शिवसेना या संघटनेची स्थापना १९ जून १९६६ रोजी झाली. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धोरणाने स्थापन झालेल्या संघटनेचे मा. प्रबोधनकार ठाकरे यांनी शिवसेना असे नामकरण केले.
मा.प्रबोधनकार ठाकरे यांच्या खोलीत अवघ्या १८ जणांच्या साक्षीने ‘शिवसेने’ची स्थापना झाली होती. मराठी माणसासाठी लढणारी आक्रमक संघटना यापुरतीच शिवसेनेची कार्यकक्षा सीमित होती. स्थापनेनंतर एक महिन्याने झालेल्या बैठकीत उपस्थितांनी शपथ घेतली होती. या शपथेचा मसुदा होता आपली मालमत्ता परप्रांतीयांना विकू नये, मराठी ग्राहकांशी विनयाने वागावे, मराठी नोकर नेमावे, मराठी शाळा, संस्थांना मदत करावी, मराठी बांधवांची गृहरचना संस्था काढावी, मराठी सण-समारंभांत भाग घ्यावा, मराठी बांधवांच्या मदतीला धावा याबरोबरच इंग्रजी टायपिंग शिकावे, आळस झटका, उडपी हॉटेलवर बहिष्कार टाकावा, मराठी व्यावसायिकाची उमेद वाढवा, त्याला नामोहरम करू नका, राज्यात कोठेही काम करण्याची मानसिकता जोपासा. शिवसेनेची स्थापना झाल्यावर २६ जून १९६६च्या ‘मार्मिक’मध्ये शिवसेनेचे बोधचिन्ह म्हणून डरकाळ्या फोडणारा ‘वाघ’ छापण्यात आला. सोबत शिवराय होतेच. पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे चित्र आणि ‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ हे वचन लिहिले होते आणि मोठ्या अक्षरात मराठी माणसाच्या या संघटनेचे नाव छापले होते ‘शिवसेना’!
शिवसेनेचा पहिला मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला तब्बल चार लाख लोक जमले होते. ‘मार्मिक’ वगळता इतर कोणत्याही वर्तमानपत्रात शिवसेनेच्या शुभारंभाच्या मेळाव्याची घोषणा अथवा जाहिरात नव्हती. तरीही मुंबई आणि महाराष्ट्रातल्या अन्य भागांतून मेळाव्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. शिवाजी पार्क खच्चून भरले होते. विशेष म्हणजे, दादर रेल्वे स्थानकावरून शिवाजी पार्ककडे जाणारे रस्ते फुलून गेले होते. शाहीर साबळे यांच्या गाण्याने मेळाव्याची सुरुवात झाली. मेळाव्याला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना प्रबोधनकार म्हणाले, ठाकरे कुटुंबाचा असलेला हा बाळ मी तुम्हाला, या महाराष्ट्राला आज अर्पण करत आहे!
शिवसेनेच्या पहिल्या मेळाव्याची मार्मिकमधील जाहिरात.
मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या शिवसेनेचा भव्य मेळावा.
मार्मिक कचेरी :
७७- ए रानडे रोड, शिवाजी पार्क,
मुंबई-२८, डीडी
फोन : ४५२८९२
दि. २७ आक्टोबर १९६६
जय महाराष्ट्र वि. वि.
महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्फूर्तिदायक चरणांवर प्रतीक्षेचा माथा ठेवून महाराष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी सिद्ध झालेल्या शिवसेना सैनिकांचा मेळावा रविवार दि. ३० आक्टोबर १९६६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता, शिवाजी पार्क, दादर येथे.
भरणार आहे. आपण महाराष्ट्राचे निष्ठावंत अभिमानी. आपण या मेळाव्याला जातीने हजर राहावे, अशी शिवसैनिकांच्या वतीने मी आपणास विनंती करत आहे.
आपला नम्र, महाराष्ट्रसेवक
- बाळ ठाकरे
शिवसेनेचा इतिहास अनेक प्रकारे लिहिला जाईल. पण त्यातील दोन गोष्टी इतिहासाला ठामपणे लिहाव्याच लागतील. त्या दोन गोष्टी म्हणजे शेवट पर्यत एका पक्षाचा एकच नेता आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजकारणात राहून जात न माणणारा आणि मित्रता कायम जपणारा नेता. असा माणूस राजकारणात आता होणे नाही. दिलेला शब्द न मोडणारा, ‘तुझी जात कोणती’ असे न विचारता निवडणुकीत तिकीट देणारा आणि १९९५चे मंत्रिमंडळ महाराष्ट्रातील सर्व छोटय़ा-मोठय़ा जातींचे तयार करून सामाजिक समतेच संदेश देणारा देशातील एकमेव नेता म्हणजे मा.बाळासाहेब ठाकरे.
शिवसेनेचे सामर्थ्य वाढले ते सामान्य माणसाला बाळासाहेबांनी ताकद देऊन मोठे केले आणि ते स्वत: सत्तेपासून दूर राहिले म्हणून. आपल्याभोवती जमलेल्या सवंगड्यांवर त्यांनी विश्वास टाकला. त्यांना मोठे केले. आज महाराष्ट्रात बाळासाहेबांमुळे राजकारणात मोठी झालेली जी माणसे आपण पाहतो आहोत, ती माणसे मनमोकळेपणाने आपल्या यशाचे सर्व श्रेय बाळासाहेबांना देतात, त्यात संकोच करीत नाहीत.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
June 19, 2022
१८२२ मध्ये सर विल्यम एर्स्किन यांनी आपल्या लेखनात जॉन स्मिथ दैनंदिनी ईस्ट इंडिया कंपनीचे निर्देशनासह अजिंठा लेणी स्थापत्य, शिल्प व चित्रांची चर्चा केली आहे. इसवी सन पूर्व २०० च्या सुमाराला लेणी खोदण्यास सुरुवात झाली होती. पैठणच्या सातवाहन घराण्यातील सम्राटानी याची सुरुवात केली. सातवाहन काळात ८, ९, १०,१२, १३ आणि १५ या लेण्यांचे खोदकाम पूर्ण झाले. पुढे जवळपास ५०० वर्षे खोदकाम बंद होते त्यानंतर पुन्हा पाचव्या शतकात गुप्त , वाकाटक आणि बदामीच्या चालुक्यांनी येथील लेण्यांचे खोदकाम सुरु केले.
April 28, 2022
निसर्गराजाने एकदाच… फक्त एकदाच…. असा चमत्कार केला होता, जो पाहून -ऐकून लाखो लोक आश्चर्यचकित झाले होते ! अमेरिकेच्या उत्तरेस असलेल्या आणि अमेरिका-कॅनडा देशांच्या सरहद्दीवर हजारो वर्षे अष्टौप्रहर कोसळत असलेल्या अतिप्रचंड जलप्रपाताचे, नायगारा धबधब्याचे कोसळणे २९ मार्च १८४८ रोजी अचानक थांबले आणि तब्बल तीस तास त्यातून पाणी आलेच नाही. नायगारा ठणठणीत कोरडा पडला होता !
March 29, 2022
ब्रेड हा आज अनेकांच्या रोजच्या आहारातील पदार्थ झाला आहे. दर वर्षी फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘रिअल ब्रेड वीक’ म्हणजेच भेसळमुक्त पाव आठवडा म्हणून साजरा केला जातो. या वर्षी २० फेब्रुवारी २०२१ ते २८ फेब्रुवारी २०२१ रिअल ब्रेड वीक साजरा केला जात आहे.
जे नैसर्गिक पद्धतीने ब्रेड बनवतात, अशांसाठी हा आठवडा खास साजरा केला जातो.
नैसर्गिक पद्धतीने ब्रेड म्हणजे ज्या ब्रेडसाठी खाण्याचा सोडा, ॲकस्कॉर्बिक ॲसिड, चव वाढवणारी द्रव्ये यांपकी काहीही वापरलं जात नाही तो
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
February 24, 2022
२०१४ पर्यंत सायबर सोमवार हा वर्षातील सर्वात व्यस्त दिवस होता, मात्र यावेळी ऑनलाइन डेस्कटॉप विक्री $2 अब्ज पेक्षा जास्त होती आणि त्यात यूएस हा इतिहासातील सर्वात व्यस्त दिवस होता.
November 29, 2021
कडाऊन करण्याची तीन प्रमुख कारणे होती. पहिले उद्दिष्ट म्हणजे, विषाणूची साखळी तोडणे. साखळी तोडली, तर विषाणूचे पेशीविभाजन रोखले जाईल. दुसरे म्हणजे, बाधित व्यक्तिंमध्ये वाढ झाली, तर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तयारी करायला आरोग्य यंत्रणेला अवधी मिळेल आणि तिसरे उद्दिष्ट म्हणजे, मानवी वर्तणुकीवर काम करणे. याचा अर्थ पुरुष, स्त्रिया आणि मुलांना हात धुणे, मास्क घालणे आणि सुरक्षित वावराचे नियम पाळण्याची सवय लावणे.
March 24, 2022
अन्नदिनाच्या निमित्ताने गरीबी आणि भूकमारी विषयी जागरूकता वाढवण्यावर आणि त्यासंदर्भातील उपाययोजनांवर भर देण्यात येतो. १९८१ पासून जागतिक अन्नदिनाच्या निमित्ताने दरवर्षी एक वेगळी संकल्पना मांडली जाते.
October 16, 2021
२६ ऑक्टोबर १९४७ रोजी काश्मीरचे तत्कालीन महाराज हरी सिंह यांनी जम्मू-काश्मीरच्या भारतातील विलीनीकरणाच्या करारनाम्यावर सही केली खरी पण त्याआधीच पाक पुरस्कृत टोळीवाले श्रीनगरच्या दिशेने कूच करून येत होते आणि ते उरी पर्यंत पोचले देखील होते.
पाकिस्तानी सैन्याने ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच “ऑपरेशन गुलमर्ग” या नावाने कारवाई चालू केली होती.
October 27, 2023
१९५६ साली गव्हर्नमेंट ऑफ नागालँडची घोषणा करण्यात आली, मुळात साहित्यिकाचा पिंड असणाऱ्या फिझोने तर स्वतंत्र नागा राष्ट्राचे राष्ट्रगीत देखील लिहून ठेवले होतेचं, शिवाय राष्ट्रध्वज देखील तयार करण्यात आला. या हालचाली पाहता नागाहिल्सवर भारतीय लष्काराची संख्या वाढविण्यात आली.
December 1, 2021
१८५० पासून असे पेन बाजारात आले. अशा शाईच्या पेनमध्ये धातूची निब असते. या निबमध्ये मधोमध एक भेग असते व त्याच्या मुळाशी एक भोक असते. शाई साठवण्यासाठी निबच्या विरुद्ध बाजूस नळीत द्रवरूप शाई भरलेली असते. कागदावर निब ठेवली असता शाई गुरुत्वाकर्षणाने निबकडे येते.
November 5, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti