वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
होमिओपॅथीमध्ये आम्लपित्तावरती, तसेच कडूपित्तावर अत्यंत गुणकारी औषधे आहेत. ‘व्यक्ती तितक्याथ प्रकृती’ या म्हणीप्रमाणे प्रत्येकामध्ये ऍसिडिटीची वेगळी लक्षणे आढळतात. काहींना ऍसिडिटीमुळे पोटात जळजळते तर काहींना छातीत जळजळते. काही व्यक्तींना मळमळते, उलटी होते तर काहींना उलट्या कधीच होत नाहीत, नुसतेच मळमळते. काही व्यक्तींची ऍसिडिटी काहीतरी खाल्ल्यावर कमी होत, तर काहींना उपाशीपोटी बरे वाटते. ऍसिडिटीमुळे काही व्यक्तींची मान दुखू लागते, पित्त डोक्या त चढत आहे असे वाटते. काहींना आंबट घशाशी येते तर काहींना कडू पित्त होते. पित्त झाल्यावर काही व्यक्तींच्या पोटात बारीक दुखते तर काहींना अगदी आग पडल्यासारखी वाटते. काही रुग्णांमध्ये ऍसिडिटीमुळे गरगरते, चक्कर आल्यासारखी वाटते. पित्त वाढल्यामुळे काही व्यक्तींचे डोके जड झाल्यासारखे वाटते, दुखते तर काहींना खूप ढेकरा येतात. अतिविचार, अतिकाळजी करणाऱ्या व्यक्तींमध्ये पित्ताचा त्रास वरचेवर होतो. या प्रत्येक लक्षणासाठी विशिष्ट, वेगळे औषध होमिओपॅथीत उपलब्ध आहे. होमिओपॅथिक औषधे ही चवीला गोड व घ्यायला अत्यंत सोपी असतात. ही औषधे उपाशीपोटी घेतली तरी चालतात. या औषधांचे कोणतेही साईड इफेक्ट स होत नाहीत.ऍसिडिटी हा असा विकार आहे, की त्याला नुसते वरवरचे उपाय करून ते बरा होत नाही, मुळापासून त्यावर उपाय करावे लागतात. कोणत्याही रोगाचे समूळ उच्चाटन करणे हे होमिओपॅथिक औषधांचे वैशिष्ट्य असल्यामुळे होमिओपॅथीमुळे ऍसिडिटी पूर्णपणे बरी होऊ शकते. सततच्या ऍसिडिटी मुळे आतड्याला जखम होऊन ‘अल्सर’ होऊ शकतो. अल्सरकडेही दुर्लक्ष केले तर पोटदुखी होऊन तो आतल्या आत फुटून सेप्टीक होऊ शकते. त्यामुळे साध्या वाटणाऱ्या ऍसिडिटीकडे वेळीच लक्ष देऊन योग्य उपचार करून घेणे हे केव्हाही हिताचे असते.
संजीव वेलणकर पुणे.
9422301733
December 24, 2016
स्वयंपाकघरात मधे वाढलेली राईस प्लेट थेट टेबलावर आणून समोर ठेवणे आणि टेबलावर ताट ठेवून एकामागून एक पदार्थ आणून वाढणे, यात फरक आहे. पदार्थ कोणत्या क्रमाने वाढले जातात, त्या क्रमालाही महत्व आहे. सुरवात लिंबू मीठाने करून शेवट वरणभातावर वाढलेल्या तुपाने करावा. तूप वाढून झाले की बसलेल्यांनी समजावे, आता वाढायला येणारी आणखी कोणी नाही. आता फक्त "हर हर महादेव" म्हणून आक्रमणाला सुरवात करायची, एवढे समजले तरी पुरे.
ताटात जसजसा एक पदार्थ येत जातो, तस तसा डोळ्यांनी म्हणजे चक्षुरेंद्रियांनी, घ्राणेंद्रियांनी म्हणजे नाकाने वास घेत त्याची वार्ता आतमधे पोहचवलेली असते. बाकी सगळे अगदी तैय्यार असतात. प्रत्येक पदार्थ वेगळा वाढल्यामुळे प्रत्येक पदार्थाचे रसग्रहण अगदी उत्तम करता येते.
मीठ वाढताना त्याची सूक्ष्म चव आपण अनुभवतो, लिंबू वाढताना, त्याच्या रसाचा फवारा आपल्या तोंडात उडायला सुरवात होते, पापड वाढताना त्याचा कुर्रकुर्र आवाज कानात नाद निर्माण करतो. भजी आल्यावर त्याचा खमंग वास चोंदलेलं नाक सैल करून टाकतो. लालबुंद रस्सा डोळ्यांनी बघताक्षणी पोटात भूक चाळवायला सुरवात झाली नाही, तरच नवल.
(काहीजण एवढे चाळवतात, की वाढला पापड झाला गट्टम, कोशिंबीर पुढच्या पानात वाढायच्या अगोदर ही संपली सुद्धा. वाढली भाजी खाऊन टाकली. याला पंगत म्हणत नाही. त्याचेही काही भारतीय नियम असतात, तेही "मॅनर्स" पाळलेच पाहिजेत. थोडा संयम हा हवाच. तरच "सहना ववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यम्, यातील सह ला महत्व आहे. ) असो.
तळलेला किंवा भाजलेला कुरकुरीत पापड त्याच्या आवाजाने, पुरणपोळी आपल्या स्पर्शाने, भजी आपल्या वासाने, चटणी आपल्या चवीने, आणि सुंदर रंगसंगतीने, असं छान वाढलेलं, पदार्थांनी भरलेलं ताट, बघताक्षणी डोळ्यांचेही पारणे फिटते. म्हणजे डोळ्यांनी ते पचवायला सुरवात केलेली असते.
शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या तन्मात्रा या परिपूर्ण आहारात एकवटलेल्या असतात. केवळ कॅलरीज मोजून जेवणे, वजनी प्रमाणात जेवणे, याला चौरस आहार म्हणता येईल का, विचार करून पहावे.
एकापेक्षा एक उत्तम पदार्थांचे एकमेकांमधे एकत्र झालेले वास. आणि आग्रह करून, प्रेमाने वाढणाऱ्यांचा सहवास यामुळे अग्निवृद्धी आपोआपच होत जाते. कधी एकदा ताटातले हे उत्तम पदार्थ पोटात जातात असे होऊन जाते.
हे सर्व मीच अगोदर अनुभवणार अशी जणु काही स्पर्धाच लागते सगळ्या इंद्रियामधे.
जो जे वांछील तो ते लाहो, अशी अनुभुति इंद्रिये घेत असतात, तो आनंद शब्दात वर्णन करणं अशक्यच आहे. याचा दृष्य परिणाम म्हणून हर हर महादेव चा गजर होण्याअगोदरचा कल्ला, पुढील पाच मिनिटांसाठी पूर्ण बंद झालेला असतो. निमूटपणे सर्वजण आतील प्रज्वलीत अग्निनारायणाला एकेका पदार्थाची आहुती देत असतात.
पंचहाभूतात्मक आहार, पंचमहाभूतात्मक शरीरासाठी, पंचमहाभूतांच्या तन्मात्रांसह...
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
18.03.2017
March 18, 2017
गॅसनामा
गॅस झालाय. आता काय करावे ? अनेक जणांनी हाच प्रश्न विचारलाय. आधीच्या सर्व टीप नीट वाचल्या असतील तर याचा खुलासा सहज होतोय. तरी सुद्धा परत सांगतो.
गॅस होण्यासाठी काही तरी कुजणे आवश्यक आहे. काही तरी कुजल्याशिवाय गॅस तयारच होणार नाही. पोटात गॅस होतोय म्हणजे या ब्रह्मांडात कुठेतरी घोटाळा नक्कीच असणार. ( आमच्या वैद्य नानांचा हा आवडता शब्द, ब्रह्मांड ! )
या आतड्याच्या आत काय कुजणार ? आपण जे काही खातो पितो तेच ना ! जर ते पुढे सरकले नाही, जिथे आहे तिथेच साठून राहिले की गॅस बनायला सुरवात होते. अन्न पुढे पुढे सरकत असले की गडबड नसते. पाणी पुढे सरकत असले की शेवाळ धरत नाही. अडकले की शेवाळ धरायला, बुळबुळीतपणा वाढायला सुरवात होते.
लोकलच्या तिकिटाची रांग ( मराठीत लाईन लाईन ! ) व्यवस्थित पुढे जात असेल तर आरडाओरडा नसतो. जरा कोणाकडे सुटे पैसे नसले, आणि रांगेची हालचाल जरा थांबली की बोंबाबोंब सुरू झालीच म्हणून समजा !
जीवनाला गती हवी, थांबला तो संपला.....
याच न्यायाने खाल्लेल्या अन्नाला पण गती हवीच. अन्नाचा रस जिथे थांबेल तिथे अन्न चिकटून बसते. तिथेच जास्ती वेळ अडकले की कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. पहिले चिकटलेले असेल त्याला मागून येणारे अन्न चिकटते, आणि मागे रांग वाढत जाते. थरावर थर वाढतो. गॅस होत रहातो.
चिकटवण्याची प्रक्रिया पाणी करते आणि तेल या चिकटवण्याच्या बरोब्बर विरोधी गुणाचे आहे.
कणिक मळल्यानंतर हाताला चिकटते, कशाने काढली जाते ? तेलाने.
फणसाचा डिंक हाताला चिकटला तर तो सोडवण्यासाठी फक्त तेलाचा एक थेंब पुरतो.
ग्रीस डांबरासारखे चिक्कट पदार्थ हाताला चिकटले तरीसुद्धा खनिजतेल म्हणजे राॅकेलच मदतीला येते. याचा अर्थ चिकटपणा सोडवण्यासाठी तेल मदत करते.
जसं बाहेर तसंच आतमधे देखील! पोटाला आतड्यांना चिकटून बसलेला चिकट आम सोडवून बाहेर काढण्यासाठी तेलच मदत करते. म्हणून जेवणात तेल वापरावे. वरून कच्चे वापरले तर अधिक फायदेशीर. म्हणजे तयार झालेला आम चिकटत नाही. आणि वायुची निर्मिती अगदी "न" के बराबर !
गॅस वाढवायला पाणी पण मदत करते. म्हणून पाणी देखील गरजेनुसारच प्यावे. नियम करून अमुक लीटर पिऊ नये. पाणी जेवता जेवता प्यावे. अगोदर किंवा नंतर शक्यतो नको.
तहान लागेल तेव्हाच पाणी पिणे, जेव्हा एक नंबर दोन नंबर काॅल येईल तेव्हा, टाळाटाळ न करता, लगेचच जाऊन येणे, भूक असेल तेव्हा जेवणे, जेवणात सहा चवींचा वापर करणे या छोट्या छोट्या गोष्टी दररोज केल्या तर गॅस होणारच नाही.
गॅस होऊ नये म्हणून जेवणाची वेळ बदलावीच लागेल. सूर्यास्त होईपर्यंत खावे. त्यानंतर लगेचच आपली सायंपूजा आणि नैवेद्य! रात्रीचा नैवेद्य हा अगदी अल्प असतो, हे ध्यानात ठेवावे.
गॅस होऊ नये यासाठी म्हणजे अन्नपचन नीट व्हावे यासाठी जे करायचे तेच गॅस झाल्यानंतर देखील करायचे असते.
( या विषयावर गेल्या वर्षी याच दिवसात सविस्तर लेखमाला आलेली होती. )
हे करायचे नसेल तर नियमितपणे व्यायाम करावा. व्यायाम पोट हलेल, चिरडेल, असा असावा. उगाच चालण्याचा देखावा नसावा. यासाठी सूर्यनमस्कार आठवावा. नाहीतर देह जमिनीवर गडाबडा फिरवावा. लोटांगणे घालावीत. आतमधे चिकटलेले आम आदि सोडवून घ्यावे.
"हे काही आम्हाला जमणारच नाही", अशी मनोभूमिका असणाऱ्या मंडळींनी, गॅस होऊ नये याकरीता जवळपास असणाऱ्या वैद्यांचे पत्ते शोधून ठेवावेत. ते वैद्य पंचकर्म आदि उपचार, जे जे सांगतील ते अगदी मनोभावे करावेत.
अन्यथा नंतर कधीतरी जिथे जावे लागणारच आहे, अशा आपल्याला आवडेल तशा, मल्टी सुपर स्पेशालीटी हाॅस्पीटल मधली एखादी रूम आधीच बुक करून ठेवावी. पै पै मिळवलेली सर्व स्वकष्टार्जित मिळकत, दहा पंधरा दिवसात त्यांच्या खात्यात खात्यान्तरीत करावी. हल्ली मोबाईल वर सुद्धा अॅप आहेतच. बॅकेत जायचे सुद्धा कष्ट नाहीत.
कष्टाविना काही नाही,
आमाविना गॅस नाही,
केल्याविना साध्य नाही,
आधी केलेची पाहिजे ।।
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
05.04.2017
April 5, 2017
पाणी जीवनामृत आहे. वनस्पती आणि प्राण्यांच्या शरीरक्रिया पाण्यामुळेच शक्य होतात. मनुष्याच्या आणि काही प्राण्यांच्या शरीरात ७० टक्के पाणी असते. टोमॅटो, कलिंगड या पिकात तर त्याहून जास्त पाणी असते. ताण बसून कोमेजणाऱ्या झाडांना पाणी दिले की, ते तरारते. म्हणूनच म्हणतात, ‘ए फर्टाइल लॅण्ड विदाऊट वॉटर इज देझर्ट.
July 15, 2023
परंपरेने गणेशाचं हे लोकप्रिय सगुणस्वरूप फार श्रद्धेनं जपलेलं आहे. असं असलं तरी गणपतीपूजनाला खरा राजाश्रय लाभला, तो पेशवे अधिकारपदावर आल्यावर. पेशवे गाणपत्य असल्याने त्यांनी आणि त्यांच्या सरदारांनी गावोगाव असलेल्या गणपतीच्या देवळांचं वैभव वृद्धिंगत केलं. अष्टविनायकांच्या स्थानांना प्रतिष्ठा आली. असंच एक पुरातन स्थान आहे कर्जत तालुक्यातल्या ‘कडाव’ला. इथल्या बालदिगंबर गणेशाचे देऊळ फार प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे.
September 9, 2019
चष्मा ही आजच्या युगातील अनेकांची एक अत्यंत गरजेची वस्तू ठरली आहे. फक्त प्रौढांच्याच नव्हे, तर अनेक तरुणांच्याही ! दृष्टिदोषावर मात करणाऱ्या या अतिशय उपयुक्त साधनालाही स्वतःचा इतिहास आहे. या इतिहासातल्या विविध टप्प्यांचा आढावा घेणारा हा लेख…
February 2, 2024
मराठीतून बोलणं मागासलेपणाचं लक्षण आहे असं आपण मराठी माणसांनीच ठरवून टाकलंय त्यामुळे, ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…’ या ओळीला एक सुंदर ओळ या पलीकडे काहीच अर्थ उरत नाही. या ओळीत अर्थ भरणं सर्वस्वी आपल्या हातात आहे.
February 27, 2016
कायदा काही करणार नाही, कायदा काही करू शकत नाही, कारण कायदा राबविणारी व्यवस्थाच पंगू आहे, गुलाम आहे. त्यामुळे लोकांनीच आता स्वयंस्फूर्तपणे काही करणे गरजेचे आहे. बहिष्कार हे एक मोठे अस्त्र आहे, ते अहिंसक तर आहेच शिवाय अतिशय प्रभावी आहे. दूध माफियांना धडा शिकवायचा असेल तर लोकांनी दुधावरच बहिष्कार टाकायला हवा.
March 27, 2011
एका विज्ञानकथेत कथालेखकाने अशी कल्पना मांडली होती की, एक दिवस वाढत्या प्रदूषणामुळे मानवाचे पृथ्वीवर म्हणजेच जमिनीवर राहणे अशक्य होईल आणि संपूर्ण मानवी वस्ती पृथ्वीच्या पोटात स्थलांतरित होईल. पृथ्वीच्या पोटात 10 ते 20 फूट खाली जाऊन वस्ती करून राहणे माणसाला भाग पडेल. वातावरणात संरक्षक आवरण म्हणून काम करणाऱ्या ओझोन वायूचा स्तर फाटल्यामुळे सूर्याची अतिनील (अल्ट्राॅ व्हायोलेट) किरणे सरळ पृथ्वीवर येतील, या किरणांचा सामना करणे तसेच वाढत्या तापमानाशी जुळवून घेणे शक्य न झाल्यानेच मानवाला पृथ्वीच्या पोटात आसरा घ्यावा लागेल.
July 24, 2005
आरोग्य मिळवण्यासाठी माझं नेमकं काय चुकतंय ? मी पाश्चिमात्य विचारांच्या प्रभावाखाली कसा कधी आलो, आणि जे मूलतः भारतीय नाही, पण ज्याचा संबंध थेट आपल्या आरोग्याशी आहे, अशा अनेक गोष्टींना मी माझ्या रोजच्या जीवनात कसं सामावून घेतलंय,
हे माझं मलाच विसरायला झालंय. त्याची आठवण करून देण्यासाठी हा लेखन प्रपंच.
February 1, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti