अक्षय तृतीया या दिवशी जे काही जप,होम,पितृतर्पण,दान इत्यादी केले जाते ते अक्षय होते,असा शास्त्रसंकेत आहे. वैशाख महिन्यातील शुद्ध पक्षातील तृतीया म्हणजे अक्षय तृतीया या दिवसाला कृतयुगाचा प्रारंभ दिन मानतात. हिंदू संस्कृती जे साडेतीन मुहूर्त पाळतात त्यातील अक्षयतृतीया हा अर्धा मुहुर्ताचा दिवस.
बच्चा भी खेले, बच्चेका बाप भी खेले अशी तोंडी जाहिरात करत खेळणी विकणारे अनेक जण चौपाटीवर, उपनगरी गाड्यांमध्ये, इतरत्र आपल्याला भेटत असतात. त्यातली किती खेळणी तशा प्रकारची असतात, हे सांगणं कठिण आहे. पण कॅलिडोस्कोप हे मात्र अशा प्रकारचं खेळणं आहे यात शंका नाही.
राष्ट्रीय सुरक्षा परिषद भारतात ४ मार्च १९६६ रोजी स्थापन करण्यात आली, म्हणून हा दिवस ‘राष्ट्रीय सुरक्षा दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘नॅशनल सेफ्टी कौन्सिल’ ही एक स्वायत्त संस्था आहे, जी निस्वार्थ भावनेने कार्य करते.
आपल्याला जे छापायचे आहे त्याची प्रतिमा प्रथम एका माध्यमावर घ्यावी लागते. ते माध्यम नंतर छपाई यंत्रावर लावून त्यावरुन कागद किंवा इतर गोष्टींवर छपाई होते. नेहमीच्या वापरातील माध्यमे म्हणजे ब्लॉक्स, टाइप, ऑफसेट फ्लेट्स, दगड, क्रिन इत्यादी. माध्यमामुळे छपाईचे तीन प्रकार पडतात.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्या५साठी साप्ताहिक ‘नवयुग’ कमी पडू लागले म्हणून शिवाजी पार्कच्या सभेत मे १९५६ मध्ये सेनापती बापट यांनी आचार्य अत्रे यांना सुचवले की, लढा यशस्वी करायचा असेल तर एक दैनिक सुरू करा. आचार्य अत्रे यांनी घोषणा केली, ‘१५ नोव्हेंबरपासून ‘मराठा’ नावाचे दैनिक सुरू करेन.’
भारतीय संस्कृतीत पुरातन काळापासून बाहुली-बाहुला खेळला जातोय. त्याचे दाखले आपल्या पाणिनी, ज्ञानेश्वरी आणि दासबोधात वाचायला मिळतात.
२७ मे १९५१ रोजी मुंबईतील तारापोरवाला मत्स्यालयाचे राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते उदघाटन झाले होते. सर्व बाजूने सागराने वेढलेल्या मुंबईला सागरी मत्स्यसंशोधन केंद्र असावे अशी संकल्पना प्रथम १९२३ साली बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेचे कार्यवाहक श्री.मिलार्ड यांनी शासनापुढे मांडली. याचा अभ्यास करण्यासाठी शासनाने मत्स्यव्यवसाय संचालक यांच्या नेतृत्वाखाली १९२६ साली तज्ञसमिती नेमली. दुसऱ्या महायुध्दानंतर मत्स्यालय उभारणीला चालना मिळाली.
मुंबईतलं अतिशय जुनं आणि प्रसिद्ध पर्यटनस्थळाचं अगदी सुरुवातीला म्हणजे २७ मे १९५१ रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या मत्सालयाच्या बांधकामासाठी डी. बी. तारापोरवाला या निसर्गप्रेमी दाम्पत्याने दोन लाख रुपये देणगी दिली होती. केवळ निसर्ग प्रेमी श्री. डी. बी. तारापोरवाला यांनी १९४५ साली दिलेले दोन लाखाच्या रुपयांच्या देणगीमुळे आणि शासनाने दिलेल्या समुद्र तटावरील मोठ्या भूखंडामुळे तारापोरवाला मत्स्यालय उभारणे शक्य झाले. त्यावेळी हे मत्सालय उभारायला ८,९०,९०४ रुपये इतका खर्च आला होता.
तारापोरवाला मत्स्यालयाचे एकूण क्षेत्रफळ ४३६९ चौरस मीटर असून त्यापैकी १३६९ चौरस मीटरवर मत्स्यालयाची विद्यमान इमारत उभी आहे. काळाची गरज ओळखून सुमारे २१ कोटी रुपये खर्चून त्याचं नूतनीकरण करण्यात आलं आहे. सिंगापूमधील जॉर्जिया मत्स्यालयाप्रमाणे तारापोरवाला मत्स्यालयही अंडरग्राऊंड करण्याचा विचार पुढे आला होता. पण, मरीन ड्राईव्हचा उथळ समुद्र या प्रकारच्या मत्स्यालयासाठी योग्य नसल्याने हा प्रस्ताव बारगळला. मग, आहे त्याच जागेत आधुनिक पद्धतीने मत्स्यालयाची उभारणी करण्याचा निर्णय झाला. १८० अंशांमध्ये खाऱ्या पाण्यातील मासे ठेवण्यात आले आहेत. ही काच ॲक्रेलिकची असून, अशा प्रकारे मत्सालय असलेलं हे भारतातलं एकमेव मत्सालय असल्याचं तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे मत्सालयाच्या प्रवेशद्वारापाशीच लोकांची उत्कंठा शिगेला पोहोचते.
प्रवेशद्वारापाशीच आपल्याला भव्य भुयारी मत्सालय ठेवण्यात आलं आहे. प्रवेशद्वाराच्या समोरच पांढऱ्या रंगांतलं माशाच्या आकारातलं कारंज पाहायला मिळतं. त्या कारंज्याच्या बाजूने मुख्य प्रदर्शनी हॉलमध्ये जाता येतं. दर्शनी भागात प्रवेशद्वाराजवळ ओशनेरियम सदृश्य पाण्याचा टँक उभारण्यात आल्यानं आपल्याला समुद्रातून चालत जात असल्याचा नि भोवताली मासे असल्याचा सही फिल मिळतो. आतल्या भागात जुन्या साध्या काचांऐवजी पारदर्शक फ्लेक्सी काचा बसवण्यात आल्यानं टँकमधले मासे नि जलजीव अगदी जवळून पाहता येतात. या मत्सालयात विविध प्रकारच्या माशांच्या सुमारे ४०० जाती ठेवण्यात आल्या आहेत. या मुख्य हॉलमध्ये खाऱ्या पाण्यातील आणि गोडया पाण्यातील मासे असे दोन मुख्य गट तयार करण्यात आले आहेत. खाऱ्या पाण्यात आढळणाऱ्या माशांच्या २०० तर गोडय़ा पाण्यात आढळणाऱ्या २०० जाती ठेवण्यात आल्या आहेत. खाऱ्या आणि गोडया पाण्याचे सतरा ते अठरा टँक आहेत. पैकी गोडया पाण्याचा विभाग हा मध्यभागी करण्यात आला आहे. खाऱ्या पाण्याचा विभाग सागरी कासवाचा टँक सुरू होतो. आणि त्याच्या बाजूला डॅम्सेल, बटरफ्लाय, एंजल, ट्रिगर, कावळा मासा, किळीस, वाम, स्क्विरल, पोम्पॅनो, ग्रुपर, टँग, कोंबडा, व्हिम्पल, मुरीश, सी ॲनिमल आदी प्रकारचे आणि त्यांच्या प्रजातींचे शोभिवंत माशांचे टँक पाहायला मिळतात.
याचं आणखी एक आकर्षण म्हणजे या ठिकाणी जेली फिश नावाची नवीन टाकी मध्यभागी ठेवण्यात आली आहे. अगदी जेलीसारखा दिसणारा हा मासा अतिशय दुर्मीळ आणि छोटा असून तो पाहण्यासाठी आणि त्याला कॅमेऱ्यात टिपण्यासाठी लोकांची झुंबड उडते. मधल्या गोडया पाण्याच्या विभागातही देश-विदेशातील मासे पाहायला मिळतात.यातील विशेष आकर्षण म्हणजे लक्षद्वीप बेटामधून आणलेले सात प्रकारचे प्रवाळ व मासे. तसेच ‘स्टिंग रे’, ‘शार्क’ किवा ‘काळा मासा’, ‘कासवे’ असे डिस्कव्हरीवर पाहायला मिळणारे समुद्री जीव समोर पाहताना मनाला फार आनंद मिळतो. खरं म्हणजे प्रत्येकालाच प्रत्येक माशांची माहिती असेलचं असं नाही. म्हणून या टाक्यांच्या वर त्या माशांचं नाव, त्यांच्या प्रजातीविषयीची माहिती सांगणारे एलईडी टीव्ही प्रत्येक टाकीवर लावण्यात आले आहेत. एलईडी असल्यामुळे स्पष्ट वाचता येतं. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये ही माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे बाहेर पडताना तुमच्या ज्ञानात भरच पडेल यात काही शंका नाही. मुंबईतलं जुनं आणि पर्यटकांच्या नेहमीच आकर्षणाचा विषय असलेलं हे मत्सालय भारतातील महत्त्वाचं पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं.
अशा या समुद्री सफर घडवणाऱ्या मत्स्याल्याला भेट देण्याकरिता तुम्ही वेस्टर्न रेल्वेच्या चर्नी रोड स्थानकावरून चालत किंवा टॅक्सीने जाऊ शकता.(सध्या करोना मुळे बंद आहे.)
वेळ:- मंगळवार ते शनिवार- सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत
रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी- सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत.
"मला सर्वांना वापरता येईल अशी मोटार बनवायची आहे." ३० वर्षांचा फोर्ड सर्वांसमोर आपल्या नवीन तयार केलेल्या मोटारीचे डिझाईन पेश करत होता. त्यांचा जन्म ३० जुलै १८६३ रोजी झाला.
"हि फोर्ड मोटार दणकट, वजनाला हलकी फक्त १००० पौंड वजनाची आहे. ४ सिलिंडर इंजिनाची हि गाडी ताशी ४५ मैल वेगाने धावू शकते. सध्या हिची किंमत फक्त $९०० आहे. हिच्या बरोबरीच्या गाड्या साधारणपणे $१५०० ला विकल्या जातात. आणि यामुळेच हि गाडी सर्वांना परवडणारी जगातील पहिली गाडी असेल." असे म्हणून त्याने सर्वांच्या पुढे आपल्या गाडीचे एक चित्र सरकवले. हेन्री फोर्डच्या उद्योगीपणाचा अनुभव त्याच्या घरच्यांना आणि मित्रांना त्याच्या लहानपणा पासूनच येऊ लागला होता. त्याच्या वयाच्या तेराव्या-चौदाव्या वर्षी त्याच्या वडिलांनी त्याला एक पॉकेट वॉच आणून दिले होते. त्यात तो रमला. इतका की तो पंधरा वर्षाचा होई पर्यंत त्याने आपले शेजारी आणि मित्र यांची घडय़ाळे शंभरदा उघडली आणि पुन्हा त्यांची जुळवणी केली. तो तेरा वर्षांचा असताना त्याचे मातृछत्र हरपले आणि तो जवळपास मानसिकरीत्या उध्वस्त झाला. त्याचे त्याच्या आईवर खूप प्रेम होते.
समजू लागले त्या वयापासूनच यंत्राशी त्यांची मैत्री झाली, या यंत्रांच्या ओढीनेच ‘अश्वहीन रथ’ म्हणजेच मोटरगाडी बनविण्याचे त्यांना पडलेले स्वप्न आणि त्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीच्या साथीने केलेले कठोर परिश्रम नक्कीच कौतुकास्पद आहेत. घोडय़ाशिवाय कधी रथ चालतो काय, अशी चेष्टा लोक करीत. शेवटी अनेक दुरुस्त्या करीत १८९३ मध्ये त्याने आपली गाडी रस्त्यावर आणलीच. मात्र पोलिसांशी हुज्जत घालण्याचे प्रसंग वारंवार येऊ लागले, या गाडीच्या आवाजाने घोडे उधळतात,गाई दूध देत नाहीत, कोंबडय़ा अंडी घालत नाहीत, रस्ते खराब होतात, अशा तक्रारी लोक करीत होते. आज हे वाचताना गंमत वाटते.अशा तक्रारी लोक करू लागले. शेवटी डेट्रॉइटच्या नगरपालांकडून हेन्री फोर्ड यांनी गाडी चालविण्याचा परवाना काढला.अमेरिकेतला हा पहिला परवाना होता.
हेन्री फोर्ड यांचे ७ एप्रिल १९४७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / विनोद शिवाजी गोरे
हा चित्रपट काढण्यास राजकपूर यांना प्रवृत होण्यास एक कॉमिक जबाबदार आहे. राजकपूर नेहमी आर्ची कॉमिक्स वाचत असत, एक दिवस ते कॉमिक वाचत असताना त्यांतील एक संवाद त्यांना वाचण्यास मिळाला तो होता ‘यू आर टू यंग टू फॉल इन लव’ – ये उम्र नहीं है प्यार की. हा संवाद वाचून त्यांच्या डोक्यात वीज चमकल्या सारखे झाले व बॉबीची कल्पना आली.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळामार्फत ‘किशोर’ची निर्मिती झाली, ती मूळ संकल्पना होती, तत्कालीन शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी यांची.
Copyright © 2025 | Marathisrushti