वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
कालाम्बुदालिललितोरसि कैटभारे-र्धाराधरे स्फुरति या तडिदंगनेव्।
मातु: समस्त जगतां महनीय मूर्ति
भद्राणि मे दिशतु भार्गवनन्दनाया:।।६।।
कालाम्बुदालिललितोरसि कैटभारे- अंबु म्हणजे पाणी. ते देणारा तो अंबुद म्हणजे ढग. ढगांचा खरा काळ पावसाळा. त्या काळातील ढग काळेशार असतात. त्यांची अली म्हणजे रांग. एकामागोमाग एक आल्यामुळे विशाल समूह वाटणाऱ्या आणि अत्यंत काळेशार दिसणाऱ्या.
कैटभारे:- कैटभ नावाच्या राक्षसाचे अरि म्हणजे शत्रू अर्थात भगवान श्रीविष्णु, त्यांच्या उरसि म्हणजे छातीवर.
धाराधरे स्फुरति या तडिदङगनेव्- धारा म्हणजे जलधारांना धारण करणारा म्हणजे मेघ. यावर तडीत अंगणा म्हणजे मेघाची विद्युत रूपी पत्नी. इव स्फुरति- ज्याप्रमाणे चकाकणारी, सौंदर्यपूर्ण दिसणारी.
एकत्रित पाहता, मेघावर चमकणाऱ्या विजेप्रमाणे भगवान श्री विष्णूंच्या काळ्याशार वक्षस्थलावर मस्तक ठेवल्यावर अधिकच सौंदर्यपूर्ण दिसणारी.
हे सौंदर्य पहायचे असेल तर एखाद्या सोनाराच्या दुकानात जावे. तेथे असलेल्या कसोटीच्या दगडावर उमटलेली सोन्याची रेघ आई लक्ष्मीचे स्वरूप असते. कसोटीचा दगड शाळीग्राम असतो . अर्थात भगवान विष्णू.
मातु: समस्त जगतां - सगळ्या जगाची आई असणाऱ्या महालक्ष्मीची,
महनीय मूर्ति- अत्यंत श्रेष्ठ अशी मूर्ती म्हणजे प्रगट झालेली दृष्टी, भार्गवनन्दनाया:- महर्षी भृगु आणि त्यांची पत्नी दक्षकन्या ख्याती यांच्या तपश्चर्येने देवी लक्ष्मीने त्यांच्या आश्रमात अवतार धारण केला. त्या संदर्भाने भार्गव कुळाला आनंद प्रदान करणारी दृष्टी,
भद्राणि मे दिशतु - मला कल्याणकारक बाबी प्रदान करो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
March 15, 2020
चित्रपटात रंगभुषाकार (अमोल कोल्हे) कांबळी केशवची कला ओळखत निर्मात्यांशी बोलून अनेक नाटकांमध्ये त्याला भूमिका मिळवून देण्यापासून ते स्वत:च्या घरात रहाण्याची सोय करण्यापर्यंत सर्वतोपरीने मदत करतात. केशवची भूमिका असणार्या नाटकांना ज्यावेळी प्रेषकांकडून दाद मिळू लागते व तो लोकप्रिय नायक म्हणून प्रेषकांसमोर येतो, त्यावेळी सहाजिकच रूपेरी पडद्यावर देखील नायक म्हणून ऑफर्स मिळतात
December 31, 2013
स्वामी विवेकानंद म्हणतात- प्रार्थनेपेक्षा खेळ तुम्हाला देवाच्या जास्त जवळ घेऊन जाऊ शकतो. कारण प्रार्थनेमध्ये तुमचा संपूर्ण सहभाग असेलच असे नाही परंतु खेळात तो असतोच. वरील संदर्भ लक्षात घेता येथे नमूद करू वाटते की व्यक्तिमत्व विकासामध्ये बुद्धिबळाचा सिंहाचा वाटा आहे. आणि त्यामुळेच व्यक्तिमत्व विकास करण्याकरिता बुद्धिबळ हा खेळ आत्मसात करावा, जोपासावा, व्यासंग धरावा व त्याचे अनुसरण करावे.
April 4, 2022
दादासाहेब रेगे हे व्यक्तिमत्त्व काय होतं, आणि त्यांच्या बालमोहनने आपल्या बाळांना काय दिलं, हे प्रत्येकजण सांगू लागला असता, तर एक सप्ताहच आयोजित करावा लागला असता. आपण एका मराठी शाळेत शिकलो, याचा सार्थ अभिमान, उपस्थित प्रत्येक कीर्तिवंताच्या बोलण्यातून डोकावत होता.
June 17, 2022
कुटुंबाचे हे वास्तव आजकाल दिसून येते. आपल्याला गरज आहे ती आपल्या परिवारतील सदस्यांना समजून घेण्याची त्यांना मोठ्यांकडून मिळत असलेल्या मार्गदर्शनाची, प्रेमाची आणि एकत्र राहण्याची.
May 1, 2024
घरामध्ये लग्न,मुंज असो किंवा वास्तुशांत वा धार्मिक कार्य असो. घराच्या दरवाज्याला तोरण बांधण्याचा कुळाचार पूर्वीपासून चालत आला आहे.
एका सुतळीला सोनेरी नक्षीचे पताका सारखे कागद लावून त्याच्या मध्यभागी सोनेरी कागद चिटकवलेला नारळ असतो यालाच तोरण असे म्हणतात. आंब्याच्या डहाळ्यांचे किंवा पानाफुलांचेही तोरण शुभ म्हणून समजले जाते.
दरवाज्याला तोरण बांधल्याने दृष्ट प्रवृत्तीचा वावर घरात होऊ शकत नाही. उलटपक्षी धार्मिक कार्ये यशस्विरीत्या पार पाडली जातात.
आजकाल गणपतीच्या मंदीरात नारळाचे तोरण बांधल्यास गणपती नवसाला पावतो अशी श्रध्दा रुढ झाली आहे. नवर्यामुलाला व मुलीला त्यांच्या विवाह प्रसंगी बाशिंग बांधले जाते हे सुध्दा एक प्रकारचे तोरण असून त्यामुळे त्या दोघांना कुणाचीही दृष्ट लागत नाही अथवा बाधा येत नाही.
तारण या शब्दाचा अपभ्रंश तोरण झाला असून तारण म्हणजे संकटापासून तारणे असा अर्थ गृहीत धरला जातो.
January 16, 2016
योगा व प्राणायाम न करण्यासाठी दिली जाणारी कारणं.......
1) जॉब हेक्टिक आहे
( कुणाचा नसतो ?)
2) वेळच मिळत नाही
( सर्वांनाच 24 तास मिळतात !)
3) खूप काम असते
( रिकामटेकडा कोण असतो ?)
4) अभ्यास खूप असतो कॉलेजात
( काय दिवे लावणार आहात ?)
5) घरी जाऊन पण काम असते
( आम्ही पण कामं करतो !)
6) लग्न झालं आता
( मग काय नाचू ? सर्वांचीच होतात !)
7) मुलांच्या मागे धावण्यात वेळ जातो
( तेवढा योगा - प्राणायाम, व्यायाम पुरेसा वाटतो का ?)
8) आता कोण बघतंय आमच्याकडे ?
( मग घराबाहेर पडूच नका !)
9) मला गरजच नाही योगा-प्रणायाम, व्यायामाची
( सर्वात मोठा गैरसमज ...)
10) हे जिम , व्यायाम योगा-प्रणायाम मोठ्या लोकांची थेरं आहेत
( स्वतःला कमी समजायचंच कशाला ?)
11) योगा प्राणायाम क्लास ची फी परवडत नाही
( घरी करायला किती पैसे लागतात ?)
12) खूप ठरवतो , पण काही ना काही आडवं येतं
( अर्धा एक तास काढता येत नाही स्वतःसाठी ?)
13) घरी आल्यावर आराम करायचा की योगा-प्रणायाम करत बसायचं ?
( एक सिरीयल कमी पाहिलीत तर लगेच जीव जाईल का ?)
हुश्श !!!
यापेक्षा मोठी लिस्ट होईल.
मित्रांनो , कारणं खूप देता येतील. पण आज स्वतःमध्ये गुंतवणूक कराल तर पुढचं आयुष्य निरोगी जगाल. नंतर हा पैसा , मालमत्ता , हुशारी , कशाचाच उपयोग होणार नाहीय. तंदुरुस्त शरीर हीच सर्वात मोठि मालमत्ता आहे तेव्हा आतापासूनच स्वतःची काळजी घ्या.
April 7, 2017
आयुर्वेदाच्या क्षेत्रात अतिशय प्रसिद्ध असलेला शब्द म्हणजे ‘इंटिग्रेटेड प्रॅक्टिस’. शब्दकोषानुसार या शब्दाचा अर्थ एकात्मिक असा असला तरी आयुर्वेदात मात्र हा शब्द वेगळ्या अर्थाने पाहिला जातो. इंटिग्रेटेड म्हणजे आयुर्वेदाची पदवी घेऊन आधुनिक शास्त्राचे उपचार देणे वा त्यांची सरमिसळ करणे. आयुर्वेदाची विद्यमान शिक्षणपद्धती आणि धोरणे ठरवणाऱ्या शीर्ष परिषदेची उदासिनता यामुळे सध्याचा आयुर्वेदाचा विद्यार्थी ग्रंथांपासून दूर आणि औषधी विक्रेत्यांच्या जवळ कसा जाईल याची पुरेपूर काळजी घेतली जात असल्याने असे विचार बऱ्याचदा वाढीला लागतात.
ज्या दोन शास्त्रांचे मूलभूत सिद्धांतच न जुळणारे आहेत त्यांना इंटिग्रेट करण्याचा विचार करणं म्हणजे तेलात पाणी ओतून ‘एकजीव मिश्रण’ तयार केल्याचा दावा करणे होय. या दोन्ही गोष्टी एकत्र मिसळू शकतील का? नाही. आहारापासून विचारापर्यंत कोणतीच गोष्ट जुळत नाही; किंबहुना अगदी विरुद्ध टोकाची आहे अशा व्यक्तींची लग्न जुळवण्याचा अट्टाहास हा सप्तपदीपासूनच घटस्फोटाच्या दिशेने पावले टाकणारा असतो. त्याचप्रमाणे आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकाचे आहे. आयुर्वेदाचा अवघा डोलारा ज्या दोष- धातू- मल आदि संकल्पनांवर आधारित आहे त्यांनाच आधुनिक शास्त्र मानत नाही. पुढे बोलण्याचा प्रश्नच येतो कुठे?! याकरताच MBBS नंतर MD/MS (Ayurved) करायला देण्याच्या आत्मघातकी निर्णयावरील चर्चेला आम्ही वैद्यांनी विरोध दर्शवला होता.ज्यांना आयुर्वेद शिकायचा आहे त्यांनी BAMS करूनच तो शिकावा हे स्वच्छ गणित आहे. काहीजण मात्र उफराटे कारभार करत आयुर्वेदानुसार निदान आणि आधुनिक चिकित्सा वा आधुनिक शास्त्रानुसार निदान आणि आयुर्वेदीय चिकित्सा असे विचार करत असतात. काहीजण तर त्यापलिकडे जाऊन आधुनिक औषधे आयुर्वेदाच्या सिद्धांतानुसार कशी कार्य करतात हे ‘ओढून ताणून बसवून’ सांगत असतात. मात्र त्याच वेळेला आयुर्वेदानुसार ही औषधें कोणत्या ‘भैषज्यकल्पनेत’ बसतील यावर मात्र गुळणी धरून (बिटाडीनची?!) गप बसतात.
आयुर्वेदाला कोणाहीसमोर स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. आचार्य चरकांच्या शब्दांत हे शास्त्र ‘शाश्वत’ आहे. पण मग आयुर्वेद स्वतःला फारच ग्रेट समजतो किंवा आयुर्वेदाचे आधुनिक विज्ञानाशी वावडे आहे का; तर मुळीच नाही. आयुर्वेदाला व्यक्त होण्यास आधुनिक वैद्यकाच्या कुबड्यांची गरज नाही इतकेच आमचे मत आहे. पण मग आयुर्वेदीय वैद्यांना तपासणीची प्रयोगशालेय साधने का लागतात? असा प्रश्न कित्येकजण उपस्थित करत असतात. मुळात हा प्रश्नच फसवा आहे. स्टेथोस्कोपपासून ते एमआरआय पर्यंतचे सगळे शोध हे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी इत्यादि मूलभूत शास्त्रीय शाखांचे आहेत; आधुनिक वैद्यकाचे नाहीत!! त्यामुळे वैद्यांनी त्यांचा गरज पडेल तेथे वापर करण्यास काहीच प्रत्यवाय नाही. मात्र पुन्हा हा वापर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हवा. ही परीक्षणे आयुर्वेदानुसार प्रत्यक्ष प्रमाणे आहेत. त्यापुढील अनुमान, युक्ति आदि प्रमाणे वापरताना आणि निदान-उपचार ठरवताना ते आयुर्वेदाच्या संकल्पना वा सिद्धांतांनुसार असायला हवे. याला खऱ्या अर्थाने ‘इंटिग्रेटेड’ म्हणता येईल. वैद्यांनी आधुनिक वैद्यकाच्या ओंजळीने पाणी पिणे बंद करावे असे मला तरी वाटते. काही घ्यायचेच असेल तर आपले शास्त्र सार्वभौम करण्याची आधुनिक वैद्यकाच्या पदवीधरांची वृत्ती आणि त्यासाठी अहोरात्र मेहनत घेण्याची तयारी हे गुण घ्यावेत. त्यातच शास्त्राचे खरे ‘उपबृंहण’ करण्याची क्षमता आहे.
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
January 19, 2017
अभय गुजर गगनचुंबी इमारतींतील ‘अग्नी सुरक्षा’ ही नेहमीच चिंतेची बाब असते. नुकत्याच लागलेल्या ‘लोटस बिझनेस पार्क’मधील आगीच्या तांडवात ही बाब प्रकर्षाने ऐरणीवर आली आहे. अग्निशमन यंत्रणांच्या नियमांच्या अंमलबजावणीतील पळवाटा शोधण्याच्या वृत्तीमुळे अशा इमारतींत वावरणाऱ्या माणसांना धोका निर्माण झाला आहे. याच अनुषंगाने या ‘आधुनिक लाक्षागृहां’चा घेतलेला हा जळजळीत लेखाजोखा…
January 24, 2024
५ पॅरा कमांडोंनी मध्यरात्री १२ ते पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान केलेल्या या धाडसी कारवाईत, तब्बल ४० ते ५० दहशतवाद्यांचा निप्पात केला होता.
September 29, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti