रिश्चन अशा सर्व धर्माचे लोक होते. जे.पी. व न्यायाधीश घोडय़ांवर स्वार होते, तर गव्हर्नर पालखीमधून व वकील लोक पायीपायीच या मिरवणुकीमध्ये होते. राजे दुसरे चार्ल्स यांनी ईस्ट इंडिया कंपनीला या बिगर सरकारी कोर्टाच्या स्थापनेसाठी दिलेले परवानापत्र खास गाडीतून आणले होते. नव्याने स्थापन झालेल्या या न्यायालयाचे लोकांनी चांगले स्वागत केले. त्यानंतर १६७७ साली ऑन्जियार यांची कारकीर्द संपली व त्याबरोबरच न्यायालयाचा प्रामाणिकपणा व पारदर्शी कामकाजही संपले.
या न्यायालयाचे न्यायाधीश ईस्ट इंडिया कंपनीकडून नेमले जायचे. त्यामुळे ही मंडळी प्रामाणिक नसायचीच, पण प्रशिक्षितही नसायची. त्यामुळे या न्यायालयाचे कामकाज बऱ्याच वेळा बंद पडायचे. हा सर्व प्रकार पाहून राजे पहिले जॉर्ज यांनी १७२८ मध्ये स्वतंत्रपणे पहिले ‘मेयर्स कोर्ट’ स्थापन केले. त्यानंतर राजे दुसरे जॉर्ज यांनी १७५३ साली दुसऱ्या मेयर्स कोर्टाची स्थापना केली. त्या वेळी मुंबईचा विकास जोरात होत होता व त्यामुळे सर्वच व्यापाऱ्यांना सुगीचे, भरभराटीचे दिवस आले होते. या सुमारास ईस्ट इंडिया कंपनी ही नुसती व्यापारी कंपनीच राहिली नव्हती, तर ती सत्ताधारी पण बनली होती. त्यानंतर तिसरे जॉर्ज यांनी १७९८ मध्ये मेयर्स कोर्टाऐवजी ‘रेकॉर्ड्स कोर्टा’ची स्थापना केली.
या काळात न्यायाधीशांची जागा सतत बदलत होती. त्या वेळी रेकॉर्ड्स कोर्टासाठी ‘अॅकडमिरल्टी हाऊस’ ही जागा निवडली. या वेळी कायदेतज्ज्ञ हिंदू पंडित, मुस्लीम काझी, पारसी धर्मगुरू, ख्रिश्चन धर्मगुरू हे विद्वान लोक रेकॉर्डरला मदत करीत असत. कारण त्या काळात पर्सनल लॉनुसार तंटे मिटविले जात.
या काळात न्यायदानाचा दर्जा नक्कीच उंचावला होता. या न्यायाधीशांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांची बाजू न घेण्याचे ठरविल्यामुळे म्हणजेच निष्पक्षपाती निर्णय देण्यामुळे न्यायव्यवस्था व त्या वेळचे इंग्रज सरकार यांच्यामध्ये मधूनमधून वाद निर्माण होऊ लागले. त्यानंतर मुंबई व इतर प्रांतांच्या न्यायव्यवस्थेला कामाची शिस्त लावण्यासाठी १८२४ साली चौथे जॉर्ज यांच्या परवानगीने रेकॉर्ड्स कोर्ट बरखास्त करण्यात आले व त्या जागी ‘सुप्रीम कोर्ट ऑफ बॉम्बे’ची स्थापना झाली. अशामुळे परिस्थिती सुधारली नाहीच, पण गव्हर्नर व न्यायाधीश यांचे संबंध मात्र ताणले गेले.
१८५७ च्या स्वातंत्र्य लढय़ानंतर ब्रिटिश राजवटीने ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यातील सर्व प्रांत आपल्या अधिकारात घेतले व बंगाल, मद्रास व बॉम्बे अशा तीन प्रेसिडेन्सी तयार केल्या. त्या वेळी इंडियन हायकोर्ट अॅतक्ट, १८६१ मध्ये निघून १४ ऑगस्ट १८६२ या दिवशी उच्च न्यायालय सुरू झाले.
उच्च न्यायालयाच्या स्थापनेमुळे पीनल कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड व सिव्हिल प्रोसिजर कोड यांच्या कायद्यात रूपांतर झाले. या उच्च न्यायालयात १५ न्यायाधीश नेमण्याची मुभा होती, पण प्रत्यक्षात सातच न्यायाधीश नेमले गेले होते. या उच्च न्यायालयामध्ये दाव्यांचे प्रमाण वाढले असूनसुद्धा जवळजवळ ५७ वर्षे (१८६२ ते १९१९) सातच न्यायाधीश या उच्च न्यायालयाचे सर्व कामकाज पाहत होते. ही परिस्थिती पहिल्या महायुद्धाच्या वेळी लक्षात आली, कारण त्या वेळी दाव्यांचे प्रमाण भरमसाट वाढले होते. या न्यायालयात ५०० दावे/ खटले होते, तो आकडा सात हजारांवर जाऊन पोहोचला.
या न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम १ एप्रिल १८७१ ला सुरू होऊन नोव्हेंबर १८७८ मध्ये संपले. या बांधकामाचा प्रत्यक्ष खर्च १६,४४,५२८ एवढा झाला. या मूळ इमारतीला बरीच जोडकामे झाल्यामुळे मूळ वास्तूवर खूप भार आला आहे. न्यायालयातील खटले चांगल्याच प्रमाणात वाढले असल्यामुळे गर्दीचा भार पण चांगलाच वाढला आहे. ही हेरिटेज वास्तू सुस्थितीत करण्यासाठी राज्य सरकारने २० कोटींचा निधी पुरातत्त्व क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या देखरेखीखाली मंजूर केला. विशेष म्हणजे १८७८ साली या इमारतीच्या मूळ बांधकामाला साडेसोळा लाख लागले, तर सरकारला आता फक्त नुसत्या दुरुस्तीसाठी २० कोटी रुपये मंजूर करावे लागले. अगदी सुरुवातीला या उच्च न्यायालयात सात न्यायाधीश बसत असत. त्या वेळी पहिल्या मजल्यावर एक कोर्ट रूम होती, तर दुसऱ्या मजल्यावर सहा कोर्ट रूम्स होत्या. उरलेल्या इमारतीमध्ये प्रशासकीय कार्यालये, न्यायाधीशांची दालने, वरिष्ठ वकिलांची दालने, बार असोसिएशनचे ऑफिस व ग्रंथालय असे सर्वकाही होते. ही वसाहत स्थापन झालेली उच्च न्यायालयाची इमारत हे मुंबईचे वैभव आहे.
१४ ऑगस्ट १९४७ रोजी रात्री १२ वाजता या इमारतीवर तिरंगा फडकाविला गेला. त्या वेळी ब्रिटिश सरन्यायाधीश सर लिओनार्ड स्टोन यांनी त्याच वेळी मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती एम. सी. छागला यांच्या हाती सर्व सूत्रे सोपविली. ही वेळ होती रात्री ११ वाजून ४५ मिनिटांची. तेव्हा सर्व सभागृह न्यायाधीश, बॅरिस्टर्स, वकील, न्यायालयाचे कर्मचारी आणि इतर पाहुण्यांनी भरगच्च भरून गेले होते. त्या वेळी कोर्टरूममध्ये तिरंगा फडकाविला गेला व त्याहून मोठा तिरंगा उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या सज्जामध्ये झळकला.
तेव्हा उच्च न्यायालयाच्या समोरच्या ओव्हल मैदानामध्ये जमलेल्या गर्दीचा आनंद गगनात मावत नव्हता. तेव्हा वसाहत काळात स्थापन झालेली न्याययंत्रणा गेल्या दीडशे वर्षांत भक्कम झाली आहे. सामान्य माणसाला सर्वोच्च न्यायालय पाहण्यासाठी मिळणे कठीण आहे; परंतु आपल्या मराठी राज्यात ज्या कोणी मुंबई उच्च न्यायालयाची इमारत पाहिलेली नाही, त्यांनी ही इमारत आवर्जून पाहावी.
दोन मजल्यांतील अंतर पायऱ्यांवरून चढताना चांगलीच दमछाक होते. ही इमारत म्हणजे व्हिक्टोरियन बांधकाम शैलीचा उत्तम नमुना आहे. जो कोणी प्रथमच ही इमारत पाहतो तो एकटक या इमारतीकडे पाहत असतो.
संकलन : संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
स्विगी.! झोमॅटोची प्रतिस्पर्धी कंपनी..! १४ ऑगस्ट २०१४ ला सुरु झालेली ही कंपनी. अल्पावधीतच ग्राहकांच्या लोकप्रियतेला पात्र ठरणारी कंपनी म्हणून या कंपनीची ओळख आहे. या कंपनीची स्थापना नंदन रेड्डी, राहुल जेमिनी आणि श्रीहर्ष मजेती या तिघांनी केली. यातील नंदन रेड्डी आणि श्रीहर्ष मजेती हे दोघे बिर्ला इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (बिट्स) पिलानीचे विद्यार्थी.
या दोघांनी 'बंडल' नावाची कुरिअर लॉजिस्टिक्स कंपनी सुरु केली. वर्षानंतर लोकल हॉटेल व्यावसायिकांशी जोडुन फुड ऑर्डर डिलिव्हरीची सुरुवात केली. आयआयटी खरगपूर येथे शिकणाऱ्या राहुल जेमिनी यांच्याशी या दोघांची ओळख झाली. राहुल हे 'मिंत्रा'चे संगणक अभियंता म्हणून कार्यरत असणारे व्यक्ती. असे तिघे मिळवून स्विगी चालवू लागले.
स्विगीवर बिर्याणी, बटर नान, फ्राइड राईस हे पदार्थ सर्वाधिक मागविले जातात. ५७% ऑर्डर्स वेब तर ४३% ऑर्डर्स या अॅइपच्या माध्यमातून दिल्या जातात. स्विगीच्या एका आकडेवारीनुसार ५५,०००+ हॉटेल्स, १,२०,०००+ डिलिव्हरी पार्टनर्स, ५,०००+ मनुष्यबळ कार्यरत आहेत. आज स्विगी कंपनीचे बाजारमुल्य ३.३ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतके आहे. अॅसपचे १० लाखांहून अधिक वापरकर्ते जगभरात आहेत. १५ हुन अधिक आर्थिक संस्थांनी भांडवल स्वरूपात १.३ अब्ज अमेरिकी डॉलर्स पेक्षा अधिक मदत केली आहे.
स्विगीच्या अॅीपमध्ये मुख्य गोष्टी तीन. पहिली ग्राहक, दुसरी डिलिव्हरी पार्टनर्स, तिसरी हॉटेल्स!
५००० ते ७५०० ग्राहक प्रतिदिन या अॅयपवर फुड ऑर्डर करतात. ग्राहकांना वेगवेगळे कॅशबॅक देऊन आकर्षित केले जाते. ग्राहक त्याच्या आवडीनिवडीप्रमाणे ऑर्डर करू शकतो. मेंबरशिप असणाऱ्या ग्राहकांना विशेष ऑफर्स दिल्या जातात. अॅडपवर येणाऱ्या ऑर्डर्समधून ग्राहकाचा खाण्यापिण्याचा ट्रेंड शोधला जातो. त्यानुसार पुढील वेळी त्याच्या आवडीच्या हॉटेलचे अन्नपदार्थ स्क्रीनवर दाखवले जातात. ग्राहकांकडून किरकोळ स्वरूपात डिलिव्हरी चार्जेस आणि पॅकेजिंग चार्जेस आकारले जातात. जर आपण प्रीमियम सभासद असाल तर हे चार्जेस आकारले जात नाहीत. सांगलीत जवळपास ४०० हून अधिक युवकांना येथे रोजगार मिळाला आहे. यामध्ये तरुण वर्गापासून आबालवृद्ध लोक कार्यरत आहेत.
पार्ट टाईम तसेच फुल टाईम अशा वेळेत काम करू शकता. जॉबला लागल्यानंतर सर्वसाधारणता १,००० रु. भरावे लागतात. (दोन्ही कंपनीचे नियम वेगवेगळे आहेत.) दर आठवड्याला कामाचे पैसे त्यांच्या अकाउंटवर जमा होतात. फुल टाईम काम करण्याऱ्या व्यक्तीला सरासरी रु. ८,००० ते रु. १५,००० दरम्यान पगार मिळतो. पार्ट टाईम काम करण्याऱ्या व्यक्तीला सरासरी रु. ६,००० ते रु. ११,००० दरम्यान पगार मिळतो.
ऑर्डर्स ऑनलाईन येत राहतात. त्याप्रमाणे त्या स्वीकारून हॉटेलमधून घेऊन ग्राहकापर्यंत पोहोचविल्या जातात. हॉटेल्सकडून या कंपन्या १०-२५% कमिशन चार्ज आकारतात. हॉटेल चालकांना एकसलग ऑर्डर्स मिळतात म्हणून ते देखील आनंदाने पैसे देऊ करतात.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
त्यांच्या वाढदिवशी घरी जायचो मग खूप गप्पा , खूप आठवणी ते सांगत
आज भारतीय संघ टॉप ला आहे. हा झाला वर्तमान काळ परंतु नेहमी चर्चा होत असते ती १९८३ च्या वर्ल्ड कपची . परत आपल्या संघाकडे वर्ल्ड कप येण्याची चिन्हे दिसत आहेत . १९८३ च्या वर्ल्ड कपचा कप्तान होता कपिल देव.
के. ऐन . सिग असे एकटे होते की त्या चित्रपटातील सर्व संवाद रशियन भाषेत त्यांनी स्वतःच्या आवाजात ‘ डब ‘ केले होते बाकी सर्वाना दुसऱ्यांचा आवाज दिलेला होता. के. ऐन . सिंग यांचे भेदक डोळे , त्यांची संवादफेक , खलनायकी ढंग इतका प्रसिद्ध झाला की ते कधी कुणाच्या घरी गेले तर त्याच्यासाठी पटकन दरवाजा उघडला जात नसे , कुणाकडे समारंभास गेले की त्याच्याशी आलेल्या स्त्रिया त्यांना बघून घाबरत.
शिवाजी मंदिर, मुंबई येथे पं. राम मराठे आणि डॉ. वसंतराव देशपांडे या दोन बुजुर्ग आणि घरंदाज गायक नटांच्या अदाकारीने गाजलेल्या आणि धीर धरी धीर धरी, धनसंपदा न लागे मला, गुलजार नार ही… अशा नाट्यपदांनी नटलेल्या ‘मेघमल्हार’ या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
सोशल मिडिया वर सारखे फॉरवर्ड केले जाणाऱ्या मेसेज मध्ये वरचा क्रमांक लागतो तो “गृहनिर्माण संस्थेत सदस्याच्या मृत्युनंतर हितसंबधाचे हस्तांतरण कसे करावे ” यात अनेक व्यक्ती चुकीचा सल्ला देतात. त्यांना कायद्याचे पुरेसे ज्ञान नसते आणि माहीत नाही हे सांगायला कमीपणा वाटतो. नेहमी कायदेतज्ञ यांचा सल्ला देऊन कागदपत्र केलेले कधीही चांगले. फास्ट फूडची चटक असल्याने सर्व फास्ट करण्यासाठी कायदेतज्ञ यांच्याकडे न जाता गुगलवर शोधून निर्णय घेणारे महाभाग आजही कमी नाहीत असो. आज वरील विषयावर आपणास खालील लेखात माहिती दिली आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti