जगातील वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांविषयी लोकांच्या मनात जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ११ जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो.
समर्थावर सन्त एकनाथाच्या वाग्मयाचा प्रभाव असल्याने प्रपंच आणि परमार्थ नेटका करण्यासाठी विवेकसंपन्न व्हा, असा उपदेश केला. आनंदवनभुवनाचे स्वप्न पाहिले. हिंदुस्थान बलसंपन्न व्हावा यासाठीच क्षात्रतेज व ब्राह्मतेज जागविले.
पुण्यातील नाना पेठ परिसरातील ऐतिहासिक सिटी चर्चने आज २२७ वर्षे पूर्ण केली आहेत. पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील क्वार्टरगेट जवळील ऑर्नेलाज हायस्कूल शेजारी हे भव्य कॅथोलिक चर्च उभे आहे. "इमॅक्युलेट कन्सेप्शन ऑफ मदर मेरी" चर्च असेही याला संबोधले जाते. विशेष म्हणजे या सिटी चर्चच्या सभोवताली मोठी मुस्लिम वस्ती असून चर्चच्या कम्पाऊंड व भिंत व बाजूच्या मशिदीची भिंत एकच आहे. धार्मिक सलोख्याचे हे विलोभनीय उदाहरण मानावे लागेल.
पुण्यातील सिटी चर्चचा इतिहास :
पुण्यातील सिटी चर्चसाठी सवाई माधवराव पेशवे यांनी सुमारे चार एकर जागा दिली होती. अटकेपार झेंडे लावणाऱ्या पराक्रमी श्रीमंत पेशव्यांच्या फौजेत डॉम मॅन्यूल डि नोव्हो हा पोर्तुगीज लष्करी अधिकारी सेवेत होता. पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोवा आणि उत्तर कर्नाटक येथून श्रीमंत पेशव्यांच्या फौजांसाठी सैन्यभरती करीत असत. त्यामुळे पेशव्यांच्या फौजांमध्ये अनेक पोर्तुगीज व ख्रिस्ती सैन्य असायचे. पोर्तुगीज अधिकारी डॉम मॅन्यूल डि नोव्हो हा साऱ्या सैन्याच्या गरजांकडे लक्ष देत असे.
सैन्यातील ख्रिश्चनांची गरज त्यांनी श्रीमंत पेशव्यांच्या कानावर घातली आणि श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या मागणीस तत्काळ मान्यता देऊन सध्याच्या नाना पेठेत चार एकर जागा कॅथोलिक चर्च बांधण्यासाठी दिली. तसेच आपले कारभारी नाना फडणवीस यांना सांगून आर्थिक मदत दिली. तेथे ८ डिसेंबर १७९३ मध्ये सध्याच्या चर्चची पायाभरणी होऊन प्राथमिक शेड बांधली गेली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने बांधकाम होत प्राथमिक चर्चची वास्तू आकारास आली.
पेशव्यांनी दिलेल्या जागेवर पायाभरणी करून बांधलेल्या शेडमध्ये २५ डिसेंबर १७९२ मध्ये उल्हासात ख्रिसमस साजरा करण्यात आला. चर्चची उभारणी करण्यासाठी उपस्थित ख्रिश्चन बांधवांनी वर्गणी काढून निधी उभारला. तेव्हा सुध्दा त्यात श्रीमंत माधवराव पेशव्यांनी देखील त्यात सढळ हाताने वैयक्तिक आर्थीक मदत केली. सुमारे वर्षभरात सन १७९३ मध्ये चर्चची बांधणी पूर्ण झाली. त्यानंतर दरवर्षी ८ डिसेंबर रोजी स्थापना दिन आणि २५ डिसेंबरला ख्रिसमस येथे साजरा होतो व त्यात श्रीमंत पेशव्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. या चर्चचा विस्तार ब्रिटिश सत्तेच्या कालावधीत होऊन १८५२ मध्ये दगडी इमारत झाली म्हणजे तब्बल १०० वर्षांनी आजचे चर्च आकारास आले.
गेल्या २२७ वर्षांत येथे रोज प्रार्थना व विविध धार्मिक सामाजिक उपक्रमाची परंपरा चालू आहे. सर्व जाती धर्मांमध्ये येथे सलोखा निर्माण करण्यातही या सिटी चर्चचा सदैव पुढाकार राहिला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
https://youtu.be/CZTyUzFmkXQ
आकाशवाणीवरून पहिल्यांदा बातम्या प्रसारित झाल्या त्या घटनेला ९७ वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने भारतीय प्रसारण दिवस साजरा केला जातो.
आपल्याला लहानपणी खारुताईचं चित्र असलेलं एक वॅफल पॅकेट मिळायचं. बऱ्याच जणांना ते आवडत होतं. पण वेळ जसा पुढे सरकत गेला तसं ते पॅकेटही कालबाह्य होत गेलं. बऱ्याच लोकांना ते अजून डोळ्यांसमोर येत असेल पण काय करणार ते पॅकेट आता मिळत नाही. अशांना मी आज वॅफल कसं बनवतात ते सांगणार आहे.
भारतमातेसाठी बलीदान करणाऱ्या क्रांतीकारकांमध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांची नावे एकत्रितपणे घेतली जातात. इंग्रज अधिकारी सँडर्स याच्या जाचातून मुक्तता करणाऱ्या या तिघांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.
सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर माणसाच्या प्रत्येक भावनेसाठी आज इमोजी उपलब्ध आहेत. व्हॉट्सअॅप, मेसेंजर यांच्यामुळे इमोजी आताच्या काळात संदेश पाठवतानाच्या अविभाज्य भाग बनल्या आहेत इतक्या की चक्क त्यांच्या साठी स्वतंत्र दिवस सुद्धा साजरा केला जातोय.
हनुमान आणि रुद्र : हनुमानाला रुद्राचा अवतार मानतात. पुराणकाळात हे नाते विकसित झाले. स्कंद पुराण (अवंतीखंड ८४), ब्रह्मवैवर्त पुराण (कृष्णजन्मखंड ६२), नारदपुराण (पूर्वखंड ७९), शिवपुराण (शातारुद्रसंहिता २०), भविष्यपुराण (प्रतिसर्ग पर्व १३०), महाभागावात्पुरण (३७) इ.ठिकाणी रुद्र व हनुमान हे नाते स्पष्ट केले आहे. हनुमानाची एकादश रुद्रांत गणना होते. भीम हे एकादश रुद्रांतील एक नाव आहे. म्हणूनच समर्थानी त्याला भीमरूपी महारुद्र म्हटले आहे. हनुमानच्या पंचमुखी मूíत रुद्रशिवाच्या पंचमुखी प्रभावातून आली आहे.
14 सितंबर 1949 को संविधान सभा ने एक मत से निर्णय लिया कि हिंदी ही भारत की राजभाषा होगी. देश के पहले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू ने कहा कि इस दिन के महत्व देखते हुए हर साल 14 सितंबर को हिंदी दिवस मनाया जाए. बता दें, पहला हिंदी दिवस 14 सितंबर 1953 में मनाया गया था.
१८ एप्रिल १९७५ रोजी "सामना" मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. मराठी चित्रपटसृष्टीतील "सामना‘ चित्रपट हे एक महत्त्वाचे वळण. ‘मारुती कांबळेचं काय झालं’ या अजरामर संवादासह सरपंच आणि मास्तर यांच्यातील संभाषणाची जुगलबंदी, . हा मास्तर, गप, गुमान र्हावा की… कशाला उगाच नसत्या चौकशा… आणि त्याच जोडीला ‘सख्या रे घायाळ रे हरिणी ’हे सामना चित्रपटांतील जबरदस्त गाणे व स्मशानशांतता असलेल्या महालांतील ती निघृण हत्या, याने गाजलेला गिरीराज पिक्चर्स या बॅनरचा 'सामना' हा चित्रपट. या चित्रपटाने राज्यातील सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली. एका ध्येयनिष्ठ मास्तरने (डॉ. श्रीराम लागू) एका सहकार सम्राटाच्या (निळू फुले) अस्तित्वास दिलेले आव्हान या कथासूत्राभोवती हा चित्रपट होता. हा चित्रपट झळकला आणि नंतर २५ जून रोजी देशात आणीबाणी जाहीर झाल्याने, या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालून तो चित्रपटगृहातून उतरवण्यात आला. विजय तेंडुलकरांची कथा-पटकथा-सवांद असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल यांचे होते. तर निर्मिते रामदास फुटाणे व माधव गालबोटे हे होते. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित पहिला चित्रपट. "सामना" चित्रपटाने बर्लिन महोत्सवात भारताची ‘प्रवेशिका’ म्हणून गेलेला पहिला मराठी चित्रपट मान मिळवला. या चित्रपटात स्मिता पाटील यांनी छोटी भूमिका केली होती. 'या टोपीखाली दडलंय काय' या गाण्यात 'पप्पा……… ' स्मिता पाटील होत्या. डॉ. श्रीराम लागू व निळू फुले यांच्या अभिनयाचा 'सामना' खूप गाजला. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा 'माईलस्टोन' सिनेमा आहे. त्या वेळी अवघ्या दीड लाख रुपयांत चित्रपट बनला गेला. बेचाळीस वर्षांनंतरही ब्लॅक एन्ड व्हाईट मध्ये असूनही हा चित्रपट आजही त्याच उत्साहाने बघितला जातो. व चित्रपटाची विविध संदर्भात विशेष चर्चा सुरु असतेच.
सामना १९७५ सामाजिक
३५ मिमी/रंगीत/११२मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी७६७०५/२-१-१९७५./यू
निर्मिती संस्था :गिरीराज पिक्चर्स
निर्माता :रामदास फुटाणे, माधव गानबोटे
दिग्दर्शक :जब्बार पटेल
कथा :विजय तेंडुलकर
पटकथा :विजय तेंडुलकर
संवाद :विजय तेंडुलकर
संगीत :भास्कर चंदावरकर
छायालेखन :सूर्यकांत लवंदे
संकलक :शा. वैद्य
गीतलेखन :आरती प्रभु, जगदीश खेबुडकर,जब्बार पटेल
कला :दिनानाथ चव्हाण
रंगभूषा :निवृत्त दळवी
वेषभूषा :पांडुरंग खटावकर
नृत्य दिगदर्शक :सोहनलाल
स्थिरचित्रण :डी. व्ही. राव
गीत मुद्रण :बी.एन्.शर्मा, रॉबिन चटर्जी
ध्वनिमुद्रक :रामनाथ जठार, बाबा लिंगनूरकर
निर्मिती स्थळ :जयप्रभा स्टुडिओज्, कोल्हापूर, शालिनी स्टुडिओज्, कोल्हापूर
रसायन शाळा :बॉम्बे फिल्म लॅबोरेटरीज
कलाकार :अस्वले गुरुजी, आबू, आशा पाटील, उदय लागू, उषा नाईक, औंधकर, नंदू पोळ, निळू फुले, भालचंद्र कुलकर्णी, मीटकर, मोहन आगाशे, रजनी चव्हाण, रमेश टिळेकर, लालन सारंग, विलास रकटे, शहाजी बारे, शिवाजी भोसले, श्रीराम लागू, संजीवनी बिडकर, सुरेखा शहा, स्मिता पाटील, हेमसुवर्णा
पार्श्वगायक :लता मंगेशकर, उषा मंगेशकर, रवींद्र, श्रीराम लागू
गीते :१) कुण्याच्या खांद्यावर कुणाचे ओझे, २) हा महाल कसला रानझाडी ही दाट, ३) कुणी तरी अशी पटापट गंमत आम्हा सांगिल काय या टोपीखाली दडलय काय?, ४) सख्या चला बागांमधी रंग खेळू चला, ५) रंगमहाली रंगबाजीचा डाव आला रंगाला
कथासूत्र. खेड्यातून आता श्रीमंत झालेला बागाईतदारांचा एक वर्ग राजकारणात शिरून पुढारी बनतो व अनेक कृष्णकृत्ये करतो आणि अशा तथाकथित पुढाऱ्यांना वेळीच काबूत ठेवले पाहिजे हे कथासूत्र.हिंदुराव धोंडे पाटील हे पुढारी आणि जुने ज्वलंत गांधीवादी मास्तर.दोघांची मैत्री जमली.म्हणजे पाटलांनी चातुर्याने जमवली.पण एका खुनाच्या प्रकरणाने मास्तर अस्वस्थ झाले आणि पाटील व मास्तर असा सामना सुरु झाला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
खालील लिंक क्लिक करून "सामना‘ चित्रपट बघू शकता.
https://www.youtube.com/watch?v=qss_9no2Oeo
https://www.youtube.com/watch?v=EqnFwzOtcAM
Copyright © 2025 | Marathisrushti