एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इथे
पाणी हे जीवन आहे, असे जे म्हटले जाते ते किती खरे आहे! परमेश्वर मानवासाठी जी नवीन सृष्टी निर्माण करणार आहे, तिचे एक ओझरते वर्णन पवित्र शास्त्रात आढळते. त्यात लिहिले आहे की, तिच्या मध्यभागातून स्फटिकासारखी निर्मळ अशी नदी असेल आणि तिच्यातून जीवनाचे पाणी वाहत असेल! नाही तर पाण्यासाठीच होईल तिसरे जागतिक महायुद्ध.
आपल्याकडील पदार्थ खूपच व्यंजन मिश्र. त्यांचा इतिहास कुठे सापडेल? इतर प्रांतांतले पदार्थ पाहिले तरी हेच प्रश्न पडतील. पश्चिमेकडे यीस्ट वापरून पाव बनवला गेला तर इकडे इडली- डोशाचे पीठ रात्रभर आंबवले गेले. ते प्रथम कधी आंबवले गेले, इडली-डोशाचे पीठ आंबवण्याची प्रक्रिया पहिल्यांदा कशी घडली असेल? असे असंख्य प्रश्न राहतात. इडली हा पदार्थ मूळचा दक्षिण भारतीय म्हणून ओळखला जात असला तरी, इडली हा प्रकार इंडोनेशियातून भारतात आला आहे. तेथे त्याला किडली/ केडली असे म्हटले जाते. भारतात पदार्थांवरूनही श्रेयवाद आहेत. इडलीचे वर्णन कर्नाटकात ९२० जुलिअन कालगणनेत आढळते. तर तमिळ प्रांतात म्हणे इडली १७ व्या शतकात आली. गुजराथ प्रांत यातही मागे नाही. त्यांच्या मते ढोकळा हा पदार्थ दक्षिणेला १०- १२ व्या शतकात तेथे गेला. कारण त्याकाळी सौराष्ट्र प्रांतातील रेशीम व्यापारी महाराष्ट्रमार्गे तेथे जात असत आणि तेव्हाच ढोकळ्याचे इडली या प्रकारात परिवर्तन झाले. अशी इडलीची ही गाथा.
इडलीवरची कविता
एक होती इडली
ती खूप चिडली
तरातरा धावली
सांबारात जाऊन पडली
सांबार होते गरम
इडली झाली नरम
चमचा आला खुशीत
बसला बशीच्या कुशीत
चमच्याने पाहिले इकडेतिकडे
इडलीचे केले तुकडेतुकडे
मुलांनी केली इडली फस्त
इडली झाली होती मस्त!
कवी माहित नाही.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
काही काळानी मी आरोग्याच्या विषयी व संगीत व चित्रपट या विषयी समूह चालू केले. संगीत व चित्रपट या विषयी लिखाण करत असताना एक कल्पना सुचली आपण रोज कॅलेंडर नुसार त्या त्या व्यक्तीच्या वाढदिवसाच्या दिवशी, जन्मदिनी, स्मृतिदिनी त्यांची माहिती टाकावी, या कल्पनेला खूपच प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाने अनेक कलाकारांनी खूप छान प्रतिसाद दिला.
तेजाब’ मधून एन. चंद्रा यांनी बेरोजगारी, बेकारी, गुन्हेगारी व भ्रष्टाचार यातून निर्माण होणारे नैराश्य व तरूणांपुढे निर्माण झालेला अस्तित्वाचा प्रश्न याची मांडणी केली.
१९६२ साली भारतीय क्रिकेट संघ वेस्टइंडिज दौऱ्यावर गेला होता. वेस्ट इंडिज चे गोलंदाज त्यावेळी वाऱ्याच्या वेगाने गोलंदाजी करायचे आणि त्या दौऱ्यात देखील अपेक्षेप्रमाणे त्यांनी तेज गोलंदाजी केली. परिणामी बरेच भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त झाले त्यात त्यावेळचे भारतीय कर्णधार नरी कॉन्ट्रॅक्टर यांचा देखील समावेश होता त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं, त्यावेळी परदेशी असलेल्या या भारतीय खेळाडूला रक्ताची गरज होती तेव्हा वेस्ट इंडिज चा खेळाडू फ्रॅंक वोरेल सर्वात आधी रुग्नालयात पोहचवला आणि इतकेच न्हवे तर त्याने रक्तदान देखील केले होते.
समीर गांगुली दिग्दर्शित शर्मिली हा हिंदी चित्रपट २५ एप्रिल १९७१ रोजी प्रदर्शित झाला. गीतकार नीरज आणि संगीतकार एस. डी. बर्मन या सदाबहार गाणी देणाऱ्या जोडीची या चित्रपटातील सर्वच गाणी अतिशय लोकप्रिय झाली होती. आजही या चित्रपटाचं शीर्षक गीत ‘ओ मेरी शर्मिली’ हे गाणं गाताना किशोरकुमारने आपल्या खास शैलीत गाऊन एकच धमाल उडवून दिली होती. यातील इतर गाणी ही तेवढीच गाजली होती.
मल्लखांब या खेळाचा उदय दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात झाला. पेशव्यांच्या दरबारातल्या बाळंभट दादा देवधर यांनी कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून मल्लखांबाची मुहूर्तमेढ रोवली होती.
अमोल पालेकर या सिनेमात larger than life असलेल्या भूमिकेत कधीच नव्हता. कुठल्याही गर्दीत दिसणारा तो एक सामान्य माणूस होता. उगाच व्हिलनच्या खिशात चावी ठेवून “चाबी अब मै तेरे जेब से निकाल कर हि ये ताला खोलुंगा पीटर” म्हणत हिरोगिरी करणाऱ्याच्या भानगडीत तो कधी पडला नाही.
ऑगस्ट महिन्यातला पहिला बुधवार. ह्या दिवशी कॅनडामध्ये एक आगळ्यावेगळ्या स्वरूपाचा दिवस साजरा केला जातो. त्या दिवसाचं नाव आहे “National Regatta Day” म्हणजेच राष्ट्रीय नौकाशर्यत दिन.
भारतीय संस्कृतीमध्ये या दिवसाला फार महत्वाचे स्थान आहे. वास्तविक तिळगुळ देण्यामागील भाव असा आहे की तीळ हे अतिशय सूक्ष्म असलेल्या मनुष्य आत्म्याचे प्रतीक आहे आणि गुळाची गोडी हे आत्मिक प्रेमाचे प्रतीक आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti