शेतीमातीचे प्रश्न नवे नाहीत. ते आदीम काळापासून आलेले आहेत. जो दुसऱ्याला जगवितो त्याच्या स्वतःच्या जगण्याचे काय ? या प्रश्नाने अश्वस्थ झालेले आणि स्वतः घेतलेले अनुभव आविष्कृत होण्याची तडफ कवितेतून मांडणारे डॉ.प्रभाकर शेळके हे 'करपलं रान सारं' या कवितासंग्रहातून व्यक्त होतात. मिरगाचा खेळ,दु:ख सांदीत ठेऊन, निबर मनाने, बया काटेरी उनगा, बेंदाड अंगावर येणार , चिभडं पिकांचा हुडहूड होम अशी शब्दरचना ग्रामनात्याची साक्ष देतात. धान्य पिकविले जाते. ते विकले जाते. शेतकऱ्यांची पदोपदी पिळवणूक होते.हे सांगताना ते म्हणतात.
करपलं रान सारं,झाला डागीनचा वाडा
गाव वेशीला टांगला,ह्यो ग जन्माचा ख्वोडा
गावचं गावपण हरवत चाललय. शहराच्या ओढीनं माणसं जास्त व्यावहारिक बनत आहेत.गाव, गावचा मळा, माणसाचा लळा ओसाड होतो की काय ?अशी अनामिक भिती कवीला सतावते आहे. 'गेला गावकुस' या कवितेत ते खंत व्यक्त करतात.
गेला गावकुस गेला लपंडाव
व्यसनाचे पेव आता गावांमध्ये
अध्यात्माची वाटचाल पुर्वीइतकी निर्मळ आता राहिलेली नाही. देवाच्या वाटेवर भक्तीमार्गाचा वास असतो तरी अपघातात मरण येते. तोंडामध्ये ईश्वराच्या नामोच्चार असतो मग असे का घडावे? देवाच्या नावाने धर्मभोळेपणा जपला तर जात नाही ना? हे विचारण्याचे धाडस कवीने दाखविले आहे.
असं दिंडीचं मरण
उभ्या जन्माची जिभाळी
सवसांज आहेवाची
कशी रडते आभाळी
'करपलं रानं सारं ' हा कवितासंग्रह वाचताना काही प्रश्न उभे केले आहेत. तर काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आहे.ते म्हणतात काळ्या आईच्या प्राक्तनातून माझ्या भूमियांच्या वेदनेचे कढ मला नेहमीच अस्वस्थ करत आले. खरेतर अस्वस्थताच लेखनाची उर्जा असायला हवी. आजची गावखेड्याची अवस्था पाहून कवी गलबलतो. कुणब्यांची दु:खसल कुणबावा असल्याशिवाय मांडता येत नाही. अनुभवाची शिदोरी पाठीशी लागतेच.
कुणबी कर्जात बुडाला
सालदार घेई झोके
मोंढ्यामंदी टपलेले
त्यांच्या मालावर बोके
साध्या शब्दात समर्पक आशय कवीने मांडला आहे. जालना हा मराठवाड्यातील जिल्हा. तेथील बोलीभाषेचा शब्दपरिपोष कवितासंग्रहात जाणवतो.तो स्वाभाविक आहे.करपलं रान सारं मध्ये पाच श्रृंगारिक लावण्यादेखिल आहेत. हायकू हा काव्यप्रकार कवितासंग्रहात आला आहे. बेकारीचे चटके उद्धृत केलेले आहेत. ही प्रचंड मोठी समस्या आहे. खेड्यातील तरूण युवक शहरांकडे धावत आहे. पोटाचे नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. या बाबतीत हा संग्रह नाविन्याचा शोध घेत आहे.एकूण बासष्ट कवितांचा समावेश यात आहे. सरदार जाधव यांनी केलेले मुखपृष्ठ बोलके आहे. कुंडलिक अतकरे यांनी देखणा कविता संग्रह बनविला आहे.फक्त एकाच विषयावरील कवितांचा समावेश होणे शक्य झाले असते तर वेगळी झालर प्राप्त झाली असती. सर्वच कविता गेय आहेत. नादनिर्मितीमुळे हृदयापर्यंत भिडतात.
करपलं रान सारं (कवितासंग्रह)
डॉ. प्रभाकर शेळके
कैलास पब्लिकेशन्स, औरंगाबाद
पृष्ठे;७१ मुल्य ; ७०₹
विठ्ठल जाधव
शिरूरकासार,बीड
सं.९४२१४४२९९५
मिलिंद वेर्लेकरांचे या पुस्तकाच्या निर्मितीमधील अनुभव. त्यांच्याच शब्दात !!
`घरीदारी' या इंद्रजित भालेरावांच्या व्यक्तिचित्रांच्या संग्रहाचे नुकतेच प्रकाशन झाले आहे. ही व्यक्तिचित्रे म्हणजे साहित्य क्षेत्रातल्या व्यक्तींचा वेगळा परिचय देणारी आहेत. त्यांच्या गुणांनी व स्वभाववैशिष्ट्यांनी नटलेली ही माणसे जात्याच प्रसिद्ध आहेत.
`घरीदारी' :
लेखक : इंद्रजित भालेराव
सार्या जगाला भयचकित करणारे सुनामी हा काय प्रकार आहे ? याची साद्यंत, सचित्र व शास्त्रीय माहिती सोप्या भाषेत देणारे मराठीतील एकमेव पुस्तक. यमदूती सुनामी विभावरी शेंबेकर लेखक : श्री. गो.बा. सरदेसाई पाने : ६४, किंमत : ६५ रू. प्रकाशक : नचिकेत प्रकाशन मो. : 9225210130 / 9405142209
प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितलेल्या खास पाककृतींचा हा संग्रह आहे. पुस्तकाचं वेगळेपण हे, की त्यांनी विविध फळांचा वापर करून पदार्थ कसे तयार करायचे याचं मार्गदर्शन केलं आहे.
“जग जाहिरातीचं अर्थात जाहिरात विश्वाचे अंतरंग” हे नागपूर येथील नचिकेत प्रकाशनाने प्रकाशित केलेले लेखक सुधाकर घोडेकर यांचे पुस्तक. जाहिरात या विषयावर मराठीतून पुस्तक प्रसिद्ध होणे म्हणजे तसे अप्रुपच. सुधाकर घोडेकर यांच्या या पुस्तकावरून नजर टाकली तरी त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत जाहिरातीच्या व्याख्येपासून ते बाजारातील सर्व्हे अत्यावश्यक चाचपणी या विषयापर्यंत जाहिराती संदर्भात मुद्देसुद माहिती दिली आहे. मराठीत जी काय जाहिरात या विषयावर पुस्तके प्रकाशित झाली असतील त्यात सुधाकर घोडेकर यांच्या उपरोक्त शीर्षकाच्या पुस्तकाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. जग जाहिरातीचे अर्थात जाहिरात विश्वाचे अंतरंग लेखक : श्री. सुधाकर घोडेकर पाने: 160, किंमत : 175 रू. प्रकाशक : नचिकेत प्रकाशन मो. : 9225210130
अमेरिका आणि चीन ही राष्ट्रे सातत्याने राष्ट्रीय धोरणांवर लक्ष केंद्रीत करून असतात. आपल्या अर्थव्यवस्थेला कशाप्रकारे बळकटी आणि नवीन बाजारपेठ मिळेल यावर ही राष्ट्रे सतत काही ना काही धोरणे राबवताना दिसतात. आपल्या अर्थव्यवस्थेला आणि एकूणच राष्ट्रीय हिताला साजेशे निर्णय अमेरिका आणि चीन ही राष्ट्रे घेत असतात.
निसर्गाची नवलाई अनेक अंगाने मनुष्याला खुणावत असते. भूकंप, ज्वालामुखी, आदी या नवलाईची काही रूपे रहस्यमयी, विस्मयकारी आहेत तर धबधबे, सरोवर, गरम पाण्याचे झरे ही रूपे मनोहारी, आल्हाददायी आहेत. अशा विविध 25 नवलाईंमागील रहस्य, विज्ञान, कारणमीमांसा यांचा उलगडा अत्यंत सोप्या ओघवत्या भाषेत प्रा. सुधीर सहस्त्रबुद्धे यांनी निसर्गाची नवलाई मध्ये केला आहे. कोणत्याही वयोगटाच्या वाचकांना हे लिखाण आवडावे व त्यांच्या ज्ञानात भर पडावी. लेखक : प्रा. सुधीर सहस्त्रबुद्धे डॉ. मधुकर आपटे ,नागपूर प्रकाशक : नचिकेत प्रकाशन, 24 योगक्षेम ले-आऊट, स्नेह नगर वर्धा रोड, नागपूर-15 पाने: ९२,किंमत : रू ९०/-
देशाच्या आर्थिक विकासात वेगवेगळ्या उद्योगांचा वाटा मोठा आहे. या उद्योजकांची वाटचाल कशी झाली याविषयी सर्वसामान्यांना कुतुहल असते. अनेक उद्योजकांची वाटचाल संघर्षमय होती. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी यश मिळवले आणि देशातील आघाडीचे उद्योजक म्हणून स्थान मिळवले. अशा काही आघाडीच्या उद्योजकांशी संवाद साधून ज्येष्ठ पत्रकार वीर संघवी यांच्या लेखणीतून ‘नवभारताचे शिल्पकार’ हे पुस्तक साकारलं आहे.
महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या अंदाजे १८ टक्के मराठी माणूस हा बृहन्महाराष्ट्रात वास्तव्यास असतो. मराठ्यांच्या साम्राज्याला टिकविण्यासाठी आणि एकेकाळी त्यांचा झेंडा अटकेपार फडकविण्यासाठी, निमूटपणे मराठ्यांच्या सैन्याबरोबर बृहन्महाराष्ट्रात गेलेला हा मराठी माणूस गेल्या २५० पेक्षा जास्त वर्षांपासून त्या त्या प्रांतात आपापल्यापरीने स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेत आनंदी आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti