एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इथे
या सणासाठी शेतकऱ्या मध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा या साठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात.
हे नाटक माहिती नसलेला मराठी रसिक विरळाच. आपल्या लिखाणाने आणि नाटकांनी रसिकांच्या मनावर अनेक दशके अधिराज्य गाजवणारे साहित्यिक, संगीतकार, अभिनेते, विज्ञानप्रेमी असे बहुरूपी व्यक्तीमत्त्व म्हणजे पु.ल.देशपांडे.यांनी लिहिलेले ‘वाऱ्यावरची वरात’ हे नाटक.
विद्यापीठाची एकूण ३७ वसतिगृहे असून त्यांपैकी सहा वसतिगृहांत मुलीच राहतात. विद्यापीठीय आवारात २८ वसतिगृहे आहेत. विद्यपीठाचे एक सुसज्ज आंतरराष्ट्रीय वसतिगृह असून तेथे पन्नास विदेशी विद्यार्थी राहण्याची सोय आहे.
पुण्यातील नाना पेठ परिसरातील ऐतिहासिक सिटी चर्चने आज २२७ वर्षे पूर्ण केली आहेत. पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील क्वार्टरगेट जवळील ऑर्नेलाज हायस्कूल शेजारी हे भव्य कॅथोलिक चर्च उभे आहे. "इमॅक्युलेट कन्सेप्शन ऑफ मदर मेरी" चर्च असेही याला संबोधले जाते. विशेष म्हणजे या सिटी चर्चच्या सभोवताली मोठी मुस्लिम वस्ती असून चर्चच्या कम्पाऊंड व भिंत व बाजूच्या मशिदीची भिंत एकच आहे. धार्मिक सलोख्याचे हे विलोभनीय उदाहरण मानावे लागेल.
पुण्यातील सिटी चर्चचा इतिहास :
पुण्यातील सिटी चर्चसाठी सवाई माधवराव पेशवे यांनी सुमारे चार एकर जागा दिली होती. अटकेपार झेंडे लावणाऱ्या पराक्रमी श्रीमंत पेशव्यांच्या फौजेत डॉम मॅन्यूल डि नोव्हो हा पोर्तुगीज लष्करी अधिकारी सेवेत होता. पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोवा आणि उत्तर कर्नाटक येथून श्रीमंत पेशव्यांच्या फौजांसाठी सैन्यभरती करीत असत. त्यामुळे पेशव्यांच्या फौजांमध्ये अनेक पोर्तुगीज व ख्रिस्ती सैन्य असायचे. पोर्तुगीज अधिकारी डॉम मॅन्यूल डि नोव्हो हा साऱ्या सैन्याच्या गरजांकडे लक्ष देत असे.
सैन्यातील ख्रिश्चनांची गरज त्यांनी श्रीमंत पेशव्यांच्या कानावर घातली आणि श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या मागणीस तत्काळ मान्यता देऊन सध्याच्या नाना पेठेत चार एकर जागा कॅथोलिक चर्च बांधण्यासाठी दिली. तसेच आपले कारभारी नाना फडणवीस यांना सांगून आर्थिक मदत दिली. तेथे ८ डिसेंबर १७९३ मध्ये सध्याच्या चर्चची पायाभरणी होऊन प्राथमिक शेड बांधली गेली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने बांधकाम होत प्राथमिक चर्चची वास्तू आकारास आली.
पेशव्यांनी दिलेल्या जागेवर पायाभरणी करून बांधलेल्या शेडमध्ये २५ डिसेंबर १७९२ मध्ये उल्हासात ख्रिसमस साजरा करण्यात आला. चर्चची उभारणी करण्यासाठी उपस्थित ख्रिश्चन बांधवांनी वर्गणी काढून निधी उभारला. तेव्हा सुध्दा त्यात श्रीमंत माधवराव पेशव्यांनी देखील त्यात सढळ हाताने वैयक्तिक आर्थीक मदत केली. सुमारे वर्षभरात सन १७९३ मध्ये चर्चची बांधणी पूर्ण झाली. त्यानंतर दरवर्षी ८ डिसेंबर रोजी स्थापना दिन आणि २५ डिसेंबरला ख्रिसमस येथे साजरा होतो व त्यात श्रीमंत पेशव्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. या चर्चचा विस्तार ब्रिटिश सत्तेच्या कालावधीत होऊन १८५२ मध्ये दगडी इमारत झाली म्हणजे तब्बल १०० वर्षांनी आजचे चर्च आकारास आले.
गेल्या २२७ वर्षांत येथे रोज प्रार्थना व विविध धार्मिक सामाजिक उपक्रमाची परंपरा चालू आहे. सर्व जाती धर्मांमध्ये येथे सलोखा निर्माण करण्यातही या सिटी चर्चचा सदैव पुढाकार राहिला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
https://youtu.be/CZTyUzFmkXQ
बोरीबंदर ते ठाणे अशी पहिली स्टीम इंजिन असलेली ट्रेन धावल्यानंतर या ट्रेनचा विकास होण्यास बराच कालावधी लागला आणि त्यानंतर पहिली ईएमयु (वीजेवर चालणारी )लोकल धावण्यास १९२५ साल उजाडले.
६ ऑगस्ट १९२० साली पहिल्या स्थानिक सेन्सॉर बोर्डची मुंबईत स्थापना झाली. याच बरोबर कलकत्ता, मद्रास, व रंगून स्थानिक सेन्सॉर बोर्डची स्थापना केली गेली.
पहिले सेन्सॉर प्रमाण पत्र गोउमुंट कंपनी ला देण्यात आले.
अमेरिकेत हॉलीवूडमध्ये चलचित्राच्या सेन्सॉरशिपची पहिली घटना घडली १८९७ मध्ये जेव्हा जेम्स कॉर्बेट व रॉबर्ट फिट्झसिमन्स यांच्यातील हेवीवेट वजनी गटातील सामना दाखवायला बंदी घातली गेली होती. १९१५ मध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने म्युच्युअल फिल्म कॉर्पोरेशन वि. इंडस्ट्रिअल कमिशन ऑफ ओहायो यांच्यातील खटल्यात सिनेमा हा तद्दन व्यवसाय असल्याने त्यावर सेन्सॉरशिपला विरोध दर्शविला होता. मात्र, १९१५ ते १९५२ या काळात स्थानिक, राज्य व केंद्र सरकारी पातळीवर सेन्सॉरशिप लागू करण्याचे बरेच प्रयोग झाले. अमेरिकन शासनाने सेन्सॉर बोर्ड स्थापन करू नये यासाठी १९२२ मध्ये रिपब्लिकन पक्षाचा वकील व वजनदार अशा विल हेज याच्या नेतृत्वाखाली प्रोड्युसर्स आणि डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशन (PDA) ही संघटना स्थापन झाली जिने शासनाने हस्तक्षेप करण्याआधी स्वतःच काही बंधने घालून घेतली. १९३४ साली जोसेफ ब्रीनच्या नेतृत्वाखाली प्रॉडक्शन कोड अॅडमिनिस्ट्रेशन (PCA) या संघटनेने १ जुलै, १९३४ पासून पुढे येणाऱ्या सर्व सिनेमांना प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले. ब्रीनने हा कायदा अतिशय कडक व त्रासदायक केला.
तथाकथित नैतिकता व धार्मिकता पाळणे हे अक्षरशः बंधनकारक केले. पुढे १९५२ साली अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात PCA चा अधिकार खूपच कमी केला. हा निर्णय 'मिरॅकल' या सिनेमाशी संदर्भित खटल्याशी संबंधित असल्याने त्याला 'मिरॅकल डिसीजन' (जादुई निर्णय!) म्हटले जाते. यानंतर 'द मून इज ब्ल्यू' या १९५३ च्या सिनेमात Virgin, Seduce इ. शब्दांचा प्रथमच वापर करण्यात आला. जगभरातील बहुतांश देशांत चित्रपटाच्या सेन्सॉरशिपशी संबंधित कायदे व बोर्ड अस्तित्वात आहेत. भारतात पहिला सिनेमा १९१३ साली आला आणि सेन्सॉर बोर्डाची स्थापना १९२० साली झाली.
सिनेमेटोग्राफ एक्टच्या खाली सेंट्रल बोर्ड ऑफ़ सेन्सॉर ची १९५२ मधे स्थापना झाली. कालांतराने त्यात काही नवे बदल घडवून १९८३ मध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ़ सर्टिफिकेशन असं नामकरण करण्यात आलं. आधी फक्त ‘यु’आणि ‘ए’अशी दोनच प्रमाण पत्रे दिली जायची..नंतर ती ‘यु’, ’यु/ए’, ’ए’ आणि ‘एस’ अशी विविध वयोगटानुसार,प्रेक्षकवर्गानुसार देण्यात येतात.मात्र हे देण्यासोबतच काही सीन्स, शब्द, वाक्यांना सेन्सॉर बोर्ड बिनबोभाटपणे कात्री लावते.प्रदर्शनाला बंदी घालते.
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
तृतीय पंथी व्यक्तींना सुप्रीम कोर्टाने ‘तिसरे’ लिंग म्हणून २०१४ मध्ये मान्यता दिली. त्या मुळे त्यांना शिक्षण, नोकरी इत्यादी ठिकाणी आरक्षणही मिळेल व अधिक महत्त्वाचे व आनंदाचे हे की त्यांना आपले लिंग स्त्री वा पुरूष असे लिहिणे बंधनकारण रहाणार नसून ‘इतर’/’तृतीयलिंगी’ व्यक्ती म्हणून कायदेशीर रित्या वैध मार्गाने जीवन जगता येऊ लागले. या निमित्ताने महाराष्ट्र सरकार तर्फे तृतीय पंथी ओळख सप्ताह पाळला जातो.
भारतातील अनेक शहरांमध्ये सहसा पादचाऱ्यांची सोय आणि सुरक्षितता ह्याकडे दुर्लक्ष होत आले आहे. पुण्यामध्ये मात्र स्ट्रीट डिझाईन गाईडलाइन्स, पादचारी धोरण, नॉन मोटर राईड वाहतूक समिती अशा अनेक घटकांमुळे हे चित्र पालटण्यास काही अंशी सुरुवात झाली आहे.
२५ एप्रिल १९८२ रोजी भारतात रंगीत दूरचित्रवाणी प्रक्षेपणाची सुरुवात झाली. १९८२ मध्ये भारतात झालेल्या ‘एशियाड’ या आशियायी क्रीडा स्पर्धेमुळे भारतातले क्रीडाप्रेम किती वाढीला लागलं हे माहीत नाही; मात्र त्यानिमित्तानं रंगीत झालेल्या टीव्हीचं प्रेम मात्र झपाट्यानं वाढत गेलं हे नक्की !
द्धिमत्ता, पवित्रता, शालीनता, सौंदर्यता, कलात्मकतेचे बळ घेऊन नवे स्वप्न साकारण्यासाठी उगवत्या सूर्याकडे पाहून तुतारी फुंकणारी महिला असे कंपनीचे बोधचिन्ह अजरामर झाले. याच तुतारीच्या निनादाचे बळ घेऊन येथे अयोध्येचा राजा, गोपालकृष्ण, खुनी खंजीर, राणीसाहेब व बजरबट्ट उदयकाल, चंद्रसेना, जुलूम अशा मूकपटाची निर्मिती येथे झाली.
Copyright © 2025 | Marathisrushti