रंग भरले कळीत
कळी उमलेल आता
तिच्या अंतरी फुलेल
एक नाजूक कविता….
Author
Post Views: 4
रंग भरले कळीत
कळी उमलेल आता
तिच्या अंतरी फुलेल
एक नाजूक कविता….
केशवसुतांनी कवितेतून कवित्वाची नवी जाणीव प्रकट केली हे त्यांचे वैशिष्ट्य. ‘आम्ही कोण? ‘ या कवितेत कवितेबद्दलचा विचार मांडला आहे, पण त्याशिवाय त्यांच्या इतरही अनेक कवितांमधून त्यांनी कवितेचे महत्त्व ठासून सांगितले आहे. ‘अशी असावी कविता म्हणून’, ‘रांगोळी घालताना पाहून’, ‘जे रम्य ते बघुनिया मज वेड लागे’, ‘जिने मला वेडे केले तिच्यावरी ही फिर्याद’ किंवा ‘दुर्मुखलेला’ या कवितांमधून त्यांनी कवितेच्या निर्मितिप्रक्रियेविषयी व एकूणच कवितेचे मोठेपण दाखवून दिले आहे. […]
‘कोलंबसाचे गर्वगीत’ ही कुसुमाग्रजांच्या गाजलेल्या कवितांपैकी एक. या कवितेत मानवतेचे निशाण हाती घेऊन नवनवे प्रदेश शोधून काढणाऱ्या कोलंबस या खलाशाचे, त्याच्या ध्येयासक्तीचे चित्रण कुसुमाग्रजांनी केले आहे. ही कविता कुसुमाग्रजांनी १९३६ मध्ये लिहिली. त्या वेळी ते केवळ चोवीस वर्षांचे होते. ऐन तारुण्यात त्यांच्या प्रतिभेने मोठी झेप घेतली आणि काव्यप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. […]
आईची महती अनेक थोर कवींनी वर्णन केली आहे. ‘प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई’ – माधव जूलियन, ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ -यशवंत, ‘निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी – भा. रा. तांबे किंवा ‘अंतरले पाय तुझे हाय हाय माते ।’ – केशवसुत. आई आपल्या मुलाची मायेने काळजी घेते. त्याला घास भरवते. लहानाचा मोठा करते. आजारपणात सेवा करते. आईमुळेच घराला घरपण येते. मुलाला घडवण्यात, त्याच्यावर चांगले संस्कार करण्यात आईचा वाटा फार मोठा असतो. चार-पाच दिवस जरी आई घरापासून दूर बाहेरगावी गेली तर घर सुने सुने होऊन जाते. आईच नसलेले घर तर अगदी पोरके होऊन जाते. इतके आईचे स्थान महत्त्वाचे आहे. […]
Copyright © 2025 | Marathisrushti