No Picture
व्यक्ती-परिचय

प्रतिभाताई पवार

Category:

 

शरद पवार ६१ वर्षाचे झाले तेव्हा त्यांचा एकसष्टीचा वाढदिवस त्यावेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत साजरा केला होता. त्यावेळी भाषण करताना वाजपेयींनी पवार यांच्या अनेक गुणांचे वर्णन केले होते आणि शेवटचे वाक्य ते असे म्हणाले की, ‘सबसे बडी और महत्त्वपूर्ण बात यह है की, अनेक गुणों से मंडित पवारसाब ‘प्रतिभा’संपन्न भी है।’

No Picture
साहित्य - ललित

प्रारब्ध – भाग 2

Category:

 

गोष्ट सुमारे चाळीस वर्षापूर्वीची. माझ्या वडिलांची बदली झाली त्यावेळची. बदली झाल्यावर नाशिकहून आम्ही मुंबईला आलो. वडिलांना भायखळ्याला राणीच्या बागेजवळ, आता तिला जिजामाताबाग म्हणतात, ससेक्स रोडला मिस्त्री बिल्डिंगमध्ये सरकारी जागा मिळाली.

जागा कसली? एक दुमजली बंगलेवजा घराचा १ल्या मजल्यावरचा अख्खा अर्धा भागच होता तो! दोन मोठे प्रशस्त हॉल. तसंच मोठं स्वयंपाकघर. उंची चांगली बारा पंधरा फूट. मंगलोरी कौलं. तिन्ही बाजूंनी आठ दहा फूट रुंद प्रशस्त व्हरांडा. अगदी राजेशाही थाट! त्याच रस्त्यावरून म्युझियम ते राणीचा बाग अशी एक छोटीशी ट्रॅम गाडी पण यायची. आम्हाला तर फार मजा वाटायची. रात्री राणीच्या बागेतल्या वाघ-सिंहाच्या डरकाळ्या पण ऐकू यायच्या. एखाद्या गव्हर्नरच्या बंगल्यासारखाच थाट होता. नंतर समजले की पूर्वी तो बंगला म्हणजे जर्मन कॉन्सुलेटरचे ऑफिसच होते. आता तो मिस्त्री नावाच्या एका पारशाने विकत घेतला होता.

No Picture
व्यक्ती-परिचय

प्रकाश बाळ जोशी

Category:

 

प्रकाश बाळ जोशी हे एक बहुआयामी असं व्यक्तिमत्त्व आहे. गेल्या एक्केचाळीस वर्षापासून ते पत्रकारितेत आहेत. एका बाजूला सर्जनशील लेखन तर दुस-या बाजूला एक चित्रकार म्हणून मिळालेली आंतरराष्ट्रीय स्तरावरची ओळख याची त्यांनी स्वत:ची अशी एक खास शैली निर्माण केलेली आहे.

No Picture
व्यक्ती-परिचय

प्रकाश घांग्रेकर

Category:

 

प्रकाश घांग्रेकर मुळचे पुण्याचे.संगीत नाटकाची कारकीर्द घडवण्यासाठी १९६० साली मुंबईला आले. देवियाच्या द्वारी या नाटकातून त्यांची कारकीर्दची सुरवात झाली.

No Picture
व्यक्ती-परिचय

पुष्पा पागधरे

Category:

 

त्यांच्या वडीलींचे मनोर, वाडा येथे त्यांच्या भजनी मंडळाचे कार्यक्रम होत असत. त्यावेळी पाच-सात वर्षांच्या असलेल्या पागधरे वडिलांबरोबर भाग घ्यायच्या.

No Picture
अवर्गिकृत

भारतमातेच्या वीरांगना – 15 – झाशीची राणी

Category:

 

मे १८५७ ला मेरठ मधून संग्रामला सुरवात झाली. झाशी अजूनतरी शांत होते. राणी लक्ष्मीबाईंनी आपले सैन्य उभे करायला सुरुवात केली. हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करून, स्त्री शक्तीला जागृत केले, त्यांना आणि इतर बांधवांना धैर्य दिले. झाशी सदैव स्वतंत्र राहील ह्याचे आश्वासन सुद्धा दिले. जुनमहिन्यात संग्रामच्या झळा झाशीपर्यंत पोचल्या. आधी शेजारी राज्य ओरछा आणि दातीया राज्याकडून आक्रमण आणि मग ब्रिटिश सैन्याचे आक्रमण. शेजारी राज्यांना पराभूत करून राणी इंग्रजांविरुद्ध च्या लढाईसाठी सज्ज झाल्या. त्यावेळी राणीने आपल्या सैन्याला, लोकांना सांगितले, ‘आपण युद्धाला सज्ज आहोत, जर जिंकलो तर विजयाचा आनंदोत्सव साजरा करू आणि जर हरलो तर आपल्याला आत्मिक आनंद नक्कीच मिळेल की आपण शरणागती पत्करली नाही.’

No Picture
लेखसंग्रह

स्वदेशी धर्म आणि ग्राहक धर्म

Category:

 

पूर्वी ‘ईस्ट इंडिया कंपनी ने भारत लुटला. त्याविरोधात आपण लढलो. स्वातंत्र्यानंतर देशी उद्योगांनीही भारताची खरं तर अशीच लूट केली; पण ते ‘स्वदेशी’ उद्योग म्हणून आपण उगीचच त्यांना पावित्र्य बहाल केलं. ‘खा-उ- जा’ धोरणाअंतर्गत पुन्हा विदेशी उद्योग आले, नि त्यांनी लूटच चालू केली.

No Picture
लेखसंग्रह

आजी आजोबांचे आरोग्य – भाग ४

Category:

 

तोंडात अन्न घेतल्याबरोबर लगेचच लाळ येऊन पचनाची पहिली प्रक्रिया सुरू होते. वार्धक्यात कधीकधी लालाग्रंथींमधून पुरेशा प्रमाणात लाळ निर्माण होत नाही. याची अनेक कारणे असू शकतात. काही औषधांचे दुष्परिणाम, विशिष्ट आजारांचे लक्षण, केमो किंवा रेडिएशनचे दुष्परिणाम, लालाग्रंथींच्या नलिकांमध्ये खडा होणे, उलट्या होणे, तळलेले पदार्थ अधिक सेवन करणे, रक्तस्राव होणे, सिगारेट व तंबाखू सेवन करणे अशी मुख्य कारणे आहेत.

No Picture
व्यक्ती-परिचय

पुरुषोत्तम श्रीपत काळे

Category:

 

पुरुषोत्तम श्री काळे यांना जवळचे लोक अण्णा म्हणत असत. ललितकलादर्श’चे कल्पक चित्रकार आणि नेपथ्यकार म्हणून पु.श्री. काळे यांची ओळख होती. मराठी लेखक व.पु. काळे यांचे हे वडील होत. व.पु. काळे यांनी आपल्या वडिलांच्या वर “वपु सांगे वडिलांची कीर्ती” हे पुस्तक लिहिले आहे.