राजमाता जिजाऊ
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteजिजामाता या राजमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ या नावांनी त्या प्रचलित आहेत. मराठा साम्राज्याच्या संस्थापक म्हणूनही त्यांचे नाव आग्रहाने घेतले जाते.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteजिजामाता या राजमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ या नावांनी त्या प्रचलित आहेत. मराठा साम्राज्याच्या संस्थापक म्हणूनही त्यांचे नाव आग्रहाने घेतले जाते.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteछत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरचे शाहू, राजर्षी शाहू, चौथे शाहू अशा नावाने प्रसिद्ध होते. छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापुर संस्थानाचे छत्रपती होते. ब्रिटिश राजवटीच्या काळात सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहू महाराजांनी केलं. बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले. महाराजांना राजर्षी ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteनटसम्राट’ हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर उभे राहते ते एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे ‘डॉ. श्रीराम लागू’ भारतीय चित्रपटाच्या इतिहासातले एक तेजस्वी अभिनय पर्व असलेले, नटसम्राट गणपतराव बेलवलकरांसारखी अनेक पात्रे रंगभूमीवर चिरंजीव करणारे, अनेक नाटककारांना प्रयोजन देणारे, व्यक्तिमत्व म्हणजे, डॉक्टर श्रीराम लागू. मराठी रंगभूमीवरचा नटसम्राट या शब्दात श्रीराम लागूंचे वर्णन करता येईल. भूमिका जिवंत करणे हा वाक्प्रचार लागूंच्या बाबतीत अगदी खरा ठरतो. मराठी रंगभूमी, चित्रपट, हिंदी चित्रपट यात यशस्वी मुशाफिरी करणारे लागू खऱ्या अर्थाने रमले ते नाटकातच.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteबाबूरावांचे मुंबईतील गिरगावात चष्म्याचे दुकान होते. सुरुवातीला तेथे बसून बाबूराव रहस्यकथा लिहीत. दुकानात चष्मा खरेदी करण्याऐवजी लोक रहस्यकथा लेखक बाबूरावांना पहायला येत. बाबूराव जेपी (जस्टिस ऑफ पीस) होते; ते स्वातंत्र्य सैनिकांच्या संघटनेचेही काम करीत. त्यामुळे त्यांना खूप फोन येत, याचा आणि बाहेरील वर्दळीचा त्रास होऊ लागल्याने ते अनेकदा एखाद्या गुप्त ठिकाणी जाऊन लेखन करीत.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteसंख्याशास्त्रात कारकीर्द करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राम प्रधान यांनी वर्गमित्र स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन थेट वरिष्ठ पदावर विराजमान झाल्यानेच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि १९५२ साली भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) प्रवेश केला.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site२०१४ मध्ये स्वच्छ भारत अभियानाचा राजदूत व २०१९ मध्ये उत्तर प्रदेश फिल्म डेव्हलपमेंट काउन्सिल चा अध्यक्ष होण्याचा बहुमान राजू भाईंना मिळाला.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteआयन रँड यांची सर्वात जास्त गाजलेली ‘ॲटलास श्रग्ड’ ही कादंबरी १९५७ मध्ये प्रकाशित झाली. ॲटलास हे स्वतःच्या खांद्यावर पृथ्वी तोलून धरणारे ग्राीक पुराणकथेतील पात्र. या कादंबरीत जग तोलून धरणाऱ्या आदर्शवत मानवांची अशीच कल्पना केली आहे. त्यांनी एखाद्या क्षणी जर ही जबाबदारी नाकारली आणि खांद्यावरील ओझे झटकले तर काय.. मात्र हे आदर्श पूर्णपणे वस्तुनिष्ठतावादाला धरून आहेत. हे काही पारंपरिक नैतिक कसोटीवरचे सामाजिक धार्मिक आदर्श नव्हेत! स्वार्थ, आत्मकेंद्रित असणे म्हणजे पाप नाही हे यात ठासून सांगितले आहे.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteअवघ्या १८ वर्षांच्या असताना त्या झाशीच्या प्रमुख झाल्या. इतक्या लहान वयात हे पद मिळाल्याने त्या काळात लक्ष्मीबाई प्रसिद्ध झाल्या. धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या होत्या.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteकुसुमताईंचे नाव मराठी रंगभूमीवरच्या एका महत्त्वाच्या कलाकृतीशी जोडलेले आहे आणि ती कलाकृती म्हणजे लक्ष्मीबाई टिळक यांच्या ‘स्मृतीचित्रे’ या आत्मकथनावरील एकपात्री प्रयोग. कुसुमताईंचे चुलत बंधू सीताकांत हेगडे यांनीच मूळ पुस्तकावरून रंगावृत्ती तयार केली होती आणि या एकपात्री कार्यक्रमाचे दिग्दर्शन नाटककार विजय तेंडुलकर यांनी केले होते. त्यामुळेच नंतर ‘सखाराम बाइंडर’साठी तेंडुलकरांनी कुसुमताईंचे नाव दिग्दर्शक कमलाकर सारंग यांना लक्ष्मीच्या भूमिकेसाठी सुचवले. मध्यमवर्गिय जाणिवांना आणि दिवाणखान्याच्या चौकटीतल्या नाटकाला धक्का देणाऱ्या ‘सखाराम बाईंडर’मधील लक्ष्मी कुसुमताईंनी अफलातून रंगवली आणि मराठी नाट्य इतिहासात स्वतःचे स्थान निर्माण केले.
Copyright © 2025 | Marathisrushti