बिसुर (सांगली) ते मुंबई व्हाया ठाणे – भाग – २
Category:
अवर्गिकृतसन १९९० ला लग्न झालं आणि सुविद्या पत्नी म्हणुन वृषालीनं संसाराची गोडी वाढवली. कठीण प्रसंगात पोलीस खात्यात काम करणाऱ्या एका कलंदर माणसाबरोबर अपेक्षा न करता ती माझ्या मागे ठामपणे उभी राहिली. अनेक संकटं आली पण ती कधी घाबरली नाही. म्हणुन यशस्वी वाटचालच नाहीतर मी उत्तुंग भरारी घेतली. कधी मागं पाहायला लागलं नाही. लग्नानंतर तिनं संसारवेल फुलवली. एका मागोमाग एक दोन फुलं बहरली.