वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
हे नाटक माहिती नसलेला मराठी रसिक विरळाच. आपल्या लिखाणाने आणि नाटकांनी रसिकांच्या मनावर अनेक दशके अधिराज्य गाजवणारे साहित्यिक, संगीतकार, अभिनेते, विज्ञानप्रेमी असे बहुरूपी व्यक्तीमत्त्व म्हणजे पु.ल.देशपांडे.यांनी लिहिलेले ‘वाऱ्यावरची वरात’ हे नाटक.
जॉर्ज गिफन यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध मेलबोर्न येथे 31 डिसेंबर 1882 रोजी खेळला .
पुरातन काळातील कथा आपल्याला हेच शिकवतात की जितके आपण शांत, प्रेमळ राहू तितके लोकांचे आवडते आणि जितके अहंकारी, तापट स्वभाव तितकेच लोकांचे नावडते. आज आपल्यासमोर जे आदर्श व्यक्ति आहेत त्यांच्या जीवनामध्ये संतुलन दिसून येते स्वतःवर नियंत्रण ठेवणारा व्यक्तीच दुस-यांना नियंत्रित करू शकतो. आपले मात्र संपूर्ण जीवन दुसयाला नियंत्रण करण्यामध्ये व्यतीत होते.
मदनलाल याने त्याचा पहिला कसोटी सामना 6 जून 1974 मध्ये इंग्लंडविरुद्ध मॅचेस्टर येथे खेळला होता. ह्या सामन्यात त्याने 31 षटकात 56 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर तो 1977-78 पर्यंत म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या टूरपर्यंत भारतीय संघाचा भाग होता.
त्याने ६६ फर्स्ट क्लास सामन्यामध्ये ३२६१ धावा केल्या त्यामध्ये त्याने २ शतके आणि २४ अर्धशतके केली. त्याची सर्वोच्च धावसंख्या होती १२८ धावा.
३ मे १९५९ पासून मराठी भाषिक प्रदेशात साराबंदीचा प्रचार करण्यात आला. सीमा भागातील १५० गावात साराबंदीचे आंदोलन सुरू करण्याचे ठरविण्यात आले. परंतु हे आंदोलन करतांना दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले. साराबंदी आंदोलन करताना मराठी व कानडी भाषिकांत संघर्ष होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी व साराबंदीचा निर्णय गावच्या जनतेने स्वयंस्फुर्तीने घ्यावा, असे ते दोन निर्णय होते. त्याला लोकांचा प्रतिसादही मिळाला.
एकीकडे लोक पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसरात्र एक करतात. अशीच काहीशी जिद्द उरी बाळगून सोलापुरातील एका महिलेनं भाकरी बनवण्याच्या उद्योगातून मोठी भरारी घेतली आहे. तसचं अस्सल महाराष्ट्राचं धान्य असलेल्या ज्वारीला लौकिक प्राप्त करून दिलं आहे. पाहुयात या महिला उद्योजिकेची यशस्वी भरारी.
मुंबईमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामना ब्रेबॉर्न स्टेडियम मध्ये सुरु होता . ऑस्ट्रलियन संघामध्ये अॅलन डेव्हिड्सन , रे लिंडवॉल ,रिची बेनॉ सारखे जबरदस्त खेळाडू होते. अब्बास अली बेग त्यांचा जुना साथीदार नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्याबरोबर खेळण्यास आले तेव्हा दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी १३३ धावा केल्या त्यामध्येअब्बास अली बेग यांच्या ५० धावा होत्या.
१९६८ मध्ये परत तो अँशेस साठी परत सिलेक्ट झाला तो इंग्लंडच्या संघाविरुद्ध त्यावेळी ऑस्ट्रेलिया इंग्लंडच्या टूरवर गेली होते तेथे त्याने ३४.६६ च्या सरासरीने १२ विकेट्स घेतल्या. १९६९-७०मध्ये त्याच्या हाताची किंमत इतकी वाढली की त्याचा हाताचा १०, ००० ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा विमा काढण्यात आला.
हिंदू धर्मामध्ये ईश्वराची पूजा-अर्चना करणाऱ्या अनेक पद्धती आपण बघतो. खूप भक्ती-भावनेने त्या केल्या जातात. त्यातलीच एक पद्धत म्हणजे पंचामृताने ईश्वराला स्नान घालणे. दूध, दही, तूप, मध, साखर ह्या सर्वांनी त्याला स्नान घातले जाते व त्याचबरोबर आपली भावना अर्पित केली जाते. ह्या भावनांचा तसेच आपला नमस्कार स्वीकारावा हा त्या मागचा उद्देश्य.
Copyright © 2025 | Marathisrushti