No Picture
लेखसंग्रह

अंधेरी नगरी…!

Category:

 

भारनियमनाचा परिणाम दैनंदिन जीवनावर तर झालाच आहे , पण शेती आणि उद्योगाचीही पार वाट लागली आहे. राज्यातील उद्योगांना या अतिरेकी भारनियमनामुळे रोज कोट्यवधीचा फटका बसतो आहे.
सध्या संपूर्ण राज्याला सूर्याच्या काहिलीसोबत भारनियमनाच्या उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

No Picture
लेखसंग्रह

कुपोषण : मुळापर्यंत पोहचण्याची गरज !

Category:

 

प्रकाशन दिनांक :- 03/04/2005

डॉ. अभय बंग यांच्या नेतृत्वाखाली ‘बालमृत्यू मूल्यमापन समिती’ने आपला दुसरा आणि अंतिम अहवाल शासनाला नुकताच सादर केला. या अहवालात राज्यातील बालमृत्यूंना आळा घालण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची शिफारस करण्यात आली आहे.

No Picture
लेखसंग्रह

राखेतून सोन्याचा धूर!

Category:

 

तार्किकदृष्ट्या या आगींमागील कारणांचा वेध घेतल्यास अशा घटनांमागे मोठे अर्थकारण असल्याचे सहज स्पष्ट होते. कापूस खरेदी आटोपलेली असते, कापसाच्या गठाणी बांधून तयार झालेल्या असतात. बाकी असते ती केवळ प्रतवारी आणि मूल्यांकन.

No Picture
लेखसंग्रह

मराठी टक्का घसरतोय!

Category:

 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. विलासरावजी देशमुख यांनी परवा एका पब्लिक स्कूलच्या भूमिपूजन समारंभात महाराष्ट्रात मराठी टक्का घसरतोय अशी खंत बोलून दाखविली. पूर्वी केवळ मंत्रालयातील अधिकाऱ्यांचीच नावे अमराठी होती, आता तर चक्क मंत्र्यांच्या नावाच्या पाट्यादेखील अमराठी आडनावाने सजू लागल्या आहेत, असे काहीसे ते बोलले.

No Picture
लेखसंग्रह

कत्तल गोवंशाचीच नव्हे समृध्दी आणि मूल्यांचीहा!

Category:

 

प्रकाशन दिनांक :- 20/03/2005

बहुसंख्यकांची इच्छा प्रमाण मानणे हेच लोकशाहीचे मूलभूत बीज आहे. संसद, विधिमंडळ, मंत्री, खासदार, आमदार या सगळ्या लोकशाही वृक्षाच्या शाखा- उपशाखा मूळ बीजाच्या पोषणातूनच फुलत गेल्या, फळत गेल्या. परंतु दुर्दैवाने या बाह्य विस्ताराच्या कौतुकात मूळ बीजाकडे कायम दुलर्क्ष होत आले.

No Picture
लेखसंग्रह

कुठे मिळतो स्वाभिमान ?

Category:

 

प्रकाशन दिनांक :- 13/03/2005

इतरांना शहाणपण शिकविण्याची सवय बऱ्याच लोकांना असते. आपल्याला कळते तेवढे दुसऱ्या कुणालाच कळत नाही, त्यामुळे या दुसऱ्यांना शहाणपणाच्या चार गोष्टी सांगायचा आपल्याला अधिकार प्राप्त झाला आहे, अशा भ्रमात बरेच लोक वावरत असतात. वस्तुस्थिती मात्र अशी असते की, इतरांना शहाणपण शिकविणारे हे लोकच मुळात अज्ञानी असतात.

No Picture
लेखसंग्रह

नाक दाबावेच लागेल.

Category:

 

प्रकाशन दिनांक :- 06/03/2005
बिहार, झारखंड विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर उद्भवलेली राजकीय परिस्थिती आणि त्यानंतर सुरू असलेला लोकशाहीचा तमाशा बघता निवडणूक पद्धतीत आमूलाठा सुधारणा करणे अत्यंत गरजेचे ठरले आहे. या दोन्ही राज्यात आणि याआधी केंद्रात तसेच इतर राज्यातदेखील खंडित जनादेशामुळे जी काही राजकीय साठमारी झाली अथवा होत आहे ती नक्कीच लोकशाहीचा गौरव वाढविणारी नाही. केवळ सत्तेसाठी आपल्या विचारधारा, श्रद्धा वेशीला टांगून राजकीय पक्षांमध्ये अक्षरश: अनैतिक सौदेबाजी होत असते.

No Picture
लेखसंग्रह

शेतकरी आणि प्रतिष्ठित

Category:

 

आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कृषिक्षेत्राच्या, कृषकांच्या समस्या, त्यांच्या निराकरणाचे मार्ग या विषयावर चर्चेला पेव फुटले आहे. भारताचा शेतकरी प्रचंड हलाखीत जगतो आहे, शेती हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरत आहे, यावर झाडून साऱ्यांचे एकमत असते; परंतु शेतकरी दरिद्री का आहेत, यावर फारशा गांभीर्याने कोणी चिंतन करताना दिसत नाही. गॅट करारामुळे जागतिक व्यापार खुला झाला.

No Picture
लेखसंग्रह

अनाकलनीय!

Category:

 

प्रकाशन दिनांक :- 06/02/2005

भौतिक सुखांची जिथे रेलचेल आहे त्या अमेरिकेतील अर्धी जनता आज झोपेच्या गोळ्या घेते. केवळ मन:शांतच्या शोधात ड्रग्जच्या आहारी जाणाऱ्या तरुणांची संख्या अमेरिकेत प्रचंड आहे. 11 सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर तर संपूर्ण अमेरिकन जनमानस एका अज्ञात दहशतीच्या छायेखाली जगत आहे.

No Picture
लेखसंग्रह

जनता मंत्र्यांकडे, दुकानदार अधिकार्‍यांकडे!

Category:

 

प्रकाशन दिनांक :- 20/02/2005

र्ीकाम करून घेणे’ ही संकल्पना अलीकडील काळात मोठ्या प्रमाणात रूढ झाली आहे. एवढेच नव्हे तर काम करून घेण्याची कला आत्मसात करणे हीच यशाची एकमेव गुरुकिल्ली ठरू पाहात आहे. अर्थात केवळ वाच्यार्थाच्या दृष्टीने विचार केल्यास त्यात वावगे असे काहीच दिसत नाही, परंतु ‘काम करून घेणे’ या संकल्पनेमागील लक्षार्थ मात्र बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित करून जातो.