एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इथे
१९७० च्या दशकात चीन आणि अमेरिकेमधील संघर्ष कमी करण्यात मोलाची भूमिका चीनचे टेबल टेनिस टेनिसपटू ‘जुआंग डुंग’ यांनी बजावली होती. त्यांनी घेतलेल्या पावले ‘पिंग पोंग डिप्लोमसी’ म्हणून ओळखली जाते. १९७१ मध्ये जपान माढेल नगोया मध्ये झालेल्या विश्व चैंपियनशिप स्पर्धेच्या दरम्यान अमेरिकी खेळाडू ग्लेन कान यांची बस सुटली तेव्हा चीनच्या टीमने त्यांना आपल्या बसने त्यांना मैदानात पोहचवले होते. पुढे झालेल्या सामन्यात जुआंग डुंग यांनी अमेरिकन क्रीडापटू ग्लेन कान यांना एक सिल्कचे पेंटिंग भेट केले होते. आपल्या दुभाषीच्या मदतीने जुआंग डुंग यांनी ग्लेन कान यांना सांगितले अमेरिकी सरकारचे चीनच्या सोबत दोस्तीचे संबध नाहीत पण अमेरिकन लोक चिनी लोकांचे मित्र आहेत. मी तुम्हाला ही फ्रेम चिनी लोकांच्या कडून दोस्ती खुण म्हणून देत आहे. जेव्हा या दोघांच्या भेटीची बातमी पेपर मध्ये आल्यावर चीनचे नेते माओत्से तुंग यांनी विदेश मंत्रालयाला आदेश दिला की अमेरिकी टीमला चीन बोलवा.
डेस्कटॉप पॉवर मॅनेजमेंट या प्रभावी उपायामुळे संगणक सुरू असेल, परंतु त्याचा प्रत्यक्ष वापर चालू नसेल अशा काळात त्यामधील समाविष्ट सॉफ्टवेअरद्वारे ऊर्जाबचतीचे उपाय केले जातात. उदा. वापर थांबल्यावर काही सेकंदांनी पडदा (स्क्रीन वा मॉनिटर) बंद झाल्याने विजेची भरपूर बचत होते.
संग्रह म्हटलं की छंद, सामान्य व्यक्ती एखाद्या गोष्टीकडे सीमित दृष्टीकोनातून पाहते पण त्याच गोष्टीकडे छंदवेडी व्यक्ती कल्पकतेने पाहते. छंद आयुष्यात उर्जा निर्माण करतो,असे मानणाऱ्या आणि प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात कोणतातरी छंद बाळगायला हवा असे म्हणणारे आमचे मित्र धनंजय बदामीकर यांचा विंटेज कार चा छंद.
‘विंटेज कार’ बाळगणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे. याचा अर्थ ही हौस केवळ श्रीमंत माणसांचीच आहे, असेही नाही. मुख्य म्हणजे त्यासाठी गाडीवर प्रेम असावे लागते. ही गाडीसुद्धा इतर गाडय़ांसारखी धातूपासूनच तयार झालेली असते. असे असले तरी हिचा सांभाळ करताना धसमुसळेपणा करून चालत नाही. तिला तळहातावरील फोडाप्रमाणे जपावे लागते. ती आहे तशीच रहावी यासाठी हरप्रकारे प्रयत्न करावे लागतात. एकीकडे अद्ययावत तंत्रज्ञान असलेल्या कितीही गाडय़ा बाळगल्या तरी ही गाडी अनमोल असते. इतर गाडय़ांच्या बाबतीत आपण कितीही ‘रफ अॅंण्ड टफ’ वागत असलो तरी व्हिन्टेज गाडय़ांच्या बाबतीत मात्र ‘हँडल वुइथ केअर’ या धोरणाचा अवलंब करावा लागतो.
पुण्यातील आमचे मित्र धनंजय बदामीकर असाच विंटेज कारचा छंद बाळगून आहेत. धनंजय बदामीकर यांच्या कलेक्शन मध्ये अनेक विंटेज कार आहेत. त्यांच्या विंटेज कार्स अगदी कालच खरेदी केल्यासारख्या दिसतात. गेली सोळा वर्षे ते विंटेज कार छंद बाळगुन आहेत.
त्यांच्या कलेक्शन जर्मन कार मध्ये, व्हॉक्स वॅगन टेम्पो, ओपेल, बीटल, मायक्रो बस, जेट्टा, अमेरिकन कार मध्ये,फोर्ड, डीसेटो, ब्यूक, शेवरलेट फ्रेंच कार मध्ये सिट्रोन, एच व्हॅन, भारतीय कार मध्ये हिंदुस्थान, लॅडमास्टर, फियाट अशा मिळून जवळ जवळ ७० ते ७५ व्हिन्टेज कार आहेत.
धनंजय बदामीकर नेहमी म्हणतात, ‘व्हिन्टेज कार’ बाळगायची असेल तर गाडीवर जीव असावा लागतो. व्हिन्टेज कारची निगा कशी राखावी, यावर धनंजय बदामीकर म्हणतात मुळात म्हणजे ही नेहमीसारखी गाडी नाही. या गाडय़ांना पॉवर स्टेअरिंग नसते, ब्रेकसुद्धा मेकॅनिकल असतात. त्यामुळे चालवताना ती सांभाळून चालवावी लागते. त्याचप्रमाणे आठवडय़ातून किमान २० ते २५ किलोमीटर चालवली पाहिजे. तसे नाही केले तर ब्रेक ‘जाम’ होऊ शकतील, टायरची समस्या उभी राहू शकेल. सहा महिन्यांतून एकदा तरी या गाडीचा ‘चेक अप’ करायला हवा. अशा गाडय़ांचे सुटे भाग सहजासहजी मिळत नाहीत. मुंबईतील ऑपेरा हाउस किंवा चोर बाजार या ठिकाणी गाडय़ांचे सुटे भाग काही वेळा मिळतात. तसे नसेल तर मात्र ते तयार करावे लागतात. त्यासाठी तशी जाणकार व्यक्ती असली पाहिजे. म्हणूनच अनेक व्हिन्टेज कारमालक सुटे भाग जमवून ठेवतात. म्हणजे एखाद्या बाजारात जुन्या प्रकारचे गिअर्स दिसले, इंजिन दिसले तर गरज नसूनही ‘व्हिन्टेज कार’चा मालक ते भाग घेऊन ठेवतो. यांची मूळ किंमत शंभर रुपये असली तरी विकत घेताना अशा भागांसाठी कदाचित पंधराशे रुपयेही मोजावे लागू शकतात. आम्ही धनंजय बदामीकर यांच्या बरोबर मुंबईतील ऑपेरा हाउस, चोर बाजार या ठिकाणी गाडय़ांचे सुटे भाग खरेदी करण्यास कित्येक वेळा गेलो आहोत. धनंजय बदामीकर यांच्या गाड्या प्रदर्शनासाठी नेल्या जातात, तेव्हा त्यांना खूप काळजी घ्यावी लागते. तिच्या बाजूला सुरक्षारक्षक उभा करावा लागतो. कारण पाहणारा पटकन दार उघडतो किंवा कुठेही हात लावतो. तसे करताना चुकून हँडलला काही झाले, किंवा आरसा वाकला किंवा काहीही झाले तरी त्याची डागडुजी करण्याचा खर्च खूप असू शकतो किंवा तुटलेला सुटा भाग परत मिळेलच असे नाही.
साडे माडे तीन, दुनियादारी, बालगंधर्व, अक्षय कुमारचा रुस्तम, अशा अनेक चित्रपटात धनंजय बदामीकर यांच्या विंटेज कार आपण बघीतल्या असतीलच.
धनंजय बदामीकर यांच्या विंटेज कार रस्त्यावरून जाताना ‘वो गाडी देख’ अशा प्रकारचे संवाद कानी पडतात तेव्हा त्याला तोड नसते. केवळ बुजुर्गच नव्हे तर लहान मुलेही वळून वळून या गाडीकडे पाहतात. सिग्नलला थांबल्यावर कोणी गाडीची चौकशी करतो, कोणी नुसताच ‘थम्स अप’ करून दाखवतो, तेव्हा त्याने गाडी सांभाळण्यासाठी घेतलेली मेहेनत सार्थकी लागल्याचे त्यांना एक समाधान मिळते! धनंजय बदामीकर यांनी आपल्या गाड्या दुरुस्ती साठी स्वत:चे आद्यावत गॅरेज बनवले आहे. धनंजय बदामीकर यांना त्यांच्या विंटेज कारचे कायम स्वरूपी एक संग्रहालय करायचा विचार आहे. जागतिक संग्रहालय दिवसाच्या निमित्ताने धनंजय बदामीकर यांचा विंटेज कारच्या छंदाला सलाम.
धनंजय बदामीकर संपर्क.
९४२२००९८९५
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
जगातील कोणत्याही दोन हसणार्याम व्यक्तींमध्ये सहज मैत्री होऊ शकते. मग त्या व्यक्ती कोणत्याही देशाच्या, भाषेच्या, जातीच्या, धर्माच्या, वयाच्या का असेना. हास्य हे जगातील सर्वांशी मैत्री करून देणारे प्रभावी साधन आहे असेही आपण म्हणू शकतो. नेहमी हसा, हसत राहा आणि सर्वांना हसवत राहा……!!!!
चल संन्यासी मंदिर मे, सून बाल ब्रह्मचारी मै हू कन्याकुमारी, बाली उमरिया, यह है गीता का ज्ञान अशा सुपर हिट गाण्यांमुळे लोकप्रिय ठरलेल्या सोहनलाल कंवर निर्मित आणि दिग्दर्शित संन्यासी चित्रपट प्रदर्शित १७ ऑक्टोबर १९७५ रोजी झाला. फिल्म नगर या बॅनरखाली निर्माण झालेल्या या चित्रपटाची कथा पटकथा राम केळकर यांची आहे. तर छायाचित्रण राघु कर्मकार यांचे आहे.
शीतयुद्धाच्या काळात खतपाणी घातलेला, अफगाणिस्तानच्या भूमीत रुजवलेला दहशतवाद नावाचा भस्मासुर या महासत्तेवरच उलटला. अमेरिकेचे फासे अमेरिकेवरच उलटले.
शिक्षणाचे माहेरघर ही पुण्याची ओळख सार्थ करणारे व पुण्याचा मानबिंदू असणाऱ्या फर्ग्युसन कॉलेजचा वाढदिवस.
२ जानेवारी १८८५ रोजी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज ची सुरवात झाली.
शैक्षणिक क्षेत्रात योगदान देण्यासाठी टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी या नावाची सार्वजनिक संस्था उभारण्याचे ठरविले. १८८२ ला आलेल्या हंटर आयोगापुढे साक्ष देताना वामन शिवराम आपटे यांनी अतिशय मुद्देसूद विवेचन करून नव्या खाजगी आर्टस् कॉलेजची निकड विशद केली होती. न्यू इंग्लिश स्कूलचे, त्यासाठी संस्थापकांनी केलेल्या धडपडीचे कौतुक हंटर आयोगाने केले होते. त्या पार्श्वभूमीवर ‘जेम्स फर्ग्युसन’ या तत्कालीन मुंबई प्रांताच्या गव्हर्नरने या प्रस्तावाला अनुमोदन दिले व बक्षीसासाठी रु. एक हजार दोनशे पन्नासची मदत देण्यापासून शक्य ते इतर सहकार्यही केले. १८८३ च्या सुमारास त्यांनी या कामाला सु्रुवात केली. २४ ऑक्टोबर १८८४ रोजी 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी'ची स्थापना झाली.
संस्थेच्या विश्वस्त समितीमध्ये अनेक महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. यामध्ये सर विल्यम वेडरबर्न,महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, शिक्षणतज्ज्ञ एम. एम. कुंटे तसेच प्रख्यात वकील के. पी. गाडगीळ यांचा समावेश होता. सर जेम्स फर्ग्युसन यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी संस्थेच्या कॉलेजचे नाव फर्ग्युसन महाविद्यालय ठेवण्याचे एकमताने ठरवण्यात आले व २ जानेवारी १८८५ ला फर्ग्युसन कॉलेज अस्तित्वात आले.
फर्ग्युसन कॉलेज त्या वेळी पुणे शहरात शनिवार पेठेतील गद्रे ह्यांच्या विस्तीर्ण जुन्या वाड्यात होते. नंतर आत्ताच्या जागेत आले.
फर्ग्युसन कॉलेजच्या संस्थापकांचे स्पष्ट मत होते की पाश्चिमात्य शिक्षणाचा भारतात प्रसार होणे अत्यंत निकडीचे आहे. चिपळूणकर आणि टिळक तर इंग्रजी भाषेला वाघिणीचे दूध म्हणत. टिळकांनी येथे गणित व संस्कृतचे अध्यापन केले. वामन शिवराज आपटे हे फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य होते.
पण संस्थेच्या अन्य सभासदांसमवेत बाह्य-उत्पन्नाच्या विषयावरून झालेल्या वादामुळे डिसेंबर १८९० मध्ये टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा राजीनामा दिला आणि स्वतः पूर्णवेळ केसरी व मराठा या वृत्तपत्रांचे संपादन करू लागले.
फर्ग्युसनचे माजी प्राचार्य डॉ. वि. मा. बाचल यांनी फर्ग्युसनवर जवळपास दीड हजार हस्तलिखित पाने लिहिली होती. त्यावर फर्ग्युसन कॉलेजचा हा १२५ वर्षांचा समग्र इतिहास ग्रंथरूपात 'फर्ग्युसनची वाटचाल' या नावाने प्रसिद्ध झाला आहे.
फर्ग्युसनची स्थापनेपासून ते २०१० पर्यंतचा इतिहास या पुस्तकातून समोर आला आहे. या ग्रंथामुळे पुण्याच्या तत्कालीन राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक जीवनाचे संदर्भ उपलब्ध झाले आहेत. . विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी, वामन शिवराम आपटे यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली. फर्ग्युसनची इमारत वास्तुकलेचा एक उत्तम नमुना मानला जातो. हे कॉलेज देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार आहे. माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग, पी.व्ही नरसिंह राव असे अनेक नेते फर्ग्युसनमधून शिकून बाहेर पडले. फर्ग्युसन कॉलेजला शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठी परंपरा आहे. त्याचे प्राचार्यपद अनेक विद्वानांनी भूषवले आहे. सैन्य, प्रशासन, मंत्री, खेळाडू, अभिनेते अशा सर्व पद्धतीचे विद्यार्थी महाविद्यालयातून घडले, त्यांचा बराचसा इतिहास या ग्रंथात आला आहे.
महात्मा गांधी यांनी १९१९ मध्ये ज्या सभागृहातून देशाला स्वदेशीची हाक दिली, त्या ऐतिहासिक फर्ग्युसन कॉलेज मधील एन.एम. वाडिया अॅ म्फी थिएटरला इतिहास आहे.
लोकमान्य टिळक, आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर आदींनी स्थापन केलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन कॉलेजच्या अॅेम्फी थिएटरला २०१२ मध्ये शंभर वर्षे पूर्ण झाली. १९१२ मध्ये सर जिजीभॉय यांनी दिलेल्या पंचवीस हजार व प्रिन्स आगाखान यांच्या पाच हजारांच्या देणगीतून थिएटरची उभारणी झाली होती. पुण्यातील धनिकांनीही आर्थिक मदत दिली होती. या निमित्ताने नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. स्वातंत्र्य चळवळीची साक्षीदार ठरलेल्या या वास्तूला सरकारने ‘हेरिटेज ए’चा दर्जा दिला आहे. रवींद्रनाथ टागोर, पं. नेहरू, सी.व्ही. रामन, जगदीशचंद्र बोस, मदनमोहन मालवीय यांनी येथे विचार मांडले होते.
फर्ग्युसन कॉलेजच्या अॅेम्फी थिएटर मध्ये १९२७ मध्ये देशातली पहिली भारतीय महिला परिषद झाली. सरोजिनी नायडू, यशवंतराव चव्हाणांची भाषणे येथे झाली. केरळचे तेव्हाचे मुख्यमंत्री नंबुद्रीपाद यांचे ‘स्वातंत्र्य’वर व्याख्यान येथे झाले. कुमार गंधर्व, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, भालबा केळकर, भास्कर चंदावरकर, रोहिणी भाटे, वसंतराव देशपांडे यांचे कार्यक्रम येथे झाले. पुण्यातील प्रसिध्द पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेची सुरुवात फर्ग्युसन कॉलेजच्या अॅयम्फी थिएटर येथुनच झाली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आपल्या राजवटीखाली असलेल्या देशांना ‘स्वयंशिस्त’ लागावी, या हेतूने ब्रिटिशांनी सगळ्या देशांची एकत्रित स्पर्धा सुरू केली आणि त्यालाच कॉमनवेल्थ गेम्स अथवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असे नाव दिले.१९३० पासून या स्पर्धेला प्रारंभ झाला आणि दर चार वर्षांनी ही स्पर्धा होते.१९४२ आणि १९४६ साली दुसऱ्या महायुद्धामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती.१९३० ते १९५० या कालावधीत राष्ट्रकुलला ‘ब्रिटिश राजवट क्रीडा स्पर्धा’ म्हणूनही ओळखले जात.
अन्नदिनाच्या निमित्ताने गरीबी आणि भूकमारी विषयी जागरूकता वाढवण्यावर आणि त्यासंदर्भातील उपाययोजनांवर भर देण्यात येतो. १९८१ पासून जागतिक अन्नदिनाच्या निमित्ताने दरवर्षी एक वेगळी संकल्पना मांडली जाते.
म्हणूनच आजपासून प्रतिज्ञेतील ” माझा ” हा शब्द ओळखून वागण्याचे ठरवले आहे. कारण आपण जेव्हा एखादी वस्तू माझी आहे अशी म्हणतो त्या वेळेस आपण त्या गोष्टीची जिवापलीकडे काळजी घेतो, जपतो आणि म्हणूनच भारत “माझा” देश आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti