आता आपण खोबरेल तेलाचे घरगुती उपयोग पाहूयात:
१)खोबरेल तेल व चुन्याची निवळी हे मिश्रण घोटून केले मलम केसांना लावल्यास केस गळणे थांबते.
२)थंड हवेशी संपर्क आल्याने त्वचा फुटते ह्या करीता खोबरेल तेल व लोणी हे मिश्रण समभाग मिसळून त्वचेवर लावावे.
३)खोबरेल तेल अंगाला नियमीत चोळल्यास मांसपेशी व स्नायू पुष्ट होतात.
४)संडास करताना व नंतर गुदद्वाराची आग होत असल्यास खोबरेल तेलाचा फाया गुदद्वारात ठेवावा.
५)लहान मुलांची टाळू भरायला खोबरेल तेल टाळूवर लावावे.
६)बोटांना होणाऱ्या कोरी बऱ्या होण्सासाठी त्यावर लोखंडी न गांजलेली सुरी तापवून त्यावरून खोबरेल तेल सोडावे.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती.)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४

पाषाणभेद चवीला तुरट,कडू असून थंड गुणाची व हल्की स्निग्ध व तीक्ष्ण असते.हि त्रिदोष शामक असून प्रभावाने अश्मरीभेदन आहे.ह्याचे उपयुक्त अंग मुळ आहे.
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशेअडतीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग बत्तीस
बाबा सांगतात...
देव, गाय, ब्राह्मण, वृद्ध, राजा, आणि अतिथी यांची यथायोग्य पूजा करावी. याचकाला काही न देता घालवू नये, त्यांचा अवमान करू नये. आणि कठोर शब्दांनी बोलू नये.
राजाला योग्य तो मान दिलाच पाहिजे. जरी लोकशाही असली तरी तो लोकमान्य लोकनेता आहे. हे विसरून चालत नाही.
दारी आलेला याचक ओळखून त्याला यथाशक्ती मदत करावी. तो किती मागतोय, यापेक्षा माझी दातृत्व शक्ती किती आहे, हे एकदा तपासून पहावे. काळाची पावले ओळखून, काहीवेळा "नाही" म्हणायलादेखील शिकले पाहिजे.
अतिथी म्हणजे ज्याची येण्याची आणि जाण्याची तिथी निश्चित नसते. म्हणजे न सांगता येतो आणि न सांगता जातो. सांगून येतो तो "पाहुणा" !
या दोघांचाही योग्य तो मान राखला पाहिजे.
अतिथी आणि याचक यांच्यातही फरक आहे. अतिथी हा आपल्या परिचित असतो तर याचकाची मर्यादा दरवाज्यापर्यंतच असतो. याचक काहीतरी मागण्यांसाठीच आलेला असतो. अतिथीची अशी काही अपेक्षा असत नाही.
वनवासामधे जाताना कोळ्याच्या घरी रामराया राहिले होते, ते अतिथी म्हणून. आणि सीता हरण करण्यासाठी रावण सीतेच्या पर्णकुटीपर्यंत आला होता, तो याचक बनून !
सांगायचं काय तर या दोघांचाही योग्य तो मान राखला पाहिजे. बदलत्या काळानुसार यातील फरक लक्षात यावा म्हणून उदाहरण दिले.
महत्त्वाचे म्हणजे लक्ष्मणाने आखून दिलेल्या रेषेचा भंग होऊ नये. आजच्या काळात ही लक्ष्मणरेषा म्हणजे आपल्या बॅक अकाऊंटचा पासवर्ड म्हटला तरी चालेल.
ही रेषा फक्त सीतेसाठीच आहे, असे नाही. तर सर्वांसाठीच आहे. या रेषेचे महत्त्व सर्वांनीच लक्षात ठेवावे, म्हणजे झाले. कारण आज समाजात रामापेक्षा रावणांची संख्या वाढली आहे. कोणाला किती जवळ करावे, हे ओळखता येणे कठीण आहे. कोण कसे फसवेल हे समजणे पण कठीण झाले आहे. सज्जन आणि दुर्जन ओळखणे कठीण झाले आहे.
ज्या शब्दात आपण बोलतो ते शब्द कोणाला दुखावणारे असू नयेत. आपला अपमान झाला अशी भावना कोणाच्या मनात तयार होऊ नये, असे शब्द असावेत. बोलताना सूर, ताल आणि त्यामुळे बदलणारे शब्दांचे अर्थ यानी अनर्थ होतात, हे बोलण्यापूर्वीच लक्षात ठेवावे. कारण एकदा बाहेर पडलेला शब्द ( आणि वाॅटसपवरील एन्टर केल्यानंतरचा मेसेज ) काही झाले तरी मागे घेता येत नाहीत.
आपण दुसऱ्याला कधी फसवू नये, पण आपण दुसऱ्याकडून फसवले जाणार नाही, एवढा शहाणपणा आपल्या अंगी नक्कीच बाणवावाच लागेल.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 2
जसे आचमनातून आपल्याला कळले की अनावश्यक पाणी फक्त पळीभरच म्हणजे चमचाभरच प्यायचे असते. अन्यथा नाही. आयुर्वेदात हेच सांगितले आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, नित्य म्हणजे नियमाने करायच्या कर्मांमधे देवपूजा सांगितलेली आहे. यात ठराविक वेळ पाळणे अत्यंत आवश्यक आहे. 'मला सवड झाली की देवपूजा' असं करू नये. नियमितपणा म्हणजेच देव. सूर्याने जर नियमितपणा सोडला तर ? आणि देवपूजा करताना श्रद्धेने आणि भक्तीयुक्त अंतःकरणाने केली तरच शांती मिळते. नाहीतर ते केवळ कर्मकांड होते. तसे न व्हावे.
आचमन झाल्यावर प्राणायाम केला जातो.
काही मंडळी याला थोतांड म्हणतात. या कर्मकांडात काऽही काही अर्थ नाही, असे म्हणतात. प्राणायाम करणे हे पण एक कर्मकांडच आहे. त्याला देवपूजेमधे सर्वात पहिले स्थान दिले आहे, हे विसरून चालणार नाही.
प्राणायाम कसा करावा, ते सुद्धा धर्मशास्त्रात सांगितलेले आहे. जसे योगशास्त्रामधे वर्णन केलेले आहे, तशीच कृती धर्मश्स्त्रातील कर्मकांडामधे वर्णन केलेली आहे. हा केवळ योगायोग समजावा का ? नक्कीच नाही.
ही सर्व शास्त्रे जगण्यासाठी आवश्यक ते मुलभुत नियम सांगायला बनवली गेली आहेत. समाजाचे धारण करतो, तो धर्म अशी व्याख्या देखील केलेली आहे.
प्राणायाम करण्यापूर्वी आचमन सांगितलेले आहे हा क्रम देखील विसरून चालणार नाही. आधी प्राणायाम नंतर आचमन असे नाही सांगितलेले ! घसा, श्वसनमार्ग आचमन करून, जरासा ओला करून घ्यावा म्हणजे, नंतर केल्या जाणाऱ्या जाणीवपूर्वक श्वासोच्छ्वासाने घश्यामधे कोरडेपणा निर्माण होऊन त्रास होऊ नये. यासाठी हा क्रम महत्त्वाचा !
आचमन झाल्यावर डाव्या नाकपुडीने श्वास भरून घ्यावा. उजवी नाकपुडी बंद करावी. भरून घेतलेला श्वास फुफ्फुसामधे रोखून धरावा. म्हणजे दोन्ही नाकपुड्या बंद कराव्यात. आपली श्वास रोखून धरण्याची शक्ती संपली की, श्वास हळूहळू सोडून द्यावा. श्वास सोडताना उजव्या नाकपुडीने सोडावा. आणि श्वास न घेता काही वेळ थांबावे. याला अनुक्रमे पूरक, अंतःकुंभक, रेचक आणि बहिर्कुंभक म्हणतात. हे कर्मकांड का करायचे ? आणि देवपूजेमधे सुरवातीला महत्त्व दिले जावे, एवढे काय आहे या प्राणायामात ?
असा प्रश्न विचारणारा, कदाचित अभारतीय असावा. एवढे याचे महत्त्व महर्षी पतंजलींपासून आजमितीपर्यंत सर्व योगतज्ञांनी आपल्याला वेळोवेळी सांगितलेले आहे. प्राण धारण करण्याची शक्ती वाढवणे, शरीर आतून शुद्ध स्वच्छ ठेवणे, मन आत्मा इंद्रिये यांना शुद्ध ठेवणे, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जगण्यावरील विश्वास वाढवणे, यासाठी प्राणायाम करावा. हे तर सर्वांनाच माहिती आहे. त्यासाठी वेगळा वेळ आणि जागा फुकट घालवायवा नको. आणि आत्ता तर आपण जागतिक स्तरावर योगदिन साजरा करतो.
त्यामुळे माहिती नसेल तर लवकरात लवकर हे ज्ञान मिळवावे.
नियमितपणे प्राणायाम करावा, म्हणजे श्वसनासंबंधी कोणत्याही समस्या निर्माण होत नाहीत, आणि निर्माण झालेल्या असल्या तरी त्या दूर होतात. एवढे समजले तरी आज पुरेसे आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
27.05.2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 31
नैवेद्यम् समर्पयामी-भाग पाच
गणेशजी आपल्याकडे येतात. काही जणांकडे दीड दिवस, काही जणांकडे पाच, सात, अकरा, एकवीस दिवस मुक्कामी असतात. जणुकाही घरातलाच एक घटक होऊन जातात. विसर्जनाची वेळ येते तेव्हा सगळ्यांचेच डोळे पाणावतात. ते (तेज) घरातून जाऊ नयेत, असे लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच वाटत असते.
गणेशजी आपल्या घरातील एक ज्येष्ठ आदरणीय व्यक्तीच बनून गेलेले असतात. सर्वगुणसंपन्न असलेली ही सगुण देवता आपल्या अवतीभवती आहे, याचा विलक्षण आनंद यावेळी आपल्या मनात असतो. केवळ एका ज्ञातीचे हे दैवत नसून समस्त समाजाला देशभक्तीच्या एका सूत्रात बांधून ठेवणारे हे सामाजिक आणि राष्ट्रीय स्तरावरील दैवत. जेव्हा गणेशजी येतात, मनातली सर्व सुख दुःख प्रत्येक जण त्यांना सांगत असतात. कोणावर जबरदस्ती नाही, कडक सोवळे ओवळे नाही. घरातली सर्वजण अगदी मनोभावे यथासांग, यथा मिलितोपचार द्रव्यांनी षोडशोपचार पूजा करत असतात.
या निमित्ताने नवीन खरेदी, बाजारात खरेदीला गर्दी, एका घरातील पैसा बाहेर येतो, दुसऱ्याच्या घरात जातो. चलन हलते फिरते राहाते, पैसा फिरला तर देशाचा आर्थिक विकास होतो, हा अर्थशास्त्रातला नियम. सणांच्या माध्यमातून भारतात हा नियम केवळ पुस्तकात राहिलेला नाही तर व्यवहारात उतरवला गेलाय. त्याचा परिणाम म्हणून भारतात इंग्रज येऊन गेल्यानंतर परिस्थिती दुष्काळी असली तरी आर्थिक मंदीची लाट तशी कधी जाणवली नाही, ती या अशा सणांमुळे आणि त्यातल्या कर्मकांडामुळे !
पाच फळं, पाच भाज्या, पाच पक्वान्न, सणाच्या निमित्ताने का होईना, खरेदी होते, सण म्हणून वेगवेगळे पदार्थ. एकत्रित भोजन, एकत्रित भजन, एकमेकांच्या सहवासात येत असतो. घराला जणुकाही देवालय बनवून टाकलेलं असतं. घराघरातील गणेशतत्व जरी एकच असले तरी प्रत्येकाच्या घरी जावून, प्रत्येक घरातील प्रत्येक गणेशाचे दर्शन होते. एक निमित्त असते, लोकसंग्रह वाढवायचे ! नातेसंबंध वाढवायचे, पौष्टिक खायचे, आरोग्य सुधारायचे !
सकाळी लवकर उठून गणपतीची मनोभावे केलेली पूजा, आरती, शंख, घंटा यातून निर्माण होणारे ध्वनी, झांज, टाळ, तबला, पेटी, पखवाज, घुमट इ. अनेक वाद्यांचे गजर, शब्दलहरी, मंत्रलहरी, त्यांचे नाद, सूर, ताल, लय यांनी घरातील वायुमहाभूताची, आकाश महाभूताची शुद्धी होत असते.
काही आठवतंय पहा,
प्रत्येक कार्याच्या प्रारंभी गणेशजीना पहिला नमस्कार.
आपण जेवायला बसलो की गणेशजीना नैवेद्याचे पान पहिल्यांदा. "तुमच्यामुळे आम्हाला मोदक मिळती खायाला, गणपती बाप्पा मोरया" असं म्हणत गणपतीसाठी केलेले सर्व मोदक आपणच खाऊन टाकायचे....
हे पंचपक्वान्नाचे ताट नैवेद्य म्हणून दाखवून परत सगळ्यांनी समान वाटून घ्यायचे. कोणताही भेदाभेद नाही. कोणाशीही भेदभाव नाही.
पण....
हा असा भरलेल्या ताटाचा नैवेद्य फक्त दुपारी दाखवला जातो.( नाव गणेशाचे खातो आपणच ! )
आणि रात्रीची पेटपूजा ?
?????
नैवेद्याला काय असते ?
आठवावं लागतंय ना !
जशी षोडशोपचार पूजा सकाळी केली जाते, तशी सायंपूजा केली जात नाही. सायंकाळी केली जाते, त्या पूजेला सायंपूजा असे म्हणतात.
सायंकाळी फक्त पंचोपचार आणि आरती ! आणि नैवेद्याला काय असतं ?
फक्त एखादा लाडू, किंवा लाह्यांचं गुळखोबरं घातलेलं पंचखाद्य, किंवा एखादा मोदक किंवा एखादी करंजी किंवा नेव्हरी. ( गोवा, कोकण भागात करंजीला नेवरी म्हणतात.)
बास्स बास्स बास् !
संध्याकाळी झालेल्या या पूजेनंतर गणेशजींचा हा जो नैवेद्य असतो, इथे आरोग्य दडलेलं आहे.
जे जे देवासाठी ते ते देहासाठी. या न्यायानुसार आपणही तेवढे आणि तसेच अन्न खायचे असते.
सकाळ दुपार भरपूर जेवायचे आणि सायंकाळी कमी, रात्रीचे तर नाहीच, हा नियम पुनः एकदा सिद्ध होतो.
सकाळी झालेल्या पूजेनंतर पंचपक्वान्न खाल्ली तरी चालतात. आणि सायंकाळी मात्र एखादाच लाडू किंवा लाह्या सदृश्य काही तरी भाजलेलं, फुलवलेलं, पचायला एकदम हलकं असंच अन्न घ्यावं हा त्यामागील आरोग्य संकेत . समजून घेणाऱ्या समंजसांना हा समज समजतो. बाकी सगळे बुद्धीवादी, भक्ती सोडून ज्ञानाची सालपटं काढत रहातात, आणि आपण मात्र लंबोदर होतात.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
24.06.2017
पुरूषांनी दोन्ही पाय दुमडून जेवायला बसायचे. तर महिलांनी ?
त्यांनी जेवायला बसताना दोन्ही पाय दुमडून उकीडवे बसायचे नाही. तर उजवा पाय गुडघ्यातून आडवा दुमडून घेत, जमिनीला समांतर ठेवत, त्याच्यावर डावा पाय उभा दुमडून पोटाकडे घेत जेवायला बसावे.
आजही अनेक घरातील आज्ज्या याच पद्धतीने बसतात. केवळ जेवायलाच नव्हे तर केव्हाही. बसायचं म्हटलं की, उजव्या पायाची मांडी घालून डावा पाय गुडघ्यातून दुडुन काटकोनात सरळ. आणि पुनः डाव्या हाताने डावा उभा पाय घट्ट आवळून धरायचा.
मग ते वाती वळायला असो, किंवा दळण दळायला, तांदुळ निवडायला असो वा भाजी नीट करायला, मुलांचा अभ्यास घ्यायला असो वा नामजप करायला, धार्मिक कार्य असो वा वो चार दिन !
आसन मांडी एकच.
आज वागणंच एवढं सैल झालं आहे की,
" बसणं जरा सैल केलं, तर काय एवढं बिघडलं ? " असं, फक्त मांड्या घट्ट आवळून घेणारी (काही वेळा तर पायाकडील रक्तपुरवठाच कमी करणारी ) टाईट्ट जीन्स घालून, खुर्चीवर बसून, पाय अधांतरी हलवत, शरीराला झुलवत विचारणार्या, काही कमी नाहीत.
स्त्री पुरूष समानतेच्या काळात असं लिहिणं आणि विचार करणं देखील समस्त स्त्री वर्गावर अन्याय्य आहे, समस्त स्त्री वर्गाला आणि पुरोगामी महाराष्ट्राला हे अपमानास्पद आहे. तीव्र शब्दात आम्ही याचा निषेध करतो. असं म्हणणाऱ्यांनी फक्त एक दोन गोष्टींचा जरूर विचार करावा, की,
गेल्या तीस चाळीस वर्षांत स्त्रीयांची जाडी, पुरूषांच्या तुलनेत, वाढली की कमी झाली ? आणि,
स्त्रीविशिष्ट आजार वाढले की कमी झाले ?
......नक्कीच वाढलेले आहेत.
.....जाडी वाढलेली आहे.
... .वागण्यातला सैलपणा ( की सैराटपणा ? ) वाढलेला आहे.
आसन मांडी बदलणे, हे त्यातील एक कारण असावे.
असं घट्ट बसल्याने गर्भाशय, मूत्राशय, पक्वाशय, डावी किडनी, डिसेंडींग कोलोन, स्वादुपिंड, प्लीहा, आमाशय, ह्रदय, डावे फुफ्फुस आणि पूर्ण पाठीचा कणा हे सगळं पोट, आतून एवढं आवळून घेतलं जाई, की, पोटाची काय हिम्मत होईल, .... बाहेर यायची ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
18.09.2016
आधुनिक प्रतिमाशास्त्रात जवळजवळ सर्वच प्रतिमा कृष्णधवलच असतात; कारण निदानातील सूक्ष्मता ओळखण्यास मानवाचे डोळे कृष्णधवलातच सर्वात जास्त कार्यक्षम असतात.
एखादी अमंगल म्हणजे वाईट गोष्ट अथवा वस्तूची सावलीही ओलांडून जाऊ नये. राख, तृण, विष्ठा, उष्टे खरकटे, पवित्र दगड, वारुळाची माती, एखाद्याच्या नावाने दिलेला बली, विनाकारण ओलांडून जाऊ नये. एखाद्याने स्नान केलेली जागा देखील ओलांडू नये.
१)गाईचे तुप:
बुद्धि,कांती,स्मृती,धारणाशक्ती वाढविते,स्त्रोतसांचे शोधन करते,वातनाशक,स्वर चांगला ठेवते,पित्तनाशक,पुष्टीदायक,भुक वाढविते,वृष्य,आयुष्यकारक,गोड असून सर्व तुपांत श्रेष्ठ आहे.हे विषनाशक,डोळ्यांना हितकर,रसायन असून आरोग्यदायक आहे.
२)म्हशीचे तुप:
धारणाशक्तीवाढविणारे,सुखदायक,
कांतीवर्धक,कफवातनाशक,शक्तिवर्धक शरीरवर्ण सुधारणारे,मुळव्याध नाशक,भुक वाढविणारे व डोळ्यांसाठी हितकर आहे.
३)शेळीचे तुप:
भुक वाढविते,डोळ्यांनाहितकर,बलवर्धक,
खोकला,दमा कमी करणारे,पचायला अत्यंत हल्के असते.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
रोग वाढण्याच्या काही कारणांचा विचार केला असता, त्यातील एक कारण म्हणजे जेवणाची वेळ न पाळणे.
उत्तम आरोग्यासाठी जेवणातील अन्नपदार्थ हा वेगळा च विषय होईल, पण केवळ जेवणाची वेळ पाळल्याने बरेचसे आजार कमी होतात किंवा आयुर्वेदीय परिभाषेत सांगायचे झाल्यास, व्याधीचा संप्राप्ती भंग करता येतो. कमी वेळात व्याधीची लक्षणे कमी होत जातात. आणि लवकर बरे वाटते. म्हणून जेवणाची वेळ पाळणे अत्यंत आवश्यक आहे. जेवणाची वेळ पाळली तर औषध घ्यायच्या वेळा पाळायची वेळ येत नाही.
जेवण नेमके कोणत्या वेळी घ्यावे, असा शोध मी ग्रंथात घ्यायचा प्रयत्न केला, तेव्हा मला थेट उत्तर मिळाले नाही.पण एक श्लोक मात्र मिळाला आणि विचारांना दिशा मिळाली.
अष्टांग संग्रह सूत्रस्थान अध्याय 11-63 मधे शास्त्रकार म्हणतात,
प्रातराशे तु अजीर्णे अपि,
सायमाशो न दूष्यति ।
अजीर्णे सायमाशे तु
प्रातराशो हि दूष्यति ।।
म्हणजे दिवसा सेवन केलेले अन्न सम्यक रितीने जर पचले नाही, आणि जर सायंकाळी भोजन केले तर विशेष हानी होत नाही.
पण सायंकाळी घेतलेले भोजन जर सकाळी पचले नसेल आणि सकाळी पुनः अन्न सेवन केले तर मात्र हानी अवश्य होते.
अजीर्ण होऊ नये म्हणून हा श्लोक उद्धरीत केला आहे. आता शास्त्रकारांनी ज्या कारणासाठी हा श्लोक तिथे सांगितला होता, त्याचे कारण वेगळे होते. अजीर्ण केव्हा होते, कसे होते हे सांगताना हा श्लोक सांगितला आहे.
आता या श्लोकातील दोन शब्दांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. प्रातः आणि सायम् प्रातःकाल आणि सायंकाळ. म्हणजे सकाळ आणि सायंकाळ.
इथे दुपारी आणि रात्री असे शब्द वापरलेले नाहीत. याकडे विशेष लक्ष द्यावे. यावरून असे लक्षात येते, की आपल्या दोन वेळा जेवायच्या. सकाळी आणि सायंकाळी.
हे काही आपल्याला जमणारे नाही बुवा, असं म्हणून, सोडून द्यायचा हा विषय नाही. कारण औषधाशिवाय निरोगी जगायचं असेल तर कुछ ना कुछ करना तो पडेगा ।
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
25.02.2017
Copyright © 2025 | Marathisrushti