(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भ्रष्टाचार मुळां पासून काढायचा ?……खरें तर “गुप्त स्वहित” प्रथम ओळखलें पाहिजे.

    भारतीय विद्वानांचा विचार असा आहे कि जर सर्व नियम शिथिल केले पारदर्शकता ठेवली आणि ती लोकां पर्यंत पोहचली, तसेंच शिक्षेची योग्य अंमलबजावणी ह्या गोष्टी केल्या तर भ्रष्टाचार थांबविणे शक्य होईल.

      November 15, 2010


  • एक डोळ्याची दिव्यदृष्टी

    गेट वे ऑफ इंडिया हून मांडव्याला जायला संध्याकाळी साडे चार वाजता लाँच निघाली होती. तीच लाँच मांडव्याहून परतीच्या मार्गाला संध्याकाळी सहा वाजता निघणार होती. लाँच मध्ये फारशी गर्दी नव्हती, सगळे प्रवाशी ऐसपैस आणि पाहिजे तिथं बसले होते. इकडून तिकडे जागा बदलत होते.

      April 5, 2023


  • स्मरणगाथा : ३ 

    मे महिन्याचे दिवस होते . चार दीपावली अंकांना लघुकथा पाठवून झाल्या होत्या . एका दीपावली अंकासाठी दीर्घकथा लेखन चालू होते .
    आणि अचानक मेनका च्या संपादकांचा - राजाभाऊ बेहरे - यांचा फोन आला . " मेनकासाठी भुईचाफा कथा मिळाली . आता जत्रा दीपावली अंकासाठी विनोदी कथा हवी आहे . सांगायला उशीर झाला आहे , पण कितीही उशीर झाला तरी कथा पाठवा . "

    बेहरे यांना नकार देणं शक्यच नव्हतं .
    मी म्हटलं , " मी विनोदी लेखन कधी केलं नाही , पण प्रयत्न करतो . आवडली नाही कथा तर साभार परतीचा पर्याय मला आवडेल . "
    पलीकडून हसण्याचा आवाज आला .
    आणि नेहमीप्रमाणे मी डोक्याला हात लावून बसलो .
    भिडस्त स्वभावामुळे कुणाला नकार देता येत नव्हता . आणि इथे राजाभाऊंचा शब्द होता .
    त्यांना नकार देणं म्हणजे कृतघ्नपणा ठरला असता .

    कारण माझी पहिली कादंबरी मेनका प्रकाशनामार्फत त्यांनीच प्रकाशित केली होती . त्यासाठी पुन्हा पुन्हा लेखन करायला लावून माझ्यातल्या लेखकाला आकार देण्याचे काम केले होते . ती कादंबरी मी तीन वेळा लिहिली होती . विषय आवडल्यामुळे त्यांनी लेखनाचा आग्रह धरला होता . त्यांची माझी साधी ओळखही नव्हती . कादंबरीचे पहिले हस्तलिखित तयार झाल्यावर कुणाला पाठवावे म्हणून विचारात असताना , रत्नागिरीच्या स्टँडवर एका बुकस्टॉल वर मेनकाचा अंक दृष्टीस पडला . त्यावरचा पत्ता लिहून घेतला आणि घरी हरचिरीला आल्यावर ते हस्तलिखित त्यांना पोस्टाने पाठवून दिले . पंधरा दिवसांनी ते साभार परत आले . सोबत चुका दाखवणारे आणि पुन्हा लेखन करा असा आग्रह धरणारे पत्र होते . मी ते बाड फाडून नव्याने लेखन केले . तेही पंधरा दिवसात परत आले . मी निराश झालो . पण बेहेरेंचं एका महिन्याने पत्र आलं , कादंबरीचं लेखन कुठपर्यंत आलं याची विचारणा करणारं .
    मग मात्र मी सगळ्या चुका लक्षात घेत , नवीन शैलीत लेखन केले , आणि कादंबरी पाठवून दिली . मनाशी पक्का निश्चय केला , की आता हस्तलिखित परत आले तर कधीही लेखन करायचे नाही .

    पण अहो आश्चर्यम !
    कादंबरी स्वीकारल्याचे , ती मेनका मासिकात क्रमशः प्रसिद्ध करण्याचे , त्यानंतर पुस्तक काढण्याचे , मानधनाचे करारपत्रच त्यांनी पाठवून दिले होते .
    तेव्हा मी हरचिरी हायस्कूल येथे शिक्षक म्हणून नोकरी करत होतो .
    आई अण्णांना खूप आनंद झाला होता . अर्थात मलाही गगन ठेंगणे वाटत होते .

    त्या एका पत्राने माझे सगळे आयुष्यच बदलून गेले .
    त्यानंतर राजाभाऊंनी माझ्या अनेक कादंबऱ्या क्रमशः प्रसिद्ध केल्या . मेनका , रविवारची जत्रा यासारख्या अंकातून त्यांनी मला महाराष्ट्रभर प्रसिद्धी दिली . महाराष्ट्रात जिथे जिथे एस टी स्टँड होते त्या त्या ठिकाणी त्यांची मासिके आणि साप्ताहिके खूप विकली जात होती . त्यामुळेच मला खूप मोठा वाचकवर्ग लाभला . फॅन मेल च्या पत्रांनी माझ्याकडच्या फाईल्स भरून जाऊ लागल्या .
    हरचिरीला आमच्याकडे अगदी क्वचित पत्र घेऊन येणारा पोस्टमन आता आठवड्यातून तीन तीनदा येत होता .
    आई अण्णांना त्याचेही खूप अप्रूप वाटत होते . त्यांचाही वेळ चांगला जाऊ लागला होता . किंबहूना माझ्यापेक्षा अण्णांच आता पोस्टमन ची वाट बघू लागले होते .

    या प्रसिद्धीचा आणखी एक चांगला परिणाम झाला तो म्हणजे अन्य दिवाळी अंकांसाठी लेखन पाठवण्याची विनंती करणारी पत्रे येऊ लागली होती .
    महाराष्ट्र टाइम्स , कालनिर्णय , लोकसत्ता , अंतर्नाद , किस्रीम अशा अनेक अंकांसाठी मी लेखन करू लागलो . ( त्याविषयी नंतर केव्हातरी लिहीनच . )

    --- पण जत्रा साठी विनोदी कथा लिहिणे , आव्हानच होते .

    त्याचवेळी मुंबईला नातेवाईकांकडे लग्न होते आणि जाणे गरजेचे होते . एसटी ने जाण्यापेक्षा मी रेल्वेने जायचे ठरवले .
    त्याकाळात दादर पॅसेंजर ही माझी अतिशय आवडती ट्रेन होती .
    मी अनेक वेळेला त्यातून प्रवास केलेला आहे .
    रत्नागिरीहून जाताना किंवा दादरहून येताना प्रचंड गर्दी असायची . पण बसायला जागा मिळत असे . अर्थात थोडी घुसखोरी करायला लागायची . पण मजा यायची .
    त्या गाडीत एकदा चढायला मिळाले की वेगवेगळ्या चवींचा चहा , खाण्याचे विविध पदार्थ , विविध वस्तू विकणारे विक्रेते , पाणी , कोल्ड्रिंक्स असं काही काही मिळायचं . तेही स्वस्तात .
    गाडीत खाण्यासाठी घरून काही नेलेलं मला आठवत नाही . एक मात्र आठवतंय , रत्नागिरीहून जाताना चिपळूण किंवा खेड स्टेशनवर एक म्हातारे गृहस्थ , गरमागरम उपमा विकायला यायचे . तो मात्र मी आवडीने घेत असे . स्टीलच्या स्वच्छ डब्यात ते उपमा घेऊन यायचे आणि गोड हसत विकायचे . अनेकांना त्यांच्या उपम्याने वेड लावले होते . डबा रिकामा झाला की पुढच्या स्टेशनला ते उतरून जायचे . त्यांच्या उपम्याची चव अजून आठवते .

    पण खरी मजा यायची ती प्रवाशांच्या गप्पा ऐकण्यात .
    अगदी घरात असल्यासारखे प्रवासी मोठमोठ्यांदा बोलायचे , गप्पा मारायचे . बायकासुद्धा बडबडत असायच्या . सासरच्या व्यथा , माहेरच्या आठवणी , मुलांची प्रगती असं सगळं त्या एकमेकींना सांगायच्या .
    मला त्या सगळ्यांच्या गप्पांचा हेवा वाटायचा . कोण काय म्हणेल , मॅनर्स याचा विचारही लोक करत नसत . सगळी बोगी म्हणजे गप्पांचा पार वाटायचा .
    खरं सांगायचं तर दादर पॅसेंजर मधून प्रवास करण्याचा माझा हेतू स्वच्छ होता . एक म्हणजे आपल्याकडे कोण बघतंय की काय याचा विचार न करता आवडेल तो पदार्थ विकत घेऊन हादडता येत होता आणि गप्पा ऐकता येत होत्या .
    आणि खोटं कशाला बोलू , मला कथांसाठी त्या गप्पांतून कथाबीजं सुद्धा मिळत होती . व्यक्तिरेखा सापडत होत्या . मानवी भावभावनांचा कल्लोळ अनुभवायला मिळत होता . ( त्याविषयी पुन्हा केव्हातरी )

    तर त्या ट्रेन ने प्रवास करताना कोकणी बाण्याचे काही प्रवासी इलेक्शनवर जोरजोरात वाद घालत होते . नेहमीच्या सवयीनं शिव्या , कुळाचा उध्दार, उमेदवारांचा भ्रष्टाचार असे अनेक मुद्दे रंगत होते .

    त्या गप्पा ऐकताना अचानक कुणी तरी म्हणाला , ' आजच्या काळात निवडून यायचे असेल तर साध्या सरळ माणसाला मुश्किल होऊन जाईल , त्या स्वच्छ चारित्र्याच्या माणसाला सुद्धा इतर भ्रष्ट उमेदवारांसारखे वागावे लागेल .'
    अर्थात हे म्हणताना तो ज्या शिव्या वापरत होता त्या इथे लिहिण्यासारख्या नाहीत .

    पण मला ते वाक्य खूप काही देऊन गेले .
    आणि जत्रा दीपावली अंकासाठी , शीर्षकासह कथा मनात आकार घेऊ लागली .
    त्यावर्षी चिमणरावांची निवडणूक ही विनोदी कथा मी लिहिली आणि राजाभाऊंना पाठवली . त्यांनाही ती कथा खूप आवडली आणि नंतर वाचकांनाही .

    आज दादर पॅसेंजर ही ट्रेन आठवली त्या ट्रेनने सुद्धा मला लेखक होण्यात किती मोलाची कामगिरी बजावली आहे . याचे स्मरण झाले .

    आणि कोकण रेल्वेला सलाम करावासा वाटला !

    डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
    दिनांक : २५ जुलै २०२५
    ८९५१९०६७०१
    ---------------
    स्मरणगाथा आवडल्यास नावासह सर्वदूर पाठवायला हरकत नाही

      August 12, 2025


  • अमेरिकन घरं

    इथे साधारण तीनेक प्रकारची घर दिसतात. पहिला प्रकार अपार्टमेंट स्वरूपाचा. ती एक किंवा दोन मजली असतात. आपल्याकडे इमारती असतात तशी. त्यामध्येदेखील ऐसपैस जागा असते:

      April 6, 2023


  • श्री भ्रमरांबाष्टकम् – ८

    कर्पूरागरुकुङ्कुमाङ्कितकुचां कर्पूरवर्णस्थितांकृष्टोत्कृष्टसुकृष्ट कर्मदहनां कामेश्वरीं कामिनीम् ।
    कामाक्षीं करुणारसार्द्रहृदयां कल्पान्तरस्थायिनीं
    श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये ॥ ८॥

    कर्पूर- कापूर

    आगरु- काळे चंदन

    कुङ्कुम- कुंकू

    अङ्कितकुचां- यांनी वक्षस्थल व्याप्त असलेली. या सगळ्यांची उटी आई जगदंबेने शरीराला लावली आहे. कर्पूरवर्णस्थितां- कापरा प्रमाणे शुभ्र पांढऱ्या रंगाची.

    कृष्टोत्कृष्ट- कृष्ट म्हणजे निम्न तर उत्कृष्ट म्हणजे अप्रतिम.

    सुकृष्ट- सुयोग्यरीत्या केलेले,

    कर्मदहनां - कर्माला जाळून टाकणारी.
    कर्माची रचना एखाद्या बीजाप्रमाणे असते. बीज ज्या प्रकारचे असते वृक्ष त्या प्रकारचा निर्माण होतो. तसे कर्म जसे असते तसे फळ प्राप्त होते. मात्र जर हे बी भाजले आणि नंतर पेरले तर ते उगवत नाही. त्याप्रमाणे एकदा आई जगदंबेची कृपा प्राप्त झाली की मग कोणत्याही कर्माचे फळ अर्थात बंध लागत नाहीत.

    कामेश्वरीं - सर्व कामना अर्थात इच्छांची अधिष्ठात्री.

    कामिनीम् - भक्तांच्या, साधकांच्या सकल कामना पूर्ण करणारी.

    कामाक्षीं- काम म्हणजे इच्छा. अक्षी म्हणजे निवास. सकल कामनांचे निवास अर्थात मूळ स्थान. करुणारसार्द्रहृदयां- कारुण्य रसाने जिचे हृदय भरलेले आहे अशी. कल्पान्तरस्थायिनीं-
    भगवान श्री ब्रह्मदेवांच्या दिवसाच्या शेवटी या संपूर्ण विश्वाचा जो लय होतो तो पर्यंतच्या काळाला कल्प म्हणतात. त्यावेळी सर्वकाही नष्ट होते. मात्र त्यावेळी सुद्धा नष्ट होणारी आदिशक्ती कल्पान्तरस्थायिनी संबोधिली जाते.

    श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये - श्रीशैल पर्वतावर निवास करणाऱ्या आई जगदंबेचे मी भजन करतो.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

      April 10, 2020


  • देशभक्तीचे बदलते आयाम!

    प्रकाशन दिनांक :- 28/09/2003
    देशाला स्वातंत्र्य मिळून अर्धशतकाचा कालावधी उलटून गेला. स्वातंत्र्याचा उपभोग घेणारी तिसरी पिढी जन्माला आली. शेकडो वर्षांच्या संघर्षाचे एक पर्व संपले, परंतु त्याचा अर्थ संघर्ष संपला असा करता येणार नाही.

      September 28, 2003


  • सिनेमा बनताना – बॉम्बे टू गोवा

    ”दिल तेरा है, मै भी तेरी हु सनम “ या गाण्याच्या वेळी अमिताभ बच्चन याचे गुडघे सोलवटले होते, पण सांगणार कोणाला? नवखा होता ना, त्याही परिस्थितीत त्याने गुडघ्याला रुमाल बांधून शुटींग केले. “देखाना हाय रे सोचाना “ गाण्याच्या वेळी अमिताभ बच्चनला १०२ ताप होता. एक दिवस शुटींग थांबले. पण शुटींग जास्त थांबवून चालणार नव्हते म्हणून मेहमूदने त्याला सांगितले तुला जमतील तश्या स्टेप्स कर, व सहकलाकारांना  त्याला प्रत्येक सीन नंतर टाळ्या वाजवून प्रोत्साहन द्या असे सांगितले. तरीही त्याने असा काही डान्स केला कि शंकाही येत नाही कि त्याने तापामध्ये शुटींग केले असेल.

      September 1, 2022


  • स्वराज्यस्थापनेतील कायस्थ वीर

    शिवछत्रपतींच्या स्वराज्यस्थापनेत कायस्थ प्रभु ज्ञातीचा अत्यंत महत्वाचा वाटा आहे. हिंदवी स्वराज्याच्या संस्थापनेच्या कार्यात शिवाजी महाराजांना सर्वोतपरी मदत करणार्या आणी प्रसंगी बलिदान करणार्या ज्या ज्ञाती होत्या त्या मध्ये चांद्रसेनीय कायस्थ प्रभु ज्ञाती ही अग्रस्थानी होती. शिवशाहीसाठी कायस्थ वीरांनी फार मोठे आत्मसमर्पण केले असे हिंदवी स्वराज्याचा इतिहास सांगतो. आज शिवजयंतीच्या निमित्ताने यातील काही कायस्थ वीरांची थोडक्यात माहीती.

    1. शिवाजीराजांना रायरेश्वराच्या देवळात दूधभात व बेलभंडारा उचलुन हजार बाराशे मावळयांसह हिंदवी स्वराज्याची प्रेरणा व शपथ देणारे होते - दादाजी नरसप्रभु देशपांडे-कुलकर्णी गुप्ते.

    2. रानोमाळी फिरुन आदिलशाहींतील हजारो सैनिकांचे आपल्या गोड वाणीने मन वळवुन मुसलमानी अधिपत्याखालील अनेक गडकरी व हत्यारबंद सैनिक शिवाजी राजांना स्वराज्याच्या कामी मिळवुन दिले ते ह पिलाजी दुर्वे व त्यांचे बंधु यमाजी मावजी प्रभु दुर्वे यांनी.

    3. छत्रपतींचे सचिव व अत्यंत विश्वासु सहकारी होते बाळाजी आवजी चिटणीस. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत बाळाजींचा अत्यंत महत्वाचा वाटा होता.ते छत्रपतीचे अत्यंत एकनिष्ठ असे सेवक होते.

    4. शिवाजीराजांचे अनेक गड बांधणारे दुर्गकार होते पद्मदुर्गकार मल्हारराव नारायण चौबळ (चेउलकर)

    5. शिवाजी राज्यांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते विश्वासराव बाबाजी दिघे – देशपांडे. यांना अनेक भाषा अवगत होत्या.

    6. छत्रपती शिवरायांचे वकील उर्फ पारसनीस होते निळकंठ उर्फ निळो येसाजी प्रभु – पारसनीस. या पारसनीसांना मराठी,हिंदी,संस्कृत,पर्शियन,उर्दु,मागधी,पाली,तेलगु,द्राविडी इतक्या भाषांचे उत्तम ज्ञान होते असे सेतुमाधवराव पगडी यांनी त्यांच्या शिवाजी या इंग्रजी पुस्तकांत लिहिले आहे.

    7. छत्रपतींच्या आज्ञेवरुन कल्याणचा खजिना लुटुन महाराजांच्या चरणी अर्पण करणारे होते..कर्णिक..देशपांडे..तोरणेकर व राजमाचीकर हे सगळे कायस्थ होते.

    8. शिवाजी महाराजांच्या अंगरक्षक दलाजे प्रमुख होते गंगो भंगाजी वाकनीस – प्रधान. गंगो भंगाजी वाकनीस इतके शूर होते की,त्यांच्या या अंगरक्षक दलाची ख्याती व विशेषत: गंगो भंगाजी यांची भिती अगदी औरंगजेबालाही होती असे इतिहासात सांगितलेले आहे.

    9. किल्ले रायगडचे पोतनीसी मुरारबाजी देशपांडे यांचे वंशज पोतनीस यांच्याकडे होती.

    10. दादाजी रघुनाथ प्रभु देशपांडे – महाडकर हे शूर सरदार होते व शिवाजी राजे त्यांना घेतल्याशिवाय कोणत्याही मोहिमेस जात नसत.

    11. पुरंदर या महत्वाच्या किल्लयाचे किल्लेदार होते शूर वीर सरदार मुरारबाजी देशपांडे. घनघोर युध्दानंतरही मोगल सरदार दिलेरखान याला त्यांनी किल्ला दिला नाही.मुरारबाजी या लढाईत धारातिर्थी पडले पण किल्ला पडला नाही.

    12. विररत्न बाजी प्रभु देशपांडे हे शिवाजी राजांचे प्रमुख सरदार होते.महाराज विशालगडाकडे जातांना मोगलांविरुध्द घोडखिंडीतील त्यांनी दिलेली पावन लढत जगभर प्रसिध्द आहे.

    13. बाजीप्रभु देशपांडे – प्रधान हे जसे कसलेले योध्दे होते त्याचप्रमाणे ते एक कुशल असे स्थापत्यशास्त्रज्ञ होते हे सांगुनही कोणाला खरे वाटणार नाही.पण इतिहास सांगतो की बाजी प्रभु यांना स्वराज्याच्या 27 गडांची डागडुजी करण्याचे व पुनर्बांधणी करण्याचे अत्यंत महत्वाचे असे काम महाराजांनी त्यांना दिले होते.याचा उल्लेख बखरीत केलेला आहे.

    14. शिवाजी राजांचे राज्याभिषेकाप्रसंगी 32 मणस सोन्याचे सिंहासन बनविले होते अण्णो दत्ताजी चित्रे यांनी.

    असे हे महान कायस्थ वीर. या व्यतिरीक्तही अनेक कायस्थ प्रभु वीरांनी स्वराज्य स्थापनेच्या कामी महाराजांना एकनिष्ठेने मदत केली. महाराजांचा कायस्थांवर प्रचंड विश्वास होता. शिवाजी महाराजांनी आपले पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांच्याजवळ कायस्थ ज्ञातीविषयी काढलेले गौरवोद्गार इतिहासात नोंदविलेले आहेत.महाराज म्हणत ….

    ""प्रभुंची जात सदैव विश्वासपात्र जात आहे. ते विश्वासाने काम करितात.प्रसंगी आपल्या धन्यासाठी प्रभु लोक आपले प्राणही खर्ची घालण्यास मागे पुढे पहात नाहीत."

    हिंदवी स्वराज्यासाठी कायस्थांनी केलेल्या या त्यागाला स्मरुन प्रबोधनकार ठाकरे यांनी एक कवीता लिहिली होती त्यातील एक कडवे असे होते…..

    राज्य मर्हाठी श्री.शिवबांचे का कायस्थांचे
    कायस्थांच्या रक्तावरती बुरुज उभे त्यांचे,
    ज्या राज्याची प्राणप्रतीष्ठा कायस्थे केली,
    अवतारी शिवमुर्ती मग वरती स्थापन झाली…..

      November 4, 2016


  • विज्ञान मराठी : विज्ञानविषयक मजकूर

    विज्ञानविषयक मजकूर छापतांना पारिभाषिक शब्दांच्या बाबतीत बर्‍याच अडचणी येतात. सर्वमान्य पारिभाषिक शब्द वापरल्यास अर्थबोध चट्कन होतो. अुदा. ‘बॉयलिंग पॉअिंट’ या अिंग्रजी शब्दास ‘अुत्कलनबिंदू’ हा सर्वमान्य शब्द आहे. फार तर ‘अुत्कलनांक’ किंवा ‘अुकळांक’ हे शब्द वापरले तरी चालण्यासारखं आहे. पण ‘बुदबुदांक’ हा शब्द वापरल्यास अर्थबोध चट्कन होणार नाही. कोणताही द्रव अुकळत असतांना बुदबुद असा आवाज येतो हे खरं आहे.

      January 7, 2021


  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ५

    प्रवालप्रवाहप्रभाशोणमर्धं
    मरुत्वन्मणि श्रीमहः श्याममर्धम् |
    गुणस्यूतमेतद्वपुः शैवमंतः
    स्मरामि स्मरापत्तिसंपत्तिहेतोः ‖ ५ ‖

    निर्माण आणि प्रलय दोन्हींची नियामक महाशक्ती आहेत भगवान शंकर. त्यांचे सदाशिव रूप निर्माणाचे अधिष्ठान आहे तर रुद्र हे विनाशाचे संचालक.
    या दोन्हींच्या समन्वयातून साकारलेल्या भगवान शंकरांचे स्वरूप सांगतांना आचार्यश्री म्हणतात,
    प्रवालप्रवाहप्रभाशोणमर्धं- प्रवाळ म्हणजे पोवळे नावाचे रत्न. त्याचा प्रवाह म्हणजे त्यातून बाहेर पडणारे तेज. त्याची प्रभा म्हणजे चमक. त्याप्रमाणे शोण म्हणजे लालरंगाचे. अर्ध म्हणजे ज्यांचे अर्धे शरीर आहे असे.
    मरुत्वन्मणि श्रीमहः श्याममर्धम् -मरुत्वन्मणि म्हणजे इंद्रनील मण्याच्या श्रीमहः- तेजा प्रमाणे
    श्याममर्धम्- अर्धे शरीर निळसर काळपट असे सावळे आहे.
    यातील पोवळ्याच्या लालीमे चा रंग आदिशक्तीचे प्रतीक असून भस्मधारण केल्याने निळसर धूसर दिसणारे शरीर भगवान शंकरांचे आहे. अर्धनारीश्वर स्वरूपात हे दोन्ही रंग एकवटतात.
    गुणस्यूतमेतद्वपुः शैवमंतः- शैववपु म्हणजे भगवान शंकरांच्या शरीरात हे दोन गुण स्यूत अर्थात एकत्र आलेले आहेत.
    स्मरापत्तिसंपत्तिहेतोः - स्मर म्हणजे मदन त्याच्यावरची आपत्ती म्हणजे त्याचा विनाश आणि त्याची संपत्ती म्हणजे निर्मिती, या दोन्हींचा आधार असणारे.
    शक्ती स्वरूपात, प्रकृती स्वरूपात विश्वाची निर्मिती आणि शंकर स्वरूपात विलय या दोन्हींचे एकत्रित स्वरूप असणाऱ्या अर्धनारीश्वराचे मी स्मरण करतो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      June 14, 2020