प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितलेल्या खास पाककृतींचा हा संग्रह आहे. पुस्तकाचं वेगळेपण हे, की त्यांनी विविध फळांचा वापर करून पदार्थ कसे तयार करायचे याचं मार्गदर्शन केलं आहे.
सचिन तेंडुलकरच्या सोनेरी कारकिर्दीचा मागोवा घेणारे “जागत्या स्वप्नाचा प्रवास....” हे पुस्तक आता मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी इ-बुक स्वरुपात केवळ रु.९९/- मध्ये उपलब्ध आहे.
डबल क्राऊन आकाराच्या तब्बल ४८० पानांचा भरगच्च खजिना असलेल्या या पुस्तकात सुमारे १२५ हून जास्त पानांची सांख्यिकी माहिती दिलेली आहे हे या पुस्तकाचे एक ठळक वैशिष्ट्य. खर्या अर्थाने या पुस्तकाला सचिन-कोश असेच म्हणता येईल. मूळ किंमत रु.७००/- असलेल्या या तब्बल ४८० पानी पुस्तकात सचिनच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यापासूनचा प्रवास टिपलाय डॉ. आनंद बोबडे या क्रिकेटवेड्या अवलियाने. सचिन संदर्भातल्या शेकडो व्हिडिओ लिंक्स हे या इ-बुकचं आणखी एक आकर्षण आहे.
आपण आमच्या वेबसाईट समूहाचे एक सन्माननीय वाचक आहात. आपल्यासाठी हे पुस्तक इ-बुक स्वरुपात आणलंय केवळ रुपये ९९/- मध्ये. ही खास ऑफर अत्यंत मर्यादित काळापर्यंतच आणि फक्त पहिल्या ५००० ग्राहकांसाठीच आहे.
आपल्याला या पुस्तकाची छापील आवृत्ती हवी असल्यास ती उपलब्ध आहे फक्त रुपये ४००/- मध्ये महाराष्ट्रात कोठेही अगदी घरपोच! आणि याबरोबर इ-बुक मोफत!
हे पुस्तक कोणत्याही क्रिकेट रसिकाला आपल्या संग्रही ठेवावेसे वाटेलच. सचिनच्या मैदानावरच्या प्रत्येक विक्रमाची नोंदही या पुस्तकात आहे. आपल्याला माहित नसलेल्या अनेक बाबी या पुस्तकातून आपल्यासमोर येतात.
आपण जरुर या सवलतीचा लाभ घ्यावा!
खरेदीसाठी क्लिक करा....
<!-- सचिन तेंडुलकरच्या सोनेरी कारकिर्दीचा मागोवा घेणारे “जागत्या स्वप्नाचा प्रवास....” हे पुस्तक आता मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी इ-बुक स्वरुपात केवळ रु.९९/- मध्ये उपलब्ध आहे. डबल क्राऊन आकाराच्या तब्बल ४८० पानांचा भरगच्च खजिना असलेल्या या पुस्तकात सुमारे १२५ हून जास्त पानांची सांख्यिकी माहिती दिलेली आहे हे या पुस्तकाचे एक ठळक वैशिष्ट्य. खर्या अर्थाने या पुस्तकाला सचिन-कोश असेच म्हणता येईल. मूळ किंमत रु.७००/- असलेल्या या तब्बल ४८० पानी पुस्तकात सचिनच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यापासूनचा प्रवास टिपलाय डॉ. आनंद बोबडे या क्रिकेटवेड्या अवलियाने. सचिन संदर्भातल्या शेकडो व्हिडिओ लिंक्स हे या इ-बुकचं आणखी एक आकर्षण आहे. आपण आमच्या वेबसाईट समूहाचे एक सन्माननीय वाचक आहात. आपल्यासाठी हे पुस्तक इ-बुक स्वरुपात आणलंय केवळ रुपये ९९/- मध्ये. ही खास ऑफर अत्यंत मर्यादित काळापर्यंतच आणि फक्त पहिल्या ५००० ग्राहकांसाठीच आहे. आपल्याला या पुस्तकाची छापील आवृत्ती हवी असल्यास ती उपलब्ध आहे फक्त रुपये ४००/- मध्ये महाराष्ट्रात कोठेही अगदी घरपोच! आणि याबरोबर इ-बुक मोफत! हे पुस्तक कोणत्याही क्रिकेट रसिकाला आपल्या संग्रही ठेवावेसे वाटेलच. सचिनच्या मैदानावरच्या प्रत्येक विक्रमाची नोंदही या पुस्तकात आहे. आपल्याला माहित नसलेल्या अनेक बाबी या पुस्तकातून आपल्यासमोर येतात. आपण जरुर या सवलतीचा लाभ घ्यावा! खरेदीसाठी क्लिक करा....
-->
येत्या शनिवारी म्हणजेच दिनांक ७ जानेवारी २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजता, नूतन बांदेकर लिखित मनतरंग (भाग १) या ललित लेखसंग्रहाचे व अॅडिओ सीडीचे प्रकाशन नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महानगरपालिका मुख्यालय, पहिला मजला, ठाणे (प) येथे होणार असून माननीय महापौर संजयजी मोरे (ठाणे महानगरपालिका) यांच्या हस्ते प्रकाशन होईल. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संपदा जोगळेकर-कुलकर्णी (अभिनेत्री), मिलिंद बल्लाळ (संपादक दै. ठाणे वैभव) , दीपक वेलणकर (व्हॉईस गुरु) ही नामवंत व्यक्तिमत्व लाभलेली आहेत. आपण या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती !
श्रोते हो, आपण माझ्या लिखाणाला देत असलेल्या उदंड प्रतिसादामुळे मला सतत लिहीत रहाण्याची उर्जा मिळते. तीच विचारांची मालिका आणि तंत्रज्ञानाची कास धरुन निर्माण झालेलं त्याचं हे श्राव्यरुप मी खास आपल्यासाठी सादर करीत आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी माझा हा खारीचा वाटा ! आजच्या विद्यार्थी वर्गाला मराठी भाषा वाचन आणि उच्चार सुधारण्यासाठी मदतीचा हात देण्याचा आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी माझा हा वेगळा प्रयत्न आहे. आपण माझी ही नवनिर्मिती स्विकारुन, नक्कीच प्रतिसाद द्याल, ही अपेक्षा !
घेऊन तेव्हा येईन मी, विचारांचे नवीन रंग !
द्याल जेव्हा साद मित्र हो, पुन्हा उमटतील मनतरंग !
मनापासून धन्यवाद !
- नूतन बांदेकर

लेखक मनोहर महादेव भोसले यांनी स्वतः च्या मनोगतामध्ये आजच्या काळातील स्त्रियांच्या बदलत्या विचार सरणीला स्पर्श केला आहे. लग्नामध्ये किंवा लग्न झाल्यावर अनेक वस्तूंच्या किंवा आर्थिक गोष्टी बद्दल एकमेकांचे वाद विवाद असतात. परंतु लेखकाने अनुभवलेल्या एका प्रसंगांमध्ये स्त्रीचे मत स्पष्टपणे आणि योग्य ठिकाणी मांडणे कितपत आवश्यक आहे याची सर्वांना नक्कीच कल्पना येईल. आजच्या या २१व्या युगातील महिलांमधील शारीरिक, मानसिक, भावनिक वैचारिक बदला बद्दलची ही लघुनाटिका आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांनाही समान मानले जाते परंतु काही धार्मिक पंडित म्हणवून घेणा-या व्यक्तीच्या मूळे लिंगभेद निर्माण केला जात आहे. त्याचा परिणाम संपूर्ण मानव जातीवर होतो आहे लिंगभेदामुळे अनेक नवनवीन वाद विवाद होत आहेत. पुरुषांना सर्व बाबतीत मुक्तता असते परंतु स्त्रीयांवर अनेक प्रकारची बंधने घातली जातात. भारतीय संस्कृती हि पुरुष प्रधान मनाली जाते परंतु कोणताही पुरुष हा स्त्री शिवाय अपूर्णच आहे.
वंश आणि अंश या लघुनाटिकेमध्ये लेखकाने एका काल्पनिक विवाहात स्त्री पुरुषामध्ये लिंगभेदामुळे घटस्फोट घेण्यासाठी ते कोर्टामध्ये जातात. त्या दोघांनाही घटस्फोट हवा असतो परंतु त्यांना तीन मुली असतात त्या मुलींच्या जोपासनेसाठी लागणारी पोटगी त्या महिलेला मिळावी यासाठी ते कोर्टात जातात. तेथे त्यास्रीला सर्वजण वंशाचा दिवा मानला जाणारा मुलगाच हवा आणि ते ती स्त्री देऊ शकत नाही म्हणून तिचा पती घटस्फोट घेत असतो. परंतु मुलं जन्माला घालणे हे फक्त एका स्त्रीचे काम नसून त्यामध्ये पुरुष देखील खुल महत्वाची भूमिका बजावत असतात. कोर्टा मध्ये काही जेष्ठ आणि तज्ज्ञ व्यक्ती तसेच डॉक्टर यांना बोलावून मुलं जन्माला घालणे, त्यासाठी आवश्यक असणा-या गोष्ट या सर्व बाबींची चर्चा होते.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार स्त्री मध्ये फक्त X पेशी असतात तर पुरुषामध्ये X आणि Y अशा दोन प्रकारच्या पेशी असतात पुरुषापासून मिळालेल्या पेशींनुसारच जे बाळ जन्माला येणार आहे ते स्त्री किंवा पुरुष ठरत असते त्यामुळे स्त्रियांना दोष देण्यापेक्षा पुरुष ही तितकाच जबाबदार आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे. स्त्री ही नेहमी जमिनीची भूमिका बजावते तर पुरुष हा शेतक-याची भूमिका बजावत असतो पुरुष जे पेरतो तेच उगवत असते मग पुरुषाने काय पेरायचे ते स्वतः ठरवावे लागेल.
लेखक मनोहर भोसले यांनी मुलगा किंवा मुलगी या दोघात ही वंश न समजता तो आपला अंश आहे म्हणून त्याचा सर्वांगीण विकास केला पाहिजे. असा मुक्त विचार सरणीचा संदेश खूप छान पद्धतीने दिला आहे. शाळा, कॉलेज, महाविद्यालयामध्ये ही लघुनाटिका सादर व्हावी आणि समाज जागृतीचे आणि प्रबोधनाचे कार्य होणे आवश्यक आहे आणि ते वंश आणि अंश या लघु नाटिकेतून नक्कीच होईल असा मला ठाम विश्वास वाटतो. लेखकाला पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा.
- मंगेश विठ्ठल कोळी (लेखक-संपादक-समीक्षक)
o Title - Vansh Aani Ansh (वंश आणि अंश)
o Author - Manohar Mahadev Bhosale (मनोहर महादेव भोसले)
o Price - Rs. 40/- (मूल्य 40/- रुपये)
o Publisher - Dr. Sunil Patil (डॉ. सुनील पाटील)
o Publication - KavitaSagar Publication (कवितासागर प्रकाशन)
o Contact - 02322 - 225500, 09975873569
o Email - sunildadapatil@gmail.com
“बगळा” या प्रसाद कुमठेकरांच्या कादंबरीचा ज्येष्ठ साहित्यिक चरित्रकार वीणा गवाणकर यांनी घेतलेला आस्वाद
महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या अंदाजे १८ टक्के मराठी माणूस हा बृहन्महाराष्ट्रात वास्तव्यास असतो. मराठ्यांच्या साम्राज्याला टिकविण्यासाठी आणि एकेकाळी त्यांचा झेंडा अटकेपार फडकविण्यासाठी, निमूटपणे मराठ्यांच्या सैन्याबरोबर बृहन्महाराष्ट्रात गेलेला हा मराठी माणूस गेल्या २५० पेक्षा जास्त वर्षांपासून त्या त्या प्रांतात आपापल्यापरीने स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेत आनंदी आहे.
मधु मंगेश कर्णिकांच्या लेखणीतून तब्बल १२ वर्षानंतर लिहिली गेलेली कादंबरी. इंग्रजांना ब्रह्मदेशचा राजा थिबा याला रत्नागिरीला आणून स्थानबध्द केलं. राजाचा मोठा डामडौल होता. राण्यांवर तो खूप खर्च करावयाचा. आपल्या राहणीमानाला पूरक व्हावं म्हणून त्याने पोत्यांमधून जडजवाहिर बोटीत बसायच्या आधी टाकून घेतलं होतं. रत्नागिरीला आल्यावर जवळचे जडजवाहिर विकून ते आपला थाट करीत होते. रत्नागिरीला त्यांच्यासाठी 'थिबा पॅलेस' बांधण्यात आला. घरातील अंतर्गत बाबींचा यात अंतर्भाव केलेला आहे.
राजा थिबा
लेखक : मधु मंगेश कर्णिक
प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
मूल्य : १३०/- रुपये
पाने : १२८
मराठीतील १०० वाचनीय पुस्तके..
जीवनाच्या विविध पैलूच्या भावना समर्थपणे व्यक्त करणारा काव्यसंग्रह बालपणीच्या पहिल्या हुंकारापासून माणसाचं व्यक्त होणं सुरू होतं आणि आयुष्यात घडणार्या चांगल्या वाईट प्रसंगात प्रत्येक माणूस व्यक्तीपरत्वे व्यक्त होत असतो. नव्हे आयुष्यभर व्यक्त होण्याचा त्याला ध्यास लागलेला असतो. त्यामुळेच व्यक्त होणं हे माणसाच्या जिवंतपणाचं लक्षण समजले जातं. मिलींद वि. देशपांडे व्यक्त मी अव्यक्त मी : प्रा. सुनील जोशी भ्र.: 9273807046 पाने : ११२, किंमत : १०० रू. प्रकाशक : नचिकेत प्रकाशन मो. : 9225210130
नुकतेच Three Thousand Stitches हे सुधा मुर्ती यांचे पुस्तक वाचून हाता वेगळे केले . या पुस्तकात त्यांनी त्यांचे काही अनुभव कथन केले आहेत . हे अनुभव वाचकांचे केवळ मनोरंजन करत नाहीत तर काही तरी पदरात टाकून जातात . श्रीमंत करून जातात !
सुधा मुर्ती या लेखिका म्हणून सर्वाना परिचित आहेत , पण त्या 'एक व्यक्ती 'म्हणून किती मोठ्या आहेत याची कल्पना हे पुस्तक वाचून येते . पुस्तक वाचताना आपला मोठेपणा त्या वाचकावर लादत नाहीत . आपलीच एखादी लहान /मोठी बहीण आपली सुख -दुःखे , यश -अपयशाच्या कथा आपल्याशी 'शेअर ' करतेय असा भास होतो .
हे पुस्तक इंग्रजीत आहे . इंग्रजी बद्दल एकंदरच आपल्या मनात न्यूनगंड आहे . इंग्लिश बोलण्या इतकेच वाचनाला सुद्धा आपण बिचकतो . पण या पुस्तकातली भाषा परकी वाटत नाही . अत्यंत सोपी ,साधी आणि प्रवाही (म्हणूनच प्रभावी ), भाषा आहे .
सुधाजीनी इंग्रजीत लिखाण कसे सुरु केले याचा किस्सा ऐकण्या सारखा आहे . त्यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण त्यांच्या मातृभाषेत म्हणजे कानडी माध्यमात झाले . त्यांना एकदा 'न्यू इंडियन एक्सप्रेस ' या इंग्रजी वृत्तपत्रातून साप्ताहिक स्तंभ लेखना साठी विचारणा झाली . त्या वर त्या म्हणाल्या कि मला इंग्लिश पेक्षा कानडीतुन कथन करणे सोपे जाईल . त्यावर एक प्रसिद्ध पत्रकार (TJS George )म्हणाले कि 'भाषा एक माध्यम /वहान आहे . तुमच्यातला कथा गुंफणारा लेखक महत्वाचा असतो . तेव्हा भाषेचा फारसा बाऊ न करता लिहिते व्हा , भाषा तुमच्या लिखाणाला आपोआप साहाय्यभूत होत जाईल !' आणि त्यांचा साहित्य प्रवास सुरु झाला . तात्पर्य इतकेच कि भाषा गौण लेखन /वाचन महत्वाचे .
१९९६ला इन्फोसिस फाउंडेश स्थापन झाली . सामान्य माणसांना मदत करण्याच्या उद्देशाने हि Non Profit संस्था काढण्यात आली . या विश्वविख्यात संस्थेच्या चेअरपर्सन आहेत सुधा मुर्ती .
सुधाजीनी 'देवदासी पुनर्वसन आणि जागरूकता ' या स्फोटक प्रोजेक्ट पासून सुरवात केली . त्या वेळी त्या अननुभवी होत्या . एकी कडे छुपा सामाजिक विरोध ,दुसरीकडे देवदासी ,बोलणेतर दूरच पण जवळ पण येऊ देईनात . ज्या देवदासींना त्यांना चपला ,टमाटे फेकून मारले ,त्याच देवदासींना तीन हजार 'हातानी ' प्रेमाचे प्रतीक म्हणून , एक -एक टाका घालून विणलेली चादर एका भव्य कार्यक्रमात 'भेट ' दिली ,इथपर्यंतचा प्रवास Three Thousand Stitches या पहिल्या प्रकरणात आहे .पण खरी 'भेट 'होती ती ,या देवदासींनी ,सुधाजींच्या मदतीने ,या गलीच्छ प्रथे पासून करून घेतलेली सुटका ,आणि समर्थपणे सामान्य ,सन्माननीय जीवन जगण्याचा घेतलेला वसा ! आज याच देवदासींची मुलं उच्य शिक्षित ( डॉक्टर ,इंजिनियर वगैरे) आहेत .!
काशी यात्रा केल्यावर ,आपल्या आवडीचे काही तरी सोडावे लागते ,अशी आपली प्रथा आहे . Three Handful Of Water या प्रकरणात सुधाजीनी काय वर्ज केले हे वाचून तुम्ही अवाक व्हाल ( मी झालोय !)
कपड्यावरून माणसांची 'किंमत ' ठरवणार ,स्वतःहास श्रीमंत आणि इतरांना Cattle Class म्हणून हिणवणारा एक वर्ग उदयास आला आहे . अश्याच एकाचा अनुभव Cattle Class मध्ये वाचायला मिळतो .
भारतातल्या गरजू ,गरीब महिलांना नौकरी आणि मोठ्या पगाराचे आमिष दाखून परदेशात कशी पिळवणूक आणि अडवणूक होते हे No Place Like Home मध्ये .
सिनेमाचे वेड ,तुमच्या माझ्या प्रमाणे सुधाजीना पण आहे ! Bollywood चा इतर देशातील प्रभाव ,आणि त्याचा त्यांना आलेला अनुभव ,A Powerful Ambassador मध्ये त्यांनी लिहलंय . मला हे प्रकरण 'मस्त ' वाटले .
इतकेच नाही तर अजून हि बरेच काही या पुस्तकात आहे . हि फक्त काही उदाहरणे आपल्या साठी दिलीत .
त्यांचा जन्म आपल्या सारखाच मध्यम वर्गीय ,सुशिक्षत , संस्कारक्षम घरात ,आणि वातावरणातला झाला , ('आपल्या सारखा 'या साठी लिहल कि मी हि साधारण अशाच वातावरणात वाढलोय -माझा जन्म १९५२ चा ) पण त्यांची 'झेप ' अफाट आहे ! हे त्यांनी कसे साध्य केले ? या साठी या पुस्तकातील काही प्रसंग सूचक आहेत .
तेव्हा इंग्रजीची भीती बाजूला सारून हे पुस्तक जरूर वाचा , वाचनानंदाची gurantee माझी !
Title of Book : Three Thousand Stitches
Author : Sudha Murty
Publication : Penguin Random House India 2017
-- सु र कुलकर्णी .
(माझा पहिलाच प्रयत्न . परीक्षण कसे वाटले ? जरूर कळवा . आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye . )
Copyright © 2025 | Marathisrushti