वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
हे संबोधन मी १९८२ पासून ऐकत आलोय. बजाज ऑटो मधील एका गुरुवारच्या सुट्टीत आम्ही मित्र-मित्र गेलो होतो बालगंधर्वला ! तेथील कलादालनात “काव्य-चित्र ” प्रदर्शन अशी पाटी दिसली म्हणून आम्ही उत्सुकतेने घुसलो. अनेक नामवंत मराठी कवींच्या काव्य ओळींचे चित्रातून हृदगत मांडलेले दृष्टीस पडले. हा प्रकारच अनोखा होता आणि काव्याचे असे interpretation आम्हांला नवे वाटले.
June 14, 2022
गेल्या दशकभरात तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असून आज नवी वाटणारी गोष्ट उद्या लगेच जुनी होत आहे. यामुळे ग्राहकांसमोर एकाच वेळी अनेक पर्याय खुले होत असून योग्य पर्याय निवडताना ते गोंधळून जात आहेत. सध्या अॅण्ड्राईड या मोबाईल फोन्सच्या ऑपरेटिंग सिस्टिमबद्दल बरीच चर्चा होत असली तरी त्यापेक्षाही चांगली ऑपरेटिंग सिस्टिम कधीही बाजारात दाखल होऊ शकेल अशी परिस्थिती आहे.
January 28, 2011
अननस हे फळ आपल्या सर्वांच्याच आवडीचे.हे एवढे रूचकर लागते कि खायचा मोह आवरत नाही. ह्या पासून आपण सरबत,मुरंबा,जॅम,पाक,रायते,ज्युस आणी गोव्यात प्रत्येक मेजवानीत हल्ली हमखास अननसाचे सासव केलेच जाते.आणी हे सगळेच पदार्थ भयकंर चविष्ट लागतात ह्यात वादच नाही.
ह्या अननसाचे रोप जमीनी लगत वाढते व ह्याच्या भक्कम बुंध्यास काटेरी पाने फुटतात आणी त्याच्या मधोमध हे फळ उगवते.लहान व कच्चे असताना हे फळ लालसर असते तर पिकल्यावर ते पिवळे होते.फळाच्या डोक्यावर मुकुट शोभावा अशी पाने असतात.
हे पिकलेले असताना गोड व कच्चे असताना आंबट असते.हे थंड असल्याने वात व पित्त शामक आहे.
आता आपण ह्याचे घरगुती उपचार पाहूयात:
१)ज्या स्त्रियांना मासिक पाळी नियमीत येत नाही त्यांनी कच्च्या अननसाचा रस मासिक पाळी येण्याच्या तारखे पुर्वी १/२-१ कप रोज प्यावा.
२)१ ग्लास अननसाचा रस+१चमचा साखर हे मिश्रण जेवणापुर्वी घ्यावे लघ्वीची जळजळ,लघ्वी कमी होणे,लघ्वीला उग्रवास येणे कमी होते.
३)अजीर्ण,उल्ट्या,जुलाब ह्यात उपवास करावा व अननसाचा रस+काळी मिरी+साखर हे मिश्रण थोडे थोडे प्यावे.
४)गजकर्ण,खरूज,ह्यात येणारी खाज कमी करायला अननसाचा रस लावावा.
५)पोटफुगणे,भुकमंदावणे,नियमीत संडासला न होणे ह्यात जेवणासह अननसांची फोड चावून खावी.
अननस खायचा अतिरेक केल्यास अम्लपित्त व जुलाब होतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 21, 2016
पेनसिल्वेनीयातल्या पोकोनो पर्वतराजीतून जाणार्या, “माझ्या” यु.एस. रुट नंबर ६ वर, तीन वर्षे ये जा करता करता, नजरेस पडलेले निसर्गाचे ऋतुचक्र.
मार्चच्या अखेरी पासून ते एप्रिलच्या सुरुवाती पर्यंत वसंताची चाहूल लागायला लागते. साठलेले बर्फाचे ढीग वितळून पाण्याचे छोटे छोटे ओहोळ उतारावरून रस्त्याच्या कडेने वाहू लागलेले असतात. बर्फाने आच्छादलेली जमीन उघडी वागडी व्हायला लागलेली असते. सुकलेल्या पाचोळ्याचा तपकिरी रंग बर्फाच्या आवरणाखालून डोकं वर काढायला लागलेला असतो; पोपडे पडलेल्या भिंतीखालचा जुना रंग दिसावा तसा. जागोजागी वितळलेल्या बर्फाखाली, सुकलेल्या गवताचे पिवळे तुकडे इतस्तत: दिसत असतात. झाडांच्या फांद्या देखील अंगावरचं बर्फ झटकून पुन्हा तरतरीत होत असतात.
हळूहळू पिवळ्या गवतावर हिरव्या छटा चढायला लागतात. झाडांच्या बुंध्यांच्या पायथ्याशी, झुडपांच्या काटक्यांचे जंगल माजलेले असते. या उघड्या, बोडक्या, सुकलेल्या तपकिरी काटक्या, एकाएकी टोकाकडे हिरवट पिवळ्या व्हायला लागतात. काही ठिकाणी जुनाट काटक्यांच्या टोकाला नवीन पिवळ्या पोपटी नाजुक वेलांट्या उमलतात. हा पिवळा रंग अगदी डोळ्यात भरण्याएवढा गर्द असतो. आणि हे रंगायतन इतक्या अचानक होतं की काल परवापर्यंत रुक्ष, तपकिरी, वठल्यासारखी वाटणारी झुडपं, एकाएकी सजीव आणि तजेलदार दिसायला लागतात. अशातच एके दिवशी अचानक, पोपटी रंगाचे शिंतोडे पडल्यासारखी छोटी छोटी पाने अवतरतात.
झाडांच्या टोकांच्या बारीक फांद्या लाल गुलाबी कळ्यांनी (buds) मोहरून जातात. कळ्यांनी लगडलेल्या झाडांच्या दाट गर्दीमुळे, डोंगरांवर गुलाबी छटा दिसायला लागते. गुलाबी रंगाने रंगून गेलेल्या फांद्यांची टोकं आणि झाडांच्या पायतळींच्या झुडपांचा पोपटी रंग यामुळे झाडांनी गुलाबी फेटे आणि पोपटी मोजे असा मजेशीर पोशाख केल्यासारखं वाटायला लागतं. ‘वीपींग विलो’ च्या झाडाचे लोंबणारे झुपके पोपटी होतात. सर्व झाडांमधे या झाडावर वसंताचा स्पर्श प्रथम जाणवतो. वितळलेल्या बर्फामुळे बर्याच झाडांचे बुंधे आणि फांद्या, शेवाळाने माखून गेलेल्या असतात.
डोंगरकड्यांच्या दगडांच्या मधून आलेलं गवत देखील हिरवटसर व्हायला लागलेलं असतं. दगडांच्या पुढे आलेल्या टोकांखाली, जिथे थिजलेल्या बर्फाचे लोलक झाले होते, ते वितळून नुसताच पाण्याचा ओलावा राहिलेला असतो आणि त्यात शेवाळाची हिरवट झाक डोकवायला लागलेली असते.
हळू हळू रान रंगू लागतं. रुक्ष करड्या तपकिरी रंगाचा एकसुरीपणा जाऊन, हिरव्या, पोपटी रंगाच्या विविध छटा जागो जागी दिसू लागतात. झाडांच्या फांद्यांवर पिवळ्या गुलाबी रंगाची झाक गडद होऊन किरमिजी रंगाची होते. वर्षभर हिरवे रहाणारे सूचिपर्ण वृक्ष, आपले गडद हिरवे पिसारे फुलवून, नेहमीच्याच दिमाखात उभे असतात. त्यांच्या आगे मागे, नवीन पालवी फुटणारी पानगळीची झाडं, आपल्या नव्या नवलाईचं कौतुक अंगाखांद्यावर लेवून उभी असतात. झाडांच्या या सरमिसळीकडे पाहून, पिढीजात श्रीमंतांच्या वडिलोपार्जित वाड्यांच्या आसपास, नवीनच हातात पैसे खुळखुळू लागलेल्या चाकरमान्यांनी रंगीबेरंगी अपार्टमेंट कॉम्प्लेक्स उठवावेत तसं वाटतं. म्हातार्या आजी आजोबांचं सुनसान घर एकदम मुला नातवंडांनी भरून जावं, लेकी सुनांनी नव्या कोर्या साड्या नेसून लगबग करावी आणि नातवंडांनी घरभर गोंधळ घालावा तसे डोंगर गजबजून जातात.
एप्रिल मे मधे इथे भरपूर पाऊस पडतो. पण पाऊस आपल्या मान्सूनसारखा धुवाधार नाही. मधून मधून सरी तेवढ्या येऊन जातात. या सीझनमधे चेरी ब्लॉसम, क्रॅब अॅपल, मॅग्नोलिया, डॉगवूड वगैरे झाडांवर फुलांचा बहर येतो. या झाडांवर तोपर्यंत पानांचा मागमूस नसतो. नुसत्या फांद्या, काटक्या आणि फुलांची लयलूट ! पण हा बहर जेमतेम २-३ आठवडे टिकतो. हळू हळू फुलं सुकून पडायला लागतात आणि फुलांच्या भरगच्च संभारात जिथे जिथे मोकळी जागा होईल तिथे तिथे हिरवी पाने दिसायला लागतात. फुलांची आणि पानांची जणू रस्सीखेच सुरू असते. शेवटी हिरवाई वरचढ ठरू लागते. झाडाझुडपात दिमाखात डुलणारी फुले जमिनीवर लोळण घेऊ लागतात. पुढचे काही दिवस झाडांच्या पायतळी ह्या गळून पडलेल्या फुलांचे गालिचे पडून राहिलेले असतात. एकदा हे गालिचे वार्यावर उडून गेले किंवा पाचोळ्याचा भाग होऊन मातीत एकजीव होऊन गेले की सारे संपले. त्यानंतर पुढचे ५-६ महिने, नुसत्या हिरव्या पानांचा भार वागवत झाडं उभी रहातात. जणू एखाद्या करमणुकीच्या कार्यक्रमात, मोठ्या माणसांच्या आधी लहान पोराटोरांचे कार्यक्रम उरकून घेतले जावेत, तसे पानांचं साम्राज्य पसरायच्या आधी, फुलांची रंगी बेरंगी होळी उरकून घेतली जाते.
August 3, 2015
नविन वर्षात आपल्या शरीराला गुदगुल्या करणारं, काहीतरी हवंहवंसं वाटणारं रोज घडो. त्याचसाठी तर आपण धडपडत असतो..परंतू त्याच बरोबर मनाच्या माध्यामातून मेंदूला गुदगुल्या करणारं, विचार करण्यास भाग पाडणारं, सदसदविवेकबुद्धी जागृत करणारंही काहीतरी घडो ह्या शुभेच्छा
January 1, 2017
१९५० च्या दशकातील भारतीय सिनेमा हा सामाजिक जाणिवा, स्वातंत्र्यसोहळ्यानंतरचा नवा भारत आणि कौटुंबिक मूल्यांवर आधारित होता. या काळात चित्रपटातील मुख्य अभिनेत्री (Heroine) ही अतिशय सुसंस्कृत, सोशिक, पारंपरिक साडी किंवा सलवार-कमीज नेसणारी आणि भारतीय सती-सावित्रीच्या प्रतिमेत बसणारी असायची. साहजिकच, अशा नायिकेला पडद्यावर मादक हालचाली करणे, पाश्चात्त्य शैलीत नाचणे किंवा क्लबमध्ये जाऊन मद्यधुंद गाणी गाणे पूर्णपणे वर्ज्य होते. या सामाजिक चौकटीतूनच बॉलिवूडमध्ये एका नव्या पात्राचा जन्म झाला, ज्याला ‘व्हॅम्प’ (Vamp) किंवा ‘खलनायिका/नर्तिका’ म्हटले गेले.
August 6, 2026
मनुष्याला आपल्या आयुष्यात प्रत्येकक्षणी सतत काहीतरी हवे असते. आणि या हव्यासापोटी तो आपले सामाजिक कर्तव्य विसरत चालला आहे. शिक्षण, व्यवसाय, नोकरी करत असताना सामाजिक बांधीलकीचे भान ठेवणे गरजेचे आहे, आणि काही व्यक्ती ठेवतातही. त्यापैकीच खामगावचे एक कलाशिक्षक संजय गुरव. प्राणीमात्रांची सेवा करून इतरांनाही प्रेरणादायी ठरणारा छंद त्यांनी जोपासला आहे.
आजच्या ग्लोबलायझेशनच्या युगात बहुतांश पालक आपल्या मुलांना घर, शाळा, शिकवणी वर्ग, संगणक, टीव्ही आणि मोबाइल या व्यतिरिक्त इतरत्र डोकावूनसुद्धा पाहू देत नाहीत. जग जवळ आले असले तरी विद्यार्थ्यांना आजूबाजूला आढळणारे प्राणी, पक्षी कोणते? याची माहिती नसते. पूर्वी ‘चिव ये, दाणा खा, पाणी पी अन् भुर्र्र उडून जा’, असे लहानपणी मुले खेळत होती. बालगोपाल चिमण्यांच्या चिवचिव आवाजाचा, भुर्र्र उडण्याचा मनसोक्त आनंद घेत असत. परंतु, आज हा प्रकार अनुभवाला मिळत नाही. तीन वर्षांपूर्वी खामगाव येथील र्शी अ. खि. नॅशनल हायस्कूलमधील कलाशिक्षक संजय माधव गुरव, त्यांची दोन मुले, पत्नी व मित्र विजय खंडागळे यांनी एक प्रयोग करून बघितला. सुरुवातीला अंगणात वृक्षलागवड केली. त्यामुळे विविध पक्षी येऊ लागले. सोबतच खार, मुंगूस, सरडे, हिरवा सरडा, चिमणी, बुलबुल, सूर्यपक्षी, मैना, साळुंकी, चष्मेवाला, शिंपी, पिंगळा, होला, दयाळ, राखी वरवट्या, काळी मैना, ब्राrाणी मैना यांची ओळख छोट्या मुलांना व मित्रांना करून देण्याचा छंद त्यांना जडला. नंतर या पक्ष्यांसाठी अंगणात 22 बाय 33 फूट लांबीचे चार पाणवठे तयार केले. पाणवठय़ाच्या वरच्या बाजूला 12 फूट उंचीवर एक लाकडी घरटे तयार करून लावले. त्या ठिकाणी नियमित अन्न टाकणे सुरू ठेवले. दोन महिन्यांनंतरच त्या घरट्यात ब्राrाणी मैनेने दोन पिलांना जन्म दिला, हे त्यांचा मुलगा संदेशने आनंदाने नाचून सांगितले. हा आनंद पैसे देऊनही विकत मिळत नाही, असे वाटल्याने त्यांनी घरट्यांची संख्या वाढवली. मातीच्या मडक्यांची घरटी तयार केली, परंतु पक्षी येईनात. म्हणून सहा महिन्यांनी मडक्याच्या तोंडावर चिमणीच्या आकाराचे छिद्र पाडले व त्यावर खरड्याचे आवरण लावले. आणि अवघ्या अध्र्या तासातच दोन्ही मडक्यांमध्ये चिमण्यांची ये-जा सुरू झाली. आजपर्यंत या घरट्यात मैना व चिमण्यांनी दहा-बारा वेळा आपल्या पिलांना जन्म दिला. हा अनुभव खरंच आजच्या धकाधकीच्या जीवनात लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वांना सुखदायक ठरणारा आहे.
February 27, 2017
दुग्धैर्मध्वाज्ययुक्तैर्दधिसितसहितैः स्नापितं नैव लिड्गं
नो लिप्तं चन्दनाद्यैः कनकविरचितैः पूजितं न प्रसूनैः ।
धूपैः कर्पूरदीपैर्विविधरसयुतैर्नैव भक्ष्योपहारैः क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥६॥
भगवान श्री शंकरांच्या पूजनाचा विषय निघाल्यानंतर या पूजेमध्ये अर्पण करण्याच्या पुढील पदार्थांची आचार्यश्री ना स्वाभाविक आठवण झाली. या उपचारांचा देखील मी कधी विनियोग केला नाही. अशी कबुली देत त्यासाठी क्षमा मागताना आचार्यश्री म्हणतात,
दुग्धैर्मध्वाज्ययुक्तैर्दधिसितसहितैः - दूध,मध, आज्य म्हणजे तूप यांनी युक्त असलेल्या दही आणि साखर सह, अर्थात पंचामृताने,
स्नापितं नैव लिड्गं - मी कधीही शिवलिंगाला स्नान घातले नाही.
नो लिप्तं चन्दनाद्यैः- त्या भगवान शंकरांच्या प्रतीक शिवलिंगावर कधी चंदन इत्यादींचा लेप लावला नाही. कनकविरचितैः पूजितं न प्रसूनैः - कधी सोने इत्यादींनी सजविलेल्या फुलांनी, अर्थात फुले किंवा आभूषणांनी,
धूपैः- ऊद इ. धूपांनी, कर्पूरदीपै - कापूर आरती इत्यादींनी कधी भगवंता तुझी पूजा केली नाही.
र्विविधरसयुतैर्नैव भक्ष्योपहारैः - विविध रसांनी युक्त असणारे भक्ष इत्यादी नैवेद्य समर्पित केले नाही.
नैवेद्यात मधुर, आम्ल,लवण,कटू, कशाय आणि तिक्त हे
सहा रस असावेत आणि भक्ष्य म्हणजे खाता येणारे, लेह्य म्हणजे चाटता येणारे, पेय म्हणजे पिता येणारे आणि चोष्य म्हणजे चोखता येणारे अशा चार प्रकारचे अन्न असावे असे वर्णन आहे.
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे श्री महादेव शंभो माझ्या या अपराधांना क्षमा करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
July 25, 2020
‘नेमेची येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे सध्या नित्यनेमाने ठिकठिकाणी आगी लागत आहेत. त्यांमध्ये निवासी इमारतींपासून कारखान्यांपर्यंत सर्व प्रकारच्या इमारतींचा समावेश आहे. आगीमुळे प्रचंड वित्तहानी तर होतेच आहे; पण जीवितहानीही सुरू आहे. आगीनंतर बरीच चर्चा होते. सर्व प्रकारची माध्यमे विषय उचलून धरतात; पण हे सर्व तात्पुरते असते. चौकशी समिती नेमली जाते, शिफारशी केल्या जातात.
February 4, 2024


काही वर्षांपूर्वी बंगाली रंगभूमी ही अतिशय प्रगत आणि प्रगल्भ आहे आणि ती भारतात प्रथम क्रमांकावर आहे, असं मानलं जात होतं, परंतु प्रथम क्रमांकाची जागा आता सर्वांगानी बहरलेल्या अशा मराठी रंगभूमीने घेतली आहे, असं मानायला काहीच प्रतिवाद नसावा. व्यावसायिक, प्रायोगिक, हौशी, समांतर रंगभूमी, बाल रंगभूमी, कामगार रंगभूमी, दलित रंगभूमी अशा विविध नाट्यक्षेत्रात नवेनवे प्रयोग चालू आहेत, परंतु मराठी संगीत रंगभूमी, जी महाराष्ट्राने जागतिक रंगभूमीला दिलेली देणगी अशी मानली जाते, तिची पिछेहाट झालेली दिसते, किंबहुना ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, असं म्हटलं जातं.
ग्रंथाक्षर या दिवाळी २००९ विशेषांकात रामदास कामत ह्यांनी लिहिलेला हा लेख
June 27, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti