एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इथे
१०० पैकी ८०% लोकांना हा खाऊ म्हणजे जीव की प्राण असतो. आज अशा चॉकलेटची आठवण काढण्याचे खास कारण आहे. आज दिनांक २८ जुलै ! आजचा दिवस राष्ट्रीय दुग्धयुक्त चॉकलेट ( National Milk Chocolate Day ) दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस United Kingdom (UK) मध्ये साजरा केला जातो.
सुरुवातीला किर्लोस्करवाडीत फक्त पाण्याचे पंप बनत होते. किर्लोस्करांचे पंप इतके लोकप्रिय झाले की, पुढे पंप म्हणजे किर्लोस्करांचे, अशीच ख्याती झाली. किर्लोस्करांनी पुढे आपल्या उत्पादनांचा पसारा वाढवला आणि डिझेल व विजेवर चालणाऱ्या पंपांबरोबरच यांत्रिक नांगर, ट्रॅक्टर्स अशा शेती उत्पदनांसाठी लागणाऱ्या यंत्रांचीही निर्मिती तिथेच सुरू झाली.
जगाला एकापेक्षा एक मौल्यवान, अजरामर काव्य कलाकृती प्रदान करणाऱ्या सर्व कवींना गौरवण्याचा हा दिवस.
युनेस्कोने जागतिक काव्य दिनाची २१ मार्च १९९९ रोजी पॅरिस परिषदेत या दिवसाची घोषणा केली. तेव्हांपासून प्रत्येक वर्ष एका महान कवीला समर्पित केले जाते. यंदाचे वर्ष तब्लिसी (जॉर्जिया)येथील कवी निकोलस बाजातशविली (१८१७-१८४४) यांना समर्पित करण्यात आले आहे. त्यांनी ३२ पेक्षा अधिक काव्यरचना केल्या. त्यात बहुतांश प्रेमकविता होत्या. मानवी भावना प्रकट करणे तसेच अनुभवण्याची अद्वितीय क्षमता काव्यात असते. युनेस्कोच्या महासचिवांनी म्हटलेच आहे की, कविता हा एक झरोका असून याद्वारे मानवतेतील वैविध्य मनमोकळा श्वास घेऊ शकते. एकोणिसाव्या शतकातील फ्रेन्च कलावंत जोसेफ राँऊ ह्यानी म्हटले होते की Science is for them who learn, Poetry is for those who know. हे खरच आहे की बुद्धीची कसोटी लावून विज्ञान शिकता येते पण पद्य मनाला भावणे गरजेचे असते. सुप्रसिद्ध कवयित्री मा. संजीवनी मराठे ह्यांनी कवितेच्या उगमाची प्रक्रियाच ह्या कवितेतून समोर आणली आहे. कविता तिच्या नाजूक नखरेलपणामुळे आणि भावतरलतेमुळे स्त्रीलिंगी मानली जाते. स्त्रियांच्या नकारात अनेकदा होकार दडलेला असतो असं मानलं जातं. म्हणूनच आपल्या कवितेत त्या म्हणतात -
कुंभ रसांचे शिरी घेऊनी शब्दांच्या गवळणी
नजरेपुढती ठुमकत येती रूपवती कामिनी
त्यांच्या नादे करू पाहते पदन्यास मी कशी
मी न कुणाला सांगायची कविता स्फुरते कशी
William Wordsworth ह्यांनी म्हटल्याप्रमाणे Poetry is the spontaneous overflow of powerful feeings. शब्दांच्या माध्यमातून होणारा रसरशीत भावनांचा उस्फुर्त उद्रेक म्हणजे कविता.
सर्व कवी, कवीयित्रींना आजच्या जागतिक कवी दिनाच्या हार्दीक शुभेच्छा !
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
बांगला देशी विद्यार्थ्यांनी उर्दूसोबत बांग्ला भाषेलाही राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळावा म्हणून १९५२ साली निदर्शने केली होती. त्यांच्यावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या स्मृती प्रीत्यर्थ हा दिवस युनोस्को तर्फे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदही संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी साम्य असलेली विद्यार्थी संघटना आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन केली होती. देशातील विविध विद्यापीठांमधील डाव्या विचारांचा पगडा कमी करणं हा अभाविपच्या स्थापनेमागील प्रमुख उद्देश होता.
आज दिनांक ६ ऑक्टोबर. १९२१ साली याच दिवशी न्युयॉर्कमध्ये उच्चभ्रु असं ब्रोडवे थिएटर उभारण्यात आलं होतं. त्या थिएटरचं नाव होतं न्यु सेंच्युरी थिएटर. हे थिएटर न्युयॉर्कमधील नावाजलेलं शहर मॅनहॅटन येथे वसलेलं होतंं. थिएटरची आसन व्यवस्था १७०० इतकी होती. या संपूर्ण थिएटरचं स्थापत्य हबर्ट जे. क्रॅप यांचं होतं आणि या थिएटरवर मालकी हक्क शुबर्ट या संस्थेचा होता.
महोत्सवाची प्रमुख आकर्षण म्हणजे काशी विश्वनाथ धाम आणि संगीत, साहित्य, पुस्तक मेळा, व्यापार मेळा, महोत्सव, महापौर संमेलन, कृषीआधारित संमेलन, वास्तुविशारद संमेलन, कला आणि साहित्य संमेलन, रांगोळी आणि छायाचित्रण स्पर्धा, क्रीडा आणि युवकांसाठी विविध कार्यक्रम असतील. हा उत्सव महिनाभर चालणार आहे.
२७ डिसेंबर १९११ रोजी जन-गण-मन हे गीत इंडियन नॅशनल काँग्रेसच्या कलकत्ता येथील कार्यक्रमात सर्वात पहिल्यांदा गायले गेले. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेत रचलेले हे गीत भारताचे राष्ट्रगीत होईल असे त्यावेळी कोणाला वाटले ही नसेल.
जंगलात तब्बल अडीच हजार झाडांचा लिलाव त्यावेळी करण्यात आला. गावातील आंदोलकांनी विरोध केला, तरीही लिलाव झालाच. ठेकेदारांना लोकांच्या विरोधाची कल्पना होती. त्यांनी कार्यकर्त्यांना लोकांची जुनी देणी देण्याच्या निमित्ताने चामोलीत बोलावून घेतले. त्यांच्या गाफीलपणाचा गैरफायदा घेऊन त्यांनी गुपचूप रेनीच्या जंगलात मजूर पाठविले. एका छोट्या झाडांची कत्तल करण्यासाठी आलेल्या मजुरांना पाहिलं आणि धावत गावात ही खबर दिली. पण, गावात फक्त १५-२० स्त्रिया आणि काही छोटी मुले होती. पुरुष मंडळींना निरोप कळवून ते परत येईपर्यंत दोन-तीन दिवस लागणार. तोपर्यंत जंगलतोड अटळ होती. हे लक्षात येताच गावातील महिला आपल्या मुलांसह जंगलात आल्या. बायकांसह सगळी लहान मुलं झाडाला चिकटून उभी राहिली.
पुण्याचे भूषण असलेली संगीत क्षेत्रातील एक पूज्य वास्तू " पुणे भारत गायन समाज " आज १०७ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. देवगंधर्व पंडित भास्करबुवा बखले यांनी १ सप्टेंबर १९११ साली स्थापन केलेली हि वास्तू पुढे अनेक दिग्गज कलावंतांच्या पदस्पर्शाने पुनीत झाली आणि आजही होत आहे. या संस्थेमार्फत संगीत प्रचार आणि प्रसाराचे काम गेली १०७ वर्ष अविरत पणे चालू आहे.
याच संस्थेच्या भास्कर संगीत विद्यालयामध्ये गायन,तबला,सतार,हार्मोनियम,व्हीयोलीन,कथ्थक, भरतनाट्यम इत्यादी कलाप्रकारांचे शात्रोक्त पद्धतीनी शिक्षण दिले जाते . यामध्ये मध्यमा,विशारद,पारंगत अशा १० वर्षाचा लिखित अभ्यासक्रमानुसार शिक्षण दिले जाते.
संस्थेच्या अभ्यासक्रमाला १९६२ मध्ये राज्यसरकारने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक संगीत विद्यालये भास्कर संगीत विद्यालयाशी संलग्न आहेत.सौ.शैला दातार या पुणे भारत गायन समाजच्या अध्यक्षा आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti