Year: 2026
शेवटचे दिस
Category:
कथा साहित्य - ललितप्रत्येक घरात स्वत:ला जाणे शक्य नाही म्हणून ईश्वराने आई निर्माण केली. स्त्री-पुरुष प्रमाणाचा समतोल राखण्यासाठी त्याला काही पुरुषांमध्ये मातृहृदय टाकावे लागते. त्याच्या आदेशानुसार त्यातले काही संतमहात्मे बनून जगाच्या कळवळा घेऊन पृथ्वीवर अवतरतात, तर काही प्रपंच करण्यासाठी येतात. प्रपंच करीत असले तरी त्यांची कळवळ्याची जाती संतांप्रमाणेच असते. माझे बाबा त्यांच्यापैकी एक हे निश्चित.
सर्वांगीण दर्जा व्यवस्थापन : एक दृष्टीकोन
Category:
लेखसंग्रहमागील काही वर्षे गुणवत्ता किंवा दर्जा ही संकल्पना औद्योगिक क्षेत्रासह इतर क्षेत्रात खूपच पुढे येते आहे. तिचे मूळ किंवा प्रारंभ “inspection” ह्या शब्दापाशी आहे. त्यानंतर ती संकल्पना quality control, quality assurance, quality engineering अश्या रुपात पुढे सुद्रुढ होत गेली. एखाद्या वस्तूचे उत्पादन करताना ते उत्पादन विभागाकडून आधी दिलेल्या तपशीलाप्रमाणे [specification] केले जाते. वस्तू चांगल्या गुणवत्तेची बनवण्यावर साहजिकच भर दिला जातो.
रणांगण – मराठी नाटक
Category:
मराठी नाटक व्हिडिओज - Marathiविश्वास पाटील यांच्या कथेवर आधारित ऐतिहासीक नाटक
दूतघटोत्कच
Category:
साहित्य - ललितभासांचे एक अंकी नाटक. उत्सृष्टिकांक हा याचा रूपकप्रकार. काही अभ्यासकांच्या मते व्यायोग रूपकप्रकार आहे, परंतु या रूपकाची लक्षणे उत्सृष्टिकांकाला अधिक लागू पडणारी आहेत या नाटकातील सर्व पात्रे ही महाभारतातील प्रसिद्ध पात्र असली तरी कथानक संपूर्णत: कवींच्या कल्पनेतून साकारलेले आहे.घटोत्कचाने दूत म्हणून कौरवां कडे जाणे असा या नाटकातील प्रसंग मूळ महाभारतात नाही.
आम्हाला बी थोडं घडवां की हो
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकअब्राहम लिंकन सांगून थकले की माझ्या मुलाला हे शिकवा माझ्या मुलाला ते शिकवा, त्यांनी मुख्याध्यापकांना लिहिलेलं पत्र मुख्याध्यापकांच्या खोलीत फोटो फ्रेम मध्ये बंदिस्त झालं आहे. फ्रेम मध्ये बंदिस्त केले की विचार ही बंदिस्त होतात कां?प्रेरणेच्या पायवाटा या धूळ खाण्यासाठी नसून त्याच्यावरून मार्गक्रमण करण्यासाठी असतात. शाळेत फक्त अभ्यासक्रम शिकवतात. संस्कार करणं शाळेची जबाबदारी आहे असं परिपत्रक तरी अजून निघालेले नाही कारण परिपत्रकाच्याच मार्गाने काही शाळा मार्गक्रमण करतात.
मी विजेता होणारच
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकनशीबावर अवलंबून अनेक जण आयुष्य व्यतीत करतात. माझ्या नशिबात नाही, मी करूच शकत नाही, मी होऊच शकत नाही. पण मनानं ठरवलं आणि अंमलबजावणी केली की यश आपलंच असतं.मनानं ठरवणारे अनेक असतात,उद्या पासून करु म्हणणारे तिथेच राहतात.